कवितेचा उत्सव
☆ औचित्य… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
घेउनी संदेश मेघांचे सहिष्णू,
वारा कांही बरळतो आहे.
आठवांच्या लाटांचा दर्या अनावर ,
थेंब होउन डोळ्यात तरळतो आहे.
पाखरं उडून गेली म्हणून इथे,
वृक्ष थोडाच रडणारआहे.
रानावनाला माहीत आहे,
पाऊस हमखास पडणार आहे.
चिंब होण्या सरीत बरसत्या,
पाऊस एक निमित्त आहे.
जीवघेण्या पावसाचे आवेग समजण्या,
भिजून जाणे हे खरे औचित्य आहे
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈