श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ परदु:ख शीतलम् !! ☆ श्री सुहास सोहोनी ☆

“आमच्या पिढीला खूप कष्ट करावे लागले. खूप खस्ता खाव्या लागल्या. आमच्या आधीच्या पिढीला अशी धावपळ नव्हती, स्वास्थ्य होतं. आमच्या पुढची पिढी कामं खूप करते, पण पैसाही तसाच मिळतो की !!”

मला वाटतं की प्रत्येक पिढीतली  माणसं हेच म्हणत असतात ! त्याचं कारण एकच. “परदु:ख शीतलम् !!”

खरं म्हणजे प्रत्येक पिढी अतोनात कष्ट करून, अगदी रक्त आटवून आपला संसार चालवत असते आणि जेवढं जमेल, तेवढं काहीतरी पुढच्या पिढीसाठी करून सुद्धा ठेवत असते ! आपल्या वकुबानुसार, आर्थिक  परिस्थितीप्रमाणे आणि स्वतःच्या बुद्धी/समजूतीप्रमाणे. पण अनेक ठिकाणी पुढच्या पिढीला त्याची फार मोठी किंमत वाटत नाही, कारण परिस्थिती बदललेली असते. आर्थिक स्तर उंचावलेला असतो. गांवाकडे घेतलेली जमीन किंवा बांधलेलं घर, ही asset नसते, तर liability ठरत असते. त्यामुळे आधीच्या पिढीच्या कामगिरीवर विनाकारण शेरेबाजी सुरू होते. “खूप ओढाताण करून गांवाला तीन एकर जागा घेतली त्यांनी. त्याच्या ऐवजी मुंबई-पुण्याकडे तीन गुंठे जागा घेतली असती तर ? आणि त्यावेळी त्यांना ते शक्य सुद्धा  होतं !!” 

अशा comments वर काय बोलणार? त्यामुळे मधल्या आळीतले झंपूनाना चितळे रोखठोक म्हणायचे तेच खरं, ” ज्याचे त्याने स्वतःपुरते बघावे. जास्तीत जास्त, कंबरेस चड्डी बांधण्यापुरती नाडी दुसऱ्यास द्यावी. अखंड चड्डी देण्याच्या भानगडीत पडू नये. त्यात आपलीच लंगटी सुटते. शेवटी ज्याचा तो !”

… हा खरा लाख मोलाचा सल्ला !!

लेखक : सुहास सोहोनी. 

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments