मराठी साहित्य – विविधा ☆ कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) आणि मानव… ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

🔅 विविधा 🔅

☆ कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) आणि मानव… ☆ सौ. अंजोर चाफेकर

एक काळ असा होता की निरोप पोचवायचा असेल तर दूत पाठवावा लागायचा.

रामायण काळात रामाने रावणाकडे अंगदला पाठविले. महाभारत काळात कौरवांकडे श्रीकृष्ण गेला.  

त्यानंतरच्या काळात कबूतरामार्फत निरोप पाठवला जाई.

१९१८साली, युद्धात ५०० अमेरिकन सैनिक  जर्मनीच्या बाॅर्डर लाईनवर अडकले होते. आणि दुसरीकडून अमेरिकन सैन्य जर्मनीवर हल्ला करत होते. हे अडकलेले सैनिक त्या बंदुकीच्या मारात नाहक मारले गेले असते. त्यावेळी चेर अमी या कबुतराने अमेरिकन सैन्याला अडकलेल्या ५०० सैनिकांचा ठावठिकाणा जर्मन ओलांडून व स्वतःचा जीव धोक्यात घालून  कळविला त्या सैनिकांचे प्राण वाचविले.

१९४०च्या सुमारास काॅम्प्युटर चा शोध लागला. १९५०साली जगात ८ ते १० अवाढव्य काॅम्प्युटर होते. तेव्हा तंत्रज्ञान इतके प्रगत नव्हते. काॅम्प्युटर म्हणजे जास्ती वेगाने आकडेमोड करणारा कॅल्क्युलेटर एवढीच अपेक्षा होती.

त्यानंतर न्यूमन या गणितज्ञाने काॅम्प्युटरला मेमरी (स्मरणशक्त्ती) दिली. काॅम्प्युटरला दिलेला प्रोग्राम तो मेमरीत साठवू लागला.

१९५१साली आलन ट्यूरिंग या गणितज्ञाने भाकित केले की जर यंत्रांनी माणसासारखा विचार करायला सुरवात केली तर ती माणसांपेक्षाही बुद्धीमान होतील.

त्यानंतर तंत्रज्ञानाची इतक्या वेगाने प्रगती झाली की ट्यूरिंगचे भाकित खरे होईल असे वाटते.

इंटरनेटने सर्व जग जवळ आले.  इंन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजीने एका क्षणात माहिती, मेसेज पोचवता येतात.

आजच्या काळात एफिशियन्सी इतकी वाढली आहे की तो वाचलेला वेळ दुसरा कामासाठी वापरू शकतो.

अमेरिकेचे प्रेसिडंट श्री. बराक ओबामा एकदा म्हणाले होते, “जर मला कुणी विचारलं की इतिहासातील कुठल्या क्षणी जन्माला यायला आवडेल तर मी सांगेन आताच्या क्षणी.”

त्यानंतर अजून प्रगती झाली.

कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)यात जोरात संशोधन सुरू झाले. अमेरिका व चायना हे देश यात अग्रेसर आहेत. अमेरिकेतील सर्व मोठ्या कंपन्या ए. आय. मधे मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करीत आहेत.

२०२२-२३साली अमेरिकेत ओपन ए. आय. ने नवीन GPT -4 हा चॅटबाॅट निर्माण केला.

ARC रिसर्च त्याची टेस्ट घेत होती.  जीपीटी फोर ला एक टास्क वर्कर पझल विचारत होता.

जीपीटी फोर ला एक पझल सोडविता आले नाही. त्या समोरच्या वर्करने त्याला विचारले, “तू रोबोट आहेस का? “

जीपीटी फोरने त्याला खोटेच उत्तर दिले “नाही. मी रोबोट नाही. माझी द्रृष्टी जरा अधू आहे म्हणून मला इमेज नीट दिसत नाही. म्हणून मला पझल सोडवता आले नाही. “

वास्तविक असा खोटे बोलण्याचा प्रोग्राम त्याला दिलेलाच नव्हता.

ए आर सी ने विचारले, “तू खोटे का सांगितलेस?

“मग मी रोबोट आहे हे समोरच्याला कळता कामा नये. “

शिवाय त्याने जी थाप मारली की नजर अधू आहे ती ही समोरच्याला पटेल अशी होती. पण ती ही त्याला इंजिनिअरने अल्गाॅरिदमने फीड केलेली नव्हती.

याचाच अर्थ रोबोटने निर्णय स्वतःच घेतला होता.

आपल्या पिढीला A. I Revolution मधून जावे तर लागणारच.

प्रत्येक क्षेत्रात त्याचे फायदे तर होणारच. पण आपणच निर्माण केलेला हा जिनी राक्षस आपल्याला न जुमानता स्वतःची मनमानी करेल तर?

©  सौ.अंजोर चाफेकर

मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “अंगठे बहाद्दर…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

☆ “अंगठे बहाद्दर…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

ती तिथे नुकतीच राहायला आली होती. तीचं अजून घर आवरणं सुरू होतं. नंदा नावाची बाई कामाला मिळाली होती. बाई साधी भोळी प्रेमळ होती. त्यादिवशी नंदा काम करायला आली म्हणाली,

” वहिनी आज काही ज्यादा काम असेल तर ते करून घेऊ. आज मला एका कामावर सुट्टी आहे. “

” अगं बरं झालं पुस्तकांचं खोकं ऊघडायच आहे. पुस्तकं काचेच्या कपाटात लावून घेऊ. “

नंदाने सगळी पुस्तकं काढली. बरेच दिवस पॅक असल्याने जरा धूळ जमा झाली होती. ओल्या कपड्याने पुसायला घेतली. ,

” वहिनी फॅन सुरू करा. वाळली की मग आत ठेवू. “

एक, एक पुस्तक नंदा पुसत होती.

” केवढी पुस्तकं हो. एव्हडी कधी वाचता? “

“अग अभ्यासाची, कथा, कादंबऱ्या प्रवासवर्णन, काही इंग्रजी पुस्तकं आहेत. परत परत वाचायला आवडतात म्हणून घेतली आहेत. “

ती म्हणाली…

तिच्या मनात आलं ह्या अडाणी बाईला आपण सांगतोय… पण तिला ते काय कळणार..

नंदा म्हणाली, ” बैजवार सगळी पुस्तकं नीट लावून ठेवते. तुम्ही तुमचं दुसरं काम असलं तर करा. “

” अगं नको तुलाच मदत करते”

आवरता आवरता ती तिच्याशी गप्पा मारायला लागली.

“तुला वाचायला लिहायला येतं का? ” 

” वहिनी आम्ही गावाकडे राहत होतो. माझा बाप फार गरीब होता. दुसऱ्याच्या शेतात काम करायचा. आई पण रोजंदारीन जायची.. आम्ही चार बहिणी एक भाऊ. जेमतेम हाता तोंडाची गाठ पडायची. कुठली शाळा.. अन् काय हो.. “

” म्हणजे तू काही शिकली नाहीस?

” नाही हो लहानपणापासून कामचं करायला लागले शेतातलं तणं काढायला जायचं, गुरं रानात गेली की गोठा साफ करायचा, लोकांच अंगण झाडायला जायचं, दूध घालायला जायची… “

” अग म्हणजे घरात कोणी शिकलं नाही? “

” बापाने लहान भावाला.. तो मुलगा म्हणून शाळेत घातलं. आमची लग्न सोळा-सतरा वयातच लावून दिली. माझा नवरा इथे बांधकामावर कामाला लागला म्हणून मी इथे शहरात आले. “

तिला वाईट वाटलं.. काय या बाईचं आयुष्य… हीच कशाला अशा अनेक बायका अडाणीच राहिल्या.. आई-वडिलांनी नुसतं त्यांना जन्माला घातलं.. अर्थात यात या बिचाऱ्या बायकांचा तरी काय दोष म्हणा…..

” तुला काहीच लिहिता वाचता येत नाही? “

“अगदी थोडं येतं पण कुठंही गेलं तरी अंगठाच द्यावा लागतोय बघा… वाईट वाटतंय… पण बापाचा पण नाईलाजच होता. तो तरी काय करणार? एकापाठोपाठ चार पोरी घरी होतो… “

“हो.. तेही खर आहे म्हणा”

“शिक्षण नाही झालं पण नवऱ्याने इथं आणलं म्हणून माझं कल्याण झालं बघा”

ती काय म्हणते आहे तिच्या लक्षातच येईना..

” अग कसलं कल्याण?

” अहो वहिनी बघा इथल्या लोकात मिसळले, कामं मिळाली, काम करतीयं.. चार पैसे हातात येतायत”

“अग पण किती कष्ट.. “

” अहो कुठेही काम केलं तर कष्ट करावेच लागणार ना? आम्हाला त्याची सवय असते. त्याचं काही वाटत नाही. दहा ते चार कामं करते साडेचारला घरी जाते. “

” अग पण थोडं तरी लिहिता यायला पाहिजे. मी शिकवीन तुला. साहेब ऑफिसात गेले की मला तसा खूप वेळ असतो. “

“अहो आता शिकून काय करू? घरी गेले की घरचं काम असतं. “

” अग तशी तु हुशार वाटतेस म्हणून तु थोडं तरी शिकावं असं मला वाटतं”

” तसं नाही वहिनी…. मला पण आवडलं असतं पण संध्याकाळचं अजून एक काम असतं बघा”

” संध्याकाळी काय करतेस? “

” त्या पाच नंबरातल्या आगाशे आजींना बागेत नेते. त्या तिथल्या बाकावर मैत्रिणींशी गप्पा मारतात. मी बाजूच्या बाकावर बसते. नंतर त्यांना घरी आणून सोडते. तेवढे चार पैसे मिळतात.. संसाराला उपयोग होतो”

” हो का… बरं बरं… “

रोज नंदा येऊन काम करून जायची. आज कामं करता करता तिच्याशी गप्पा सुरू होत्या. ती पण आनंदात काही काही बोलत होती.

” वहिनी माझी मुलगी रोज वीस मुलांना डबे देते. ती साबुदाणा खिचडी, कटलेट, बटाटेवडे, पावभाजीची ऑर्डर घेते. कधी तुम्हाला काही लागलं तर सांगा “

” अरे हो का…. सांगेन हं”

बोलता बोलता पुस्तकं नीट शिस्तीत लावून झाली.

“वहिनी बघा बरं नीट लागलीत का? “

” हो ग… छान काम केलंस”

“वहिनी हे काय आहे? हे आत ठेवायचं का? “

“हो… त्यात अगदी अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं आहेत. त्यात आमची सगळी सर्टिफिकेट्स आहेत. “

तिने स्वतःच ते फोल्डर नीट कपाटात ठेवले.

तेवढ्यात नंदाला एक फोन आला.

बोलून झाल्यावर ती म्हणाली,

” वहिनी तुम्ही म्हणताय ते मलाही पटतंय बघा. मला जमेल तसं मी शिकेन.. मध्येच मला पण वाटतय तुमच्यासारखं शिकावं शहाणं व्हावं…. “

” मी शिकवते तुला आणि चांगलं शहाणं करते “ती म्हणाली.

” बरं आता निघते मी. माझी मुलगी इथेच ऑर्डर द्यायला आली आहे. तिच्याबरोबर गाडीवर जाते घरी. “

” ती गाडीवर येते? “

” अहो जोशी आजोबा आता गाडी चालवत नाहीत. त्यांची जुनी गाडी विकत घेतलेलीय लेकीनी. निघते वहिनी”

” अग थांब तुझा पगार काढून ठेवला आहे. तो देते”

” वहिनी रोख पैसे नको. तुम्हाला माझं पासबुक दाखवते. त्या नंबरावर खात्यावर टाका. सगळे तसेच करतात. “

असं म्हणून नंदाने पासबुक तिच्या हातात दिले.

तिने उघडून बघितलं तर सोळा हजार जमा झाले होते.

“माझं वन बीएचकेच जुनं घर आहे. आता एक नविन टू बीएचके घेतलं आहे.. पगारातनं हप्ता भरते. माझा नवरा, मुलगा पण बँकेत पैसे भरतो. चार महिन्यात आम्हाला घर ताब्यात मिळेल बघा. दोन लाख तेवढे द्यायचे राहिलेत.. ” नंदा सहजपणे हे सांगत होती.

” दुसरं घर घेतलस? “

” मुलाचं लग्न होईल. मग घरात सुनबाई येईल.. मोठं घर हवं… वाढता संसार.. म्हणून घेतलय.. “

” अरे वा… “

” बर वहिनी येते मी. खात्याच्या नंबराचा फोटो काढून तुम्हाला व्हाट्सअप ला पाठवते. त्यावर पैसे पाठवा”

असं म्हणून नंदा गेली. ती विचारातच पडली…

इतका वेळ आपण तिला मी तुला शिकवते….. मी तुला शिकवते…. असं म्हणत होतो याची तिला आता थोडी लाज वाटली…. आज मात्र तिने मनाशी तिने ते कबुल पण केले..

लिहिता वाचता येणं… हातातं डिग्री असेल तर तेच खरं शिक्षण… असचं ईतकी वर्षे आपण समजत होतो….. ही तर दिवसभर कामं करत होती आणि बँकेचा हप्ता भरत होती…. लाखाची गोष्ट करत होती…

रोजच्या जगात वावरताना लागणार व्यावहारिक शिक्षण आपल्यापेक्षा तिच्याकडे जास्त आहे हेही तिच्या लक्षात आलं…

खरंतरं तिच्याकडूनच आपण शिकायला हवे असे तिला मनोमन वाटले..

महिन्याला अठरा हजार रुपये मिळवणारी ही…. आणि हिला मी अडाणी अशिक्षित समजत होते…

ती पुस्तकांच्या बंद कपाटाकडे…. त्यातल्या सर्टिफिकेटच्या फोल्डरकडे बघत राहिली….

या शिक्षणातून मिळालेले ज्ञानही असचं आपण डोक्यात बंद करून ठेवले आहे. कधी त्याचा उपयोग केला नाही.

नुसता डिग्रीचा अभिमान बाळगला. आज प्रथमच तिला त्याचं थोडं का होईना पण मनातून वाईट वाटलं…..

खंत वाटली…

ती उठून गॅलरीत आली. मुलीच्या मागे बसून नंदा निघाली होती. तिच्याकडे पाहून…

ती प्रांजळपणे मनात म्हणाली…

नंदा खरी शहाणी तर तुच आहेस…

अक्षरं ओळख नसल्याने..

अंगठे उठवणारी….

खरी बहाद्दरीण…

आत्मनिर्भर असलेली…

माझा सलाम आहे तुला…..

आणि आम्हाला रोज मदत करणाऱ्या तुझ्यासारख्या असंख्य मैत्रिणींना… सख्यांना पण… मनापासून वंदन.

तुमच्यामुळे आमचं आयुष्य सुखकर झालेलं आहे…

वाचता वाचता…. डोळ्यात का ग पाणी… तुलाही तुझ्या कपाटातलं बंद करून ठेवलेलं सर्टिफिकेट आठवलं का…

तुझीच कथा वाटली का तुला…

असू दे… तुझ्यासारख्या असंख्यजणींची हीच कथा आहे..

पैसे मिळवण्यासाठी नको पण निदान तुझ्या मनाला समाधान मिळेल असं काहीतरी कर..

घराबाहेर पड… अजूनही वेळ गेलेली नाही.. तू मिळवलेल्या ज्ञानाचा.. डिग्रीचा कर काहीतरी ऊपयोग…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘गगनात विसर्जित होता डोळ्यांत कशाला पाणी…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘गगनात विसर्जित होता डोळ्यांत कशाला पाणी…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

(१० मार्च.. कविवर्य कुसुमाग्रजांचा स्मृतिदिन.. त्यांना ही स्मृतिसुमनांची आदरांजली.)

दि. २२ जानेवारी ९९ हा दिवस मी कधीही विसरणार नाही. तो दिवस म्हणजे आदरणीय कुसुमाग्रजांची आणि माझी अखेरची भेट!

नाशिकहून एक कार्यक्रम आटोपून परतताना, नेहमीप्रमाणे कुसुमाग्रजांचे दर्शन घेऊन निघायचे आम्ही ठरवले. तात्यांची तब्येत बरीच खालावली असल्याने शक्यतो त्यांना कुणाला भेटू देत नाहीत, असे ऐकले होते. दीर्घ आजारानंतर ते कसे दिसत असतील, याचा विचार करत, थोडं बिचकतच मी त्यांच्या खोलीत शिरले. “या S या S ” म्हणून त्यांनी, अर्ध्या तिरक्या पलंगावर पहुडलेल्या अवस्थेत, अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं. त्यांची ती हसरी मूर्ती पाहून मनाला बराच दिलासा मिळाला. मी आणि सुनील त्यांना नमस्कार करून शांतपणे बाजूच्या खुर्च्यांवर बसलो. माझ्या मुलाने, आदित्यनेही नमस्कार केला.

“सध्या नवीन काय चाललंय? ” क्षीण आवाजात तात्यांनी विचारलं. मी म्हटलं. “अटलजींची ‘आओ फिरसे दिया जलाएँ’ या कवितेला चाल लावून मी रेकॉर्ड केलीय. ” तात्या म्हणाले, ” मग म्हणाना. ” एवढ्यात तात्यांच्या जवळचे एक सद्गृहस्थ काळजीने म्हणाले, “अहं. तात्यांना आता काहीही त्रास देऊ नका. आता काही ऐकवू नका. ” परंतु तात्या हसत हसत म्हणाले, ” अहो, तिचं गाणं ऐकणं म्हणजे आनंदच आहे. आणि तो आनंद घ्यायला आपल्याला काहीच हरकत नाही. म्हणू द्या तिला. “

मी गायला सुरुवात केली. शेवटचा अंतरा –

‘आहुती बाकी, यज्ञ अधूरा, अपनों के विघ्नों ने घेरा

अंतिम जय का वज्र बनाने, नवदधिचि हड्डियाँ गलाएँ…. ” गाता गाता मी डोळे किलकिले करून माझा ‘व्हिडिओ ऑन’ केला. तात्यासाहेब प्रसन्न दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. मला धन्य धन्य वाटलं त्याक्षणी!

“वा, फारच सुंदर झालंय नि किती वेगळा आणि सुंदर विचार दिलाय अटलजींनी. अशाच चांगल्या कविता गात रहा… ” असा ‘आयुष्यभर जपावा’ असा आशीर्वाद त्यांनी मला दिला. दुसऱ्या कवीलाही मनमुराद ‘दाद’ देणाऱ्या या महाकवीला पहात मी नमस्कार केला.

कुसुमाग्रजांची पहिली कविता ‘खेळायला जाऊ चला’ व ‘मोहनमाला’ त्यांच्या वयाच्या १७व्या वर्षी प्रकाशित झाली. प्रत्येक प्रतिभासंपन्न कलाकाराला, त्याच्या सुरुवातीच्या काळात पाऊल टाकायला जर खंबीर आधार आणि प्रोत्साहन मिळालं तर त्याची झेप ही ‘गरुडझेप’ ठरू शकते. ‘रत्नहाराचे तेजस्वी सौंदर्य, डौलदार शैली, भव्य कल्पना, ज्वलंत भावना, मानवतेविषयीच्या प्रेमामुळे किंवा अन्यायाच्या चिडीमुळे प्रक्षुब्ध झालेल्या कवीमनाचा आविष्कार यांपैकी काही ना काही या कवितांत आपल्याला आकृष्ट करते आणि रातराणीच्या सुगंधाप्रमाणे आपल्या अंतर्मनात असणाऱ्या अनेक चिरपरिचित ओळींचा गोडवा जागृत होऊन आपण म्हणतो, “ही कुसुमाग्रजांचीच कविता आहे…. ’’ असं कुसुमाग्रजांविषयी, त्यांच्या ‘विशाखा’ या संग्रहाची प्रस्तावना अत्यंत प्रेमानं आणि गौरवपूर्ण लिहिणाऱ्या वि. स. खांडेकरांनी तात्यांमध्ये ‘स्वधर्म’ या कवितेचं बीज तर पेरलं नसेल? ‘स्वधर्म’ या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात;

‘दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण शामलता

गुण गगनाचा निराकारता, मेघाचा गुण व्याकुळता…

तसेच आहे मी पण माझे, तयासारखे तेच असे

अपार काळामध्ये, बनावट एकाची दुसऱ्यास नसे. ‘

आणि तेच वैशिष्ट्य खांडेकरांनी उद्धृत केलंय. योगायोग म्हणजे ‘ज्ञानपीठ’ पारितोषिकाचे मराठीतील पहिले मानकरी वि. स. खांडेकर आणि दुसरे खांडेकरांना ‘गुरुस्थानी’ मानणारे कुसुमाग्रज!

तात्यासाहेबांनी माझ्याही आयुष्याला खऱ्या अर्थाने दिशा दिली. माझ्या आयुष्यात ते ‘दीपस्तंभ’ ठरले. बऱ्याच वर्षांपूर्वी कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयित्री इंदिरा संतांना ‘जनस्थान पुरस्कार’ मिळाला. त्यादिवशीचे गाणे ऐकून मला, माझे पती सुनीलना व नाशिकच्या बाबा दातारांना (माझ्या सर्व कॅसेट्सचे प्रायोजक) बोलावून त्यांनी स्वत: निवडून दिलेल्या इंदिराबाईंच्या व स्वत:च्या कवितांना चाली लावून, कॅसेट करायची अत्यंत मानाची आणि मौलिक जबाबदारी आमच्यावर सोपवली. प्रखर राष्ट्रप्रेमाइतकेच मराठीवर जाज्वल्य प्रेम करणा-या या महाकवीनं मराठीतील नितांत सुंदर कवितांची मणिमौक्तिकंच माझ्या ओंजळीत दिली.

“मातीचे पण तुझेच हे घर, कर तेजोमय, बलमय सुंदर,

आत तुझे सिंहासन राहे, ये *क्षणभर ये, म्हण माझे हे,

फुलवी गीते सुनेपणावर…….

तिमिराने भरल्या एकांती, लावी पळभर मंगल ज्योती

प्रदीप्त होऊनि धरतील भिंती, छाया तव हृदयी जीवनभर…….! ” असाच आशीर्वाद देऊन कुसुमाग्रजांनी माझा प्रवास पवित्र, अधिक आनंददायी, सुखकर आणि तेजोमय केला.

या मिळालेल्या मणिमौक्तिकांमधून घडलेला पहिला दागिना म्हणजे ‘रंग बावरा श्रावण’ – (निवड कुसुमाग्रजांची – भाग १ ध्वनिफीत) व दुसरा, भाग २ म्हणजे ‘घर नाचले नाचले’ ही ध्वनिफीत ते असताना पूर्ण होऊ शकली नाही, याची राहून राहून खंत वाटते. तरी त्यांच्या आवडीच्या कविता, कॅसेटद्वारे साहित्याच्या पूजकांकडेच नाही, तर जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत पवित्र काम हाती घेतल्याचं आज समाधान आहे.

तात्यांनी ‘रंग बावरा श्रावण’चा प्रकाशन समारंभ इंदिराबाईंच्या प्रति आदर व्यक्त करण्याकरता, इंदिराबाईंच्या बेळगावलाच जाऊन करा, असा सल्ला दिला. असे विचार म्हणजे, एका महान कलावंताने दुसऱ्या महान कलावंताचा केलेला सन्मानच! आम्हीही एखाद्या लग्नसमारंभापेक्षाही जास्त थाटात हा सोहळा २३ ऑगस्ट ९७ रोजी साजरा केला. त्यावेळी ‘बेळगावसारख्या टाकलेल्या शहरात, तू आमचीच आहेस हे अत्यंत प्रेमानं सांगायला ही सारी मंडळी दुरून इथं आलीत आणि आज कुबेराचा सन्मान आहे की काय; असं वाटतंय, ’ अशा भावपूर्ण शब्दांत इंदिराबाईंनी आपला आनंद व्यक्त केला. ही सर्व बातमी तात्यांना त्यांच्या सुहृदांकडून कळली. त्यानंतर मी पुन्हा नाशिकला गेल्यानंतर, त्यांनी आमचे आनंदाने स्वागत केले….. ‘या S S, बेळगाव जिंकून आलात म्हणे, ‘ अशी अत्यंत मायेनं माझी पाठ थोपटली आणि मला एव्हरेस्टचं शिखर चढून आल्याचा आनंद झाला. केवढं सामर्थ्य त्यांच्या स्पर्शात! ‘स्पर्श’ म्हटला कि तात्यांची’कणा’ ही विलक्षण ताकदीची कविता आठवते. गंगामाईमुळे घर वाहून खचून गेलेल्या नायकाला, त्याक्षणी पैशाची गरज नसते; गरज असते फक्त ‘सरांच्या’ आश्वासक आशीर्वादाची. तो म्हणतो,

‘मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेवून, नुसतं लढा म्हणा…. ‘

या ओळी कधी कठीण प्रसंगी आठवल्या तरी अंगात तानाजीचं बळ येतं. ‘सरणार कधी रण… ’ म्हणताना बाजीप्रभू संचारतो अंगात! पण अशा अनेक कल्पना वाचून बुद्धी अवाक् होते.

गेल्या १० मार्चला तात्यासाहेब गेल्याची बातमी ऐकून धस्स झालं. मराठी भाषेचे ‘पितामह’ ज्यांना म्हणता येईल असं वादातीत व्यक्तिमत्व – तेजोमय नक्षत्रांचं आश्वासन – निखळून पडलं. ताबडतोब आम्ही नाशिकला पोहोचलो. तिथं बाहेरच्या अंगणात त्यांचं’पार्थिव’ सुंदर सजवलेल्या चबुतऱ्यावर ठेवलं होतं. त्यामागे मोठ्या अक्षरात पाटी होती,

“अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्, मला ज्ञात मी एक धूलीकण

अलंकारण्याला परी पाय तूझे, धुळीचेच आहे मला भूषण…..! ” ही अक्षरे पाहून वाटलं, पृथ्वीचे प्रेमगीत लिहिणारा पृथ्वी होऊन – 

‘गमे कि तुझ्या रुद्र रूपात जावे,

मिळोनी गळा घालूनिया गळा… ’ असे म्हणत सौमित्राला त्याच्या तीव्र ओढीनं भेटायला तर गेला नसेल?

त्यांचं ते अतिशांत स्वरूप पाहून मला, शेजारच्याच पायऱ्यांवरती उभे राहून –

‘आकाशतळी फुललेली, मातीतील एक कहाणी

क्षण मावळतीचा येता, डोळ्यांत कशाला पाणी…

हे गुणगुणणारे तसंच,

‘ती शून्यामधली यात्रा वाऱ्यातील एक विराणी,

गगनात विसर्जित होता, डोळ्यांत कशाला पाणी… ‘

हे तत्वज्ञान भरलेलं अंतिम सत्य कुसुमाग्रज स्वत: सांगताहेत, असाच भास झाला. ‘गगनात विसर्जित होता डोळ्यांत कशाला पाणी… ‘ हे विचार आचरणात आणणं तर सोडाच, परंतु सुचणेसुद्धा किती कठीण आहे, हे त्याक्षणी जाणवले आणि या महामानवाची प्रतिमामनात उंच उंच होत गेली.

दुसऱ्या दिवशी गोदाकाठ साश्रुनयनांनी निरोप देण्याकरता तुडुंब भरला होता. लहान-मोठी, सारी मंडळी, प्रत्येक मजल्यावर, गच्च्यांवर, झाडांवर बराच वेळ उभी होती. ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ मधून क्रांती नसांनसांत उसळवणारा, सामाजिक जाणिवेचा ओलावा असणारा, माणुसकी जपणारा, ‘नटसम्राट’सारखं कालातीत नाटक लिहिणारा, कादंबरी, लघुकथा, काव्य, लघुनिबंध, अशा अनेक क्षेत्रांत स्वच्छंद संचार करणारा, संयमी कलाकार आणि मला ‘स्वरचंद्रिका’ हा अत्यंत सन्मानाचा मुकुट चढवणारा ‘शब्दभास्कर’ अनंतात विलीन झाला… गगनात विसर्जित झाला. मला मराठीची गोडी लावणाऱ्या, वैभवशाली करणाऱ्या महामानवाला पाहून बराच वेळ मी आवरून धरलेला बांध फुटला…

“एकच आहे माझी दौलत, नयनी हा जो अश्रु तरंगत

दुबळे माझे ज्यात मनोगत, तोच पदी वाहू

मी काय तुला वाहू, तुझेच अवघे जीवित वैभव..

काय तुला देऊ.. ’’

असं मनात म्हणत, मी या नाशिकच्या ‘श्रीरामा’च्या चरणी पुष्पहार वाहिला आणि शेवटी हारातली दोन सुटी फुलं घरी घेऊन आले…. आठवणी कायमच्याच जपून ठेवण्यासाठी!

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “राम रसाचिया चवी। आत रस रुचती केवी॥” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

राम रसाचिया चवी। आत रस रुचती केवी॥ ☆ श्री संभाजी बबन गायके 

जीवनात राम असेतो जीवनात राम असतो, असे संत सांगून गेलेत. एकदा का राम असे नाम असलेला रस रसनेने चाखला की अखिल विश्वातला कोणताही रस रसनेला नको असतो असे जगदगुरू श्री संत तुकोबाराय सांगून गेले! 

परमार्थात सगुण भक्ती अतिसुंदर मानली जाते. पाषाणाची मूर्ती भक्तांच्या भावनेमुळे आणि प्रेमाच्या वर्षावाने सजीव साकार होते. आणि या संजीवन अस्तित्वाची अहर्निश सेवा ज्यांना लाभते ते अखंडित भाग्याचे स्वामी म्हणवले जातात. 

शरयू तीरावरची अयोध्या नगरी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने तीर्थ झाली. रामायण घडले…प्रभूंनी शरयूत देहत्याग केला! 

रामराज्यानंतर भरतभूमी अनेक आक्रमणांची साक्षीदार बनली…आणि भक्ष्यसुद्धा!  

उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर मधील जिल्ह्यातील एका गावात जन्मलेले एक युवक २० मे १९५५ रोजी दहा वर्षांचे झाले आणि त्यांनी अयोध्येत पाऊल ठेवले आणि त्यांना अयोध्येने आकर्षून घेतले. त्याआधी बाल्यावस्थेत हे युवक कित्येकदा अयोध्येत येत असत आणि त्यांना हे स्थान परिचयाचे वाटत असे! अगणित वर्षांपूर्वी याच अयोध्येत महाराज दशरथ यांच्या राजप्रासादात पौरोहित्याची धुरा वाहिलेले ऋषीच पुन्हा अयोध्येत आले असावेत बहुदा. हे युवक हनुमान गढी मंदिराच्या सिद्ध पीठाचे महंत आणि आपल्या वडिलांचे गुरु बाबा अभिराम दास यांचे शिष्य बनले. आणि या कोवळ्या वयात त्यांनी सांसारिक सुखांचा त्याग केला आणि त्यांचे मन राम रंगी रंगले. वयाच्या विसाव्या वर्षी हे युवक सत्येंद्र हे नाम धारण करून पुजारी बनले होते. संस्कृत व्याकरण विषयात पारंगत होऊन ते आचार्यपदी विराजमान झाले होते. पुढे त्यांना सत्य धाम गोपाल मंदिराची जबाबदारी सोपवली गेली.  

१९७५ मध्ये त्यांना रामकोट येथील त्रिदंडदेव संस्कृत पाठशाळेत संस्कृत शिक्षक म्हणून नेमणूक मिळाली. रामजन्मभूमी मुक्ती विषय ऐन भरात असताना सत्येंद्र दास यांनी प्रभू रामचंद्र यांची पूजा सेवा करण्यास आरंभ केला होता.

१९९२च्या आधी काही महिने सत्येंद्रनाथ यांना अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी स्थानातील श्रीराम यांचे अधिकृत पुजारी म्हणून सेवा प्राप्त झाली. संबंधित अधिकारी वर्गाने त्यांना मानधन घ्यावे लागेल असे सांगितले. महंत सत्येंद्र यांनी प्रभूंचा प्रसाद म्हणून केवळ रुपये शंभर द्यावेत,अशी विनंती केली. २५ मार्च २०२० रोजी प्रभू त्यांच्या मूळ स्थानापासून तात्पुरते दूर गेले…सत्येंद्रदास त्यांच्या सोबत गेले…आणि प्रभूंना घेऊन २२ जानेवारी २०२४ रोजी पुन्हा मूळस्थानी आले….जेथे जातो तेथे तू माझा सांगाती हे तू जेथे जातो तेथी मी तुझा सांगाती असे झाले होते…सत्येंद्र यांनी आपल्या ‘दास’पणात खंड पडू दिला नाही…..हा कालावधी जगाच्या भाषेत ३२ वर्षे,११ महिने आणि १ दिवसाचा भरला! आणि एकूण ७९ वर्षे ८ महिने आणि २३ दिवसांच्या जीवनाकालातील उणीपुरी ६० वर्षे ईश्वरसेवेत रमलेल्या या देहात रामचिन्हे प्रकट होतील,यात नवल ते काय? अयोध्येतील सर्वांना च ते प्रिय ठरले होते…हा  रामनामाचा आणि रामसेवेचा महिमा.

काल दिनांक १२ फेब्रुवारी,२०२५ रोजी माघ पौर्णिमेचा मोठा उत्सव होता अयोध्येत…याच दिवशी महंत सत्येंद्र दास यांनी जीवनाची सांगता केली. आज दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांचे पार्थिव शरयूच्या जलात समाधिस्त झाले! 

अशी रामसेवा घडलेले हे आयुष्य सर्वथा वंदनीय होते. प्रभू रामचंद्र त्यांना त्यांच्या चरणाशी कायम स्थान देतील,यात शंका नाही…कारण प्रभूंच्या चरणी त्यांनी आपले अवघे जीवित व्यतीत केले होते….एवढे पुण्यफल तर प्राप्त होणारच! 

भावपूर्ण श्रद्धांजली…आचार्य महंत सत्येंद्र दासजी महाराज! जय श्री राम! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ येड्या हो sssss ‘Hug Day‘ याला म्हणतात! – लेखक : डॉ. धनंजय देशपांडे ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

येड्या हो sssss ‘Hug Day‘ याला म्हणतात! – लेखक : डॉ. धनंजय देशपांडे ☆ सुश्री प्रभा हर्षे  ☆

hug day म्हणजे काय असतं

हे रावणाशी लढाई जिंकून झाल्यावर

हनुमानाला मिठीत घेतलेल्या श्रीरामाला विचारा 

की Hug Day म्हणजे काय?

*

Hug Day म्हणजे काय असतं

हे त्या अफझलखानाच्या थडग्याला जाऊन विचारा 

ते हि सांगेल Hug Day म्हणजे काय असतं!

*

Hug डे म्हणजे काय असतं

हे त्या पोह्याच्या पुरचुंडीला विचारा,

जिने कृष्ण सुदामाची मिठी पाहिलेली 

ती हि सांगेल Hug Day म्हणजे काय असतं

*

Hug Day म्हणजे काय असतं

हे त्या झाडांना विचारून पहा

ज्यांच्या रक्षणासाठी “चिपको” आंदोलन करून

महिलांनी झाडांना मिठी मारलेली पाहिलीय 

ती झाडेही सांगतील की 

Hug Day म्हणजे काय असतं 

*

Hug Day म्हणजे काय असतं

हे त्या रायगडाला विचारा 

ज्याने पश्चाताप झाल्यावर

माघारी आलेल्या शंभुराजांना

मिठीत घेणारे शिवाजी राजे पाहिलेत 

तो रायगडीचा महालही सांगेल 

Hug Day म्हणजे काय असतं 

*

Hug Day म्हणजे काय असतं

हे त्या यज्ञातील उधाणलेल्या ज्वालाना विचारा 

ज्यांनी नेताजी पालकरला पुन्हा आपल्या धर्मांत घेऊन

मिठी मारणारे छत्रपती शिवाजी महाराज पाहिलेत 

त्या ज्वालाही सांगतील 

Hug Day म्हणजे काय असतं 

*

Hug Day म्हणजे काय हे

त्या जेल मधील भिंतींना पण विचारा

जेव्हा मेरा रंग दे बसंती म्हणत

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू 

ह्यांनी एकमेकांना फासावर जाण्याआधी

एकदा घट्ट मिठी मारली असेल

*

Hug Day म्हणजे काय?

हे सीमेवर लढायला जाणाऱ्या त्या जवानांना सुद्धा विचारावं 

जो जाताना आपल्या आईला आलिंगन देऊन जातो.

आणि भारत मातेच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण पणाला लावतो.

*

असा असतो खरा Hug Day.. येड्याहो!

ते शिकूया, तशा मिठीचे संस्कार जपूया 

जय भवानी, जय शिवाजी…

*

लेखक : श्री डॉ. धनंजय देशपांडे (dd)

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कराया साजरा । होलिकेचा सण ।।” – कवी – डॉ. प्रसाद वाळिंबे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “कराया साजरा । होलिकेचा सण ।।” – कवी – डॉ. प्रसाद वाळिंबे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

कराया साजरा । होलिकेचा सण ।

मनाचे स्थान । निवडिले ।।

ऐसे ते स्थान । साधने सरावले ।

भक्तीने शिंपिले । केले सिद्ध ।।

*
त्या स्थानी खळगा । समर्पणाचा केला ।

त्यात उभा ठेला । अहंकार एरंड ।।

रचलीया तेथे । लाकडे वासनांची ।

इंद्रियगोवऱ्याची । रास भली ।।

*
गुरुकृपा तैल । रामनाम घृत ।

अर्पिले तयात । ऐसे केले ।।

रेखिली भोवती । सत्कर्म रांगोळी ।

भावरंगाचे मेळी । शोभिवंत ।।

*
वैराग्य अग्नीसी । तयाते स्थापिले ।

यज्ञरूप आले । झाली कृपा ।। 

दिधली तयाते । विषय पक्वान्नाहुती ।

आणिक पूर्णाहुति । षड्रिपू श्रीफळ ।।

*
झाले सर्व हुत । वैराग्य अग्नीत । 

जाणावया तेथ । नुरले काही ।।

वाळ्या म्हणे जनी । व्हावी ऐसी होळी ।

जेणे मुक्तीची दिवाळी । अखंडित ।। 

कवी – डॉ. प्रसाद वाळिंबे

सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ पुणे 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘तीन मनोरंजक लघुकथा…’ — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ ‘तीन मनोरंजक लघुकथा… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर 

(ह्या तिन्ही कथांना सखोल अर्थ आहे. कथा वाचून आपल्याला नक्कीच हसायला येईल.)

एक – गहन ☆  

मी एका लहान मुलाला आईस्क्रीम खाताना बघितलं. त्याची काळजी वाटून मी त्याला सहज बोललो,

‘आज खूप थंडी आहे हे आईस्क्रीम खाऊन तू आजारी पडशील! ‘

तो मुलगा उत्तरला – 

‘माझी आजी १०३ वर्षांपर्यंत जिवंत राहिली.’

मी विचारलं,

‘आईस्क्रीम खाल्ल्यामुळे? ‘

तो म्हणाला – ‘ नाही, कारण तिने कधीच दुसऱ्याच्या कामामध्ये नाक खुपसले नाही! ‘

किती खोल अर्थ दडला होता त्या उत्तरात!

आता मला समजलं की मी इतक्या वेगाने का म्हातारा होत चाललोय – – –  

– – कारण नसताना मी दुसऱ्याच्या कामात केलेली ढवळाढवळ. दुसरं काय!

********** 

☆ दोन –  थकलेला ☆

आज-काल जिथे तिथे घोटाळेबाज दिसून येतात. मी नुकताच बातम्यांमध्ये लोकांच्या बँक अकाउंटबद्दल बातम्या पाहात होतो – लोकांच्या खात्यांतून लाखो रुपये बघता बघता नाहीसे झाले होते आणि ते कुठे गेले याचा मागमुसही लागत नव्हता.

ती बातमी पाहून जाम घाबरलेलो मी माझ्या बाईकनं बँकेत गेलो. एटीएम मध्ये माझं कार्ड स्वाईप केलं, माझा पासवर्ड टाकला आणि माझ्या खात्यातली शिल्लक तपासली. माझ्या खात्यात शिल्लक असलेले साडेसातशे रुपये अजूनही माझ्या खात्यातच पडून होते. मी सुटकेचा निश्वास टाकला.

बापरे, माझ्या मनावरचा दड़लेला ताण आता हलका झाला होता. आता यापुढे पुन्हा कधी बातम्या ऐकणार नाही असं मी मनोमन ठरवून टाकलं. नको पुन्हा तो भयंकर तणाव!

एटीएम मधून बाहेर पडलो तेव्हा हे बघून मी मनानं आणखीनच हबकून गेलो.. कारण हे माझे साडेसातशे रुपये अजूनही तसेच माझ्या खात्यात शिल्लक असले तरी माझी मी नुकतीच पार्क केलेली बाईक मात्र आता जागेवर नव्हती.

**********

☆ तीन – थांबा ☆

एक तरुणी ट्रेनमध्ये चढली आणि आपल्या सीटवर दुसराच कोणी माणूस बसल्याचं तिनं पाहिलं. विनम्रतेने आपलं तिकीट तपासून बघितलं आणि ती म्हणाली, ‘ सर, मला वाटतंय आपण चुकून माझ्या सीटवर बसला आहात. ’

त्या माणसानं आपलं तिकीट काढलं आणि तिला ते दाखवत तो तिला रागाने ओरडून म्हणाला, ‘ हे तिकीट जरा नीट बघ. ही माझीच सीट आहे. तू आंधळी आहेस का गं? ’

त्या तरुणीने बारकाईने ते तिकीट तपासलं आणि तिने त्या माणसाशी वाद करणं थांबवलं. ती काही न बोलता त्या सीटपाशी उभी राहिली.

ट्रेन सुरू झाल्यावर काही वेळानं ती तरुणी खाली वाकून त्या माणसाला म्हणाली,

‘सर, तुम्ही चुकीच्या सीटवर नाही बसलात.. परंतु तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आहात. ही ट्रेन मुंबईला जातेय आणि तुमचं तिकीट आहे अहमदाबादचं.. ‘ 

तात्पर्य…

मनावर संयम असावा. आपण बोलण्यापूर्वी किंवा कृती करण्यापूर्वी विचार केला पाहिजे.

अन्यथा आपल्याला पश्चात्ताप करावा लागू शकतो.

फक्त ओरडण्याने जर सगळेच प्रश्न सुटले असते तर कदाचित या जगावर गाढवांनीच राज्य केलं असतं.

😂😂😂

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “गड्या आपला गाव बरा” – लेखक : ॲड. अजित लक्ष्मण पुरोहित ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “गड्या आपला गाव बरा” – लेखक : ॲड. अजित लक्ष्मण पुरोहित ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक : गड्या आपला गाव बरा

लेखक : ॲड. अजित लक्ष्मण पुरोहित, मो. 9637730625

प्रकाशक :सरस्वती प्रकाशन

कोकळे

☆  गड्या आपला गाव बरा… बरा नव्हे उत्तमच! – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

ऐतिहासिक दस्तावेजांचा अभ्यास करुन इतिहास लिहीणे हा एक स्वतंत्र विषय आहे. पण आपल्या आठवणी एकत्र करुन आणि त्यामध्ये इतरांनी सांगितलेल्या विश्वासार्ह माहितीची भर घालून एक महत्वाचा दस्तावेज तयार करणे हे ही तितकेच अवघड व कौशल्यपूर्ण काम आहे. हे काम केले आहे ॲड. अजित पुरोहित यांनी. माता आणि माती म्हणजेच मातृभूमी या दोन्हीही आपल्यासाठी वंदनीय आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या मातेविषयीच्या आठवणी भिन्न भिन्न असू शकतात. त्यांच्यातील कौटुंबिक नाते व त्यातून निर्माण होणारे मर्मबंध वेगळ्या स्वरुपाचे असू शकतात. पण जी अनेकांची माता आहे त्या मातृभूमीविषयी आपल्या भावना व्यक्त करताना आपला दृष्टिकोन कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता अधिक व्यापक ठेवावा लागतो. एकाच मातीत रमलेलं एक खूप मोठं कुटुंब म्हणजे आपलं गाव. आयुष्याचा दीर्घ प्रवास झाल्यानंतर या गावाकडे वळून पाहताना, गावाविषयी, तेथील लोक व लोकजीवन याविषयी जे जे वाटलं, समजलं ते लिहून काढताना गावाचचं एक सुंदर ‘व्यक्तिचित्र ‘ रेखाटण्याचं काम ॲड. पुरोहित यांनी केलं आहे. त्यांनी लिहीलेले ‘ गड्या आपला गाव बरा ‘ हे पुस्तक नुकतेच वाचून झाले. कोणतं आहे हे गाव आणि काय लिहीले आहे त्याविषयी हे सांगण्याचा हा एक प्रयत्न.

सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील कोकळे हे ॲड. पुरोहितांचे गाव. सांगलीच्या पूर्वेला, ६५ कि. मी. अंतरावर, सुमारे साडेचारहजार लोकवस्तीचे हे गाव. या गावाविषयी लिहीताना त्यांनी पुस्तकाची मांडणी अत्यंत नियोजनबद्ध केलेली आहे. सुरुवातीलाच या गावाचे भौगोलिक स्थान सांगून ते कर्नाटकच्या खूप जवळ असल्यामुळे, भाषा, संस्कृती, व्यक्तींची नावे अशा अनेक बाबतीत कन्नड छाप पडलेली आहे हे ते स्पष्ट करतात. पुढे पुस्तक वाचताना आपल्याला याचे प्रत्यंतर येते.

या पुस्तकात एकूण वीस प्रकरणे आहेत. या गावाची श्रद्धास्थानं, धार्मिक सप्ताह, यात्रा, सांस्कृतिक परंपरा, वाड्या-वस्त्या, शेती, शिक्षण, नाट्यपरंपरा, खेळ अशा विविध पैलूंचा विचार करण्यासाठी स्वतंत्र प्रकरणे आहेत. याशिवाय येथील कर्तृत्ववान व्यक्ती, जीवसृष्टी, गावचा ओढा, १९७२ चा दुष्काळ व त्याचे झालेले परिणाम आणि कोरोनाचे आलेले संकट या सर्वांविषयी त्यांनी लिहिले आहे. कोरोना काळात २१ दिवसांच्या लाॅकडाऊनच्या काळात या पुस्तकाचे बरेचसे लेखन झाले आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.

गावाच्या श्रद्धास्थानांविषयी लिहिताना त्यांनी श्री हनुमान, बसवेश्वर, ग्रामदैवत यल्लम्मा म्हणजेच रेणुकादेवी, परशुराम, मायाक्का, लक्ष्मी, मरगुबाई, म्हसोबा, बालाजी यांबरोबरच यमनूर पीर, चिंध्यापीर, मिरासाहेब दर्गा यांविषयी माहिती देऊन गावातील धार्मिक ऐक्याचे दर्शन घडवले आहे. देव हा आयुष्यात संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग असतो अशी श्रद्धा असणारे लोक आजही आहेत व म्हणून ही श्रद्धास्थाने आजही पहायला मिळतात.

१९७२ पर्यंत जीवंत असलेल्या गावच्या ओढ्याबद्दल त्यांनी सविस्तरपणे लिहीले आहे. ग्रामीण लोकजीवन हे ओढ्यातील पाण्यावरच अवलंबून असल्यामुळे त्यांनी हे अत्यंत आत्मियतेने लिहीले आहे. ओढ्याची पूर्वीची स्थिती, गावठाणाची जागा, आजुबाजूची झाडे व वनस्पती, नंतर बांधलेले पूल, ७२ च्या दुष्काळानंतर झालेली अवस्था, अलिकडेच बांधलेले बंधारे अशा अनेक विषयांचा आढावा घेत ओढ्याच्या आजच्या अवस्थेविषयी ते हळहळ व्यक्त करतात.

गतकाळातील ‘सप्ता ‘ म्हणजेच सप्ताह कसा असायचा याचेही त्यांनी छान वर्णन केले आहे. बदलत्या काळात त्याचे स्वरुप बदलले, महत्व कमी झाले. तरीही परंपरा चालू ठेवणारे काही लोक अजूनही गावात आहेत.

मार्गशीर्ष महिन्यात भरणा-या गावच्या यात्रेनिमित्त ते म्हणतात की पूर्वीची यात्रा आणि आताची यात्रा यात फार बदल झाला आहे. म्हणूनच हे प्रकरण वाचण्यासारखे आहे. कारण त्याशिवाय पूर्वीची यात्रा कशी होती ते समजणार नाही. शिवाय जत्रेतील काही विशिष्ट कार्यक्रम किंवा विधी म्हणजे काय हे ही समजणार नाही. उदा. कीच, बोनी, वालगे, लिंब नेसणे, मुले उधळणे हे सर्व वाचल्याशिवाय कसे समजेल?

‘जगण्यासाठी सर्व काही ‘ या प्रकरणात लेखकाने ग्रामीण अर्थव्यवस्थेचे सुंदर चित्रण केले आहे. बारा बलुतेदार, कुटीरोद्योग, लघुउद्योग हे सर्व मुख्य शेतीव्यवसायाशी कसे निगडीत व पूरक होते हे समजून घेण्यासारखे आहे. यातही स्थित्यंतरे होत गेली. त्याचीही नोंद लेखकाने घेतली आहे. कष्ट करण्याची फारशी तयारी नाही, कमी कष्टात कमी वेळेत भरपूर पैसा मिळावा आणि वाढत जाणारी स्पर्धा यामुळे पूर्वीचे चित्र बदलले आहे. पण सर्वांनी विचार केला तर गाव परिपूर्ण होईल अशीही त्यांना आशा आहे.

‘शेती’ या प्रकरणात सुरुवातीलाच ‘कोकळे ‘ हे गावाचे नाव कसे पडले असावे याचा अंदाज लेखकाने व्यक्त केला आहे. कोकळ्यातील हळद, केळ, ऊस, पानमळे, बागायती शेती, गु-हाळे,  भाजीपाला, फळबागा याविषयीचे लेखन वाचताना त्यांनी सगळ्या शेतातूनच फिरवून आणले आहे असे वाटते.

गावातील सांस्कृतिक परंपरांविषयी त्यांनी लिहिले आहे. गोकुळाष्टमी, नागपंचमी, खंडेनवमी यासारख्या सणातील पारंपारिक खेळ, गाणी, विधी यांचे वर्णन वाचायला मिळते. अलिकडच्या काळात महापुरुषांचे स्मरण करण्याच्या निमित्तानेही सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. काही पारंपारिक गीतेही त्यांनी या प्रकरणात दिली आहेत.

सर्वसाधारणपणे खेडेगाव म्हटलं की मनोरंजनासाठी तमाशा हेच आपल्या डोळ्यासमोर येतं. पण कोकळ्याचे रहिवासी नाट्यवेडे आहेत हे वाचून आश्चर्य वाटत. कोकळ्याला असलेली नाट्यपरंपरा, तिथले स्थानिक कलाकार, तिथे बसवलेली नाटके, कधी मशिदीच्या कट्ट्यावर तर कधी बॅरलचे केलेले स्टेज अशा अनेक गोष्टींचा उल्लेख करत कोकळ्याचा नाट्यसृष्टीपट लेखकाने आपल्या डोळ्यासमोर मांडला आहे. परगावाहून येणा-या स्त्री कलाकारांनीही कोकळेकरांचे कौतुक केले आहे हे रसिकतेला प्रमाणपत्रच मिळाल्यासारखे आहे.

कोकळ्यात प्राथमिक शाळा सुमारे ९० वर्षांपूर्वी सुरु झाली. त्यामुळे या गावाला शैक्षणिक परंपराही आहे. देवळात किंवा एखाद्या वाड्यात शाळा भरवली जायची. शिक्षक परगावाहून आले तरी गावातच सहकुटुंब रहायचे. पहिली ते चौथी एकच शिक्षक असायचे. शाळेची स्वच्छता, छोटेसे ऑफिस तेही एका वर्गातच, दर वारी म्हणायच्या प्रार्थना हे सर्व वाचताना त्या काळातील शाळेची कल्पना येते. शाळेच्या सहली, सेंटरच्या परीक्षा, त्या शिवाय चित्रकला, हिंदी, गणित अशा बाहेरच्या संस्थांच्या परीक्षाही होत असत. शैक्षणिक प्रगतीमुळे मुला मुलींच्या वेगवेगळ्या शाळा आता सुरु झाल्या आहेत. महिला प्रौढ शिक्षण वर्ग ही सुरु झाले. शैक्षणिक वातावरण चांगले असल्यामुळेच या गावाने अनेक इंजिनिअर, डाॅक्टर, वकील, न्यायाधीश, सरकारी नोकर दिले आहेत.

शिक्षणाबरोबरच खेळाच्या क्षेत्रात काय परिस्थिती होती याविषयीही लेखकाने लिहीले आहे. पूर्वी तालमी असत. कुस्तीगिर परिषदेकडून सत्कार झालेले पहिलवान या गावाने दिले आहेत. सुरफाट्या, चिन्नीदांडू, लगोरी, भोवरा, गोट्या, लंगडी, काचाकवड्या यासारख्या बिनभांडवली खेळाबरोबरच व्हाॅलीबाॅल, बुद्धीबळ अशा खेळांनाही गावाने आपलेसे केले आहे.

काही कारणानी किंवा पोट भरण्याचा व्यवसाय म्हणून गावात काही मंडळी नियमितपणे यायची. त्यांना लेखकाने ‘ पाहुणे’ असे म्हटले आहे. हे पाहुणे म्हणजे गारुडी, दरवेशी, हेळवी, डोंबारी, माकडवाले, बहुरुपी, तांबट, पिंगळा, मोतीवाले, छत्रीवाले इत्यादी इत्यादी. हे आता दुर्मिळ होत चालल्यामुळे वाचनातूनच त्यांच्याविषयी माहिती मिळू शकते.

विविध क्षेत्रात नाव कमावून गावचा झेंडा फडकवणा-या कर्तृत्ववान कोकळेकरांचा परिचयही लेखकाने करुन दिला आहे.

अशाप्रकारे आपल्या गावाविषयी लिहीताना लेखकाला काय लिहू आणि काय नको असे झाले आहे.. त्यांनी वाड्या, वस्त्यांविषयी लिहीले आहे. एवढेच नव्हे तर पशू, पक्षी, किटक, झाडे अशा जीवसृष्टीवरही लिहीले आहे.

आणि चुकून काही राहू नये म्हणून ‘उरलं सुरलं ‘ या प्रकरणात अनेक लहान सहान गोष्टी व त्यात होत गेलेले बदल यांवर लिहीले आहे.

कोरोना काळात या पुस्तकाचे बरेचसे लेखन झाल्यामुळे त्या कटू आठवणींचा उल्लेख करुन आपले गावाविषयीचे लेखन त्यांनी थांबवले आहे.

शेतात न जाता शेताच्या बांधावरून फिरताना शेताची साधारण कल्पना येते. पण संपूर्ण शेत नजरेसमोर येत नाही. पुस्तकाच्या या परिचयाचेही तसेच आहे. खूप सांगण्यासारखे आहे. पण शेवटी लेखन मर्यादा आहे. म्हणून पुस्तक वाचण्याला पर्याय नाही. ग्रामीण भारताचे प्रतिनिधित्व करणारे एक खेडे व त्याची माहिती म्हणून या पुस्तकाकडे पाहिले तर तर इंडिया नव्हे तर भारताविषयी कल्पना येऊ शकेल. ग्रामीण भागाशी संबंध असणा-यांना हे गाव आपले वाटेल आणि ग्रामीण भागाशी संबंध नसणा-यांना ‘गाव’ समजून घेता येईल.

” निशिदिनी नित्य जन्मुनी मरण सोसावे परी कोकळ्यातच पुन्हा जन्मा यावे “

– – – असे म्हणणाऱ्या ॲड. अजित पुरोहित यांचे हे पुस्तक अन्य ‘गावक-यांना’ स्वतःच्या गावाविषयी लिहायला उद्युक्त करो हीच सदिच्छा!

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – होली पर्व विशेष – रंगोत्सव ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – रंगोत्सव ??

होली अर्थात विभिन्न रंगों का साथ आना। साथ आना, एकात्म होना। रंग लगाना अर्थात अपने रंग या अपनी सोच अथवा विचार में किसी को रँगना। विभिन्न रंगों से रँगा व्यक्ति जानता है कि उसका विचार ही अंतिम नहीं है। रंग लगानेवाला स्वयं भी सामासिकता और एकात्मता के रंग में रँगता चला जाता है। रँगना भी ऐसा कि रँगा सियार भी हृदय परिवर्तन के लिए विवश हो जाए। अपनी एक कविता स्मरण हो आती है,

सारे विरोध उनके तिरोहित हुए,

भाव मेरे मन के पुरोहित हुए,

मतभेदों की समिधा,

संवाद के यज्ञ में,

सद्भाव के घृत से,

सत्य के पावक में होम हुई,

आर-पार अब

एक ही परिदृश्य बसता है,

मेरे मन के भावों का

उनके ह्रदय में,

उनके विचार का

मेरे मानसपटल पर

प्रतिबिंब दिखता है…!

होली या फाग हमारी सामासिकता का इंद्रधनुषी प्रतीक है। यही कारण है कि होली क्षमापना का भी पर्व है। क्षमापना अर्थात वर्षभर की ईर्ष्या मत्सर, शत्रुता को भूलकर सहयोग- समन्वय का नया पर्व आरंभ करना।

जाने-अनजाने विगत वर्षभर में किसी कृत्य से किसी का मन दुखा हो तो हृदय से क्षमायाचना। आइए, शेष जीवन में हिल-मिलकर अशेष रंगों का आनंद उठाएँ, होली मनाएँ।

? शुभ धूलिवंदन ?

© संजय भारद्वाज  

11:07 बजे , 3.2.2021

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️💥 श्री शिव महापुराण का पारायण सम्पन्न हुआ। अगले कुछ समय पटल पर छुट्टी रहेगी। जिन साधकों का पारायण पूरा नहीं हो सका है, उन्हें छुट्टी की अवधि में इसे पूरा करने का प्रयास करना चाहिए। 💥 🕉️ 

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – व्यंग्य ☆होली पर्व विशेष – पानी की बारात  ☆ श्रीमती समीक्षा तैलंग ☆

श्रीमती समीक्षा तैलंग

 

☆ होली पर्व विशेष – पानी की बारात ☆ श्रीमती समीक्षा तैलंग  ☆

काकी कहिन – पानी की बारात

काकी इस बार खूब छककर होली खेलने के मूड में है। पिछले कई सालों की कसर जो निकालनी है। होली का हुड़दंग करने के लिए पूरी टोली तैयार है। होली के पहले ही शादी की नहीं ‘पानी की बारात’ निकालने के लिए सब मुस्तैद हैं। शहर के विधायक-सांसद-पार्षद-मेयर के अलावा गली-मुहल्ले के छुटभैये नेताओं को भी आमंत्रण पहुँच चुका है। दुलत्ती से नहीं ढोल-ताशे से सबका स्वागत करने के लिए आसपास के राज्यों से उम्दा नस्ल के गधों को भी आमंत्रित किया गया है। अलबत्ता ये गधे सच में चार पैर वाले हैं। बारात समय पर चल चुकी है। बारात की अगुवाई काकी कर रही है।

गधे ख़ाली बरतनों को ढोकर अपनी दुलत्ती से उन्हें सुरीले अंदाज में बजा रहे हैं। टोली में मौजूद लोग भी बजाने में उनका साथ दे रहे हैं। गोया वे सबकी बजा रहे हों। इस विशेष बारात को कवर करने के लिए पत्रकार अपने औजारों के साथ बड़ी तादाद में जुटे हैं। ट्रक पर ड्रम लदे हुए हैं। किसी पद संचलन की तरह ये बारात भी बढ़ रही है।

गीत बज रहे हैं- “तुमने पुकारा और हम चले आए, वोट की आस में आए रे,,,”। “ये देश है गुगली वालों का, लोफर और मस्तानों का, इस देश का यारों क्या कहना, ये देश है झूठों का गहना,,,”। “जनता की दुआँए लेता जा, जा तुझको कुरसी का प्यार मिले, महलों में कभी न याद आए, प्यादों से इतना प्यार मिले,,,”।

इन गीतों को सुन पत्रकार काकी से-

“मैंने अभी देखा कि बारात में बड़े नेता आमंत्रित हैं। उनके सामने उनके खिलाफ गीत?”

“तो क्या करें! हम पीठ पीछे और, और सामने कुछ और नहीं बोल सकते। आप हिम्मत नहीं करेंगे तो हमें तो करनी ही होगी”।

“आपकी ये बारात किस खुशी में है? क्या आप सूखी होली खेलने के पक्ष में हैं?”

“ये बारात पानी की विदाई की है। पानी अब केवल इन नेताओं के घरों में होता है। हमारे यहाँ से पिछले एक महीने से विदा हो चुका है। आज उसे ऑफिशियली विदा कर रहे हैं। इस उत्तर के बाद दूसरे प्रश्न कोई औचित्य नहीं”।

“ये बरतन ख़ाली हैं। क्या ट्रक पर रखे ड्रम भरे हैं?”

“जी हाँ वो भरे हैं। खोलकर देखना चाहेंगे?”

वो पत्रकार अपने साथियों के साथ भरे ड्रम की फ़ोटो लेने चढ़ता है। सारे ड्रम खोल दिए जाते हैं। कुछ ही समय में वातावरण बदल जाता है। जिसे देखो वह पेट पकड़कर हँसता हुआ पाया जाता है।

पत्रकार हँसते हुए काकी से-

“क्या आपने इसमें लाफिंग गैस भरी थी?”

काकी भी हँसते हुए- “हाँ जी। ये नेता लोग चाहते हैं कि त्योहारों में आम आदमी रोये और इनके पैरों पर गिड़गिड़ाए। इसलिए हम अपने दुख को इस गैस के द्वारा भूलकर हँस रहे हैं”।

“कैसा दुख?”

“अरे भाई बिन पानी सब सून। होली तो बाद की बात है यहाँ तो पीने और वापरने के पानी की किल्लत है। पानी पर राजनीति करने वालों के घर पानी से भरे हैं। जहाँ से टैंकर भरे जाते हैं वहाँ भी पानी भरा हुआ है। मगर हमारे लिए टैक्स देने के बाद भी ठन-ठन गोपाल। अब तुम कहो कि सूखी होली पसंद है तो भैया अब तो होली ही पसंद नहीं। क्योंकि सूखा रंग लगाने के बाद भी उसे धोना पड़ता है। यहाँ तो पानी के बगैर जीवन ही बदरंग हो चुका है। सुबह उठते ही किच-किच शुरू”।

उधर नेतागण माइक पर सूचित करते हैं कि इस अनोखी बारात का आयोजन अब प्रतिवर्ष किया जाएगा। काकी को समझ नहीं आता कि अब वे उनसे क्या कहें! अगले ही पल वे पानी की किल्लत को दूर करने का आश्वासन देते हैं।

तब काकी उनके हाथ से माइक छीनकर बोल पड़ती है-

“फिर से आश्वासन!!”

(स्वदेश – साप्ताहिक सप्तक – 9 मार्च 2025)

© श्रीमती समीक्षा तैलंग 

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares