☆ ३० सप्टेंबर : जागतिक अनुवाद दिन ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
३० सप्टेंबर : जागतिक अनुवाद दिन
दोन संस्कृतींची जोडतो नाळ – सीमेपार घडवतो संवाद… अनुवाद
या अतिशय उचित व्याख्येनुसार ‘अनुवाद’ हे काम अतिशय उत्तमपणे करणा-या सर्व अनुवादकांना सर्वप्रथम मन:पूर्वक नमस्कार.
‘लेखन’ ही जशी ‘कला’ आहे, तशीच ‘अनुवाद करणे’ ही सुद्धा नक्कीच कला आहे. ‘अनुवाद म्हणजे भाषांतर’, असे ढोबळपणे मानले जाते—-आणि भाषांतर म्हणजे एका भाषेतल्या शब्दांसाठी दुस-या भाषेतले शब्द शोधून वाक्य लिहिणे इतकेच, असा सर्वसाधारण मोठा गैरसमज असलेला दिसतो. ‘अनुवाद’ या शब्दाला मात्र जरा जास्त पैलू आहेत.
भाषा कुठलीही असली, तरी त्यातून व्यक्त केल्या जाणा-या भावनांची आणि विचारांची विविधता, समृद्धता आणि ताकद, आपल्या मातृभाषेइतकीच प्रभावी असते… मनाला भिडणारी असते. म्हणूनच, आपल्या भाषेव्यतिरिक्त, इतर भाषांमधून प्रकट होणारे तितकेच मौल्यवान विचारधन आपल्यापर्यंतही पोहोचावे, यासाठी त्याचा आपल्या भाषेत अनुवाद करण्याचा विचार ज्यांनी सर्वप्रथम केला असेल, त्यांचे खूपच आभार मानायला हवेत.
वेगवेगळ्या संस्कृती जपणा-या वेगवेगळ्या वंशातल्या माणसांचा जीवनाकडे बघण्याचा नैसर्गिकपणे वेगवेगळा असणारा दृष्टीकोन, एकाच गोष्टीबद्दल वेगवेगळ्या माणसांचा असणारा वेगवेगळा विचार, आणि अशा विचारांवर त्या माणसांच्या संस्कृतीचा, भोवतालच्या परिस्थितीचा, त्यांच्या जगण्याच्या पद्धतीचा, नक्कीच होणारा खोलवर परिणाम—- या सगळ्यांमुळे वेगवेगळ्या भाषा असणा-या वेगवेगळ्या देशातले किंवा अगदी एकाच देशातल्या वेगवेगळ्या प्रांतातले साहित्यही खचितच वेगवेगळे असते—-लेखनशैलीतही वैविध्य असते. भाव-भावनांच्या छटाही वेगवेगळ्या असतात. जगभरातल्या अशा प्रचंड आणि वैविध्यपूर्ण साहित्याचा रसास्वाद घेणे साध्य व्हावे, यासाठी ” अनुवाद ” हा एकमेव सर्वोत्तम मार्ग आहे.
अशा वेगवेगळ्या भाषेतले, वाचकाच्या थेट मनाला भिडणारे समृद्ध साहित्य तितक्याच उत्तमपणे अनुवादित करतांना, अनुवादकाची भाषाही मूळ साहित्यिकाइतकीच समृद्ध, आणि तशीच थेट मनाला भिडणारी असणे अतिशय आवश्यक असते—-आणि म्हणूनच अनुवाद करतांना, फक्त मूळ शब्दाला अनुवादाच्या भाषेतला पर्यायी शब्द शोधला की झाले… असे कधीच करून चालत नाही. फक्त इंग्लिश भाषेबद्दल बोलायचे झाले, तर ‘गुगल-सर्च’ करून, किंवा डिक्शनरीत पाहून आपल्या भाषेत असलेले पर्यायी शब्द कुणालाही सहजपणे सापडू शकतात. पण एकाच इंग्लिश शब्दाचे मराठीत दोन अगदी वेगळे, आणि कधी कधी विरूद्ध अर्थही सापडू शकतात. आणि हे लक्षात घेता कुणालाही अनुवादाचे काम अगदी सहज जमेल, असे म्हणताच येत नाही. याचे मुख्य कारण असे की, उत्तम अनुवादकाला— ‘‘To be able to read between the lines” हे एक वेगळे आणि विशेष कौशल्य अवगत असणे अतिशय गरजेचे असते. कारण असे की, कोणत्याही लेखकाला, आपल्या विचारांना जसेच्या तसे, अगदी नेमके असे शब्दरूप देणे कितीदा तरी शक्य होत नाही. स्वत:चे विचार आणि भावना पोहोचवण्यासाठी भारंभार शब्द वापरतांना, मूळ विचाराची, भावनेची भरकट होणे, लिखाणात विस्कळीतपणा येणे स्वाभाविकपणे घडू शकते, जे त्याला आवर्जून टाळावे लागते. म्हणूनच त्याच्या दृष्टीने त्याच्या भाषेतला जास्तीत जास्त नेमका शब्द तो वापरतो. पण अनुवादकाच्या भाषेतल्या पर्यायी शब्दात त्या भावना नेमकेपणाने व्यक्त होतीलच असं नाही, आणि असे कितीदा तरी होऊ शकते. आणि म्हणूनच, अनुवादकाला ‘‘to read between the lines’’ ही त्याची खास क्षमता वापरून, मूळ लेखकाच्या भावना आणि विचार जसेच्या तसे पोहोचवण्याची मोठीच जबाबदारी पेलावी लागते… ” अनुवाद या संकल्पनेमागचे हे मूळ तत्त्व आहे “, याचे भान सतत ठेवण्याची जबाबदारी आणि खबरदारीही अनुवादकाला जागरूकपणे घ्यावी लागते. —-विशेषत: वेगवेगळ्या भाषेतल्या वाक्प्रचारांचा अनुवाद करताना तर जरा जास्तच. म्हणूनच अनुवादित साहित्य आपल्याच भाषेत असल्याने ते वाचायला-समजायला सोपे जात असले, तरी कुणीही याचा अर्थ असा घेऊ नये की, अनुवाद करणे हे सोपे काम आहे. अनुवादित साहित्याचा रसास्वाद घेतांना, मूळ लेखकाइतकेच श्रेय अनुवादकाचे असते, हे वाचकांनी नक्कीच लक्षात घ्यायला हवे. इतर अनेक भाषांमधील साहित्य, अनुवादाच्या माध्यमातून जणू नव्याने निर्मिले जात असते. म्हणूनच जुन्या जाणत्या विचारवंतांनी…‘‘अनुवाद म्हणजे अनुसृजन किंवा अनुनिर्मिती”… ही जी व्याख्या केलेली आहे, ती खरोखरच अतिशय सार्थ आहे.
आणखी विशेषत्त्वाने सांगण्याची गोष्ट अशी की, आता अनुवाद फक्त ललित साहित्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. आता अनेक शास्त्रीय विषय, अनेक प्रकारची संशोधने यांची विस्तृत माहिती देणारी, बहुपदरी मनोव्यापार विषद करून सांगणारी, वेगवेगळ्या आजारांवर वेगेवेगळ्या देशांमध्ये होणाऱ्या ‘निदान आणि उपचार’ या संदर्भातल्या संशोधनांची माहिती देणारी, प्रत्येकाला स्वत:चा व्यक्तित्त्व-विकास साधण्यासाठी उपयुक्त ठरणारी… अशी असंख्य विषयांवरची पुस्तकं जगभरात लिहिली जात असतात. आणि आजपर्यंत अशा अनेक पुस्तकांचे इतर अनेक भाषांमध्ये अनुवाद केले गेले आहेत… केले जात आहेत… त्यामुळेच मूळ साहित्याइतकेच अनुवादित साहित्याचे दालनही दिवसेंदिवस अधिकाधिक समृद्ध होत चाललेले स्पष्ट दिसते आहे… म्हणूनच ‘अनुवादित साहित्य’ हा साहित्य क्षेत्रात जागतिक पातळीवर सन्मानित असलेला विशेष साहित्य प्रकार’ आहे, असे आवर्जून म्हणायला हवे. जगभरातल्या साहित्यसंपदेत मोलाची भर घालणारी… साहित्यविश्वाला मिळालेली ही खरोखरच एक मौल्यवान देणगी आहे, हे मान्य करावेच लागेल.
म्हणूनच जगभरातल्या सर्व उत्तम अनुवादकांना आजच्या ‘जागतिक अनुवाद-दिना’च्या निमित्ताने पुन्हा एकदा मन:पूर्वक नमस्कार आणि तितकेच मन:पूर्वक धन्यवादही.
☆ जीवन रंग ☆ दांपत्य स्वप्न.. अनुवाद ☆ सुश्री सुमती जोशी ☆
एक
सुधीर आला होता. त्याच्या हातात गुलाछडीच्या फुलांचा गुच्छ. चेहऱ्यावर हसरा भाव. पंख पसरून मन जणू उडू उडू पहात होतं.
आल्याबरोबर सुधीर म्हणाला, “हासी, आज एक खुशखबर आहे. काय देशील सांग. नाहीतर सांगणार नाही.”
हासी म्हणाली, “सांगा ना प्लीज.”
“मला काय देशील ते आधी सांग.”
“मी आणखी काय देणार? तुमच्या रुमालावर छान कशिदा काढून देईन. मला एक सुरेख नमुना मिळालाय.”
“नाही, ते मला पसंत नाही.”
“मग काय हवंय तुम्हाला? चॉकलेट आहे. ते देऊ शकेन.”
“चॉकलेट घेऊन संतुष्ट व्हायला मी लहान बाळ आहे का?”
हासी हसू लागली. म्हणाली, “मला ऐकायचं नाही. कशिदा काढून द्यायला तयार होते, चॉकलेट द्यायची इच्छा होती, त्यामुळे जर आपलं…”
सुधीर म्हणाला, “आता मी निघतो.”
हासीनं पुन्हा विचारलं, “सांगत का नाही?”
“एक वस्तू मिळाली तर सांगू शकेन. तीच, जी त्या दिवशी मागितली होती.” असं म्हणून अर्थपूर्ण नजरेनं तो हासीकडे बघू लागला.
हासी लाजली पण तिने सावरून घेतलं. म्हणाली, “आपल्याला सांगून ठेवतेय, ते जमणार नाही.”
सुधीरच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर तिला भीती वाटली. सुधीर म्हणत होता, “मला वाटलं होतं हसत हसत मी बातमी सांगेन. पण जमलं नाही. मला क्षमा करा. तुझं लग्न साँतरागाछीच्या त्या तरुणाशी ठरलाय.”
असं सांगून सुधीर निघून गेला.
हासीनं पुन्हा हाक मारली, “सुधीरदा ऐकून जा.”
सुधीर परत आला नाही.
दोंन
अलका आलीय.
तीच अलका जिला भेटण्यासाठी अजय दिवसभर वाट बघत राही – केव्हा संध्याकाळ होईल आणि ती येईल!
अलका येऊन म्हणाली, “अजयदा इंग्लिशमध्ये ‘पेट’ या नावाची एखादी कथा आहे का?”
अजय म्हणाला, “आहे. पेट म्हणजे माथा.”
“खरं आहे का हे?”
“डिक्शनरी काढून बघ. पेट म्हणजे माथा.”
“आमची वरुणादी बरोबर सांगतेय ना!”
अजय म्हणाला, “ठीक आहे, मुंडकं याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात?”
अलका डोळे मिचकावत म्हणाली, “हेड.”
“हेड म्हणजे माथा.”
“मुंडकं म्हणजेही माथा.”
अजय हसून म्हणाला, “हेच का तुझं बांगला भाषेचं ज्ञान! माथा आणि मुंडकं म्हणजे एकच वस्तू!”
अलकानं हसून विचारलं, “फरक काय?”
गंभीर होत अजय म्हणाला, “तुझ्यात आणि पाँची धोपानी यांच्यात काही फरक आहे का सांग पाहू. दोघीही मुलीच आहेत.”
अलका विचारू लागली, “पाँची धोपानी कोण?”
“तुझ्या गल्लीच्या वळणावर धोब्याची मुलगी आहे ना! लहान वयाची – तुझ्याच वयाची असेल.”
(व्हाट्सअपवरून आलेल्या एका अतिशय चांगल्या मेसेजवरून सहज सुचलेलं.)
—–माणूस जिवंत असतानाच आपण त्याला का चांगले म्हणत नाही ? दुर्दैवाने तो गेल्यावर, मग त्याचे चांगले गुण आपण गौरव करून सांगतो. आपले एवढे मोठे मन का बरं नसावं, की आपण एखाद्याला त्याच्यासमोरच कौतुकाचे शब्द ऐकवावे.
—–विशेषे करून आपण बायका,समोरच्या बाईंचे कौतुक जरा हात राखूनच करतो ना?
काय हरकत आहे हो लगेच असं म्हणायला , की “ अग, किती सुंदर आहे ही तुझी साडी,
अगदी मस्त दिसतेय तुला.”
—–का नाही पटकन आपण म्हणत, “ किती ग मस्त केलेस तू वडे. अगदी अन्नपूर्णा आहेस बघ. “
—–पण सहसा हे लोकांच्या हातून होत नाही.—हे फक्त बायकांच्याच बाबतीत नाही मला म्हणायचे, तर पुरुष मंडळीही याला अपवाद नाहीत. ऑफिसमध्ये, कनिष्ठ पदावरच्या माणसाला प्रमोशन मिळालं , तर खुल्या दिलाने त्याचे कौतुक किती सहकारी करत असतील? फार कमीच.
—–ही वृत्ती लहान मुलांतही असतेच. पण पालकांनी त्याला खतपाणी घालता कामा नये. पहिल्या आलेल्या मुलाचे खुल्या दिलाने अभिनंदन करायला मुलांना आईवडिलांनी शिकवले पाहिजे.
—– सुंदर दिसणाऱ्या मुलीचे आपण कित्तीतरी वेळा मनातल्या मनात कौतुक करतो.
पण मग तिला तसे प्रत्यक्ष जाऊन सांगत का नाही ?–की, “ अग, किती छान दिसतेस तू.
तुझा चॉईस खूप छान आहे, तुला कपड्यातले खूप छान कळते ग. माझ्या बरोबर येशील का खरेदीला? “ —बघा किती आनंद होईल तिला.
—–सुनेने एखादा पदार्थ खरोखरच सुंदर केला, तर द्यावी ना सासूबाईंनी दाद की “ किती चव आहे ग तुझ्या हाताला. मस्त केलेस हो हे. ”
—–आनंद, हा कौतुक केल्याने द्विगुणित होतो— आम्ही पुण्याच्या प्रख्यात हुजूरपागा शाळेत शिकलो. मुख्याध्यापक बाईंच्या त्या ऑफिसमध्ये जायचीही भीती वाटायची तेव्हा, इतका त्या खुर्चीचा दरारा होता. पुढे फार वर्षांनी माझी मामेबहीण हुजूरपागेची मुख्याध्यापिका झाली. इतके कौतुक वाटले ना तिचे. तिला भेटायला आणि तिचे कौतुक करायला, तिला न कळवता आम्ही बहिणी शाळेच्या ऑफिसमध्ये गेलो. म्हटले, “ आमची बहीण कशी दिसते या खुर्चीत, ते बघायला आलोय आम्ही .” त्यावेळी तिचे आनंदाने भरून आलेले डोळे आजही आठवतात.
—–पाठीवर दिलेली कौतुकाची थाप तर आपल्या कुत्र्यालाही आवडते. मग आपण तर माणसे—का नाही समोरच्याचे वेळीच कौतुक करू? चार चांगले शब्द काय जड होतात का हो उच्चारायला?
—–या वरून आपल्या लाडक्या सुधा मूर्ती आठवतात.–तळागाळातील बायकांशी मैत्री करून, त्यांची सुखदुःख्खे जाणून घेऊन, त्यावर उपाय शोधून, पुन्हा कुठेही मोठेपणाची हाव न धरणाऱ्या सुधाताईंचे किती कौतुक करावे—-समाजाने वाळीत टाकलेल्या बायकांनी केलेल्या सुबक गोधड्या बघून, त्यांचे मन भरून कौतुक करणाऱ्या सुधाताई नुसत्या तेवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर त्यांना त्या विकायला त्यांनी बाजारपेठ उपलब्ध करून दिली. ,मान खाली घालायला लावणारा त्यांचा व्यवसाय त्यांना सोडायला लावून, नवीन दिशा दिली. आणि यातूनच, “ तीन हजार टाके ” हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक जन्माला आले.—–असे निरपेक्ष मोठे मन आपण किती लोकांकडे बघतो? फारच कमी. खरं तर आपल्या स्वतःपासूनच सुरुवात करत, आपणही खुल्या दिलाने इतरांचे कौतुक करायला शिकले पाहिजे.
—–मी मुलीकडे हॉंगकॉंग ला गेले होते. तिकडे फिरत असताना , आम्हाला बाबा गाडीत आरामात बसलेली दोन इतकी गोड बाळे दिसली ना—–मला लहान मुले अतिशय आवडतात. त्यातून ही गुबगुबीत आणि गोंडस जुळी मुले तर मिचमिचे डोळे करून आमच्याकडे बघत होती. मी त्यांच्या आईला विचारले, “ मी बोलू का यांच्याशी? ” ती हसली आणि म्हणाली,” हो, बोला की. पण ती चावतात बर का. जपूनच बोला. ” मी गुढग्यावर बसले, आणि चक्क मराठीत बोलू लागले त्या गोड बाळांशी. ती दोघेही जोरजोरात दंगा करायला लागली, आणि हात पसरून माझ्याकडे झेप घेऊ लागली. त्यांच्या आईला खूप मजा वाटली. किती अभिमानाने ती आपल्या गोड बाळांकडे बघत होती —–
—–प्रेमाला भाषा नसते हो—फक्त तुम्ही ते व्यक्त करा, ते समोर पोचते लगेच.
—– माणूस जिवंत असतानाच दाद द्या,
—–चार शब्द कौतुकाचे बोला,
—–तो माणूस शहरातून बदलून गेल्यावर, किंवा दुर्दैवाने या जगातूनच निघून गेल्यावर, मग हळहळून काय उपयोग ?
—–आपल्या भावना लगेचच पोचवायला शिका. वेळ आणि वाट नका बघत बसू.
कारण नंतर कितीही हळहळूनही , गेलेली वेळ परत येत नसते. मग आपल्या हातात,
“ अरेरे।” असं म्हणत पश्चात्ताप करण्याशिवाय काहीही उरत नाही.
—–मंडळी चला तर मग —करा सुरुवात दिलखुलास दाद द्यायला,—न कचरता.
आणि बघा, समोरचाही किती खुश होतो, आणि तुमचाही दिवस किती सुंदर जातो ते।।।
नेहमी स्वयंपाकघरात पिठाची पिशवी (अट्टा) ठेवा आणि ती कुठे आहे हे सर्वांना कळवा.
(कृपया शेवटपर्यंत वाचल्याशिवाय हटवू नका)
“हा स्वतः भाजलेल्या स्त्रीचा खरा जीवन अनुभव आहे …”.——
काही वेळापूर्वी, मी कॉर्न उकळत होतो आणि कॉर्न तयार आहे की नाही हे पाहण्यासाठी उकळत्या पाण्यात थोडे थंड पाणी ओतले. चुकून मी माझा हात उकळत्या पाण्यात बुडवला ….
माझा एक मित्र जो व्हिएतनामी पशुवैद्यकीय डॉक्टर होता घरी आला होता. म्हणून मी वेदनेने ओरडत असताना त्याने मला विचारले की माझ्याकडे घरी (गव्हाच्या) पिठाची पिशवी आहे का?
मी थोडे पीठ ओतले आणि त्याने माझा हात पिठात टाकला आणि मला सुमारे 10 मिनिटे थांबायला सांगितले.
त्याने मला सांगितले की व्हिएतनाम मध्ये एक मुलगा होता जो एकदा जळला होता. त्याच्यावर आग लागल्याने आणि घाबरून कोणीतरी आग विझवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याच्या संपूर्ण शरीरावर पिठाची पोती ओतली. पण केवळ जाळच विझवला गेला नाही तर मुलावर भाजल्याचा कोणताही मागमूस नव्हता !!!!
माझ्या स्वतःच्या बाबतीत, मी माझा हात पिठाच्या पिशवीत 10 मिनिटांसाठी ठेवला आणि नंतर काढला आणि त्यानंतर मला जळण्याच्या कोणत्याही लाल खुणाही दिसल्या नाहीत. शिवाय, पूर्णपणे वेदना नाही.
आज मी पिठाची पिशवी फ्रिजमध्ये ठेवली आणि प्रत्येक वेळी मी भाजल्यावर पीठ वापरते. वास्तविक थंड पीठ खोलीच्या तपमानापेक्षा खूप चांगले आहे.
मी पीठ वापरते आणि मला कधी भाजल्याचा मागमूसही नाही!
एकदा माझी जीभ पोळली होती आणि त्यावर सुमारे 10 मिनिटे पीठ ठेवले होते …. वेदना थांबल्या.
त्यामुळे नेहमी तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये कमीत कमी पिठाचे पिशवी ठेवा.
????✌️
पीठात उष्णता शोषण्याची क्षमता असते आणि त्यात मजबूत अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. अशा प्रकारे, जळलेल्या रुग्णाला 15 मिनिटांच्या आत लागू केल्यास ते मदत करते.
जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासाठी फायदेशीर अशी एखादी गोष्ट शेअर करते, तेव्हा ती इतरांबरोबर शेअर करण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे. म्हणून हे इतरांसोबत शेअर करा.
संग्राहिका : सुश्री मीनल केळकर
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
स्वार्थाने बरबटलेल्या जगात आपल्याला यशापयशासकट जर कोणी स्वीकारत असेल, तर ते म्हणजे फक्त आपले आईबाबा. नेमके आपण त्यांना आपल्यापासून दूर करण्याचा अपराध करतो. ते त्याचीही खंत करत नाहीत. पिल्लं शरीराने आणि मनाने दूर गेल्याचे दु:खं सहन करतात आणि कधी चुकून जवळ आले, तर तितक्याच मायेने त्यांची चौकशी करतात. अशा प्रेमळ जन्मदात्यांना दुखवण्याचे पाप कधीही करू नका…
एक मेडिकलचे दुकान होते. औषध घेण्यासाठी लोकांची गर्दी होती. मेडिकलवाला शक्य तेवढ्या लवकर प्रत्येकाला अचूक औषध देत गर्दी कमी करत होता. त्याचा सहाय्यकही आपले काम चोखपणे पार पाडत होता. त्याचवेळेस रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला झाडाखाली एक बाई मेडिकलकडे बघत ताटकळत उभी होती. बहुदा ती मेडिकलमधील गर्दी कमी होण्याची वाट बघत असावी. मेडिकलवाल्याचे तिच्याकडे लक्ष गेले. तिची अस्वस्थता पाहून त्याने काही वेळ सहाय्यकाला दुकानाकडे लक्ष दे असे सांगून आजीकडे धाव घेतली.
आजीने त्याला पाहिले. तिला खुशाली वाटली. आजीच्या राहणीमानावरून ती मध्यमवर्गीय कुटुंबातली वाटत होती. मेडिकलवाल्याने तिला कोणते औषध हवे, असे विचारले. आजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. मेडिकलवाला म्हणाला, `काय झाले आजी, औषध घ्यायला पैसे नाही का?’आजी म्हणाली, `पैसे आहेत, पण मला हवे असलेले औषध तुझ्याकडे आहे का?’
मेडिकलवाला गोंधळला. त्याने आजीकडे औषधाचा कागद मागितला. तो आजीकडे नव्हता. आजी म्हणाली, `लेका, माझा मुलगा तुझ्याच वयाचा असेल. तो बायको मुलांना घेऊन दूर राहतो, दर सुटीत मला भेटायला येतो. पण गेली काही वर्षे तो भेटायला तर येत नाहीच, वरून न येण्याची कारणे चिठ्ठीत लिहून पाठवतो. म्हणून मला एकच औषध हवे आहे, मला मूल आहे हे विसरण्याचे…आहे का तुझ्याकडे तसे औषध???’
मेडिकलवाला नि:शब्द झाला. कारण, या औषधाची गरज आज अनेक पालकांना निर्माण झाली आहे, अद्याप या औषधाची निर्मिती झालेली नाही. खरोखरच असे औषध निर्माण झाले, तर म्हातारपणी कित्येक पालकांना होणाऱ्या वेदना तरी कमी होतील…!’
——मित्रांनो, सगळ्यात मोठे कोणते पाप असेल, तर ते म्हणजे आपल्यामुळे आपल्या पालकांच्या डोळ्यात अश्रू येणे. त्या पापाचे प्रायश्चित्त कोणत्याही पुराणात दिलेले नाही. म्हणून हे पाप आपल्या हातून घडणार नाही, याची अवश्य काळजी घ्या !
संग्राहक : श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा “रात का चौकीदार”महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9th की “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत हैं प्रसंगवश आपकी हिंदी पर एक रचना “बीत गया हिंदी पखवाड़ा….”। )
(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब) शिक्षा- एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)
☆ आलेख ☆ शहीद ए आज़म – स्व भगत सिंह ☆ श्री कमलेश भारतीय ☆
[मित्र विवेक मिश्र ने एक काम मेरे जिम्मे लगाया। बड़ी कोशिश रही कि जल्द से जल्द दे सकूं पर इधर उधर के कामों के बावजूद शहीद भगत सिंह के प्रति मेरी श्रद्धा और उनके पैतृक गांव खटकड़ कलां में बिताये ग्यारह वर्ष मुझे इसकी गंभीरता के बारे में लगातार सचेत करते रहे। बहुत सी कहानियां हैं उनके बारे में। किस्से ऊपर किस्से हैं। इन किस्सों से ही भगत सिंह शहीद ए आज़म हैं।
मेरी सोच है या मानना है कि शायद शुद्ध जीवनी लिखना कोई मकसद पूरा न कर पाये। यह विचार भी मन में उथल पुथल मचाता रहा लगातार। न जाने कितने लोगों ने कितनी बार शहीद भगत सिंह की जीवनी लिखी होगी और सबने पढ़ी भी होगी। मैं नया क्या दे पाऊंगा? यह एक चुनौती रही। – कमलेश भारतीय ]
सबसे पहले जन्म की बात आती है जीवनी में। क्यों लिखता हूं मैं कि शहीद भगत सिंह का पैतृक गांव है खटकड़ कलां, सीधी सी बात कि यह उनका जन्मस्थान नहीं है। जन्म हुआ उस क्षेत्र में जो आज पाकिस्तान का हिस्सा है। चक विलगा नम्बर 105 में 28 सितम्बर, 1907 में जन्म हुआ। और यह बात भी परिवारजनों से मालूम हुई कि वे कभी अपने जीवन में खटकड़ कलां आए ही नहीं। फिर इस गांव की इतनी मान्यता क्यों? क्योंकि स्वतंत्र भारत में भगत सिंह, राजगुरु और सुखदेव को श्रद्धा अर्पित करने के दो ही केद्र हैं -खटकड़ कलां और हुसैनीवाला। इनके पैतृक गांव में इनका घर और कृषि भूमि थी। इनके घर को परिवारजन राष्ट्र को अर्पित कर चुके हैं और गांव में मुख्य सड़क पर ही एक स्मारक बनाया गया है। बहुत बड़ी प्रतिमा भी स्मारक के सामने है। पहले हैट वाली प्रतिमा थी, बाद में पगड़ी वाली प्रतिमा लगाई गयी। इसलिए इस गांव का विशेष महत्त्व है। हुसैनीवाला वह जगह है जहां इनके पार्थिव शवों को लाहौर जेल से रात के समय लोगों के रोष को देखते हुए चोरी चुपके लाया गया फांसी के बाद और मिट्टी का तेल छिड़क आग लगा दी जैसे कोई अनजान लोग हों -भगत सिंह, राजगुरु और सुखदेव। दूसरे दिन भगत सिंह की माता विद्यावती अपनी बेटी अमर कौर के साथ रोती हुई पहुंची और उस दिन के द ट्रिब्यून अखबार के पन्नों में राख समेट कर वे ले आई तीनों की जो आज भी शहीद स्मारक में ज्यों की त्यों रखी हैं। यही नहीं स्मारक भगत सिंह जो डायरी लिखते थे और कलम दवात भी रखी हैं। मानो अभी कहीं से भगत सिंह आयेंगे और अपनी ज़िंदगी की कहानी फिर से और वहीं से लिखनी शुरू कर देंगे, जहां वे छोड़ कर गये थे। इनकी सबसे बड़ी बात कि इन्होंने अपने से पहले शहीद हुए सभी शहीदों की वो गलतियां डायरी में लिखीं जिनके चलते वे पकड़े गये थे। जाहिर है कि वे इतने चौकन्ने थे कि उन गलतियों को दोहराना नहीं चाहते थे। वैसे यह कितनी बड़ी सीख है हमारे लिए कि हम भी अपनी ज़िंदगी में बार बार वही गलतियां न दोहरायें।
अब बात आती है कि आखिर कैसे और क्यों भगत सिंह क्रांतिकारी बने या क्रांति के पथ पर चले? शहीद भगत सिंह के चाचा अजीत सिंह ने किसान आंदोलन पगड़ी संभाल ओए जट्टा में बढ़ चढ़ कर हिस्सा लिया जिसके चलते उन पर अंग्रेज सरकार की टेढ़ी नज़र थी। उन्हें जेल में ठूंसा गया दबाने के लिए। इनके पिता किशन सिंह भी जेल मे थे। जब इनका जन्म हुआ तब पिता और चाचा जेल से छूटे तो दादी ने इन्हें भागां वाला कहा यानी बहुत किस्मत वाला बच्चा कहा। जिसके आने से ही पिता और चाचा जेल से बाहर आ गये। इस तरह इसी भागां वाले बच्चे का नाम आगे चल कर भगत सिंह हुआ।
फिर इनके बचपन का यह किस्सा भी बहुत मशहूर है कि पिता किशन सिंह खेत में हल चलाते हुए बिजाई कर रहे थे और पीछे पीछे चल रहे थे भगत सिंह। उन्होंने अपने पिता से पूछा कि बीज डालने से क्या होगा?
-फसल। यानी ज्यादा दाने।
-फिर तो यहां बंदूकें बीज देते हैं जिससे ज्यादा बंदूकें हो जायें और हम अंग्रेजों को भगा सकें।
यह सोच कैसे बनी और क्यों बनी? इसके पीछे बाल मनोविज्ञान है।
इनके चाचा अजीत सिंह ज्यादा समय जेल में रहते और चाची हरनाम कौर रोती बिसूरती रहती या उदास रहती। बालमन पर इसका असर पड़ा और चाची से गले लग कर वादा करता रहा कि एक दिन इन अंग्रेजों को सबक जरूर सिखाऊंगा। इनके चाचा अजीत सिंह उस दिन डल्हौजी में थे जब हमारा देश स्वतंत्र हुआ और उसी दिन वहीं उनका खुशी में हृदय रोग से निधन हो गया। डल्हौजी में उनका स्मारक भी बनाया गया है जिसे देखने का सौभाग्य वहां जाने पर मिला था।
परिवार आर्य समाजी था और इनके दादा अर्जुन सिंह भी पत्र तक हिंदी में लिखते थे जो अनेक पुस्तकों में संकलित हैं। भगत सिंह सहित परिवार के बच्चों के यज्ञोपवीत भी हुए। इस तरह पहले से ही यह परिवार नयी रोशनी और नये विचारों से जीने में विश्वास करता था जिसका असर भगत सिंह पर भी पड़ना स्वाभाविक था और ऐसा ही हुआ भी।
इस तरह क्रांति के विचार बालमन में ही आने लगे। फिर जब जलियांवाला कांड हुआ तो दूसरे दिन बालक भगत अपनी बहन बीबी अमरकौर को बता कर अकेले रेलगाड़ी में बैठकर अमृतसर निकल गया और शाम को वापस आया तो वहां की मिट्टी लेकर और फिर वह विचार प्रभावी हुआ कि इन अंग्रेजों को यहां से भगाना है। उस समय भगत सिंह मात्र तेरह साल के थे। बीबी अमर कौर उनकी सबसे अच्छी दोस्त जैसी थी। वह मिट्टी एक मर्तबान में रख कर अपनी मेज़ पर सजा ली ताकि रोज़ याद करें इस कांड को। इस तरह कड़ी से कड़ी जुड़ती चली गयी। भगत सिंह करतार सिंह सराभा को अपना गुरु मानते थे और उनकी फोटो हर समय जेब मे रखते थे। उन्हें ये पंक्तियां बहुत पसंद थीं
हम भी आराम उठा सकते थे घर पर रह कर
हमको भी मां बाप ने पाला था दुख सह सह कर,,,
दूसरी पंक्तियां जो भगत सिंह को प्रिय थीं और गुनगुनाया करते थे :
सेवा देश दी करनी जिंदड़िये बड़ी औखी
गल्लां करनियां ढेर सुखलियां ने
जिहना देश सेवा विच पैर पाया
उहनां लख मुसीबतां झल्लियां ने,,,
स्कूल की पढ़ाई के बाद जिस काॅलेज में दाखिला लिया वह था नेशनल काॅलेज, लाहौर जहां देशभक्ति घुट्टी में पिलाई जा रही थी। यह काॅलेज क्रांतिकारी विचारकों ने ही खोला था। उस घुट्टी ने बहुत जल्द असर किया। वैसे भगत सिंह थियेटर में भी दिलचस्पी रखते थे और लेखन में भी। इसी काॅलेज में वे अन्य क्रांतिकारियों के सम्पर्क में आए और जब लाला लाजपतराय को साइमन कमीशन के विरोध करने व प्रदर्शन के दौरान लाठीचार्ज में बुरी तरह घायल किया गया तब ये युवा पूरे रोष में आ गये। स्मरण रहे इन जख्मों को पंजाब केसरी लाला लाजपत राय सह नहीं पाये और वे इस दुनिया से विदा हो गये। लाला लाजपतराय की ऐसी अनहोनी और क्रूर मौत का बदला लेने की इन युवाओं ने ठानी। सांडर्स पर गोलियां बरसा कर जब भगत सिंह लाहौर से निकले तो थियेटर का अनुभव बड़ा काम आया और वे दुर्गा भाभी के साथ हैट लगाकर साहब जैसे लुक में बच निकले। दुर्गा भाभी की गोद में उनका छोटा सा बच्चा भी था। इस तरह किसी को कोई शक न हुआ। भगत सिंह का यही हैट वाला फोटो सबसे ज्यादा प्रकाशित होता है।
इसके बाद यह भी चर्चा है कि घरवालों ने इनकी शादी करने की सोची ताकि आम राय की तरह शायद गृहस्थी इन्हें सीधे या आम ज़िंदगी के रास्ते पर ला सके लेकिन ये ऐसी भनक लगते ही भाग निकले। क्या यह कथा सच है? ऐसा सवाल मैंने आपकी माता विद्यावती से पूछा था तब उन्होंने बताया थे कि सिर्फ बात चली थी। कोई सगाई या कुड़माई नहीं हुई न कोई रस्म क्योंकि जैसे ही भगत सिंह को भनक लगी उसने भाग जाना ही उचित समझा। तो क्या फ़िल्मों में जो गीत आते हैं वे झूठे हैं?
जैसे : हाय रे जोगी हम तो लुट गये तेरे प्यार में,,,इस पर माता ने कहा कि फिल्म चलाने के लिए कुछ भी बना लेते हैं। वैसे सारी फिल्मों में से मनोज कुमार वाली फिल्म ही सही थी और मनोज कुमार मेरे से आशीर्वाद लेने भी आया था।
खैर भगत सिंह घर से भाग निकले और कानपुर जाकर गणेश शंकर विद्यार्थी के पास बलवंत नाम से पत्रकार बन गये। उस समय पर इनका लिखा लेख -होली के दिन रक्त के छींटे बहुचर्चित है। और भी लेख लिखे। मैं हमेशा कहता हूं कि यदि भगत सिंह देश पर क़ुर्बान न होते तो वे एक बड़े लेखक या पत्रकार होते। इतनी तेज़ कलम थी इनकी।
इसके बाद इनका नाम आया बम कांड में। क्यों चुना गया भगत सिंह को इसके लिए? क्योंकि ये बहुत अच्छे वक्ता थे और इसीलिए योजना बनाई गयी कि बम फेंककर भागना नहीं बल्कि गिरफ्तारी देनी है। भगत सिंह ने अदालत में लगातार जो विचार रखे वे अनेक पुस्तकों में सहेजे गये है और यह भी स्पष्ट किया कि हम चाहते तो भाग सकते थे लेकिन हम तो अंग्रेजी सरकार को जगाने आये थे। दूसरे यह गोली या बम से परिवर्तन नहीं आता लेकिन बहरी सरकार को जगाने के लिए इसे उपयोग किया गया। इस तरह यह सिद्ध करने की कोशिश की गयी कि हम आतंकवादी नहीं बल्कि क्रांतिकारी हैं। भगत सिंह की एक पुस्तिका है-मैं नास्तिक क्यों हूं? यह खूब खूब बिकती है और पढ़ी जाती है। भगत सिंह हरफनमौला और खुशमिजाज युवक थे। इनके साथी राजगुरु और सुखदेव भी फांसी के हुक्म से जरा विचलित नहीं हुए और किसी प्रलोभन में नहीं आए। अनेक प्रलोभन दिए गये। आखिरी दिन तक प्रलोभन दिये जाते रहे लेकिन भारत माता के ये सपूत अपनी राह से बिल्कुल भी पीछे न हटे। डटे रहे।
भगत सिंह पुस्तकें पढ़ने के बहुत शौकीन थे और अंत तक जेल में अपने वकील या मिलने आने वालों से पुस्तकें मंगवाते रहे। आखिर जब फांसी लगने का समय आया तब भी लेनिन की जीवनी पढ़ रहे थे और जब बुलावा आया कि चलो। तब बोले कि ठहरो, अभी एक क्रांतिकारी दूसरे क्रांतिकारी से मिल रहा है। अपने छोटे भाई कुलतार को भी एक खत में लिखा था कि पढ़ो, पढ़ो, पढ़ो क्योकि विचारों की सान इसी से तेज़ होती है।
बहुत छोटी उम्र मे 23 मार्च, 1931 में फांसी का फंदा हंसते हंसते चूम लिया। क्या उम्र होती है मात्र तेईस साल के आसपास। वे दिन जवानी की मदहोशी के दिन होते हैं लेकिन भगत सिंह को जवानी चढ़ी तो चढ़ी आज़ादी पाने की।