श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ माझे दुःख… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
दुःख झाले एवढे की, आसवांना वाट नाही
तो किनारा दूर झाला, नाविकाला घाट नाही ||धृ.||
लाट आली, लाट गेली
जाहल्या ताटातुटी..
ऐन माध्यानी सुखाच्या
दाटले तम भोवती,
शुक्रतारा निखळला जो, तो पुन्हा दिसणार नाही ||१||
या मनाच्या मर्मबंधी
स्मरण यात्रा राहिली,
वेदना लपवून पोटी
जी जिवाने साहीली,
मंद झालेल्या प्रकाशी, सावली दिसणार नाही ||२||
हात हातातून सुटला
अंतरीचा बंध तुटला,
पंख तुटल्या पाखराला
सांत्वनाने धीर कुठला ?
आसवांची तेवणारी, ज्योत ही विझणार नाही ||३||
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈