☆ “ऋतूनाम कुसुमाकरः…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस ☆
वसंत हा निसर्गाचा उत्सव आहे. सतत सुन्दर भासणारा निसर्ग वसन्त ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसन्त असेल तर वसन्त हे सृष्टीचे यौवन आहे. महर्षी वाल्मीकींनी रामायणात वसन्त ऋतूचे अतिशय सुन्दर व मनोहारी चित्रण केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ’ ऋतूनाम् कुसुमाकरः’ असे म्हणून ऋतुराज वसन्ताची बिरुदावली गायली आहे. सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसन्त ऋतूमध्ये जणू पुन्हा रुजून येतो.
कात टाकणारे साप, धुळीची, किरणात नाचणारी बाळे, संध्याकाळी कौलांवर रेंगाळणारे कवडसे आणि खडकात फुलणारा चाफा हे सारे आजूबाजूला दिसू लागले की कळते आता बसंत आने को है.. अन् मन सावरीच्या कापसासारखं अलवार होऊन वाऱ्याच्या झुळकी होतं… या सगळ्या वसंताच्या आगमनाच्या सुचना आहेत हे वयपरत्वे कळत गेले…
फुलांचा संभार सांभाळत उभा असलेला चाफा बघणं मला आवडतं… असं वाटतं, रात्रीच्या वेळी त्याच्या फुलांमधून चांदण्यांचे झरे झिरपतात आणि मुरतात त्याच्या सालीमध्ये.. वाटतं जणू चाफा म्हणजे चांदण्यांचं घरच आहे की काय? तर कधी वाटतं, एखादी सोनपरी आपले इवले पंख पांघरून येईल कुठूनशी आणि चाफ्याच्या फुलावर मोठ्या डौलात बसून झोके घेत राहील… देवघरात झुल्यावर बसवलेल्या गोैरीसारखी…
खरंच हा वसंत एकटा येत नाही कधी. तो घेवून येतो नवीन पालवीची जादू… जी तो पखरत जातो कोमेजलेल्या फांद्यांपासून कोमेजलेल्या मनांपर्यंत… आणि उत्फुल्ल करून टाकतो सारा आसमंत… आपल्या पेटार्यातल्या रंगबिरंगी चिजा काढून रंगवून टाकतो सारा राखाडी बाज आपल्या रंगांच्या पंचमीत… चाफा, मोगरा, अमलताश, पलाश, बहावा सारेच त्याचे साथी आणि गुलमोहर तर प्राणप्रिय सखा-वाटायचं हा वसंत जसाकाही कान्हा आणि ही सृष्टी जणू राधिका; जी कान्हाच्या स्वागतासाठी सारी मरगळ झटकून साजशृंगार करते आहे. पाखरांच्या गळ्यातून तिच्या कान्हाजीचे स्वागत करते आहे, म्हणते आहे…
ऋतू वसंत तुम
अपनेही रंग सो
पी ढुंढन मै
निकसी घर सो
ऋतू बसंत तुम..
जणू काही कित्येक काळाच्या तितिक्षेनंतर विरहिणीला तिचा प्राणसखा भेटावा आणि तिने म्हणावे…
सजण दारी उभा… काय आता करू? घर कसे आवरू? मज कसे सावरू? हाच तो क्षण बहाव्यानं आपल्या सोनसळी फुलांनी सजण्याचा आणि पलाश, पांंगार आणि गुलमोहराने बहरण्याचा.
वसन्ताचा उत्सव हे अमर आशावादाचे प्रतीक आहे. वसन्ताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश बनत नाही. शिशिर ऋतूत वृक्षाची पाने गळून पडतात, पण तो स्वतःच्या जीवनातून निराशा झटकून टाकतो. वसन्त म्हणजे आशा व सिद्धी ह्यांचा सुन्दर संगम. कल्पना व वास्तवता ह्यांचा सुगम समन्वय. जीवन व वसन्त ज्याने एकरूप करून टाकले अशा मानवाला आपली संस्कृती सन्त म्हणते. ज्याच्या जीवनात वसन्त फुलतो तो सन्त!
आकाश हेच घर असणाऱ्या तेजाने सगळीकडचा अंधार, उदासिनता दूर सारून प्रकाशानं आसमंत उजळून टाकावा आणि या तेजाचे काही कण पिऊन समस्त सृष्टीने नवा जन्म घ्यावा.. असंच काहीसं वाटतं वसंताच्या येण्यानं.. जणू फुलणाऱ्या प्रत्येक कळीतून नवीन जीवन जन्माला यावे आणि त्याने आपल्या रंग, गंध, रसातून उधळून द्यावे जीवनासक्तीचे तुषार जे शिशिराच्या वृद्ध उदास पानगळीलाही जगण्याचा मोह पाडतील.. हीच तर वसंताची जादू आहे.. वसंत म्हणजे सकारात्मकता. वसंत म्हणजे उत्साह. वसंत म्हणजे यौवन.. वसंत येतो, दवांत न्हातो. दर्वळ दर्वळ होतो. जणू एखाद्या लाजऱ्या पानसखीचे
मंथर गाणे गातो.. कधी फुलात हसतो, वनी लगडतो
झऱ्यांत झुळझुळ वाहतो.. तर कधी गंध कोवळा माखून घेऊन आभाळात पसरतो.. कधी वाऱ्यावर लहरत सूर सोहळा होतो तर कधी तृणांच्या मखमालीवर गवतफुलाबरोबर उमलताना सोनसावळा होऊन खुलतो.. एखाद्या आमराईत सहज वाऱ्याच्या हिंदोळ्यावर
आंबवती झुलताना कोकीळाच्या गळ्यातील पंचम तान होतो असा हा ऋतूनाम् कुसुमाकरः वसंत येतो अन् आपल्या ऋतूवैभवाने चिंब भिजवतो.. मला, तुम्हाला आणि साऱ्या चराचराला.. तेव्हा आठवतं
गगन सदन तेजोमय..
तेव्हा नक्कीच स्वागत करूया या ऋतूराजाचं जीवनातल्या नवीन बहरासाठी..
श्रीराम जन्मोत्सवाच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
सध्या रामजन्मोत्सव होय रामजन्मोत्सवच, जयंती नव्हे, साजरा करताना अधिक आनंद होतोय. कारण प्रभू आपल्या मंदिरात विराजमान झाले आहेत. तसेच मंडळी मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतेय. न्यू इयर साठी नाही. हॅपी न्यू इयर म्हणून हाय करणे ही संस्कृती आपली नव्हे. तर तो केवळ उपचार आहे. मोठ्यांना नमस्कार करून शुभेच्छा देणे आणि लहानांना आशीर्वाद देणे. वाकून मोठ्यांचा पदस्पर्श करणे यातही शास्त्र आहे. विज्ञान आहे. अशा तऱ्हेने शुभेच्छा दिल्या घेतल्या जातात. हा संस्कार आहे. संस्कृती आहे. यातही शास्त्र आहेच ना? गुढीपाडवा कसा साजरा करायचा वगैरे सर्व गोष्टी प्रत्येकाच्या घरातली वडील माणसं सांगतातच. पण खरंच चैत्र महिनाच वर्षाचा प्रथम महिना का ?
शिशिर ऋतूत झडलेली पानं आपण बघतो ! झाडांना चैत्रात नवी पालवी फुटायला लागते. मानवी जीवनातली निसर्गाने सांगितलेली ही फार मोठी गोष्ट आहे तत्वज्ञान आहे. यातच येतो गुढी पाडवा. श्री राम जन्मोत्सव, हनुमान जन्मोत्सव ! चैत्रगौर ! आंब्याची डाळ, पन्हं घेऊन !
दिवसा सूर्य अतिउच्च शिखरावरून टळटळू लागतो. पृथ्वीवरील पाणी, जेवढे शक्य असेल तेवढे वाफेच्या रूपात घेऊन जातो. तशातही टेम्भरे, करवंद, चारोळी, जांभूळ ही फळं निसर्गामध्ये देतच असतो. हा वर्षाचा प्रथम मास लवकर संपून न जावा असं वाटत असतानाच वैशाख येतो. कैरी जाते. तो आंबा घेऊन येतो. ऊन असतं पण फणस, आंबा, कोकम हवेहवेसे वाटतात ना? लगेच आगमन होतं जेष्ठाचं !
कडक ऊन. आणि मोसमी पूर्व थोडासा पाऊस. सृष्टी भाजून निघते. आणि पावसाची वाट बघणं सुरू होतं.
ढगांच्या गडगडासह, विजेच्या रोषनाईत नंतर आगमन होतं ते आषाढाचं. आर्द्रा नक्षत्र आपलं अक्राळ विक्राळ रूप दाखवू लागतं. पावसानं मस्त जोर धरलेला असतो. कारण हे सर्व पाणी जमिनीत मुरायला हवं असतं. झाडांना वर्षभर पुरायला हवं असतं. नदी नाले तलाव भरून ओसंडून वाहू लागतात. बळीराजा आनंदून जातो. लहानखुऱ्या पावसात त्याने पिकाची सुरुवात केलेली असते. आता यथेच्छ पाणी पिऊन पिकं मोठी होऊ लागतात.
माणसानंही असंच वागायला हवं. आपल्या योग्य वयात म्हणजे वयाची सोळा वर्ष पूर्ण करताच आपली ध्येये ठरवायला हवीत. पंधरा ते पंचेचाळीस हा खरा कालावधी शिक्षणाचा आणि हवं ते मिळविण्याचा. झपाटून अभ्यास, कष्ट करण्याचा. हे वय साध्य नव्हे तर, विद्यार्थी मित्रांनो साधन आहे. आषाढासारखं.
अतिपावसाचा कंटाळा आला असं म्हणावं लागू नये म्हणून की, काय लगेचच हिरव्या ऋतूचं आगमन होतं. अर्थातच श्रावणाचं. हिरवागार शालू नेसून एखादी नववधू विवाहासाठी तयार होऊन बसावी, तसा हा वर्षातला पाचवा महिना ! अधूनमधून पावसाची सर, मधेच पडणारं पिवळंधम्म उन्ह, आकाशाला तोरण बांधणारं इंद्रधनुष्य. सणांची रेलचेल !सर्वांना हवाहवासा वाटणारा श्रावणमास !
श्रावणातल्या धरणीचं लग्न लागलेलं असतं. तसं आषाढातच. भाद्रपदात झाडं, वेली वाढू लागतात. हळूहळू वेलींना फुलं येऊ लागतात. फळं लगडतात. सारा निसर्गच लेकुरवाळा होऊन जातो. ही लहान लहान लेकरं निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळू लागताच लगेच किंचितशी थंडीची चाहूल लागते.
खरंच की ! थंडीची चाहूल म्हणजेच आश्विनाची सुरुवात. अंगा खांद्यावर फिरणारी पिल्लं शाळेत जाऊ लागावीत. तरूण नवरा – बायकोने आपल्या सुखी संसाराची तजवीज करावी, असा वयाच्या तीस – पस्तीशीतला दृष्टीकोन ठेवणारा अश्विन महिना. पिकं डोलू लागतात. ती खराब होऊ नयेत म्हणून, शेतकरी आई होऊन काळजी घेऊ लागतो. पिकातली कीड काढून टाकून शेत निकोप कसं होईल याची काळजी घेतो. किती समजूतदार आहे नाही निसर्ग ?
माणसाची चाळीशी येते. संसार बऱ्यापैकी स्थिरावलेला असतो. मुलांना वाट दाखवायची असते. घरदार, जमापुंजी हळूहळू वाढायला लागते. अगदी असंच रूप धारण करुन कार्तिक महिना येतो. पस्तीशीतल्या जाणत्या देखण्या स्त्रीसारखा. आश्विन अमावसेला लक्ष्मीपूजन करून वेगवेगळे संकल्प करण्यासाठी येते ती बलिप्रतिपदा. हे व्यापऱ्यांचं नवीन वर्ष असतं बरं का?
नंतर हळूच आगमन होतं ते मार्गशीर्षाचं ! थंडीनं कळस गाठलेला असतो. तुम्ही आता स्थिरावलात. म्हणून सूर्य दाक्षिणेची काळजी घ्यायला दक्षिणायनात दाखल झालेला असतो. तब्येतीला आता जरासं जपायचं असतं. निसर्गही सारं जपू लागतो. धान्याच्या राशी घरात येतात. चार पैसे हातात खुळखुळू लागतात. गरज आणि सुखाची कल्पना संपून, मन चैनीकडे झुकावं, तसा हा वर्षातला ” शीर्ष महिना ” पुढल्या जन्मासाठी काही ठेव करून ठेवावी असं सांगणारा.
शेतकरी नाही का, पीक निघताच त्यातलं निखळ असं धान्य दुसऱ्या वर्षाच्या बीजाई साठी काढून ठेवतो ? अगदी तसाच. आमच्या वयाची साठीची अटकळ बांधणारा आणि सांधणारा हा मार्गशीर्ष सरता सरताच आगमन होतं ते पौषाचं.
पौषाचा पूर्वार्ध कडाक्याच्या थंडीचा. पण थोडंसं ऊन जाणवणारा. साठीच्या पुढल्या किंचितशा तब्येतीच्या कुरबुरी सुरु असाव्यात अगदी तसाच. तीळसंक्रांतीला तीळ गुळ, गाजर, बोरं, ऊस खाऊ घालणारा. सुखी असा !
आम्ही सत्तरीकडे झुकतो. तसा निसर्गात दाखल होतो माघ महिना. संपन्न पण जरासा काळजीचा. आमचीही मुलं आता संसारात रमणारी, मोठी झालेली असतात. आमच्या वानप्रस्थाच्या गोष्टी सुरु झालेल्या असतात. पण पैशाची ऊब आणि बऱ्यापैकी तब्येत एवढ्यातच वानप्रस्थ स्विकारू देत नाही. म्हणून कानटोपी घालून का होईना, आमचा मॉर्निंग वॉक सुरु असतोच. पण माणसाने तग धरायची तरी किती ? शेवटी शरीरच ते !
कुणाच्या आयुष्याचा शिशिर माघातच सुरु होतो. गळू लागतात काही पानं ! हळूच आणि नकळत फाल्गुन आयुष्यात प्रवेशतो. होळीच्या रूपाने आयुष्यातली किल्मिषं, कटूपणा, वाईटपणा, जाळून टाकणारा हा महिना. यावेळी मला माझ्या तिसऱ्या वर्गातल्या कवितेचं एक कडवं आठवतं.
“उदासवाणा शिशिर ऋतू ये पाने पिवळी पडतात
सोसाट्याच्या वाऱ्यासंगे झरझर झरझर गळतात
झडून पाने झाडे सगळी केविलवाणी दिसतात
दिसे तयांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास “
नवीन पालवीला जागा देण्यासाठी जुन्यांना गळावं लागतंच. शेवटी निसर्गच तो.
असा आमचा निसर्ग आणि हे बारा महिने / सहा ऋतू ! आयुष्यात खूप काही शिकवून जातात. कधी ते जीवन शिक्षण असतं ! कधी तत्वज्ञान । कधी रसग्रहण । तर कधी संगीत, ताल, लय, नृत्य । कधी रंग, कधी चित्रकला । भांडार आहे नुसतं ज्ञानाचं ! अगदी प्रतिपदा ते अमावस्या किंवा पौर्णिमा या पंधरा तिथ्यांना सुद्धा कुठलातरी सण आहे. पुढे कधीतरी तेही बोलूच.
पण आम्ही सध्या इकडेच पाठ फिरवतोय. दरवाजाच्या बाहेर पडून डोंगर /पर्वत कसे दिसतात ते आम्ही बघत नाही. म्हणून तर आमची मुलं आज रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकरलाच पर्वत समजाहेत. निसर्गात शुद्ध हवा आहे हे एसीत जगणाऱ्यांना कळतच नाही. रेनकोट घालून पाऊस अनुभवता येत नाही आणि बूट घालून, हिरवे गालीचे समजत नाहीत. सिमेंटच्या छतातून चांदण्यांचं आकाश दिसत नाही.
तर असे हे चैत्रादी बारा महिने. यांचा इथे केवळ वरवर धांडोळा घेतलाय. या वर्षातला प्रत्येक दिवस आमचा गुरू आहे. काहीतरी शिकवणारा आहे, आणि याच गुरूला आम्ही आज पारखे झालो आहोत.
अर्थात याला कुणी खुळेपणाही म्हणतील. पण मंडळी स्वतःच्या आईला कुणी मावशी म्हणतं का? नाही ना ? असे आत्या, मामी, काकी, मावशी साऱ्यांचा आदरसत्कार जरूर करायला हवा. पण आपले महिने, आपलं वर्ष, आपल्या तिथ्या, संस्कृती, भाषा याचा आदर करायला आधी शिका ! कारण ती आपली आई आहे.
आता शिशिराचा शेवट आलाय. एखादं पान शंभरी पार करून नव्या पालवीसोबत दिसेलही. पण खरंच ही गळकी पानंही नव्यांना जागा करून देतात. स्वतः गळून पडतात. पण ती पिवळी पानंही आनंदाने गिरकी घेत घेत खाली येतात, तसंच माणसांनही रडत कुढत शेवट जवळ करण्यापेक्षा हसत करायला हवा. कारण हे निसर्गाचं चक्र आहे. नववर्ष आलंय.
” सहा ऋतूंचे चाक फिरतसे शिशिर ऋतूही जाईल हा
वसंत सांगे हळूच मीही येतो मागोमाग पहा “
वसंत ऋतू सुरू झालाय. त्याच्याच हातात हात घालून चैत्राचं आगमन झालंय. या चैत्रप्रतिपदेला ब्रह्मध्वजा उभारून ते साजरं करा. काही दृढ संकल्प करा. पुढल्या आश्विन, कार्तिक, मार्गशीर्षात आनंदोत्सव साजरे करायचे असतील, तर त्याची तजवीज आतापासूनच करा. कुणाला ” हॅपी न्यू इयर ” न म्हणता वर्षप्रतिपदेच्या शुभेच्छा द्या ! म्हणा – – – –
गुढीपाडवा : आनंद वाढवा इथून पुढे वर्षभर आपले सर्व सण आनंदाने साजरे करू या !
छत्रपती संभाजीनगर जवळ घृष्णेश्वर मंदिर आहे. मी आणि माझा मित्र किशोर गुंजाळ दर्शनासाठी तिथे गेलो होतो. मंदिराच्या एका कोपऱ्यात एक स्त्री आणि एक पुरुष एकमेकांचे हात हातात घेऊन रडताना दिसले. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे निघालो.
थोड्यावेळाने माझे लक्ष झाडाखाली बसलेल्या काही लोकांकडे गेले. त्याच लोकांमध्ये ते दोघेही होते, ज्यांना मी मंदिरात रडताना पाहिले होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू अजूनही थांबले नव्हते. बाजूला बसलेली काही मंडळी त्यांना शांत होण्याचा सल्ला देत होती.
आम्ही थोडे पुढे गेल्यावर एका ठिकाणी जेवायला बसलो. त्या हॉटेलमधील एक माणूस दुसऱ्याला सांगत होता, “त्या झाडाखाली बसलेले जोडपे आहे ना, त्यांनी पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांची मुलं परदेशात शिकत आहेत. पैसा, संपत्ती, सगळं काही आहे, पण समाधान नसल्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला होता. ” हे ऐकून मी गडबडीने किशोरचा हात पकडला आणि त्या माणसांमध्ये जाऊन बसलो.
‘जर त्या त्या वेळी कोणीतरी मार्गदर्शन करणारे असते, तर माझ्याकडून चुकीचे काम झाले नसते’, असे ठामपणे सांगणारे अनेक जण मी पाहिले आहेत. मात्र, येथे मी ते प्रत्यक्ष अनुभवत होतो.
ते जोडपे, ते कुटुंब आणि त्या सर्व माणसांशी मी संवाद साधला. त्या संभाषणानंतर मी इतका थक्क झालो की, माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नव्हते. मी ज्यांच्याशी बोलत होतो, त्यांची नावे अर्चना देशमुख आणि सतीश देशमुख.
अर्चना देशमुख या मूळच्या यवतमाळच्या, पूर्वाश्रमीच्या अर्चना पाटील. त्या मराठवाड्यात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. सतीश देशमुख हे मराठवाड्यातील एक मोठे उद्योजक आहेत. त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले. त्यांना दोन अपत्ये झाली. मात्र, काही वर्षांतच सतीश आणि अर्चना यांच्यातील मतभेद टोकाला पोहोचले आणि अखेर त्यांनी घटस्फोट घेतला.
सतीश आणि अर्चना यांचा मुलगा संकेत हा अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) क्षेत्रात कार्यरत आहे, तर त्यांची मुलगी सत्यभामा ही परदेशात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. घटस्फोटानंतरही सतीश यांच्या आई-वडिलांपासून अर्चनाच्या आई-वडिलांपर्यंत, तसेच त्यांच्या दोन्ही मुलांपर्यंत सर्वांचे नाते घट्ट राहिले. मात्र, सतीश आणि अर्चनाचे नाते मात्र तितकेच ताणले गेले होते.
दोघांचेही स्वभाव अतिशय टोकाचे होते. दोघेही प्रतिष्ठित आणि उच्च सामाजिक स्थान असलेले व्यक्ती असल्यामुळे त्यांना मन मोकळे करणे सहज शक्य नव्हते. पण खोलवर विचारल्यानंतर, ते दोघे हळूहळू व्यक्त होऊ लागले.
अर्चना सांगत होत्या, “आम्ही दोघेही आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी एवढे झटत होतो की, त्यात आमचे व्यक्तिगत आयुष्यच हरवून गेले. वैयक्तिक, मानसिक आणि शारीरिक गरजा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी कधी कधी एक पाऊल पुढे टाकावे लागते, तर कधी एक पाऊल मागेही घ्यावे लागते. कधी नवऱ्याने समजून घ्यावे लागते, तर कधी बायकोने. मात्र, हे सगळे आम्ही दोघेच विसरलो होतो. त्यामुळे आमच्या नात्यात इतकी दरी निर्माण झाली की, अखेर घटस्फोट झाला. ”
पुढे त्या म्हणाल्या, “खरं तर सामाजिक आणि शारीरिक गरजा कुठेतरी पूर्ण होतील, या विचाराने आम्ही विभक्त झालो. मात्र, घटस्फोटानंतर आम्हाला मानसिक शांती मिळाली नाही. अखेरीस आम्ही समुपदेशनासाठी गेलो, आणि तिथेच आम्हाला सत्याचा साक्षात्कार झाला. मग आम्ही निर्णय घेतला की, आपल्याला एकत्र राहिले पाहिजे. त्यातूनच आम्ही पुन्हा एकत्र आलो. ”
सतीश आणि अर्चनांच्या नातेवाईकांमध्ये संजू पाटील नावाचे एक वकील होते. ते म्हणाले, “हे दोघेजण पुन्हा एकत्र आल्यावर, त्यांच्या आई-वडिलांनी ठरवलं की आपण ज्या घृष्णेश्वराला मानतो, त्याच्या समोर जाऊन नतमस्तक व्हायला पाहिजे. त्यामुळे आम्ही सगळेजण आज घृष्णेश्वर ला आलो. ”
संजू एकेक विषय मांडत होते, आणि मी त्यांना प्रश्न विचारत होतो. अर्चना आणि सतीश हे दोघे विभक्त का झाले, याची कारणे उघडपणे सांगणे सोपे नव्हते. पण हा प्रश्न केवळ त्यांच्यापुरता मर्यादित राहिला नव्हता, तो आता संपूर्ण समाजाच्या मानसिक आरोग्याशी निगडित झाला होता. संजू वकील आणि त्यांच्यासोबत असलेल्या मंडळींनी यावर माझ्याशी चर्चा केली.
मी अर्चना आणि सतीश दोघांनाही विनंती केली, “तुम्ही आज अनेक भांडणाऱ्या आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरून नाती तोडणाऱ्या स्त्री-पुरुषांसाठी एक आदर्श आहात. ”
अर्चना माझ्याकडे पाहत शांतपणे म्हणाल्या, “आम्ही काही उदाहरण वगैरे नाही आहोत. जर उदाहरण असायचं असेल, तर त्यासाठी आम्हाला खूप वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. स्त्री आणि पुरुष निसर्गाने वेगळे बनवले आहेत, पण अनेकदा दोघेही ते वेगळेपण स्वीकारत नाहीत. त्यामुळे वाद होतात. ”
डॉ. विजय दहिफळे
सतीश म्हणाले, “तेरा दिवसांपूर्वीच मी संभाजीनगरमध्ये डॉ. विजय दहिफळे (93560 33230) यांच्या ‘सामाजिक स्वास्थ्य’ कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्यांना मी याआधी टीव्हीवर पाहिले होते, पण त्या दिवशी प्रत्यक्ष ऐकले आणि मनावर जबरदस्त परिणाम झाला. त्याच कार्यक्रमातून मी माझ्या बायकोला फोन केला. रडत रडत तिने तो फोन उचलला आणि म्हणाली, ‘हा एवढासा फोन करायला तुला पंधरा वर्षे लागली?’”
मी तिला उत्तर दिलं, “आता मला एकही मिनिट तुझ्यापासून दूर राहायचं नाही. तू जिथे कुठे आहेस, मला सांग, मी तुला भेटायला येतो. ” अर्चना संभाजीनगरपासून १५० किमी दूर होती, पण त्या क्षणी मी थेट तिच्याकडे पोहोचलो.
मी तिला पाहिलं आणि जाणवलं—ती अजूनही तशीच होती. माझी वाट पाहत बसलेली, माझी काळजी करणारी. तिला फक्त माझ्याकडून प्रेमाची, आपुलकीची, सुरक्षिततेची जाणीव हवी होती.
मी मात्र तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. तिला काय हवं आहे, कधी हवं आहे, हे समजण्याइतका मी सजग नव्हतो. पण ही डोळस समज आणि खऱ्या अर्थाने ‘पुरुष’ असण्याची अनुभूती मला डॉ. विजय दहिफळे यांच्या सहवासात आल्यावरच मिळाली. आम्ही दोघेही त्यांच्या क्लिनिक मध्ये जाऊन त्यांना भेटलो. त्यांनी आमचं गैरसमजुतींचं जडलेलं आवरण दूर करून सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र दिला.
सतीश पुढे म्हणाले, “आमच्या घटस्फोटामुळे आमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण झाला. आमच्या मुलांना मानसिक वनवास भोगावा लागला. आम्ही दोघेही आमच्या वैयक्तिक आयुष्यात सुखी नव्हतो. अशा कित्येक समस्या या एका निर्णयामुळे उभ्या राहिल्या होत्या. ”
मी आणि किशोर दोघेही हे ऐकून थक्क झालो.
डॉ. विजय दहिफळे यांचा संपर्क आणि पत्ता घेऊन आम्ही त्यांना भेटायचं ठरवलं. संभाजीनगरमध्ये न्यायालयाजवळच त्यांचा दवाखाना होता. सायंकाळची वेळ होती, आणि त्या वेळीही डॉक्टरांना हार-तुरे घेऊन भेटायला आलेल्यांची संख्या मोठी होती. आम्हीही भेटण्याच्या रांगेत उभे राहिलो.
तिथे उपस्थित असलेल्या लोकांशी बोलत असताना लक्षात आलं की, बहुतांश लोक शारीरिक आणि मानसिक त्रासांतून बाहेर पडून आता सुखी जीवन जगत होते. माझ्या मनात एकच विचार घोळत होता– आपलं सामाजिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी अशा डॉक्टरांची समाजाला नितांत गरज आहे. सतीश आणि अर्चना यांच्यासारख्या शेकडो जोडप्यांनी नव्याने आयुष्य सुरू केलं होतं, आणि त्यासाठी डॉ. दहिफळे यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरलं होतं.
सुख, मग ते शारीरिक असो की मानसिक, ते उपभोगण्यासाठी आपला जन्म कसा आहे? आपण कसे वागले पाहिजे? याबाबत समुपदेशन करणे, आणि गरज पडल्यास स्वतः विकसित केलेली औषधे लोकांना देणे यामध्ये डॉ. दहिफळे यांचा कमालीचा हातखंडा होता.
मी डॉक्टरांनी जे काही उभं केलं होतं, ते बारकाईनं निरीक्षण करत होतो. तुटलेली लग्न आणि मनं पुन्हा जोडण्याच्या कार्यात डॉक्टरांनी जागतिक पातळीवर विक्रम केले होते. एक-दोन नव्हे, तर अडीच लाखाहून अधिक जोडप्यांना सामाजिक स्वास्थ्याचं महत्त्व पटवून देऊन त्यांनी त्यांना एकत्र आणलं होतं.
मी स्त्रीरोगतज्ञांविषयी अनेक ठिकाणी वाचलं होतं, पण इथं डॉक्टर पुरुषरोगतज्ञ होते.
डॉक्टर बाहेर आले. त्यांनी प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधला. सर्वांशी बोलून झाल्यावर शेवटी आम्ही दोघेच उरलो. डॉक्टर आमच्याशी अगदी आत्मीयतेने बोलले. आम्ही अर्चना आणि सतीश यांचा दाखला देत डॉक्टरांशी संवाद सुरू केला.
अत्यंत हुशार, प्रचंड हजरजबाबी आणि अनेक वर्षांचा सामाजिक स्वास्थ्याचा अनुभव असलेले डॉक्टर आमच्या प्रत्येक प्रश्नाला सखोल उत्तर देत होते. आम्ही अडीच तास डॉक्टरांशी गप्पा मारल्या, पण तरीही आमचे समाधान झाले नाही.
मी डॉक्टरांना अनेक वेळा टीव्हीवर ‘कामशास्त्र’ या विषयावर मनमोकळेपणाने बोलताना पाहिले होते. आज समाजात, घरात, शाळा- कॉलेजांमध्ये सेक्स संदर्भात उघडपणे बोललं जात नाही. त्यामुळेच संपूर्ण पिढी गोंधळलेल्या विचारसरणीकडे आणि अज्ञानाकडे झुकत आहे, हे डॉक्टर आम्हाला समजावून सांगत होते.
डॉक्टर म्हणत होते, “हे सत्य आहे की, सेक्स या विषयावर घरात, शाळेत, कॉलेजमध्ये आणि समाजात उघडपणे चर्चा केली जात नाही. त्यामुळेच तरुणाई दिशाहीन होत आहे. ”
डॉक्टरांनी राज्यभरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये समुपदेशन मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेमुळे दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला.
डॉक्टरांनी त्यांच्या कामाचे पुरावे—बातम्या, छायाचित्रे आणि संशोधन दाखवत आम्हाला समजावले की, आपल्या भारतीय संस्कृतीने ‘कामसूत्र’ या महत्त्वाच्या ग्रंथाकडेही दुर्लक्ष केले आहे.
ज्या डॉक्टरांनी पाच लाखांहून अधिक संसार वाचवले, दहा लाखांहून अधिक युवकांना शारीरिक जाणीव आणि समज दिली, त्या क्षेत्रात कदाचित राज्यात कुणीच इतकं मोठं कार्य केलं नसेल.
भविष्यात पुढील चारशे वर्षे डॉक्टरांचे ज्ञान पुढील पिढ्यांच्या उपयोगी यावे, यासाठी डॉक्टरांनी आधीच तयारी करून ठेवली आहे.
काही माणसं समाजासाठी पूर्णतः झपाटलेली असतात आणि ते केवळ समाजाच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित करतात. हीच भावना डॉक्टरांच्या कार्यातून प्रकर्षाने जाणवत होती.
सेक्स, कामसूत्र, स्त्री-पुरुष संबंध यांसारखे शब्द ऐकताच पुढे काय बोलावे हे कळत नाही. मात्र, डॉक्टर या प्रश्नांकडे थेट आणि डोळसपणे पाहतात.
मूळचे अंबाजोगाईचे असलेले डॉ. दहिफळे हे “माझ्या घडणीत वडील सोपानराव आणि आई पार्वती यांच्या संस्कारांचा मोठा वाटा आहे, ” असे आवर्जून सांगत होते.
डॉक्टर अनेक लोकांशी संवाद साधत होते, कुणाला समुपदेशन करत होते, कुणाला औषधे देत होते. पण हे सर्व करत असताना तिथे पैशाची अजिबात विचारणा नव्हती.
मी डॉक्टरांना विचारले, “डॉक्टर, समाजसेवा ठीक आहे, पण हे सगळं चालवायचं कसं?”
डॉक्टरांनी वर पाहत हात जोडले आणि उत्तर दिले, “त्याची सगळी काळजी घेतली आहे. ”
एखाद्या मंदिराबाहेर जशी मोठी गर्दी आणि प्रदीर्घ रांग असते, तशीच रांग डॉक्टरांना भेटण्यासाठीही होती. लोक हार-तुरे घेऊन त्यांना भेटण्यासाठी उभे होते.
मी आणि किशोर परतीच्या मार्गाला लागलो. आम्ही दोघेही चर्चा करत होतो की, मानसिक आणि शारीरिक आरोग्य समाजासाठी किती महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी डॉक्टर दहिफळे जे महान कार्य करत आहेत, ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं होतं.
डॉ. दहिफळे थेटपणे कार्य करतात आणि आता हे कार्य आपण सर्वांनी हाती घेण्याची गरज आहे.
तुम्ही डॉक्टर नसाल, तरीही तुम्ही चांगले समुपदेशक बनून भरकटलेल्या पिढीला योग्य मार्ग दाखवू शकता.
☆ “भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशन…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆
भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशन…
हे आहे भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशन, येथून उतरून पायी चालत गेल्यास प्रवासी तीन मोठ्या तीन देशात पोहोचतात !
तुम्हाला माहीत आहे का, भारतातील शेवटचे रेल्वे स्थानक कोणते आहे? हे स्थानक एकाच वेळी तीन देशांना जोडते, आणि या स्टेशनवर उतरून जर तुम्ही पायी चालत गेलात, तर थेट परदेशात पोहोचाल ! चला, जाणून घेऊया हे अनोखे रेल्वे स्थानक कोणते आहे.
ते आहे, भारताचे शेवटचे रेल्वे स्थानक – सिंहाबाद स्टेशन
भारताचे शेवटचे रेल्वे स्थानक पश्चिम बंगालमधील सिंहाबाद रेल्वे स्टेशन आहे. हे स्थानक बांगलादेशच्या सीमेलगत स्थित आहे. जेव्हा ब्रिटिश भारत सोडून गेले, तेव्हा हे स्थानक जसे होते, तसेच आजही आहे.
पूर्वी येथे मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक सुरू होती, परंतु सध्या प्रवासी गाड्यांसाठी हे स्थानक बंद आहे. येथे केवळ मालगाड्यांची वाहतूक केली जाते आणि काही गाड्या थेट बांगलादेशपर्यंत जातात. हे स्थानक पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर परिसरात स्थित आहे.
ब्रिटिशकालीन वारसा :
सिंहाबाद रेल्वे स्थानक ब्रिटिश काळात बांधण्यात आले होते. आजही येथे कार्डबोर्ड तिकिटे पाहायला मिळतात, जी आता इतर कोणत्याही रेल्वे स्थानकावर वापरली जात नाहीत. येथे अजूनही हाताने नियंत्रित सिग्नल गिअर्स, ब्रिटिश काळातील टेलिफोन आणि उपकरणे वापरली जातात.
या रेल्वे स्थानकावर एक छोटे कार्यालय, दोन रेल्वे क्वार्टर आणि कर्मचारी कार्यालय आहे. विशेष म्हणजे, येथे “भारताचे शेवटचे रेल्वे स्थानक” असा एक फलक लावण्यात आला आहे,
तीन देशांना जोडणारे अनोखे स्थानक:
सिंहाबाद रेल्वे स्थानकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, येथे उतरून जर तुम्ही पायी चालत गेलात, तर तुम्ही थेट तीन देशांत प्रवेश करू शकता.
ते देश म्हणजे – –
बांगलादेश
नेपाळ
पाकिस्तान
ही भारतातील एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक रेल्वे लिंक असून, आजही ती भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालवाहतुकीसाठी वापरली जाते.
उर्वरित भारताशी संपर्क कमी:
पूर्वी कोलकाता-ढाका रेल्वे मार्गाचा एक भाग म्हणून सिंहाबाद स्टेशनला महत्त्व होते. मात्र, सध्या येथून कोणतीही प्रवासी रेल्वे धावत नाही. त्यामुळे हे स्थानक निर्जन आणि शांत बनले आहे.
हे स्थानक ऐतिहासिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे असून, या स्थानकाने अजूनही ब्रिटिशकालीन आठवणी जपून ठेवल्या आहेत.
माहिती संकलक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
बैठकीत विश्वास मिळतो, तर माजघरात आपुलकी ! स्वैपाकघरातील प्रेम तर दुधाच्या मायेनं ऊतू जातं! तुझ्या आतल्या देव्हाऱ्यात बसलेली मूर्ती मनातील भीती पळवून लावते.
खरंच वास्तुदेवते, या सगळ्यामुळे तुझी ओढ लागते.
तुझी शिकवण तरी किती बहुअंगी! खिडकी म्हणते, ‘दूरवर बघायला शिक’.
दार म्हणतं, ‘येणाऱ्याचं खुल्या मनाने स्वागत कर’.
भिंती म्हणतात, ‘ मलाही कान आहेत. परनिंदा करू नकोस’.
छत म्हणतं, ‘माझ्यासारखा उंचीवर येऊन विचार कर’.
जमीन म्हणते, ‘ कितीही मोठा झालास तरी पाय माझ्यावरच असू देत’.
तर बाहेरचं कौलारू छप्पर सांगतं, ‘स्नेहाच्या पंखाखाली सगळ्यांना असं काही शाकारून घे की बाहेर शोभा दिसेल आणि आत ऊन, वारा लागणार नाही’.
इतकंच नाही तर तू घरातील, मुंग्या, झुरळ, पाली, कोळी यांचाही आश्रयदाता आहेस. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्थाही बघतोस आणि निसर्गाच्या अन्न साखळीला हातभार लावतोस. इतकं मोठं मन आमचंही व्हावं असा आशीर्वाद दे.
तुझ्या वाटणीसाठी दोन भाऊ कोर्टात जातात आणि वकिलाची घरं उभी रहातात, याचं खरंच वाईट वाटतं.
एकत्र कुटुंबपद्धतीकडून एकल कुटुंब पद्धतीकडे वेगाने निघालो आम्ही. पण तरीही शेवटी ‘घर देता का कोणी घर?’ ही नटसम्राटाची घरघर काही संपली नाही रे !
कारण जिथे तुझ्या प्रसन्नतेच्या खाणाखुणा नाहीत, ते घर नसतं. बांधकाम असतं रे विटामातीचं.
पण एक मात्र छान झालं, की लॉकडाऊनमुळे ज्या सामान्य माणसाने तुला उभारण्यासाठी जिवाचे रान केले ना, त्याला तू घरात डांबून, घर काय चीज असते ते मनसोक्त उपभोगायला लावलेस रे.
खरंच हा आमूलाग्र बदल कोणीच विसरणार नाही रे.
वास्तू देवते, पूर्वी आई आजी सांगायच्या, “शुभ बोलावं नेहमी. आपल्या बोलण्याला वास्तुपुरूष नेहमी ‘तथास्तु’ म्हणत असतो.
मग आज इतकंच म्हणते की “तुला वस्तू समजून विकायचा अट्टहास कमी होऊन तुझ्या वास्तूत वर्षातून काही क्षण तरी सगळी भावंडं, मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट एकत्र वास्तव्यास येऊ देत. “
आणि या माझ्या मागण्याला तू “तथास्तु” असंच म्हण, हा माझा आग्रह आहे.
तथास्तु!
लेखिका: अज्ञात
प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर
☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ३ – संत मदालसा किंवा महदंबा… ☆ सौ शालिनी जोशी ☆
संत मुक्ताबाई आणि संत जनाबाई यांच्या समकालीन संत महदंबा. यांचा काळ इसवी सन १२४२ ते इ.स.१३१२. या चक्रधर स्वामींच्या शिष्या होत्या. यादवांच्या शेवटच्या काळातील मराठी संत चक्रधर आद्य – क्रांतिकारक, समाजसुधारक होते. सर्व धर्मातील व पंथातील महत्त्वाच्या गोष्टी निवडून त्यांनी महानुभाव पंथाची उभारणी केली. समानतेला महत्त्व दिले. त्यामुळे शूद्र व स्त्रिया आकर्षित झाले.मासिक धर्म,सोयरसुतक, अस्पृश्यता याला त्यांनी विरोध केला. लोकभाषेत पंथाचा प्रसार केला.
महदंबा या औरंगाबाद जिल्ह्यातील वारसगाव येथील वायेनायके या दशग्रंथ ब्राह्मणाची मुलगी होत्या.वायेनायके हे प्रतिष्ठित व सुस्थितीतले होते. त्यांच्यामुळे महदंबा यांना परमार्थाची गोडी लागली. त्या प्रज्ञावंत विदूषी झाल्या. एका वादात परप्रांती विद्वानाना जिंकून त्यांनी जैतपत्र मिळवले. तेव्हा राजाने त्याना पाच गावे इमान दिली होती. महदंबा बालविधवा असल्याने माहेरीच राहत असत. प्रथम वडिलांच्या संमतीने त्यानी दारूस नावाच्या एका साधू पुरुषाचे शिष्यत्व पत्करले. त्यामुळे धर्माचे संस्कार अधिक बळकट झाले. संत चक्रधर हे दारूचे गुरु. त्यामुळे महदंबांची व चक्रधर स्वामी यांची ओळख झाली.
संत चक्रधरांचे विचार महदंबाना पटले. त्या अभ्यासू व बुद्धिमान होत्या. त्या काळात स्त्रियांची स्थिती पशुपेक्षा केविलवाणी, त्यात विधवेचे जीवन म्हणजे शापच. पण महानुभाव पंथातील स्त्रियांना मिळणारी माणूसपणाची वागणूक आणि पुरुषांच्या बरोबरीचे स्थान यांनी महादंबेचे मन जिंकले. त्यांनी चक्रधरांकडे घेऊन वडिलांच्या मनाविरुद्ध संन्यास घेतला. सर्व संत स्त्रियात संन्याशी या एकट्याच होत्या. हिंदू धर्मातील गोत्र,जात, कुल यांना तिलांजली देऊन हिंदू विरोधी मानला गेलेल्या पंथात त्या सामील झाल्या. वैराग्य आणि मनोनिग्रह यांच्या जोरावर वेगळी वाट यशस्वीपणे चोखाळली. पंथातील अनेक स्त्रियांना साधले नाही ते करून दाखवले. पंथाचे कडक आचारधर्म, मठाचे नियम, शिस्त, भिक्षा धर्म हे सगळं त्यानी स्वीकारलं. संन्यास वेश त्यांनी धारण केला. चक्रधर स्वामींच्या पट्ट्य शिष्या झाल्या.त्या आद्य कवियत्री ठरल्या.
लग्नप्रसंगी म्हणावयाची रसाळ अशी गाणी त्यांनी रचली. त्याला धवळे किंवा धवळगीत म्हणतात.
‘कासे पितांबर l कंठी कुंदमाळा l कांतु शोभे सावळा l रुक्मिणीचा l’
अशा या रचना. त्यानी रुक्मिणी स्वयंवराची रचना केली. त्यांच्यासाठी गुरु आणि देव कृष्ण एकरूप झालेले. दोघांचा उल्लेख त्यांच्या काव्यात येतो. अशा प्रकारे भक्तीने ओथंबलेल्या पण भाबडी अनुचर नव्हत्या . तर विचारी, जिज्ञासू आणि करारी होत्या .पंथाची धुरा वाहण्यास समर्थ होत्या.लीलाचरित्र हा महानुभावांचा श्रेष्ठ ग्रंथ. महदंबांच्या प्रश्नांना उत्तरे देता देताच या ग्रंथाचा बराचसा भाग तयार झाला. ७० व्या वर्षी गुरुस्मरणात त्यांनी देह सोडला.
☆ निर्माल्य !!☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
बाजारात अनेक फुले होती. मोगरा होता, गुलाब होता, जाई होती, जुई होती, सोनचाफा होता. शेवंती होती, झेंडू होता, सायली होती, मखमल होती, अनेक फुलं होती. सर्व लोकं ही फुले घेण्यास उत्सुक होती. प्रत्येक फुलाची ऐट वेगळीच. प्रत्येकाचे मूल्य वेगवेगळे आणि सुगंधाप्रमाणे वाढत जाणारे.
मी तगर!! कुठेही सापडणारे, सहज उपलब्ध असलेले नि त्यामानाने ‘नगण्य’ मूल्य असलेले सामान्य फुल. मला मनमोहक ‘गंध’ नाही, रूप नाही, रंग ही सामान्य (पांढरा). मला कोण देवाच्या पायी वाहणार ? परमेश्वराच्या मंगल आणि पावन चरणांना स्पर्श करण्याचे भाग्य मला कसे लाभणार ?
मनात असलेली, ध्यास लागलेली गोष्ट यथावकाश घडतेच असे म्हटले जाते. मलाही त्याची अनुभूती आली. भगवंताच्या रूपाने एक साधू महाराज आले, त्यांनी मला ‘खुडून’ घेतले आणि भगवंताच्या चरणावर अर्पण केले. माझी सुप्त इच्छा पूर्ण झाली. मला मूल्य नाही मिळाले, किंमत मिळाली नाही, सुगंध मिळाला नाही, पण एक गोष्ट मिळाली की ज्यामुळे मी कृतकृत्य झालो. मी कोमेजलो नाहीच, निर्माल्य होण्याचे भाग्य मला मिळाले यापेक्षा पुण्य काय असू शकते ? भगवंताच्या सहवासात माझे ‘निर्माल्य’ झाले. निर्माल्य!
… मनुष्याचे जीवन फुलासारखे तर असते. नाना तऱ्हेची फुले तशी नाना तऱ्हेची माणसे. फक्त निर्माल्य होणे गरजेचे. किमान तसा प्रयत्न आपण करायला हवा.
तो माझ्याएवढाच तेवीस चोवीस वर्षांचा. आम्हां दोघांनाही रायफल मस्त चालवता यायची… निशाणा एकदम अचूक आमचा. पण त्याला गिटार वाजवता यायची आणि तो गायचाही अतिशय सुरेख. एल्टन जॉनचं Sacrifice तर तो असा काही गायचा की बस्स! माझ्या आणि त्याच्या भेटीचा शेवट याच गाण्याने व्हायचा नेहमी… किंबहुना हे गाणं ऐकण्यासाठीच मी त्याच्याकडे जात असे. माझ्यासारखाच तोही इथं सैन्याधिकारी बनायला आला होता. त्याचे वडील बँकेत नोकरीला तर आई माझ्या आईसरखीच साधी गृहिणी होती. तो मेघालयातल्या शिलॉंग इथे जन्मलेला… शिलॉंग म्हणजे पृथ्वीवरील एक स्वर्गच जणू! इथेच मी एका शाळेत शिकलो. तो माझ्यापेक्षा केवळ शेहचाळीस दिवसांनी मोठा होता. इथल्याच एका प्रसिद्ध शाळेत शिकणारा हा गोरागोमटा गडी अंगापिंडाने मजबूत पण वागण्या-बोलण्यात एकदम मृदू. इथल्या तरुणाईच्या रमण्याच्या सगळ्या जागा आणि बागा आम्हांला ठाऊक होत्या. त्यावेळी त्याची आणि माझी अजिबात ओळख नव्हती… माझ्यासारखाच तो शहरात फिरत असेल, शाळा बुडवून सिनेमाला जात असेल… त्यालाही मित्र-मैत्रिणी असतील… त्याचीही स्वप्नं असतील माझ्यासारखीच… भारतीय सैन्याचा रुबाबदार गणवेश परिधान करावा… शौर्य गाजवावे! आणि योगायोगाने आम्ही दोघेही एकाच प्रशिक्षण संस्थेत एकाच वर्षी दाखल झालो. ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नईची १९९६ची हिवाळी तुकडी. पण तो काही माझ्या कंपनी किंवा प्लाटूनमध्ये नव्हता. आमची ओळख झाली ती परेड ग्राउंडवर. दिवसभराच्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय थकवणा-या वेळापत्रकानंतर त्याला त्याच्या बराकीत भेटायला जायचं म्हणजे एक कामच होतं… पण मी ते आनंदाने करायचो.. कारण त्याला भेटल्यावर आणि विशेष म्हणजे त्याचं गाणं ऐकल्यावर थकवा पळून जाई. आमच्या भेटीचा समारोप त्याच गाण्याने व्हायचा…. त्याने आधी कितीही वेळा ते गाणं गायलेलं असलं तरी मी त्याला एकदा.. एकदा… पुन्हा एकच वेळा… ते गाणं गा! असा त्याला आग्रह करायचो… आणि तो सुद्धा त्यादिवाशीचं त्याचं अखेरचं गाणं गाताना भान हरपून गायचा… त्याचं गाणं ऐकायला इतर बरेच प्रशिक्षणार्थी अधिकारी उपस्थित असायाचे. एकदा त्याने त्याच्या प्रेयासीचं नावही मला सांगून टाकले… आणि जेंव्हा जेंव्हा तिचा उल्लेख मी करयचो तेंव्हा तेंव्हा त्याचे गुबगुबीत गाल आणखी लाल व्हायचे… ते दोघं लग्न करणार होते स्थिरस्थावर झाल्यावर! त्याने त्याच्या आणि तिने तिच्या घरी अजून काही सांगितले नव्हते तसे! त्याच्या पाकिटात तिचा एक फोटो मात्र असे! दिवस पुढे सरकत होते… आमचे प्रशिक्षण जोमाने सुरु होते… आणि मी त्याचे गाणे ऐकायला जाणेही तसे रोजचेच होऊन गेले होते!
ज्याच्यासाठी अट्टाहास केला होता तो दिवस अखेर उगवला… अंतिम पग नावाची पायरी पार करताना मनाला जे काही जाणवतं ते इतरांना कधीही समजणार नाही…. अभिमान, जबाबदारीची जाणीव, केलेल्या श्रमाचं फळ मिळाल्याची भावना… सारं कसं एकवटून येतं यावेळी. आम्ही दोघांनीही त्यादिवशी अंतिम पग पार केले आणि आम्ही भारतीय सेनेचे अधिकारी झालो!
या दिवसाच्या पूर्वसंध्येला मी त्याच्या बराकीत गेलो होतो… पण तो त्याच्या आई-बाबांना घ्यायला बाहेर गेला होता… त्याचा थोरला भाऊ सुद्धा यायचा होता पासिंग आऊट परेड बघायला! त्यामुळे त्यादिवशीची आमची भेट झालीच नाही. दुस-या दिवशी परेड कार्यक्रम पार पडल्यानंतरच्या गडबडीत मला तो भेटला नाही. सायंकाळी आम्हां सर्वांनाच अकादमीचा निरोप घ्यायचा होता. त्याच्या आधी काही मिनिटे मी त्याच्या बराकीत पोहोचलो… तोवर तो तिथून निघून गेला होता… आमची भेट नाही झाली! तो त्याच्या टेबलवर जिथे त्याची गिटार ठेवत असे त्या जागेकडे पाहत मी तिथून माझ्या बराकीत परतलो आणि माझ्या गावी निघालो.
जंटलमन कडेट क्लिफर्ड किशिंग नॉनगृम त्याचं पूर्ण नाव होतं. त्याला पहिलीच नेमणूक मिळाली ती रणभूमीची राणी म्हणवल्या जाणा-या 12 JAK LI (१२, जम्मू and काश्मीर लाईट इन्फंट्री) मध्ये. इथे सतत काहीतरी घडत असते! त्याला शेवटचे भेटून अठरा महिने उलटून गेले होते. त्याच दरम्यान पाकिस्तानी आपल्या हद्दीत लपून छपून घुसले आणि त्यांना तिथून हुसकावून लावणे हे एक मोठेच काम होऊन बसले. त्यावेळी मी पठाणकोट येथे नेमणुकीस होतो. आपल्या सैन्याने पाकिस्तानने बळकावलेल्या चौक्या एका मागून एक पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याची मालिकाच सुरु केली होती… पण हे काम अतिशय जीवघेणे होते! ताज्या दमाचे अधिकारी आणि सैनिक या लढाईत अगदी पुढच्या फळीमध्ये होते…. रणभूमीला ताज्या रक्ताची तहान असते असं म्हणतात! युद्धात यश तर रोजच मिळत होते पण बलिदानाच्या काळीज पिळवटून टाकणा-या बातम्याही रोजच कानी पडत होत्या! अगदी काहीच दिवसांपूर्वी आपल्यासोबत हसणारा आपला सहकारी आज शवपेटीमध्ये पाहून दु:ख आणि शत्रूविषयी प्रचंड राग अशा संमिश्र भावना मनात दाटून यायच्या!
त्यादिवशी मी माझ्या युनिटच्या रणगाडा दुरुस्तीच्या प्रशिक्षणात अगदी रात्री उशिरापर्यंत व्यग्र होतो. युनिटमध्ये माझ्यासाठी फोन आला… कुणी इन्फंट्री ऑफिसर माझ्याशी बोलू इच्छित होते. हात पाय ऑईल-धुळीने माखलेले अशा अवस्थेत मी धावत जाऊन तो कॉल घेतला… तर पलीकडून क्लीफी अर्थात क्लीशिंग क्लिफर्ड नांगृम साहेब बोलत होते.. क्लीफी हे मी त्याला ठेवलेलं टोपणनाव. त्याचा आवाज अगदी नेहमीसारखा… उत्साही! कारगिल लढाईमध्ये निघालो आहे! त्याने अगदी अभिमानाने सांगितले… आवाजात कुठेही भीती, काळजी नव्हती. लढाईत शौर्य गाजवण्याची संधी मिळत असलेली पाहून एका सैनिकाच्या रक्ताने उसळ्या घ्यायला सुरुवात केली होती…. भेटू युद्ध जिंकून आल्यावर… भेटीत तुझ्या आवडीचं गाणं नक्की गाईन… तेच नेहमीचं Sacrifice.. त्यागाचं गाणं! विश्वासाचं गाणं! अकादमीमधून निघताना तुझी भेट होऊ शकली नाही.. मित्रा! माफ कर!… तो म्हणत होता आणि माझ्या डोळ्यांसमोर तो साक्षात उभा राहिलेला होता! गिटार ऐवजी आता त्याच्या हातात मला रायफल दिसत होती!
पर्वतांच्या माथ्यांवरून शत्रू आरामात निशाणा साधत होता. बर्फाने आच्छादलेल्या पहाडांवर चढून वर जाणे म्हणजे साक्षात मृत्यूला कवेत घेणे. ७० अंशाची चढण चढून जाणे आणि तेही युद्ध साहित्य पाठीवर घेऊन, वरून अचूक गोळीबार सुरु असताना…. कल्पनाच धडकी भरवणारी. एक गोळी म्हणजे एक यमदूत…. अंधारात, बर्फावरून पाय निसटला म्हणजे खाली हजारो फूट दरीत कायमची विश्रांती मिळणार याची शाश्वती. शत्रू पाहतो आहे… भारताचे सिंह पहाड चढण्याच्या प्रयत्नात आहेत… त्यांना ही कामगिरी शक्यच होणार नाही हे ते ओळखून आहेत. समोरून, वरून प्रचंड गोळीबार होत असताना या मरणाच्या पावसात कोण चालेल? त्यांनी विचार केला असावा. त्यांचा गोळीबार तर थांबणार नव्हताच… त्यांची तयारी प्रचंड होती! पहाड जिंकायचा म्हणजे शत्रूच्या नरडीला हात घालावाच लागणार होता…. आणि हे करताना त्या मरणवर्षावात चिंब भिजावेच लागणार होते… तुकडीतील किमान एकाला तरी. अशावेळी हा नक्की सर्वांच्या पुढे असणार हे तर ठरलेले होते. त्याला त्याच्या जीवाची पर्वा तरी कुठे होती… सोपवलेली कामगिरी पडेल ती किंमत मोजून फत्ते करायचीच हा त्याचा निर्धार होता… धोका पत्करणे भागच होते!
सत्तर अंश उभी चढण तो लीलया चढला…. दहा तास लागले होते त्याला पहाडाच्या टोकापर्यंत पोहोचायला…. गोळीबाराच्या गदारोळात शत्रूवर चालून गेला… शत्रूला हे असे काही कुणी करेल याची कल्पनाच नव्हती… ते वरून आरामात त्यांच्या शस्त्रांचे ट्रिगर दाबत बसले होते.. त्यांच्या टप्प्यात येणा-या भारतीय सैनिकांवर गोळीबार करीत होते. खालून आपल्या बोफोर्स तोफा आग ओकत होत्याच… पण शत्रूने जागाच अशा निवडल्या होत्या की तिथे फक्त माणूस पोहोचू शकेल! आणि तिथे कुणी माणूस पोहोचू शकेल असे शत्रूने स्वप्नातसुद्धा पाहिले नव्हते! तो एखाद्या वादळवा-यासारखा शत्रूच्या बंकरसमोर पोहोचला… बंकरमध्ये हातगोळे फेकले आणि त्याच्या हातातल्या रायफलने दुश्मनाच्या मरणाचे गीत वाजवायला आरंभ केला… जणू तो काही गिटारच्या ताराच छेडतो आहे… अचूक सूर! सहा शत्रू सैनिक त्याने त्यांच्या अंतिम यात्रेला धाडून दिले! एक धिप्पाड शत्रू सैनिक त्याच्यावर झेपावला… हातातल्या रायफली एवढ्या जवळून एकमेकांवर झाडता येत नाहीत…. अशावेळी क्लिफर्डने शाळेत असाताना गिरवलेले बॉक्सिंगचे धडे कामी आले… पाहता पाहता ते धिप्पाड धूड कायमचे खाली कोसळले… क्लिफर्ड साहेबांनी त्याने जणू त्या पहाडाला मोठे भगदाडच पाडले होते…. आपल्या नेत्याचा हा भीमपराक्रम पाहून त्याच्या मागोमाग मग त्याचे सैनिक पुढे सरसावले आणि त्यांनीही प्रचंड वेगाने उर्वरीत कामगिरी पार पाडली…. Point 4812 आता भारताच्या ताब्यात आले होते!
पण पावसात बाहेर पाऊल टाकले म्हणजे भिजणे आलेच… हा गडी तर खुल्या आभाळातून होणा-या वर्षावात पुढे सरसावला होता… रक्ताने भिजणे साहजिकच होते… शरीराची शत्रूने डागलेल्या गोळ्यांनी चाळण झालेली…. केवळ २४ वर्षांचा तो सुकुमार देह… आता फक्त एकाच रंगाची कहाणी सांगत होता…. I gave my today for your tomorrow! महावीर लेफ्टनंट क्लीशिंग क्लिफर्ड नांगृम साहेब धारातीर्थी पडले! हेच तर स्वप्न असतं प्रत्येक भारतीय सैनिकाचं.. ताठ मानेने मरणाला सामोरे जायचं… राष्ट्रध्वजात गुंडाळले जाऊन घरी परतायचं… इथं या मरणाला जीवनाच्या सार्थकतेची किनार असते!
तो लवकरच सुट्टीवर घरी येणार होता म्हणून थोरल्या भावाने आपल्या विवाहाची तारीख पुढे ढकलली होती… बाकी सर्व तयारी झालेलीच होती.. फक्त त्याची सर्वजण वाट पहात होते…. तो आला पण फुलांनी शाकारलेल्या, तिरंगा लपेटलेल्या शवपेटीत! पीटर अंकल आणि सेली आंटीच्या दु:खाला कोणतेही परिमाण लावता येणार नाही. ते त्याच्या शवपेटीवर डोकं टेकवून त्याच्या आत्म्याच्या कल्याणाची प्रार्थना पुटपुटत आहेत! त्याच्या सन्मानार्थ हवेत झाडल्या गेलेल्या गोळीबाराच्या फैरी मेघालयाच्या आभाळातल्या मेघांना भेदून वर जात आहेत… ढगांच्या मनातही मोठी खळबळ माजली आहे… ते कोणत्याही क्षणी बरसू लागतील असं वाटतं आहे७… ७ मार्च, १९७५ रोजी जन्मलेले Captain Keishing Clifford Nongrum आता पन्नास वर्षांचे असते… तुमच्या आमच्या सारखे संसारात आनंदात असते… पण देश सुखात रहावा म्हणून त्यांनी आपले तारुण्य अर्पण केले!
माझ्या टेबलवर मी एका सैनिकाचा पुतळा ठेवलेला असतो कायम… या पुतळ्याच्या हातात गिटार मात्र नाही… रायफल आहे! माझ्या जिवलग मित्राच्या तोंडून Sacrifice अर्थात त्यागाचं गाणं एकदा शेवटचं ऐकण्याचं राहून गेलं… देवाच्या घरी भेट होईल तेंव्हा मात्र मी त्याला आग्रहाने तेच गाणं गाण्याचा आग्रह मात्र निश्चित धरणार आहे!
– – लेफ्ट. कर्नल संदीप अहलावत
(Captain Keishing Clifford Nongrum साहेबांचे मित्र लेफ्ट. कर्नल संदीप अहलावत साहेब यांनी एका फेसबुक लेखात इंग्रजी भाषेत वरील भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचे मी जमेल तसे मराठी भाषांतर आपल्यासाठी मला भावले त्या शैलीत केले आहे. यात काही कमीजास्त असू शकते. अहलावत साहेबांची परवानगी घेता नाही आली, क्षमस्व! सुधारणा असतील तर त्या निश्चित करेन!)
लहानपणी खेळ खेळताना हे छोटे Keishing Clifford साहेब स्वत: बनवलेली लाकडी रायफल हाती धरत. घरच्यांना अजिबात कळू न देता त्यांनी सैन्याधिकारी होण्यासाठीची परीक्षा दिली होती! अत्यंत कठीण प्रशिक्षण लीलया पूर्ण केले होते. सियाचीन ग्लेशियरवर नेमणुकीस असताना तिथे झालेल्या हिमस्खलनात गाडल्या गेलेल्या बारा सैनिकांचे प्राण उणे ६० अंश तापमानात त्यांनी अथक प्रयत्न करून वाचवले होते. सुट्टीवर आल्यावर आपल्या शहरातील विविध शाळा-महाविद्यालयात फिरून व्याखाने देण्याचा त्यांचा प्रयत्न असे. सैन्यात अधिकारी कसे व्हावे या विषयावर त्यांनी स्वहस्ताक्षरात सविस्तर माहिती लिहून ठेवली होती. ते देणार असलेले शेवटचे व्याख्यान त्या शाळेच्या परीक्षा सुरु असल्याने होऊ शकले नव्हते… त्यांचे मित्र संदीप अहलावत साहेबांनी नंतर त्याच शाळेत जाऊन दिले कारण हे व्याख्यान द्यायला Captain Keishing Clifford Nongrum हयात नव्हते! Captain Keishing Clifford Nongrum यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या भावाने गरीब मुलांसाठी एक फुटबॉल क्लब स्थापन केलाय. यासाठी लागणारा निधी हे विद्यार्थी स्वत: एक बेकरी चालवून त्यातून मिळणा-या पैशांतून भागवतात. साहेबांचे आई वडील कारगिलच्या त्या पहाडांवर स्वत: जाऊन आपला लाडका लेक जिथे धारातीर्थी पडला होता ती जागा बघून आले! साहेबांच्या स्मृती शिलांग मध्ये जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. आपले लोक ही बलिदाने विसरून जातात याचा अनुभव साहेबांच्या कुटुंबीयांनी सुद्धा घेतला आहे… पण जेंव्हा एखादी महिला साहेबांच्या बाबतीत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या सर्व बातम्यांची कात्रणे दाखवायला येते, एखादा माणूस त्यांच्या दरवाजावर माथा टेकवून त्याने धरलेला उपवास सोडायला येतो… तेंव्हा त्यांचा ऊर अभिमानाने भरून येतो. देशाचा दुस-या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार, ‘महावीर चक्र’ प्राप्त करणारा मेघालयातील हा पहिलाच तरुण आहे, ही बाबही त्यांना अभिमानाचे क्षण देऊन जाते! आज इतक्या वर्षांनतर साहेबांचे कोर्स मेट अर्थात OTA मधील सहाध्यायी त्यांच्या घराला भेट देतात, साहेबांना मानवंदना देतात, तेंव्हा आपण एकटे नाही आहोत… देश आपल्या मागे उभा अही, ही त्यांची भावना दुणावते. पूर्वोत्तर राज्यातही देशभक्तीची बीजे खोलवर रुजली आहेत, याचेच हे प्रत्यंतर असते. जय हिंद!
जीवन पुढे खूप आहे… पण तूझ्या विना जगण्याचा यक्ष प्रश्न आहे.. रडून रडून किती दिवस रडणार… आता अश्रू ही सुकले आहेत कारण तो /ती गेली आहे पण उरल्या संसाराच्या जवाबदाऱ्या तिला /त्याला पार पाडायाच्या आहेत…
आयुष्य किती शिल्लक आहे यांची माहित नाही.. जुन्या आठवणीत रमलो /रमले तर वर्तमान कठीण आहे.. वर्तमाना अस्तित्व नष्ट करेल… अस्तित्वाची लढाई एकट्याने लढायची आहे
आयुष्यात पुढे काय ताट वाढल आहे.. काय आव्हान आहेत.. ते सर्व अनामिक आणि खडतर असणार पण जीवन गाडं दुःखच्या चिखलात रुतले तरी ते आपल्याच प्रयत्नांनी बाहेर काढायचा आहे…. काळ लोटायचा आहे…
जो वर तो / ती सोबत होती… त्याच्या संगतीचा उजेड होता तेव्हा त्या उजेडाची किमंत कळली नाही पण अचानक तो उजेड गेला आणि पायाशी अंधार दाटलाय… चाचपडत चाचपडत पुढे जात ध्येय गाठणे हेच प्रारब्ध आहे…
जोवर सोबत.. सहवास होता तो वर ती सुखसुमने होती पण त्या सुख
सुमनांची आता निर्माल्य झाली आहेत.. त्या सुख सुमनांचा गंध आता हरवला आहे…. एखादी वाऱ्या
ची झुळूक आली तरी त्या तरल.. हलक्या फुलक्या आठवणी आत आठवून कसं चालेल… आये है दुनिया में तो जीना ही पडेगा…
जोवर श्वास चालू आहे तो पर्यंत जगण्याची धडपड, इच्छा शक्ती ठेवायची आहे.. आव्हानावर मात करायची आहेत… कर्तव्य ती पार पाडायची आहेत… पण जेव्हा धडधड थांबेल तेव्हा त्या सावलीला मला अर्ध्या वाटेवर का सोडून गेलीस /गेलास हा प्रश्न विचारायला गाठायाचं आहेत… भेटायच हा शब्द मुद्दामहून टाळला आहे.. कारण त्याच्या/तिच्या नंतर जगाचा सामाना त्याला /तिला करायचा आहे…
असं म्हणतात, “There is only one Happiness in this life, to love and be loved. Love is the master key that opens the gates of happiness.”
आणि या करता जरुरी आहे – स्वतः वर प्रेम करण्यापासून सुरुवात करण्याची. स्वतः वर प्रेम करणारी व्यक्तीच सभोवतालावर प्रेम करू शकते आणि आनंद निर्माण करू शकते. Love yourself first, and everything else falls into line.
* * * *
आजच्या जगात सगळं काही मिळतं, पण आनंद मिळत नाही, असं म्हणतात. कारण आनंद हा कुठल्याही भौतिक वस्तुपासून मिळवता येत नसतो, तर तो माणसांपासूनच मिळवावा लागतो.
आपल्या आसपास माणसं खूप असतात, पण म्हणावं असं किंवा जवळचं असं, आपलं कुणीच नसतं. आणि हीच जवळ जवळ सगळ्यांचीच खंत असते. जवळची माणसं का नाहीत ? तर खरं प्रेम किंवा मनापासून प्रेम हे कुणी कुणावर करतच नाही किंवा असे प्रेम करणारे फारच थोडे थोडके असतात.
नवरा बायको राहतात एका घरात, पण relations dry असतात. आई वडील – मुलं /सुना – नातवंडं राहतात एका घरात, पण relations dry असतात. शेजारी – पाजारी राहतात आसपास, पण relations dry असतात.
ह्या सगळ्यांना जवळ करण्याकरता जरुरी असते, मनापासूनचे प्रेम किंवा सच्चे दिलसे प्यार किंवा इनर लव्ह यांची.
देव आपल्या सगळ्यांना इथे पाठवतांना आपल्या मनावर प्रेमाचे कपडे घालूनच पाठवत असतो. आणि तेच प्रेमाचे कपडे आपण सगळ्यांनीच आयुष्यभर आपल्या मनावर ठेवावे आणि मिळालेलं आयुष्य आनंदात घालवावं, अशी त्याची मनापासून इच्छा असते आणि त्याचे तसे आशीर्वाद पण आपल्यामागे असतात. लहान असतांना आपल्या मनावर तेच कपडे असतात, त्यामुळे सगळ्यांचेच बालपण आनंदानी भरलेलं असतं.
आपण सगळेच थोडे मोठे झालो, कि आपल्यामधला “मी” जागा होतो. हे माझे / ते माझे आणि थोडक्यात म्हणजे सगळेच आपल्यामधल्या त्या “मी” ला पाहिजे असते. आणि मग ते मिळवण्याकरता निरनिराळे मार्ग शोधणे सुरु होते, धावपळ सुरु होते. मोह – माया – मत्सर – राग – लोभ – द्वेष हे आपले मित्र बनतात. आणि इथेच आपल्या आयुष्याचे सगळे गणितच बदलते. देवानी दिलेल्या प्रेमाच्या कपड्यांवर आपण “मी” चे कपडे चढवतो. आणि देवानी दिलेले प्रेमाचे कपडे दफन होतात. बऱ्याच वेळा खोटं किंवा नाटकी प्रेम यांना पण आपण जवळ करतो. प्रेमामधे खरं प्रेम आणि खोटं प्रेम किंवा नाटकी प्रेम असे दोन प्रकार असतात.
खरं प्रेम बघायला मिळतं, प्रेमी / प्रेमिका यांच्यामधे.
खरं प्रेम बघायला मिळतं, शाळा / कॉलेज चे मित्र – मैत्रिणी यांच्यामधे.
खरं प्रेम बघायला मिळतं, मुलं लहान असेपर्यंत आई / वडील आणि मुलं यांच्यामधे.
खरं प्रेम बघायला मिळतं, बहीण – भावंडांमध्ये ते शाळा – कॉलेज मध्ये शिकत आहेत तोपर्यंत किंवा त्यांची लग्ने होईपर्यंत.
लग्न झाल्यानंतर नवरा आणि बायको यांच्यामधे प्रेम असते, पण conditions apply असे लेबल त्याला लागते. आपल्या बायकोनी काय करावं / कसं वागावं, वगैरे अशी अपेक्षांची यादी नवरेमंडळीची तयार असते. शिकलेल्या आणि नोकरी करणाऱ्या मुलींना हे पसंत पडत नाही आणि पडू पण नये. आपल्या नवऱ्यानी कसे वागावे / काय करावे अशा याद्या बायकोच्या पण तयार असतात. अशा अपेक्षांची आमने- सामने बहुतेक घरांमध्ये होते. आणि मग दोघांमधे नाराजी / बेबनाव / चिडचिड अशी यादी सुरु होते आणि अशा फॅमिली लाईफला आपण संसाराचा गाडा ओढणे असे म्हणतो. आपल्या आधीच्या पिढीमध्ये मुली शिकलेल्या नसायच्या आणि पती परमेश्वर हि संकल्पना त्यांच्या मनात वडीलधाऱ्यांनी रुजवलेली असायची, त्यामुळे आपले मन मारून नवऱ्यांच्या अपेक्षांप्रमाणे बायका वागायच्या आणि संसाराचा गाडा तसा पुढे जात राहायचा.
“जो तुमको हो पसंद, वही बात कहेंगे, तुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगे “, असा विचार करणारे पण नवरा-बायको असतात. “प्यार मे अपना कब्जा दिया जाता है, ना कि दुसरेका कब्जा लिया जाता है”, अशी विचारसरणी असणारे पण नवरा-बायको असतात आणि आहेत. त्यांच्यामधल्या प्रेमाला conditions apply असे लेबल नसते, हे सरळच आहे.
लग्न झाल्यानंतरची मुलं आणि त्यांचे आई वडील / लग्न झालेले भाऊभाऊ / लग्न झालेले भाऊबहीण / लग्न झालेल्या बहिणी यांच्यामधे प्रेम असते, पण conditions apply असे लेबल इथे पण लागलेले असते. आईवडिलांची जबाबदारी पडणे, त्यांची उपयुक्तता संपणे, आई वडिलांच्या संपत्तीचे वाटप, अशा घटना या नात्यांमध्ये वरवर दिसणाऱ्या प्रेमाचा कमकुवतपणा उजेडात आणतात आणि प्रेमामधल्या conditions apply चा अर्थ पण उघड होतो.
राधा कृष्ण, कृष्ण द्रौपदी, श्रावणबाळ, राम लक्ष्मण भरत, अशी उदाहरणे आज पण बघायला मिळतातच, पण खूप थोडी थोडकी. खरं प्रेम म्हणजे Unconditional Love. खरं प्रेम म्हणजे No Expectations. खरं प्रेम म्हणजे It Is Only Giving and Giving.
ढाई अक्षर ‘प्रेम’ के, सारा जग जितवाये I
ढाई अक्षर ‘प्यार’ के, सबको पास खिचवाये I
ढाई अक्षर ‘लव्ह’ के, सब को गले मिलवाये I
आणि ही “ ढाई अक्षरं ” ज्यांना आचरणात उतरवता येतात,