मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पिकलं पान – भाग – 2… सुश्री मीनाक्षी मोहरीर ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

?  जीवनरंग ?

☆ पिकलं पान – भाग – 2… सुश्री मीनाक्षी मोहरीर ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

( इथे मात्र कित्येकदा सारी नातीगोती असूनही केवळ ‘ घरात नको ‘ म्हणून हकालपट्टी झालेली असते, ते बघून जीव दुखतो.) इथून पुढे —-

 “असं बघ बेटा, आजकाल अगदी लहान मुलांपासून सगळ्यांचे नाही का, निरनिराळे क्लब निघालेत? ते तुमचे रोटरी, जेसीज, लेडिज क्लब, शिवाय फुलापानांसाठीचे गार्डन क्लब, सगळे नावाजलेले आहेत. तसंच एखादं गोंडस नाव द्यावं अशा वृद्धाश्रमांना गं !”

” खरंय आई तुझं ! किती छान विचार मांडते आहेस तू आज !” मी म्हणाले.

” अगं कसलं काय, सहज मनात आलं एवढंच! खरं तर ‘ ओल्ड इज गोल्ड ‘ ही म्हण आम्हा वृद्धांसाठी किती सार्थ आहे बघ नं ! ओल्डचा अर्थ वयस्क , वृद्ध असा घ्यायचा आणि गोल्डचा अर्थ सोनं असा न घेता, सोन्यासारखा पिवळा असा घ्यायचा. मग याच न्यायानं जर वृद्धाश्रमाला ‘ गोल्डन क्लब ‘ असं नाव दिलं तर कानांनाही ऐकायला किती चांगलं वाटेल? सर्व वृद्धांचा अर्थात पिवळ्या पानांचा तो ‘ गोल्डन क्लब ‘ हो नं? ” 

आईच्या विचारांचं मला सकौतुक आश्चर्य वाटत होतं. इतके दिवस वाटायचं, इतर सर्वांच्या आईसारखीच आपली पण आई आहे. प्रेमळ, शांत, कामसू, हसतमुखानं सारं सहन करणारी! पण आज मात्र तिच्या विचारांनी मी अगदी भारावून गेले होते. आईचा सुरकुतलेला हात कुरवाळत मी म्हणाले…..

” हे मात्र खरंय हं आई! वृद्धाश्रमाला ‘गोल्डन क्लब’ म्हणण्याची तुझी कल्पना आणि त्या मागची भावना एकदम झकास आहे बरं का! पण घरातल्या वृद्धांची काय किंवा पिकल्या पानांची काय, गरजच नसते असं मात्र अजिबात नाहीये हं! बाळंतपणात नाही का, विड्याच्या पिकल्या पानांना, औषधी गुणांच्या दृष्टीनं किती महत्त्व आहे? आणि केवड्याच्या कणसाची पिवळी धम्म पानं किती छान सुगंध पसरवत चक्क गणपतीच्या मस्तकावर विराजमान होतात? आई, तसंच घरातही आहे गं ! कित्येक महत्त्वाच्या गोष्टीत घरातील वृद्धांचा सल्ला अतिशय गरजेचा असतो बघ. कडू गोड अशा अनेक अनुभवांनी माणूस वृद्धत्वाला पोहोचतो अन् हेच अनुभव दुसऱ्या पिढीला ठेचा लागू नयेत, म्हणून कामात येतात, हो नं? त्याहीपेक्षा कुणीतरी आपल्यापेक्षा मोठं घरात आहे, या कल्पनेनीच इतरांना आपलं लहानपण जपता येतं. नमस्कारासाठी वाकायला, आशिर्वादाचा हात डोक्यावर ठेवायला, लहानाचं कौतुक करायला घरातले वृद्ध घरातच असायला हवेत नं आई? नाही ते विचार तू डोक्यात नको हं घेऊस !”

आईच्या हातावरील एक एक सुरकुती, बोटांनी मिटवून बघण्याचा वेडा चाळा करत मी आईची समजूत घालून बघितली. तिचं कितपत समाधान झालं, कुणास ठाऊक! पण तिचा मूड मात्र ठीकठाक झाला.

डिंकाच्या आणि मेथीच्या लाडवांचा डबा माझ्या हातात ठेवत, तिनं म्हटलं, ” सध्या थंडी भरपूर आहे, पंधरा दिवसात संपवून टाका बरं का गं!”

मी ही तिच्या समोरच एक लाडू खायला घेत म्हटलं, ” आई, जेव्हापासून तुझ्या हातचे हे लाडू खातेय, तेव्हापासून त्याची चव अगदी सारखीच कशी गं?”

” अगं साऱ्या मेव्यासोबत, आईची तीच माया पण त्यात असते नं, मग चव कशी बदलणार बाळा?”

आम्ही दोघीही मनापासून हसलो. नाश्ता, चहा घेताना मग वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. आईचा मूड चांगला झाला याचंच मला मनापासून समाधान वाटलं.आई घरी जायला निघाली. कुंडीतल्या झाडांना तिच्या सुरकुतल्या हातांनी हलकेच गोंजारलं, अगदी मला गोंजारावं तसं ! झाडांची कापून टाकलेली पिवळी पानं हळूवारपणे ओंजळीत धरून, क्षणभर कपाळावर टेकवली आणि सोबतच्या पिशवीत घालत म्हणाली, 

” घरी गेल्यावर यांना विहिरीत शिरवून टाकेन “—डोळे तुडुंबले होते तिचे.

मी ऑटोरिक्षापर्यंत आईच्या सोबत निघाले. आईने नेहमी सारखाच निरोप घेतला—

” ये बरं का गं घरी ! मुलांना घेऊन निवांतपणे ये रहायला. आणि हो, ‘गोल्डन क्लबचा’ विचार असू दे बरं का मनात !”

एवढं म्हणेस्तोवर रिक्षा निघाली. निरोपाचा हात हलवत, रिक्षा नजरेआड होईपर्यंत मी बघत राहिले. ऑटो दूर दूर जात होती. परत येताना मी आईच्या बोलण्यावागण्याचाच विचार करत होते. 

चार दिवसांनी आई एकाएकीच गेली. झाडाची पिवळी पानं गळून पडावीत, तितकी सहज !

आता मात्र मी सतत विचार करते, ” हिरव्यागार झाडांची शान पिवळ्या पानांमुळे नाहीशी नाही होत, उलट भरल्या घरात वयोवृद्ध व्यक्ती, नमस्कार करायला वाकल्यावर आशीर्वाद द्यायला असाव्यात, तशी ही पिवळी पानं मला वाटायला लागली आहेत.”

–तेव्हापासून झाडांवरची पिवळी पानं छाटणं मी पार सोडून दिलंय आणि आईचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ‘ गोल्डन क्लब’ चा विचार मात्र मनात पक्का केलाय !

— समाप्त —

लेखिका : मीनाक्षी मोहरील

प्रस्तुती : अस्मिता इनामदार

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पिकलं पान – भाग – 1… सुश्री मीनाक्षी मोहरीर ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

?  जीवनरंग ?

☆ पिकलं पान – भाग – 1… सुश्री मीनाक्षी मोहरीर ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

त्या दिवशी दुपारची गोष्ट. मी नुकतीच दुपारचा चहा वगैरे घेऊन, छान फुरसतीत घरातच कुंड्यांमधून तयार केलेल्या माझ्या बागेतील झाडं निरखत कौतुकानी त्यांना गोंजारत होते. झाडांच्या अध्येमध्ये दिसणारी पिवळी पानं माझ्या नजरेला पटकन बोचली. मी आतून कात्री घेऊन परत समोर आले तर आई घरात शिरत होती.

खूप दिवसांनी आईला आलेली बघून मी जाम खुश झाले. तिला खुर्चीवर बसायला लावत मी म्हटलं, ” आई गं, एवढं हातात घेतलेलं पूर्ण करून घेते पटकन, मग मस्तपैकी गप्पा मारत ऐसपैस बसू हं ! ” 

मी हातातल्या कात्रीने कुंडीतल्या झाडांची पिवळी पानं सपासप छाटत बोलत राहिले—

” बघ नं आई, इतकी छान घनदाट, हिरवीगार झालीयेत झाडं। पण या पिवळ्या पानांमुळे झाडांची सारी शानच नाहीशी होतेय ! म्हणून आज ठरवून, सगळी पिवळी पानं छाटून टाकण्याचा उद्योग चालवलाय मी! “

माझं वाक्य संपून दोन तीन मिनिटं झाली तरी आई काहीच का बोलत नाही म्हणून मी मागे वळून पाहिलं तर, आई कसल्यातरी विचारात गढल्यासारखी, एकटक नजरेने, कापून टाकलेल्या पिवळ्या पानांकडे बघत बसली होती. तिचे डोळे मात्र पाण्याने काठोकाठ भरलेले दिसले. मला काहीच कळेना !

तेवढ्यात आई मनाशीच बोलल्यासारखी म्हणाली ” खरंच, पिवळी पानं हिरव्यागार झाडांची सारी शोभाच नाहीशी करतात. तुमच्या हिरव्यागार बहरलेल्या सुंदर संसारात आम्ही वृद्ध मंडळी पण पिवळ्या पानांसारखी विशोभित दिसत असू, नाही गं? पण पिवळ्या पानांसारखं आम्हाला काढून टाकता येत नाही. आपोआप गळून पडेल म्हणून वाट बघावी लागते एवढंच!”

” आई, काहीतरीच हं तुझं ! उगाच नाही नाही ते विचार डोक्यात घेऊन, नाराजीचाच सूर तू आजकाल लावत असतेस. अगं पिवळी झालेली झाडांची पानं कापण्याची लहानशी गोष्ट ती काय, आणि तुझे विचार कुठल्याकुठे जाऊन पोहोचले बघ ! आताशा तू खूपच बदललीयेस, हळवी झालीयेस. काय झालंय गं आई? “

मी हातातली कात्री तिथेच ठेवून, आईच्या जवळ जाऊन बसले. लहानपणीसारखा तिच्या बांगड्यांशी खेळ करत राहिले. पण आईचा मूड गेला तो गेलाच. मात्र तिच्या मनात प्रचंड उलथापालथ सुरू होती. खरं तर इतक्या लहानशा घटनेनी तिनं एवढं अस्वस्थ का व्हावं, हाच विचार मनात मी करत होते. तोच स्वत:हूनच ती परत बोलायला लागली.

” अगं मी घरातून निघताना, असलं काही सुद्धा माझ्या मनात नव्हतं.पण तुला असं ते पिवळी पानं सपासप कापताना बघून सहजच माझ्या मनात विचार आला आणि लगेच तो बाहेर पडला सुद्धा ओठातून ! बघ बेटा जरा तूच विचार कर… वाढत्या वयाबरोबर, आयुष्याच्या तिन्हीसांजेला मी कदाचित हळवी झालेही असेन, पण शांतपणे विचार केलास तर तुलाही माझं म्हणणं पटेल बघ ! कुणी मुद्दाम नाही गं करत, पण आपोआप, नकळताच आम्हा वृद्धांना किंचित का होईना वेगळी वागणूक वाटेला येतेच बघ ! ‘ आमच्या घरी नं वृद्ध, वयस्कर मंडळी आहेत ‘ असं कुणी म्हटलं तर

त्यात आदर, प्रेम जाणवतं, पण आधीच परावलंबी विद्रुप वृद्ध व्यक्तींना कुणी, ‘ म्हातारे, बुढ्ढे, थेरडे ‘ असले शब्द वापरले की मन अगदी खोलवर घायाळ होऊन जातं बघ! जितकी जास्त वर्ष जगणार तितका जास्त हा अनुभव येणार आणि मनाचा हळवेपणा जास्त वाढणार! ” आई बोलता बोलता किंचित थांबली म्हणून मी बोलायचा प्रयत्न केला.

” आई, असं काय गं आज? वेगळेच विचार डोक्यात घेऊन तू पार अस्वस्थ झालीयेस ? काही घडलंय का वेगळं विशेष?”

” नाही गं, असं काहीच नाही. आज उगाच बोलावंसं वाटलं झालं! घरात आपण अडगळीपेक्षा ‘नकोसे ‘आहोत, ही भावना मनात जागी होणं किती दु:खदायक असतं? दिवसेंदिवस वृद्धाश्रमसुद्धा किती बोकाळलेत बघ की ! बरं, त्याला तरी वृद्धाश्रम का गं म्हणायचं? “

” आई, अगं असं काय ? आपला काही संबंध आहे का त्याच्याशी?” मी खरंच काय बोलावं न समजून काहीतरीच बोलले होते, हे मलाही जाणवलं. आईनी तिचं बोलणं पुढे सुरू ठेवलं.

” अगदी अनाथाश्रमासारखाच वृद्धाश्रम हा शब्दही केविलवाणा वाटतो, पोरका वाटतो. त्या निष्पाप मुलांना निदान, त्यांचे आई-वडील कोण आहेत याची जाणीव तरी नसते.इथे मात्र कित्येकदा सारी नातीगोती असूनही केवळ

‘ घरात नको ‘ म्हणून हकालपट्टी झालेली असते, ते बघून जीव दुखतो.”

क्रमशः…

लेखिका : मीनाक्षी मोहरील

प्रस्तुती : अस्मिता इनामदार

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ टीप – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री लक्ष्मण धरत ☆

?जीवनरंग ?

☆ टीप – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री लक्ष्मण धरत 

कितीही मोठे व्हा, मित्राला कधी विसरू नका…

टेबलवर ऑर्डर घेऊन आलेला सुखदेव टेबलावरची माणसे बघून हबकून गेला… तब्बल २५ वर्षानंतर तो हे चेहरे पुन्हा बघत होता. कदाचित त्या चौघांनी त्याला ओळखले नव्हते किंवा ओळख दाखवत नव्हते…

चौघापैकी दोघेजण मोबाईल मध्ये व्यस्त होते. आणि दुसरे दोघे लॅपटॉपमध्ये. कदाचित आत्ताच झालेल्या ‘deal’ ची आकडेमोड चालली होती…

शाळेतील मित्र खूप पुढे निघून गेले होते. तो स्वतः मात्र कॉलेज पर्यंतसुद्धा पोहचू शकला नव्हता…

नंतर दोन-तीन वेळा तो त्यांच्या टेबलवर गेला, पण सुखदेवने स्वतःची ओळख लपवून पदार्थ वाढले… चारी बिझनेसमन मित्र जेवण संपवून निघून गेले.

‘आता परत कधी इकडे न आले तर बरं’, असा विचार त्याच्या मनात आला. स्वतःच्या सध्याच्या परिस्थितीमुळे ( वेटर असल्यामुळे) शाळेतील मित्रांना ओळख सुद्धा दाखवता आली नाही म्हणून सुखदेवला फार वाईट वाटले.

“सुखदेव, टेबल साफ कर.’

‘तीन हजारचे बिल केले पण एक पैसा टीप म्हणून ठेवला नाही साल्यानी…”

मॅनेजर वैतागून बोलला…

टेबल साफ करता करता सुखदेवने टेबलावर पडलेला पेपर नॅपकिन उचलला. त्या चार बिझनेसमेननी पेनानी कदाचित त्या नॅपकिनवर पण आकडेमोड केली होती. पेपर टाकता टाकता सहज सुखदेवचे त्याच्याकडे लक्ष गेले, त्यावर लिहिले होते…

‘सुखदेव, तुला टीप द्यायला आमचं मन झालं नाही. ह्या हॉटेलशेजारीच आम्ही एक फॅक्टरी घेतलीय, म्हणजे आता येणे जाणे सुरूच राहील. तू आमच्या बरोबर जेवायला बसला नाहीस, उलट आम्हाला तू वाढत होतास हे आम्हाला कसंसच  वाटलं? आपण तर शाळेत एकमेकांच्या डब्यातून खाणारे! आज तुझा ह्या नोकरीचा शेवटचा दिवस. फॅक्टरीमधलं कॅन्टीन कोणीतरी चालवलंच पाहिजे ना…???

– शाळेतील तुझेच मित्र….’

खाली कंपनीचे नाव आणि फोन नं. लिहिला होता.

आत्तापर्यंत मिळालेल्या सर्वात मोठ्या ‘टीप’ ला सुखदेवने ओठांना लावले आणि , तो कागद खिशात व्यवस्थित ठेवला.

लेखक – अज्ञात 

संग्राहक – श्री लक्ष्मण घरत

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भिकारी (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?जीवनरंग ?

☆ भिकारी (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे  

त्याचं निधन झालंय. आत्ताच मी त्याच्या अंत्ययात्रेहून परत येतोय. त्यासाठी आलेले इतर लोक सांगत होते की, तो बऱ्याच दिवसांपासून आजारी होता. पण त्याने कुठलेच औषधोपचार केले नव्हते. कोणीतरी सांगत होतं की तो अतिशय घाणेरड्या घरात राहत होता. एकजण म्हणत होता की कुपोषणामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यावर दुसरा एकजण म्हणाला की, तो रोज दोन वेळा पोटभर जेवला असता तर आणखी काही दिवस नक्की जगू शकला असता.

काही दिवसांपूर्वी जेव्हा तो मला भेटला होता, तेव्हा माझ्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलला होता. कदाचित मी असा एकटाच माणूस असेन ज्याच्याशी तो इतक्या आपलेपणाने बोलला असेल. त्याच्याकडे काही लाख रुपयांची रोख रक्कम असल्याचे त्याने मला सांगितले होते. या एका शहरात त्याचे सहा फ्लॅट आहेत. त्यादिवशी आम्ही बोलत असतांना आतून कुणीतरी त्याला हाक मारली, म्हणून तो आत गेला. मी मग उगीचच त्याच्या घरात इकडेतिकडे पहात बसलो होतो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी ज्या खुर्चीवर बसलो होतो, ती खुर्ची अगदी मोडकळीला आलेली होती. कितीतरी वर्षांपूर्वी त्याच्या ऑफिसमधल्या जुन्या सामानाचा लिलाव झाला होता, त्यात त्याने ती विकत घेतली होती. त्याच्या घरात फर्निचर म्हणावं असं फारसं काही नव्हतंच. इतर जे  सामान दिसत होतं– म्हणजे सायकल, शिलाई-मशीन, टेबलफॅन वगैरे, तेही त्याने कुठून कुठून सेकंडहॅंडच विकत घेतलेलं होतं. घरही भाड्याचंच होतं, आणि गेली तीस वर्षं तो तिथेच रहात होता. बऱ्याच वर्षांपासून त्याने त्या घराचं भाडं देणंही बंद केलं होतं. आणि त्या घराची अवस्था खरोखरच इतकी वाईट झालेली होती की कधीही ते कोसळून पडू शकलं असतं. घराचा मालक कधी या जगाचा निरोप घेतोय, याचीच ते घर– आणि बहुतेक तोही– वाट बघत होते. 

थोड्या वेळाने एका मळकट-कळकट आणि तडा गेलेल्या कपात चहा घेऊन तो बाहेर आला. तो चहा नुसता पाहूनच इतकं कसंतरी  वाटलं मला, की तो जर तिथे माझ्यासमोर उभा नसता ना, तर त्याच्या घराच्या दरवाज्यासमोरून वाहणाऱ्या उघड्या गटारात मी तो फेकूनच दिला असता. असो.– त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली होती. — त्याला जेव्हा नोकरी लागली, तेव्हा त्याची आर्थिक परिस्थिती फारच हलाखीची होती. त्यामुळे नोकरी लागल्या लागल्या तो कसंही करून पैसे वाचवण्याच्या मागे लागला. त्या नोकरीबरोबरच काहीतरी पार्ट-टाइम कामही करायला लागला होता. बघता बघता त्याचं उत्पन्न वाढलं–आणि वाढतच राहिलं. पण तरीही आधीपासूनच त्याने खर्चाला जो लगाम लावलेला होता, तो मात्र त्याने कधीच सैल सोडला नाही. मग काय — त्याची बचत चहूबाजूने जणू फुलायला लागली. एका बँकेनंतर दुसरी–दुसऱ्या बँकेनंतर तिसरी– असं करता करता अनेक बॅंकांमध्ये खाती उघडली गेली. आता पैसे दुप्पट नाही, तर चौपटीने वाढायला लागले. 

मी त्याला एकदा विचारलं होतं की, “ इतक्या पैशांचं काय करणार आहेस तू ? “ 

यावर त्याने काय उत्तर द्यावं ? तो म्हणाला होता की, “ मी असा विचार करतोय की सगळी खाती बंद करायची आणि सगळे पैसे एकाच चांगल्या बँकेत टाकायचे. “ 

“मग पुढे ? “ मी विचारलं. 

“मग सगळी रक्कम सहा वर्षांसाठी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकीन. म्हणजे एकूण  सगळीच रक्कम दुप्पट होईल. “ 

“ याचा तुला काय फायदा मिळेल ? “

“ फायदा हा होईल की मला हिशोब ठेवणं सोप्पं जाईल. “ 

“ बरं, पण मग अशा रीतीने रक्कम दुप्पट झाल्यानंतर पुढे काय करशील ? “

“ मग पुन्हा ती सगळी रक्कम पुढच्या सहा वर्षांसाठी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकीन. “

“ म्हणजे कधी कुठला खर्च करणारच नाहीस का ? “ 

“ एवढी रक्कम खर्च कशी केली जाते ? “ त्याने भाबडेपणाने मलाच उलटा  प्रश्न विचारला होता. 

——- मी अगदी सहजच समोरच्या टीपॉयवर पडलेलं वर्तमानपत्र हातात घेतलंय. पहिल्याच पानावर एक बातमी छापून आलेली आहे —-” रस्त्यावर भीक मागणारा एक भिकारी, कडाक्याच्या थंडीमुळे गारठून गेल्यामुळे त्याच्या मोडक्या झोपडीत मृतावस्थेत सापडला. त्याला त्या झोपडीतून बाहेर काढण्यासाठी लोक जेव्हा आत गेले, तेव्हा त्यांना त्याच्या मृतदेहाखाली, चिल्लरने भरलेली दोन मोठी मडकी, आणि नोटांनी गच्च भरलेले पत्र्याचे दोन मोठे डबे, जमिनीत पुरून ठेवलेले सापडले.”

——- ज्याची अंत्ययात्रा संपवून मी  थोड्या वेळापूर्वीच परत आलो होतो, तो मित्र क्षणात माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला.– आणि आता मी विचारात पडलोय, की  त्याच्यात आणि या भिकाऱ्यात काय फरक आहे ? ——–

मूळ हिंदी  कथा – ‘भिखारी’,  कथाकार – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ EQ, दूधवाला आणि फ्री पिझ्झा…भाग -2 ☆ योगिया ☆

? जीवनरंग ❤️

☆ EQ,  दूधवाला आणि फ्री पिझ्झा…भाग -2 ☆ योगिया

EQ (Emotional Quotient), दूधवाला आणि फ्री पिझ्झा

पिझ्झा खाताना आजोबा आम्हाला सांगत होते कि “आज तुमची आजी असती ना तर तिने त्याला आज ठेवूनच घेतला असता. फार जीव लावायची सगळ्यांना.” फार इमोशनल झाले होते आजोबा. सांगत होते कि “त्यांच्याकडे एक अप्पा दूध घालायला यायचे. जवळच्या गावातून पहाटे ५.३० – ६.०० ला निघायचे. बरोबर ७. २० ते ७. ३० च्या दरम्यान आमच्याकडे यायचे. कित्त्येक वर्षे येत होते. कधी खाडा नाही. आजारपण नाही. ऊन -पाऊस नाही. वेळ ठरलेली. एकदा मात्र त्यांना यायला उशीर झाला ८.३० वाजले. तुझ्या आजीची चलबिचल सुरु. कशात तिचं लक्ष लागेना. सारखा एकच घोष “अप्पाला कधी उशीर होत नाही आज काय झालं?” ९ वाजले. मग तिने दारामागे अप्पासाठी भांड पालथं घातलं (पूर्वी अशी पद्धत होती कि कोणाला उशीर झाला, आपण कोणाची वाट पहात असू तर त्याच्या नावाने दारामागे भांड पालथं घालायचं). १० वाजत आले. मला ऑफिस ला जायचे होते. मला म्हणाली अप्पा आल्याशिवाय ऑफिस ला जायचं  नाही. जा त्याला बघून या. मग मी एका दिशेला. तुझ्या बाबाला आईने पिटाळलं कि बाकी ज्यांच्याकडे अप्पा दूध टाकतो त्या सगळ्यांकडे जाऊन ये”

“शेवटी ११.०० ला अप्पा आला. त्याची गाडी खराब झाली होती. शिक्षा म्हणून मग त्या दिवशी अप्पा ला आपल्याकडे जेवावं लागलं. तिने नाही अप्पाला अजून १ लिटर दूध फ्री मागितलं. अप्पा पण तिला खरवस , भूईमूगाच्या शेंगा , शेवग्याच्या शेंगा , कणस असं काय काय द्यायचा. त्याचा हिशोब नसायचा.”

उन्हाळ्यात पोस्टमन साठी पन्ह करून ठेवायची..बिचारा इतक्या उन्हात पत्र वाटत फिरतो म्हणून.

कामवाल्या बाईंना रोज ओरडायची, भांडी स्वच्छ निघत नाहीत म्हणून. २ तरी परत धुवायला लावायची पण त्यांचं काम झालं कि त्यांना रोज १ ग्लास भर दूध. वर म्हणायची ताकद नसेल तर कशी निघणार भांडी म्हणून दूध देते तुला. कामवाल्या बाईंनी पण कधी कटकट केली नाही. पाहुणे -रावळे झाले कि  जास्तीची भांडी पडायची. पण म्हणून खाडा नाही केला त्यांनी.

तिने या सगळ्याकडे कधी सर्व्हिस म्हणून नाही पाहिलं. आमच्यावेळी एकूणच जगण्याला SLA ‘s, KPI’s, KRA’s, Goals, Targets चिकटली नव्हती रे. आम्ही  नाती मात्र जोडली होती.  तुम्ही सगळ्याला पेनल्टी किंवा रिवॉर्ड लावून सर्व्हिस मिळवता आणि सुखी होता.  आम्ही संवेदना जाणून सर्व्हिस मिळवायचो आणि समाधानी राहायचो.  अरे मी काय बडबड करत बसलोय. तुझ्या आजीची आठवण झाली इतकंच.  असो. चला पिझ्झा संपवा आणि मग तुमची काय ती कंप्लेंट लाँच करा. “

“मग केली का?”

“नाही बाबा.. यापुढे कधीच कोणाला उशीर झाला तर कंप्लेंट  नाही करणार आणि फ्री पिझ्झा पण नाही मागणार, नो वन ड्स इट पर्पसली.. मला तर वाईट वाटतंय कि आपल्याला वेळेत पिझ्झा पोहोचवण्याचा नादातच तो घसरून पडला असेल” – छोटे चिरंजीव म्हणाले.

दादुने विचारलं ” तुमचं लेक्चर कसं होतं”

बायको उठता उठता म्हणाली  “तुम्ही आज जे शिकलाय त्यापुढे काहीच नाही…जा झोपा आता”

– योगिया

०१ जून २०२२

([email protected] / ९८८१९०२२५२)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆EQ, दूधवाला आणि फ्री पिझ्झा…भाग -1 ☆ योगिया ☆

? जीवनरंग ❤️

☆ EQ, दूधवाला आणि फ्री पिझ्झा…भाग -1 ☆ योगिया

EQ (Emotional Quotient), दूधवाला आणि फ्री पिझ्झा

परवाचीच गोष्ट. आम्ही दोघे एका लेक्चर ला जायचे होतो. ““How to improve the EQ (Emotional Quotient) of your child”. महत्वाचा विषय होता. विशेषतः घरात २ टिनेजर्स असताना तर नक्कीच. आमची गडबड असल्यामुळे ‘चान्स पे डान्स’. दोघांनी मिळून आमच्याकडून पिझ्झा ऑर्डर करून घेतला होता. ‘डिलिव्हरी इन हाफ ऍन अवर ऑर १ लार्ज पिझ्झा फ्री’ अशी काहीतरी स्कीम होती’. ६ वाजेपर्यंत पिझ्झा येणे येणे अपेक्षित होते.  ५.५५ झाले तशी दोघांची घालमेल सुरु झाली. आणि मनोमन प्रार्थना कि अजून ७ मिनिटाने येवू दे म्हणजे एक लार्ज पिझ्झा फ्री मिळेल. खरं तर आम्ही जेव्हा जेव्हा पिझ्झा ऑर्डर करतो तेव्हा नेहमी थोडा जास्तीचा असतोच कारण तास -दोन तासाने १-२ स्लाईस ची भूक लागतेच. तरीपण आमचीच मुलं, त्यामुळे काही फ्री म्हंटलं कि मोह होतोच , सोडवत नाही. ६.०५ झाले आणि चिडचिड सुरु झाली. ६.१५ झाले तरी पिझ्झाचा पत्ता नाही. नुसता त्रागा. बाबा आपण डॉमिनोज ला ‘सू’ करूया, छोटे चिरंजीव म्हणाले.  आई तू कस्टमर सर्व्हिस ला फोन लाव आणि कंप्लेंट कर, त्यांना सांग इट इज टू लेट , दे शुड गिव्ह २ फ्री पिझ्झाज –  मोठे चिरंजीव. आम्हाला पण निघायचे होते. उशीर होत होता..चिडचिड.  झेपत नाही तर कशाला कंमिटमेन्ट देतात. आमचे आजोबा शांत पणे सोफ्यावर बसून सगळं पहात होते , ऐकत होते. आमची चिडचिड पाहून त्यांचंही लक्ष  फाटकाकडे लागलं होतं.

“आबा..आम्ही निघतो….उशीर होतोय. पिझ्झा येईलच. पैसे पेड केले आहेत.  मुलं घेतील पण जरा त्याला दरडावून विचारा उशीर का झाला ते आणि तो फ्री पिझ्झा द्यायला सांगा.”

ते फक्त हसले. आम्ही निघालो.  रात्री उशिरा आलो. आबा झोपले होते.  आल्यावर मुलांना विचारलं कि “कधी आला पिझ्झा?, फ्री मिळाला का??”

दोघे शांत होते. “छान होता पिझ्झा. आम्ही फ्री मागितलाच नाही.”

“का??”

६.४० ला पिझ्झा वाला मुलगा आला. मी आणि दादू आंगावरच धावलो त्याच्या. दादू पेक्षा थोडाच मोठा होता. घाबरला होता. सॉरी सॉरी म्हणत होता. प्लीज कंप्लेंट करू नका म्हणाला. तेवढयात आजोबा आले आणि आम्हाला ओरडले गप्प बसा. त्याला विचारलं “कारे बाबा लंगडत आलास, मी पहात होतो. सगळं ठीक ना? “

तो हो म्हणाला. तेवढयात आजोबांचं लक्ष त्याच्या पॅन्ट कडे गेलं. गुडघ्यावर फाटलेली..थोडंसं रक्त लागलेलं. मग आजोबांनी त्याला आत बोलावलं. पॅन्ट वर करायला सांगितली. जखम झाली होती रक्त वहात होतं.

“काय झालं?”

साहेब घाईत येत होतो. एका वळणावर गाडी स्लिप झाली. पडलो. अजून दोन जणांना धडकलो. ते सगळं निस्तरता निस्तरता उशीर झाला. पण पिझ्झा मागे पेटित  होता. तो तसाच राहिला. कदाचित फक्त टॉपिंग्स थोडी सुट्टी झाली असतील. सर प्लीज कंप्लेंट करू नका. रिमार्क देतात आणि अर्धा पगार पण कट करतात. आणि त्याने आमच्याकडे बघून हात जोडले.

“अरे माफी कसली मागतोस. माझ्या नातवा एवढा आहेस तू ” “दादू जा डेटॉल -कापूस घेऊन ये.” आजोबांनी त्याला ड्रेसिंग केलं. त्याच्यासाठी चहा केला. त्याला एक पण एक पीस पिझ्झा खायला दिला . तो आजोबांच्या पाया पडला आणि गेला.

क्रमशः…

– योगिया

०१ जून २०२२

([email protected] / ९८८१९०२२५२)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काना मात्रा वेलांटी….भाग – 3 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

काना मात्रा वेलांटी….भाग – 3 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सुरुचीसाठी आदर्श निबंध  लिहायला हवा.असे मी ठरवते आता पुढे..)

सुरुचीच्या आणि माझ्या वयातलं अंतर! ती उमलणारी बालिका आणि माझे पक्व मन.खऱ्या खोट्यातून गेलेली मी. जागोजाग धुक्कळ पसरलेले. पण तरीही मला हे अंतर पार करून तिच्या लेव्हल पर्यंत जायला हवेच.

ऑफिसातला हाही दिवस माझा नेहमी प्रमाणे गेला. कामात गुंतलेला.मिलवानीची  चार्जशीट तयार झाली. रमीला काटदरे येऊन गेली. वाटत होती तेवढी ती लेचीपेची नव्हती. चांगली संतुलित आणि कणखर दिसली.

लंच टाईम जरा हलकाफुलका रिकामा गेला.

सुरेंद्र पांडे भविष्य पहायचा. तो सहज म्हणाला

” मॅडम आज मी तुमचा हात पाहतो.”

तशी स्टाफशी   माझी रिलेशन्स खेळीमेळीची आहेत. कधी कामापुरते वाद-विवाद होतात. वातावरण उष्ण आणि गढूळ होते. पण पुन्हा उडालेला धुरळा जमिनीवर बसतो आणि हवा मोकळी स्तब्ध शांत होते.

सुरेंद्र ला मी हात दाखवला.

” हं बघा.

त्यांनी माझा हात उलटासुलटा करून पाहिला. सांगितलं मात्र काहीच नाही. शेवटी मीच कंटाळून म्हणाले,

” अरे! काहीतरी सांग. वाईट असलं तरी चालेल मला.”

” मॅडम तुम्ही फार चांगल्या आहात!पण तुम्हाला चंद्रबळ कमी आहे. त्यामुळे मानसिक सौख्य कमी. तुम्ही सगळ्यांसाठी झटता. पण तुमच्या कृतीचे सगळीकडेच चुकीचे अर्थ निघतात.  पण आयुष्याच्या उत्तरार्धात तुम्ही बऱ्याच अध्यात्मिक बनाल.”

” का कोण जाणे! पण थोडीशी मी डिप्रेस्ड झाले. क्षणभर मनात आलं सुरेंद्र ला खरंच कळत असेल का काही .थोडेसे त्यांनी बरोबर हे सांगितले. पण मनाला बजावलं. आपण बुद्धिवादी आहोत.  one must master our stars या विचारांचे आहोत. मनाची अशी घसरगुंडी होता नये.

पुन्हा केबिनमध्ये गेले. उगीचच माझीच केबिन मला नव्यासारखी आणि परकी वाटू लागली. भिंतीवरचे गांधी, नेहरू, सुभाषचंद्र बोस ,इंदिराजींचे फोटो कोपर्‍यातली पृथ्वी, टेबलावरच्या ग्लास मधून दिसणारी कॅलेंडर्स,मॅथेमॅटिकल टेबल्स, कुणाकुणाचे पत्ते, वुमन मॅगझीन मधले माझ्या मुलाखतीचे कात्रण. पण त्या सर्व नीरस, रंगहीन कागदामध्ये एक चित्र होतं! विस्मयाने काढलेले.  अनेक रंगांनी रंगवलेलं. एक घर होतं. पक्षी होते. उंच झाडे होती. दोन समांतर रेषा घरापासून निघालेल्या.ती एक वाट होती. दूर दूर जाणारी. या टोकापासून त्या टोकापर्यंत.

संध्याकाळची वेळ.  दिवस संपत आल्याची चाहूल देणारी.

ऑफिस ते घर. परतीचा प्रवास. पुन्हा घराचे विचार. सकाळचं विस्मयाचं ठणठणीत बोलणं आठवलं.

” तुला वेळच नसतो  आमच्याशी बोलायला.”

आजचा दिवस मात्र चांगलाच समजायचा. नाही तर रोज काही ना काही कारणावरून ऑफिस मधून परतायला उशीर होतोच. आज ऑफिसर्स कोआॅर्डीनेशन मिटींगला जाण्याचे टाळले म्हणून. पुढल्या सेशनला  चंद्रमणी बोलेलंच काहीतरी. नोकरी करणाऱ्या स्त्रियांविषयी त्याला फारच राग आहे. म्हणजे तसं आपण कधीही मिटिंग चुकवत नाही पण आज सकाळीच सुरुची ला प्रॉमिस केले होते . तिचा निबंध आज लिहून दिलाच पाहिजे.

मी कोण होणार.?

अजून काही ठरलं नाही. स्कूटरवरून जाताना समोरून चेहऱ्यावर येणारा वारा कसा सुखद वाटत होता! हा वारा, ही गती, मला फार आवडते. मनातल्या विचारांना एक ठेका देते.. आज काय झालं असेल ते असो, पण उद्या नक्की चांगलं होईल असा आशावाद निर्माण करते. आज सिग्नल पाशी ही थांबावं लागलं नाही. समाधान वाटलं. तेवढाच वेळ वाचला.

घरी आले तेव्हा सुरुची खेळायला गेली होती.  विस्मयाला अमृता घेऊन गेली होती. काय केले टेस्ट मध्ये कोण जाणे! बहुतेक नीट केली असणार. तसा व्हेरी गुड रिमार्क असतोच तिला. तारा ही सर्व आवरून माझीच वाट पाहत होती. मी वाॅश  घेतला. हाऊस गाउन चढवला. ताराने गरम चहा आणून दिला. तो घेतला. हातात वही पेन्सिल घेऊन बसले. सुरुची येईपर्यंत काहीतरी मुद्दे काढून ठेवू या. सुरूची चा निबंध चांगला झालाच पाहिजे.

टेबलवर वही होती सुरूचीची . शेवटच्या पानावर पेन्सिलीने काहीतरी लिहिले होते.

मी कोण होणार? डॉक्टर, इंजिनियर, पत्रकार, पुढारी, समाजसेविका, गायिका की चित्रकार? नको रे बाबा!! यापैकी मला काहीही व्हायचे नाही.  मी सांगू? मला कोण व्हायचंय?

आई …

एक चांगली आई . म्हणजे विद्वान  नव्हे. ऑफिसात जाणारी आई नव्हे. मला मुलांवर कधीही न चिडणारी, सदैव प्रेमाने वागणारी, मुलांशी खेळणारी, गप्पा मारणारी, हसरी, खेळणारी आई व्हायचे आहे. श्यामच्या आई सारखे. रात्री झोपताना गाणं म्हणणारी. गोष्टी सांगणारी. आई होणं किती महान आहे! जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी! या जगातली चांगली आईच कुठेतरी हरवलेली आहे.

पुढच्या ओळी मला दिसल्साच नाहीत. माझे डोळे पाण्याने डबडबले. ही माझी अकरा वर्षाची मुलगी विचार करू शकते? तिच्या बाल मनातून ओघळलेले नैसर्गिक भाव!  शब्द चुकले असतील. काना, मात्रा वेलांट्या कुठेकुठे राहिल्या होत्या. चुका शुद्धलेखनाच्या होत्या. पण विचार प्रामाणिक आणि निडर होते. आयुष्याला ही असेच व्याकरण असते का? काना मात्रा वेलांट्या  तिथेही  असतात कां? जशा त्या शब्दाला आकार देतात, अर्थ देतात. त्या चुकल्या तर शब्दाचा उच्चार बदलतो. शब्द बेढब, अर्थहीन बनतो. सुरुची चे शुद्धलेखन सुधारण्याचा मला अधिकार आहे का? तिचे विचार पुस्तकी नव्हते.  ते सहजस्फूर्त  होते. भावनिक कुपोषणामुळे निर्माण झालेला तो विद्रोह होता. एका चौकटीतल्या सुंदर चित्रातला न दिसणारा,तो एक प्रमाण  चुकलेला आकार होता. तो टिपून घ्यायला एखाद्या कलाकाराची दृष्टी हवी. डोळे झाकले म्हणून दोष जात नाहीत. जे एखाद्याला सुंदर दिसतो ते दुसऱ्याला तसं दिसेलच असं नाही. सुरुची ने लिहिलेल्या त्या ओळी वाचून मी एकदम पराभूत झाले. मी कोण होणार होते, कोण झाले, मला काय मिळालं ?

धपकन सुरूची ने माझ्या गळ्यात हात घातले.

“मम्मी केव्हा आलीस? आणि मी लिहिलेलं तू वाचलंस मम्मी? मी असंच लिहिलं. गंमत म्हणून. मला वाटलं म्हणून. आय डोंट मिन ईट मम्मी! आय लव यु व्हेरी मच! मेरी अच्छी मम्मी! चल आपण परत लिहूया. फेअरबुकमधे असं काही लिहून चालणार नाही.  दुसरं काहीतरी लिहूया.

मग मी सुरुचीचा एक पापा घेतला.

“नको काय हरकत आहे हेच लिहिलं तर? हे छान आहे. खूप सुंदर लिहिले आहेस तू. तेवढे काना, मात्रा, वेलांट्या कुठे कुठे विसरली आहेस.. तेवढं दुरुस्त कर…..

समाप्त

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवा काळ आणि समस्या ☆ श्री गौतम रामराव कांबळे ☆

श्री गौतम रामराव कांबळे

? विविधा ?

☆नवा काळ आणि समस्या ☆ श्री गौतम रामराव कांबळे

साधारण चाळीसेक वर्षापूर्वीची गोष्ट असावी. आजही स्मरणात घर करून बसली आहे. मी चौथीला असेन त्यावेळी. वडीलांच्या कडक शिस्तीत वाढत होतो.

त्यांचे काही नियमही होते. त्यापैकी एक म्हणजे, घर व गल्लीचा परिसर सोडून खेळायला लांब जायचे नाही. आमच्या खेडेगावात  बहुतेक सगळ्या पालकांचा या बाबतीत नियम सारखाच.

आमचे घर गावाच्या दक्षिण टोकाला. एकदा असाच मी शाळेतील मित्रांच्या नादाने गावाच्या उत्तरेकडील गल्लीत खेळायला गेलो होतो. चांगलाच रमलो होतो.  त्या गल्लीतील एका ज्येष्ठ माणसाने मला पाहिले. मी या गल्लीत नवीन आहे हे त्यांनी ओळखले. मला त्यांनी हटकले. जवळ बोलावून म्हणाले,

“कुणाचा रं तू?”

मी वडीलांचे नाव सांगितले.

“मग इकडं कसा आलायस?”

मी गप्प.

“तुज्या ‘बा’ला म्हाईत हाय का?”

बापाचं नाव काढल्यावर पोटात गोळा आला.

मी काही न बोलता नकारार्थी मान हलवली.

“चाटदिशी घरला जायाचं. न्हायतर मार खाशील. तुजा बा इचारू दे. मग त्येला पण सांगतो.” ते अधिकारवाणीने बोलले.

मागं न बघता नीट घर गाठलं. पण मनात भीती होती. वडीलांना समजलं तर काय खरं नव्हतं. कशानं हाणतील याचा नेम नव्हता.

वडील संध्याकाळी शेतातून आले. मूड चांगला वाटला त्यांचा. विचार केला, त्या माणसानं सांगण्या अगोदर आपणच सांगितलं तर बरं होईल. थोडक्यात तरी भागंल.

मी म्हणलं, “तात्या, आज मी वाण्याच्या गल्लीत गेल्तो.”

“कशाला”

“पंडासंगं”

पंडीत देसाई हा माझा मित्र. त्याला सगळे पंडाच म्हणायचे. त्यांच्या आणि आमच्या घरचे चांगले होते. त्यामुळे फार अडचण येणार नव्हती.

“बर मग?” तात्यांचा प्रश्न.

तिथंले काका इकडं का आलायस म्हणून रागावले मला. “मार खाशील म्हणाले”

 “का?”

“घरात माहीत हाय का म्हणून इचारलं”

“तू काय सांगितलंस?”

“न्हाय म्हणालो”

“त्येच्या पायात पायताण न्हवतं का? तोंडानं बोलण्यापेक्षा हाणायला पाहिजे होतं.” वडीलांचा शेरा.

मी गप्प बसलो. असंच वातावरण असायचं गावाकडं. गल्लीतल्याच काय गावातल्या प्रत्येक माणसाचं सगळ्या मुलांकडं लक्ष असायचं. धाक असायचा.  कुणाच्या मुलाला कुणीही  रागवलं तर आई बापाला राग यायचा नाही.

आई, बापाची न्हायतर मामाची भीती घालायची. बाप काकाची भीती घालायचा. म्हाताऱ्या माणसांना तर कुणालाही रागवण्याचा अधिकारच असायचा. त्यामुळे मुलं, तरुण टरकून असायचे.

हल्ली एक समस्या होऊन बसली आहे. मुलं आई वडीलांची खूप लाडकी झाली आहेत. बाप, आत्या किंवा काका रागवला तर आईला राग येतो. आणि आई किंवा मुलाचा मामा रागावला तर बापाला राग येतो. मग गावातीलच काय शेजाऱ्या पाजाऱ्यानाही कुणाच्या मुलाला बोलायचे धाडस होत नाही.   परिणामी मुलांना कुणाचा धाक असा राहिलेलाच नाही.

चौकोनी कुटुंब पद्धतीचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. मुलं आपल्या मनाला वाटेल तशी वागत आहेत. व्यसनाधीनता वाढत आहे. याचा विचार कोण आणि कधी करणार हा प्रश्न उरतोय.

© श्री गौतम रामराव कांबळे

शामरावनगर,सांगली.

9421222834

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काना मात्रा वेलांटी….भाग – 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

काना मात्रा वेलांटी….भाग – 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(ताराला मी मदत करु शकले नाही. ती गेली. आता  पुढे)

आज एकदम आठवण झाली. मधूनच सुरुचीच्या निबंधाचा विषय डोक्यात घोळत होता., मी कोण होणार?, एखादी समाजसेविका?

डोळ्यासमोर एक चित्र आलं. ब्रिज खालची वस्ती. जवळ जवळ असलेल्या अनेक पत्र्याच्या झोपड्या. ओला चिखल .कचऱ्याचे ढीग. घणघणणाऱ्या माशा. वाहणारे नळ. उघडी नागडी पोरं. शेंबडी मळकट.. दारू पिऊन खाटेवर लोळणारी सुस्त माणसं. आणि फाटक्या लुगड्या खाली स्तन्य करणाऱ्या, विटलेल्या बायका.काही सरकारी वर्दी घातलेली, चष्मा लावलेली माणसं, एका झोपडी जवळ फुटकळ सामान बाहेर काढत आहेत. हातात स्टॅम्प पेपर. कोणीतरी तारा चा डावा हात उचलला. इंक पॅडवर अंगठा दाबला आणि ठसा घेतला. रडणारी तारा, तिला बिलगलेली तिची मुलं, झोपडीजवळ सारी गर्दी जमलेली, अगदी एखाद्या हिंदी पिक्चर मधला सीन. आणि इतक्यात… श्रीदेवी किंवा  जयाप्रदा गर्दीतुन वाट काढत आली.

” ठहरो! ही बघा कोर्टाची ऑर्डर. थांबवा हे सारे. तिचं घर तिला परत द्या. दूर व्हा सा!रे या घरावर फक्त तिचाच हक्क आहे. मग ती तारा जवळ गेली. तिच्या पाठीवर हात ठेवला. तिच्या मळकट मुलांचे पापे घेतले.  मग म्युझिक गाणं वगैरे  वगैरे… आणि सर्व आनंदी आनंद.

खरंच समाजसेविका होणच योग्य. बरंच काही लिहिता येईल. करू विचार.   संध्याकाळपर्यंत पुष्कळ मुद्दे सुचतील.

तारा कामावर आल्यामुळे दिवसाचा कार्यक्रम  बिघडला नव्हता. सारं काही वेळेस होणार होतं.  रोज सकाळी काही वेळ येणार हे दडपण थोडं उतरलं. .अॉफिसची वेळ झालीच होती.

आता स्कूटर नीट सुरू झाली तर बरं! नाहीतर उगीचच उशीर व्हायचा. काल पेट्रोल भरायला हवं होतं. संजय नेहमी रागावतो.गाडी रीझर्वला येईपर्यंत तू पेट्रोल भरत नाहीस.

पण आज मी ऑफिसला वेळेवर पोहोचले.

घर आणि ऑफिस हे अंतर पार करताना जो वेळ लागतो. त्या वेळात, माझ्या व्यक्तित्वात बदल झालेला असतो. आता माझ्या डोक्यात ऑफिसचेच विचार. तारा, विस्मया ची टेस्ट, संजय चे टोमणे, सुरूची चा निबंध डोक्यात नाही.

कालचे डे बुक आऊट होतं. फारच फरक होता. आज प्रथम ते टॅली करावं लागेल. शिवाय इतर प्रॉब्लेम्सआहेतच. मिलवानीने हाऊसिंग लोन घेऊन घर बांधलं आणि विकलं. हेड ऑफिस मधून चौकशी चालू आहे. गेले सहा महिने तो विदाऊट पे रजेवर आहे. त्याच्यावर ॲक्शन अंडर डिसिप्लिन होणार.

आज एक व्यक्ती मला भेटायला येणार आहे रमीला काटदरे.

काटदरे  आमच्याच बॅचला होता. त्याची ही  बायको. दोन वर्षापूर्वी काटदरेची नागपूरला बदली झाली होती. सर्व नाद होते त्याला. चिक्कार प्यायचा अलीकडे .सस्पेंड  केला होता त्याला. ऑफिसमध्ये पिऊन यायचा म्हणून. बायकोने डिवोर्स घेतला होता. एक मुलगी होती त्याला. शेवटी काही महिन्यांपूर्वीच संपला. लिवर सिरॉसिस! खोलीत तीन दिवस प्रेत पडले होते म्हणे!  म्युनिसीपालीटीच्या गाडी वरून नेला त्याला. नागपुर ब्रांच मधल्या शिपायाला काय वाटले कोण जाणे ! रस्त्यावरून त्याचे प्रेत जात असताना धावत जाऊन त्याने पांढऱ्या ,सुकलेल्या फुलांचा हार त्याच्या प्रेतावर टाकला.

काटदरे चा कसा बेवारशी शेवट झाला. सगळे असूनअनाथ!  स्वतःच्या जीवनाचे अशी लांच्छनास्पद अवस्था करून घेतल्यानंतर मरताना यांना काय वाटत असेल? मरणार्‍या माणसाच्या अंत: चक्षू समोरून स्वत:च्या जीवनाचा एक चित्रपट सरकून जातो अस म्हणतात. काटदरे ने या चित्रात स्वतःला कसं पाहिलं असेल? मरताना निदान त्याच्याच पेशीतून तयार झालेली त्याची निष्पाप बालिका त्याला दिसली असेल का? तिच्या उरलेल्या भविष्याबद्दल तरी त्याला खंत वाटली असेल का?

आज त्याची बायको मला भेटायला येणार आहे. प्रॉव्हिडंट फंडावर तिने मुलीच्या नावे क्लेम केला आहे. मॅटर तसं  सरळ नाही. युनीअन सेक्रेटरी ही मिटींगला हजर राहणार आहेत.  मॅनेजमेंट च्या वतीने मला हे प्रकरण हाताळायचे आहे. काटदरेचे ड्युज बरेच आहेत. पण तसा तो सिनिअर होता. सर्व्हिस बरीच वर्ष झाली होती.

कशी असेल त्याची बायको? कुठल्यातरी प्रायव्हेट कंपनीत नोकरी करते. माहेरीच असते. एक स्त्री म्हणून मला तिच्याबद्दल सहानुभूती वाटत होती. एका पुरुषाच्या बेजबाबदार बेताल व्यसनाधीन पणामुळे बळी पडलेल्या  जीवनाची, साक्षीदार म्हणून मला तिच्याबद्दल अनुकंपा वाटत होती. पण नियमात बसेल तेवढीच मदत मी तिला करू शकणार होते.

आज फारच रेस्टलेस झाले होते  मी. त्यातून सुरूचीने या निबंधाच्या विषयाचा किडा उगाचच माझ्या मनात वळवळत ठेवलाय.” मी कोण होणार?”

काहीतरी महत्वपूर्ण व्यक्ती बनून समाजाचे ऋण फेडावे असे लहानपणी मला फार वाटायचं. आपण डॉक्टर व्हावं डॉक्टरच्या गळ्यात अडकवलेल्या स्टेथॉस्कॉपची  मला फार मजा वाटायची. पण आता वाटतं कशाला काही अर्थ उरला आहे का? पदवीपूर्व भ्रष्टाचार आणि पदवीनंतरही भ्रष्टाचार. त्यादिवशी राम स्वरूप ने मुलगा पास झाला म्हणून पार्टी दिली. एका हातात ड्रिंकचा ग्लास आणि दुसरा हात पोराच्या पाठीवर.

” बेटा पास हो गया हमको फिकर नही. हम कितना भी पैसा लगायेगा. कही ना कही इंजिनीयर को भेजही  देंगे उसकोा.”

एका मार्गाने अॅडमीशन हुकली म्हणून विनु निराश झाला होता. रात्रीचा दिवस करून अभ्यास केला होता त्याने. मध्यमवर्गीय आई वडिलांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून त्याने कसून मेहनत केली होती. बऱ्याच वेळा माझ्याकडे डिफिकल्टी सोडवायला यायचा. मॅथ्स मध्ये मी त्याला खूप मदत केली होती. खरं म्हणजे मलाही फार उजळणी करावी लागायची. पण मजा  वाटायची.

एक दिवस तो म्हणाला होता,” मावशी, तुम्ही टीचिंग लाईन घ्यायला हवी होती.  खूप छान शिकवता तुम्ही.विनूने कॉम्प्लिमेंट्स दिल्या तेव्हा बरं वाटलं होतं पण आता तो स्वतः इतका हताश झालाय् की त्याची काळजी वाटते.

निबंध थोड्या निराळ्या कोनातून लिहावा. मी कोणीच होणार नाही. ध्येय, महत्त्वाकांक्षा याला काही अर्थ आहे का! मी चांगली होणार की वाईट होणार हेही ठरवू नये. मी वाईट झाले तर माझ्या विवेकबुद्धीला ते टोचत राहिल. आणि मी जर चांगली झाले तर? चांगली म्हणजे सत्यवादी, नीती प्रिय, स्वाभिमानी, तत्त्वांना महत्व देणारी वगैरे वगैरे…. त्यापेक्षा एक मातीचा गोळाच रहावे. जसा आकार मिळत जाईल तसं आकारत जावे. मनाशी कुठली आकांक्षा बाळगणं म्हणजे हवेला धोपटणं आहे.  पण हा फारच निराशाजनक विचार झाला व्हेरी मच पेसिमिस्तिक. सुरुची अजून लहान आहे. तिच्यावर हे असे नकारात्मक संस्कार करणे योग्य नव्हे. जीवनाविषयीचा तिचा दृष्टीकोन गढूळ होईल. मी कोण होणार या विषयावर पारंपारिक निबंध लिहायला हवा. म्हणजे पिढ्या नी पिढ्या चालत आलेले आदर्श. उदात्त, ध्येयवादी.

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काना मात्रा वेलांटी….भाग – 1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

काना मात्रा वेलांटी….भाग – 1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

तीन दिवस झाले. सुरुची रोज सांगते,

“मम्मी मला निबंध लिहून दे! विषय आहे “मी कोण  होणार?”

मी तिला रोज, आज नक्की सांगेन हं असं आश्वासन देते आणि कामाच्या पसाऱ्या पुढे मला तिचा निबंध लिहून देणं काही जमत नाहीय.

” मम्मी आजचा लास्ट डे आहे.  उद्या मिस बुक्स चेक करणार आहेत .मला इन कम्प्लीट रिमार्क नकोय. देशील ना लिहून? मराठीतून लिहाचं आहे म्हणून तुला मस्का नाहीतर मीच लिहिलं असतं .मला पटापट मराठी शब्द आठवत नाही.”

तुझं मराठी इतकं काही वाईट नाही. तू लिहून तर बघ. मी दुरुस्त करून देईन.

“ते काही नाही. तू टाळतेस हं मम्मी.तुला निबंध सांगायलाच हवा. मागच्या वेळेस मिसने माझा निबंध वर्गात वाचून दाखवला होता.”

“छान! म्हणजे मी लिहायचा आणि शाबासकी तुला!”

”  बरं. संध्याकाळी घरी आल्यावरआधी तुझा निबंध. मी कोण होणार. बस?”

” प्रॉमिस ?”

“प्रॉमिस.”

तेवढ्यात सुरूची ची रिक्षा आली. मी तिला टाटा करून घरात वळले. सुरुची शाळेत गेली.

मी कोण होणार? थोडा विचार करायला हवा. घड्याळात ठोके पडले. आणि विचार बदलले. सात ते दहा. तीन तास. त्यात कामाची तुडुंब गर्दी.  विस्मया ची पण आज टेस्ट आहे.  तिचा अभ्यास घ्यायलाच हवा. अगदी जवळ बसून, तोंडावर पांघरूण घेऊन झोपली आहे. तिला उचलून उठवावे लागणार. थोडं रडणं कुरकुर. पुन्हा गादीवर जाणं. डोळे धू. चुळ भर. घे हा ब्रश. घास दात. दूध पी. आंघोळ कर. लवकर अटप गं! मला उशीर होतोय. तुझं होमवर्क राहिलंय. घे ते दप्तर. काढ वही. रबर सापडत नाही. पेन्सिलीला टोक नाही. चल ग लवकर अटप. किती वेळ घालतेस. अजून तारा पण आली नाही.

शी बाई! मम्मी तुझी किती घाई! करते ना सर्व काही! आणि आज ते झाडावरचं ऑरेंज फुल  मी मिसला देणार आहे.”

” हो. ते नंतर बोलु.”

” नंतर कधी? मम्मी, तुला वेळच नसतो आमच्याशी बोलायला.”

” हे बघ आधी तू टेबल्स म्हण. वर्णमाला काढ. त वर अनुस्वार दे म्हणजे पतंग हा शब्द होईल.”

” मम्मी अनुस्वार म्हणजे काय?”

” अनुस्वार म्हणजे टिंब”

” म्हणजे शब्दाला कुंकू लावायचं ना?”

विस्मया चे विनोद आणि हसणे. पण आपल्या जवळ इतका वेळ नाही.

” तुझ्या कल्पना पुरे! आज टेस्ट आहे ना तुझी?”

ताराला आज उशीर झाला तिला किती वेळा सांगितलंय्, सकाळी उशीर करू नकोस. एखादे वेळेस ती येणारही नाही. सांगून कधी रजा घेतली आहे?वाट बघायची आणि कामाला लागायचे. अजून संजय चा ब्रेकफास्ट करायचाय्.तारा आली नाही तर विस्मयाला शीला कडे पाठवावे लागेल. विस्मया तयार होणारच नाही. तिची मनधरणी करताकरताच वेळ जायचा.

ती म्हणेलच,” मम्मी तू सुट्टी घे ना.मी शिलाआँटी कडे जाणार नाही. मला प्रेमच्या  रिक्षातून जायला आवडत नाही. तो चिडवतो मला.

आली तारा. उशीर केल्याबद्दल ओरडायला हवं होतं पण जाऊ दे उगीच सारा दिवस खराब जायचा.  आणि शिवाय कुणी मुद्दाम वागत नाहीअसं. तिच्या काही अडचणी असतील.

एकदा ती म्हणाली होती,”ताई एक विचारू का? रोजच ठरवते आज विचारीन, पण तुम्हाला टाईम भेटत नाय, म्हणून म्हणावं जाऊ दे. पण आता अगदी गळ्याशी आलया”

“काय झालं? बोल.” तिच्या बोलण्याच्या पद्धतीवरून अंदाज आला होता. पैसे वगैरे हवे असणार.

” बाई लेकीच्या  लग्नाला, महिला बँकेतून तीन हजार रुपये घेतले होते.ते काही फेडणं झालं नाही मजकडून. कुठे कुठे पुरी पडू? उधार उसनवारी करून दिवस निघत आहेत. बँकेने केस केली आहे. हा बघा कोर्टाचा कागद.”

तिनं साडीच्या पदरात बांधलेल्या पेपराची घडी माझ्या हातात ठेवली.

” माझी झोपडी तारण ठेवली होती. पैसे नाही भरले तर जप्ती येईल. माझ्यासाठी एवढं करा. तेवढे पैसे भरून द्या. माझ्या महिन्यातून कापुन घ्या. काय बी करा. आणि गरज भगवा. मी तुमचे उपकार जन्मात विसरणार नाही. लई कठीण झालंया बगा. झोपडी गेली तर राहू कुठे? दोन लहान लेकरं हायेत.  शिवाय एकटी बाई कपाळकरंटी. तुमच्याशिवाय हवाला तरी कुणाचा मला? “

बोलता-बोलता तारा रडू लागली. तसे हालच आहेत. शिवाय या बायकांचे नवरे असले काय नी नसले काय? त्यांच्या पीडा आहेतच. शिवाय ताराला माहेरचं कोणी नाही. तिचा भाऊ आहे. पण तोच हलाखीत. सासरी विचारत नाही कुणी.

तरीही मी म्हटलं,” का ग तुझे एवढे तीन-तीन दीर आहेत तुला काही मदत करत नाहीत?”

“कर्म त्यांचं !ही कापड गिरणी बंद पडली. आणि बेकार झालेत सर्व. कुठे मिळेल तिथे मजुरी करतात. असलं तर काम नाही तर असेच. त्यांच्यापासून काय मी अपेक्षा ठेवणार बाई? तुमची कंपनी देते ना कर्ज! तिथून काहीतरी करा ना??”

या बायकांच्या परिस्थितीची दया येते. पण मागे एकदा पारुच्या वडिलांना चहाची गाडी टाकण्यासाठी, एका बँकेतून, माझ्या ओळखीने कर्ज मिळवून दिलं. तर दुसऱ्याच महिन्यात त्यांनी पैसे मस्त वापरले. चैन केली. पुन्हा हातावर हात चोळत बसला. हफ्ते भरलेच नाहीत. मी मात्र विना कारण अडकले. गॅरंटी दिली होती मी. नकोच त्या भानगडीत पडायला.

“हे बघ! एक कर्ज फेडता आलं नाही. दुसरं कसं फेडशील ?इतके दिवस महिन्याच्या महिन्याला थोडेसे पैसे भरले असते तर फिटले नसते का कर्ज? शिवाय तू कामावर ही वेळेवर येत नाहीस. सारख्या रजा घेतेस. महिना तरी पुरा होतो का तुझा.  मला काही जमणार नाही बाई! तू तुझं बघ.

मग काही न बोलता तारा गेली. त्यानंतर ताराने कधी विषय काढला नाही. मीही कधी विचारले नाही.

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares