(डॉ भावना शुक्ल जी (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं मकरणक्रान्ति पर्व पर “भावना के दोहे”। )
(आदरणीय श्री संतोष नेमा जी कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में प्रस्तुत हैं “संतोष के दोहे”। आप श्री संतोष नेमा जी की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)
मन्यादादा सांगू लागला “आपण पंधरा, सोळा वर्षानी भेटलो.त्यात माझ्या आयुष्यात बरेच चांगले, वाईट प्रसंग घडून गेले.दुसरासा माणूस खचला असता पण मी मुळातच हॅपी गो लक्की,हालमें खुशाल रहायची वृत्ती म्हणून ठणठणीत आहे. मीरा, माझी बायको दोन वर्षे अंथरूणावर होती.ती गेली.तिच्या पाठोपाठ अण्णा वयोमानानुसार अल्पशा आजाराने गेले.मग काय मुलांची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर. मला तर चहा पण करता येत नव्हता.कधी घरी स्वयंपाकीण ठेवून,कधी बाहेरुन डबा आणून दिवस काढले.हळूहळू मुलगी,मंजिरी काॅलेज करून थोडा स्वयंपाक विचारुन विचारुन, पुस्तकात वाचून करु लागली.तेव्हा तुझ्या आईची इतकी आठवण यायची.कधी त्यानी जाणवू दिलं नाही आपण शेजारी असल्याचं.तुझ्या दादाच्या सारखंच माझं करायच्या सणवारं
गोडधोडं,माझा वाढदिवस.इतकंच काय पण माझ्या आजारपणात पथ्यपाणी पण. अण्णांना ऑफिस मध्ये अचानक काम निघाले आणि रात्री घरी यायला उशीर झाला तर मला तुमच्या बरोबर जेवू घालायच्याच आणि अण्णासाठीं घरी डबा द्यायच्या. अशी देवमाणसं आता मिळणं कठीणच.
आता लग्न करुन मंजिरी गेली नव-याबरोबर यु.के.ला आणि मनोज, माझा मुलगा गेला u.s.ला तिकडेच सेटल झाला.तसे फोन असतात.हा दोघांचे. बोलवतात मला तिकडे.पण योग नाही माझा तिकडे जाण्याचा.वर बोट दाखवून म्हणाला शेवटी त्याची इच्छा. तीन वेळा ह्वीसा रिजेक्ट झाला. ‘एकला चलो रे’. बायकोचंआणि ताईचं पटत नसल्यामुळे ताईशीही संबंध नाही. “ओघ घालवला आणि ओक्साबोक्सी रडला म्हटलं, “तुझ्या वयाला योग्य अशी जोडीदारीण बघ म्हणजे एकटेपणा जाणवणार नाही. मुलं तिकडे तू एकटा इकडे दुखलंखुपलं, अडीअडचणीला हक्काचं माणूस पाहिजेना.का मी शोधू तुझ्यासाठीं?”
तर म्हणाला,”चालेल बघ.चला निघतो भेटू परत “.म्हणून त्यानी आणि माझ्या लेकानी फोन नंबरची देवाणघेवाण करुन निरोप घेतला.आम्ही घरी आलो.
नाटक विसरुनच गेले.आणि अण्णा मन्यादादा, माधुरीताई आणि गिरगावातले बालपणीचे दिवस,त्या आठवणी जाग्या झाल्या.
☆ विविधा ☆ संक्रांत सण हा मोठा (भाग -2) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
संक्रांतीला आस-पासच्या बायकांना, नातेवाईकांना बोलावून हळदी-कुंकू करायची प्रथा आहे. तीळगुळाबरोबरच एखादी वस्तू द्यायची पद्धत आहे. हळदी कुंकू लावून तीळगूळ द्यायचा. गव्हाबरोबरच ओटीत, सुगडात घातलेल्याच वस्तू , म्हणजे बोरं, पावट्याच्या शेंगा, उसाचे कर्वे, गाजराचे तुकडे घातले जात. त्याच बरोबर एखादी वस्तू किंवा फळ वगैरे दिलं जाई. त्याला पूर्वी वस्तू लुटायची असं म्हंटलं जाई. जी वस्तू द्यायची, त्याचा हळदी-कुंकू असे, त्या खोलीत एका कोपर्यात ढीग लावलेला असे. येणार्याने त्यातून आपल्याला हवे तेवढे घेऊन जायचे. त्यात प्रामुख्याने मळ्यातून आलेल्या भाज्या, फळे वगैरे असत. हवे तेवढे घेऊन जायचे म्हणून त्याला ‘लुटायची’ असा शब्द रूढ झाला. लूट करावी, इतकी ती गोष्ट अमाप असे. कालौघात परिस्थिती बदलली. मग वस्तू लुटण्याऐवजी वस्तू देणं आलं. त्यात मग गंमत म्हणून वेगवेगळ्या वस्तू आणायच्या. त्याच्या चिठ्ठ्या लिहायच्या. आलेल्या स्त्रियांना चिठ्ठ्या उचलायला सांगायच्या व जिला ही चिठ्ठी मिळेल, तिला ती वस्तू द्यायची. यात कधी आनंद असे, तर कुठे कमी मोलाची वस्तू मिळाली, याची एखादीला खंतही वाटे.
संक्रांतीचं हळदी-कुंकू संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत कधीही आपल्या सोयी-सवडीने करायची प्रथा आहे. माझ्या सासूबाईंना हळदी-कुंकवाच्या वेळी कंगवे, पावडर वगैरेचे छोटे डबे असं काही देणं फारसं पसंत नव्हतं. त्या म्हणत, ‘तुम्ही वस्तू देण्याबद्दलचं बजेट ठरवा. एखाद्या गरजवंत बाईला कशाची गरज आहे, ते बघा आणि तिला ती वस्तू घेऊन द्या. माझ्या जुन्या काळातल्या, सोवळ्या असलेल्या सासुबाईंचे हे विचार आधुनिक काळाला साजेसे होते आणि आम्ही तसच करत असू. मग ते कधी वाण म्हणून असो, वा मग सरळ सरळ प्रथा किंवा चाल म्हणून.
सणाच्या निमित्ताने दुसर्याला काही देण्याची प्रथा केवळ हिंदू धर्मातच आहे असे नाही, मुसलमान, क्रिश्चन, शीख , पारशी इ. सर्व धर्मात आहे. आपले सगळे सणवार, ते साजरे करण्यासाठी पडलेल्या प्रथा आनंद, उल्हास, निर्माण करणार्या आहेत. म्हणूनच त्या आजही टिकून आहेत. आजच्या काळात स्त्रिया उंबरठा ओलांडून घराबाहेर पडल्या. नोकर्या करू लागल्या. प्रत्येकीला स्वतंत्रपणे हळदी-कुंकू करावं इतका वेळ मिळेनासा झाला. मग त्यातून मंडळात किंवा सोसायतीत सगळ्यांनीच एकत्र येऊन सार्वजनिक हळदी-कुंकू होऊ लागले. रीती-रिवाजात बदल होत गेले, पण प्रथा, परंपरा कायम राहिली. पूर्वी हळदी-कुंकवाच्या वेळी सुवासिनींनाच बोलावण्याची पद्धत होती. आता विधवांनाही सन्मानाने बोलावलं जाऊ लागलं. हा बादल माणुसकीचे बंध घट्ट करणारा आहे.
संक्रांत सणाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. बाकीचे सण त्या त्या तिथीला येतात. उदा. पाडवा चैत्र प्रतिपदेला, गणेश चतुर्थी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला, पण संक्रांतीची तिथी नक्की नसते. तिची तारीख नक्की ठरलेली असते. १४ जानेवारी. टिळक पंचांगाप्रमाणे ती १० जानेवारीला असते. क्वचित एखाद्या वर्षी ती १३ वा १५ जानेवारीला यते. संक्रांत हा द्क्षिणायण आणि उत्तरायण या दोन कालखंडांना जोडणारदिवस आहे. या दिवसापासन सूर्याचे उत्तरेकडे भ्रमण सुरू होते. (त्याच्या फार भौगोलिक तपशीलात शिरायला नको). या दिवसापासून दिवस मोठा होऊ लागतो. या दृष्टीने खरं तर हाच वर्षाच्या सुरवातीचा दिवस मानायला हवा. गुढी पाडवा हा वर्षाचा पहिला दिवस मानतात. त्यामागे विविध मिथकांचा आधार घेतलेला आहे. संक्रांतीला नववर्षाची सुरुवात मानली, तर त्याला भौगोलिक आधार आहे. शिशीर ऋतूतील थंडी , पानगळ, त्यातून दिसणारे सृष्टीचे, बापुडवाणे, उदास, मरगळलेले आणि मळकटलेले रूप आता बदलू लागणार आहे. झाडाझाडांवर नव्या अंकुरांच्या रूपाने नवजीवन साकारणार आहे. नवचैतन्याने सृष्टी बहरणार आहे. नाना रंगांच्या फुलांनी नटणार आहे. या सार्याचं आश्वासन संक्रांत घेऊन येते.
*ऋणानुबंधाच्या कुठून जुळल्या गाठी*
( भाई – उत्तरार्ध )
वर्गात इतिहासाचा तास चालू आहे. ‘देशपांडे’ सर प्रतापगडा वरचा धडा शिकवत आहेत. प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराज आणि अफजलखानाची भेट ठरलेली आहे. देशपांडे सर इतकं छान वर्णन करून सांगत आहेत की मनाने सगळेजण तो क्षण अनुभवयायला तिथे पोचले आहेत. महाराज खानाच्या भेटी साठी निघतात, तेवढ्यात तास संपल्याची घंटा होत. सगळेजण हिरमुसतात.
“भाई – पूर्वरंग” पहात असताना ती खास मैफल संपली तेव्हा मला अगदी असंच वाटलं होतं.
शाळेतल्या मुलाचं ठीक होतं.
त्यांना दुस-या दिवशी किंवा तीस-या दिवशी देशपांडे सर अफजलखानचा कोथळा बाहेर काढुन दाखवू शकत होते पण इथे “भाई – उत्तरार्ध” येण्यासाठी ८ फेब्रुवारी पर्यत म्हणजे तब्ब्ल एक महिना महेश गुरुजींनी ( tutorial वाले नव्हे ) थांबयला भाग पाडले होते.
पण तरीही या महिन्याभरच्या कालावधीत पूर्वरंगाच्या ‘ नशेत ‘ भले भले ‘रम’लेले दिसले आणि काल ८ तारखेला जेव्हा उत्तरार्धासाठी खुर्चीवर बसलो तेव्हा समोर पडद्यावर कुठल्या तरी फालतू जहिराती चालू असताना वसंतराव, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी यांची मैफल परत कानात गुंजी घालू लागली. शब्द ऐकू यायला लागले ” कानडा राजा पंढरीचा, यमुना किनारे मेरो गांव! सांवरे आजइयो,सांवरे”
आता या उत्तरार्धात,भाईंबरोबर “ऋणानुबंधाच्या कुठून, कशा आणि कुणाकुणाशी गाठी जुळल्या हे पहायची उत्सुकता लागून राहिली होती. तेवढ्यात श्रेयनामावली सुरु होऊन एक सुंदर अभंग सुरु झाला. अनोखे सरप्राईज होते ते माझ्यासाठी कारण माझा आवडता अभंग लागला होता ” इंद्रायणी काठी”.
ख-या अर्थाने सबकुछ पु.ल म्हणता येईल अशी पु.लं ची कलाकृती ‘ गुळाचा गणपती’ यात हा अभंग आहे आणि भाई उत्तरार्ध ही प्रदर्शित झाला ‘गणेश जयंतीलाच’. छान योगायोग ना?
हे गाणं ऐकताना वाटत होतं श्रेयनामावली अजून जरा वाढवता आली असती तरी चालले असते
भाग १- च्या शेवटी सुरु झालेली मैफल ही ख-या अर्थाने संपते ती कुमार गंधर्व यांच्या इंदूरच्या घरी. कुमारजी आजारी असताना हे सगळे त्यांना भेटायला जातात. यावेळेला बरोबर माणिक ताई पण असतात. ‘यमुना किनारे मेरो गाव’ पासून सुरु झालेेली मैफील परत या गाण्यापाशी येऊनच पूर्ण होते आणि एक वर्तुळ पुर्ण होते. या मार्गात मग अनेक गाणी भेटतात
कबीराचे विणतो शेले,
खरा तो प्रेमा ला,
सुरत पिया की न छीन बिसुराये,
आगा वैकुंठीच्या राया.
माझ्यामते हे पुर्ण होणारे वर्तुळ म्हणजे या दोन्ही भागाचा आत्मा आहे.
भाई- उत्तरार्धाच्या सुरवातीलाच नाटकासाठी
विजया बाई – सुनीता बाई यांच्यातील भूमिकेसाठी पात्र निवडीचा प्रसंग छान जमलाय. दवाखान्यात भाईंना भेटायला गेलेल्या विजयाताईंनी २४ x ७ बातम्यांचा दणका देणा-या मिडियाला सणसणीत मारलेली चपराक पाहण्यासारखी.
दूरदर्शन चे ‘प्रकाशवाणी’ हे नाव एका मराठी द्वेष्ट्या अधिका-या मुळे कसं राहून गेलं, त्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर खुलंलेले भाई, आणि नोकरी सोडल्याच्या निमित्याने झालेल्या पार्टीत कुमार गंधर्वांनी सादर केलेले ‘ अजुनी रुसूनी आहे ‘ खुलता कळी खुलेना ‘ चे सादरीकरण अफलातून. इथेच बटाट्याच्या चाळीचा जन्म झाला.
आणि यानंतरच भाईंनी,’ मी आता मला पाहिजे तसे जगणार’ हे ठरवले अन करुन दाखवले.
‘बटाट्याचा चाळीचा’ हा प्रयोग पाहून रात्री २ वाजता ‘आचार्य प्रल्हाद केशव अत्रे ‘ यांनी भाईंना केलेला फोन आणि पुढील १०००० वर्षात असा पु.ल होणे नाही म्हणून दिलेल्या शुभेच्छा , संगीत नाटकातलही जयमाला शिलेदार -राम यांचा प्रयोग, “रवी मी चंद्र कसा”हे गाणे, तेंडुलकर – भाई यांच्यातील संवाद(डॉ काशीनाथ घाणेकर – श्रीराम लागू जुगलबंदीची थोडीशी आठवण करुन देणारा)
शाळेतील जूना मित्र बारक्या -स्काॅलर भाई यांचा प्रसंग, बाळासाहेब ठाकरे- महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि त्यानंतरचे नाट्य, ‘तूला शिकवीन चागंलाच धडा असे म्हणत दवाखान्यात झालेली बाळासाहेबां नंतरची भक्तीची एन्ट्री. हे सगळ एकदम कडकच म्हणावे लागेल !
भाईच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा – समाजसेवा आणि त्यांचे बाबा आमटे याच्याबरोबरचे काम
– आदरणीय बाबा आमटे यांच्या आश्रमात भाई तेथील मुलां बरोबर ” नाच रे मोरा अंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच” या गाण्यावर नाचतात. ही केमिस्ट्री मस्त जमलीय. हे गाणे पाहून मला वाटते प्रत्येकाच्या लहानपणीच्या शाळेतील स्नेहसंमेलनाच्या आठवणी जाग्या होतील.
मराठीतील दोन बायोपिक मधे ( डाॅ काशिनाथ घाणेकर आणि भाई-२) झळकण्याचा मान
” नाच रे मोरा ” ? या गाण्याला मिळाला आहे. असे भाग्य दुस-या कुठल्याही गाण्यास आजपर्यंत मिळाले नसेल. ख-या अर्थाने ह्या गाण्याचा once मोर झाला असे म्हणता येईल
आजकाल मोठ्या मोठ्या पार्ट्यात कुणी हाय फाय इंगजी बोलत सुत्रसंचालन करणारी मॅडम, सगळ्यांना घेऊन ग्रुप डान्स करताना एखादा अंगविक्षेप करते आणि त्याच स्टेपची हुबेहूब नक्कल बाकीचे करतात. त्यांनी हा भाई आणि या मुलांनी केलेला नृत्याविष्कार जरुर पहावा. छोट्या छोट्या पण पहावयाला सुखकारक स्टेप्स कशा करता येतात हे नक्की शिकता येईल.
आनंदवनातल्या आणि आमटे यांच्याबद्दल बोलताना भाई बोरकरांची एक कविता सांगतात
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे
भाई, अगदी पटले हे. हेच तुमचे ही हात जे हार्मोनियम वर अगदी सहजपणे फिरले आणि त्यांनी सुरांची मैफल निर्मिली, लेखणीतून अजरामर साहित्य निर्माण केले. या निर्मिती मागचा ध्यास या बोरकरांच्या कवितेतून दिसून येतो.
कुमार गंधर्व गेल्याचीे दु:खद बातमी कळल्यावर भाई म्हणतात, “आम्ही हा जन्म आनंदाने जगलो कारण आम्ही कुमार ऐकला”
भाई, एक सांगतो, आज आम्ही पण असे म्हणू की आम्हीही आनंदाने जगू कारण आम्ही ‘भाई’ पाहिला, भाईंचे लेखन वाचले आणि अनुभवलेही.
“शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले”
असे शेवटचे गाणे जेंव्हा सिनेमा संपताना लागते तेंव्हा एकच गोष्ट जाणवते,
☆ विविधा ☆ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा…☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆
मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक.. महाराष्ट्री प्राकृतचे एक आधुनिक रूप… मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्यातून केलेला दिसून आलेला आहे.. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून त्याला वेगळे महत्त्वही प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भरही पडत आहे..
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
मराठीने फडकवले अटकेपार निशाण
माय मराठीच आहे जगाचा अभिमान
मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी १ जानेवारी ते १५ जानेवारी हा कालावधी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” म्हणून साजरा करण्यात येतो..
मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्राची खरी ओळख व महाराष्ट्राची संस्कृती असं म्हटले तरी काही वावग ठरणार नाही.. मराठी भाषेचा गोडवा,भाषेची संस्कृती त्यांचे महत्व अगदी जगभरात पोहोचले आहेत. महाराष्ट्रात बाहेरून येणारा प्रत्येक माणूस मराठी भाषा ही कळत नकळतपणे का होईना पण शिकतोच आणि बोलतो सुद्धा..
एखाद्या पर्यटनस्थळाच्या त्या त्या ठिकाणचा उत्सव, त्या त्या पर्यटनस्थळाचा इतिहास, त्याचा भूगोल, आजूबाजूचा परिसर, अश्या विविध गोष्टींचे महत्व आपल्याला माहितीतून समजतो त्याचप्रमाणे मराठी भाषा आणि तिचं महत्त्व, तिचा इतिहास, तिच्या विविध बोली, तिचं साहित्य, हजारो मराठी पुस्तके- ग्रंथ, ग्रंथांमध्ये उपलब्ध असलेली माहिती, मराठी माध्यमाच्या शाळेत शिकताना त्याचे होणारे फायदे, तिच्या समोरची आव्हाने, काळानुरूप नवं स्वीकारण्याची तिची ताकद या आणि अश्या अनेक गोष्टींवर लोकांनी एकत्र यावं, त्यावर चर्चा करावी तिचं महत्त्व जाणून घ्यावं, तिचा प्रचार-प्रसार करावा आणि अश्या दैदीप्यमान इतिहास लाभलेल्या या मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा हा शासनाचा मराठी भाषा पंधरवड्यामागे मुख्य हेतू आहे..
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणे अतिशय मोलाचे आहे कारण आपण महाराष्ट्र राज्यात राहतो तो आपल्याला मराठी होण्याचा गर्व आहे. मग मराठी भाषा जतन करणं हे तर आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण शिक्षकवृंद विद्यार्थ्यामध्ये मराठी भाषा विषयी प्रेमाचे जतन करू शकतो.
ह्यासाठी आपण अनेक माध्यमातून मराठी भाषेचे जतन करू शकतो. उदा. द्यायचेच झाले तर..मराठी भाषा पुस्तक दिंडी काढणे, मराठी भाषेवर कवी, साहित्यिक, ई. यांचे व्याख्यान आयोजन करणे, मराठी भाषेवर निबंध स्पर्धा, मराठी भाषा शुद्ध लेखन स्पर्धा, मराठी पुस्तके वाचणे, नामांकित लेखिका व लेखक यांच्या पुस्तकांचे अभिवाचन करणे, पुस्तक प्रदर्शन आयोजित करणे, मराठी भाषेत शुभेच्छा पत्र तयार करणे, वकृत्व स्पर्धा, मराठी गीत गायन स्पर्धा, मराठी भाषेचे विविध साहित्यिक,कवी,लेखक, लेखिका यांची समग्र माहिती देणे, तसेच मराठी भाषा – कथा कथन इत्यादी..असे विविध उपक्रम राबवून व अनेक प्रकारांनी आपण मराठी भाषेसाठी प्रचार व प्रसार करू शकतो..
महाराष्ट्राचे भौगोलिक व सांस्कृतिक वैविध्य जपत मराठी भाषेमध्ये मोठी वैचारिक संपदा निर्माण झाली आहे. विविध लोककला,नाटक, कविता, ग्रंथ असे अनेकानेक उत्तमोत्तम साहित्य लिहिले गेले.. ही वैचारिक संपदा जपण्यासाठी, मराठीचे वैभव वाढविण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे असे मी इथे मनापासून नमूद करीन..
खरे तर आज मराठी भाषेच्या संवर्धनाचे अनेकानेक मार्ग खुले झाले आहेत. संगणकीय तंत्रज्ञानही मराठी भाषेत उपलब्ध होत आहे. विविध ज्ञानशाखांमधील उपयुक्त ज्ञान आज मराठीत येत आहे. या सगळ्याला जोड असायला हवी ती आपल्या निग्रहाची.. मराठी भाषेबद्दल रास्त अभिमान बाळगण्याची आणि तिची जोपासना व संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची नाही का.. !
जसं वर्षाच्या सुरुवातीला आपण संकल्प करतो आणि वर्षभर त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतो अगदी त्याचप्रमाणे एक जानेवारीला भाषिक संकल्प करण्यास काहीच हरकत नाही… हो ना…!!
ऊज्वलाताई या हाडाच्या शिक्षीका. मुख्याध्यापक पदावरुन आता निवृत्त असल्या तरी विद्द्यार्थांमधे असलेला प्रचंड ऊत्साह आजही त्यांच्यात टिकून आहे.
विवीध साहित्य प्रकारातील आणि अनुवादित अशी जवळ जवळ साठाच्यावर त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत.चंद्रपाखीची वाट नंतर “मृगजळाच्या काठी ” हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह. या संग्रहातील कविता सहा विभागात वाचायला मिळतात.
सर्व कविता मुक्तछंद, छंदोबद्ध, कणिका, हायकु या काव्याप्रकाराच्या माध्यमातून व्यक्त झाल्या आहेत..
त्यांच्या सर्वच कविता भावना, बांधीलकी आणि विचारांनी समृद्ध आहेत.कqविता वाचताना, निसर्ग प्रेम, संवेदनशील मन, वैचारिक दृष्टीकोन,शब्द आणि भाषेवरील प्रभुत्व, प्रामुख्याने जाणवते. कल्पकता आणि मन:चक्षुने रेखाटलेली शब्दचित्रे कवितेतून जाणवतात. मनाला भिडतात, आनंद देतात.
“गंध गाभार्या तळी” या विभागातल्या निसर्ग कविता सृष्टीची विवीध रूपे उलगडतात. पानगळ, शिशीरऋतु च्या रुपाशी आपलं भावुक नातं जुळतं. “अवलिया” च्या, रुपात
एक व्यक्ती म्हणूनच, शिशीर ऋतु ऊभा ठाकतो.
भरली झोळी फकीर गेला
धुळीमातीची विभूती लावूनी
मलीनधुक्याचे लक्तर लेऊन
सृष्टी बसली भणंग होऊनी…
अवलिया येतो, गळलेली पानेफुले झोळीत भरतो, त्याच्या येण्यानं सृष्टी धुळकट,ओकीबोकी, रूक्ष बनते. वाचता वाचताच जाणवते हा अवलिया दुसरा तिसरा कुणी नसून
साक्षात शिशीर ऋतुच.कवियत्रीच्या कल्पनेला,मन मग भरभरून दाद देतं….
“सांज सजे अलबेली रात काळोखी..”
या विभागातून रात्रीची अनेक रुपे डोळ्यासमोर येतात. रात्र.. कुणाची अशी तर कुणाची कशी..
“सांज सजे अलबेली..कुणी हिला नादावली..”
किंवा
“चंद्र नकली,चांदण्याही चांदव्याला टांगुन आले”
नाहीतर…
“रात्र लडिवाळ.गोष्टीवेल्हाळ..”
रात्र..”मृतवत् जीवनात प्राण फुंकणारी..”
रात्र.चंद्रबनातून अलगद ऊतरणारी…”
“चंचल,मद् होश नटनारी रात्र…”
अशी, कधी व्याकुळ, वेदनादायी, प्रेममयी, कुटील कारस्थानी रात्र या काव्य पंक्तीतून आपल्याही जाणीवांना टोकरते….कविता आणि कवियत्री एकरुप झाल्यासारख्या वाटतात.
“पाऊस,रानातला..अंगणातला..मनातला..कवितेतला..”
या विभागात वाचक पावसात चिंब भिजतो.. पावसाविषयीच्या विवीध भावना…पाऊस हवा,पाऊस नको..पाऊस लडीवाळ, बालीश..ऊदास नाहीतर वादळी..
कवियत्रीचं मन पावसाशी गप्पा मारतं. रागावतं, भांडतंही. नव्हे धिक्कारही करतं!!
“घन ओंबून आले ।क्षण माथ्यावर झुकले। परि न बरसले….”
“पाऊस ऊरी जपताना।कोसळे भिंत भवताली।
मोकळ्या स्तनांवर झुकली ।घनगर्द तुझी सावली।
ऊज्वलाताईंच्या या काव्यातले हे टपटपणारे शब्द
मनातल्या बोथट बीजांना अंकुर फोडतात..
“कविता तुझ्या माझ्या..त्याच्या तिच्या…”
या विभागात नाती ऊलगडतात..” स्त्री आणि पुरुष यांच्यामधील आर्त,स्वप्नाळु,ओढाळ,सैल घट्ट भावनाविष्कार या कवितांतून जाणवतात.
“प्रवाह” ही कविता काहीशी रुपकात्मक वाटते.
वादळ आणि झाड यांच्यातील हा संवाद आहे. धडका देणारं वादळ आणि झाडांची रुजलेली मुळं.. एका परिपक्व नात्याचेच महत्व सुंदरपणे ऊलगडत जाते.
“तुझ्या प्रवाहावर झोकून देणं कसं घडेल?
त्यापेक्षा तूच आवर ना तुझा आवेग..!
या थोड्याच शब्दांत केव्हढा मोठा आशय!!!
“व्रतोत्सव “या विभागात जगण्याचं व्रत घेतलेल्या माणसांच्या कविता आहेत..
“तूही पेटव तुझ्या अंतरात
एक आशेची शलाका
जी ऊजळून टाकेल
काळजात कोंडलेले
शाश्वत नैराश्य…आणि करील तेजोमय अवघे प्राण..
सकारात्मक विचार जणु जगण्यास बळ देतात.जगणं फुलवतात…
आपल्या एकाकीपणाकडेही तटस्थपणे पाहताना, कवियत्री म्हणते,
मीच दिलेल्या शस्त्रांनी ।
माझे बंध तोडून!
मीच दिलेल्या ऊंटावर।
मीच दिलेले जवाहर लादून।
सारे गेले निघुन।
मला एकाकी टाकून…।।
तेव्हां जाणवतो जगातला पोकळपणा..धूसर खोटेपणा..
“अनुवादित कविता” हा शेवटचा विभाग. यात मान्यवर हिंदी कवींच्या अनुवादित कविता आहेत.
आपल्याला आवडलेलं रसिकांच्यात वाटावं, या समृद्ध भावनेतून केलेली ही पुरवणी. ऊत्कृष्ट विचारांचं ऊत्कृष्ट भाषांतर.
घनश्याम अग्रवाल यांची अनुवादित,”देशभक्तीची कविता..” मनाला भिडते. देशभक्तीची एक नवीनच सापडलेली व्याख्या थक्क करते.कविता दूर सरहद्दीवर असते
डबडबलेल्या डोळ्यांनी बघते
विचार करते
जितकं दु:ख वेदना इथे आहे
तितकच दु:ख वेदना तिथेही आहे..
कवितेसाठी तहान लागली असता
स्वत:ला पिणं, म्हणजे देशभक्ती
कुणा दुसर्यामधे
स्वत:ला ढाळून जगणं
म्हणजे देशभक्ती….
कविता किती निस्पृह मनातून आलेली असते याचाच वस्तुपाठ हे शब्द देतात.
“मृगजळाकाठी..” या कवितासंग्रहावर लिहीताना एक सांगावसं वाटतं की मूळात हे शीर्षकच किती बोलकं आहे..अस्तित्वातच नसलेल्या भासमय गोष्टी मिळवण्यासाठी आपण अव्याहत धडपडतो…पण जे स्वप्नांत असतं ते कवितेत मात्र गवसतं..आकारतं.. आणि मग त्या मृगजळाकाठी आपली आनंददायी सैर घडते… कविता वाचतांना त्या काव्याची ,कवीच्या मनातली पार्श्वभूमी आपल्याला अवगत नसली तरीही आपल्या मनांत विवीध अर्थ उलगडतात आणि त्यातच आपण डुंबतो…तरंगतो..हे तरंगणं म्हणजेच काव्याचं यश…
ऊज्वलाताई या कवितांतून हा अनुभव देतात,म्हणूनच हा कवितासंग्रह वाचनीय आहे असे मी खात्रीपूर्वक म्हणू शकते..