हिन्दी साहित्य – कविता ☆ नारी सशक्तिकरण ☆ डॉ निशा अग्रवाल

डॉ निशा अग्रवाल

(ई- अभिव्यक्ति में प्रसिद्ध शिक्षाविद एवं साहित्यकार डॉ निशा अग्रवाल जी का हार्दिक स्वागत है।  प्रस्तुत है आपका संक्षिप्त परिचय एवं एक भावप्रवण कविता “नारी सशक्तिकरण”।)  

संक्षिप्त परिचय 

सम्प्रति – शिक्षाविद, लेखिका, कवयित्री, गायिका, स्क्रिप्ट राइटर

प्रकाशन / प्रसारण – 

  • संपादक – राजस ऑनलाइन मैगज़ीन
  • साहित्य सृजन- मेरी कलम, मेरी पहचान
  • संचालक – शिक्षा/संगीत/साहित्यिक मंच
  • समाज सेविका- गरीब एवं असहाय बच्चों को निःशुल्क शिक्षा प्रदान करना।
  • विभिन्न रचनाओं का अखबार, जन प्रखर पत्रिका, सच की दस्तक पत्रिका, वैश्य चित्रण, ड्रीम ऑफ फ्यू बुक, मैगज़ीन ऑफ इंडिया, ई मैगज़ीन, एवं अन्य पत्रिकाओं में…सतत् प्रकाशन
  • रेडियो एवं आकाशवाणी पर रचनाओं का प्रसारण।

सम्मान –

  • उत्कृष्ट लेखन सम्मान (वाराणसी-सच की दस्तक प्रसारण मंत्रालय, भारत सरकार)
  • राष्ट्रीय/अंतरराष्ट्रीय साहित्यिक मंच व अन्य संस्था द्वारा सम्मान प्राप्त।

लेखनी का उद्देश्य – नारी सशक्तिकरण पर विशेष, समाज की व्यथा को उजागर करना व समाज में चेतना का संचार करना ।

☆  कविता – नारी सशक्तिकरण डॉ निशा अग्रवाल ☆  

अबला नही हो तुम,कायर नही हो तुम

जगत जननी हो तुम, जगत का अभिमान हो तुम।

करुणा का सागर हो तुम, ममता की सरिता हो तुम

मां ,बहन ,बेटी, पत्नी के ,जीवन का आधार हो तुम।

सागर की लहरों की ,हूंकार हो तुम

पर्वत की ऊंचाई जैसा ,देश का गौरव हो तुम।

सदियों से कोमल तन को ,लिपटी साड़ी में ढके हो तुम

झुकी हुई नज़रों से तानों की बौछार सुनती आयी हो तुम।

बहुत हुए है जुल्म तुम पर ,बहुत हुआ मन को आघात

मत सहो तुम अत्याचार को, मत दावो तुम मन में बात।

छोड़ो सदियों की नारी को,आज की नारी बन जाओ

थाम लो हिम्मत का हाथ अब,हर मंजिल को फतह करो।

उठो,जागो ,तलवार उठाओ, झांसी की मनु बन जाओ

तेज़ धार और वीरता से,आगे -आगे बढ़ते जाओ।

याद करो उस नारी को ,जो लायी थी देश में आंधी

बनी देश की पहली मुखिया, वो थी इंदिरा गांधी।

मान बढ़ाया जिसने देश का ,देकर के अपना स्वर

कहते जिसको ‘स्वरकोकिला’, नाम लता मंगेशकर।

भारी उड़ान पहुँची अंतरिक्ष में ,सच कर दिखाया सपना

उस नारी को नमन करें हम, वो थी कल्पना चावला।

आया समय उठो तुम नारी,युग निर्माण तुम्हें करना है

आज़ादी की खुली नींव पर,प्रगति के पत्थर भरना है।

कमज़ोर ना समझो खुद को तुम, सम्पूर्ण जगत की जननीं हो

स्वर्णिम आगत की आहट से, नया इतिहास तुम्हें रचना है।

©  डॉ निशा अग्रवाल

जयपुर, राजस्थान

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 5 (36-40)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

॥ श्री रघुवंशम् ॥

॥ महाकवि कालिदास कृत श्री रघुवंशम् महाकाव्य का हिंदी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग #5 (36-40) ॥ ☆

 

‘कुमार’ सम पुत्र को राजरानी ने ब्रह्यवेला में क्यों कि जाया

अतः परब्रह्य के नाम पर ही ‘अज’ उसका भी नाम गया रखाया ॥ 36॥

 

सब रूप, रंग, वीरता और काठी सुपुत्र अज ने पिता की पाई

ज्यों दीप से ज्वालित दीप कोई अलग न देता कभी दिखाई ॥ 37॥

 

सुशील शिक्षित सुरूप अज की थी राजलक्ष्मी को चाह ऐसी

सुयोग्य वर देख सुधीर कन्या को पिता -सहमति की चाह जैसी ॥ 38॥

 

तब इंदुमति भगिनी के स्वयंवर में अज को सादर विदर्भ लाने

विदर्भ – नृप भोज ने रघु को न्यौता सुयोग्य चर भेज दिया, बुलाने ॥ 39॥

 

सुयोग्य अज को वयस्क लखकर सुयोग्य संबंध की कामना से

विशाल सेना के साथ रघु ने विदर्भ भेजा नृप प्रार्थना पै ॥ 40॥

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १३ ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

?१३ ऑक्टोबर  – संपादकीय  ?

  • गिरीजाबाई केळकर

ज्या काळात स्त्रीयांचे लेखन समाजमान्य नव्हते, त्या काळापासून गिरीजाबाई केळकर या लेखन करत होत्या. म्हणजे स्त्री लेखिकांच्या पहिल्या पिढीतल्या त्या लेखिका. सुरूवातीला त्यांनी ज्ञानप्रकाशमध्ये लिहायला सुरुवात केली. हे लेखन त्यांनी निनावी केलं होतं. काकासाहेब खाडीलकर यांनी स्त्रीयांचे बंड’ असे नाटक लिहिले. त्याला उत्तर म्हणून की काय, त्यांनी पुरूषांचे बंड हे नाटक लिहिले. हे नाटकही त्यांनी निनावीच लिहिले होते. पुढे भारत नाटक कंपनीच्या य. ना. टीपणीस यांनी ते रंगभूमीवर आणले. त्या पहिल्या स्त्री नाटककार आहेत. त्यांनी पुढे आयेषा, मांदोदरी, राजकुवर, वरपरीक्षा, सावित्री इ. नाटके लिहिली.

ज्ञानप्रकाशमध्ये त्यांनी लिहिलेल्या लेखांची गृहिणीभूषण नावाची पुस्तके, दोन भागात प्रकाशित झाली. समाजचित्रे -2 भाग, संसार सोपान हे त्यांचे वैचारिक लेख आहेत. त्यांनी ‘स्त्रीयोनुं वर्ग या गुजराती पुस्तकाचा स्त्रीयांचा वर्ग हा अनुवादही केला आहे. न. चिं. केळकर यांच्या त्या वाहिनी. पुढे त्यांचे चिरंजीव मनोहर केळकर यांनी वङ्मयशोभा नावाचे साहित्यिक मासिक काढून अनेक वर्ष चालवले.

स्त्रीयांचे लेखन समाजमान्य नव्हते, त्या काळात गिरीजाबाई केळकर यांनी इतके समृद्ध साहित्य निर्माण केले आणि पुढील लेखिकांना लेखनाचा मार्ग प्रशस्त करून दिला, त्याबद्दल त्यांचा अभिमान मिश्रित आदर वाटतो. त्यांचा जन्म १८८६ सालचा तर त्यांचा स्मृतीदिन १९८०सालचा.

  • इंदूमती शेवडे 

इंदूमती शेवडे या लेखिका होत्या. पत्रकारही  होत्या. त्यांनी नागपूर तरुण भारतमध्ये महिलांचे मनोगत हे सदर अनेक वर्षे चालवले. नंतर त्या दिल्लीला गेल्या. तिथे त्यांनी नॅशनल बुक ट्रस्टने प्रसिद्ध केलेल्या अनेक पुस्तकांचे इंग्रजीत भाषांतर केले. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबरचा दिल्लीत त्यांनी ‘मिर्झा गलीब’ची माहिती मिळवली. नागपूरला पुन्हा गेल्यावर त्यांनी  ‘मिर्झा गालीबचे चरित्र लिहिले. त्या उत्तम चित्रकारही होत्या. आपल्या पुस्तकातील चित्रे त्यांनी स्वत:च काढली आहेत.

त्यांचे संत कवियत्री हे पुस्तक स्त्रीमुक्तीच्या चळवळीच्या अभ्यासातील पहिले पुस्तक मानले जाते. महदाईसा, मुकताबाई, जनाबाई, बहिणाबाई, वेणाबाई या ५ संत कवियात्रींच्या काव्याचा या पुस्तकात वेगळ्या दृष्टीने विचार आहे. या शिवाय, इये साहेबाचीये नागरी’, पु.य. देशपांडे (चरित्र) इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

त्यांनी नागपूर आकाशवाणी वरून अनेक श्रुतीकाही सादर केल्या.

  • लक्ष्मण लोंढे

लक्ष्मण लोंढे हे विज्ञान कथा लेखक म्हणून प्रसिद्धा होते. त्यांची दुसरा आईन्स्टाईन   ही कथा सायन्स टूडे या मासिकात प्रकाशित झाली आणि पुढे या कथेला जागतिक सर्वोत्कृष्ट कथा म्हणून कॅन्सास विद्यापीठाचा पुरस्कार मिळाला. त्यांची एक कथा जेम्स गुण यांच्या द रोड तू सायन्स या पुस्तकाच्या १९८९ च्या  आवृत्तीत निवडली गेली आहे. अशा तर्‍हेने आंतरराष्ट्रीय बहुमान मिळवणारे ते भारतातील पहिले विज्ञान लेखक.त्याचा जन्म १३ ऑक्टोबर १९४५ साली झाला.       

 विज्ञान कथांशिवाय त्यांनी अन्य ललित लेखनही केले. सोबतमध्ये, लक्ष्मण झूला या नावाने ते सादर चालवीत. असं घडलंच नाही ही त्यांची कादंबरी, आणि वसंत पुन्हा बहरला हे त्यांनी लिहिलेले चरित्र. याशिवाय त्यांची थॅंक्यू इमस्टर फॅरॅडे, काऊंट डाउन, देवासि जीवे मरिले इ. पुस्तके विज्ञान पुस्तके म्हणून खूप गाजली.

त्यांच्यादुसरा आईन्स्टाईन या पुस्तकाला कॅन्सास विद्यापीठाचा, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारचाही पुरस्कार मिळाला.        

  • लीलाताई दीक्षित

लीलाताई दीक्षितांनी लग्नानंतर एम. ए. पीएच. डी. या पदव्या घेतल्या. नंतर पुण्याच्या एस.एन.डी. टी. कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम केले. बालसाहित्याच्या लेखिका म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. गंमत गाव, गाणारे झाड, नाच रे मोरा, पंख नवे, पॉपतचा झाड फुलांना रंग मिळाले. इ. बालसाहित्याची पुस्तके लिहिली. बालसाहित्यातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना २००५ मध्ये पर्भणी येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९३५ मध्ये झाला.

विविध विषयांवरील त्यांनी ५० पुस्तके लिहिली. बालसाहित्याशिवाय त्यांनी आनंदयोगिनी(९ स्त्री संतांची चरित्रे) , अंतरीचे भावे (आठवणी), आजोबांचे घर, घर आमचा कोकणातलं, स्वामी अपरांताचा ( कादंबरी) इ. पुस्तके लिहिली. लिहिली. प्राचीन मराठी साहित्यातील स्त्री दर्शनया त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचापुरस्कार मिळाला.       

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ 

मराठी विभाग. 

संदर्भ : कर्‍हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी , गुगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कालरात्री ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ कालरात्री… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

रुप तुझे असे भयंकर

कार्य करिसी तू शुभंकर

शुभंकरीच म्हणती तुज

संपविलास तू रक्तबीज !

सातवे दिवशी पूजन

कृष्ण वर्णी तू नेत्र तीन

हाती खड्ग गर्दभ वाहन

करीसी भक्तांचे रक्षण !

होवो अज्ञान तिमिर दूर

 कालरात्री देई ऐसा वर !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 105 ☆ शांताबाई ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 105 ?

☆ शांताबाई ☆

शांताबाई शांताबाई

तुम्ही म्हणजे रानजाई ॥

 

साधेसुधे राहणीमान

मराठमोळे परिधान

डोईवरचा पदर छान

तुम्ही म्हणजे सुरेल तान ॥

 

शांतादुर्गा म्हणू की म्हणू

वाङेश्वरीची लेक लाडकी

करून गेलात मैफल पोरकी

तुम्ही म्हणजे शब्दसखी ॥

 

लाखमोलाचे तुमचे शब्द

उपकार केलेत अब्ज अब्ज

लिहिल्या कविता नव नीत

तुम्ही म्हणजे फक्त प्रीत ॥

 

नित्य स्मरू अन् सदैव वंदू

वाणी गोड बोलणे मृदू

साहित्यातला ज्ञानसिंधू

तुम्ही म्हणजे स्वप्न मधू ॥

ज्येष्ठ कवयित्री/साहित्यिक स्व.शांता शेळके यांना विनम्र अभिवादन

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उदे ग अंबे उदे  भाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? विविधा ?

☆ उदे ग अंबे उदे  भाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

अश्विन महिना लागला, की शुद्ध प्रतिपदेपासून  नवमीपर्यंत नऊ दिवस, आणि हो, नऊ रात्रीसुद्धा नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू होते. नवरात्रोत्सव हा देवीचा उत्सव. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर अखील भारतातील देवीस्थाने गजबजून जातात. देवीच्या मंदिरातून श्रद्धाळू भाविकांची अपार गर्दी उसळते. ‘उदे ग अंबे  उदे’  म्हणत देवीच्या उदयाची आकांक्षा बाळगली जाते. तिला आवाहन केलं जातं.

आदिशक्तीच्या मातृस्वरुपाला अंबा,  जगदंबा़, किंवा अंबाभवानी म्हणतात. याच शक्तीने, प्रकृतीने,  निर्गुणाला चेतवून अखंड ब्रह्मांडाची निर्मिती केली. तीच जन्मदात्री,  धात्री, पालनकर्ती आणि रक्षणकर्तीही. हीच महालक्ष्मी,  महासरस्वती,  महाकाली या रुपांनी त्रिविध आणि त्रिगुणात्मक बनते. तिची नाना रुपे आहेत. तिला नाना नावांनी ओळखले जाते. तिची स्थाने जशी अनेक आहेत, तशीच तिच्याठायी मानवी मनाने वेगवेगळी सामर्थ्ये कल्पिली आहेत. भवानी,  रेणुका,  चामुंडा,  शांतादुर्गा,  पद्मावती, संतोषी, जोगेश्वरी,  शाकांबरी  ही त्यापैकीच काही नावे.

महालक्ष्मी हे जगदंबेचेच एक रूप आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर,  मुंबई,  केळशी,  आडिवरे, कुडाळ, वाई इ. ठिकाणी महालक्ष्मीची मंदिरे आहेत,  तथापि कोल्हापुरातील महालक्ष्मीच्या स्थानाचे महात्म्य खूप आहे. तिच्या नावाने पिठा-मिठाचा जोगवा’ मागत कोल्हापूरला जाताना भाविक महिला म्हणतात,

‘कोल्हापूरवासिनी ग अंबे दे दर्शन मजसी

तुझ्या कृपेने जाती लयाला पापांच्या राशी’

आपल्याला पिठा-मिठाचा जोगवा’ सत्वर’ घालायला ती सांगते. कारण तिला दूरवर कोल्हापूरला जायचय. देवीला बांगड्या,  हार-गजरे अर्पण करायचेत. साडी-चोळी नेसवून खण-नारळाने तिची ओटी भरायचीय. ती सौभाग्याची देवता आहे,  असा स्त्रियांचा विश्वास आहे. लोकमानसात हे विचार,  संस्कार,  श्रद्धा,  भावना खूप खोलवर रुजलेल्या आहेत.

कोल्हापूरवासिनी अंबाबाई, हे पार्वतीचं रूप, की लक्ष्मीचं, याबद्दल अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. पुराणकथा व अन्य ग्रांथिक आधार बघितले, तर ती शिवाची पार्वती आहे, तसेच विष्णूची लक्ष्मीही आहे, असे सांगणार्‍या कथा आपल्याला वाचायला मिळतात.

कोल्हापूर हे आद्य आणि महत्वाचं शक्तिीपीठ आहे. महत्वाच्या साडेतीन पीठातील ते पहिले महत्वाचे पीठ. या शक्तिपीठांबद्दल अशी कथा सांगितली जाते, की दक्ष प्रजापती आणि असिक्वीनी यांना जगदंबेच्या वरदानाने सती नावाची एक सर्वज्ञ व अवतारी कन्या झाली. तिने शंकराशी विवाह केला. दक्षाला ते पसंत नव्हते. पुढे दक्षराजाने एक यज्ञ केला. त्यात सतीचा अपमान झाला, म्हणून तिने यज्ञवुंâडात उडी घेतली. त्यामुळे शंकर संतप्त झाला. त्याने यज्ञकुंडातून अर्धवट जळलेले निष्प्राण शरीर बाहेर काढले व ते खांद्यावर टाकून त्याने तांडव सुरू केले. त्यामुळे सगळी पृथ्वी भयभीत झाली, तेव्हा नारायणाने शिवालायातून बाहे काढण्यासाठी आपल्या सुदर्शन चक्राने व धनुष्यबाणाने मागच्यामागे सतीच्या देहाचे अवयव तोडण्यास सुरुवातकेली. या पवित्र देहाचे अवयव पृथ्वीवर १०८ ठिकाणी पडले. तिथे  तिथे शक्तिपीठे निर्माण झाली. कोल्हापूर (किंवा  पूर्वी यालाच करवीर नगरी म्हणत) इथे सतीच्या हृदयापासूनचा वरचा भाग पडला. सर्व अवयवात मस्तक हे प्रधान,  त्यामुळे सर्व शक्तिीपीठात कोल्हापूर हे सर्वोच्च व आद्य शक्तिपीठ मानले जाते. दुसरे शक्तिपीठ म्हणजे तुळजापूरची भवानी. तिसरे म्हणजे माहूरची रेणुका व अर्धे पीठ म्हणजे वणीची सप्तशृंगनिवासिनी.

कोल्हापूरवासिनी अंबाबाई, हे लक्ष्मीचं, रूप आहे,  असं सांगणारी कथाही पुराणातआहे. एकदा काश्यपऋषी यज्ञ करत असताना, त्याचा हविर्भाग कुणाला अर्पण करणार असे नारदाने विचारले,  असता कोणती देवता यासाठी योग्य, असा विचार सुरू झाला. मग ते ठरण्याची जबाबदारी भृगु ऋषींवर टाकण्यात आली. ते प्रथम ब्रह्मलोकी गेले. नंतर कैलासावर शंकराकडे गेले, पण या दोघांनीही त्यांची दखल घेतली नाही. ते रागावून वैकुंठाला गेले. तिथेही विष्णू-लक्ष्मी बोलत होते. त्यांचे  काही भृगुऋषींकडे लक्ष गेले नाही. ते संतापले आणि  त्यांनी विष्णूच्या छातीवर लाथ मारली. पुढे विष्णुचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी ऋषींचे स्वागत केले आणि म्हणाले, ‘आपल्यासारख्या महात्म्याचे दर्शन मोठ्या पुण्याईने होते. माझ्या खडकासारख्या छातीवर लाथ मारल्याने आपले पाऊल दुखावले तर नाही ना?  बोला मीआपले काय प्रीयकरू?’ त्यांचा हा दिव्य भाव पाहून भृगुऋषींचा राग पळून गेला. त्यांनी आपल्या पावलाचे चिन्ह कायमचे छातीवर धारण करायला सांगितले व ते मृत्यूलोकी निघून गेले व तिथे जाऊन त्यांनी विष्णू हाच हविर्भागदेण्यासाठी योग्य आहे,  असे सांगितले. तेव्हापासून’ भक्तवत्सलांछन’ हे बिरुद विष्णूदेवाने अलंकाराप्रमाणे मिरवले आहे.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विज्ञान कथा – लादेन विरघळला – भाग 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

? जीवनरंग ??‍?

☆ विज्ञान कथा – लादेन विरघळला – भाग 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

” पेन्शन मिळाल्या पासून मी अगदी सुखात होतो . उशिरा उठणे, पेपर वाचणे, उशिरा अंघोळ इ . मात्र दोन्ही वेळचं जेवण ठरल्यावेळी ! संध्याकाळी मस्तपैकी फिरून येणे आणि झोपेपर्यंत अखंड दूरदर्शन समोर . आता तरी या जगात माझ्या इतका आनंदी, सुखी नकीच कोणी नाही . घरातही पंधरा दिवस मी एकटा आहे . ही माहेरी तिच्या भाचीच्या लग्नाची तयारी करण्यासाठी गेली आहे . माझ्यासाठी दोन्ही वेळचा डबा येतो आहे . मग काय? सारा वेळ मी आणि टि.व्ही .

अरेच्या! हे काय? अमेरिकेची बातमी काय येतेय सारखी . ? अरे बापरे! केवढ्या उंच इमारती डोळ्यासमोर कोसळताहेत ? कुणाचं एवढं विध्वंसक डोकं? विमानाने धडक मारायची आणि सगळ्या जगाला हादरायच ? कुठला इंग्रजी चित्रपट पहातोय का मी? छे! छे! केवढा हा धुरळा? केवढी आग? काय झाली असेल तिथे अवस्था? पण हे काय? इथले लाईट कसे गेले? किती तो अंधार? अरे बाप रे! हे काय? बाँबस्फोट झाल्यासारखा कसला आवाज? आणि हा माझा टिव्ही . स्क्रिन कसा फुटला? आणि त्यातून हे काय बाहेर पडलं? मी जाम हादरलो . या अंधारात काय करू? बॅटरी कुठे आहे बरं? निदान मेणबती – काडेपेटी .कु ठे आहे? … कु ठे शोधू ?

हा ! बरं झालं ! लवकर लाईटस आले ते . पण माझ्या टिव्ही ला काय झालं अचानक ? हे काय ? इथे समोर काय सांडलय ? पांढरा शुभ्र चकचकीत कसला गोळा आहे बरं ? अन् हे काय? हा गोळा हळूहळू मोठा कसा होत चाललाय ? परवा तो टरमिनेटर पिक्चर पाहिला … तसच काय होतय? मी जागा आहे की स्वप्नात ? मी माझा मलाच चिमटा घेऊन पाहिला . अरे बापरे ! तो चकचकीत गोळा केवढा मोठा होतोय … कसला आकार घेतो य ? आता मात्र मला घाम फुटला …. बघता बघता, त्या गोळ्यामधून मानवी देह तयार झाला .

माझ्याच घरात, माझ्या समोर आतून दार बंद असताना, चक्क एक दाढीवाला, पागोटे वाला आणि हातात लांबडी नळकांडी असलेली बंदूक हातात घे तलेला माणूस माझ्याकडे एक टक लावून पहात मंद हसत होता . क्षणभर मला काय करावे तेच सुचेना . माझ्या समोर टिव्ही . स्क्रिनच्या काचाही पसरल्या होत्या, विखुरल्या होत्या आणि हा बंदुकधारी माणूसही होता .” मी लादेन ….” तो मराठीमध्ये माझ्याशी बोलेला .” आताच पाहिलेस् ना अमेरिकेची कशी झोप उडवली मी? होय . तोच मी . तुम्ही मला अतिरेकी म्हणता, पण जशास तसे एवढेच मी जाणतो . म्हणून पहिल्यांदाच तुला सांगतो, मुकाट्याने मी काय सांगतो ते ऐकत जा आणि त्या प्रमाणे, अगदी त्याच प्रमाणे वाग . इथून पुढे तू माझ्या ताब्यात आहेस . आपलं स्वतःच डोकं वापरायचा जरा जरी प्रयत्न केलास ना तर याद राख. कुणालाही तुझा थांगपत्ता लागणार नाही अशी अवस्था करीन तुझी ….”.

एका दमात त्या दाढीवाल्याने मला जबरदस्त दम भरला . पोलिसांना फोन करावा का? की शेजारच्यांना हाक मारावी ? मुलाला फोनवर कॉन्टॅक्ट करावा का? पण काय सांगणार ? कुणाला पटेल का हे? काय करू? याच्या तावडीतून कशी सुटका करून घेऊ? काही म्हणजे काही सुचेना .

एवढ्यात त्यानेच जादू केल्या प्रमाणे खिशातून रिमोट सारखी वस्तू काढली आणि क्षणार्धात माझा टि.व्ही . ठाकठीक केला . मला तेवढेच हायसे वाटले . पण ता असा कसा तयार झाला? माझ्या मागे का लागलाय? हा आलाच कसा? कुठून? याला काही विलक्षण शक्ती आहे की जादूटोणा करतोय? मीच कसा सापडतो याला?

क्षणभरात विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली . हा गालावर हात ठेवून ‘ माझ्यावर पाळत ठेवल्या सारखा आरामात बसला होता . माझ्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होता त्याच्या

अशा अकस्मात येण्याने मी पार हादरून गेलोय हे त्याला समजले होते . त्यामुळे तो जास्तच निर्धास्थ झाला होता .

‘ह – ऊठ -‘ लादेननं मला ऑर्डर केली .” मला खूप भूक लागलीय . तुझ्या घरी जे काही खायला आहे ते मला लवकर दे . माझ्याबरोबर तूही खा . न घाबरता . मग मी माझे पुढचे प्लॅनिंग तूला सांगेन .”

मी मुकाट्याने आत जाऊन माझ्या जेवणाच्या डब्याचे दोन भाग करून घेऊन आले . पाणी आणले . जणू काही तो मालक आणि मी नोकर ! जेवायच्या आधी खिशातून त्याने थर्मामीटर सारखी नळी काढली आणि प्रत्येक पदार्थात बुडवून निरीक्षण केले .” आम्हाला फूड पॉयझिनींगचा धोका फार . ! मी खाण्याचे सगळे चेक करूनच खातो . हे माझे फूड पॉयझनिंग चेक करायचे मशिन . अमेरिकेत तयार झालेय पण उपयोग होतोय मला .”

माझ्याकडे पहात मिश्किल हसत लादेन म्हणाला,” तुमचे जेवण छान आहे हं ! इथे रहायला आवडेल मला . फक्त तू चांगले कोऑपरेशन घ्यायला हवस . माझं सगळं ऐकायलाही हवस . त्या मोबदल्यात वाटेल तेवढे पैसे – सोनं देईन मी तूला . ऐकतो आहेस ना? .उद्या सकाळी फिरायला जाशील : … हो ‘ माहिती आहे मला .. तर त्या वेळी मी देईन त्या गोळ्या तुमच्या गावातल्या मुख्य इमारतींच्या गेटपाशी ठेवून ये. तू घरी पोहोचेपर्यंत त्या जमीनदोस्त झाल्या असतील . पण हां, वाटेत कुणाला काही सांगण्याचा, कुणाशी बोलण्याचा प्रयत्न जरी केलास, तरी तुझा सर्वनाश अटळ आहे हे विसरू नको”.

बापरे! बॉम्बिंग सारखं त्याचं बोलणं ऐकून आणि माझा तो करत करत असलेला वापर ऐकून मी हादरून गेलो . माझी ‘ सुटका कशी होणार यातून ? माझ्याकडून हा अशी वाईट कृत्य का करवून घेतोय? कसा थांबवू हा अशी वाईट का करवून घेतोय? कसा थांबवू हा सर्वनाश ? माझ्या गावाचा … माझ्या देशाचा ?

क्रमशः …..

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जागर… ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  मनमंजुषेतून ?

☆ जागर… ☆ सौ राधिका भांडारकर 

नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मी माझे काही विचार या लेखातून मांडण्याचा प्रयत्न करते—-

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम:

नम:प्रकृत्यै  भद्रायै नियत:प्रणता स्मताम् ।।

अश्विन शुद्धप्रतिपदेपासून घरोघरी घटस्थापना होते. देवीचे मूर्त तेज वातावरण उजळते.मंत्रजागर, आरत्या, यांचा नाद घुमतो.उदबत्त्या ,धूपार्तीचे सुगंध दरवळतात. दररोज नवनवे नैवेद्य देवीला अर्पण केले जातात. नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रेही परिधान केली जातात. सर्वत्र उत्साह, मांगल्य, पावित्र्य पसरलेले असते.

लहानपणापासून आपण एक कथा  ऐकत आलो आहोत– महिषासुराची.  या महिषासुराने पृथ्वी आणि पाताळात  अत्याचार माजवला होता. आणि त्यास स्वर्गाचे राज्य हासील करायचे होते. सर्व देव इंद्रदेवांकडे जाऊन ,महिषासूरापासून रक्षण करण्याची प्रार्थना करतात. इंद्र आणि महिषासुरात युद्ध होते व या युद्धात इंद्रदेव पराभूत होतात. हतबल झालेले देव ब्रह्मदेवाकडे येतात.व आसुरापासून रक्षण करण्याची विनंती करतात. महिषासुराचा वध हा मनुष्यमात्राकडून होणे असंभव होते. मग ब्रह्मा, विष्णु,महेश यांच्या तेजातून एक स्त्रीशक्ती निर्माण केली जाते. ही स्त्रीशक्ती म्हणजेच आदीमाया.–“ आदीशक्ती.दुर्गामाता.”

शंकराचे त्रिशूळ, विष्णुचे चक्र, वरुणाचा शंख, यमाची गदा, तसेच कमंडलु, रुद्राक्ष, अशा दहा शस्त्रांची परिपूर्ण शक्ती…दशभुजा दुर्गा..सर्वशक्तीमान रुप– तिचे आणि महिषासुराचे घनघोर युद्ध होते. व महिषासुराचे दारुण मर्दन होते. म्हणून ही महिषासुरमर्दिनी—सिंहारुढ ,पराक्रमी, तेज:पुंज देवी.

नवरात्रीचे ,महाराष्ट्रात आणखी एक विशेष म्हणजे भोंडला. भोंडला म्हटले की शालेय जीवनातले दिवस आठवतात. नवरात्रीत सगळ्या सख्या,नऊ दिवस वेगवेगळ्या सखीकडे जमतात. पाटावर सोंडेत माळ धरलेल्या हत्तीचं चित्र काढायचं, अन् त्या पाटाभोवती फेर धरुन एकेक प्रचलित लोकगीतं गायची—तर असा हा भोंडला, भुलाई, हादगा —

ऐलमा पैलमा गणेश देवा

माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा।।

–अशी सुरुवात होऊन मग गाणी रंगत जातात. सख्या आनंदाने फुलतात. आणि मग शेवटी—

बाणा बाई बाणा स्वदेशी बाणा

गाणे संपले खिरापत आणा..।।

खिरापत ही गुलदस्त्यातील. ती ओळखायची. अन् नंतर चट्टामट्टा करायचा…नवरात्रीच्या या उत्सवातील, असा हा पारंपारिक खेळ…सामुहिक आनंदाचा सोहळा.

अर्थात् नवरात्र म्हणजे देवीचाच उत्सव. तिची शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा ,कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री ही निरनिराळी नऊ नावे असली, तरी ती त्या एकाच आदीशक्तीची विविध रुपे आहेत. देवीच्या कथाही अनेक आहेत. पण सामाईकपणे ही नारीशक्ती आहे.आणि तिचा अवतार,अहंकार, क्रोध, वासना, पशुप्रवृत्ती, यांचा संहार करण्यासाठीच झाला आहे…

दरवर्षी नवरात्री उत्सवात या सर्वांचं,मोठ्या भक्तीभावाने  पूजन,पठण होते. गरबा, दांडीयांचा गजरही या आनंदोत्सवाला सामायिक स्वरुप देतोच..

पण मग एका विचारापाशी मन येऊन ठेपतं—-आपले सर्वच सण, हे आध्यात्मिक संदेश घेऊन येतात..अर्थपूर्ण.नैतिक संदेश.—पण उत्सव साजरे करताना या संदेशाचं काय होतं..?

ज्या स्त्रीशक्तीची नऊ दिवस पूजा केली जाते, दहाव्या दिवशी अनीतीचा रावण जाळला जातो, आणि मग अकराव्या दिवसापासून पुन्हा तीच हतबलता…??

खरोखरच स्त्रीचा सन्मान होतो का? स्त्री सुरक्षित आहे का आज? ज्या शक्तीपीठाची ती प्रतिनिधी आहे , त्या स्त्रीकडे किंवा त्या स्त्रीबाबत विचार करण्याचा समाजाचा दृष्टीकोन नक्की कसा आहे ?  —-आज तिच्या जन्माचा आनंदोत्सव होतो का? का तिला उमलण्याच्या आतच खुडलं जातं…?

ज्या पवित्र गर्भातून विश्वाची निर्मीती होते, त्या देहावर पाशवी,विकृत वासनेचे घाव का बसतात…?

विद्रोहाच्या घोषणांनी काही साध्य होते का?–समाजासाठी मखरातली देवी,आणि आत्मा असलेली, चालती बोलती स्त्री.. ही निराळीच असते का?—–

असे अनेक प्रश्न ,अनेक वर्षे युगानुयुगे,अगदी कथांतून, पुराणातून, इतिहासातून व्यक्त झाले आहेत.

आणि आजही ते अनुत्तरीत आहेत.

स्त्रीचा विकास झाला म्हणजे नक्की काय झाले? ती शिकली. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झाली. उच्चपदे तिने भूषविली,  तिच्या वागण्या बोलण्यातही फरक पडला. तिचा वेशही बदलला. ती आत्मनिर्भरही  झाली—-पण तिचा संघर्ष संपला का? तिचे हुंदके,तिची घुसमट,तिची होरपळ..आहेच त्या चौकटीत—एका मोठ्या रेषेसमोरची ती एक लहान रेषच–दुय्यमच. म्हणून डावलणं आहेच. सन्मान कुठे आहे तिचा…? 

मग हा जागर कधी होणार? तिच्या सामर्थ्याचं त्रिशूळ, बुद्धीचं चक्र, विचारांची गदा, सोशिकतेचं कमंडलु ,भावनांची रुद्राक्षं, तेजाचे तीर —जेव्हां धार लावून तळपतील ,तेव्हाच या शक्तीपीठाचा उत्सव सार्थ ठरेल…

नवरात्री निमित्ताने जोगवा मागायचाच असेल तर  स्त्री-जन्माच्या  पावित्र्याचा. .मांगल्याचा .शक्तीच्या आदराचाच असला पाहिजे हे मनापासून वाटते…

हे देवी ! तुझ्या दशभुजा, सर्व शस्त्रांसहित पसर आणि तुझ्या दिव्य तेजाचंच दर्शन दे…..!!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देणाऱ्याची भूमिका कशी असावी ? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

 ☆ देणाऱ्याची भूमिका कशी असावी? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

आमच्या जी. एस्. मेडिकल कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापटांच्या एकत्रित काव्यवाचनाचा कार्यक्रम ठेवला होता. शनिवार दुपार होती ती. कार्यक्रम रंगला. संपला. मी या मंडळाचा त्या वर्षाचा कार्यवाह. मानधनाची पाकिटे तिन्ही कविवर्यांना दिली. 

विंदा म्हणाले, “तुमचे हाडाचे हॉस्पिटल कुठे आहे?”

“टाटाच्या समोर… जवळच आहे…. पाहायला जायचं आहे का कुणाला? …” मी म्हणालो.

विंदांचा वाटाड्या होऊन आम्ही ऑर्थोपेडीक सेंटरमध्ये गेलो. काही रुग्णांचा मुक्काम तिथे अनेक महिने असायचा. विशेषतः फ्रॅक्चरचे रुग्ण. घरात संडासापासूनच्या सोयीची कमतरता. त्यामुळे हॉस्पिटलात सक्तीचा निवास. नवीन पेशंट्सचा दट्ट्या असायचा. मग वॉर्डातले काही पेशंट्स पॅसेजमध्ये यायचे. पॅसेजमधून वॉर्डाबाहेरच्या मोकळ्या जागेत.

विंदाना ज्या बाईंना भेटायचं होतं त्या अशाच एका पॅसेजमध्ये होत्या. शाहीर अमर शेखांच्या पत्नी. आम्ही त्यांना “शोधून” काढलं. विंदांनी त्यांची चौकशी केली. खिशातून पाकीट काढलं. आमच्या मंडळाने दिलेल्या मानधनाच्या पाकिटात त्यांनी जिना चढतानाच थोडे पैसे (स्वतःजवळचे) भरले होते. ते पाकिट त्यांनी बाईंच्या हातात दिलं. 

“औषधासाठी होतील म्हणून शिरूभाऊंनी दिले आहेत. मी आज इथे कार्यक्रमाला येणार होतो. म्हटलं नेऊन देतो.”

थोड्या वेळाने आम्ही बाहेर पडलो. मीही विंदांबरोबर बसस्टॉपवर आलो. विचारू की नको अशा मनातल्या गोंधळावर मात करत मी प्रश्न विचारला. तोही घाबरतच. 

“तुम्ही त्यांना मदत केलीत, पण शिरूभाऊंचे नाव का सांगितलंत?…” 

शिरूभाऊ म्हणजे बहुधा त्यांचे मित्र श्री. ना. पेंडसे असावेत.

विंदांनी त्यांच्या खास नजरेने माझ्याकडे आरपार बघितलं.

 “असं बघा… घेणाऱ्याचं मन आधीच बोजाखाली असतं की आपल्याला कुणाकडून तरी मदत घ्यावी लागतेय… अशावेळी याचक होतं मन. देणाऱ्याकडून समोरासमोर घेताना त्रास वाढतो. कमी नाही होत… अशावेळी आपण निरोप्या झालो तर समोरच्याचा त्रास वाढत तरी नाही… शेवटी महत्त्वाचं काय… त्या व्यक्तीला मदत मिळणं… कुणी केली हे नाही….”

माझी विंदांशी काही ओळख नाही. ही आमची शेवटची भेट. पण माझ्या मनात त्या वेळी लागलेले हजारो वॅटचे लाईट अजून विझलेले नाहीत.

 देणाऱ्याने देताना, घेणाऱ्याच्या भूमिकेत स्वतःला नेणे …. ते सारे क्लेष क्षणभर अनुभवणे  …..  पुन्हा देण्याच्या भूमिकेत येणे …  आणि  “इदं न मम” असं म्हणत यज्ञवृत्तीने दान करणे.

मी empathy ची व्याख्या मानसशास्त्राच्या पुस्तकातून शिकण्याआधी कवीकडून शिकलो याचा मला अभिमान आहे…

 

डॉ. आनंद नाडकर्णी

(विषादयोग)

 

संग्राहक : सुहास पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ केळवे गावची श्री शितला देवी ☆ संग्रहिका – सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ? 

☆ केळवे गावची श्री शितला देवी ☆ संग्रहिका – सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

  !!   तू केळव्याची शितल आई 

       तुझ्या महतीची ही पुण्याई

       तुझ्या कीर्तीनेच धाव घेती जर्जर

       तुझ्या प्रसादाने मुक्त होती सत्वर

       तुझी थोरवी ही देशोदेशी जाई  !!

  

मनाला शितलता देणारी केळव्याची केळवे गावची श्री शितला देवी

केळव्याच्या समुद्र किनाऱ्या जवळ असलेले श्री शितला मातेचे सुंदर आणि अति प्राचीन मंदिर आहे. मंदिरात अतिप्राचीन अशी तेजस्वी शितला मातेची मूर्ती आहे. केळवे गावाचे प्राचीन नाव कर्दलीवन केळवे हे एक बेट आहे… गावाला पौराणिक आणि ऐतिहासीक महत्व लाभले आहे…. राम वनवासात असताना त्याचा प्रवास केळवे (कर्दलीवन) या  गावतून झाला होता अशी आख्यायिका आहे. या मंदिरात अतिप्राचीन अशी तेजस्वी शितला मातेची मूर्ती आहे.. 

चैत्र शुद्ध पौर्णिमेला श्री शितलाईची खूप मोठी यात्रा भरते.. नवरात्रोत्सव आणि यात्रोत्सव हे दोन देवीचे उत्सव मानले जातात..  नवरात्रोत्सवात संपूर्ण मंदिर आणि परिसरातील दिव्यांची रोषणाई केली जाते.. देवीपुढे नऊ प्रकारची धान्ये पेरतात नऊ घर रामकुंडातल्या पाण्याने भरून स्थापिले जातात.. रोज झेंडू फुलांच्या दोन माळा देवीसमोर टांगल्या जातात.. देवीला नूतन वस्त्रांनी, अलंकारांनी सजविले जाते 

भरजरी कपड्यांनी सुवर्णलंकारांनी नटलेल्या देवीचे अतिशय विलोभनीय सौंदर्य व तेजस्वी रूप डोळ्यांत साठवत आपण तिच्या समोर आपोआप नतमस्तक होतो..

नऊ दिवसात रोज निरनिराळे कार्यक्रम सादर होत असतात.. भजन, कीर्तन, गायन इ. कार्यक्रम उत्साहाने होत असतात.. अष्टमीला होमहवन होतो..यावेळी मातेचे दर्शन अतिशय विलोभनीय व  सुखकारी असते.. माता दोन्ही हातांनी भाविकांना भरभरून देते. 

या मंदिराचा जिर्णोद्धार अहिल्याबाई होळकर ह्यांनी केला होता. शितला मातेच्या मंदिरात सिद्धीविनायक, पार्वती बरोबर शंकराची पिंडी स्थानापन्न आहे.. मंदिराच्या बाहेर हनुमानाचे छानसे मंदिर आहे. शितला मातेच्या समोर राम कुंड आहे.. सितामातेला जेव्हा तहान लागली होती तेव्हा श्री रामाने आपल्या बाणाने त्या तलावाची निर्मिती केली होती अशी आख्यायिका प्रचलीत आहे आणि म्हणून ह्या तलावाला रामकुंड असे म्हणतात.  हनुमान जयंतीच्या दिवशी शितला देवीची यात्रा उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा होतो..  यात्रा उत्सव कालावधीत शितलादेवी मंदिराच्या आजुबाजूचा परिसर आनंदाने, रोषणाईने आणि भक्त भाविकांच्या अलोट गर्दीने भरुन गेलेला असतो…

हे शितला देवी तू जगाची माता तूच जगाचा पिता आणि तूच जग थारण करणारी आहेस अशा शितला देवीला

माझा नमस्कार…

संग्रहिका –  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares