image_print

मराठी साहित्य – विविधा ☆ मन आणि सकारात्मक विचारांचा प्रभाव … ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे  विविधा  ☆ मन आणि सकारात्मक विचारांचा प्रभाव … ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆ आपले मन काय विचार करते याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो. तसे पाहता मन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य  भाग आहे. जे दिसत नाही पण अस्तित्वात आहे ते आपले मन. आपल्या मनात सतत विचारांचा कल्लोळ चालूच असतो. मग हे विचार कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक असतात.  आपल्यात तयार  होणारी सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा ही मनातूनच उगम पावत असते. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्यापूर्वी आपणास प्रथम आपल्या मनाची तयारी ठेवावी लागते. कोणतेही कार्य सिद्धीस नेण्यास प्रयत्नासोबत आपल्या मनाची भक्कम साथ हवी असते.  लोक नकळतपणे बोलतात..  बघा ..  " मनात आले तर करेन, नाहीतर नाही करणार "  आपले मन काय विचार करते याच्यावर आपले वागणे अवलंबून असते. मनात येणाऱ्या  बऱ्या-वाईट विचारांवर आपली वर्तणुक ठरत असते.  पण आपल्या मनास वाईट कृत्यांपासून परावृत्त करणे हे आपल्याच हातात असते. मन जर वाईट मार्गाने धावत असेल तर त्याला लगाम घालण्याचेही आपल्याच हाती असते. अर्थात अस्तित्वात नाही पण आपणासी संलग्न आहे अशा मनाचे दोर हे आपल्याच हाती असतात. आपणास जर स्वतःचे व्यक्तिमत्व सुसंस्कृत असे प्रभावी  घडवायचे असेल...
Read More

मराठी साहित्य – विविधा ☆ डोही मनाच्या… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी  विविधा  ☆ डोही मनाच्या… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆ स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही तसेच माणसांच्या मनाचा तळ समजला की त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही खूप दिवसांनी मला निवांत वेळ मिळालेला.. म्हणजे मी तो काढलेला होता अगदी प्रयासाने. स्वतःसाठी वेळ असतोच कुठे आपल्याला या धावपळीच्या जगात ?. घर, नोकरी, मुलं बाळं, नातेवाईक, सण समारंभ यातच गुरफटुन गेलेलो असतो आपण.. स्वतःकडे बघायला वेळच नसतो. स्वतःसाठी वेळ काढावा असे मनात पण येत नाही. बरं ते असो... खूप उबग आला होता सगळ्याचा. अगदी सगळ्याचा. खोटं खोटं हसण्याचा, खोटं आनंदी आहे सुखी आहे हे दाखवण्याचा. कंटाळला होता जीव. घुसमट असह्य होत होती. काही सेकंद माझी मलाच भीती वाटली. सगळे मुखवटे फाडून टाकून जावे. . कुठे तरी अशा शांत ठिकाणी जिथे मी आहे तशीच मला दिसेन. देखावे करावे लागणार नाहीत. आपण कसे आहोत हे आपले आपल्याला कळत असतेच ना. जगाला दाखवण्याचा अट्टाहास कशासाठी ? या विचाराने मन सुन्न झाले. नकळत पायात चप्पल चढवली आणि अशीच चालत निघाले न थांबता. कुठे जायचे असा विचारही...
Read More

मराठी साहित्य – विविधा ☆ “आधुनिक वटपौर्णिमा…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर 🌸 विविधा 🌸 ☆ “आधुनिक वटपौर्णिमा...” ☆ सौ राधिका भांडारकर ☆ आधुनिक म्हणजे नेमके काय? जुन्या चालीरीतींना डावलणे, परंपरा मोडणे, जे वर्षानुवर्षे चालत आले आहे त्याला विरोध  दर्शविणे...काहीतरी वेगळं नवीन करणं म्हणजे अधुनिकता का? खरं म्हणजे आधुनिकता याचा अर्थ कुठल्याही परंपरेच्या संकल्पनेचा शोध घेणं...त्यातली भूमिका, कारणं, आणि काळ याचा अभ्यास करुन बदलत्या काळाशी, वातावरणाशी, जीवनपद्धतीशी  त्याची सांगड घालून प्रथेचं उचित नूतनीकरण करणं म्हणजे आधुनिकीकरण.... हा अर्थ मला अधिक पटतो...आधुनिकीकरण म्हणजे उच्चाटन नव्हे– तर पुनर्बांधणी. वटपौर्णिमा ह्या मुख्यत्वे स्रियांच्या सणाविषयी काही भाष्य करताना हा विचार महत्वाचा वाटला... पारंपारिक पद्धतीची वटपौर्णिमा म्हणजे ,पत्नीने पतीला दीर्घायुष्य मिळावे,आणि हाच पती सात जन्म मिळावा म्हणून केलेले व्रत !! मग उपास, वडाची पूजा ,वडाभोवती दोरा गुंडाळत मारलेल्या फेर्‍या..वगैरे वगैरे.. मग त्याच्याशी जोडलेली सत्यवान सावित्रीची कथा… वास्तविक हिंदू संस्कृतीत कुठल्याही सणाशी , व्रताशी कुठलीतरी  कथा ही असतेच...मात्र या कथांच्या माध्यमातून एक शास्त्रोक्त वैज्ञानिक दृष्टीकोन असतो. तो समजून घेणं म्हणजे आधुनिकता.. आणि आजची स्त्री हा विचार करते. कारण ती शिक्षित आहे. विचारक्षम आहे. परंपरेतला अंधश्रद्धेचा ,फोलपणाचा भाग ती डावलू शकते...आजची स्त्री वटपौर्णिमेच्या दिवशी भले उपास करणार नाही, विधीपूर्वक...
Read More

मराठी साहित्य – विविधा ☆  वटपौर्णिमा अशी असावी— ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर 🌳 विविधा 🌳 ☆ वटपौर्णिमा अशी असावी— ☆ सौ. विद्या पराडकर ☆ आज वटपौर्णिमा…  भारतीय संस्कृतीने जतन केलेला पती,पत्नीच्या अतूट व अलौकिक प्रेम धाग्यात गुंफलेला एक अजोड पुष्पहारच जणू. पौराणिक कथेनुसार यमराजाच्या हातून ज्या सावित्रीने सत्यवानाला अत्यंत नम्र विनंती करुन, बुध्दीचातुर्याने, विवेकाने ज्या निर्धाराने सोडविले व चार वर मोठ्या  खुबीने मिळविले, .म्हणजेच सौभाग्य मिळविले, ती सावित्री त्रिखंडात अजरामर आहे. पतीवरील नितांत प्रेम व अखंड सौभाग्याची शिंपण ही ह्या व्रतामागील मूलभूत प्रेरणा आहे. आज समाज कितीतरी बदलला आहे. मानवी जीवनाची गतिमानता वाढली आहे  शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन असल्यामुळे आजची स्त्री घराचे कुंपण ओलांडून बाहेर पडली आहे. शिक्षणाने ती समृद्ध झाली आहे. तिचा भौतिक विकास झाला आहे. तिचा शैक्षणिक विकास झाला आहे. परंतू शिक्षणाचा जो दुसरा आणि महत्त्वाचा उद्देश ‘संस्कृती संवर्धन व नैतिक मूल्यांची जोपासना करणे‘ आहे– हे कार्य आजचे शिक्षण पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आजच्या स्त्रीला परंपरागत जीवन जगणे अशक्यप्राय झाले आहे.  आजच्या प्रगत समाजात प्रगत जीवन पद्धतीत स्त्रीला दोन्ही तारांवर नाचता येत नाही. पण दोन्ही मतांचा सुवर्णमध्य मात्र साधता येतो. जीवनाच्या अंधारमय...
Read More

मराठी साहित्य – विविधा ☆ वेळ… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी  विविधा  ☆ वेळ... ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆ वेळ- दोनच अक्षरी शब्द.पण नाना  प्रकारचे अर्थ सामावणारा. कारण संदर्भानुसार अर्थ बदलत जातात हो. नीला मैत्रिणीला म्हणाली, 'अग,एक प्रदर्शन पाहायला जायचं आहे. वेळ आहे का तुला माझ्याबरोबर यायला.' ‘ हो.एका पायावर तयार आहे बघ यायला.’ नीला पटकन उत्तरली.  तोच आई नीलाला जेवायला बोलवू लागली, नि नीला आईस म्हणाली, "नाही ग आई. वेळ लागेल थोडा. मी एक आर्टिकल लिहितेय. ते पुरं होत आलय. ते झाल्यावर येते. इथं पहिल्यांदा वेळ या शब्दाचा अर्थ सवड होतो तर तर दुसऱ्या  उदाहरणात वेळ म्हणजे उशीर. ‌रामराव असेच मित्रांच्यात बसून बोलतांना म्हणाले, “  माझ्या एका मित्रावर, दिनेशवर काय वेळ आलीय बघा. लेकीला कॅन्सर झाला नि पाण्यासारखा पैसा खर्च करुनही उपयोग झाला नाही. शिवाय कर्जही वाढले.”  इथं "वेळ " म्हणजे वाईट परिस्थिती.  कोणत्याही गोष्टीसाठी वेळ महत्वाची असते. आपले नियोजन योग्य, काटेकोर असेल तर कोणत्याही वेळेस एखादे नवीन काम सुरू केले तर ते नीट पार पडते. याउलट आपली योग्य तयारी नसेल तर अगदी मुहूर्त  पाहून काम सुरू केले तरी ते यशस्वी होईलच याची खात्री देता येत नाही.वेळ पाळणे सुद्धा महत्वाचे असते हं....
Read More

मराठी साहित्य – विविधा ☆ अनुभूती ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे  विविधा  ☆ अनुभूती ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ आमच्या छकुलीचा १० वा वाढदिवस झाला परवा. हां हां म्हणता छकुली दहा वर्षाची झाली. काल परवा पर्यंत पिटुकली, सोनुकली होती... मलाच मी खूप मोठा झालो आहे, असं वाटलं, वयानंही आणि विचारानंही. त्यालाही दोन कारणं होती. गेल्या दहा वर्षात मुलांबरोबर त्यांच्याच वयाचे होऊन खेळता खेळता काळ कसा सरला कळलंच नाही.  मुलं मोठी होत होती,  आम्ही ही एक एक नवीन अनुभव घेत मोठे झालो. दुसरं म्हणजे मला आणि नंदिताला , माझ्या पत्नीला, गेल्या दोन महिन्यात एका वेगळ्याच  प्रसंगाला सामोरे जावे लागले. नवीन वर्षाची सुरुवात झाली तीच टेन्शनमध्ये. आईची तब्येतीची तक्रार होती म्हणून चेकअप साठी हाॅस्पिटलमध्ये गेली आणि पाच वर्षांपूर्वी झालेल्या ह्रदयाच्या शस्त्रक्रियेनंतर परत तेच दुखणं,  आजारपण समोर ठाकलं . तिच्या ह्रदयावर परत शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. तीही ताबडतोब.  मनात खूप गोंधळ माजला. वैद्यकीय शस्त्रक्रिया, उपचार याबाबतीत नेहमीच उलटसुलट मते असतात. चहू बाजूंनी लोक अनेक सल्ले देत असतात. खूपदा सर्वच वास्तवात आणणे शक्य नसते. त्यामुळे गोंधळ,  साशंकता निर्माण होते. मुख्य म्हणजे सल्ले द्यायला लोक एका पायावर तयार असतात. प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा कोणीही...
Read More

मराठी साहित्य – विविधा ☆ “फोन स्टोरी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे  विविधा  ☆ “फोन स्टोरी...” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆ फोनवर बोलणाऱ्यांचे किती प्रकार सांगता येतील. काहींना निरोप सांगितला, किंवा मिळाला, की फोन ठेवण्याची घाई असते. काही फक्त हं....... बरे....... ठिक आहे....... बघतो....... चालेल..... नक्की असे म्हणत फोन ठेवतात. आपल्याला अजूनही काही सांगायचे असते‌...... पण त्याने फोन ठेवल्याने आपण फक्त फोनकडे बघतो.... कारण फोन ठेवणारा आपल्या समोर नसतो. (मग आपण सवडीने त्याला बघतो.) पण बायकांचे फोनचे तंत्र वेगळेच असते. ज्या कारणासाठी फोन केला आहे तो विषय सोडून इतर विषयांवर देखील थोडक्यात विस्तृत चर्चा करण्याचे कसब यांच्याकडे असते. हे समजण्याचे कारण आज सकाळी झालेले फोन. विषय साधाच होता. केरला स्टोरी सिनेमा बघायला जायचे का? किती वाजता? सह जायचे की आपले आपण..... पहिला फोन झाला..... जायचे की नाही या चर्चेत काय सुरू आहे?..... अशी सुरुवात झाली......स्वयंपाक.......  पलीकडून उत्तर....... मग आज काय करते आहेस? यावर भाजी पोळी पासून आमरसापर्यंत सगळा स्वयंपाक फोनवर सांगून झाला...... आता त्यांच्याकडची भाजी आम्हाला नवीन होती...... झालं..... केरला स्टोरी थोडी बाजूला राहिली, आणि भाजीची स्टोरी (डायरेक्शन सह) अगोदर संपली....... मग दुसरा फोन...... (पहिला फोन...
Read More

मराठी साहित्य – विविधा ☆ “चित्रपटनगरीची जादू…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट  विविधा  ☆ “चित्रपटनगरीची जादू...” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆ चित्रपटनगरी तशी अफलातून नगरी.  हे तसं म्हंटलं तर वादळी क्षेत्र.ह्याची दुनियाच वेगळी. ह्या क्षेत्रात सगळंच मुळी बेभरवशाचं बघा.काहींना अल्पावधीतच यश मिळतं तर काहींची हे यश मिळविण्यासाठी संपूर्ण कारकिर्दच पणाला लागते.कुणाला हे यश स्वतःच्या रुपावर मिळतं तर काहींच यश हे त्यांचा उच्चप्रतीचा अभिनय ओढून आणतो. काहींना पचवता येणार नाही इतकी अलोट संपत्ती येथून मिळते तर काहींना ही मायानगरी अक्षरशः कंगाल बनविते. पण तरीही बहुतेकांच्या मनात ह्या चित्रपटसृष्टीविषयी आवड,उत्सुकता, कुतूहल हे असतं, अगदीच खासकरून अभिनेते वा अभिनेत्रींबाबत. ह्या नगरीत अनेक आवडते कलाकार आपली कला फुलवित भरघोस योगदान देतात  तर काही व्यक्तींनी ह्या क्षेत्रात भरघोस योगदान देण्याआधीच एक्झीट घेतलीयं. ही मायानगरी म्हणजे एक अख्ख भलमोठं कुटूंबच असत जणू. कुटूंबाप्रमाणेच सगळी कामं ही वेगवेगळ्या लोकांनी वाटून घेतलेली असतात. ह्या क्षेत्राचे कायम आपल्या सामान्य जनतेला आकर्षण, उत्सुकता वाटत असते.काळ खरच खूप बदललायं. आता ह्या मध्ये चांगले वाईट हा वादग्रस्त मुद्दा विचारात न घेता फक्त एक गोष्ट नक्कीच मान्य करुया ,की ह्मा बदलत्या काळामुळे स्थित्यंतरे आलीत, गोष्टी...
Read More

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ संत एकनाथ  महाराज… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

 इंद्रधनुष्य  ☆ संत एकनाथ महाराज… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ (१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते... त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत..... एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते... हे मुळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले; द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या..... नाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला... एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर...
Read More

मराठी साहित्य – विविधा ☆ शब्द… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी  विविधा  ☆ शब्द... ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆ ...शब्द.  अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे "शब्द." मूल बोलू-चालू लागण्यापूर्वी च ऐकण्याच्या माध्यमातून  'अडगुलं-मडगुलं' सारखी बडबडगीतं ऐकतं नि मोठं होतं.चिऊकाऊच्या गोष्टी ऐकत, चांदोबाकडे पाहत, आजुबाजुचा परिसर न्याहाळत ते भोवताल समजून घेतं.लहानपणी आकलनक्षमता जास्त असते त्यामुळे मूल पटकन शिकतं.अक्षर ओळख झाल्यानंतर कांही काळ गेला कि तेच मूल मोठ्या टाइपमधील गोष्टींच पुस्तक वाचू लागतं ,यातून पुढे वाचनाची आवड निर्माण होते नि वाचनाची सवय जडते. शब्द एकदा जवळचे झाले कि मग ते सर्वस्वच बनतात.संत तुकाराम महाराज तरी म्हणतात आम्हां घरी थन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्नें करू ||१|| शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका  ||२|| तुका म्हणे पहा,शब्दची हा देव शब्देचि गौरव ,  पूजा करू ||३|| केवढा अर्थ भरला आहे या अभंगात.आपण थन कशाला म्हणतो तर सोने,चांदी,रत्ने,माणके,रुपये इ.ना.पण तुकाराम महाराज शब्दांनाच धन मानतात.कारण त्यांच्याकडं शब्दांच असं ऐश्व्य आहे कि जे हिरावून घेताच येणार नाही.शब्दांनाच ते शस्त्र मानतात .हे सुद्धा पटतं कारण महात्मा गांधींच्या "चले जाव "किंवा "छोडो भारत " या शब्दात शस्त्रासारखं सामर्थ्य होतंं ज्यामुळं ब्रिटीश साम्राज्य हादरलं.अजूनही शिकण्यापूर्वी किंवा शिटताना प्रारंभी...
Read More
image_print