सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 2 ☆ सौ. अमृता देशपांडे  

जन्माला आलेला प्रत्येक जीव पहिलं काय करतो,  तर तो रडतो. बाळाचा पहिला टॅहॅ टॅहॅ ऐकू आला कि तिथे असलेले डाॅक्टर्स,  नर्सेस सह, त्याच्या स्वागतासाठी आतुर झालेले सर्व जण आनंदित होतात. बाळ जन्मानंतर जर पटकन रडलं नाही तर डाॅक्टर्स त्याला उलटं धरून रडेपर्यंत कुल्ल्यांवर चापट्या मारतात.  जेव्हा ते रडून ठणठणाट करू लागतं, तेव्हा स्वच्छता वगैरे साठी नर्सकडे देतात. जन्मानंतर लगेचच बाळाचं रडणं आवश्यक असतं. श्वसनसंस्था स्वच्छ आणि योग्यप्रकारे कार्यरत होण्यासाठी ते अतिशय गरजेचं असतं. पुढच्या दिवसात भूक लागली की रडणं, ओलं ओलं झालं की गार वाटून रडणं हे नैसर्गिक असतं. इतर शारिरीक कार्यसंस्था उदा. पचनसंस्था, मूत्रपिंडाचे कार्य,  रक्तवाहिन्या, सर्व नसा,  अस्थिसंस्था यांची स्थिरता व कार्य सुरळीत होईपर्यंत नवजात बाळाला जपणे आवश्यक असते. हळूहळू सर्व व्यवस्थित सुरू होते,  पण सुरवातीला थोडासा जरी बदल झाला तरी बाळाच्या रडण्यानेच कळते की त्याला काही तरी त्रास होतो आहे. मग त्यावर उपाय करता येतो. एक गोष्ट मात्र खरी कि बाळ अंघोळीच्या वेळी आणि भूक लागली की जेवढं खणखणीत रडतं, तेवढं ते आरोग्यानं अधिक सशक्त होतं.  फक्त आईला समज, धीर, आणि सहनशीलता हवी.

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments