श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ आढावा ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

 (वृत्त:लवंगलता)

(मात्रा:८+८+८+४)

सारे घोडे बारा टक्के,सुभाषिताच्या पुरते….

कुणी रेसचे,कुणी रथाचे, कोणी टांग्यापुरते !

 

प्रत्येकाचे मुठभर येथे,अभाळ अपुल्यापुरते

तेज दूरच्या नक्षत्राचे, फिक्कट पायापुरते !..

 

घोडचुकांना ‘अनुभव’ ऐसे,द्यावे गोंडस नाव

नवीन सागर नवी तुफाने, पुन्हा भरकटे नाव !

 

कळपामधला मृगजळबाधित ,मृग एखादा कोणी

तृषार्त अंती उरि फुटण्याची, सांगे शोककहाणी !

 

स्मरणऋतूंच्या ओलस हळव्या,उरास भिडती लहरी

उत्तररात्री गजबजते ती , अवशेषांची नगरी !……….

 

दहा दिशांचे शाहिर गाती, दिग्विजयाची गाणी

झुंजारांच्या शोकांताची, सांगे कोण कहाणी ?

 

दूत युगांचा क्षण भाग्याचा ,अवचित येई दारा

अनाहुताला वर्ज्य उंबरा, विन्मुख क्षण माघारा!

 

कधी दुजांच्या बंडाचाही, झेंडा हाती घ्यावा

हतभाग्यांस्तव यावा कंठी, आभाळाचा धावा !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments