श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

मी एक मतदार… अनामिक ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

आजोबांनी कष्ट करून विकत घेतलेली, कसलेली, माझ्याच आज्याची शेती माझ्या बापाच्या नावावर करावी म्हणून तलाठी सज्जात गेलो . . .

तलाठ्यानं सांगितलं –

काम करू पण,

देणार किती ?

मला वाटलं शेती आमची,

बाप माझा,

आजा माझा.

मग याला का पैसे द्यायचे ?

 

तलाठ्याची तक्रार करावी म्हणून पोलिस स्टेशनला गेलो.

पोलीस म्हणाले –

 गुन्हा दाखल करू, तपास करू पण . . .

आमच्या चहा पाण्याचं काय ?

 

मला पुन्हा राग आला.

यांना तर, सरकार म्हणजेच मी पगार देतोय मग पुन्हा हे चिरीमिरी का मागत असतील.

 

म्हटलं हे आमदारांच्या कानावर टाकू,

आमदार म्हटले . . .

 त्याची गडचिरोलीला बदली करू,

त्याला निलंबित करू,

मंत्र्यांना भेटू पण . . .

वजन ठेवल्या शिवाय फाईल पुढं जातच नाही.

 

मला वाईट वाटलं.

यांना तर मी मतदान केलं होतं.

 

वाटलं कोर्टात जाऊ . . .

गेलो.

तिथं गेल्यावर कळलं की,

तिथं एक आज-उद्या मरेल अशी म्हतारी आली आहे.

 

तिच्यावर तरुणपणी अत्याचार झाला होता. त्या मॅटरची तारीख होती.

अजून निकाल लागला नव्हता.

शिवाय निकाल कसा लागेल याची खात्री नव्हती.

 

म्हटलं हे एखाद्या . . . पत्रकार,

लेखक,

कवीला सांगावं . . .

मन हलकं करावं ! आपल्या प्रश्नांना ते आवाज देतील.

 

तिकडे गेलो s s

तर सगळेच म्हणाले,

पेन आमच्या हातात असला तरी,

त्यातली शाई आम्ही विकली आहे.

आम्ही तसं लिहू शकत नाही.

आमचे हात अन . . .

पेन बांधलेले आहेत.

 

मला याचा प्रचंड राग आला होता.

म्हणून एका साधू कडे गेलो.

वाटलं तेवढीच आत्मशांती मिळेल.

मठावरचे सेवेकरी म्हणाले . . .

उद्या या !

 

सध्या भाऊसाहेब,

 P I साहेब,

आमदार साहेब,

पत्रकार साहेब,

लेखक,

कवी आले आहेत.

महाराज त्यांच्यासोबत बिझी आहेत,

नंतर . . .

त्यांच्या सोबत जेवायला बसणार आहेत.

आज ते तुम्हाला टाईम देणार नाहीत.

 

अखेर एक भक्त भेटला, म्हणे भाऊ

पेपर बिपर वाचतोस कि नाही…

प्रवाहाविरुद्ध  जायच नाही..

गंध नाही; तावीत नाही; धागा नाही…

कुठलाही झेंडा  नाही…

…अस चालणार नाही

पुस्तकातल  पुस्तकातच बरं…

आजा , जमीन तुझी असली तरी देशाचं ;धर्माच अन् देवाचं देणं द्यावच लागेल…

 

माझा सगळ्यांवरचा विश्वास उडाला होता.

म्हटलं जनतेच्या दरबारात जाऊ …!

 

लोकांसमोर गेलो, लोकांना हे सांगितलं.

लोकं म्हटली हा येडा झालाय् . . . . .

हल्ली काही बरळतोय् !

नंतर कळलं . . .

लोकं गुलाम झाली आहेत !

लाचार झाली आहेत !

 

क्षणभर वाईट वाटलं.

 

मी करणार तरी काय होतो.

 

त्यांच्यात सामील व्हावं कि मरावं ?

कि मारावं यांना . . .

😢 😢 ज्यांनी लिहिले त्यांना सलाम

 

– मी एक मतदार !

(या देशाचा मालक)

संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments