ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १९ जानेवारी २०२२ – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी)

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? संपादकीय १९ जानेवारी २०२२  ?

पत्रकार डॉ. अरुण टीकेकर यांचा जन्म १ फेब्रुवारी ४४ चा. पत्रकार म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली. त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाचा १५० वर्षाचा इतिहास लिहिला.  त्या सुमाराला ते टाईम्स ऑफ इंडियाचे उपसंपादकही होते. नंतर लोकसत्ता दैनिकाचे ते संपादक झाले.

अरुण टीकेकरांचे आजोबा केसरीत धांनुर्धारी या टोपणनावाने लिहीत. वडील दूत या नावाने लिहीत, तर काका मुसाफीर या टोपणा नावाने लिहीत. अरुण टीकेकर यांनाही यामुळे टोपणनावात रस वाटला असावा. दस्तुरखुद्द, टिचकी बहाददार अशा अनेक नावाने त्यांनी स्तंभलेखन केले आहे. टीकेकर पुढे ‘सकाळ ग्रुप’ या वृत्तपत्राचे संपादकीय संचालक  झाले. त्यांनी अनेक सदर लेखक घडवले.

टीकेकरांना इंगलीश साहित्याचे अभ्यासक, अध्यापक, १९ व्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणून ते ओळखले  जात होते. ते पीएच डी. होते.

लोकसत्तेसाठी तारतम्य हा स्तंभलेख लिहिल्यामुळे ते तारतम्यकार म्हणूनहा प्रसिद्ध आहेत. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे ते ६ वर्षं अध्यक्ष होते. पत्रकारितेबरोबर त्यांनी काही व्यक्तिचित्रेही लिहिली आहेत. मुंबई वुद्यापीठाचा इतिहासही लेखणीबद्ध केलाय.

अरुण टीकेकर यांच्या साहित्यापैकी काही निवडक साहित्य –

१.    अक्षरनिष्ठांची मांदियाळी – ग्रंथशोध आणि वाचन बोध २. इति-आदि ३. ऐसा ज्ञानसागरू – बखर मुंबई विद्यापीठाची ४ ओच्या-वेच्या (प्रवास वर्णन) ५, कालचक्र (सदर लेख संग्रह ) , ६. काल मीमांसा, ७. कालांतर ( लेख संग्रह ) ८.फास्ट फॉरवर्ड ( शरद पवारांच्या मुलाखातींचे आणि भाषणांचे संपादन) ९.रानडे प्रबोधन पुरुष १०. स्थळाकाळ (सदर लेखन)

शरद पवार यांच्या मूळ लेखनाचा अनुवाद आणि संपादन – ‘स्पर्धा काळाशी’ या नावाने      

पुरस्कार – एकमत

अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार

गौरव – जीवन गौरव  पुरस्कार समितीचे अध्यक्ष

दिल्ली येथील लायब्ररी ऑफ कॉंग्रेसमधील माराठी वङ्मय विभागाचे संपादक अरुण टीकेकर यांच्या नावाने ‘मुंबईच्या एशियाटिक सोसायटीने’ अरुण टीकेकर प्रगत अभ्यास केंद्र  स्थापन केले आहे. हे केंद्र २०१७ पासून कार्यरत आहे. सांस्कृतिक विषयात, संशोधन क्षेत्रात काम करणारे अभ्यासक वा विद्यार्थी यांना दर वर्षी १ फेब्रुवारीला डॉ. टीकेकर अभ्यासवृत्ती दिली जाते. .

☆☆☆☆☆

मा. दा. देवकाते

मारुती  दाजी देवकाते हे मराठी लेखक, पटकथाकार, गीतकार, मराठी चित्रपट सृष्टीतील संवाद लेखक होते. ४० वर्षात सुमारे १५० चित्रपटांच्या कथा, पटकथा त्यांनी लिहिल्या. काही चित्रपटांची गीते लिहीली, तर काही स्वतंत्र गीते लिहिली. त्यांचा जन्म १८जानेवारी १९४१. .

मा. दा. देवकाते यांनी संवाद लिहिलेले काही चित्रपट –

१.डाळिंबी २. थापाड्या ३.पटलं तर व्हाय म्हणा ४. पांडोबा पोरगी फसली  ५. भटकभवानी ६. भन्नाट भानू  ७. भामटा ८. रंगू बाजाराला जाते ९. हळद रुसली कुंकू हसलं. भगवद्गीता आणि महाभारत यांचे त्यांनी अभंगात रूपांतर केले. अभंग गीता  आणि अभंग महाभारत या नावाने त्या रचना प्रकाशित आहेत.

मा. दा. देवकाते यांची पुस्तके –

१.    गीत भीमाचे गाऊ. २. कळप मिळाला मेंढराला, ३. थपाड्या, ४. दामिनी, ५. दुभंग    

६. बळीचा बकरा ७. बुरखा ८ बुमरॅंग, ९. म. ज्योतिबा फुले १०. रॅगिंग, ११. रात्र पेटली अंधाराने .

यांनी रचलेली प्रसिद्ध गीते –

१, आली आली ही गोंधळाला…..आई   २. गणराजाला करू मुजरा ३ .तुझी साथ हवी रे राजा ४ पावना पुण्याचा आलाय गो ५. मला म्हणतात हो पुन्याची मैना ६. सांग माणसा सांग  ७.  सांग सजणा सांग मला ८. हे गणनायक सिद्धी विनायक ९. हे शिवशंकर गिरिजा तनया

इतर – अखिल भारतीय चित्रपट मंडळाचे १९७५ पासून ते सक्रीय सदस्य होते.

बारामती येथे भरलेल्या नवोदित मराठी साहित्य संमेलनात वसंत पवार नाट्यगृहाचे,

मा.दा. देवकाते साहित्य नागरी असे रूपांतर केले होते.

 

अरुण टीकेकर आणि मा. दा. देवकाते या दोन्ही प्रतिभावंतांचा आज स्मृतीदिन. त्या निमिताने दोन्ही व्यक्तिमत्वांना विनम्र प्रणाम

 

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हा-ड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १८ जानेवारी – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? १८ जानेवारी –  संपादकीय  ? 

बाळ सामंतांचा जन्म २७  मे १९२४ साली झाला.

यांनी प्रामुख्याने विनोदी लेखन केले.कन्नमवार मुख्यमंत्री असताना ते महाराष्ट्राचे जंनसंपर्क अधिकारी होते.

 बाळ सामंतांची काही प्रकाशित पुस्तके

१. करामत, २. खिरापत , ३. खुशमस्करी, ४. गोंधळ, ५. नवरा-बायको, ६. नवलाई, ७. पुंनर्जन्म एक शोध ८. प्रेमग्रंथ, ९.मराठी नाट्यसंगीत, १० मैफल, ११.शूरा मी वंदिले. १२. तो एक राजहंस (बालगंधर्वांच्या जीवनावर, १३. शापित यक्ष ( रिचर्ड बर्टनच्या जीवनावर) १४. न संपणार्‍या गोष्टी (स्तंभ लेखन लोकसत्ता, ), १५. हिटलर – एक महान शोकांतिका 

बाळ सामंतांना २००४ साली पद्मश्री पुरस्कार मिळाला.

आज त्यांचा स्मृतीदिन (१८ जानेवरी २००९) . त्या निमित्ताने त्यांना आदरांजली.

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १७ जानेवारी – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? १७ जानेवारी –  संपादकीय  ?

ज्योत्स्ना देवधर :

मागच्या पिढीतील ख्यातनाम लेखिका ज्योत्स्ना देवधर यांचा आज स्मृतीदिन.

त्यांनी हिंदी विषयात पुणे येथे एम.ए. व नंतर, वर्धा येथे साहित्य विशारद ही पदवी  संपादन केली. त्यांचे लेखन हिंदी व मराठी या दोन्ही भाषेत झाले आहे. 1960 मध्ये त्या आकाशवाणी पुणे येथे कार्यरत होत्या. तेव्हा ‘गृहिणी’ या मालिकेत  त्यांनी  ‘माजघरातल्या गप्पा’ चे लेखन केले  होते व ते खूप लोकप्रिय झाले होते.

त्यांच्या लेखनाची सुरूवात ‘अंतरा’ या हिंदी कथासंग्रहाने झाली. घरगंगेच्या काठी ही त्यांची पहिली मराठी कादंबरी. ती प्रचंड लोकप्रिय ठरली. नंतर या कथानकावर याच नावाने मराठी चित्रपटही निघाला होता. या व अन्य कादंब-या, कथा यांचा विचार करता असे दिसते की त्यांचे लेखन हे स्त्रीयांची  दुःखे, वेदना मांडणारे असे  वास्तववादी होते. त्यामुळे ते मनाला जाऊन भिडणारे होते.

त्यांच्या लेखनाचा यथोचित सन्मानही झाला आहे. घरगंगेच्या काठी या कादंबरीला ह. ना. आपटे पुरस्कार मिळाला आहे. रमाबाई हे चरित्र, कॅक्टस हा हिंदी कथासंग्रह व निर्णय हे पुरूष पात्र विरहीत नाटक यांनाही पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अ. भा. भाषा साहित्य संमेलनात त्यांना ‘भाषाभूषण’ म्हणून गौरविले आहे. कराड येथे झालेल्या प. महाराष्ट्र कथालेखिका संमेलनाचे अध्यक्षपद त्यानी भूषविले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शरदचंद्र चटर्जी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता.

कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, ललित असे विपुल लेखन त्यांनी केले आहे.त्यापैकी काही:

कादंबरी:  अट, उणे एक, एक अध्याय, एक श्वास आणखी, कडेलोट, कल्याणी, पडझड, घरगंगेच्या काठी, चूकामूक इ.

कथासंग्रह:  अंतरा(हिंदी), आंधळी कोशिंबीर, उध्वस्त, गजगे, गा-या गा-या भिंगो-या, दवबिंदू, झरोका, निवांत, विंझणवारा इ.

ललित: आठवणीचे चतकोर, चेहरा आणि चेहरे, मावळती, मूठभर माणुसकी इ.

चरित्र:  उत्तरयोगी (योगी अरविंद), रमाबाई(रानडे), याशिवाय नाटक, ऐतिहासिक कादंबरी, बालवाड्मय, पटकथा, संवाद लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या अनेक कथांचे कन्नड, तेलगू, तामिळ, मल्याळम, आसामी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.

अशा विविधांगी लेखन करणा-या बहुभाषिक लेखिका ज्योत्स्ना देवधर यांना नम्र अभिवादन!

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकीपीडिया

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १५ जानेवारी – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? १५ जानेवारी –  संपादकीय  ? 

नामदेव ढसाळ:

सुप्रसिद्ध कवी, लेखक, समाजसुधारक, दलित बौद्ध चळवळीचे आणि दलित पॅंथरचे नेते , महानगरीय जीवनावर लिहिणारे, लिहिताना बोली भाषा वापरणारे नामदेव ढसाळ यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील, खेड तालुक्यातील पूर या खेड्यात १५ फेब्रु. १९४९ झाला. घरची हलाखीची स्थिती होती म्हणून ते वडलांबरोबर मुंबईला आले. मुंबईतील ‘गोलपीठा’ या वेश्यावस्ती असलेल्या भागातील झोपडपट्टीत राहू लागले. पुढे मोठं झालावर त्यांचा जो  पहिला काव्यसंग्रह १९७२ मध्ये प्रसिद्ध झाला तो ‘गोलपीठा’ इथे घेतलेल्या अनुभवावरच.

मूर्ख म्हातार्‍याने डोंगर हालवला यातील कविता माओवादी विचारसरणीवर आधारलेल्या आहेत., तर प्रियदर्शनी यातील कविता इंदिरा गांधी यांच्यावर आहेत.

१९६० नंतरच्या महत्वाच्या कवींमध्ये नामदेव ढसाळ हे नाव घेतले जाते. त्यांच्या कविता लेखनाची एक वेगळीच शैली आहे. वेगळीच भाषा आहे. वेदना, विद्रोह, नकार हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव आहे.

नामदेव ढसाळांचे कविता संग्रह – १. ‘गोलपीठा’- १९७२  २. आमच्या इतिहासातील अपरिहार्य पात्र प्रियदर्शनी – १९७६ , ३. मूर्ख म्हातार्‍याने डोंगर हालवला- १९७५ , ४. मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे, ५. तुही इयत्ता कंची – १९८१ , ६. – खेळ – १९८३, ७. .या सत्तेत जीव रमत नाही. -१९९५, ८. गांडू बगीचा, ९. निर्वाणाअगोदरची पीडा

नामदेव ढसाळांचे कथा संग्रह – उचल (१९९०) , लगाम (१९९९)

नामदेव ढसाळांच्या कादंबर्‍या –निगेटीव्ह स्पेस, हाडकी हडवळ , उजेडाची काळी दुनिया

नामदेव ढसाळ नाटक – अंधार यात्रा –  

नामदेव ढसाळांचे चिंतांनापर लेखन – १ सर्व काही समष्टीसाठी, २. बुद्धधर्म : काही शेष प्रश्न ३. आंबेडकरी चळवळ ४. आंधळे शतक, ५. दलित पॅंथर- एक संघर्ष

पुरस्कार व सन्मान

१.गोलपीठा’ महाराष्ट्र राज्य पुरस्कार, १९७२ , २. सिव्हिएट लँड नेहरू पुरस्कार १९७५-१९७६ , ३.म. राज्य कवी केशवसुत पुरस्कार – १९८३ , ४. बहिणाबाई चौधरी पुरस्कार ५. पद्मश्री सहकार महर्षी विखे पाटील पुरस्कार ६. साहित्य अकादमी – स्वर्ण जयंती जीवन गौरव पुरस्कार- २००५  ७. गंगाधर गाडगीळ – २००६, ८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, ९. बुद्ध रोहिदास विचार गौरव पुरस्कार- इ. स. २००९ , १० . पद्मश्री पुरस्कार १९९९

नामदेव ढसाळांच्या नावे  ठेवलेले  पुरस्कार – २०१४ सालापासून  ‘नामदेव ढसाळ’ शब्द पुरस्कार दिला जातो. पहिला पुरस्कार हिन्दी कवी विष्णु खरे यांना मिळाला होता.

२.   नामदेव ढसाळ स्मृती समितीच्या वार्षिक कार्यक्रमात एका कवीला गौरवले जाते. २०१६ मधे पहिला पुरस्कार  लोकनाथ यशवंत यांना मिळाला होता.

स्मृती गौरव समीतीनामदेव ढसाळ यांच्या निधनानंतर त्यांची स्मृती तेवत ठेवण्याच्या  दृष्टीने वैभव छाया व समविचारी मित्रांनी नामदेव ढसाळ स्मृती गौरव समितीची स्थापना केली. या समीतीच्या वतीने दरवर्षी १५ जानेवारीला मुंबईला ‘सारे काही समष्टीसाठी’ हा अभिवादनात्मक कार्यक्रम साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या वेळी आंबेडकरांच्या, नामदेव ढसाळांच्या कवितांचे वाचन होते. त्यांच्या निवडक कवितांचे नाट्यरूपांतर, गाण्यांचे सादरीकरण, त्यांच्या जीवनावर आणि कवितांवर आधारित चित्र प्रदर्शन , चर्चासत्र, चित्रपट, लघुपट, स्क्रिनिंग अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

आज नामदेव ढसाळ यांचा स्मृतीदिन आहे. ( १५ जानेवारी २०१४)  आज मुंबईला ‘सारे काही समष्टीसाठी’ हा कार्यक्रम चालू असेल. या बहुरूपी विद्रोही कवीला हार्दिक श्रद्धांजली

☆☆☆☆☆

मंदाकिनी गोगटे:

मंदाकिनी गोगटे या लोकप्रिय कथा आणि कादंबरीकार . त्यांचा जन्म १६मे १९३६ ला मुंबई येथे झाला. त्यांनी नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातून पदवी घेतली. त्यांच्या लघुकथा प्रथम सत्यकथा मासिकातून प्रसिद्ध झाल्या. त्यांनी कादंबर्‍या, विनोदी कथा व बालसाहित्य लिहिले.

मंदाकिनी गोगटे यांच्या कादंबर्‍या –  दीपाली, गार्गी, भैरवी, मोठी वेगळी पाऊलवाट, रसिक बलमा, ह्या कातर उत्तर रात्री

मंदाकिनी गोगटे यांच्या कथा – गंध मातीचा, ढळता दिवस, प्रेमाच्या होड्या, बायकांचा गणित, मुंबईच्या रंगी-बेरंगी मुली , स्वप्नातली परी, सवत माझी लाडकी (या कथेवर चित्रपट झाला आहे.)

प्रवास वर्णन – आमची पण सिंदाबादची सफर , त्या फुलांच्या सुंदर देशात

मंदाकिनी गोगटे यांचे बालसाहित्य – छानदार कथा, भाग १ व२ , जांबो जांबो ग्वाना, प्रेमा पुरब ( क्रांतिकारी अन्नपूर्णा – चरित्र कथा, महम्मद घोरीची सांगली  (विज्ञान कथा) , चिमाजी आप्पांची मिशी ( निबंधा माला )

एकांकिका  – बोले तैसा चाले

इतर – बागेश्री दिवाळी अंकाचे संपादन, प्रकाशन त्यांनी कित्येक वर्षे केले आज त्यांचा स्मृतीदिन (१५ जानेवारी २०१० ). त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र आदरांजली

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १४ जानेवारी – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? १४ जानेवारी –  संपादकीय  ?

मालती माधव दांडेकर  :

“बालमनाला स्पर्श करणारी व त्यांच्या जीवनावर सुसंस्कार करणारी स्फूर्तीदायक रचना म्हणजे बालवाड्मय “

बाल साहित्याची अशी व्यापक व्याख्या करणा-या मालती माधव दांडेकर म्हणजेच मालतीबाई दांडेकर यांचा आज स्मृतीदिन.त्यांनी बालसाहित्य तर लिहिलेच पण विपुल प्रमाणात कथा, कादंबरी, निबंध, एकांकिका,नाटक असे विविध प्रकारचे लेखनही केले आहे.त्यांचे शालेय शिक्षण फक्त इंग्रजी चौथीपर्यंत झाले होते.पण तरूण वयातच त्यानी लेखनाला सुरुवात केली व पुढील सुमारे पन्नास  वर्षे चौफेर लेखन केले.त्यांच्या सुरूवातीच्या कथांमध्ये

आदर्शवाद दिसून येतो.पण नंतर या कथांमध्ये विविधता येत गेली.कादंबरी लेखनातही प्रामुख्याने प्रेमकथानक असले तरी स्त्रियांचे विविध प्रश्नही मांडले गेले आहेत.ऐतिहासिक विषयांवरही त्यांनी कादंबरी लेखन केले आहे.

त्यांच्या विपुल ग्रंथसंपदेपैकी काही पुस्तके अशी :

कथा,लोककथा इ.:

अंधारातील तारे,अंधारातील देव,कथा मालती,कथा सुवर्ण,प्रतिमा,मधुमालती,लोककथा कल्पलता,विसाव्याचे क्षण इत्यादी

कादंबरी :

अमर प्रीती,काटेरी मार्ग,कृष्णरजनी,तपश्चर्या,तेजस्विनी,दुभंगलेले जग,भिंगरी,मातृमंदिर,शुभमंगल इत्यादी

निबंध :

अमोल आहेर,अष्टपैलू प्रमोद,ओघळलेले मणी,तरूणींचे प्रश्न इ.

प्रबंध :

अष्टनायिका,बालसाहित्याची रूपरेषा,लोकसाहित्याचे लेणे

पुरूष पात्र विरहीत नाटक :

संगीत ज्योति, संगीत पर्वकाल ये नवा,संगीत संस्कार

एकांकिका:

कृत्तिका,जावई

बालसाहित्य:

अतिपूर्वेच्या परीकथा  नऊ भाग,किती झकास गोष्टी सहा भाग,देशविदेशिच्यि परीकथा दहा भाग,शततारका सात भाग,आसामच्या लोककथा,गुलाबकळी,चंद्रलेखा,मोहनमाळ इ.इ.

सहवास हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे.

त्यांच्या बालसाहित्यातील योगदानामुळेच 1978 साली जळगाव येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्याना मिळाले होते.

‘दगडातून देव’ या त्यांच्या पुस्तकाला राज्य व केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.

रूढ अर्थाने उच्च शिक्षित नसतानाही त्यांनी केलेली साहित्य निर्मिती पाहून त्यांच्या प्रतिभेसमोर नतमस्तक व्हावेसे वाटते.अभिवादन !

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकीपीडिया

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १२ जानेवारी – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? १२ जानेवारी –  संपादकीय  ? 

नरहर विष्णु उर्फ काकासाहेब गाडगीळ

नरहर विष्णु उर्फ काकासाहेब गाडगीळ यांचा जन्म 10 जानेवारी 1896चा. हे राजकरणी, अर्थ शास्त्रज्ञ होते, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकही होते. त्यांना एकूण आठ वेळा कारावास झाला. एकूण साडे पाच वर्षे त्यांना कारावासात राहावे लागले. त्यांचा जन्म राजस्थानात मल्हारगड इथे झाला. त्यांचे शिक्षण पुणे, बडोदा, मुंबई इथे झाले. बी.ए., एल.एल. बी. झाल्यानंतर काही दिवस त्यांनी पुण्यात वकिली केली. १९२० मधे त्यांनी राजकरणात पदार्पण केले.

त्यांनी आणि मामा देवगिरीकर यांनी मिळून हिंदीचा प्रचार करणार्याज ‘;महाराष्ट्र राष्ट्रभाषा’ या संस्थेची १९४५ साली पुण्यात स्थापना केली. भारत सरकारमधे १९५८ ते १९६२ ते पंजाबचे राज्यपाल होते. १९६४ पासून ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.१९५४ ते१९६५ ते राष्ट्रकुल परिषदेचे सदस्य होते. 

राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विधी, इतिहास यावरचे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहेच, पण त्यांनी ललित लेखनही केले आहे. त्यांची २५ पेक्षा जास्त पुस्तके आहेत. त्यांच्या काही पुस्तकांचे हिन्दी, इंग्रजी, कन्नड भाषेत अनुवाद झाले आहेत. ग्यानबाचे अर्थशास्त्र  हा आर्य चाणाक्याच्या ग्रंथाचा मराठी अनुवाद ४३ साली प्रसिद्ध झाला. अर्थशास्त्राची सुबोध मराठीत चर्चा करणारा हा ग्रंथ त्या काळी खूप गाजला.

त्यांचे काही प्रकाशित साहित्य 

१. अनगड मोती ( ललित लेख ) २. काही मोहरा काही मोती ( समकालीन राजकीय नेत्यांची शब्दचित्रे), ३. चॉकलेटची वडी  ४. पथिक (२भागातील आत्मचरित्र ) ५. माझा येळकोट (ललित लेख ) ६. मुठा ते मेन ( त्या काळाच्या जर्मनीचे दर्शन ) ७. लाल किल्ल्याच्या छायेत ८. साल गुदस्ता, ९. समग्र काका १०. महान व्यक्तींत्वे – १० भाग (बालवाङ्मय) 

गौरव

  1. पुण्यातील नदीवर न.वा. गाडगीळ नावाचा एक पूल आहे.
  2. . शनिवार वाड्याजवळ त्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे.
  3. .मुंबईत दादर पश्चीम इथे  काका गाडगीळ मार्ग आहे.
  4. सातारा इथे १९६२साली झालेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
  5. काका गाडगीळ प्रतिष्ठान आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी भाषणे आयोजित केली जातात. . एक मोफत वाचनालय चालवले जाते. काही पुरस्कारही दिले जातात. फ.मुं. शिंदे, श्रीपाल सबनीस यांना हे पुरस्कार मिळाले आहेत.

गाडगीळ यांच्यावरील पुस्तके 

  1. गाडगीळ यांच्या ८१ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने स्मरणिका प्रकाशित ही स्मरणिका ७७ साली प्रकाशित झाली असून निळूभाऊ लिमये, प्रसन्नकुमार अभ्यंकर , गो. कृ पटवर्धन  हे या स्मरणिकेचे संपदक होते.
  2. अरुण साधू आणि व्ही.एस. आपटे यांनी त्यांच्यावर चरित्रे लिहिली.
  3. त्यांच्या जन्मशताब्दीच्या  निमित्तानेही ग्रंथ प्रकाशित झाला. संपादक –रविंद्रकुमार काकासाहेब गाडगीळांवर पोष्टाचे तिकिटही प्रसारित झाले आहे.

☆☆☆☆☆

श्रीराम रावसाहेब गुंडेकर

श्रीराम रावसाहेब गुंडेकर यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९५५ चा. सत्यशोधकी साहित्याचे ते अभ्यासक आणि संशोधक होते. मराठीतले ते ग्रामीण साहित्यिक आणि समीक्षक होते. ‘उचल आणि ‘लगाम’ हे त्यांचे कथासंग्रह.  तर ढगाची तहान, श्रेष्ठ कोण माणूस की मांजर हे कविता संग्रह आहेत.

त्यांच्या वैचारिक लखनात १. ग्रामीण साहित्य प्रेरणा आणि प्रयोजन, २. म. फुले विचार आणि वङ्मय३. सत्यशोधकी परंपरा आणि स्वरूप ४. म.फुले यांची अखंड रचना, ५. म. फुले साहित्य आणि साहित्य मूल्य, ६. रा.ना. चव्हाण यांचे विचारविश्व इ. पुस्तके आहेत. सत्यशोधकी साहित्याचा इतिहास हा लेखन प्रकल्प त्यांनी सुरू केला. यापैकी खंड १ ( प्रारंभ ते १९२० ), आणि खंड २ (इ.स. १९५०) हे दोन खंड प्रकाशित झाले. खंड३ व खंड ४ हे हस्तलिहित स्वरुपात आहेत.

श्रीराम रावसाहेब गुंडेकर यांना अनेक साहित्य पुरस्कार लाभलेले आहेत. १. ‘उचल’ या कथासंग्रहासाठी भी.ग. रोहमाने  पुरस्कार, २.  ’म. ज्योतिबा फुले  विचार आणि वाङ्मय’ या ग्रंथासाठी नरहर कुरूंदकर पुरस्कार !९९२), ३. ‘म. फुले विचार आणि वाङ्मय’ या पुस्तकासाठी  ( १९९२) , महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार’ ४. बाल वाङ्मयासाठी सुशील प्रधान, तसेच  म .सा.प.चा ‘ढगांची तहान’ या बालसंग्रहासाठी (१९९९)  त्यांना पुरस्कार मिळाले आहेत.

२००३ मध्ये लातूर येथे सेवाभूमी साहित्य पुरस्कार एकूण सर्व लेखनाचा विचार करून मिळाला.

श्रीराम गुंदेकर हे अ. भा. सत्यशोधकी साहित्य , संशोधन परिषदेचे काही काळ अध्यक्ष होते.

काकासाहेब गाडगीळ आणि श्रीराम गुंदेकर या दोघांही विद्वानांना आज त्यांच्या स्मृतिदिनाबद्दल विनम्र आदरांजली.

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ११ जानेवारी – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ११ जानेवारी –  संपादकीय  ?

यशवंत  दिनकर  फडके  :

य दि  या नावाने परिचित असलेले  श्री. फडके यांचा जन्म सोलापरचा.त्यांचे शालेय शिक्षण सोलापूरात झाले.नंतर त्यांनी उच्च शिक्षण पुण्यात घेतले.बी.ए.व नंतर एम.ए या पदव्या संपादन केल्यानंतर  ते मुंबई विद्यापीठाचे पीएच.डी. वारकरी झाले.

त्यांनी प्रामुख्याने चरित्रलेखन व इतिहास संशोधन केले आहे.आगरकर, र.धों. कर्वे,

विष्णूशास्त्री चिपळूणकर,शाहू छत्रपती आणि लोकमान्य,सेनापती बापट,कहाणी सुभाषचंद्रांची,

शोध सावरकरांचा, इ.चरित्र पुस्तके त्यांनी लिहीली आहेत.याशिवाय लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक,राष्ट्रपती डाॅ.राजेंद्रप्रसाद ते प्रतिभाताई पाटील या पुस्तकांचाही उल्लेख करावा लागेल.

ऐतिहासिक पुस्तकांमध्ये डाॅ.आंबेडकर आणि काळाराम मंदिर सत्याग्रह,स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान,विसाव्या शतकातील महाराष्ट्र खंड 1 ते 8 इ.पुस्तकांचा समावेश होतो.याशिवाय त्यांनी ललित,वैचारिक,माहितीपर लेखनही केले आहे.आजकालचे राजकारणी,नथुरामायण,मुंबईचे खरे मालक कोण,संसद:तेव्हा आणि आत्ता,व्यक्ती आणि विचार अशा अनेक पुस्तकांतून त्यांचे विविध प्रकारचे लेखन दिसून येते.

वाद प्रतिवाद हे वासंती फडके यांनी संपादित केलेले पुस्तक आहे.यामध्ये यदिं नी घातलेल्याा विविध वैचारिक वादांचे संकलन आहे.विविध क्षेत्रातील भिन्न भिन्न विचारसरणीच्या विविध व्यक्तींच्या विचारांचे दर्शन येथे होते.विचारांचा लढा विचारांनीच दिला पाहिजे या मताशी ठाम राहून खेळलेले हे वाद मराठी साहित्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहेत.

अकरा  जानेवारी हा य.दि.फडके यांचा स्मृतिदिन.(2008). त्यांच्या स्मृतीस अभिवादन.

☆☆☆☆☆

 श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकीपीडिया

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ६ जानेवारी – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ६ जानेवारी –  संपादकीय  ? 

महामहोपाध्याय. विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव हे वैदिक साहित्याचे अभ्यासक होते. डॉ. श्री. व्यं. केतकर यांच्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश मंडळात’ सहसंपदक म्हणून १९२१ मध्ये ते रुजू झाले. या कोशात वेदविद्या खंडाच्या संपादन कार्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.               

महाराष्ट्रात ऋग्वेदविषयक अध्यापनाचा त्यांनी पाया घातला. संपूर्ण ऋक्संहितेचे १९२८ मध्ये त्यांनी प्रथम भाषांतर केले. अथर्ववेदाचेही त्यांनी मराठीत भाषांतर केले. पतंजलीच्या महाभाष्याचा महाभाष्य शब्दकोश, पाणिनीच्या अष्टाध्यायींचा व गणपाठाचा शब्दकोश हेही ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले. प्राचीन भारतीय स्थलकोशाचा प्रथम खंडही त्यांनी १९६९ मध्ये प्रकाशित केला. त्यांचे आणखी एक महत्वाचे काम म्हणजे त्यांनी मराठीत चरित्र कोश संपादन केले. भारतीय चरित्रकोश मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. या संस्थेतर्फे प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन काळातील प्रसिद्ध व्यक्तींच्या चरित्राचे ३ कोश संपादित करून प्रसिद्ध केले. (१९३२, १९३७ , १९४६) या चरित्रकोशाच्या सुधारलेल्या आवृत्तीस, १९३७ साली अहिंदी प्रांतात प्रकाशित झालेला  सर्वोत्कृष्ट हिन्दी ग्रंथ म्हणून मध्य प्रदेश सरकारचे पारितोषिक मिळाले.

पुरीच्या शंकराचार्यांनी  त्यांना महामहोपाध्याय ही उपाधी दिली, तर चिदंबरंच्या शंकराचार्यांनी त्यांना ‘विद्यानिधी’ ही उपाधी दिली. एक मान्यवर संस्कृत पंडित म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना १९६५ मध्ये संस्कृत सन्मानपत्र दिले गेले. त्यांच्या विद्वत कार्याच्या गौरवार्थ  ‘रिव्हू ऑफ इंडॉलॉजिकल रिसर्च इन लास्ट सेव्हंटी फाइव्ह  इयर्स हा इंग्रजी ग्रंथ १९६७ मधे तयार झाला. राष्ट्रपतींच्या हस्तेच तो, त्यांना अर्पण करण्यात आला. पुणे विद्यापीठाने १९६९ मधे डी. लिट. ही सन्मान पदवी त्यांना बहाल केली, तर भारत सरकारने १९७१ साली ‘पद्मश्री’ पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा जन्म १फेब्रुवारी १८८४चा तर त्यांचे निधन ६ जानेवारी १९८४ साली झाले.

या विद्वान आणि व्यासंगी व्यक्तिमत्वाला त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र आदरांजली.   

 ☆☆☆☆☆

प्रा.प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील सुल्लाळी येथे १९४३ साली झाला. त्यांच्या लहानपणीच त्यांच्या माथ्यावरचे आई-वडलांचे छत्र हरवले. बहिणीने त्यांचा सांभाळ केला.  गुरे-ढोरे वळतच त्यांची शाळा सुरू झाली.

त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद इथे मिलिंद महाविद्यालयात झाले. मराठवाडा विद्यापीठातून, इंग्रजी विषय घेऊन त्यांनी एम. ए. केले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून त्यांनी एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केले. १९६६ मधे आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले पुढे उपप्राचार्य व प्राचार्य झाले. १९८८ मध्ये ते निवृत्त झाले.

‘अस्मितादर्श’मधून त्यांनी आपले लेखन सुरू केले. ‘आठवणींचे पक्षी’ हे त्यांचे आत्मचरित्र. याला साहित्य अ‍ॅकॅडमीचा १९८३ सालचा पुरस्कार जाहीर झाला होता.  या आत्मचरित्राचे ११ भारतीय भाषात अनुवाद झाले आहेत. याशिवाय ‘असं हे सगळं’, ‘पोत आणि पदर’ ही त्यांची आणखी २ पुस्तके .त्यांचा साहित्यिक व सामाजिक संस्थांशी जवळचा संबंध होता. एक सहृदयी, प्रेमळ साहित्यिक अशी त्यांची ओळख होती.

ते अनेक संमेलनांचे अध्यक्ष किंवा स्वागताध्यक्ष होते. मराठवाडा साहित्य परिषदेच्या  आखाडा बाळापूर येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९७९ मधे औरंगाबाद येथे झालेल्या तिसर्‍या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.  १९८१ मधे औरंगाबाद येथे झालेल्या इंडिया बुद्धिस्ट टीचर्स कॉन्फरन्सचे ते स्वागताध्यक्ष होते.  १९८२ मधे झालेल्या पहिल्या दलित नाट्यमहोत्सवाचेही ते स्वागताध्यक्ष होते. 

 त्यांना अनेक पुरस्कार लाभले आहेत. साहित्य अ‍ॅकॅदमीच्या मानाच्या पुरस्काराबरोबरच त्यांना राज्यशासनाचाही पुरस्कार मिळाला आहे. लातूर नगर परिषदेने त्यांचा ‘भूमिपूत्र’ म्हणून त्यांचा विशेष गौरव केला आहे. आंबेजोगाई इथे यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार त्यांना दिला गेला आहे. रयत शिक्षण मंडळाचाही त्यांना पुरस्कार मिळाला आहे. राज्य शासनाने  आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा गौरव केला आहे.

आज त्यांचा स्मृतिदिन (६जानेवारी २०१०). या निमित्ताने त्यांच्या साहित्यिक आणि शैक्षणिक कार्याला विनम्र अभिवादन.

 ☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ५ जानेवारी – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ५ जानेवारी –  संपादकीय  ?

दत्तात्रय गणेश गोडसे :

श्री.द.ग.गोडसे यांचा जन्म जळगावचा.पण त्यांचे शिक्षण नागपूर व मुंबई येथे झाले.तसेच लंडन विद्यापीठाचे ललितकला विषयीचे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण  केले होते.

इतिहासकार,नाटककार,चित्रकार,नेपथ्यकार ,कलासमीक्षक अशा साहित्याच्या विविध प्रांतात त्यांनी कार्य केले आहे. शिवाजी, रामदास, मस्तानी चित्रकला, शिल्पकला, बुद्धकालीन स्थापत्य, हे त्यांच्या लेखनाचे विषय होते. वृत्तपत्रात वाद संवाद हे त्यांचे सदर खूप गाजले. यात साहित्यिक व सांस्कृतिक  घटना, ढोंगबाजी, गटबाजी, मक्तेदारी ई. वृत्ती प्रवृत्तीवर खुमासदार  लिहिले जायचे.

भारताचा सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार असा त्यांचा भारत सरकारने गौरव केला होता.

त्यांची काही पुस्तके व साहित्य : उर्जायन,काही कवडसे,गतिमानी,दफ्तानी,पोत,सोंग,मस्तानी,मातावळ,लोकधाटी,शक्तिसौष्ठव,संभाजीचे भूत, इ. काळगंगेच्या काठी(नाटक) नांगी असलेले फुलपाखरू हे कलावंतांचा सत्कार करणारे पुस्तक.

‘भारलेल्या जगातून आलेला अलौकिक माणूस’ हा दीनानाथ दलाल यांच्या वरील लेख खूप गाजला होता. 

आज त्यांचा स्मृतीदिन आहे.

☆☆☆☆☆

नारायण धोंडोपंत ताम्हनकर :

ना.धों.ताम्हनकर या नावाने सुपरिचित असलेले व ‘ गोट्या’ या लोकप्रिय पात्राचे जनक.

त्यांचे बालपण इचलकरंजीत गेले.लहान वयातच त्यानी इचलकरंजी संस्थानिकांकडे कारकून म्हणून नोकरी धरली.तेथे ब्रह्मर्षि नावाची  नाटिका लिहीली व सादर केली.त्यांचे कौतुक करून प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजीच्या घोरपडे संस्थानिकानी त्यांच्या हातात सोन्याचे कडे घातले.

नंतर ते किर्लोस्करवाडीला गेले.तेथे किर्लोस्कर या मासिकाचे उपसंपादक या पदावर बरेच वर्षे काम केले.तेथून निवृत्त झाल्यावर  नाशिकच्या ‘गावकरी’ मध्ये त्यांनी लेखन सुरू केले.

त्यांची साहित्य संपदा : मणि,अविक्षित,दाजी,अंकुश,मालगाडी,शामराई,बहिणभाऊ,किशोरांसाठी गोट्या,चिंगी, नीलांगी,नारोमहादेव,रत्नाकर,खडकावरला अंकुर.

काव्य: तिची कहाणी.

गोट्या या पुस्तकावर आधारित दूरदर्शन मालिका सादर झाली होती व ती लोकप्रियही झाली होती. 

आज ना.धों. चा  स्मृतीदिन आहे.

☆☆☆☆☆

 श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकीपीडिया

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३ जानेवारी – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ३ जानेवारी –  संपादकीय  ? 

मराठीतील नावाजलेल्या लेखिका म्हणजे सरिता पदकी. पूर्वाश्रमीच्या त्या शांता  कुलकर्णी. १३ डिसेंबर १९२८ मधे ठाणे शहाराजवळ आगाशी येथे त्यांचा जन्म झाला. त्या संस्कृत विषय घेऊन पुणे विद्यापीठात एम.ए. ला पहिल्या आल्या. सत्यकथे लेखन करणारे, अर्थशास्त्रज्ञ मंगेश पदकी, हे त्यांचे पती. तेही उत्कृष्ट लेखक होते.

वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी कविता लेखनास प्रारंभ केला. पुढे हयातभर त्यांची लेखनाशी जवळीक राहिली. महाविद्यालयात असताना त्यांचे सहाध्यायी पुरुषोत्तम पाटील स्वहस्ते त्यांचे लेखन उतरवून घेत. साहित्य,अभिरुची, सत्यकथा इ. दर्जेदार नियतकालिकातून त्यांचे लेखन प्रसिद्ध होई. त्यामुळे साहित्यिक वर्तुळात त्यांचे मानाचे स्थान निर्माण झाले. त्यांचे कवितावाचनही अतिशय प्रभावी असे.

सरिता पदकी यांचे लेखन चौफेर होते.  कविता, कथा, नाटके या त्रिविध प्रकारात त्यांनी लेखन केलेच पण इंग्रजीतील उत्तम साहित्याचाही त्यांनी मराठीत अनुवाद केला. मराठीत, मुलांसाठी निघत असलेल्या रानवारा या मासिकाच्या सल्लागार मंडळावर त्या होत्या. पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या त्या संस्थापक सदस्य होत्या. किशोरमासिकात  ७०च्या दशकात त्यांनी जे लेखन केले, ते अतिशय लोकप्रीय झाले. 

सरिता पदकी यांची काही पुस्तके –

कविता संग्रह – चैत्रपुष्प, अंगणात माझ्या लगनगंधार

कथा संग्रह – घुम्मट, बारा रामाचे देऊळ

नाटक –सीता, बाधा

अनुवादीत – खून पहावा करून- मूळ इंग्रजी लेखक – नाटककार ऑर्थर वॅटकिन यांच्या ‘नॉट इन द बुक’ या नाटकाचा अनुवाद

पांथस्थ – यूजीन ओनील यांच्या नाटकाचा अनुवाद

काळोखाची लेक – ब्राझिलच्या झोपडपट्टीत रहाणार्‍या करोलिना मारीया डी जीझस यांच्या ‘चाइल्ड ऑफ डार्कनेस या आत्मनिवेदनाचा अनुवाद

संशोधक जादूगार – वेस्टिंग हाऊसच्या चरित्राचा अनुवाद सात रंगाची कमान माझ्या पापणीवर – जपानी कवितांचा अनुवाद

बालसाहित्य  – करंगळ्या, गुटर्र गूं, नाच पोरी नाच ( कविता) अक्कल घ्या अक्कल, जंमत टंपू टिल्लूची, छोटू हत्तीची गोष्ट, हसवणारे अत्तर ( कथा) सरिता पदकी यांचं बालसाहित्याही मुलांना खूप आवडतं या प्रतिभावंत लेखिकेचं निधन वृद्धापकाळाने ३जानेवारी २०१५ मधे अमेरिकेत झालं. 

☆☆☆☆☆

अमरेन्द्र गाडगीळ हे मराठी लेखक, विशेषत: बालसाहित्याचे लेखक आणि प्रकाशक, बाल-कुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक होते. त्यांनी दैवत कोश तयार केला, ही त्यांची महत्वाची कामगिरी. १९८१ साली इचलकरंजी येथे झालेल्या बाल-कुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

अमरेन्द्र गाडगीळ  जन्म २५ जून १९१९ साली झाला.

अमरेन्द्र गाडगीळ यांचे साहित्य – अज्ञाताची वचने, ईशावस्य केनोपनिषद (६ भाग) , उक्ति विशेष, जीवन संग्राम, महाभारत सर्वांगीण दर्शन, लोकसेवक चरित्र मालेतील ठक्करबाप्पा यांचे चरित्र, त्याचप्रमाणे रविशंकर महाराज चरित्र, महर्षी आईनस्टाईन, वंदे मातरम, वीर आणि परमवीर रामबंधू  त्याग सिंधू (कथा), शतकुमार कथा (५ भाग), देवदिकांच्या गोष्टी,  किशोर मित्रांनो, श्री गणेश कोश ( ६ खंड– १९६८ पाने) , श्री राम कोश ( वाल्मिकी रामायणाच्या  समग्र अनुवादासहित, ६ खंड– १९८१ पाने), श्री हनुमान कोश, साहित्य सरिता  इ. अनेक पुस्तके  त्यांनी लिहिली. दैवत कोशांची निर्मिती हे त्यांनी साहित्याला दिलेले विशेष योगदान मानले जाते.

☆☆☆☆☆

न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी – हे सुप्रसिद्ध गांधीवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि थोर लेखक दादा धर्माधिकारी यांचे सुपुत्र. ते स्वातंत्र्य सैनिक होते. वकील होते. न्यायाधीश होते आणि लेखकही होते. मुंबईत उच्च न्यायालयाचे ते माजी मुख्य न्यायाधीश होते.

न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म २०नोहेंबर १९२७ला झाला.

प्रकाशित साहित्य – अंतर्यात्रा, काळाची पाऊले, भारतीय संविधानाचे अधिष्ठान, मंझील दूर राहिली, माणूसनामा, शोध गांधींचा, समाजमन, सहप्रवास, सूर्योदयाची वाट पाहू या.

 न्या. चंद्रशेखर धर्माधिकारीयांना २००४ला पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.

३ जानेवारी २०१९ल त्यांना देवाज्ञा झाली.

न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, अमरेन्द्र गाडगीळ, सरिता पदकी या तिघांच्या स्मृतिदिनी त्यांना हार्दिक श्रद्धांजली. .

 ☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print