सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “कोण खरं कोण खोटं ?” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

कोण खरं कोण खोटं

जगण्यापेक्षा असतं का ते मोठं

जे जसं आहे तसं

स्वीकारलं  तर काय बरं बिघडतं  …

*

काय चूक काय बरोबर

ठरवणं महत्वाचं असतं का खरोखर

चुकातूनही शिकता येतं

बरोबर तरी नेहमीच कुठं सोबतीला राहतं…

*

बदल नेहमी चांगला असतो

तरीही नकोनकोसाच वाटतो

न बदलता कुणाला बरं रहता येतं

बदललोच नाही तर जगणंच कठीण होवून बसतं ….

*

माझं ते माझं ,तुझं ते तुझं

सगळंच सारखं सगळ्यांचं

असं का होतं कुठं

वेगळेपण प्रत्येकाचं असतं महत्वाचं …

*

नको तक्रार नको स्पर्धा

तुलनेत जीव होई अर्धा अर्धा

स्वीकारू जो आहे जसा तसा

हाच सुंदर आयुष्याचा मार्ग सोपा…

💞शब्दकळी विजया💞

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments