प्रा. अशोक दास

 ☆ कवितेचा उत्सव ☆ काय करतील गांधीजी ? ☆ प्रा. अशोक दास ☆ 

महात्मा गांधी म्हणायचे

सर्वांनी सत्याने वागायचे

इथे सारेजण सत्य सोडलेले

असत्याचे पाठीराखे झालेले

            काय करतील गांधीजी?

 

      गांधीजी अहिंसेचा संदेश देती

      इथे दगड प्रत्येकाच्या हाती

      एकमेकावर सारे तुटून पडती

      स्व अस्तित्व  टिकवण्यासाठी

             काय करतील गांधीजी ?

 

गांधीजी म्हणायचे त्याग करा

इथे भोगवाद हाच खरा

सारेच घ्यायला हावरट झालेले

घरे भरण्यासाठी आसुसलेले

       काय करतील गांधीजी ?

 

आता तरी बदलूया

 महात्म्याला आठवूया

देश नवा घडवूया

अभिमान वाटेल असे वागूया

नाहीतर काय करतील गांधीजी ?

 

          सत्य,अहिंसा, स्विकारुया

          भ्रष्टाचाराला त्यागूया

          इतरांसाठी थोडे झटूया

         आणि अभिमानाने म्हणूया

         आमचे राष्ट्रपिता म.गांधीजी

 

© प्रा. अशोक दास

..इचलकरंजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments