सौ. सुजाता काळे

(सौ. सुजाता काळे जी  मराठी एवं हिन्दी की काव्य एवं गद्य विधा की सशक्त हस्ताक्षर हैं। वे महाराष्ट्र के प्रसिद्ध पर्यटन स्थल कोहरे के आँचल – पंचगनी से ताल्लुक रखती हैं।  उनके साहित्य में मानवीय संवेदनाओं के साथ प्रकृतिक सौन्दर्य की छवि स्पष्ट दिखाई देती है। आज प्रस्तुत है  सौ. सुजाता काळे जी  द्वारा  रचित एक समसामयिक भावप्रवण  कविता  “शहरातून गावी परतलेल्या मजुरांचे मनोगत…। )

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ कोहरे के आँचल से # 44 ☆

शहरातून गावी परतलेल्या मजुरांचे मनोगत…  

 

मातीतच राहतो मी….

 

आताच आलो होतो

पाय वळवून गावाकडे मी,

रंगीत शहराची तालीम

लगेचच फिरवू कसा मी.

 

भरकटलो वर्षानुवर्षे

आताच वळलो होतो,

शेताच्या मातीत आता

बीज बनून रूजलो मी.

 

धावलो स्वप्नांच्यामागे

क्षणाची उसंत नव्हती

आताच कुठेसा रोजच

हृदयाशी बोलतो मी.

 

कोंदटलेल्या श्वासात

मज बांधून घेतले होते.

आता कुठेसा गावात

प्राणवायू शोषतो मी.

 

हिरवळ गर्द हिरवी

चहुकडे पसरलेली

रोखून ठेवी गावात

शहरी कसा येऊ मी.

 

हा बांध शेतावरचा

ओलांडू न देई मजला

खुणेनंच सांगतो नाते

मातीशी जोडतो मी.

 

आता नको ते मजला

वाळू, सिमेंट, घमेले

डोक्यावरील ओझे

मातीत सोडतो मी.

 

मातीत परिश्रम करूनि

पेरतो मी रक्त-घाम

माझाच बनून आता

मातीतच राहतो मी.

 

© सुजाता काळे

पंचगनी, महाराष्ट्र, मोबाईल 9975577684

sujata.kale23@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

मातीशी नात घट्ट करणारी कविता.