सुश्री मीनाक्षी भालेराव 

चार मराठी कविताएँ 

(सुश्री मीनाक्षी भालेराव जी की भारतीय परिवेश में स्त्री की पहचान उजागर करती हृदयस्पर्शी कविताएँ।)

 

१)

आई म्हणायची ,

आपल्या मुलींवर कधी हात  टाकू नये.

लक्ष्मी रुसते.

आज  सगळीकडे

दारिद्य्र वाढतंय,

महागाई वाढतेय,

कारण

आज  देशात ठिकठिकाणी

मुलींना मारले जातंय .

 

२)

शेजाऱ्यांच्या घरात भिंत उभी राहिली आहे आताशा .

असे वाटतंय , त्यांची  मुले  कमवू लागली आहेत आताशा .

ज्या आईवडिलांनी हौसेने बांधलं होते घर

ते  वृध्दआश्रम गले  आहेत आताशा .

शेजाऱ्यांच्या घरात भिंत उभी राहिली आहे आताशा .

असे वाटतंय , त्यांची  मुले  कमवू लागली आहेत आताशा .

 

३)

लहानपणी आईपासून

नाईलाजाने दूर राहावे लागले होते ,

तेव्हा आई मला नेहमी

पत्र पाठवत असे.

आज खूप वर्षे झाली

आई जाऊन.

तेव्हापासून तिची ती पत्रेच

बनली आहेत आई !

 

४)

पूर्वी कच्चे असायचे राखीचे धागे

पण नाती असायची पक्की.

आज अगदी मजबूत असतात राखीचे धागे

पण नाती मात्र बनत आहेत तकलादू .

जेव्हापासून आईवडिलांच्या मृत्युपत्रात

मुलीलाही मिळू  लागला वाटा

तेव्हापासून माहेरी भाऊ-वहिनीच्या प्रेमाच्या

राहून गेल्या कथा .

© मीनाक्षी भालेराव, पुणे 
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

वाव सर जी बहुत बहुत धन्यवाद