मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कोटी मोलाची कथा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ कोटी मोलाची कथा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

लग्नात आहेर म्हणून आलेली भेटपाकिटं उघडतांना एका पाकिटात फक्त एक कागद अन् एक रुपयाचा ठोकळा हातात लागल्यानं त्यांची उत्सुकता वाढली. कागदाची घडी उघडली अन् त्यात खरडलेल्या पाच सहा ओळींचा मजकूर वाचताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यात लिहील होत, ” माफ करा. मी तुमच्या नात्यातला काय, ओळखीचा सुद्धा नाही. वृद्ध आई-वडीलांनी माझ्याबाबत पाहिलेली स्वप्ने फुलवण्यासाठी ग्रामीण भागातून नोकरीच्या शोधात आलेला एक उच्चशिक्षित बेरोजगार तरूण आहे मी. कडकडून भूक लागली होती. जवळ पैसेही नव्हते. येथून जातांना हे लग्न दिसलं. तसाच आत शिरलो नि भूक शमवली. या रुपयाचं हल्लीच्या काळात काहीच मोल नाही, हे पुरेपूर जाणून आहे मी. तरीही खाल्लेल्या अन्नाबद्दलची कृतज्ञता, म्हणून यात हा रुपया टाकला आहे.” 

— या एकाच गोष्टीला किती पैलू आहेत !

भूक पापी आहे.

परिस्थिती नाइलाजाची आहे.

हातून अपकृत्य घडलं आहे.

त्याची मनाला खंत आहे.

कांटा बोचरा आहे.

पश्चात्तापाची भावना आहे.

पापक्षालनाची इच्छा आहे.

पण तेव्हढीही ताकद खिशात नाहीये.

रुपयाला अर्थ नाही याची जाण आहे.

पाकिटातल्या रुपयाला नुकसानभरपाई म्हणावं की आहेर म्हणावं? समजत नाही !

या साऱ्या प्रकाराला एकच गोष्ट जबाबदार आहे – पापी भूक.

ती सुद्धा रोज रोज लागते.

उपाशी माणसाने अन्नाची चोरी करावी कां – हा प्रश्नच अमानुष आहे.

“पापी पेटका सवाल है भाई”

पण माणूस नेक आहे.

त्याच्यापाशी देण्यासारखं असलेलं सर्वस्व –

एक रुपया – देऊन त्यानं  लाखमोलाचं पुण्य जोडलं आहे.

म्हणूनच ही कथा कोटीमोलाची आहे !

मित्रांनो, काळजी घ्या…. कृपया अन्न वाया घालू नका. भूक भागवण्यासाठी अन्नाची खूप गरज आहे.

लेखक : अज्ञात 

संग्राहक – सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ II सखीII… अशी ही – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? वाचताना वेचलेले ?

☆ II सखीII… अशी ही – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

ती आली आयुष्यात अन् मी मोठी झाले

अवखळ मुलीची एकदम बाई झाले

*

नको वाटायचे तिचे येणे

सगळ्यात असून दूर बसणे

*

सण नाही वार नाही

तिचे येणे ठरलेले

अन् तिच्या येण्याने माझे बेत उधळलेले

*

बरोबर महिन्याने यायची,

येण्याआधी आठ दिवस चाहुल द्यायची

इतकी सवय झाली तिची 

की नाही आली वेळेवर तर मी चिडायची

*

सगळे तिचे नखरे सहन केले

तिने नाचवले तशी नाचले

*

तिनेच एकदा न येऊन सांगितले गुपित

आई होशील आता गर्भ रुजलाय कुशीत

*

तेवढाच काय तो दुरावा बारा महिन्यांचा

पण नंतर आलीच परत भाग होऊन आयुष्याचा

*

इतकी वर्षे चाललेय तिच्या सोबत

कधी कंटाळा दाखवला नाही

आता मात्र काय झालेय तिचे

मनातलं काही सांगत नाही

*

नसलं मनात तर येत नाही दोन दोन महिने

मी मात्र सैरभैर तिच्या न येण्याने

*

कशासाठी ही चिडचिड कोणालाच कळत नाही

कशासाठी ही कासावीशी माझे मला वळत नाही

*

कधीमधी येत राहून ती मला चिडवणार

तिच्याच मनासारखे वागून ती मला ताटकळवणार

*

ती यायला लागली तेव्हा सोहळा केला होता आईने

तिच्या जाण्याची हुरहुर मात्र सोसतेय मी एकटीने

*

एक वेळ अशी येईल तिचे येणे बंद होईल

एक कप्पा आयुष्यातला कायमचा दूर होईल

*

होईन मी मुक्त बांधिलकीतून म्हणून वाजवावीशी वाटतेय टाळी

तुमचीही परिस्थिती नाही माझ्यापेक्षा वेगळी

*

वाचताना गालात हसाल

ही तर माझीच कहाणी म्हणाल 

*

येते मनाने जाते मनाने ही

बंधन कसले पाठवत नाही

*

येताना तारुण्यपण देते

जाताना म्हातारपणाची चाहूल देते 

*

अशी ही एकमेव मैत्रीण खाशी,

जरी असल्या आपल्या बारा राशी !!

कवी : अज्ञात. 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ – एक करायला गेलं तर… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ – एक करायला गेलं तर… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एक करायला गेलं तर,

एक राहूनच जातं.

 

सकाळी फिरायला गेलं तर,

साखरझोपेचं सुख राहून जातं .

 

शांततेने पेपर वाचू लागलो तर,

पूजा, प्राणायाम राहून जातो . 

 

दोन्ही साधायचा प्रयत्न केला तर,

नाश्ताच राहून जातो .

 

धावपळ करत सगळं केले तर,

आनंद हरवतो .

 

डायट फूड मिळमिळीत लागतं,

चमचमीत खाल्लं तर वजन वाढतं .

 

एक करायला गेलं तर,

एक राहूनच जातं.

 

नोकरीसाठी कुटुंब सोडायचं नाही,

पण कुटुंबासाठी नोकरी हवी.

दोन्ही सोडायच्या कल्पनेने

भिती वाटायला लागते .

 

लोकांचा विचार करता करता,

मन दुखावतं,

मनासारखं वागायला गेलो तर,

लोक दुखावतात .

 

एक करायला गेलं की,

एक राहूनच जात

 

घाईगडबडीने निघालो तर,

सामान विसरते,

सावकाश गेलो तर,

उशीर होण्याची भीती वाटते.

 

सुखात असलो की,

दुःख संपतं, आणि

दुःखात असलो की,

सुख जवळ फिरकत नाही.

 

एक करायला गेलं की,

एक राहूनच जातं .

 

पण या काहीतरी राहून जाण्यातच,

खरा जीवनातील आनंद आहे.

काहीतरी मिळाल्याचे समाधान आहे.

 

कारण बाळ जन्मल्याबरोबर,

त्याच्या रडण्यात आनंद आहे,

आणि अचानक दुरावलेली व्यक्ती,

कित्येक वर्षांनी भेटल्यावर,

आनंदातही रडणे आहे.

 

कधी रडण्यातही आनंद मिळतो,

तर कधी आनंदातही रडता येतं.

 

ज्याला या कुठल्याच गोष्टीचे

काही विशेष वाटत नाही

तो माणूस नाही,

तर यंत्रच आहे.

 

म्हणून आनंदाने

भरभरून जगून घेऊ या .

 

आजचा दिवस आहे

तो आपला आहे .

कवी : अज्ञात

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले  ☆ “गीती गाईन ज्ञानदेव…” कवयित्री – सुश्री लीना दामले ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “गीती गाईन ज्ञानदेव…” कवयित्री – सुश्री लीना दामले ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

आनंद सागरी विहरीन। मुक्त होईन भवचक्रातून।

निरंजन समाधी घेऊन।। सांगती ज्ञानदेव ।।१।।

*

अवघा जनसागर निघाला। संतांसवे आळंदीला।

निरोप द्याया ज्ञानराजाला। बुडाला दुःखार्णवे ।।२।।

*

नामदेव व्याकुळ झाले। दुःखाने जणू पिसे लागले।

कसा राहू ज्ञानदेवा विणे। सांग बापा ।।३।। 

*

ज्ञानदेव समजावीती। नामदेवा वृथा शोक करिसी।

जडदेहाची नको आसक्ती। शरीर हे नश्वर ।।४।।

*

जे जे जगी उपजते। ते ते नाश पावते।

हे तो तुजसी ठावेच असे। नामदेवा ।।५।।

*

कसे समजावू तुजसी। ज्ञानवंत भक्त म्हणविसी।

हा शोक ना शोभे तुजसी। नामदेवा ।।६।।

*

निवृत्ती अंतरबाह्य शांत। सोपाना लीन ब्रह्मस्वरूपात।

मुक्ताई शांत शांत। वियोगाच्या कल्पनेत ।।७।।

*

कार्तिक वद्य त्रयोदशी। शुभ दिन शुभ वेळी।

निघती ज्ञानदेव समाधीस्थळी । सिद्धेश्वरा पास ।।८।।

*

समाधी स्थळ स्वच्छ केले। गोमयाने सारविले।

अंथरीली बेल,तुळशी अन फुले। आसनाभोवती ।।९।।

*

इंद्रायणीत स्नान केले। सुवासिनींनी ओवाळीले।

चंदन उटी लावली नामदेवे। ज्ञानदेवांसी ।।१०।।

*

शांत संयत चाल। कंठी तुळशीची माळ।

चालले ज्ञानदेव। वैकुंठासी ।।११।।

*

सद्गुरू निवृत्तीनाथांसी वंदिले। शुभ आशिष घेतले।

नतमस्तक ज्ञानदेव। गुरू पुढती ।।१२।।

*

नामदेव, निवृत्तीनाथ। घेऊन चालिले ज्ञानदेवास।

बसविले आसनी विवरात। भरल्या कंठी ।।१३।।

*

नंदादीप चेतविले। रत्नदीप प्रकाशले।

अवघी समाधी उजळे। स्वर्गीय प्रकाशात ।।१४।।

*

पद्मासनी बसून। भावार्थ दीपिका समोर ठेवून।

मुखावरी दिव्य हास्य लेवून। घेतले नेत्र मिटून ।।१५।।

*

समाधिस्त ज्ञानेश्वर होती। थरथरत्या हाती जड शिळा बसवती।

नामदेव समाधीवरती। जड अंतःकरणे ।।१६।।

*

ज्ञानसूर्य बुडाला। घन अंधकार पसरला।

शोक अपार दाटला। वैष्णवांच्या मनी ।।१७।।

*

ज्ञानियांचा राजा गेला। नामदेव दुःखार्णवी बुडाला।

निवृत्तीनाथ समजावीती त्यांना। अपार स्नेहे ।।१८।।

*

कुठे न गेले ज्ञानदेव। इथेच आहे ज्ञानदेव।

चराचरी भरले ज्ञानदेव। संजीवन समाधी घेऊन ।।१९।।

*

सगुण समाधी घेऊन। अमर झाले ज्ञानदेव।

पूर्णानंदी राहे सदैव। सिद्धेश्वरा पास ।।२०। 

कवयित्री : सुश्री लीना दामले (खगोलीना)

प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फुललेल्या अबोलीस पाहून… — कवी : श्री चंद्रशेखर देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ फुललेल्या अबोलीस पाहून… — कवी : श्री चंद्रशेखर देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

फुललेल्या अबोलीचे

लाख फुलांनी असे बोलणे !

 

शब्दावाचून अंगोअंगी

असे जरासे धुंद बहरणे !

 

हिरव्या हिरव्या पानांमधुनी

फिकट केशरी रंग सांडणे !

 

नको कोणते अजून अलंकार,

असेच जरासे नटणे अन् मुरडणे!

 

द्यावे वाटे हृदयीचे असे काही

जरी नसते तुझे काही मागणे !

 

होते पाहून तुजला कृतार्थ

आमचे इथले येणे !

 

कवी : श्री चंद्रशेखर देशपांडे

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘पहा देव कसे काम करतो…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘पहा देव कसे काम करतो…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

गोव्याला गेली होती आणि घरात मी एकटाच होतो. माझ्या कारचा चालकही एव्हाना त्याच्या घरी रवाना झालेला होता. बाहेर श्रावणसरी बरसायला सुरुवात झालेली होती.

औषधाचे दुकान फारसे दूर नव्हते. मला पायी सुद्धा जात आले असते. पण पावसामुळे रिक्षाने जाणेच उचित आहे असा विचार करून औषध घेण्यासाठी मी घरातून बाहेर पडलो. घराशेजारीच असलेल्या राम मंदिराचे कांही बांधकाम सुरु होते. मंदिरातील मूर्तीसमोर हात जोडून एक रिक्षेवाला देवाची प्रार्थना करीत होता. 

मी त्या रिक्षेवाल्याला विचारलं, “काय रे, खाली आहे कां तुझी रिक्षा?” तो “हो” म्हणाला. मग मी त्याला विचारलं मला नेशील कां सवारी म्हणून?”

तो हो म्हणाला तसा मी त्याच्या रिक्षात बसलो. तो रिक्षावाला बराच आजारी असावा असं माझ्या लक्षात आलं. त्याच्या डोळ्यांमधून पाणी येत होतं. मग माझ्या कडून राहवलं नाही. मी त्याला विचारलं, “काय रे बाबा, काय होतंय तुला? आणि तू रडतोयस कशाला? तुझी तब्येतही ठीक दिसत नाहीये?”

ह्यावर तो उत्तरला, “सतत सुरु असलेल्या ह्या पावसाने मागील तीन दिवसांपासून भाडं मिळालेलं नाहीय, त्यामुळे रोजगार नाही, म्हणून पोटात तीन दिवसांपासून अन्नाचा कणही गेलेला नाहीय. आज तर अंगही दुखतंय. आताच देवाला प्रार्थना करीत होतो की देवा, आज तरी मला जेवण मिळू दे, आज तरी मला एखादी सवारी मिळू दे.” 

कांहीही न बोलता मी रिक्षा थांबवला आणि समोरच्या मेडिकल शॉपमध्ये गेलो. तिथे माझ्या मनात विचार आला की देवानेच तर मला ह्या रिक्षेवाल्याच्या मदतीला मुद्दामहून पाठविलं नसेल? कारण असं बघा की मला सुरु झालेला हा ऍलर्जीचा त्रास जर अर्धा तास आधी सुरु झाला असता तर मी माझ्या ड्रायव्हरकडून मला हवी असलेली औषधे आणवून घेतली असती. मला बाहेर पडण्याची जरुरी भासली नसती, आणि हा पाऊस नसता तर मग मी रिक्षेत सुद्धा कशाला बसलो असतो? 

मनातल्या मनातच माझ्या त्या मनातल्या देवाला मी विचारलं, “देवा, मला सांगा, तुम्ही त्या रिक्षेवाल्याच्याच मदतीसाठी माझी योजना केली आहे ना?” मला मनातल्या मनातच उत्तर मिळालं, ‘हो.’ 

देवाचे आभार मानत मी माझ्या औषधांसोबतच त्या रिक्षेवाल्यासाठीही औषधं विकत घेतली. जवळच्याच हॉटेलातून छोले पुऱ्या पॅक करून घेतल्या आणि रिक्षात येऊन बसलो. 

ज्या मंदिरापासून मी रिक्षा केला होता त्याच मंदिरापाशी परतल्यानंतर मी रिक्षेवाल्याला रिक्षा थांबवायला सांगितली, त्याच्या हाती रिक्षेचं भाडं म्हणून ३० रुपये ठेवले, गरम गरम छोले-पुरीचा पूड आणि त्याच्यासाठी घेतलेली औषधे त्याच्या हाती ठेवत त्याला म्हटलं, “हे बघ, छोले-पूरी खाणं झाल्यानंतर लगेच ह्या दोन गोळ्या घेऊन घे आणि उरलेल्या दोन गोळ्या सकाळच्या नाश्त्यानंतर घे आणि त्यानंतर मला येऊन तुझी तब्येत दाखवून दे.”

रिक्षेवाल्याचा डोळ्यांना पुन्हा पाणी आलं. रडत रडतच तो बोलला, “साहेबजी, देवाला तर मी केवळ दोन घास पोटांत पडू दे म्हणून प्रार्थना केली होती, पण त्याने तर माझ्यासाठी छोले-पुरी पाठवली. कित्येक महिन्यापासून आपण छोले-पुरी खावी अशी इच्छा मनांत होती, आज देवाने माझी ती इच्छा पूर्ण केली. मंदिराजवळ राहणाऱ्या त्याच्या भक्ताची त्याने यासाठी योजना केली आणि त्याच्याकडून हे कार्य करवून घेतले अशी माझी समजूत आहे.” तो आणखी बरंच कांही बोलत होता, भरभरून. पण माझं त्याकडे लक्षच नव्हतं.

घरी आल्यानंतर माझ्या मनांत आलं, ‘त्या हॉटेलमध्ये खाण्याचे बरेच पदार्थ होते, रिक्षेवाल्यासाठी मी कांहीही घेऊ शकत होतो, सामोसे, भाजी किंवा जेवणाची थाळी, कांहीही. पण मी नेमकं छोले पुरीच कां घ्यावी? रिक्षेवाला म्हणाला ते खरंच तसं आहेकां? देवानंच तर मला आपल्या भक्ताच्या मदतीसाठी पाठवलं नसेल? माझं ऍसिडिटी वाढणं, त्यावेळेस ड्रायव्हर घरी नसणं, नेमका त्याच वेळेस पाऊस पडणं  आणि मी रिक्षा करणं ही, तो रिक्षेवाला म्हणतो त्या प्रमाणे दैवी योजना तर नसेल ना?’  

आपण जेव्हा योग्य वेळी कुणाच्या साहाय्यासाठी धावून जातो तेव्हा त्याचा अर्थ इतकाच की आपण ज्याला मदत करण्यास उद्युक्त होतो त्याची प्रार्थना देवानं ऐकली आणि आपल्याला त्याचा (देवाचा) प्रतिनिधी म्हणून किंवा देवदूत म्हणून संबंधित व्यक्तीकडे पाठवलं. म्हणून आपल्या हातून घडलेलं चांगलं कार्य हे देवाने आपल्याकडून करवून घेतलं असं समजावं म्हणजे सत्कृत्याचा वृथा अभिमान होत नाही.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पन्नाशीच्या पुढे मानसिक गोंधळ का ?? – लेखक : अर्नाल्डो लिक्टेंस्टीन, फिजिशियन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

पन्नाशीच्या पुढे मानसिक गोंधळ का ?? – लेखक : अर्नाल्डो लिक्टेंस्टीन, फिजिशियन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

पन्नाशीच्या पुढे मानसिक गोंधळ का ?? 

याची कारणे : वयाच्या तिसऱ्या  टप्प्यातील मानसिक गोंधळ …… 

जेव्हा जेव्हा मी डॉक्टरीच्या चौथ्या वर्षामध्ये विद्यार्थ्यांना क्लिनिकल औषध हा विषय शिकवितो, तेव्हा मी पुढील प्रश्न विचारतो:…

वृद्धांमध्ये मानसिक गोंधळाची कारणे कोणती आहेत?

— काही सुचवतात: “डोक्यात ट्यूमर”.  मी उत्तर देतो: नाही !

— इतर सूचित करतात: “अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे”.  मी पुन्हा उत्तर देतो नाही !

त्यांच्या प्रत्युत्तराच्या प्रत्येक नकाराने, त्यांच्या प्रतिक्रिया कोरड्या पडतात.

जेव्हा मी तीन सर्वात सामान्य कारणे सूचीबद्ध करतो तेव्हा ते अधिक मोकळे होतात:….   

– अनियंत्रित मधुमेह

 – मूत्रमार्गात संसर्ग;

 – निर्जलीकरण

हा विनोद वाटेल, परंतु तसे नाही.  ५० वर्षांपेक्षा जास्त लोकांना सतत तहान जाणवणे थांबते आणि परिणामी द्रव पिणे थांबते. जेव्हा त्यांना आसपास द्रव पिण्याची आठवण करून देण्यासाठी कोणीही नसते तेव्हा ते त्वरीत डिहायड्रेट होतात.  निर्जलीकरण तीव्र होते आणि संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो.  यामुळे अचानक मानसिक गोंधळ, रक्तदाब कमी होणे, हृदयाची धडधड वाढणे, एनजाइना (छातीत दुखणे), कोमा आणि अगदी मृत्यूसुद्धा– यासारख्या घटना घडतात. 

आपल्या शरीरात आपल्याकडे पाण्याचे प्रमाण ५0% पेक्षा जास्त असते. तेव्हा द्रव पिण्यास विसरण्याची ही सवय ५0 व्या वर्षी सुरू होते.  ५0 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांकडे पाण्याचा साठा कमी असतो.  हा नैसर्गिक वृद्ध होण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे.

परंतु यामध्ये आणखी गुंतागुंत आहे.  जरी ते डिहायड्रेटेड असतील, तरी त्यांना पाणी प्यावं असं वाटत नाही, कारण त्यांची अंतर्गत नियंत्रित यंत्रणा फार चांगली काम करत नाही.

निष्कर्ष:

५0 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक सहजपणे डिहायड्रेट होतात, केवळ त्यांच्यात पाणीपुरवठा होत नाही,  तर त्यांना शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.

५0 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक निरोगी दिसत असले तरी, प्रतिक्रिया आणि रासायनिक कार्यांची कमी झालेल्या कार्यक्षमतेचे कार्य त्यांच्या संपूर्ण शरीरास हानी पोहचवत असते.

तर येथे दोन सतर्कता घ्यायच्या आहेतः

१) द्रव्य पिण्याची सवय लावा.  पातळ पदार्थांमध्ये पाणी, रस, चहा, नारळपाणी, दूध, सूप आणि रसाळ फळे, जसे टरबूज, खरबूज, पीच आणि अननस यांचा समावेश आहे;  संत्रा आणि टेंजरिन देखील कार्य करतात.  महत्वाची गोष्ट अशी आहे की, दर दोन तासांनी आपण थोडासा द्रवपदार्थ पिणे आवश्यक आहे.  हे लक्षात ठेवा !

२) कुटुंबातील सदस्यांना इशारा:::  पन्नाशीच्या पुढील लोकांना सतत द्रवपदार्थ द्या. त्याच वेळी, त्यांचे निरीक्षण करा. .. जर आपल्या हे लक्षात आले की ते पातळ पदार्थ नाकारत आहेत, एका दिवसानंतर दुसऱ्या दिवशीही, तर ते चिडचिडे होतील, श्वास घ्यायला त्रास होणे, शांतता व सातत्य (लक्ष)कमी होणे, हे निर्जलीकरणाची जवळजवळ निश्चितच वारंवार येणारी लक्षणे आहेत.

जर आपल्याला हे आवडले असेल तर ते सगळ्यांपर्यंत पसरविण्यास विसरू नका.  आपल्या मित्रांना आणि त्यांच्या कुटूंबाला, त्यांच्यासह स्वत:साठी जाणून घेणे आणि आपल्याला निरोगी आणि आनंदी होण्यास मदत करणे आवश्यक आहे. पन्नाशीच्या पुढील लोकांसाठी हे शेअर करणे चांगले आहे !

लेखक : अर्नाल्डो लिक्टेंस्टीन, फिजिशियन.

(अर्नाल्डो लिक्टेंस्टीन (46), वैद्य, हॉस्पिटल दास क्लिनिकस येथे एक सामान्य चिकित्सक आणि साओ पाउलो (यूएसपी) विद्यापीठातील औषध संकाय येथे क्लिनिकल मेडिसिन विभागातील सहयोगी प्राध्यापक आहेत.) 

संग्राहिका  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘नैसर्गिक हायलाईट्स…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘नैसर्गिक हायलाईट्स…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

केसांच्या काळ्याभोर लाटांमध्ये अचानक चांदीच्या तारा दिसायला लागतात आणि हळुच लक्षात येते…..

देवाने काय मस्त सोय केली आहे नैसर्गिक हायलाईट्सची  

कालपरवापर्यंत ताई म्हणणारे अचानक काकू मावशी वगैरे म्हणायला लागतात आणि हळूच लक्षात येते…..

किती छान ..  आता आपण अल्लड न रहाता प्रगल्भ झालोय . 

टी व्ही वर छान कार्यक्रम बघत निवांत भाजी निवडणे चालू असते. अचानक कशासाठी तरी उठावे लागते आणि बारीकशी कळ गुडघ्यात येते आणि हळूच लक्षात येते….

की हाय हील्स ऐवजी आज वाॅकिंग शूज घालावेत.  

टीव्ही वर मॅचमध्ये भारत जिंकतो आणि मुलांबरोबर जल्लोष करताना बारीकसा दम लागतो आणि हळूच लक्षात येते…..

आज जिमला जायला विसरले.  

बसमध्ये प्रवास करताना कुणी तरी पटकन उठून जागा देते आणि ‘ बसा मावशी ‘ म्हणते आणि हळुच लक्षात येते….

संस्कार शिकवणाऱ्या  माझ्यासारख्या आयाही आहेत तर.  

शाळेत घ्यायला गेले की अनेक छोटी कोकरे पाहून मन मस्त प्रफुल्लीत झालेले असते. आपली उंची क्राॅस करून गेलेले आपले कोकरू पुढ्यात उभे राहून म्हणते ‘ लक्ष कुठे आहे तुझे? ‘  आणि हळूच लक्षात येते….

कोकराला “हाय फाइव” द्यायची वेळ झाली आहे.   

एखाद्या काॅलेजजवळ पाय आपोआप रेंगाळतात. त्या तरूणाईचा उत्साह आणि मस्ती बघून मन पण उल्हसित होते..  पण हळूच लक्षात येते….

की आपण केलेली धमाल आपली मुलंही करू शकतात.   

देवाजवळ सांजवात लावताना, स्तोत्र म्हणताना आपोआप डोळे पाणावतात आणि हळूच लक्षात येते….

देव किती चांगला आहे व किती सुंदर त्याचे चमत्कार.  

कैरीचे लोणचे घालताना सगळे बाजूला ठेवून कैरीच्या करकरीत फोडी मीठाबरोबर पटकन तोंडात जातात. एखाद्या दातातून निघालेली कळ ‘ आई गं….’  आणि हळूच लक्षात येते….

लोणच्यात मीठ जरा जास्त झालंय या खेपेस.  

बाहेर पाऊस चालू असतो .. कुरकुरीत कांदा भजी गरम गरम सगळ्यांना खाऊ घालावी. स्वतः घेताना मात्र वाढलेले वजन हळूच लक्षात आणून देते..  नको इतकी, कारण….

पुढच्याच महिन्यात असलेल्या वर्गाच्या ३० वर्षाच्या रीयूनियनसाठी घेतलेल्या गाऊनमध्ये फिट व्हायचंय.  

काॅफीचा मग मात्र सांगत असतो..  कितीही वय झाले तरी तुझी माझी सोबत मात्र कायमकरता आहे….

घे बिनधास्त….

आणि मी गाणे गुणगुणायला लागते ….

दिल तो बच्चा है जी .. .. 

लेखक : अज्ञात

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दुसरी बाजू… — लेखिका : स्मिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ दुसरी बाजू… — लेखिका : स्मिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

( १ )

आदित्य…आमच्या Society मधला एक उमदा, हरहुन्नरी तरुण…घरच्या उत्तम संस्कारात वाढलेला….

सहा महिन्यापासून अचानक केस वाढवायला लागला.. साहजिकच  लोकांच्या चर्चेला विषय….

हल्लीं मुलेही मुलींसरखे केस वाढवतात… छान Bow बांधतात… नवी Fashion आहे… असे काहीबाही कानावर पडत असेच..

परवा  अगदी रात्री उशिरा  भेटला…

“Hello काकू, कशी आहेस ?

” मी ठीक.. पण तुला मात्र पटकन ओळखले नाही. .. नव्या रुपात..”

” हो.. सध्या एका संस्थेशी जोडला गेलो आहे… केस दर सहा महिन्यांनी कॅन्सर रुग्णांना दान करतो.. ..अजून खूप कमावता नसल्याने आर्थिक लगेच शक्य नाही….. तर जे शक्य आहे तेवढे तरी !!

 

( २ )

परवा मी बस मधून गावात निघाले होते…

बसला तुफान गर्दी होती… अगदीं खचाखच भरलेल्या बसमध्ये नीट उभेही राहता येत नव्हते…

अशातच एक आजोबा S.N.D.T. ला चढले… साहजिकच ते उभेच होते….दहाच मिनिटे झाली आणि एक बाई उठल्या… एका College युवकापाशी गेल्या आणि  जोरात भांडायला लागल्या..

“काय रे, काही समजते का…हे आजोबा उभे आहेत आणि तू आरामात बसला आहेस?… कॉलेज, घरात हेच शिकवतात का तुला ? तुला नाही का उभे राहता येत? … झालं…सगळी बस त्याच्यावर तुटून पडली…बसच्या वेगापेक्षा लोकांच्या फटकाऱ्याचा वेग खूप जास्त होता!

तो बिचारा निमूटपणे उभा राहिला 

थोड्या वेळाने त्याचा स्टॉप आला व जाता जाता त्या बाईंना म्हणाला, ” काकू , पंधरा दिवसांपूर्वी माझे Appendix चे Operation झालेय… आज माझी महत्वाची परिक्षा होती की जी बुडली असती तर माझे पूर्ण Semester वाया गेले असते… सहज उभारणे शक्य नव्हते म्हणुन बसून होतो!”

एवढे बोलून झरकन उतरुन गेला….

 

( ३ )

तिच्या आईच्या मते ही पिढीच काहीशी अलिप्त… स्वतः मध्येच गुंग, थोडीशी मतलबी अशीच…

तिचा नवीन नोकरीचा पाहिला पगार हातात आला… आज ती घरी आली ती थिरकात्या पायानेच !!

” मावशी, रविवारी सगळया कामावर सुट्टी सांगा.”

” का ग बयो? काय आहे रविवारी?”

” अहो माझा पाहिला पगार झालाय…. तुम्ही , आई आणि मी मिळून मस्त आख्खा दिवसभर   लोणावळा फिरून , धमाल करून येऊ यात माझ्या या यशात तुमच्या दोघींचीही खूप मोठा वाटा आहे!!”

 

( ४ )

तो पक्का नास्तिक… त्यामूळेच ‘ देवपूजेशी ‘ त्याचा दुरान्वयेही संबध नाही….

ती ३०…३२ वर्षांची तरुण विधवा…एक ३-४ वर्षांचे छोटे बाळ पदरात… रोज एका ठराविक ठिकाणी ‘फुलंविक्रिचा’  धंदा करत असे..

रोज बाजारातून फुलांची खरेदी करणे, आणलेल्या वेगवेगळ्या फुलांचे  ढीग, फुलांचे हार, गजरे करणे. सोबतच बाळालाही सांभाळणे या सर्वात गुंतलेली असे….

तिचा रोजचा  ‘ One Woman Show ‘ चालू असे…..संध्याकाळी गिऱ्हाईक येत असत.. पण हिची जरा सुकलेली, मरगळलेली, तजेला नसलेली अशी फुले, हार बघून दुसरीकडे जात असत… हिला बरेचदा गिऱ्हाईकांकडून  फक्त सहानभूती, चुचकारे मिळत असे… शेवटी तिचा  फुलविक्रीचा धंदा हा तिच्या रोजी-रोटीचा प्रश्न होता!

त्या दिवशी तो तिच्या स्टॉलवर आला… उगीचच थोडी फुले विकत घेतली…. जरासा रेंगाळला आणि पिशवीतून एक स्प्रे बॉटल काढून तिला देत म्हणाला ,”मावशी, यातील थोडे थोडे पाणी  दर दोन तासांनी फुलांवर, हारांवर मारत जा म्हणजे फुले छान टवटवीत राहतील…. सुकणार नाहीत !!”

आता तिला विक्रीसाठी वेळ अपुरा पडतो…

लेखिका :  स्मिता कुलकर्णी, पुणे.

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘ती’ आणि ‘ही’…  ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘ती’ आणि ‘ही’… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

मालिकेतील ‘ ती ‘ आणि जीवनातील ‘ ही ‘ यांचा काही मेळ बसत नाही 

 

मालिकेतील ‘ती’ नीटनेटकी राहते. 

स्वयंपाक घरात जरीच्या साड्या घालते. 

सण नसले तरी दागिने चढवते….. 

जीवनातील ‘ही’ केसाचा अंबाडा बांधते. 

स्वयंपाक घरात गाऊनमध्ये वावरते. 

सणालाही दागिने घालण्यास कानाडोळा करते.

मालिकेतील’ ती’ जीवनातील ‘ही’

ह्यांचा काही मेळ बसत नाही ……. 

 

मालिकेतील’ ती’ला नवरा  प्रेमळ मिळतो.

वाढदिवशी स्वयंपाकघरात येऊन आलिंगन देतो. 

संध्याकाळी हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेट पण करतो….. 

जीवनातील’ ही’ला नवरा नवर्‍यासारखा मिळतो. 

वाढदिवसाचे हिला लक्षात आणून द्यावे लागते .

संध्याकाळी हिला सर्वांच्या आवडीचा मेनू बनवावा लागतो. 

मालिकेतील’ ती’ जीवनातील ‘ही’ ह्यांचा काही मेळ बसत नाही……..  

 

मालिकेतील ‘ती’ला सणाचे कोडकौतूक असतं.

सणाला ‘ती’ न दमता सर्व काही व्यवस्थित दिसतं. 

प्रत्येक सणाला संपूर्ण कुटुंब कार्यरत असतं….. 

जीवनातील ‘ही’ला सण आला की दमायला होतं. 

एक एक वस्तू  जोडतांना नाकीनऊ येतं. 

‘कोणी सण तयार केले ‘?ह्या विचाराने मन दमतं

मालिकेतील ‘ती’ जीवनातील ‘ही’ हयांचा काही मेळ बसत नाही…….  

 

मालिकेतील ‘ती’ भाम्रक जीवन दाखवत राहते. 

जीवनातील ‘ही’ त्यात स्वतःला चाचपडत राहते. 

मालिकेतील ‘ती’ काही न करता जिंकत राहते.

जीवनातील ‘ही’ सर्व करुन हारत राहते. 

मालिकेतील’ ती’ जीवनातील ‘ही’ ह्यांचा काही मेळ बसत नाही……..  

ह्यांचा काही मेळ बसत नाही…….. 

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares