श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ माझे दुःख… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

दुःख झाले एवढे की, आसवांना वाट नाही

तो किनारा दूर झाला, नाविकाला घाट नाही ||धृ.||

 

लाट आली, लाट गेली

जाहल्या ताटातुटी..

ऐन माध्यानी सुखाच्या

दाटले तम भोवती,

शुक्रतारा निखळला जो, तो पुन्हा दिसणार नाही ||१||

 

या मनाच्या मर्मबंधी

स्मरण यात्रा राहिली,

वेदना लपवून पोटी

जी जिवाने साहीली,

मंद झालेल्या प्रकाशी, सावली दिसणार नाही ||२||

 

हात हातातून सुटला

अंतरीचा बंध तुटला,

पंख तुटल्या पाखराला

सांत्वनाने धीर कुठला ?

आसवांची तेवणारी, ज्योत ही विझणार नाही ||३||

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments