श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

वैराग्य☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

केवढे हे भाग्य खोटे तू मला सोडून जावे

सारखे ध्यानीमनी मी दु:ख ते का आठवावे

*

थाटला दरबार आहे  स्वागताला वंचनेच्या

वाटते या सोहळ्याला चंद्रतारे बोलवावे

*

पेटलेला देह कोठे शांत होतो सावलीला

दैवताने घात केला हेच आता ओळखावे

*

संकटे आली तरीही  हात होते बांधलेले

संशयाला वाटले की माणसाला ठोकरावे

*

स्वप्न वेडे दिवस होते काळ सरला  वैभवाचा

थोडके उरलेत बाकी स्पर्श तेही संपवावे

*

राहिले बाकी न काही हात झाले संत दोन्ही

बदललेल्या वास्तवाने नेमके वैराग्य यावे

*

वासनांनी जींदगीला कैद केले कैक वेळा 

मुक्त तेचा काळ येता पाय गुंते सोडवावे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments