हिन्दी साहित्य – कविता ☆ “मेघदूतम्” श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद # मेघदूत ….पूर्वमेघः ॥१.२२॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

महाकवि कालीदास कृत मेघदूतम का श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “मेघदूतम्” श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद # मेघदूत ….पूर्वमेघः ॥१.२२॥ ☆

 

अम्भोबिन्दुग्रहणचतुरांश चातकान वीक्षमाणाः

श्रेणीभूताः परिगणनया निर्दिशन्तो बलाकाः

त्वाम आसाद्य स्तनितसमये मानयिष्यन्ति सिद्धाः

सोत्कम्पानि प्रियसहचरीसंभ्रमालिङ्गितानि॥१.२२॥

 

होंगे ॠणी , सिद्धगण चिर तुम्हारे

कि नभ में पपीहा , बकुल शुभ्रमाला

निरखते सहज नाद सुन तव , भ्रमित भीत

कान्ता की पा नेहमय बाहुमाला

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कोरोना ☆ श्री शरद कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ कोरोना ☆ श्री शरद कुलकर्णी☆ 

क्वारंटाइन व्हावे,

सांगावे नलगेचि.

आता अंतराची,

जाण ठेवा.

 

जाण ठेवा तुम्ही,

ओळखा रे नाती.

होणार ती माती,

अनिर्वाय.

 

अनिर्वाय जगणे,

जोवरी हा श्वास.

तरीही हव्यास,

हकनाक .

 

हकनाक आहे,

कोरोनाचे भय.

नाशिवंत देह,

हेच सत्य.

 

कधी सव्य आणि

कधी अपसव्यं .

अर्पणतर्पण,

समजावे.

 

©  श्री शरद कुलकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दृष्टिकोन ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ जीवनरंग ☆ दृष्टिकोन ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

सुनेत्रा आपल्या स्वत:च्याच फोटो कडे उदास पणे बघत होती. अगदी अलिकडचा ३-४ महिन्यापूर्वीचा भावाच्या नातवाचा वाढदिवस  व आईचे सहस्रचंद्रदर्शन या निमित्ताने काढलेले  फोटो ! प्रत्येक फोटोत तिचा चेहरा हसरा होता.पण तिला तो निस्तेज वाटत होता. डावा डोळा थोडा बारीकच दिसतो अलिकडे. पाच सहा वर्षांपूर्वी डोळे आले होते तिचे. infection फारच  severe.बरे व्हायला महिन्या पेक्षा जास्त दिवस गेले. डोळे बरे  झाले. पण डाव्या डोळ्याची पापणी अर्धवट झुकलेलीच असे. Eye ptosis— असे निदान झाले. सुदैवानं कोणताही मोठा दोष  नव्हता.परंतु डोळा बारीकच राहिला.

सगळ्यांनी लहानपणापासून केलेले काैतुक आठवत ती फोटो बघत राहिली.मोठे टपोरे असूनही तिचे डोळे शांत होते. आश्वासक नजरेने ती सर्वांना आपलेसे करत असे.एव्हढंच कशाला लग्न ठरले तेंव्हादेखील तिचे डोळे बघुनच पसंती आली होती की ! आज मात्र बारीक झालेला डोळा चेहर्‍याला sick look देत होता.

हातातला फोटो बाजूला ठेऊन  ती उठली. बसून चालणार नव्हते.आज लेकाची पावभाजीची ऑर्डर होती.तो कॉलेज मधून येईपर्यंत सगळं तयार हवं.! पण ब्रेड व बटर दिसत नाहीय घरात. म्हणजे मार्केट मध्ये जायला हवे. जवळच्याच कॉलनीतल्या सुपर शॉपीत तर जायचे.तिने फक्त ओढणी व पर्स घेतली.पण जाताजाता वर पिनअप केलेले केस सोडून पॉनिटेलचा शेपटा मोकळा केला.मन पुन्हा भूतकाळात गेले.आपले केस कधी क्लचर मध्ये बांधता येतील असे तिला वाटत नसे. पूर्वी  जाडजूड लांब सडक शेपटा पाठीवर कंबरेच्या खालपर्यंत रुळत असे.तो इतकासा कसा व केंव्हा झाला ? ती पुन्हा उदास झाली.

मान झटकून तिने हातात कुलुप घेतले व चप्पल पायात अडकवले. ऊजव्या पायाच्या अंगठयाचे बोट गेल्या वर्षी मोडले होते.प्लॅस्टर वगैरे उपचार झाले पण ते वाकडेच राहिले. त्यामुळे तिला पायात चप्पलही काळजीपूर्वक सरकवावे लागे.

काय हे ?किती गबाळ्या,कुरुप,विचित्र दिसतोय आपण.आपल्या कॉलेजला जाणार्‍या लेकाला मित्रांच्या बरोबर आपली ओळख करून देताना लाज वाटत असेल. आणी ‘अहो’? त्यांना तरी अलिकडे आपण आवडत असू का ? तसे थोडे टाळतातच ते आपल्याला आताशा ! सुनेत्रा अगदी रडवेली झाली.

मरगळ घालण्यासाठी तिने घरात आल्यावर आशा भोसले ची गाणी ‘कारवा’ वर लावली. छानशी कॉफी करुन घेतली. आता तिचे हात सराईतपणे पावभाजी करण्यात गुंतले. सुगरणी चे हात व मन आनंदाने किचन मध्ये रमले. सर्व आवरेपर्यंत संध्याकाळचे सहा  वाजले. दरवाजाची बेल वाजली. तिचा लेक दारात हसतमुखपणे ऊभा होता.सोबत दोन मित्र.तिच्या खांद्यावर हात ठेवत त्याने मित्रांची  ओळख करून दिली.” जाम भूक लागलीय मम्मीडे! आज मेक च्या लॅब मध्ये मेटल ब्लॉक करायचा होता. काय दमलोय यार.” असे म्हणत तो आत आला.”वाव!! काय मस्त वास सुटलाय. वासाने भूक आणखीनच खवळली  बघ “.पावभाजीवर तुटुन पडत सगळ्यांनी तिला दाद दिली. “आई तुझ्या हातात जादू आहे बघ.”

त्याचे मित्र गेल्या वर  ती हॉल मधला व ओट्यावरचा पसारा आवरत होती. तो ही मित्रांच्या व कॉलेज च्या गप्पा मारत तिला मदत करु लागला. तसे त्याच्या कॉलेज मध्ये न जाताही तिला सगळे ठाऊक होते. तोच सांगे सर्व. आला घरी की टकळी सुरुच.

आवराआवर होईपर्यंत ‘अहोंचे’आगमन झालेच. प्रथम चहा,गप्पा,TV, बातम्या,जेवण ———–जेवताना बापलेक पावभाजी ची स्तुती करत होते तोंडभरून.”अग आज ऑफिसधला तो जोश्या—- ” असे ऑफिस गप्पांचे तोंडीलावण होतेच.” तू दोन दिवस भिशी ग्रुप बरोबर जाणार आहेस ना ग महाबळेश्वरला ?दोन दिवस हॉटेल मधले बेचव खावे लागणार. क्या करे? बाबा आत्ताच पोटभर खाऊन घ्या “. अशा थट्टामस्करीत जेवणं झाली.

किचन मधील झाकापाकी करून ती बेडरुम मध्ये आली. नवरोबा केंव्हाच झोपी गेले होते. ते्व्हढ्यात तिला मोगऱ्याचा दरवळ आला. अहोंनी ऑफिस मधून येताना  मोगऱ्याचा गजरा आठवणीने आणला होता. तो ओंजळीत धरून तिने हुंगला. आणी मनावर दिवसभर आलेली मरगळ कुठच्या कुठे पळाली. विरळ झालेले लहान केस,वाकडे बोट किंवा अशक्त झालेला डोळा यांनी तिच्या प्रियजनांत काहीच फरक पडत नाही. ती सगळ्यांना अजूनही तितकीच आवडते.

बोट वाकडे झाले तरी त्यात चप्पल अडकवता येते. तिला कोणाच्याही मदतीशिवाय चालता येते.! डोळा बारीक झालाय पण दृष्टी चांगली आहे.!! विरळ केसातही गजरा चंद्रकोरी सारखा सजतोच ना!!!

छोट्या छोट्या कृतींमधून घरातल्यांच्या भावना तिच्या पर्यंत पोचल्या होत्या. शब्दांपलीकडले खूपसे तिला उमगले. दोघांचाही आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तिला सुखावून गेला. चेहरा आत्मविश्वासाने तेजाळला. ऊशीजवळ मोगऱ्याचा गजरा ठेऊन ती हलकेच निद्रादेवीच्या आधीन झाली.

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

१२/५/२०२०

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सुंदरा ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ जीवनरंग ☆ विविधा☆ सौ ज्योती विलास जोशी

‘प्राजक्त’ या माझ्या बंगल्याच्या कोपऱ्यावर एक मुलगा  गजरे घेऊन नेहमीच उभा असतो. मी फुल वेडी,नित्य नेमाने त्याच्याकडून गजरा घेऊन माझ्या वेणीत माळते.

दररोज दुपारची साडेतीनची माझी भजनाची ची वेळ! आदले दिवशी घेतलेला गजरा मी वेणीत माळलेला असे. मी भजनाहून परत येताना निमिष पर गाडी थांबवून उद्यासाठी त्याच्याकडून गजरा घेत असे.

आज मी निघतानाच तो माझ्या गाडीच्या आडवा आला. मी त्याच्याकडून गजरा घेतला. मी परतीच्या वेळी त्याच्याकडून गजरा घेणारच असताना त्याने आत्ता गाडी आडवली असे मी ड्रायव्हरला विचारले. दिवाळीचे पणत्या आकाश कंदील करायला तो जाणार होता म्हणून त्याने गडबडीने गजरा दिला. असे काहीसे ड्रायव्हरने मला सांगितले.

ड्रायव्हर त्याच्याशी काहीच बोलताना मला दिसला नाही. मग हे मूक रहस्य काय होते? मला जाणून घ्यायचं होतं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला.ते खरोखरच मूक रहस्य होतं तो मुका  आणि बहिरा होता. ड्रायव्हर आणि त्याच्यात फक्त  मौन संभाषण.

प्रत्यक्ष मी गाडीतून उतरून गजरा घेत नसल्यानं मला हे कधीच समजलं नव्हतं.

बऱ्याच दिवसानंतर कॉर्नरवर त्याच्यासोबत एक सावळी मुलगी हातात गजरे घेऊन उभी राहिलेली दिसली.”वहिनी,ही त्या गजरे वाल्याची बायको बघा” ड्रायव्हरने माहिती पुरवली.

मी आज गाडीतून खाली उतरले. सांकेतिक खुणांनी आपली बायको असल्याचे त्याने मला सांगितले. माझ्याकडे पाहून तिनं स्मितहास्य केलं .”नाव काय तुझं?” मी विचारलं. तिन हाताच्या बोटांनी हरिण केलं….. “सुंदरा” ?????

नाव ओळखल्याचाआनंद तिच्या चेहऱ्यावर मला दिसला.मूकपणे तिच्या मौनाचं भाषांतर झालं.तिनं लगेच बकुळीचा हार माझ्या हातात दिला आणि भर रस्त्यात ती माझ्या पाया पडली .मी तिला दोन्ही हातानी उचललं आणि अनाहूतपणे मिठी मारली.

तिचा हसरा चेहरा एक हसरा गंध देऊन गेला .त्या गंधाची झुळूक मला स्पर्शुन गेली . तिने दिलेल्या बकुळीचा वास माझ्या श्वासात भरला. सावळीशी ती किती काही बोलून गेली. तिचं मूकंपण मला बोलकं वाटलं. श्रुती आणि वाणी अबोल असलेली ती मला तिच्या मनातल्या तरंगांशी प्रामाणिक वाटली. देवाने तिच्या हातातच सुगंध पसरवायचे काम दिले असेल का ?असा विचार माझ्या मनात आला तिच्या मौनाचा अर्थ मी लावू लागले…….

निसर्गातील किती गोष्टी मौन बाळगून आहेत. जसे तारे ,आकाश, चंद्र ,नक्षत्र ,वृक्षवल्ली इत्यादी….. त्यांच्या मौनाचे रहस्य असे समजून घेता येईल का मला? वृक्षवल्लीशी आपला ‘शब्देविण संवाद’ होतोच ना ?मौन राखून ही निसर्ग निरंतर गतिशील आहेच ना ?स्पीक लिटिल डू मच असं काही सांगत असतील का ते? मूक प्राणी-पक्ष्यां च्या प्रेमा ची परिभाषा आपल्याला समजते ही मूक परिभाषा सारा आसमंत आपल्याला संक्रमित करत असेल का?

अनंतात विलीन झालेल्याला दोन मिनिटांची श्रद्धांजली आपल्या भावना पोहोचवते ना? अशा अनेक प्रश्नांचं काहूर माझ्या मनात माजले. बकुळ गंधा सारखं चिरंतन सुवास देईल असं एक तत्त्वज्ञान आज ही अबोली मला देऊन गेली आणि मौनाचे एक मानसिक तप करायचा मी निर्धार केला!!……

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आनंदाचे डोही ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आनंदाचे डोही ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

असं ऐकलं होत की अमरनाथ दर्शनाचे फळ काशीच्या दहा पट, प्रयागच्या त्रिवेणी संगमाच्या शंभरपट,आणि कुरुक्षेत्राच्या 1000 पट इतकं त्याचं महत्त्व आहे. त्यामुळे अमरनाथला जाण्याबद्दल एक कुतूहल आणि जिज्ञासा होती. तीव्र इच्छा असली की योग जुळून येतो. आणि तसंच झालं.

ऑगस्ट 1999 सालची गोष्ट. रोटरी क्लबने अमरनाथ, काश्मीर, वैष्णोदेवी यात्रा आयोजित केली होती. 187 जणांची  टीम निघाली. जम्मूला पोहोचल्यानंतर दुसरे दिवशी आमच्या बस जम्मुहून  पहाटे चार वाजता निघाल्या. जम्मू ते पहेलगाम 300 कि.मी. चा चौदा तासांचा संपूर्ण घाटाचा प्रवास होता. मी खिडकीत बसून सुंदर मनोहर निसर्गाचे नेत्रसुख घेत होते. वाटेत रामवनला खाणे पिणे झाले. बनिहाल ला जम्मू आणि काश्मिर यांना जोडणारा तीन किमीचा जवाहर टनेल. या बोगद्यावर काश्मीर पोलीस, बी एस एफ, आणि आर्मी यांचा कडक पहारा होता.  रात्री सात ते सकाळी सहा बोगदा बंद. त्यामुळे लवकर पोहोचणे गरजेचे होते. वेळेत बोगदा पार केला. आणि समोर काय वा वा निसर्ग देवतेचे सुंदर हसरं गोजिरवाण लावण्य रूप, जन्नत का नजारा  असं काश्मीर दिसायला लागलं. डोळे दिपून गेले. झेलम च्या काठावर वसलेलं अनंतनाग, तेथील डोलणारी भात शेती, लपतछपत खळखळत वाहणारी अरु नदी साथ करत होती. जागोजागी तपासणी केंद्रातून पार पडावं लागत होत. पहेलगामला पोचायला संध्याकाळ झाली. नंतर प्रथम सामानाची विभागणी केली. फक्त एक पाठीची सॅक बरोबर घ्यायची होती. व दुसरी बॅग परस्पर श्रीनगरच्या हाऊस बोटीत जाणार होती. रात्री झोपायला प्रत्येकाला स्लीपिंग बॅग दिल्या. पण रात्रीच्या मुसळधार पावसाने त्या  गारठून गेल्या. थंडीने झोपतर नाहीच लागली. पण उद्याचं काय ? हे प्रश्नचिन्ह समोर उभं राहिलं. अमरनाथालाच आवाहन केलं. त्याने आमच्या हाकेला  ओ दिली. आणि सकाळी सूर्यनारायणाच दर्शन झालं. सर्वानी  त्याला हात जोडले. सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य पसरल. सूर्यनारायणाच्या साक्षीने छोट्या गाड्या मधून जाताना एकोणीस किमीचा अत्यंत अवघड आणि अरुंद घाट, लीडर नदीच रौद्र पात्र, भीषण खळाळणारा  फेसाळणारा दुधाळ  प्रवाह  पाहून जीव मुठीत घट्ट धरला होता. बहात्तरशे फूट उंची पासून  9 हजार पाचशे फूट उंचीवरील चंदन वाडी ला पोचलो. 50 ते 60 घरांचं इतकं छोटं गाव होतं ते. 15 ऑगस्ट चा दिवस होता.तिरंगा झेंडा फडकवला. आधाराची छडी घेतली. घोडे ठरवून निघालो. आता खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात झाली.

“पाऊले चालती अमरनाथ वाट, जिज्ञासे भरिले  मन  काठोकाठ.” अशा भारावून गेलेल्या मनाने पिसू घाटीचा चढ चढणे सुरू झाले. मान पूर्णपणे आकाशाकडे करून पाहिलं की डोंगराच्या टोकावरील माणसे छोट्या बाहुली पेक्षा लहान दिसायची. आता आपण तिथं कधी पोहोचणार, असं म्हणत तिथे पोहोचलो की पुन्हा तीच पुनरावृत्ती. असं कितीदा तरी व्हायला लागलं. उंच उंच चढण, वाकडेतिकडे दगड गोटे यातून वाट काढत, आमचे ओझे पाठीवर घेऊन बिचारे घोडे चालत होते. रस्ता संपत नव्हता. शंकराला भेटायला जाणाऱ्या देवांचे दान वांशी झालेले युद्ध आणि त्यात देवांनी दानवांना  मारुन टाकून, त्यांच्या वाकड्यातिकड्या हाडांचा झालेला  ढीग म्हणजेही पिसू घाटी असं म्हणतात. तीन किमी चढून, अकरा हजार पाचशे फूट उंच असलेल्या पिसू टॉप वर पोचलो. आणि एक अवघड टप्पा फार केला. आता पुढील टप्पा शेषनाग.

उंच, खोल वाकडीतिकडी अरुंद पायवाट, वळणे वळणे असे मार्गक्रमण चालू होते. घोड्यावर बसूनही प्रत्येक श्वास महत्त्वाचा वाटायला लागला. थोड्याच वेळात निळ्याशार पाण्याचे सुंदर शेषनाग सरोवर, त्यातून वहाणारी शेषनाग नदी आणि त्याच्या आरक्षणाला उभा असलेला शेषनाग पर्वत दिसायला लागला. देवांना त्रास देणाऱ्या वायुरूपी राक्षसाला,शेषनागाने पाताळातून येऊन, सहस्त्र मुखांनी वायु ग्रहण करून, त्याचा वध केला. तोच पर्वत शेषनाग म्हणून अमर झाला. पुढे निघालो आणि शेषनागचे पत्त्याच्या बंगल्यासारखे, आमच्या मुक्कामाचे तंबू दिसायला लागले. हुश्श वाटलं. चंदन वाडी ते शेषनाग बारा किमी अंतर करायला सहा ते सात तास लागले. माझ्यासारख्या  प्राणीप्रेमीला घोडे आणि त्यांना धरून चालणारे घोडेवाले, यांच्याबद्दल खूपच सहानुभूती वाटायला लागली.आमच्यापेक्षा तेच पुण्यवान आहेत असं वाटायला लागलं. रात्री लंगरमध्ये अगदी सात्विक, राजसिक, उत्तम जेवण होते. पण तोंडावर ताबा ठेवला होता. आरोग्य सुविधा, प्रचंड कडाक्याची थंडी, झोपायला तंबू, त्यावर एक टांगलेला कंदील, शांत एकाकी वाटणारा आसमंत, विरळ हवा, बाहेर प्राणी पक्षांचे आवाज नाहीत अशा वातावरणात झोप झाली. सकाळी उठून पुढील टप्पा पंचतरणी.

सकाळी शेषनाग ते पंचतरणी असा पुन्हा 12 किमीचा प्रवास सुरू झाला. खडतर म्हणावा असा. वळणावळणातून दरीच्या कडेकडेने, पाय वाटेने पावले वाटचाल करीत होती. जागोजागी जवान होते. हसतमुखाने त्यांच्या लंगर मध्ये “चहा तरी घ्या ” असा आग्रह करत होते. “जय जवान” “जय जवान”, म्हणून आम्ही त्यांना आदरणीय हाका मारत होतो. जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडून “ओम नमः शिवाय” ” बम बम भोले” ” जय जय भोले “, उच्चार तोंडून येत होते. सर्वजण उत्साहात दिसत होते. महागुनाजपास या सर्वोच्च उंचीवरील, 14800 फूट या ठिकाणी पोहोचलो. पुढे अर्धा कि.मी. वर  पाबीपाल  आणि थोडे पुढे पोषपत्रीला थोडी विश्रांती घेतली. सर्वत्र बर्फाच्छादित डोंगर दिसत होते. मेंढीच्या दुधाचा बिन साखरेचा, काश्मिरी चहाची चव  चाखायला मिळाली. थोड्याच वेळात पंचतरणीच्या कॅम्पचे तंबू दिसायला लागले. पोषपत्री ते पंचतरणी अंतर पूर्णपणे दगडा दगडातून कापत १४८०० फुटावरून १२०००फूट उतारावर आलो. वाटेत तुषार उडवत वाहणारे झरे, -झुळझुळ वाहणारे थंडगार पाणी पाहून मन तृप्त होत होते. दुरूनच रुंदच्या रुंद  पंचतरणीच पात्र  दिसलं. खरंतर पाच नद्यांच्या संगमाने तयार झालेल्या नदीचे पात्र हे गोठलेलं ग्लेशियर असत. पण बर्फ वितळायला लागल्यामुळे पात्र ओलांडायला त्रास झाला नाही. रात्री उत्तम जेवणाचा आस्वाद घेतला. पंचतरणीच्या अंगाई गीताने निद्रा देवतेच्या अधीन झालो. आणि सकाळी तिच्याच  गाण्याच्या भूपाळीने जाग आली. आता पुढील सात कि.मी. चा अर्ध्या दिवसाचा टप्पा,

पंचतरणी ते अमरनाथ गुहा. असाच खडबडीत मार्ग. दोन तासात संत सिंग पहाडी आणि तसेच पुढे चार किमी पूर्ण गलेशियार. अमरगंगा नदी कधी समोर उभी ठाकायची, कधी डोंगराला ठोसा देऊन भगदाड पाडायची. मधूनच लपाछपी करायची. अवखळ मुलीसारखी, लांब उंच उड्या मारत नाच करायची. अमर गंगेची अशी रूप न्याहाळत गुहा कधी दिसायला लागली हे कळलंच नाही. गुहेच्या पायथ्यापासून चारशे पायऱ्या पायी चढून 13500 फुटावर जायचे होते. अमरनाथाच्या ओढीने तोही चढ कसा पार झाला लक्षातच आलं नाही. पहातो तो काय! महाकाय आणि प्रचंड बर्फाचं शिवलिंग! पूर्ण समर्पित होऊन हात जोडले. डोळ्यात कृतकृत्यतेचे  भाव आले. आणि आनंदाश्रू तरळले जायला लागले. आनंदाला शब्द नव्हते. देवदेवतांना मृत्यूपासून रक्षण करून त्यांच्यावरील प्रेमाने द्रवीभूत झालेल्या, रसमय शिवलिंगाचे, बाबा बर्फानीचे दर्शन हव  होत  ते मिळालं. शिवाने डोक्यावरून खाली घेऊन, पिळलेल्या चंद्रातून निघालेल्या अमृतधारेच -अमरगंगेच तीर्थ बरोबर घेतलं. वरती  फडफड आवाज आला. म्हणून पाहतो तो, दोन कबुतर शंकराला नृत्य समयी कुरकुर करणाऱ्या शिष्यांना, दिलेल्या शापाने झालेली ही ती कबूतर.काय खात पीत असतील कुणास ठाऊक !तेथेच असलेल्या बर्फमय पार्वती आणि गणेशाचं दर्शन घेऊन, तृप्त मनाने गुहेतून बाहेर पडलो.परतीचा रस्ता संगम टॉपला पोचलो. मोहम्मद अली आणि फारुख घोडेवाले यांना बक्षीस दिली. त्यांचे आभार मानले.घोड्यांच्या अंगावरून हात फिरवून निरोप घेतला.आता पुढील बालताल च्या वाटेला दुसरे घोडे ठरवले.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता.

मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – १३) – ‘ए, मन – यमन’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – १३) – ‘ए, मन – यमन’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

असं म्हणतात कि, पूर्वी `यमन’ रागाचं नाव `एमन’ असं होतं… ज्याची फोड केली असता ‘ए, मन’ असं असल्याचं जाणवेल… म्हणजे स्वत:च्याच मनाशी साधलेला संवाद! पुढे `एमन’ ह्या शब्दाचा अपभ्रंश होत `यमन’ असं नाव रूढ झालं. हा जो काही एकत्रित स्वरसमूह आहे त्यातून स्वत:च्याच मनाशी होणाऱ्या संवादाचा प्रत्येक भावरंग उत्तमप्रकारे प्रकट होतोच, ही किमया संगीतज्ञांनी अनुभवली असेल आणि म्हणून ह्या स्वरसमूहालाच त्यांनी `एमन’ असं नांव दिलं असावं. मराठीत ‘अरे मना’ असा ‘ए,मन’चा अर्थ होईल. म्हणजे आपल्या मनाला उद्देशून काही सांगणं.

ज्यावेळी भावनेचा एखादा रंग आपण पराकोटीच्या पातळीवर अनुभवतो तेव्हांच आपण अंतर्मुख होतो, स्वत:च्या मनाशी संवाद साधतो. हा संवाद नेमकेपणी साधला जाण्यासाठी प्रत्येकवेळी ‘एमन’च्या/यमनच्या सुरांची आळवणी उपयुक्त ठरते ही अनुभूती सूरसाधकांनी घेतली असेल म्हणून रागालाच म्हटलंय ‘ए, मन’… केवढा सार्थ विचार! काही ठिकाणी असाही उल्लेख आढळतो कि, यमन असा अपभ्रंश होण्यापूर्वी त्याचं नांव ‘इमन’ असं होतं. ‘इमन’चा अर्थ पाहायला गेलो तरी ‘इ मन’ म्हणजे ‘हे मन’ असा होईल… इथे दोन प्रकारे विचार करता येईल. ‘इ मन’… म्हणजे पुन्हा ‘अरे मना’ असं मनाला उद्देशून किंवा ‘इ मन’ म्हणजे ‘हे मन’ म्हणजे समोरच्याला जणू सांगणं आत्ता ह्या सुरांतून जे प्रकट होतंय हे माझं मनच आहे… जणू माझं अख्खं मन इथं उतरलं आहे ह्याअर्थी!

ह्या अर्थाचा विचार करताना एक निश्चित जाणवेल कि मनाची अवस्था नेमकेपणी व्यक्त करणारे ते यमनचे सूर आणि म्हणूनच नवरसांपैकी कोणताही भाव यमनच्या सुरांतून उत्तम प्रकारे व्यक्त होऊ शकतो. याआधीही आपण पाहिलं आहे कि, एखाद्या रागाची प्रकृती गंभीर आहे असं म्हटलं जातं तर एखाद्याची चंचल! मात्र यमनचे सूर भावाभिव्यक्तीच्या दृष्टीनं कोणतीही चौकट आपल्याभोवती आखून घेत नाहीत. काहीवेळा, एखाद्या रागाला तो अमुक प्रकारचा रस उत्पन्न करतो असं म्हणणं खूप सापेक्ष वाटतं. बंदिशीतलं साहित्य, त्याचा अर्थ, त्याच्या स्वररचनेची ठेवण आणि रागप्रकटीकरण करत असतानाची कलाकाराची मनोवस्था ह्या सर्वच गोष्टी कलाकृतीतून होणाऱ्या रसोत्पत्तीसाठी कारणीभूत असतात. त्यामुळं काहीवेळा रूढार्थानं केलेलं विधान सार्थ ठरतही नाही.

मात्र ह्याहीवेळी पुन्हा एका मुद्द्यावर येईन कि, मानवाच्या जाणिवा अत्यंत सूक्ष्म रूपातही जागृत असताना प्रयोग करून मांडल्या गेलेल्या मतांना काहीतरी अर्थ नक्कीच असणार. त्यांचा अनमान करायला मन धजत नाही. कदाचित रागाकडे अत्यंत सूक्षमतेनं पाहाण्याचा आवाका असणाऱ्यांना हे अर्थ जास्त नेमकेपणी उमजत असतीलही. माझ्यासारख्या सामान्य कलाकारालाही ढोबळमानानं काही अनुभूती येत असतेच. पण क्वचित कधी दुसऱ्या मताचाही विचार करावा का? असं वाटणारेही क्षण येतातच. मनात येतं, इथं कदाचित रागाच्या अंतरंग आणि बाह्यरंगाची गफलतही आपल्याकडूनच होत असावी. असो, पण यमनच्या बाबतीत मात्र हे द्वंद्व उरत नाही ह्याचं कारण म्हणजे त्याचं सर्वसमावेशक असणं!

ह्याच रागाचं नाव कल्याण असंही आहे आणि म्हणूनच हा कल्याणथाटाचा जनकराग आहे. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्या रागाचं नांव एकतर यमन म्हणावं किंवा कल्याण म्हणावं. मात्र ‘यमनकल्याण’ नावाचा राग मात्र नुसत्या ‘यमन’ किंवा ‘कल्याण’ रागापेक्षा वेगळा आहे. मागे पाहिल्यानुसार कल्याण थाटाचे स्वर म्हणजे म तीव्र आणि बाकीचे सर्व स्वर शुद्ध ह्या रागातही तसेच आहेत. नि रे ग म(तीव्र) ध नि सां असा आरोह तर सां नि ध प म(तीव्र) ग रे सा असा रागाचा अवरोह आहे. उत्तमप्रकारे यमन आळवणाऱ्या कलाकाराने उभ्या केलेल्या रागरूपात ‘ग’ आणि ‘नि’ ह्या त्याच्या वादी-संवादी स्वरांचं चिंब ओलेतं रुपडं अगदी खुलून दिसतं… म्हणजे त्याक्षणी रागातून जी रसोत्पत्ती होत असेल त्यात हे सूर अगदी चिंब भिजून जास्त जास्त खुलून आलेले जाणवतात. अर्थातच त्यांना गुंफत राहाणाऱ्या बाकीच्या स्वराचं त्यांना पोषक असणंही महत्वाचं! रात्रीच्या पहिल्या प्रहरी गायल्या जाणाऱ्या ह्या रागाचे आरोह-अवरोह पाहाता रागाची जाती षाडव-संपूर्ण असल्याचं लक्षात येईल.

‘प्रभाती सूर नभी रंगती’ सारखी रचना असेल, ‘कबिराचे विणतो शेले’, ‘अधिक देखणे तरी निरंजन पाहाणे’, ‘टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग’, ‘नामाचा गजर गर्जे भीमातीर’ ‘पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती’, ‘प्रथम तुला वंदितो कृपाळा’, ‘राधाधरमधुमिलिंद जयजय’ किंवा ‘समाधिसाधन संजीवन नाम’ सारख्या भक्तिरसातल्या रचना असोत, ‘आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम’ सारखे जीवनातली सत्य अधोरेखित करणारे शब्द असोत, ‘कशी केलीस माझी दैना, मला तुझ्याबिगर करमेना’, ‘का रे दुरावा का रे अबोला’, ‘भय इथेल संपत नाही’ ‘लागे हृदयी हुरहुर’ सारख्या काळजाची हुरहुर व्यक्त करणाऱ्या रचना असोत, ‘एकला नयनाला विषय तो झाला’, ‘नाथ हा मोही खला’, ‘सुकांत चंद्रानना पातली’ सारखी प्रसंगाला साजेशी नाट्यपदं असोत, ‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘जीवनात ही घडी अशीच राहुदे’, ‘तोच चंद्रमा नभात’, ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना’ सारखे प्रीतभावनेने ओथंबलेले शब्द असोत किंवा ‘पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा’ ही रांगड्या बाजाची लावणी असो… ह्यातल्या प्रत्येक शब्दाचा भावरंग यमनने केवळ आपल्या अनुपम सौंदर्याने खुलवला नाही तर त्याला पुरेपूर न्यायही दिला आहे.

अर्थातच काही रचनांमधे किंचित इतर सुरांचा वापर आणि पुढे कदाचित एखादं पूर्ण वेगळं वळण असू शकणं हे उपशास्त्रीय किंवा सुगम संगीतात सामावून जाणारं आहे. तर, मनाचा प्रत्येक रंग चपखलपणे उलगडून दाखवणाऱ्या यमनचा आवाका मानवी मनासारखाच प्रचंड व्यापक आणि अथांग आहे.

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा – कहानी ☆ कब्र में जीता हुआ ☆ सुश्री किरण राजपुरोहित नितिला

सुश्री किरण राजपुरोहित नितिला

(सुप्रसिद्ध राजस्थानी एवं हिंदी साहित्यकार सुश्री किरण राजपुरोहित नितिला जी का ई-अभिव्यक्ति  में हार्दिक स्वागत है।

संक्षिप्त परिचय – राजस्थानी हिन्दी की पत्रिकाओं व समाचार पत्रों में कविता, कहानी, लघुकथा, रेखाचित्र प्रकाशित राजस्थान पत्रिका में राजस्थानी कॉलम ‘सुण री सखी’ कविता कहानी के संकलनों में स्थान । लोक-संस्कृति व लोक गीतों पर लेख। चित्रकार, रेखाचित्रकार, फोटोग्राफी शौकिया जो कवर पेज और लेखों के साथ छपते हैं। यूट्यूब व इंस्टाग्राम चैनल से लोकगीत व संस्कृति के वीडियो प्रस्तुति। दूरदर्शन पर कार्यक्रम। जोधपुर, बाङमेर आकाशवाणी प्रस्तुतियां।। जै जै राजस्थान पेज से राजस्थानी में लोकरंग, आमी-सांमी व कवि सम्मेलन लाइव के संचालन सिलसिला चल रहा है। एक नया कांसेप्ट प्रायवेट नर्सिंग होम में सर्वजन साहित्यिक लायब्रेरी को स्थापित करने पर काम कर रही है। राजस्थानी साहित्य एवं संस्कृति अकादमी बीकानेर से सांवर दईया पैली पोथी पुरस्कार । वीर दुर्गादास राठौड़ सम्मान राजस्थानी संस्कृति समिति से डी लिट्,  कमला देवी सबलावत पुरस्कार, डेह सृजनगाथा सम्मान,  2 पेंटिंग प्रदर्शनी जोधपुर संभाग का पहला पेंटिंग सेमिनार का आयोजन। 

प्रकाशन – राजस्थानी कहाणी संग्रह नेव निवाळी, कांठळ (राजस्थानी),  कविता संग्रह –  ज्यूँ सैंणी तितली (राजस्थानी), झर झर निर्झर (हिंदी)

हम ई- अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों से आपकी रचनाएँ साझा करने का प्रयास करते रहेंगे।)

☆ कथा – कहानी ☆ कब्र में जीता हुआ ☆ सुश्री किरण राजपुरोहित नितिला ☆

उसकी याद फिर तिर आई। कांच पर जमती ओस की बूंदों सी और  उसका वजूद फिर नशे  सा छाये जा रहा है। कईं दिनों की मदहोशी, बेखयाली, बेचैनी, खलिस और बेकरारी उसकी याद के साइड इफैक्ट है  जो सालों से उसी शिद्दत से मोहते भी हैं और कचोटते भी है। वह उन इफैक्ट की बाट भी जोहता है और हल्की घबराहट से किनारा भी करता रहता है। इन सालों यही होता जा रहा है बार-बार। उसे लगता कि इस खाई में गिरते ,संभलते और उठते हुए युग बीत गए। बरसों की सीढ़ियां चढ़ते हुए दिनों की कतरनों ने उन सुखद पलों से उसका कई बार खून किया है और कई बार वह खुशी से और कई बार अनमना होकर उससे गुजरा भी है।  एक बेबसी उस पर हरदम तारी रहती और वह उसमें झूमता रहता।

उसे जिंदगी की इस करवट से यही सीन दिखाई देता है। वह चाहता है कि करवट बदले और कुछ दूसरा सीन देखकर बहल जाये। भूल जाये हमेशा वाली इन भावनाओं की तेज फुहार सी रौ को जिसने उसके वजूद को उब-चूब कर दिया है। पर यह कर नहीं पाता। बरसों से खुद में जीते हुए उसकी आत्मा पर उसके निशान पड़ चुके है। उन्हें खरोंच कर उतार नहीं सकता। जाने क्या हो? खरोंच के निशानों से डरता है वह। जाने कैसा एहसास पैदा हो और जो एहसास बचे वह जाने कैसा हो? मन ने उस नये एहसास को स्वीकार न किया तो ? नये एहसास से एलर्जी  हो गई तो किसकी गोद में जायेगा। आत्मा पर छपे उसके  निशान के संचे में नया एहसास फिट ना हुआ तो वह कहीं का न रहेगा।

सोचते -सोचते उसका माथा अजीब सा भन्नाने लगा। हाथ बेसाख्ता उस पर चला गया जिससे उसे हमेशा से कोफत रही। सिगरेट सुलगाते वक्त वह आंखें तरेरती और धुंआ फूंकने से पहले दूर छिटक पड़ती। शुरू-शुरू में तो वह हंसा करता और चारों ओर छल्ले के धुंए से गोला बना देता  और बेसाख्ता कठोर हो कर कह उठता …‘‘ कुछ भी हो पर तुम मेरी हो ….‘‘। इसी बात पर वह मुग्ध हो जाती लेकिन इसमें वह ज्यादा समय तक न बंध पाती और धुंए की बदबू और हल्की  घुटन से आजाद होकर दूर होकर ही सांस लेती। एक चीज मोहती तो दूसरी चीज दूर धकेलती और मन पेंडुलम सा डोलता रहता।

दीवार के सहारे जाकर सांस लेकर ठेंगा दिखाते हुए हंसती तो वह बेचैन हो उठता। जाने कैसी कसमसाहट ऐड़ी-चोटी सुलगती कि वह समझ नहीं पाता कि क्या करे और क्या न करे । जो चाहता है वह उचित नहीं और चाहा ना कर पाये, रोक पाये उतना उसमें सब्र नहीं।

कितनी तड़प होती थी । उफ! न उठते चैन न बैठते चैन। पांचवे माले के पूर्वमुखी फ्लॅट से हजार गुना अधिक तपन वह अपनी शिराओं में महसूस करता। रात-रात भर बेचैनी में धुंए से कमरे को भरते हुए इधर से उधर और उधर से इधर सैकड़ों मील चला होगा। उसको पाने की तड़प में शिरा-शिरा मुंह बोलती थी। बाजुएं, नथुने, पैर तली, कांधे, कनपटी नारियल की चिटकों की तरह  चटका करती थी। कई बार उसे यह बात बताई। बहुत बार खड़े रहकर ही बता पाया । ऐसा कहते हुए वह उसके पास बैठा नहीं रह सकता। न ही उसकी तरफ देख ही सकता था।

तब गर्मी की तप्त दोपहरी में उन दोनों के बीच भांय-भांय करता वह पुराना पंखा मनहूस गिद्ध की तरह लगता। वह चाहता कि जब वो दोनों बात करे तब बीच में कोई ना होे। कम से कम वह  सांय-सांय,  भांय-भांय कतई बर्दाश्त न करेगा लेकिन वह मनहूस पंखा उन दोनों के दरम्यान हमेशा रहा। अक्सर उसे लगता कि उसकी तकदीर ऐसी ही है। जो न चाहे वह मौजूद रहता ही  है और उसके उलट जो चाहे वह उसके आसपास बना भले रहे , ललचाता रहे लेकिन प्राप्य नहीं बन पाता।

रुद्रिका से  जब पहले पहल आत्मा के तप्त प्रवाह को बेबसी से रुक-रुक कर  पीठ फेरे हुए बता रहा था। खुद जाने किस गड्डे में गिरता जा रहा था पर अचानक आकर उसने ही उबार लिया था। अपनी गर्दन के पिछवाड़े में उसने दो नथुनों की गरमाहट को और दो होठांे की तप्त सलाईयों को महसूसा ….पल भर भी न लगा उसे और इस एहसास का परिणाम पूरे बदन में दौड़ने लगा और दिल तेजी से धड़कने लगा। वह ऐसे ही महसूसते  हुए बैठा रह जाता तो ष्षायद ठीक रहता पर जाने कैसे और कब उसने उसे अपने से सटा लिया उसे पता ही न चला। पीछे से बांहें गले में डाले वह पूरी तरह से सटी हुई थी और वह ना जाने कहां -कहां की यात्रायें वह भर में कर आया और सुखद एहसासों से लबथब रहा। कोमलता के पहले एहसास से मुलाकात  का पहला वाकया उसके लिए सुखद भी था और अंजाना भी । घबराहट वैसी जैसी पहली परीक्षा में होती है। उस आनंद को बहुत देर तक देख कर आनंदित होना भी चाह रहा था और जल्दी ही पीकर खतम भी करना चाहा रहा था। सुख के वे पल उसे बहुत लंबे चाहिए थे लेकिन सब कुछ तेजी से पाने की चाह बलवती होते जा रही थी। बदन की हर शिरा में रुद्रिका के प्रेमिल एहसास का प्रमाण गूंज रहा था। अपनी चाह को अभी इस वक्त कोई नाम नहीं देना चाहता था। सीनियर सैकंडरी से लेकर आरपीएससी के परीक्षा की तैयारी तक सैकड़ों मुलाकातें, हजारों जज्बाती रेले आये कि जब बहते-बहते तिर गए।

उन हजारों बार की उब-चूब ने उसे जाने कैसा बना दिया। एक अलग तरह का ही। उतार-चढ़ाव उसकी धमनियों का ही नहीं जीवन का स्थायी भाव बन गया। बचपन से लेकर अब तक कई जरुरतों  को मारते-मारते उसे खुद को ही मारने की इच्छा ने ही आरपीएससी की चाणक्य कोचिंग में ला पटका।

किसी भी काम में वह खुद को इतना झोंक देना चाहता है कि खुद को देखने-महसूसने समय ही न बचे और ना ही जरुरत। ऐसा करते वह सब कुछ बदल देना चाहता है।
और तत्काल ही उसे भुवन की याद हो आई। उसके दिल को कहीं ठौर है तो रुद्रिका के बाद भुवन की पनाह में। अपनी आहों का हिसाब जब उसे थमाता है तो भले ही वह खिल्ली उड़ाये लेकिन अंत में उसकी बातों को सीरियसली लेकर देा-चार उपदेश दे बैठता है। वह भी उसे मंजूर हो जाते है। लेकिन उसका सुकून भरी दुनिया की रंगीनियत में नहीं पांच बाई दस के उस अंधेरे कमरे में ही है। दर्द भरे उकताये हुए दिल को चैन भुवन के उस कमरे में ही मिलता है। भुवन के अपणायत की याद तीव्रता भी उसे सुकून देती है। दुनिया का एक वह कोना उसे नायाब लगता ।

……उस दिन की बात भी उसने भुवन से हूबहू कही थी। बिना लाग लपेट, बेहिचक। अपने मन की बात से लेकर, रुद्रिका की भाव-भंगिमा तक, अपनी देह के बदलावों से लेकर रुद्रिका की उफ तक का हिसाब देता रहा था। वह मुंह लुकोये सुनता रहा और उसे बरजता रहा था। बीच में कई बार टोका कि बस अब वह सुन नहीं पायेगा। लेकिन वह कहां रुका था।

….इन सालों की प्रीत को ऐसे किसी पड़ाव की आवष्यकता को दरकिनार करता रहा था। लेकिन आस-पास फड़कते होंठ उसकी नस-नस को जगा रहे थे और वह जाग रहा था। उसे खींच कर सामने लाकर अपनी बांहों में घेरा तब वह बहुत  सुंदर लगी थी। हमेशा से अलग सांवली सी लड़की इतनी सुंदर हो सकती है ये जाना उसने। निहारती रही थी वह भी….। चाहता था कि कमरे की ये निहायत ही शान्ति रुक जाये और किसी मधुर कोलाहल में वे डूब जाये। और किसी तरह का शोर दोनों के आसपास ना हो। वे केवल वही सुनें जो उनसे झंकृत होकर बिखरे। इस बिखरेपन में प्रकृति की सुंदर सुरुपता किसी मंजिल की ओर बहे जा रही थी। ये रास्ते बहुत तेजी से उंचे जा रहे थे। जैसे किसी मंजिल की तीव्र तलाश हो। पहाड़, झरने, सितार, जलतरंग से गूंजते वे पल सुंदरतम हुये बीतते रहे। सम तक पहुंच-पहुंच कर उनका फिर उंचा उठना….एक दूजे को देखते हुए उस सफर को पूरे होशोहवास में जी रहे थे। यह मधुर याद का पहला सफर हमेशा याद रहने वाला था। आंखें मूंदे किसी अनदेखी दुनिया को मन की आंखों से उतर कर देख रहा था….सुन रहा था….कुछ कानों में पड़ रहा था…..मधुर लय के साथ एक और वह लय किसी वस्तु के घूर्णन की ….सांय-सांय सी। वह सुनता रहा और बहता रहा…..थमता रहा। लगातार आती सांय-सांय ने उसे उद्ववेलित कर दिया। थम कर चेतना के टेंटेकल्स को थाम कर इधर-उधर देखा । लाईट आ गई थी और हमेशा से तेज आवाज में दौड़ते हुए अपने होने को जता रहा था वो मनहूस पंखा …………………

© सुश्री किरण राजपुरोहित नितिला 

संपर्क – 139 सी सेक्टर शास्त्री नगर, जोधपुर (राजस्थान) 342003

मो. 7568068844

 

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 25 ☆ किसी पावन तत्व से है भरा यह ब्रह्मांड सारा ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  की एक भावप्रवण कविता  “किसी पावन तत्व से है भरा यह ब्रह्मांड सारा।  हमारे प्रबुद्ध पाठक गण  प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।  ) 

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 25 ☆

☆ किसी पावन तत्व से है भरा यह ब्रह्मांड सारा ☆

किसी पावन तत्व से है भरा यह ब्रह्मांड सारा

इसी की नियमित कृपा से चल रहा जीवन हमारा

 

आज पर बढ़ते करोना कष्ट से सब डर रहे हैं

लोग कितने विश्व में उपचार के बिन मर रहे हैं

 

स्वार्थी संसार का जनहित विरोधी आचरण है

विचारों और कर्म से दूषित सकल वातावरण है

 

नाम सेवा का बताकर हो रहा है स्वार्थ साधन

इसी अनुचित नीति कर रखा तन मन धन अपावन

 

शुद्धता शुचिता सरलता का अनादर दिख रहा है

इसी से दुख से भरा इतिहास यह युग लिख रहा है

 

आज जग को प्रेम और विश्वास का व्यवहार चहिए

त्रस्त जीवन को परस्पर शांति सुख हित प्यार चहिए

 

किंतु सीधी राह को तज हर एक बढ़ता जा रहा है

इसी से जाता जहां भी वहां पर टकरा रहा है

 

आए दिन जाता उलझता दुखों से यह जग अकारण

प्रदूषित मन बन गया है सब दुखों का प्रमुख कारण

 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

ए १ ,विद्युत मण्डल कालोनी , रामपुर , जबलपुर

[email protected]

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि ☆ पानी ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ संजय दृष्टि  ☆ पानी ☆

आदमी की आँख का

जब मर जाता है पानी,

खतरे का निशान

पार कर जाता है।

आदमी की आँख में

जब भर आता है पानी,

खतरे के निशान से

उतर जाता है पानी।

©  संजय भारद्वाज

(कवितासंग्रह चेहरे से)

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – जीवन यात्रा ☆ मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ – भाग -5 – सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ प्रस्तुति – सौ. विद्या श्रीनिवास बेल्लारी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

(आदरणीया सुश्री शिल्पा मैंदर्गी जी हम सबके लिए प्रेरणास्रोत हैं। आपने यह सिद्ध कर दिया है कि जीवन में किसी भी उम्र में कोई भी कठिनाई हमें हमारी सफलता के मार्ग से विचलित नहीं कर सकती। नेत्रहीन होने के पश्चात भी आपमें अद्भुत प्रतिभा है। आपने बी ए (मराठी) एवं एम ए (भरतनाट्यम) की उपाधि प्राप्त की है।)

☆ जीवन यात्रा ☆ मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ – भाग -5 – सुश्री शिल्पा मैंदर्गी  ☆ प्रस्तुति – सौ. विद्या श्रीनिवास बेल्लारी☆ 

(सौ विद्या श्रीनिवास बेल्लारी)

(सुश्री शिल्पा मैंदर्गी  के जीवन पर आधारित साप्ताहिक स्तम्भ “माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे” (“मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ”) का ई-अभिव्यक्ति (मराठी) में सतत प्रकाशन हो रहा है। इस अविस्मरणीय एवं प्रेरणास्पद कार्य हेतु आदरणीया सौ. अंजली दिलीप गोखले जी का साधुवाद । वे सुश्री शिल्पा जी की वाणी को मराठी में लिपिबद्ध कर रहीं हैं और उसका  हिंदी भावानुवाद “मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ”, सौ विद्या श्रीनिवास बेल्लारी जी कर रहीं हैं। इस श्रंखला को आप प्रत्येक शनिवार पढ़ सकते हैं । )  

जब मेरे घर मेरे माता पिता को मालूम पडा कि, मैं अब से कुछ भी नही देख पाऊॅंगी, सचमें मैं कुछ भी नही कर पाऊॅंगी, क्या बीती होगी उन पर। अब मेरी लडकी क्या करेगी? ऐसा सोचना ही बहुत कठिन था।  फिर भी यह एव्हरेस्ट पर चढाई करने जैसा था और यह उन्होंने तय किया। उन्होंने मुझे इतना समझा दिया कि मुझे लगा जैसे मैं आनंद के सागर डूब रही हूँ ।

घर में हमेंशा मां के पीछे-पीछे भागती थी। रसोई घर में इधर-उधर घूमती थी। मां को हमेंशा मेरी तरफ ध्यान देना पडता था। एक दिन मां फुलों की टोकरी मेरे पास लेकर आयी। उसमें से लाल रंग के फूल बाये हाथ में और पीले रंग का फूल दाहिने हाथ में रखा। मेरा हाथ-हाथ में रख कर मुझे स्पर्श ज्ञान से दिखाया। मैंने सीखा भी जल्दी से। सुई में धागा डालकर फुलों की माला बनाना सिखाया। जल्दी ही बाये हाथ से और दाहिने हाथ से, लाल-पीला फूल डालकर दो-दो रंग की माला तैयार होने लगी। बहुत खूबसूरत माला तैयार हो गई। मां का प्रयोग यशस्वी हो गया। मुझे ये करने के लिए बंधन नही किया। जम गया तो जम गया, हम जीत जायेंगे ऐसा ही सोचा। सब्जी साफ करके, उसे काटना भी सिखाया। गाजर, नारियल के छोटे-छोटे टुकडे करना भी सिखाया। मै आज भी अपने आँसू पोछती रहती तो, आज मैं अपना काम आपको दिखा नही सकती थी। घर के काम की ट्रेनिंग मां ने दिया था, अच्छी तरह से। बाहर स्कूल, पढाई के अलावा, वक्तृत्व के पाठ पिताजी ने पढा-पढाकर तैयार किया था। सच में माता और पिताजी का बहुत बडा योगदान है, मेरे व्यक्तित्व विकास में। दोनो ही मेरे लिये बहुत कीमती है। मैं रसोई नही बना सकती यह मुझे मालूम है, पर मैं मां को बहुत कामो में मदद कर सकती हूँ । आज भी मैं मां को मदद कर सकती हूँ।

मैं साधारण तौर पर सातवी कक्षा मैं थी, तबसे ही टेप-रेकॉर्डर, टेलीफोन आ गया था। गाना सुनने के बाद बंद कैसे करना, यह मैंने हाथ के स्पर्श से सीख लिया था। मेरे भाई-बहन ने मेरा बटन बंद करना, चालू करना देखकर, मुझे प्ले, स्टाॅप, रेकॉर्ड बटनों की पहचान कर दी थी। रिवाइंडिंग कैसे करना, यह भी सिखाया। यह सब इस्तेमाल कैसे करना, ये मैं आसानी से सीख गई। M.A. की पढाई करते समय, अध्यापकों ने जो-जो सिखाया, वो सब में रेकॉर्ड करती थी। जब में पढना चाहूँ, तब मैं पढती थी और बार-बार सुनकर ध्यान में रखती थी। ऐसा ही नया आया हुआ फोन देखकर, उत्सुकता से मैं उसकी पहचान कर सकती थी। मेरे भाई ने ‘ how to operate phone?’ मुझे सिखाया था। रिसिव्हर हाथ में देने के बाद १ से ९ अंको तक की पहचान कर दी थी। कैसे दबाना यह भी आसानी से सिखाया था। २२ अंक हो तो दो वाला बटन दो बार दबाना ऐसा सिखाया। मैं वैसा ही करती थी। मुझे अपने आप नंबर ध्यान में आने लगे। बार-बार ध्यान में रखने की जरूरत नही पड़ी।

रेडिओ लगाना आज भी मुझे आसान लगने लगा और मुझे खूब अच्छा लगने लगा। कुछ साल पहले मेंरी आवाज मैं रेडिओ से सुनूंगी, ऐसी मुझे बिलकुल भी कल्पना नहीं थी। सांगली आकाशवाणी और कोल्हापूर आकाशवाणी से मेंरी आवाज प्रसारित भी हो गई,  है ना जादू!

सच में मुझे सब आता है, ऐसा नहीं है। बाहर जाने के लिये मैं आज भी किसी की मदद के बिना नहीं जा सकती। पहले पापा मुझे कहते थे, तुम्ही सफेद रंग की लकडी की काठी ला कर देता हुॅं। उसकी आदत हो जायेगी और तुम आसानी से चल पाओगी। मेरे जैसे हठ करने वाली लडकी सुनेगी तो ना!

हर रोज मैं पाठशाला जाती थी। इसलिये मुझे मॅडम का सिखाया हुआ सब समझ में आता था। इसलिये ब्रेल  लिपि सीखने की मुझे जरूरत नहीं पडी। इस में कुछ महानता भी नहीं लगी। एक-दो बार मैंने समझने की कोशिश की थी। लेकिन उधर मेंरा मन नहीं लगा। मैने सुनकर सीखने का, ध्यान में रखने का, ऐसी ही घोडी की चाल चलने का तय किया। मां कहती थी, जब मैं छोटी थी तब बहुत भाग-दौड करती थी। सीढ़ियाँ भी सहजता से जल्दी-जल्दी उतरती थी। देखने वाले को डर लगता था। दूसरों को, लोगों को मेंरी चिंता लगती थी।

मेरी कंपास, पेन्सिल, पेन सब जगह पर रखती थी। फिर भी मेरे भाई-बहन को मेंरा सामान उठाकर ले जाने की आदत थी। मेरे डांटने के बाद, गुस्सा करते थे। फिर थोडी देर के बाद सब खेलते थे।

मेरे चाची के मम्मी ने स्वेटर बनाना सिखाया था। मैंने रुमाल भी बनाया था। मैने वह रूमाल आज भी संभाल कर रखा है। मैं आज भी लॉकर का इस्तेमाल करती हूॅं।  खुशी मिलती है इसके लिए आज भी रुमाल बनाती हूॅं।

घर में मेंहमान आने के बाद पानी लेकर आती थी। मां कि बनाई हुई चाय भी देकर आती थी। सब लोगों को बहुत आश्चर्य लगता था। मां को मेंरी थोडी मदद होनी चाहिये, उसका थोडा काम हलका होना चाहिए, उसे थोडा ज्यादा आराम मिलना चाहिए, इसके लिये ही मैने सब काम सीख लिया था।

पिछले साल मेरे पिताजी को अस्पताल में लेकर जाना था। पहले मैं डॉक्टर चाचा की फोन  पर अपॉइंटमेंट लेती थी। पापा को रिक्षा में बिठाकर लेकर जाती थी।  लोगोंको कमाल सा लगता था।  उनका प्यार उमड आता था।

लोगों की आवाज सुनकर बराबर जान लेती थी। आज भी लोगों को आवाज से पहचान लेती हूं। अब क्या कहें, मिलने वाले सब लोग मुझसे प्यार ही प्यार करने लगते है, बडी लगन से। मैंने दिमाग में इतना सोच कर रखा  था कि, मैं सब ध्यान में रख सकती हूं। हमारे घर में नया वाॅशिंग मशीन आने पर उसको कैसे चलना चाहिए, यह भी सीख लिया था। आज भी मैं ही वॉशिंग मशीन ऑपरेट करती हुॅं, मां को मदद करने के लिए। उसे थोडा आराम भी मिले। इस बात से मुझे खुशी मिलती है।

कॉलेज की पढाई, वक्तृत्व स्पर्धा, गॅदरिंग, सहेलियों के साथ रहना, मस्ती करना और मां के सिखाये हुए सब काम करते-करते मैने B.A. की पदवी कैसे हासिल की, यह मेरे समझ में भी नहीं आया।

प्रस्तुति – सौ विद्या श्रीनिवास बेल्लारी, पुणे 

मो ७०२८०२००३१

संपर्क – सुश्री शिल्पा मैंदर्गी,  दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares