सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? कवितेचा उत्सव ?

☆ विठ्ठल रुक्मिणी संवाद…. ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

(काव्य प्रकार – अभंग वाणी)

विठ्ठल उदास | एकादशी दिनी

विचारे रुक्मिणी |का हो नाथा? ||१||

 

मुख झाले म्लान | उदास ही वाणी

काय आले मनी | सांगावे जी ||२||

 

बोले विठुराया | कसे सांगू तुला

जीव आसुसला | भक्तांसाठी ||३||

 

आली महामारी | शांत झाली वारी

माझा वारकरी |घरी राहे ||४||

 

चंद्रभागा तिरी | नाद मृदंगाचा

भास हा मनाचा | सतावतो ||५||

 

ऐकुनिया बोल | रुक्मिणी वदली

 चिंता ही कसली | नका करू ||६||

 

महामारी वेळी | वेश पालटून

रूप बदलून | लढलात ||७||

 

आरोग्य ,शिक्षण | साऱ्याच क्षेत्रात

तुम्हीच होतात | सर्वां ज्ञात ||८||

 

माझा विठुराया |पाठी उभा राहे

काळजी तो वाहे | विश्वास हा  ||९||

 

भरवसा ठेवा | वेळ ही जाईल

पंढरी सजेल |  पुनः पुन्हा ||१०||

 

रुक्मिणीचे बोल| मनास पटले

विठ्ठल हसले | गालातच ||११||

 

©  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments