English Literature – Poetry ☆ Life is a journey ☆ Ms. Sulakshana Misra

Ms. Sulakshana Misra

☆ Poetry – Life is a journey ☆

Life is a journey that begins with a cry

And ends with the final goodbye.

As I grew up in life

Did I think, why not give, smile a try?

Since then, I moved ahead in life

I celebrated every moment in my life.

In the journey of my life

I had my ups and downs.

When I was up and on cloud nine

I thanked Almighty and smiled.

When I felt low and let down

I bowed to God but never frowned.

I ensured to leave pleasant memories

For people around,

Before I bid my final good-bye.

Because sooner or later,

The final destination is sure to come.

But before that,

I had open arms for everyone

As a sign of hearty welcome.

I made friends, I lost friends

Life showed me alarming trends.

I am adamant about celebrating the journey,

Before it finally ends.

 

© Sulakshana Misra

Contact – 5/241, Viram Khand, Gomtinagar, Lucknow-226010

≈  Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

English Literature ☆ Stories ☆ Weekly Column – Samudramanthanam – 18 – Kamadhenu ☆ Mr. Ashish Kumar

Mr Ashish Kumar

(It is difficult to comment about young author Mr Ashish Kumar and his mythological/spiritual writing.  He has well researched Hindu Philosophy, Science and quest of success beyond the material realms. I am really mesmerized.  I am sure you will be also amazed.  We are pleased to begin a series on excerpts from his well acclaimed book  “Samudramanthanam” .  According to Mr Ashish  “Samudramanthanam is less explained and explored till date. I have tried to give broad way of this one of the most important chapter of Hindu mythology. I have read many scriptures and take references from many temples and folk stories, to present the all possible aspects of portrait of Samudramanthanam.”  Now our distinguished readers will be able to read this series on every Saturday.)    

Amazon Link – Samudramanthanam 

☆ Weekly Column – Samudramanthanam – 18 – Kamadhenu ☆ 

As ‘Kamadhenu’ first glimpse is visible to outer world people. All Sura, Asura, sages even Lord Brahma feel that they are fed with sweet milk and felt very satisfied. Even Suras who lost their consciousness, wake up and say to Indira “O! king what a taste of milk which we have drunk. Now we are feeling very energetic and can-do churning for many Yugas”

Lord Brahma said, “O! mother All the gods are residing in your body.  Your four legs are the four Vedas; your horns are the triune gods Brahma, me (tip), Vishnu (middle) and Shiva (base); your eyes are the sun and moon gods, your shoulders the fire-god Agni and the wind-god Vayu and your legs the Himalayas. I request you mother that you will keep feeding your children as you have done right now. Currently, hunger of Sura is end but Saptarishis and others are preparing to do a great yajna to complete this churning of ocean ‘Kshirasāgara’ without any restriction. So please help them to provide pure milk to make ghee for yajna. Even from today onwards you will remain with Saptarishis, because they and other sage always keep doing yajnas for which your milk will work as ‘amrita’. The people who will do your protection will be called Gaurkha or Gorakshak and a place where sage will keep you called Gokula. Today will be celebrated as day of cow called ‘Gao Dwadasi’. You will also be called Surbahi – the smell of earth.

Now Sura and Asura started churning again.

© Ashish Kumar

New Delhi

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झपूर्झा ☆ कवी स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) ☆  प्रस्तुति – सौ. ज्योत्स्ना तानवडे

कवी स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)

जन्म – 7 ऑक्टोबर 1866

मृत्यु – 7 नोव्हेंबर 1905

☆ कवितेचा उत्सव ☆ झपूर्झा ☆

कवी स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) ☆  प्रस्तुति – सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ 

हर्ष खेद ते मावळले,

हास्य निमाले;

अश्रु पळाले;

कण्टकशल्यें बोंथटली,

मखमालीची लव वठली;

कांही न दिसे दृष्टीला

प्रकाश गेला,

तिमिर हरपला;

काय म्हणावें या स्थितीला?-

झपूर्झा ! गडे झपूर्झा !  !!१!!

 

हर्षशोक हे ज्यां सगळें,

त्यां काय कळे ?

त्यां काय कळे ?

हंसतिल जरि  ते आम्हांला,

सर न धरू हे वदण्याला:-

व्यर्थी अधिकचि अर्थ वसे

तो त्यांस दिसे,

ज्यां म्हणति पिसे.

त्या अर्थाचे बोल कसे ?-

झपूर्झा ! गडे झपूर्झा !  !!२!!

 

ज्ञाताच्या कुंपणावरून,

धीरत्व  धरून,

उड्डाण करून,

चिद्घनचपला ही जाते,

नाचत तेथें चकचकते;

अंधुक आकृति तिस दिसती,

त्या गाताती

निगूढ गीति;

त्या गीतीचे ध्वनि निघती-

झपूर्झा ! गडे झपूर्झा !  !!३!!

 

नांगरल्याविण भुई बरी

असे कितितरी;

पण शेतकरी

सनदी तेथें  कोण वदा !-

हजारांतुनी एकादा !

तरी न्, तेथुनि वनमाला आणायाला,

अटक तुम्हांला;

मात्र गात हा मंत्र चला-

झपूर्झा ! गडे झपूर्झा !  !!४!!

 

पुरूषाशीं त्या रम्य अति

नित्य प्रकृति

क्रीडा करिती;

स्वरसंगम त्या क्रीडांचा

ओळखणें,  हा ज्ञानाचा

हेतु;  तयाची सुंदरता

व्हाया चित्ता-

प्रत ती ज्ञाता,

वाडें फोडें गा आतां-

झपूर्झा ! गडे झपूर्झा !  !!५!!

 

सूर्य चंद्र आणिक तारे

नाचत सारे

हे प्रेमभरें

खुडित खपुष्पें फिरति जिथें,

आहे जर जाणें तेथें,

धरा जरा नि:संगपणा

मारा फिरके,

मारा गिरके,

नाचत गुंगत म्हणा म्हणा-

झपूर्झा ! गडे झपूर्झा !  !!६!!

 

कवी – स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)   

(चित्र साभार कृष्णाजी केशव दामले – विकिपीडिया (wikipedia.org))

(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)  

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ शब्दात वाच माझ्या ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ☆

☆ शब्दात वाच माझ्या ☆

शब्दात वाच माझ्या

शब्दरुप रम्य गाथा

मुखी नाम तुझे येई

गाते तुझीच गीता !!१!!

 

माझ्या काव्यातुनीच तुजला !

जग दिसेल छान देखणं !

रेखियेले निसर्गदेवाने

आकाशी रंगतोरण !!२!!

 

शब्दात वाच माझ्या

सुख दुःख लपलेले

कधी फव्वारे हास्याचे !

कधी शब्द मस्त हसलेले !!३!!

 

शब्दातच पहा माझ्या

माझ्या मनीचा साज

काव्यातील ऐक माझ्या !

सुंदर सागराची  गाज !!४!!

 

सारेच नाही रे कळत

शब्दात सांगुनीया

डोळेच सांगती सर्व

मनातच  पाहुनीया !!५!!

 

शब्दातून उमटे काव्य !

काव्यात शक्ती मोठी

माध्यम न लगे दुजेही

काव्यातच गाठीभेटी !!६!!

 

एक एक शब्दसुमन

सुंदर सूत्रात विणावे

मंगलमय काव्याच्या

पुष्पहारातच  विलीन व्हावे !!७!!

 

मंगलमय काव्याच्या

पुष्पहारातच विलीन व्हावे!!…

 

©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नेत्रदान ☆ सौ.अस्मिता इनामदार.

सौ.अस्मिता इनामदार

☆ कवितेचा उत्सव ☆ नेत्रदान ☆ सौ.अस्मिता इनामदार ☆ 

कर्णासारखा उदार दाता

आजच्या कलियुगात नाही

माझे ते माझे, तुझे तेही माझे

असेही म्हणणारे आहेत काही…

 

तीर्थक्षेत्री करूनी दान

पुण्य मिळवती सारेजण

इतर वेळी पापे करूनी

आनंद मिळवती काहीजण…

 

देवा-धर्माच्या नावाखाली

लूटच करती या जगती

दानाच्या त्या पावित्र्याला

नष्ट करणे ही प्रगती…

 

यापरतेही अनेक दाने

जगी आहेत, जाणूनी घ्या

त्या दानातून मिळणाऱ्या

समाधानाचा लाभही घ्या…

 

दानाचेही प्रकार अगणित

द्रव्यदान वा रक्तदान

या साऱ्याहून श्रेष्ठतम ते

ते म्हणजे हो नेत्रदान…

 

अंधकार तो नयनापुढचा

क्षणात एका होईल दूर

नेत्रदानाचे पुण्य घेऊनी

आनंदाला येईल पूर…

 

त्या दानातून कुणी अभागी

पाहील जग हे डोळेभरूनी

आयुष्याच्या वाटेवरती

चालत राहील दुवा देऊनी…

 

© सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आय लव्ह यू फ्लाय बॉय (उत्तरार्ध) (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ आय लव्ह यू फ्लाय बॉय (उत्तरार्ध) (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

27 जानेवारी :  पीरपंजालच्या बरोबर वर

संध्याकाळचे पाच वाजू लागले आहेत. हेलीकॉप्टरचं पूर्ण नियंत्रण मेजरने आपल्या ताब्यात घेतलय. थोड्या वेळापूर्वी बेफिकीर वाटणारा कॅप्टन आता उत्तेजित झालाय. धुकं आणि षड्यंत्री ढगाच्या टोळीशी झुंजत झुंजत हेलीकॉप्टर आता पीरपंजालच्या बरोबर वर आहे. मेजरला बेसकडून, त्याच्या बरोबर खाली चाललेल्या चकमकीविषयी आणि या चकमकीच्या दरम्यान घायाळ झालेल्या जवानाविषयी रेडिओ- सेटवर संदेश मिळतो. बेस अद्यापही अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. अंधारही वाढतोय. मेजरच्या मनात संभ्रम आहे. कायद्यानुसार तो आपल्या बेसच्या दिशेने उडू शकतो. त्याच्यावर कोणताही दबाव नाही. नियम आणि आदेशानुसार त्याला आपलं हेलीकॉप्टर साडे पाच वाजता बेसवर लॅंड करायला हवं. महागडं हेलीकॉप्टर आणि दोन प्रशिक्षित पायलट यांच्या सुरक्षिततेचा विचार करता ते आवश्यक आहे. संभ्रमाच्या या पराकोटीच्या अवस्थेत त्याला आपल्या मेजर दोस्ताची सक्सेनाची आठवण होते. त्यांचा जिगरी दोस्त. तो त्या राष्ट्रीय राइफल्स बटालियनमधेच आहे आणि अचानक हेलीकॉप्टरची दिशा बदलते. पीरपंजालच्या जंगलाच्या दिशेने ते वळतं. कॅप्टनच्या विरोधस्वरूप बडबणार्‍या ओठांकडे दुर्लक्ष करत, मेजर आपल्या कपाळावर डावा हात फिरवत त्यावर उमटलेल्या वाकड्या तिकड्या रेषा, स्लेट पाटीवर आखलेल्या वेड्या-वाकड्या रेषा पुसून टाकाव्या, तसा मिटवून टाकतो.

27 जानेवारी :  पीरपंजालच्या खाली दक्षिणी काश्मीरी घाटीचा निबीड जंगलाचा एक भाग

संध्याकाळचे सव्वा पाच वाजले आहेत. जंगलातल्या या आतल्या भागात संध्याकाळ जरा लवकरच उतरून आलीय. रातकिड्यांच्या किरकिरीत विव्हळण्याचा आवाजही मिसळलाय त्या घायाळ लांस नायकाच्या अवती भवती असलेल्या त्याच्या साथीदार सैनिकांच्या नजरा वारंवार आकाशाकडे वळताहेत. घेरून येणार्‍या अंधारात विव्हळणार्‍या नायकाचा आवाज मंदावत चाललाय. रातकिड्यांच्या करकरीत मधेच एक आवाज आकाशातून येतो. झाडांच्या वर दिसणारं हेलीकॉप्टर, त्याचे मोठे फिरणारे पंख, निराश लांस नायकासाठी संजीवनी घेऊन आले आहेत.  पृष्ठभागापासून थोड्या उंचीवर थांबेलेलं हेलीकॉप्टर सगळ्या जंगलाला थरथरायला लवतय. घायाळ लांस नायक आणि त्याचा एक साथीदार, हेलीकॉप्टरमध्ये बसलेले मेजर आणि कॅप्टन यांच्या साथीला येतात. झाडांना, वृक्षांना हलवत, डोलवत हेलीकॉप्टर अंधारात आपला मार्ग शोधत आपल्या बेसच्या दिशेने उडू लागतं. कॉकपिटमध्ये चमकणारं घड्याळ ठरलेल्या वेळेपेक्षा १५ मिनिटे जास्त झाल्याची चेतावणी देतं.

   २८ जानेवारी: मध्य काश्मीर घाटीतील एव्हिएशन – बेसची छावणी

सकाळचे सात वाजलेत. घायाळ लांस नायकतज्ज्ञ चिकित्सकांच्या देखरेखीखाली गेले बारा तास आय. सी. यू मध्ये सुरक्षित श्वास घेऊ लागलाय.

मेजर वर्मा आपल्या बिछान्यात गाढ झोपलेत. त्यांचा मोबाईल वाजतो. चिडून, वैतागून, अस्वस्थ होत ते मोबाएल स्क्रीनकडे टवकारून पाहतात. स्क्रीनवर त्यांचे जिगरी दोस्त मेजर सक्सेनांचा नंबर फ्लॅश होतो. अस्वस्थ होत ते मोबाईल उचलतात.

मेजर वर्मा : हा! बोल!

मेजर सक्सेना : कसा आहेस तू?

मेजर वर्मा : थॅंक्स म्हणायला फोन केलायस का?

मेजर सक्सेना : नाही.

मेजर वर्मा : मग?

मेजर सक्सेना : आय लव्ह यू, फ्लाय-बॉय!*

मेजर वर्मा : चल… चल…

आणि मोबाईलच्या दोन्ही बाजूंनी एकदमच खदा खदा हसण्याचा आवाज गुंजत राहातो.

समाप्त  

* फ्लाय-बॉय – हेलीकॉप्टर चालवणार्‍याला फ्लाय-बॉय म्हणतात.

मूळ कथा –   आय लव यू फ्लाय ब्वाय     मूळ लेखक – गौतम राजऋषि

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ते मोरपंखी बालपण ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ ते मोरपंखी बालपण ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

खरच नावांप्रमाणे आमचे बालपण मोरपंखी होतं. कसलेच टेंशन नाही.

दिवस भर शाळा करायची. भरपूर वेळ खेळायचे आणि उरलेला वेळ अभ्यास करायचा. थोडा अभ्यास पुरायचा कारण त्यावेळी मुलं शाळेत शिक्षक काय शिकवतात हे लक्ष देऊन ऐकायचे, कारण क्लास लावणे हे परवडत पण नव्हते आणि फॅड पण नव्हते आणि कोणत्याच शिक्षकांचा तो व्यवसाय पण नव्हता तेव्हा कोणतेच शिक्षक पैसे कमावण्यासाठी शिकवत नव्हते तर कुंभार जसा ओल्या मातीला आकार देतो त्याच प्रमाणे विद्यार्थी घडवत होते.

पोहायला शिकण्यासाठी आम्हाला कोणत्याही क्लासला घालावे लागले नाही. आमच्या गल्लीत विजू काका म्हणुन एक काका होते त्यांनी गल्लीतल्या प्रत्येक मुलाला पोहायला आलेच पाहिजे असा चंग त्यांनी बांधला होता. प्रत्येक मे महिन्याच्या सुट्टीत ते सगळ्या मुलांना पाटील विहिरीत घेऊन जायचे शिकवायला. कोणी येणार नाही म्हणायचेच नाही तर, त्यांनी प्रत्येक  मुलाला उत्तम पोहायला शिकवले. तिथे तासावर नाही तर तासनतांस डुंबत रहायचो आम्ही सगळे. शेवटी पोटात कावळे ओरडायला लागले की यायचो घरी, डबे, ट्यूब आणि दोर हे सारे साहित्य घेऊन. कोणतीही फी न घेता आत्मियतेने शिकवणार्या माझ्या त्या काकांना माझा सलाम. नित्य नेमाने त्यांच्याबरोबर जायचे हीच त्यांची फी.

आमच्या वेळी सायकल शिकायची म्हणजे पण एकधमाल असायची. एका तासाला आठआणे भाडे देऊन आधी सायकल भाड्याने घ्यायची आणि मग गल्लीतले ताई दादा यांनी कोणीतरी सायकल शिकवायची. मला आमच्या घराच्या शेजारी सुगंधा म्हणून रहायची, तिने सायकल शिकवली. कितीदा तरी पडले, खरचटले पण धडपडत सायकल शिकले एकदा, आणि सुरुवातीला त्याला एक घंटी असते हे लक्षातच यायचे नाही. घंटी वाजवायच्या ऐवजी मी तोंडानेच सरका सरका असे म्हणायचे. आत्ता मुलांना आधी नवीकोरी सायकल मिळते मग ते चालवायला शिकतात आमच्या वेळी मात्र आधी चालवायला शिका मग सायकल मिळेल अस होतं.

गेले ते दिवस जेव्हा रणरणत्या उन्हांतही आंबे तोडतांना झाडाची सावली मिळायची, चिंचा पाडताना, नकळत आंबट चव जिभेवर रेंगाळायची, मित्र जमवून जिगळी तयार करताना न कळत आपुलकी वाढायची.

आता मुलांच्या खिश्यात असतात कॅडबरी, च्युईंगम, टाॉफी , आमच्या वेळी खिसे भरलेले असायचे  आवळा, सुपारी आणि बोरांनी. मन तृप्त व्हायचे पेरू आणि करवंदानी. चिमणीचा घास म्हणून आवळा जेव्हा तोडला जायचा तेव्हा तो ऊष्टा कोणाला वाटत नसे. कोणीतरी खिश्यातून आणलेली मीठ मसाल्याची पुडी असायची त्याला तो लावून खाल्ला की त्याची चव तर अवर्णनीय असायची. आत्ता सारखे चॉकलेट नसायचे आमच्याकडे पण खिसे लाल वाटाणे, शेंगदाणे आणि फुटाणे ह्यानी भरलेले असायचे. आत्मियतेने भरलेले हे खिसे कधी रिकामे होऊन त्याच्या जागी शिष्टाचार आला हेच कळले नाही. कोणाच्याही झाडावर चढून पेरू तोडून खाताना कधी कमीपणा वाटला नाही, ना पकडले गेल्यावर एक धपाटा खाण्यात कमीपणा, कारण त्या धपाट्यात पण आपलेपणा असायचा आणि त्या काकूही दुसरे दिवशी आमची वाट पहायच्या. हेच जर आत्ता सापडलो तर लगेच म्हणतील विचारून घ्यायचा ना मी दिला असता, पण त्यांना कुठे माहिती की चोरून पेरू तोडून खाण्यात आणि त्या आपुलकीच्या धपाट्यात किती माया दडलेली असायची ते.

पूर्वी घरचे भडंग, कांदा कैरी अस घेऊन आम्ही उद्यानात जात असू आता हीच जागा पॉपकॉर्न कुरकुरे ने घेतली. एखाद्या वेळी येताना गुर्ऱ्हाळ्यात जाऊन उसाचा रस आणि आलेपाक म्हणजे आमच्या साठी मेजवानी असायची आणि आता पिझा, बर्गर ही संस्कृती होऊन बसली.

नारळाच्या शहाळ्याची जागा कधी पेप्सी ने घेतली हे कळलेच नाही,तसेच लिंबू सरबत कधी हद्द पार झाले आणि फ्रीझ मधे कोल्ड्रिंक कधी दिमाखात सजले ते ही कळलेच नाही. कोकम सरबताची जागा मीरिंडा ने घेतली आणि फ्रेंड सर्कल चा एक भाग बनून गेली.

आमच्या बालपणी कोणत्याही मित्र, मैत्रिणींच्या घरी थेट आत प्रवेश असायचा. आत्तासारखी फोन वर अपॉइंटमेंट घ्यावी लागत नसे.

मग सुट्टीत रंगायचा आमचा पत्यांचा एक डाव, कॅरम, नाहीतर कोणाच्या तरी गल्लीत लपंडाव, लगोरी, छप्पी. आताच्या मुलांना हे खेळ माहितही नसतील, बरोबर आहे म्हणा आम्ही रिकामे होतो ते बिझी असतात मोबाईल गेम्स आणि टीव्ही कार्टून पाहण्यात. आणी चुकून बाहेर पडलेच तर मॉल मधे जाऊन डॅशिंग कार खेळतात.

मला अजून एका गोष्टीची आठवण होते. मला आठवते ती टणटण वाजणारी हातगाडी. तो आवाज आला की सगळे गोळा व्हायचे  मस्त ऑरेंज, कोला चा बर्फाचा गोळा खायला आणि मुद्दामून जीभे वर चोळून जीभ रंगवायची. गेले ते दिवस गोळ्याचे, कुल्फी चे आणि हात गाडीच्या ऑरेंज कंँडीचे.

आता मिळते ती ट्रिपल लेयर, कसाटा , मस्तानी.

पण बर्फ चोखून खाल्लेले  समाधान यात कुठे ? पावसाळ्यात ते भाजलेले कणीस नाहीतर शेंगा म्हणजे आहाहा !!!! पर्वणीच. काय आली ना आठवण तुम्हाला पण तुमच्या बालपणीची??

खरच किती आठवणी, आता आठवणीच राहिल्या नाही का?

कुठे हरवले ते दिवस जेव्हा धडपडत सायकल शिकली जायची, कोणी तरी हक्काने पोहायला शिकण्यासाठी स्वतःच्या जिवाचा आटापिटा करायचे, आणि रणरणत्या उन्हातही सुखद सावली मिळायची.आपण मनात आणले तर हेच मोरपंखी दिवस आपण आपल्या पुढच्या पिढीला ही देऊ शकू, नाही का ?

पुन्हा कोकम, पन्ह, फ्रीझ मधे विराजमान होईल, कॉल्डड्रिंक, पीझा, बर्गर हद्द पार होतील आणि घरच्या भडंगाचा आस्वाद जिभेवर पुन्हा रेंगाळेल.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ?1. 9.2020

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

03.10.2020

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रिफ्रेशमेंट – मी, कागद आणि पेन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ विविधा ☆ रिफ्रेशमेंट – मी, कागद आणि पेन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

रिचार्ज व्हायचा आपापला एक फंडा असतो. कोणाचं गाणी ऐकून मन रिफ्रेश होतं तर कोणाचं चित्रपट बघून. पण माझे मन मात्रं  हातात लेखणी आली की रिफ्रेश व्हायला लागते.

माझी प्रत्येक रचना मग ती कथा असो कविता असो चारोळ्या असो अगदी आध्यात्मिकावरही लेख कविता असो ती माझ्या पेक्षा वेगळीच असू शकत नाही. मी जे लिहिते किंवा लिहिण्यासाठीजे शब्द निवडते..खरं म्हणजे मी त्याच शब्दांमध्ये असते.

रोजचं जीवन हे माझ्या लिखाणाचं मूळ लिखाण मला प्रेरणा देतात तर शब्द ऊर्जा आनंद..बोलायलाही खूप आवडतं आणि बोलतेही..अगदी पुस्तकांवरही ….

मनांचा मनाशी संवाद… प्रश्न माझेच आणि उत्तरेही माझीच…. ना तिथे हेवेदावे ना मतभेद.. फक्त समाधान

अतिव आनंद…मग मी म्हटलं संवादांना,क्षणांना,आठवणींना ,अनुभवांना ..तुम्हाला  मनात का कैद करू?

म्हणून मी कागदाशी मैत्री केली आणि त्या सर्वांना मी कागदावर उतरवतं गेले व्यक्त होत गेले. आजूबाजूला घडणारया प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकून त्याचेही अनुभव मी अगदी त्रयस्थ पणे मांडत गेली आणि अजूनही मांडत आहे… सूर्य ,चंद्र, पाऊस यांच्याशी सुद्धा माझी सलगी झाली आणि वेगळ्याच दृष्टीने जग कळू लागले.

शांततेपासून ते व्यक्त होण्याचा आणि अस्तित्वापासून ते परिपूर्णत्वाकडे नेणारा हा प्रवास…या प्रवासाने मला व्यक्त होता आले आणि मी लिखाणातून व्यक्त झालेही..आणि मी अजूनही व्यक्त होत आहे..

माझ्यातल्या मला शोधायला आवडतं आणि हो व्यक्त होऊन लिहायलाही आवडतं…

खरचं लेखणीचं एक वेगळंच विश्व असतं नाही का? व्यक्त व्हायला..

सोबत असतात कोरा कागद,पेन आणि भावना….

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ झपूर्झा ☆ कवी स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ. ज्योत्स्ना तानवडे

 ☆ काव्यानंद ☆ झपूर्झा ☆ कवी स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ 

रसग्रहण:

आयुष्यामध्ये कोणत्यातरी एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला; मग ती एखादी कला असो, संशोधन असो, वारी किंवा परिक्रमा असो, देशसेवा असो त्या ध्यासापायी सर्वस्व उधळून देणे, त्या ध्येयाची धुंदी चढून इतर जाणिवा नाहीशा होणे ही जी तन्मयतेची, तंद्रीची, झपाटलेपणाची स्थिती आहे तिला म्हटले आहे “झपूर्झा “.

असा एखादा ध्यास घेऊन,त्यासाठी जगाला विसरून बेभान अवस्थेत त्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी ध्येयपूर्ती करून यशोगाथा लिहिल्या आहेत, त्यांना अवलिया, साधक असे म्हटले जाते. हर्ष, खेद, हास्य, शोक या भावनांच्या त्यांच्या जाणीवा बोथट झालेल्या असतात.जे इतरांना व्यर्थ वाटते त्यात त्यांना अर्थ भरलेला जाणवतो आणि त्या अर्थासाठी ते धडपडतात. हा अर्थ त्यांनाच दिसतो ज्यांना त्याचे वेड लागलेले असते. या अर्थाचे बोल कसे असतात तर “झपूर्झा गडे झपूर्झा. ”

जिथे कुणाला काही दिसत नाही अशा ज्ञाता पलीकडे अज्ञाताच्या अंधारात त्यांना काहीतरी जाणवते.वीज चमकून जावी तसे होते. त्या उजेडात अंधुक जाणीवा होतात. तिथे काहीतरी आहे हे जाणवते आणि ते त्याचा शोध घेण्यासाठी जीवाचे रान करतात. या जाणीवा गूढ गीते गातात. त्याचे बोल असतात “झपूर्झा गडे झपूर्झा.”

भुई नांगरलीच नाही तर पीक येईल कसे ? अशी कितीतरी जमीन नांगरल्याविनाच आहे. म्हणजेच विश्वात अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या आपल्याला ज्ञात नाहीत. त्यासाठी ते शोध घेत राहतात आणि शेवटी ते संशोधन फळाला येते. असंख्य शास्त्रज्ञांनी शोध लावले ते म्हणजे विश्वात असलेल्याच गोष्टींची उकल करून सर्वसामान्यांसाठी त्यांचे अस्तित्व सिद्ध करून दाखवले. त्यासाठी झपाटून शोधाचा ध्यास घेतला. त्यावेळचा मंत्र आहे “झपूर्झा गडे झपूर्झा.”

या विश्वाचा पसारा म्हणजे एक अवघड कोडे आहे. विश्वाची निर्मिती, मानवी जगाचा विकास हे समजून घेणे हाच ज्ञानाचा हेतु आहे. ज्ञान आणि कला यांच्या माध्यमातून विश्वाचे रहस्य, त्याची सुंदरता जाणवते. याचा अभ्यास ही अशाच अवलियांनी केला. तोही एकच मंत्र गात “झपूर्झा गडे झपूर्झा.’

आपल्या तारा मंडळातील मंडळी अव्याहत फिरत असतात. पण या तारा मंडळाच्या पलीकडेही असंख्य ग्रह-तारे आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांचा अभ्यास करणे यासाठी इतर सर्व गोष्टी बाजूला सारून झपाटून जाऊन अभ्यास करणे, प्रयत्न करणे आणि तिथे पोहोचणे हे महत्त्वाचे असते. तेव्हा अशा या सर्व अशक्य कोटीतील कामांसाठी आवश्यक असते ते झपाटलेपण. त्यालाच म्हणतात “झपूर्झा.’

कवीने एके ठिकाणी सांगितले आहे की ,’त्यांनी काही मुलींना पिंगा घालताना पाहिले. त्या मुली “जपून जा पोरी जपून जा”असे म्हणत गोल फिरत होत्या. असे  म्हणत म्हणत फिरताना हळूहळू अंगात लय भिनत जाते आणि त्याचीच गुंगी येते. कवीने त्याच अर्थाने शब्द योजीले “झपूर्झा गडे झपूर्झा.”

कवितेच्या सुरुवातीला लिहिले आहे, आपल्याला जे  कांही नाही असे वाटते, त्यांतूनच महात्मे कल्याणाच्या चिजा बाहेर काढतात. त्या महात्म्यांची स्थिती लक्षात घेऊन पुढील गाणे वाचल्यास ते दुर्बोध होऊ नये असे वाटते .म्हणजेच ह्या अज्ञाताच्या गुहेमध्ये शिरणाऱ्या मनाला बजावले ‘जपून जा मना जपून जा’.तर त्या ध्यासामध्ये फिरत असताना त्याचेच कधी ” झपूर्झा रे झपूर्झा ” झाले हे त्या मनाला सुद्धा कळत नाही.

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

अध्यात्म/Spiritual – श्रीमद् भगवत गीता ☆ पद्यानुवाद – अष्टदशोऽध्याय: अध्याय (70) ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

श्रीमद् भगवत गीता 

हिंदी पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

अध्याय 18

( श्रीगीताजी का माहात्म्य )

 

अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ।

ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्यामिति मे मतिः ॥

 

जिसने भी होगा सुना ,यह धार्मिक संवाद

ज्ञान से उसने ही पूजा मुझे हृदय रख याद ।।70।।

 

भावार्थ :  जो पुरुष इस धर्ममय हम दोनों के संवाद रूप गीताशास्त्र को पढ़ेगा, उसके द्वारा भी मैं ज्ञानयज्ञ (गीता अध्याय 4 श्लोक 33 का अर्थ देखना चाहिए।) से पूजित होऊँगा- ऐसा मेरा मत है॥70॥

And he who will study this sacred dialogue of ours, by him I shall have been worshipped by the sacrifice of wisdom; such is My conviction.

 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’  

ए १, शिला कुंज, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, नयागांव,जबलपुर ४८२००८

vivek1959@yahoo.co.in मो ७०००३७५७९८

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares