मराठी साहित्य – विविधा ☆ सावित्रीबाई फुले यांचे काव्यविश्व… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

?  विविधा ?

☆ सावित्रीबाई फुले यांचे काव्यविश्व… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆ 

आज ३ जानेवारी — क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना माझी ही काव्यरूपी वंदना —

वंदन सावित्रीबाईमातेला…

अज्ञानाच्या काळोखाला भेदून शिक्षणसूर्य तळपला

परंपरेच्या बेड्या तोडून नवसमाज तू निर्मिला…१

उठा बंधुंनो, अतिशुद्रांनो,– हाक घुमली खेडोपाडी

सनातनी किल्ल्यांचे बुरुज कोसळले अन क्रांतिपुष्प उमलले…२

समतेची ,मानवतेची, धैर्याची तू माऊली

लोकसेवेचे कंकण हाती, भारतवर्षाची तू सावली !

या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांचे काव्यविश्व माहिती करून घेऊ या. —

भारतीय समाजपरिवर्तनाच्या क्षितिजावरील एक तेजस्वीपणे तळपणारा तारा म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. भारतातील अग्रगण्य अशा पुणे येथील विद्यापीठास ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले.यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

मानवी स्वातंत्र्य,समता आणि ह्क्क, वैज्ञानिक दृष्टिकोन, तसेच स्त्रियांच्या सबलीकरणासाठी जीवनभर झटणाऱ्या, लोकभावनांचा  आदर करूनही धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य माणसाच्या शोषणाविरूध्द, अन्यायाविरुद्ध, दैववादाविरूध्द आवाज उठवणाऱ्या, मानवतेच्या उदात्त  तत्वांनी भारलेल्या आणि आवाज दडपल्या गेलेल्या, समाजाच्या तळाशी असलेल्या उपेक्षितांच्या जीवनात प्रबोधनाने जागृतीची ज्योत जागवणाऱ्या एक

समाजक्रांतिकारक !—-अशा अनेक पैलूंनी सावित्रीबाई ज्ञात आहेत. समाजासाठी आवश्यक पण अनेकदा न आवडणारे परिवर्तन करणाऱ्या समाजकार्याची त्यांची जातकुळी होती. त्यामुळे त्यांच्या कार्याला पाहिजे तेवढी प्रसिद्धी त्यावेळी मिळाली नाही.

सावित्रीबाई फुले या एक श्रेष्ठ साहित्यिक होत्या; हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील फारसा उजेडात न आलेला पैलू आहे. पुढील बाबींतून त्यांचे साहित्य क्षेत्रातील श्रेष्ठत्व स्पष्ट होते —

१. त्याकाळी अनेक समाजबंधने, कौटुंबिक रितीरिवाज आणि कुटुंबातील कामं यामुळे स्त्रियांमध्ये शिक्षण कमीच होतं. सावित्रीबाईही विवाहापर्यंत शिक्षणापासून दूर होत्या. मात्र लग्नानंतर पती जोतीराव फुले यांच्या सहाय्याने चिकाटी, जिद्द आणि तळमळीने त्या शिकल्या. आणि पुढे त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात जी भरारी घेतली त्यामुळे त्या आदराला पात्र झाल्या.

२. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘ काव्यफुले ‘ १८५४ मध्ये प्रकाशित झाला होता.

३. सावित्रीबाई आणि जोतीराव यांचे कौटुंबिक जीवन वादळी होते. समाजातील उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी,  त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी, त्यात अडसर असलेल्या धार्मिक शोषणाविरुद्ध ते आयुष्यभर लढले.आजच्या काळातही विस्मयकारक ठरेल अशा क्रांतिकारी जीवनाचा त्यांनी अंगीकार केला होता. (अर्थात त्याची किंमतही त्यांना मोजावी लागली होती).तरीही अशा अतिशय धावपळीच्या जीवनातही सावित्रीबाईंनी आपल्यातल्या लेखिकेला, कवयित्रीला फुलू दिले, हे त्यांचे असामान्यत्व होते.

४. ‘साहित्य हे समाजपरिवर्तनासाठी असावे ‘ या भूमिकेतून सावित्रीबाईंनी साहित्यनिर्मिती केली. सावित्रीबाईंनी समाजव्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी, समाजातील  शूद्रातिशूद्र यांच्या बरोबरीनेच अज्ञान आणि अन्यायाचे बळी ठरलेल्या, शिक्षणापासून वंचित राहिल्याने आपल्या दैन्याचीही जाणिव नसलेल्या, हतबल होऊन…हे सारे आपल्या नशिबाचे भोग आहेत म्हणून जगणाऱ्या, समाजातील साऱ्याच उपेक्षितांच्या जीवनात आत्मविश्वास जागविण्यासाठी अनेक पध्दतींचा उपयोग केला.लोकशिक्षण ही त्यापैकी एक महत्वपूर्ण पध्दत. आशयपूर्ण आणि लोकजीवनाचा ठाव घेऊन वास्तव चित्रण करणाऱ्या अनेक प्रभावी कवितांतून सावित्रीबाईंनी हे कार्य केले. म्हणूनच त्या कवितांचे मोल अधिक आहे— काव्य, गद्य, पत्रे …या साहित्याच्या क्षेत्रांत त्यांनी मुक्त संचार केला. साहित्य हे समाजशिक्षण आणि समाजपरिवर्तनाचे हत्यार आहे, या भूमिकेतून त्यांनी साहित्य विकासित केले; त्याचा प्रसार केला. सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न पाहणाऱ्या सावित्रीबाईंच्या  कवितेतील सामाजिक आशय धारदार होता. त्यातून समाजबदलाची कळकळ दिसून येते.

आत्तापर्यंत त्यांचे दोन काव्यसंग्रह उपलब्ध आहेत- (१) काव्यफुले. (२) बावन्नकशी सुबोध रत्नाकर.

काव्यफुले या काव्यसंग्रहात एकूण एक्केचाळीस कविता आहेत. यातील ‘श्रेष्ठ धन’ या कवितेतून शिक्षणाचे महत्त्व सांगताना त्या म्हणतात,

विद्या हे श्रेष्ठ धन आहे रे,श्रेष्ठ साऱ्या धनाहून ।

तिचा साठा जयापाशी, ज्ञानी तो मानती जन ।।

— शिक्षणाने युगायुगांची अज्ञानाची आणि दारिद्र्याची गुलामगिरी तोडून टाकण्याचे आवाहन करताना त्या म्हणतात,

“अज्ञानाची दारिद्र्याची गुलामगिरी ही तोडू चला

युगायुगाचे जीवन आपले फेकून देऊ चला चला”.

त्यांचा ‘ बावन्नकशी सुबोध रत्नाकर ‘ हा काव्यसंग्रह जोतीरावांच्या निधनानंतर (१८९२ मध्ये) प्रकाशित झाला होता.

त्यांचे हे सर्व साहित्य आवर्जून वाचावे असेच आहे.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देवाचं दुकान… अज्ञात ☆ सुश्री मंजुषा पाटील ☆

? जीवनरंग ?

🚩देवाचे दुकान🙏… अज्ञात ☆ सुश्री मंजुषा पाटील 

एके दिवशी मी रस्त्याने जात होतो, वाटेत एक बोर्ड दिसला, ‘ईश्वरीय किराणा दुकान,’माझी उत्सुकता वाढली. या दुकानाला भेट देऊन त्यात काय विकले जाते ते का पाहू नये?हा विचार येताच आपोआप दार उघडले, थोडेसे कुतूहल असेल तर दरवाजे आपोआप उघडतात, ते उघडावे लागत नाहीत!…

मी दुकानात पाहिले तर सर्वत्र देवदूत उभे होते. एका देवदूताने मला टोपली दिली आणि म्हणाला, “माझ्या लेकरा, काळजीपूर्वक खरेदी कर, माणसाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट इथे आहे!”

देवदूत पुढे म्हणाला, “जर तुला टोपली एकाच वेळी भरता येत नसेल, तर पुन्हा ये आणि पुन्हा टोपली भर.!

आता मी सगळं बघितलं, आधी संयम विकत घेतला, मग प्रेम,मग समजूतदारपणा, मग विवेकाचे एक-दोन डबे घेतले.पुढे जाऊन विश्वासाचे दोन-तीन डबे उचलले, माझी टोपली भरत राहिली.पुढे गेलो, पावित्र्य दिसले; विचार केला कसं सोडू, तेवढ्यात शक्तीची पाटी आली, शक्ती पण घेतली. हिंमतसुद्धा घेतली, वाटले की हिंमतीशिवाय आयुष्यात काहीच चालत नाही!…

आता सहिष्णुता घेतली, मग मुक्तीची पेटीही घेतली.माझे सद्गुरू प्रभुजींना आवडणाऱ्या सर्व वस्तू मी विकत घेतल्या. मग एक नजर प्रार्थनेवर पडली, मी त्याचाही डबाउचलला.कारण सर्व गुण असूनही माझ्या कडून कधी काही चूक झाली तर मी देवाला प्रार्थना करेन की देवा, मला माफ कर!…

आनंदी होऊन मी टोपली भरली, मग मी काउंटरवर गेलो आणि देवदूताला विचारले, “सर,या सर्व गोष्टींसाठी मला किती पैसे द्यावे लागतील?”

देवदूत म्हणाला, “माझ्या बाळा, इथली बिल भरण्याची पद्धतही दैवी आहे. आता तू जिथे कुठे जाशील, तिथे या गोष्टींची उधळपट्टी कर, सर्वांना मुक्तपणे वाट दे.आणि या गोष्टींचे बिल असेच भरले जाते!…”

या दुकानात क्वचितच कोणी प्रवेश करतो, जो आत जातो तो श्रीमंत होतो, व या गुणांचा भरपूर उपभोग घेतो आणि लुटतो!…

प्रभूंच्या या दुकानाचे नाव आहे ‘सत्संगाचे दुकान’ सद्गुणांचा खजिना भगवंताने दिला आहे, रिकामा झाला तरी सत्संगाला या आणि टोपली भरा!…

देवाच्या या दुकानातून मी एकतरी वस्तू आपलीशी करू शकेन असा मला आशीर्वाद द्या.!

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती – सुश्री मंजुषा पाटील 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माफीनामा… भाग – 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माफीनामा… भाग – 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(आज निसर्गाने पुन्हा हे नागडं…. म्हातारं पोर माझ्या ओंजळीत घातलं होतं…. मी पुन्हा बाप झालो…. पुन्हा बाप झालो यार….!!!) इथून पुढे —

शरमलेल्या बाबांना मी म्हणालो, “ बाबा लाजू नका, आपण आता मस्त आंघोळ करू….” 

तेवढ्यातूनही बाबा म्हणाले, “ माझ्या लोकांनी मला नागडं करून जेवढी लाज आणली, त्यापेक्षा ही लाज काहीच नाही बाळा …”

यानंतर बाजूच्या दुकानदारांकडून बादली, पाणी आणि मग आणून, फुटपाथवर सूर्यानं जिथं ऊन दिलं होतं, तिथं या उन्हामध्ये बाबांना बसवलं आणि साबणाने त्यांना आंघोळ घातली….डोक्यावर प्रत्येक वेळी पाण्याचा तांब्या मी उपडा केला की ते म्हणायचे ….”शंभो”…! — इथे मला जाणवलं, की मी कुण्या माणसाला आंघोळ घालत नाहीये…. तर मी अभिषेक करतोय…. !!!

निर्वस्त्र बसलेल्या त्या बाबांचा पाय मी धुवायला घेतला….  आणि सहज त्या निर्वस्त्र रूपातल्या बाबांकडे माझं लक्ष गेलं…. त्या क्षणी  मला वाटलं… आता मला कोणत्याही मंदिरात जाऊन साष्टांग नमस्कार घालण्याची गरज नाही… माझ्या हातात साक्षात पाय आहेत ! 

खरंतर आठ महिने अंघोळ नसताना, शौच वगैरे गोष्टी कपड्यातच घडत असल्यामुळे त्यांच्या अंगाला एक विचित्र असा वास येत होता…. खरंतर त्यांच्या आसपास, चार फुटाच्या परिसरात जाणेसुद्धा अतिशय क्लेशदायक होतं… 

याची जाणीव त्या बाबांना सुद्धा असावी…. प्रत्येक वेळी ते म्हणत होते, “ माझ्या जवळ येऊ नकोस, मी अत्यंत घाणेरडा झालो आहे… I am infected…!!!”

मी मनात हसत त्यांना म्हणालो, “ जाऊ दे बाबा , आमच्यापैकी सर्वच जण असे आहेत, तुम्ही ते कबूल करत आहात, आम्ही ते कबूल करत नाही, इतकाच काय तो फरक ! “

कडक टॉवेलने अंग पुसून, बाबांना पांढराशुभ्र सदरा आणि लेंगा घातला. मघाचे बाबा ते हेच काय ? असे वाटावे इतका कायापालट झाला होता. यानंतर कडेवर घेऊन मी त्यांना ॲम्बुलन्समधील स्ट्रेचरवर झोपवलं…. एका मिनिटात ते गाढ झोपी गेले…. लहानपणी सोहमला मी असाच अंघोळ घालून, कडेवर फिरवत कॉट वर ठेवायचो आणि तो गाढ झोपी जायचा…. !

का कोण जाणे, परंतु या बाबांमध्ये मला माझा मुलगा दिसत होता…. ! 

” एकरूप ” होणं हा भाव असेल, तर ” एकजीव ” होणं ही भक्ती आहे असं मला वाटतं… ! 

नकळतपणे मी या बाबांशी एकरूप नव्हे…. एकजीव झालो होतो ! 

मी हळूच झोपलेल्या बाबांच्या अंगावर चादर टाकली…. 

याचवेळी पलीकडच्या मशिदीतून आवाज आला…. कानावर अजान आली…. “अल्लाह हु अकबर”

— चला, बाबांच्या अंगावर  टाकलेली माझी चादर मंजूर झाली तर….! 

सोमवार १९ डिसेंबर रोजी या बाबांना आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे. 

बाबांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून मी परत निघालो, बाबा आता प्रसन्न हसत होते. जाताना मला म्हणाले, “ बाळा इतकं केलंस. आता आणखी एक शेवटचं कर… माझ्या घरातल्या लोकांशी संपर्क कर आणि त्यांना माझा निरोप दे, म्हणावं…. मी खुशाल आणि आनंदात आहे. माझ्या अडचणीच्या काळात तुम्ही जे वागलात, त्यात तुमचीही काहीतरी अडचण असेल, फक्त त्यावेळी मला ती समजली नाही इतकंच…. हरकत नाही, माझ्या मनात तुमच्याबद्दल कोणतीही अढी नाही. मी तुम्हाला माफ केलं आहे… त्यांना सांग, मी सर्वांना खरोखर मनापासून माफ केलं आहे “. 

— खूप मोठ्या मुश्किलीने शून्यात पहात नमस्कार करण्यासाठी त्यांनी हात जोडले….  नजरेच्या या शून्यात त्यांना त्यांच्या घरातले सर्वजण दिसत असावेत…

इतका वेळ शांत असणारा मी… त्यांची ही वाक्ये ऐकून मात्र चिडलो… रागाच्या भरात ओरडून, मी त्यांना म्हणालो,

 “ मी त्या तुमच्या लोकांशी कोणताही संपर्क करणार नाही…. तुमचा माफीनामा पोचवणार नाही… ज्यांनी तुम्हाला इतका त्रास दिला त्या लोकांची थोबाडं मला पाहायची नाहीत… मी काय रिकामा बसलो नाही तुमचा माफीनामा पोचवायला, बाकीची अजून शंभर कामं आहेत मला….”

माझा तोल सुटला होता… म्हाताऱ्या या माणसाला त्यांच्याच घरातल्या सर्वांनी इतकं अडचणीत टाकलं होतं ,  त्याचा राग मला येत होता आणि हे बाबा त्यांना माफ करायला निघाले होते, त्याचा दुप्पट राग मला आला होता … 

 यानंतर, तितक्याच शांतपणे हे बाबा मला म्हणाले, “ अरे बाळा चिडू नकोस…. माझ्या घरातल्या लोकांना मी प्रेम, माया, आनंद, सुख, समाधान, दया, क्षमा, शांती या पुस्तकातल्या सर्व शब्दांचा अर्थ आयुष्यभर समजावण्याचा प्रयत्न केला…. परंतु त्यांना हे अर्थ संपूर्ण आयुष्यात कधीही समजले नाहीत… या आजारपणात मी टिकेन की नाही याची खात्री तुलाही नाही आणि मलाही नाही… जिवंत असताना त्यांना कोणत्याही शब्दाचा अर्थ शिकवू शकलो नाही … आता मरताना  ” माफी ” या शब्दाचा अर्थ तरी मला त्यांना शिकवू दे बाळा….!!!  प्लीज बाळा …. प्लीज हा निरोप त्यांना दे … आयुष्याच्या उताराला, माफी हा शब्द तरी त्यांना शिकण्याची संधी देऊ आपण…! नाही म्हणू नकोस बाळा. माझा “माफीनामा” त्यांना पोचव…. “. 

आज मला पुन्हा एकदा पटलं…. सतारीवर दगड जरी मारला तरी तिच्यातून मधुर झंकारच बाहेर येतात…!!!

बाबांनी जे विचार मांडले, त्यात माझ्या खुजेपणाची मला जाणीव झाली…! डॉक्टर झालो …खूप शिकलो … सुशिक्षित सुद्धा झालो, परंतू या सर्व प्रवासात सुसंस्कृतपणा शिकायचं माझ्याकडून सुद्धा राहूनच गेलं यार….! 

रस्त्यावरच्या बाबांनी आज मला “ माफी “  या शब्दाचा अर्थ त्यांच्या वागण्यातून समजावून सांगितला…! 

बाबांनी पुन्हा हात जोडण्याचा प्रयत्न केला…. काही केल्या नमस्कारासाठी हात जुळत नव्हते…. मी ते दोन्ही हात माझ्या हाताने जुळवले…!

जुळवलेल्या या दोन्ही हातांना कपाळाशी लावून मी फक्त इतकंच म्हणालो, “ बाबा मला माफ करा…!!! “

माफी …. क्षमा ….  या पुस्तकात वाचलेल्या शब्दांचा अर्थ मी आज खऱ्या अर्थाने हृदयात घेऊन सुसंस्कृत झालो होतो…. बाबा माझा प्रणाम स्वीकार करा !!!

— समाप्त — 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ येळ अमावस्या—उत्सव हुरड्याचा – सुश्री नीला महाबळ गोडबोले  ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ येळ अमावस्या—उत्सव हुरड्याचा – सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

दिवाळीची धांदल मागे पडते.  हैराण करणाऱ्या उकाड्याला मागे सारून थंडीच्या गुलाबी पावलांनी सोलापुरात प्रवेश केलेला असतो….. डिसेंबरच्या धप्प्यानं  वर्षभर कपाटात नाहीतर माळ्यावर लपून बसलेले स्वेटर्स, मफलर, कानटोप्या बाहेर पडतात…

…. अन् त्यांच्याबरोबरच हृदयाच्या चोरकप्प्यात लपून राहिलेल्या  आठवणींच्या रेशमी लडीही  उलगडतात…

या सोनेरी आठवणी असतात धमाल हुरडापार्ट्यांच्या…… 

…. ” यंदा पाऊस आजिबात झाला नाही ” किंवा  ” अति पावसानं  ज्वारी आडवी झाली “…असा सोलापुरातल्या शेतकरीदादांनी कितीही आरडाओरडा  केला, तरी  निसर्ग आपल्या कर्तव्याला चुकत नाही….. सोलापुरातल्या काळ्याशार मातीत ज्वारीचं पीक डौलानं डोलू लागतं नि सोलापूरकरांना  हुरडापार्ट्यांची स्वप्नं पडू लागतात…

हुरडा म्हणजे  हिरवेगार,कोवळे ज्वारीचे दाणे….. ज्वारीनं  मोत्याचं रूप घेण्याआधीची  हिरवीकंच बाल्यावस्था म्हणजे हुरडा….. 

सहकुटुंब,सहपरिवार हुरड्यासाठी शेतात जाणं, निळ्याशार आकाशाखालील हिरव्यागार शेतात पाखरांसारखं बागडणं, किलबिलाट करत हुरड्यावर ताव मारणं नि  ही  मंतरलेली आठवण आयुष्यभर काळजात जपून ठेवणं …

… हा सोलापुरकरांसाठी केवळ एक आनंददायी अनुभव नसतो, तर तो असतो  एक समारंभ…  हिरव्यागार निसर्गाचा उत्सव… 

सोलापूरच्या संस्कृतीचा हा आनंदबिंदू…. या आनंदोत्सवाची सुरुवात ” येळ अमावस्या ”  या शुभदिनी होते…

मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस असतो ” येळ अमावस्येचा ” …. सोलापूरकरांची अन्नदायिनी “ज्वारी”

शेतांतून तरारून आलेली असते…. रसना  हुरड्यासाठी आसुसलेली असते….. पण या अन्नदेची पूजा केल्याशिवाय, ,परमतत्त्वाला नैवेद्य दाखवल्याविना  एकही दाणा तोंडात घालणं ही त्या शक्तीशी प्रतारणा…. म्हणूनच येळ अमावस्येच्या मुहूर्तावर हा नैवेद्याचा विधी संपन्न होतो..

” येळ अमावस्या ” हा  सोलापूरचा सण…. या दिवशी  कॉलेजे, शाळा, ऑफिसे ओस पडलेली असतात..

मायबाप सरकारने सुट्टी दिलेली नसली तरी सोलापूरकरांसाठी ती स्वयंघोषित असते…

या दिवशी प्रत्येक सोलापूरवासीयाला स्वत:च्या नाहीतर दुसऱ्याच्या शेतात जायचे असते… हा दिवस हुकला तर सारे वर्ष निष्फळ ठरते.

येळ अमावस्येच्या आदले दिवशीपासूनच कृषक कुटुंबातील गृहिणींची लगबग सुरू होते.. नातेवाईक,स्नेह्यांना  आमंत्रणे जातात..

हुरड्यासाठी लागणारे राजा-राणीही बनवले जातात… राजा-राणी म्हणजे काय समजलं नाही नं ?…..

हुरड्याबरोबर खाल्ल्या जाणाऱ्या कोरड्या तिखटगोड पदार्थांसाठी ” राजाराणी ” हा  प्रेमाचा  शब्द..

बारीक केलेला गूळ, ओल्या खोबर्ऱ्याचे तुकडे, साखरखोबरं, खारकांचे तुकडे हे गोड घास नाजूक राणीसाठी  नि खोबरं-लसणाची , शेंगादाण्याची, जवस-कारळ्याची चटणी, खारे किंवा मसाल्याचे शेंगदाणे, लसूणपातीचं काळं मीठ हे झणझणीत  पदार्थ रांगड्या राजासाठी…!! राजाराणी हे हुरड्याचे सवंगडी…

येळ अमावस्येदिवशी अगदी पहाटे उठून महिलावर्ग कामाला लागतो… शेंगाकूट, लसूण, कोथिंबीर, सोलापुरी काळा मसाला, लवंगपूड,  याचं मिश्रण भरून झणझणीत वांग्याची भाजी बनते…. 

शेंगाकूट, तीळ, गूळ, वेलची यांचं भरपूर सारण  भरून केलेल्या खमंग  शेंगापोळ्यांची चळत लागते…. 

तगडावर अतिशय पातळ-पातळ पुरणपोळ्या बनतात…. 

शेंगापोळ्या नि पुरण यासाठी चुलीवर घरच्या लोण्याचं  खमंग तूप कढवलं जातं….. 

हळद,मीठ  घातलेल्या नि तिळाने सजलेल्या  बाजरीच्या पातळ पातळ भाक-या  जन्म घेतात….. 

…. पण येळ अमावस्येचे मुख्य कलाकार असतात असतात  ” बाजरीचे उंडे नि भज्जे किंवा गरगट्टा “… 

बाजरीचं पीठ साध्या किंवा उकळत्या पाण्यात घालून त्यात मीठ, हळद ( तीळ, लसूण असा मसालाही घालू शकता..)  घालून भाकरीच्या पिठासारखं मळून त्याचे उंडे किंवा मुटके बनवले जातात. ते मोदकासारखे वाफवले जातात..हेच बाजरीचे उंडे….. या उंड्यांबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी बनवला जातो गरगट्टा किंवा भज्जे..

या दिवसांत भाज्या ,फळं, कोवळी पिकं तरारून आलेली असतात..

निसर्गानं दिलेल्या आहेराची निसर्गाला रिटर्न गिफ्ट द्यायला नको का? त्यासाठी हा ” भज्जे ” चा प्रपंच…

ताज्या-ताज्या, कोवळ्या पालक, चुका, मेथी,अंबाडी, हरबरा, चाकवत,चंदनबटवा या पालेभाज्या,

गाजर, घेवडा, वांगी, टोमॅटो, मटार ,ओले हरबरे, घेवड्याच्या बिया, शेंगादाणे या फळभाज्या, नि बोरं,पेरु यासांरखी फळे कुकरमधे उकडून ती एकजीव केली की त्यात तूर, मूग, मसूर, हरबरा अशा डाळी शिजवून घातल्या जातात. त्यावर  लसूण, मिरची, जिरे-मोहरीची चरचरीत फोडणी नि मीठ  घातलं की जबरदस्त चवीचा नि अतिशय पौष्टिक “गरगट्टा” तयार होतो…. हा गरगट्टा या मोसमात सात-आठवेळा खाल्ला की वर्षभराच्या जीवनसत्त्वांची नि क्षारांची बेगमी होते…

भाकरी म्हटली की ठेचा हवाच…. तोही बनतो..

घरच्या म्हशीच्या दुधाचं घट्ट दही आदले दिवशी विरजलेलं असतं… त्यातलं  डब्यात भरलं जातं.

नि उरलेल्या दह्याचं आलं, मिरची ,कोथिंबीर घालून खुमासदार ताक बनतं नि दुधाच्या बरण्यांत जाऊन बसतं …शेताकडे जाण्यासाठी…

हा  सारा जामानिमा होईपर्यंत सकाळचे  दहा वाजतात…शेताच्या ओढीने आमंत्रित पाहुणे हजर झालेले असतात…

गाड्या शेताकडे निघतात…. शेतातली सुबकशी पायवाट मोठ्या पिंपळ नाहीतर वटवृक्षाच्या पारापाशी  नेते..

पारावर  सतरंज्या अथरलेल्या असतात..

थोड्याशा विसाव्यानंतर देखण्या शेताचं दर्शन घेतलं जातं.

ताजा ऊस दातांनी सोलून चघळला जातो.

हिरवागार डहाळा म्हणजे ओला हरबरा हिशेब न ठेवता रिचवला जातो.

डायरेक्ट झाडावरून पोटात जाणारे पेरू,बोरं पुन्हा बालपणाची सफर घडवतात.

खोल विहीरीचं पाणी गूढतेचा अनुभव देतं .

निसर्गाच्या प्रत्ययकारी नि विशाल रुपांनी विभ्रमित होऊन वाचा बंद होते..

परत पारावर येईपर्यंत शेतातील भूमीपुत्राने  ज्वारीची पाच-सात  कणसं ताट्यांसहीत आणून काळ्या भूमातेवर उभी रचून ठेवलेली  असतात …. या कणसांच्या रुपानं निसर्गदेवता आज इथे अवतरलेली असते.

एरवी शहरात सलवार कमीज किंवा जीन कुर्तीत वावरणारी शेताची मालकीणबाई आज जरीच्या किंवा इरकली हिरव्या साडीत असते…. शेतातलं हे  हिरवं सौंदर्य पाहून शेताचा धनी हरकून गेलेला असतो….. नकळत त्याचे हात परमेश्वराला जोडले जातात..

डोक्यावर पदर घेतलेली लक्ष्मी नि स्वत:च्याच भाग्याचा हेवा करणारा नारायण जोडीनं शेतातील धनाची म्हणजे पिकांची साग्रसंगीत पूजा करतात…. घरात रांधून आणलेल्या सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवला जातो..

” सुजलाम-सुफलाम” असा आशीर्वाद निसर्गाकडून घेऊन  अभ्यागतांच्या खातीरदारीची तयारी सुरू होते..

आगट्या पेटतात …आग्रह करकरून आगटीत भाजलेला कोवळा हुरडा खायला घातला जातो. हुरड्यानंतरची तहान मस्त मसाला ताकाने शमवली जाते.

हुरडा महोत्सवाचा हा शुभारंभ असतो. जडावलेलं पोटं डोळ्यांना बंद होण्याचा आदेश देतं.. पारावरच विकेटी पडतात…. ” थोडी भाकरी घ्या खाऊन “… नाजूक आदेश येतो….

भाकरी-भाजी,उंडे,पुरणपोळ्या ,शेंगापोळ्या  दुधा -तुपासोबत रिचवल्या जातात…

अन्नदात्याला साहजिकच “सुखी भव ” असा पाहुण्यांकडून आशीर्वाद मिळतो..

पाहुणे  समाधानाने आपापल्या घरी परततात..

पुढचे दोन महिने सारं सोलापूर या  हुरड्याच्या  हिरव्या रंगात रंगून जातं……

लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले. 

सोलापूर

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ Priority माणसांची ☆ प्रस्तुति – सुश्री दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ Priority माणसांची ☆ प्रस्तुति – सुश्री दीप्ती गौतम ☆

“मला नाही जमणार ग ह्यावेळी,”

… हे वाक्य आपण स्त्रिया किती वेळा निरनिराळ्या ठिकाणी वापरतो. काही वेळा ह्या वाक्यामागे खरं कारण असतं, तर काही वेळा ती गोष्ट टाळायची म्हणून घेतलेला हा stance असतो. असं का होतं, ह्याचा विचार केला तर लक्षात येते की आपल्या priorities ठरलेल्या असतात, त्यात जास्त फेरफार आपल्याला झेपत नाही.

माझी आई नेहेमी सांगायची की “बाकी कशाला सवड काढ, नाही तर काढू नकोस, पण आपल्या सणावारांना, देवासमोर निवांत दिवा लावण्यासाठी, मुलांच्या शाळेतील शिक्षक पालक मीटिंगला, कुटुंबीयांच्या वाढदिवसाला, स्वतःच्या तब्येतीसाठी, मैत्रिणींबरोबर मज्जा करण्यासाठी नक्की वेळ काढ.”

मला काही सगळं पटायचं नाही. मी म्हणायचे, “आई कामासाठी वेळ नको का?”
तर आई हसून सांगायची, “महिन्याचा पगार मिळेल, बढती मिळेल म्हणून तू रोजच अगदी नेटाने काम करतेस ग. पण नात्यांचे काय? आपल्या सांस्कृतिक विचारांचे काय? त्यासाठी वेळ काढावाच लागेल. नाहीतर आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा एकटी घरात असशील, तेव्हा कोण असणार आहे?”

नातेवाईकांकडे कधी गेली नाहीस, मैत्रिणींना कधी घरी बोलावले नाहीस, स्वतः गेली नाहीस, मग तुझ्या उतरत्या काळात त्या येतील, अशी अपेक्षा करु नकोस! आपण माणसे इतकी स्वार्थी असतो, की काही न देता आपल्याला समोरच्याकडून मात्र भरपूर अपेक्षा असतात आणि अपेक्षाभंग झाला तर वाईटही वाटते.”

आईला म्हटलं, “तू एवढी psychology कधी शिकलीस ग?” … ती हसली आणि म्हणाली, “आयुष्य जेवढं शिकवतं, तेवढं तुमच्या एमबीए मध्ये पण नाही शिकवत.. तेव्हा माणसांना आधी priority दे तरच आयुष्यात सुखी आणि समाधानी राहशील.”

संग्राहिका : सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – विधायक कार्य ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 😅 विधायक कार्य ! 🤠 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“गुडमॉर्निंग पंत”

“नमस्कार, नमस्कार. पण आज तुझ्या आवाजात उत्साह वाटत नाही.”

“पंत कसा असणार उत्साह ? बारा तेरा दिवस सारखं घरात बसून कंटाळणार नाही का माणूस ?”

“तू म्हणतोयस ते बरोबरच  आहे. अरे सारखं सारखं घरात बसून, मला पण मी US ला मुलाच्या घरी तर नाही ना, असं वाटायला लागलंय हल्ली ! पण मग तुझ्या घरातल्या कामांचे काय, सगळी कामं संपली की काय ?”

“पंत आता साऱ्या कामांची एवढी सवय झाल्ये की… “

“दोन तीन तासात तू मोकळा होत असशील ना रोज ? “

“हो ना, मग करायच काय हा प्रश्न आ वासून उभा राहतो.”

“अरे मग बायको बरोबर गप्पा मारायच्या !”

“आता लग्नाला दोन वर्ष होऊन गेली, सगळ्या गप्पा बिप्पा मारून संपल्या.”

“काय सांगतोस काय, दोन वर्षात गप्पा संपंल्या ? पण आमच्या लग्नाला चाळीस वर्ष झाली तरी आमच्या गप्पा अजून काही संपत नाहीत !”

“काय सांगता काय पंत, तुमच्या लग्नाला चाळीस वर्ष झाली तरी तुमच्या गप्पा अजून…. “

“अरे म्हणजे ही गप्पा मारते आणि मी गप्प राहून फक्त हुंकार देत त्या ऐकतो एव्हढेच ! ते सोड, गप्पा नाही तर नाही बायको बरोबर पत्ते बित्ते तरी…… “

“नाही पंत, ती पुण्याची असल्यामुळे तिला पत्त्यांचा तिटकाराच आहे, लहानपणा पासून.”

“मग काही वाचन…… “

“अहो पंत, वाचून वाचून वाचणार तरी किती आणि काय काय ? आणि दुसरं असं की वाचायला सुरवात केली,  की झोप अनावर होते आणि झोपून उठलं की पहिली पाच सात मिनिट कळतच नाही, की आपण दुपारचे झोपून उठतोय का रात्रीचे ?”

“पण मग टीव्ही आहे ना बघायला ?”

“अहो पंत त्यावर पण हल्ली सगळे जुने जुने एपिसोड दाखवतायत, काही ‘राम’ नाही उरला आता त्यात !”

“मग टीव्ही वरच्या बातम्या….”

“त्या करोना व्हायरस घालवायला चांगल्या आहेत !”

“म्हणजे, मी नाही समजलो.”

“पंत, म्हणजे त्या बातम्या करोना व्हायरसला दाखवल्या ना, तर तो त्या बघून स्वतःहून पळून जाईल चीनला !”

“काही तरीच असतं तुझ बोलण !  आता मला सांग, आज काय काम काढलेस माझ्याकडे ?”

“पंत, माझ्याप्रमाणेच आपल्या चाळीतले सगळे रहिवाशी बोअर झालेत आणि…. “

“चाळ कमिटीचा अध्यक्ष या नात्याने ते तुला मोबाईलवरून सारखे फोन करून यावर काहीतरी उपाय करा, टाइम पास कसा होईल ते सांगा, असे सतवत असतात, बरोबर ?”

“कस अगदी बरोबर ओळखत पंत !”

“अरे चाळीस वर्षांचा तजुरबा आहे मला चाळकऱ्यांचा, सगळ्यांची नस अन नस ओळखून आहे म्हटलं मी !”

“हो पंत, आपल्या चाळीतील तुम्हीच सर्वात जुने रहिवासी, त्यामुळे तुम्हाला… “

“मस्का बाजी पुरे, तुझा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय आणि त्यावर माझ्याकडे उपाय सुद्धा आहे !”

“सांगा सांगा पंत, तुमचा उपाय ऐकायला मी अगदी आतुर झालोय !”

“सांगतो, सांगतो, जरा धीर धरशील की नाही !”

“हो पंत, पण एक प्रॉब्लेम… “

“आता कसला प्रॉब्लेम?”

“अहो सध्या सगळेच कोरोनाच्या संकटामुळे आपापल्या घरी अडकलेत आणि एकमेकांना भेटू…”

“शकत नाहीत, माहित्ये मला.

खरच दुर्भाग्याची गोष्ट आहे ना ?”

“यात कसली दुर्भाग्याची गोष्ट, साऱ्या जगावरच संकट ओढवलं आहे त्याला… “

“अरे त्या बद्दल नाही बोलत मी.”

“मग कशा बद्दल बोलताय पंत ? “

“आता हेच बघ ना, गेल्या बारा तेरा दिवसात मुंबईची हवा, कसलेच पोल्युशन नसल्या मुळे कधी नव्हे इतकी शुद्ध झाली आहे आणि त्याचा आनंद घ्यायचे लोकांच्या नशिबातच नाही. उलट लोकांना मास्क लावून फिरायची पाळी आली आहे.”

“हो ना पंत, पण माझी बायको म्हणते मी अजिबात मास्क नाही लावणार.”

“का, ती पुण्याची आहे म्हणून का ?”

“म्हणजे ?”

“अरे जसा पूर्वी पुणेकरांचा हेल्मेटला विरोध होता तसा मला वाटलं मास्कला पण आहे की काय, म्हणून मी विचारलं.”

“तस नाही पंत, त्या मागे तीच वेगळेच लॉजिक आहे.”

“कसलं लॉजिक ?”

“ती म्हणते ‘मी मास्क लावला तर, मी रागावून गाल फुगवून बसल्ये हे तुम्हाला कस काय कळणार ?”

“खरच कठीण आहे रे तुझ !”

“ते जाऊ दे पंत, आता दोन वर्षात मला सवय झाल्ये त्याची.  पण आधी मला सांगा तुमच्याकडे टाइमपास साठी काय… “

“अरे नेहमीच टाइमपास न करता, सध्याच्या परिस्तिथीत थोडे विधायक कार्य पण करायला शिका ! एकदा का या संकटातून सुटका झाली की मग जन्मभर टाइमपासच करायचा आहे.”

“म्हणजे, मी नाही समजलो?”

“सांगतो, आता आपल्या चाळीत एका मजल्यावर पंधरा बिऱ्हाड आणि चार मजले मिळून साठ, बरोबर ?”

“बरोबर !”

“तर तू चाळ कमिटीचा अध्यक्ष या नात्याने सगळ्यांना सांग, येत्या रविवारी सगळ्यांनी घरटी दहा दहा पोळ्या आणि त्यांना पुरेल इतकी कुठलीही भाजी भरून ते डबे चाळ

कमिटीच्या ऑफिस मधे आणून द्यावेत.”

“आणि ?”

“तू आज एक काम करायचस,  आपल्या के ई एम हॉस्पिटल मधे जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना भेटून सांगायचं,  की येत्या रविवारी आमच्या अहमद सेलर चाळी तर्फे,  आम्ही जेवणाचे साठ डबे पाठवणार आहोत. ते आपल्या हॉस्पिटल मधे कार्यरत असणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्ड बॉईजना वाटायची व्यवस्था करा.”

“काय झकास आयडिया दिलीत पंत, त्या निमित्ताने सगळ्यांचा वेळ पण जाईल आणि काहीतरी विधायक कार्य हातून घडल्याचा आनंद पण मिळेल ! धन्यवाद पंत !”

© श्री प्रमोद वामन वर्तक

०३-०२-२०२३

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 119 – गीत – शिरोधार्य आदेश तुम्हारा… ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  एक भावप्रवण गीत – शिरोधार्य आदेश तुम्हारा…।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 119 – गीत – शिरोधार्य आदेश तुम्हारा…  ✍

शिरोधार्य आदेश तुम्हारा

चाहे जो हो हाल हमारा।

 

बूँद बूँद को तरसा जीवन

पिया मरुस्थल सारा।

किरन किरन को हीँड़ा जीवन

पिया जिया अँधियारा।

 

औचक ही मिल गई चाँदनी

क्षण में किया किनारा।

 

सुरसरि सा पावन तट पाकर

चाहा प्यास बुझाना

देख परख कर रूप रश्मियाँ

चाह रहा था गाना।

 

कंठ रुद्ध हो गया अचानक

ज्यों निगला हो पारा।

 

करमजलों का जीना क्या है

साँसों की मजबूरी।

देह धरे का दंड भोगना

शायद बहुत जरूरी।

 

मेरी अपनी हस्ती क्या है

सपनों का बंजारा।

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव-गीत # 121 – “झोंके छतनार कहीं…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज प्रस्तुत है एक भावप्रवण अभिनवगीत – “झोंके छतनार कहीं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 121 ☆।। अभिनव-गीत ।। ☆

☆ || “झोंके छतनार कहीं…” || ☆

ये पत्ते नीम के ।

कड़वे लगते जैसे

नुस्खे हक़ीम के।।

 

दुबले-पतले हिलते।

लगे, हाथ हैं मलते।

 

भूखे-प्यासे जैसे

बेटे यतीम के ।।

 

डाल-डाल लहराते ।

टहनी में फहराते ।

 

झूमते-मचलते

नशे में अफीम के ।।

 

हरे-भरे रहते हैं।

खरी-खरी कहते हैं।

 

जैसे कि  तकाजे

हवा के मुनीम के।

 

झोंके छतनार कहीं।

झुकते साभार वहीं ।

 

शाख पर सजे

जैसे दोहे रहीम के।।

 

©  श्री राघवेन्द्र तिवारी

 

29-12-2021

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – असीम ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

श्री भास्कर साधना आरम्भ हो गई है। इसमें जाग्रत देवता सूर्यनारायण के मंत्र का पाठ होगा। मंत्र इस प्रकार है-

💥 ।। ॐ भास्कराय नमः।। 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि –  असीम  ??

समुद्री लहरों का

कंपन-प्रकंपन,

प्रसरण-आकुंचन,

मशीन से

मापनेवालों की

आज हार हुई,

मेरे मन में

उमड़ती-घुमड़ती लहरें,

उनकी पकड़

और परख से दूर

सिद्ध हुईं..!

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Juvenile Fiction ☆ The Tide of will – Part-3 ☆ Dr. Amitabh Shanker Roy Choudhury ☆

Dr. Amitabh Shanker Roy Choudhury

Brief Introduction

  • Birth – January 18, 1955
  • Education – MBBS (IMS/BHU)
  • Publications – 4 books (2 in Hindi, 1 each in English and Bengali) and two are yet to come.
  • Translations – Books and articles are translated in English, Odiya, Marathi and Gujarati.
  • Awards – CBT awarded stories and novel, “Kamaleshwar Smriti Katha Award (2013, 2017 and 2019)” by Kathabimb.
  • Honour – “Hindi Sevi Samman” by Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi Vishwa Vidyalaya, Wardha (December 2016). 

☆ Juvenile Fiction ☆ The Tide of will – Part-3 ☆ Dr. Amitabh Shanker Roy Choudhury ☆

Fear and Dare

From the kitchen Ananthi called out, ‘Gayatri, come here and listen to me please.’

Gayatri, sitting in the bedroom, was learning her lessons. As she was reading, her whole body was swaying. Her swaying stopped and she asked, ‘What happened amma?’

‘Just wash these coffee cups and the pot for me. I need them again.’

Gayatri left her book on the bed and came out in the courtyard. As she was washing the utensils, suddenly her hands were just paralysed. She shrieked in fright, ‘Amma, ach-chamma (granny), look at that -!’

Followed by a clattering sound of utensils dropping in the courtyard. Next, a thud too. And Gayatri was on the floor, both of her legs stretched in front.

‘Ananthi, just see what happened to Gayatri.’ Lalithambika was moving the beads of prayer in her hand. Next, rubbing her ailing knees, she got up herself.

Ananthi, immediately, came out of the kitchen, ‘What happened? Why are you so scared?’

And the third spectator, Narayanan, appeared on the spot, too. And as soon as he had seen the real reason behind Gayatri’s shriek, he burst out into a laughter, ‘So, is this the reason of your getting scared? O my god!’

Gayatri could not say a single word. The utensils were all scattered in the courtyard and she was looking at something open mouthed.

And there was a big yellow frog sitting just in front of her. Its bulging eyes were looking all around. It puffed itself up. The whitish skin just below its chin was bellowing with its breathing in and out. Once or twice it croaked. As if it was asking,

‘Why are you afraid babe, I am a yellow frog

Do you want to see me, how can I jump and jog?’  

And it jumped like the legendary frog of folk tales who was a prince and who was turned into a frog by the curse of a witch. After waiting for years when a princess kissed the frog he regained his human form. He became a prince again.

Covering her mouth with the corner of her saree Ananthi just giggled, ‘So this is the villain of the whole drama?’

A kingfisher bird was perching on a branch of the banana tree in the courtyard. It looked around in confusion. Just thinking whether it could find a piece of fish in front of any house. Startled it got and flew away.

Narayanan went to his kuchumol and patted her head. Suddenly he remembered the dialogue of Duryodhana, the character of a prince in Mahabharata. He had once seen this in a Yakshagaan performance. Which is a very popular dance drama form in Kerala. There, in the show, the prince Duryodhana had said,

‘O fear

Tell me where

You made your abode?

In the heart of a coward

Or in airy dreams

Down the fancy road?              

During his service period Sasidhar Narayanan taught math in his school. He remembered that if zero is multiplied by any number the result is always zero. Similarly if fear is deep rooted in someone’s heart how can he or she go ahead in life? He was worried for his granddaughter. He said to Ananthi, ‘We must not leave Gayatri like this. If she lives in the cocoon of a caring family and stays confined within the safety of this house only, how can she face the world when she grows up?’              

He stopped for a few minutes and announced at last, ‘From tomorrow onwards she is going to Pampa with me.’

‘And what would she do there in the river?’ asked Lalithambika anxiously.

‘She would learn swimming. And that’s final.’ Narayanan didn’t let anybody say anything. He simply made a theatrical exit.

Next morning, when it was still dawn, he woke her up, ‘Get up Gayatri. Wash your face and get ready. Let’s go.’

Naturally at the beginning everyone happens to be quite enthusiastic while doing something new. Gayatri readied herself quickly.

‘Did you take a separate towel? We’ll need this.’ He himself took a frock of her, other clothes and a thin Indian towel made of cloth. Everything in a bag.

Vishu, the festivities of new-year had passed. In Thiruvananthapuram, at the Sree Padmanabha Swamy temple the ceremony of Arattu, that is the Holy Bath of the idols were observed with elegance and grandeur.

And the clouds in the sky were waiting for this opportunity probably. By the end of May they started sailing from the horizon in the Arabian Sea. Like some black fairies, the black clouds were floating in the bright blue sky. It had been raining for last couple of days. This morning, it gave a little respite to all.    

After the overnight drizzle, the road in the village was shimmering in the early morning soft light. Two shadows were moving ahead. Scattered on the way, there were some puddles. Eyeing them how little Gayatri could control herself? Silently, she just lagged behind a few steps and jumped on a puddle. Why couldn’t she be up to a little mischief, such as this? The water splashed and Narayanan turned back.

‘Oh, be careful.’ He came up to her and held her hand tightly.

 In that wee hour of the day, there were some people already on the road. Coming from the opposite direction, one of them bowed his head and said, ‘Pranam, masterji.’

Narayanan responded with a smile and raised his hand.

They worked in the rubber plantations, in some other villages. It is here in Kerala the ninety percent of rubber in India is produced. ‘Kera’ is a word for coconut and ‘alayam’ is for abode, so Kerala is also called the place of coconut. But rubber plantations are there in many villages. It’s a big earner for them.

On the bank of Pampa, they met a few more. Haripadam was a small village. Naturally everyone knew every other person by face.

The famous scholar of the place, pundit Anantamurthi was coming from their neighbourhood, called Agrahar. He had decorated his forehead with the paste of sandal. He smiled and placed his hand on Gayatri’s head affectionately, ‘So, today morning the little kuchumol has come up with her appupan to take a bath in the Pampa? Very good, you must come regularly. Understand?’

Standing on the bank Narayanan just for once said to her, ‘Now take off your puntu and get ready for a dip.’

He didn’t press any further. Being a teacher he knew it pretty well that it would be better to give her some time to become mentally prepared. He changed and dived into the water. Within minutes he was swimming away from the shore.

Now, Gayatri, sitting alone there on the stone-steps, became very much thoughtful. Just like Shakespeare’s Hamlet she was counting, ‘To swim or not to swim, today?’ She had a sickly feeling in her gut. She decided in her mind, ‘Well, not today but it’ll be better to try tomorrow.’

Narayanan had finished his job. Still standing in the water he was praying to the sun, ‘I bow my head in reverence to you, O’ glorious and ultimate source of light! It’s you who enlighten the whole world. Please motivate us to our worldly duties!’

With folded hands he had finished his prayers. A few boats were sailing on the river. The boatmen were pushing their long bamboo poles deep into the water and moving their boats ahead. Some were rowing too. They were talking among themselves quite loudly, ‘Hey, Kariattu, did you get a catch this morning?’

‘Yes of course, Athiya. However I won’t be able to attend the market. This afternoon I must go to my maternal uncle’s place. My grandma, the poor old woman, is very sick.’

 Standing near the shore, some people were worshipping and others were taking dips very cautiously. Most probably they were quite afraid of drowning. A few had put forth some pulses and grains on the steps and above, for the birds. Five or six pigeons swooped down and started pecking at them. Happily they were cooing. A few sparrows and other birds came down and joined them. But seeing them the pigeons were probably not so happy. They probably said in their voice, ‘Hey, let us first!’

‘Gayatri, come down over here.’ her grandfather called her.

But she was scared, ‘Oh, grandpa, not today.’ She thought in her heart if only she could fly away from the place.

‘If you really want to do something, start it immediately. Only fools wait for the tomorrows.’ Narayanan was already standing near his kuchumol. He took her in his lap. Holding her tightly in his arms, came down near the water and then threw her into the river.

His philosophy of life was quite simple. No one can walk the roads of his life holding someone else’s fingers. If one is afraid of the tides, how can he swim in the sea of life? With a do or die attitude he was witnessing everything. He murmured, ‘Gayatri must learn swimming. Must!’

And there, just a few metres away, Gayatri was sinking into the water. Again she was throwing her limbs madly to float above the water level. She had already swallowed some water. Quite hopefully she called out. Her feeble voice was heard, ‘Oh appupan! Please -!’ 

One moment Gayatri could see everything around her. The men and women bathing near the ghat, the trees standing on the shore, the boats swaying on the waves – everything. Next moment, everything was vanished. Oh! Trying recklessly to arrive at the bank she was using her hands and legs.

Next, the tide of the waves covered the poor girl. She had already swallowed much of water. But still she was pushing ahead. Raising her hands and throwing them into the water. She must reach the bank.

Amusingly, the boatman Itukettu was watching the whole episode. He cried out, ‘Oh, Guruji, catch her hand. Your granddaughter is exhausted.’

Unknowingly Narayanan himself went ahead a few steps. His stretched fingers touched Gayatri’s hand. She called out, ‘Oh, appupan, oh! Help!’

Narayanan leant forward upon the water and gathered her in his arms close to his chest. Gayatri started coughing. She could no more hold her tears. She sobbed her heart out, ‘Grandfather, you didn’t come for my rescue.’

‘My silly kuchumol! I was standing there in the water keeping an eye upon you.’ he patted her head, ‘Just see, you can do it? What’s there in swimming? Then?’

They took off their wet clothes and changed. On their way back to home, he stopped at the sweet shop of Nilamperu. He asked his granddaughter, ‘What would you like to have? Idli? Veg cutlet?’

Gayatri was all smiles again. 

Now this became their daily routine. Gayatri would get up early in the morning. She would go to Pampa with her achchan for swimming. Gradually, with Naryanan’s help she learnt it. And day by day the distance, she could cover, was increasing. And every day a treat for her was waiting at Nilamperu’s shop.

This was her first reward. Full of affection. Given by her appupan.

Contd…      

© Dr. Amitabh Shanker Roy Choudhury

C0ntact: Care Dr. Alok Kumar Mukherjee, 104/93, Vijay Path, Mansarovar, Jaipur, Rajasthan 302020

Mo: 9455168359, 9140214489

Email: [email protected]

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares
image_print