सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

जन्म – ४ जुलै १९५४.

शिक्षण – एम् ए.

प्रामुख्याने रत्नागिरी आणि सांगली येथे वास्तव्य झाले. आता पुण्यात स्थायिक! गृहिणी पदाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना च शिशुवर्गापासून ते किशोर वर्गापर्यंत च्या मुलांना अध्यापन.

लेखनाची आवड जोपासली. विविध वर्तमानपत्रे आणि नियतकालिकात लेखन.’  जसं सुचलं तसं’  या लेख व कवितांच्या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथे १६ जून २०१९ रोजी  झाले.

☆ कवितेचा उत्सव ☆ तू आणि मी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

 

तुझ्या माझ्या आठवणींची

साठीही उलटून गेली!

पाठच्या बहिणीसम सखे,

तुझी माझी जोडी राहिली!

 

बालपणीची आपुली सोबत,

एकमेकीच्या घरी असे!

साजशृंगार तुझा माझा,

सारखाच मनी वसे !

 

एकीने घातली चार वेणी,

दुसरी लाही तशी हवी

तर कधी लांब वेणी वरी

रिबिनीची ही झूल हवी !

 

बालपणाने प्रवेश केला,

अलगद पणे तारुण्यात !

गोड गुपितांची लयलूट,

एकमेकींच्या कानात !

 

शैशवाचे दिवस सरले,

गेलो मांडवाच्या दारी !

ओढ आपली तरी न संपली,

होती अन् ती खरी खुरी!

 

मिळे अकल्पित वेळ कधी,

असे एकमेकीसाठी शकून!

सोडला ना एकही आपण,

भेटीचा तो असे सुकून !

 

आता उरलो एकमेकीचा,

विरंगुळा तोही मनोमनी !

आयुष्याच्या उरल्या क्षणांची,

साथ मिळेल ही क्षणोक्षणी !

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Bhagyashree

Very good