मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परि तुझ्यावाचुनि करमेना… भाग – २ ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ उज्ज्वला केळकर

??

☆ परि तुझ्यावाचुनि करमेना… भाग – २ ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

(त्यावेळी जरी मी घराबाहेर पडण्याची संधी एवढ्याच दृष्टीने बी.एड्. कडे पाहिलं असलं, तरी पुढच्या आयुष्यात मला त्याचा खूप फायदा झाला आणि ते करायला सुचवलं होतं माझ्या सहचराने.) – इथून पुढे 

मला पुढे १९७० साली, सांगलीला डी.एड्. कॉलेजमध्ये नोकरी लागली. त्यानंतर मी एम.ए. झाले. याच सुमाराला आम्ही आमचं स्वतंत्र छोटंसं घरकुल माधवनगरलाच मांडलं होतं. आमच्या लग्नाला दहा वर्षं झाली. आणि प्रकृतीने ‘अमोल’ ठेवा आमच्या पदरात टाकला. आता प्रश्न होता, नोकरी सोडायची की काय? पाळणाघर, किंवा मुलाला सांभाळायला बाई, ही मानसिकता घरात, समाजात तितकीशी रुजलेली नव्हती. प्रश्न होता, त्यावेळी नोकरी सोडली, तर चारसहा वर्षांनी, मुलाची सातत्याने देखभालीची गरज संपल्यावर, पुन्हा खात्रीपूर्वक नोकरी मिळेलच याचा काय भरवसा? माझ्या शेजारणीने माझ्या नोकरीच्या वेळात मुलाला सांभाळायचे कबूल केले, आणि माझ्या सासुबाईंनी आणि यांनी दोघांनीही मुलाकडे लक्ष देण्याची जबाबदारी स्वीकारली आणि माझी नोकरी अखंडितपणे चालू राहिली. नोकरीच्या वेळा बांधील असतात. धंद्याचं तसं नसतं. यांचा यंत्रमागावर कापड काढून देण्याचा व्यवसाय होता. तो माधवनगरातच होता. त्यामुळे गरजेप्रमाणे ते वेळ काढू शकत होते आणि तसा त्यांनी काढलाही. मुलाला वाढवताना आम्ही दोघांनी बरोबरीने जबाबदारी उचलली. यांनी कांकणभर जास्तच उचलली.

नोकरी, घरकाम, छोट्याचं संगोपन या सा-यात दिवस कधीच संपत असे. माधवनगरात तेव्हा पाण्याची खूप टंचाई होती. आजही आहेच. त्या वेळी चार-पाच दिवसातून एकदा पाणी यायचं. ते थोडंच असायचं. पिण्यापुरतं यायचं. बाकी वापराला विहिरीचं पाणी असे. पाणी ओढण्याचं काम यांनी स्वखुषीने स्वीकारलं होतं. बाजारहाटही ते करत. त्यामुळेच स्वयंपाक-पाणी, धुणं-बिणं सगळं उरकून मला नोकरीसाठी वेळेवर जाणं शक्य होत होतं. नोकरी म्हटली की तिथल्या जबाबदा-या, कर्तव्यं आलीच. अमोल दहा महिन्याचा असताना त्याला घरी ठेवून मला प्रशिक्षणासाठी दहा दिवस सातारला जावं लागलं होतं. पण यांनी सासूबाईंच्या मदतीने कोणताही गाजावाजा, गवगवा न करता मुलाला सांभाळलं. जाऊबाई, पुतणे-पुतण्या ही मंडळी पण होतीच!

मुलगा चार वर्षाचा झाला आणि आम्ही त्याच्या शिक्षणासाठी म्हणून सांगलीला बि-हाड केलं. तिथे त्याच्याबरोबर माझंही अनुभवक्षेत्र वाढत – विस्तारत गेलं. आवडी-निवडी जपायला, जोपासायला संधी मिळाली. कार्यक्रमातला सहभाग वाढला. श्रोता-प्रेक्षक म्हणून जाताना मुलाला बरोबर घेऊन जाणं, निदान पहिली काही वर्षं तरी अपरिहार्य होतं. जमेल तेवढं ऐकायचं. पाह्यचं. कविसंमेलन, व्याख्यानं, कथाकथन इ. मध्ये माझा प्रत्यक्ष सहभाग असे, तेव्हा मुलगा लहान असताना यांनी बघितलं. एक बरं होतं. या सा-या कार्यक्रमांत माझा सहभाग असावा, याबद्दल आमचं एकमत झालं. दुमत असतं तर… जाऊ दे. तो विचारच नको.

सांगलीला आल्यावर मला मिळणारा अवकाश वाढला असला तरी मला सुचतंय म्हणून आज बाकीची कामं बाजूला राहू देत. मी लिहीत बसते. एवढा आवाका मला कधीच लाभला नाही. घर, स्वयंपाक-पाणी, नोकरी-चाकरी संभाळून जमेल तसं आणि तेवढंच माझं लेखन झालं. मी वलयांकित लेखिका नव्हते, हेही त्यामागचं कारण असू शकेल. माझ्या घरकामात नाही, तरी मुलाच्या संगोपनात यांचं सहाय्य नक्कीच होतं.

आता घरकामात नाही असं म्हणतानाही बाजारहाट तेच करायचे हे मला कबूल करायलाच हवं. सगळ्यांत महत्त्वाचं काम म्हणजे सकाळी उठल्यावरचा पहिला चहा हेच करायचे आणि आल्या-गेल्यांना अगदी आवर्जून सांगायचे सुध्दा! मग मी म्हणायची, ‘सकाळी गाडीत एकदा पेट्रोल भरलं की गाडी दिवसभर न कुरकुरता चालू राहते…’

नोकरीच्या काळातही एक आठवण आवर्जून नोंदवाविशी वाटते. मिरज तालुक्यातील प्रौढ साक्षरांचं मूल्यमापन करण्यासाठी एक समिती नेमली होती. तिच्यात माझा समावेश होता. हे काम रात्री प्रौढ शिक्षण वर्ग सुरू झाल्यावर तालुक्याच्या वेगवेगळ्या गावी जाऊन करायचं असे. सुमारे महिना-दीडमहिना हे काम चाललं. मलाच कानकोंडं होई. पण या मुद्यावरून यांनी कधी खळखळ केली नाही.

आता हे सगळं वाचताना कुणालाही वाटेल तुम्ही तुमच्याबद्दल खूप लिहिलंत. त्यांच्याबद्दल काय? तर ते त्यांच्या आवडी-निवडीप्रमाणे, त्यांना हवं तसं जगत होतेच! हवं ते करत होते. पुरुष असल्यामुळे त्यांना त्यांचा अवकाश जन्मत: प्राप्त झाला होता. मलाही त्यांनी काही प्रमाणात तो प्राप्त करून दिला. ही आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट.

सांगली आकाशवाणीवरून ‘प्रतिबिंब’ ही श्रुतिकामाला सुमारे दहा-बारा वर्षं प्रसारित होत होती. त्यातील शंभर तरी श्रुतिका मी लिहिल्या असतील. श्रोत्यांनाही त्या पसंत पडत असल्याचं कळत होतं. ते संवाद, त्यातील वाद-विवाद आमच्या घरातल्या संवाद-विवादातून लिहिलेले असत. त्याला थोडी झिलई, चकचकीतपणा मी माझ्या लेखनातून दिलेला असे, एवढंच!

माझ्या लेखनाचा महत्त्वाचा स्त्रोत यांच्या वाणीतूनही अनेकदा उगम पावलेला आहे, तो असा! श्रुतिका ऐकल्यावर माझी एक मैत्रीण मुग्धा आपटे मला म्हणाली होती, ‘आमच्या घरात आम्ही जे बोलतो, ते तुला कसं कळतं?’ मी म्हटलं, ‘घरोघरी गॅसच्या शेगड्या… दुसरं काय?’

याचा अर्थ माझी वाटचाल अगदी मऊ मखमलीवरून झाली, असं मुळीच नाही. रेशमी काटे अनेकदा टोचले. अधून मधून बाभळीच्या काट्यांनीही रक्तबंबाळ केलं. भांड्याला भांडं अनेकदा लागलं. नुसता नाद नव्हे, खणखणाटही झाला.

लोकगीतातील ग्रामीण स्त्री आपल्या नवऱ्याच्या रागाला इंगळ्या इस्तुवाची उपमा द्यायची आणि आपण गोड बोलून चतुराईनं कसं ‘विसावण’ घालतो, याचं वर्णन करायची. मला असं विसावण घालणं कधी जमलं नाही. पण यांना जितक्या लवकर राग यायचा, तितक्याच लवकर तो निवायचाही. मग उगीचच काही तरी बोलून, हसवून ते वातावरणातला ताण दूर करतात. इच्छा नसतानाही मग मला फस्सकन हसू येतं. ‘तुझं नि माझं जमेना…’ असं अनेकदा म्हणता म्हणताच, ‘परि तुझ्यावाचूनि करमेना…’ याही सार्वकालिक सत्याचा प्रत्यय येतो.   

– समाप्त –

© सौ उज्ज्वला केळकर

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मदतीचा हात… लेखक : श्री रियाज तांबोळी ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ मदतीचा हात… लेखक : श्री रियाज तांबोळी ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

नाव : सातप्पा लक्ष्मण पाटील. राहणार : मु. पो. जित्ती, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर… हे शेतकरी आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ते आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत… त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घर मंजूर झालं…. घर मंजूर झाल्यानंतर स्वतःच्या घरात आनंदाने राहण्याचं स्वप्न हे कुटुंब बघू लागलं…. पण कशाचं काय!!! नियतीने काही वेगळाच डाव मांडला होता… 

जसं प्रत्येक शेतकरी उद्याच्या आशेवर त्याच्या आजच्या गरजा तेवत ठेवतो तसंच उद्या स्वतःच्या घरात आपल्याला  राहायला मिळणार या दृढ विश्वासावर हे आज बांधकाम करत होते….. बांधकामासाठी त्यांनी सिमेंट मागवलं होतं… सिमेंट उतरवून चालक गाडी मागे घेत असताना रात्रीच्या अंधारात लक्षात न आल्यामुळे त्या गाडीचे चाक सातप्पा यांच्या पायावरून गेले…. सिमेंटची ट्रॉली किती जड असते हे आपल्याला मी सांगण्याची गरज नाही.. या अपघातात त्यांचा पाय तुटला आहे… 

हातावर पोट असलेल्या या कुटुंबाकडे जमापुंजी असण्याचा विषयच नाही… त्यांचे काही हितचिंतक मित्र एकत्र येऊन त्यांनी सातप्पांचे ऑपरेशन करून घेतले आहे…. ऑपरेशनचाच खर्च दीड लाखांच्या घरात गेला असून पुढील 6 ते 8 आठवडे यांचा पाय सडू नये किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखेखाली अति दक्षता विभागात ठेवावे लागणार आहे. त्यासाठी व अन्य काही उपचारांसाठी अजूनही बराच खर्च येण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली असून त्याबद्दलचा तपशील मी आपल्यासमोर सादर करेनच…. तर घराचे सुखासीन स्वप्न बघणारे सातप्पा आज रुग्णालयात दुखण्याशी झुंज देत आहेत…. आपण त्यांचं दुखणं वाटून घेऊ शकत नाही पण दुःख मात्र नक्की वाटून घेऊ शकतो. चला तर मग या शेतकरी कुटुंबाचे दुःख वाटून घेऊयात… प्रत्येक जण आपापल्या परीने मदतीचा हात देऊयात. त्यांचे स्वतःच्या घरात राहण्याचे स्वप्न न मावळता त्यांना पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी सहकार्य करून त्यांच्यात नवी उमेद भरूयात…

जर कोणाला रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन त्यांची भेट घ्यायची असेल तर पुढील पत्त्यावर आपण भेट देऊ शकता… ते सोलापूर येथील मार्केट यार्ड जवळच्या यशोधरा रुग्णालयात दाखल आहेत… ज्या दात्यांना संपर्क साधून चौकशी व सहकार्य करायचे आहे त्यांच्यासाठी संपर्क क्रमांक आणि गुगल पे, फोन पे क्रमांक पुढे देतो आहे…. फोन पे क्रमांक सातप्पा पाटील यांचे चिरंजीव समर्थ सातप्पा पाटील. 9325306202

गुगल पे क्रमांक सातप्पा पाटील यांच्या सुविद्य पत्नी वैशाली सातप्पा पाटील. 8446183318 यापैकी आपण कोणाशीही संपर्क साधून माहिती मिळवू शकता व सहकार्य करू शकता….

थोडं मनातलं…. ही घटना घडल्यानंतर माझ्या बऱ्याच मार्गदर्शक स्नेहींनी त्यांना भेट दिली. ते जेव्हा तिथली परिस्थिती कथन करत होते तेव्हा प्रचंड वाईट आणि हळहळ वाटत होती…. आम्ही सगळे मित्र मिळून आपण सहकार्य करायचं तर कसं आणि किती याबाबतीत विचार करत होतो. तेव्हा मनात एक कल्पना आली… आपल्यातले अनेक जण बाहेर चहा पितो किंवा नाश्ता करतो. एखाद्या दिवसाचा चहा नाष्टा वगळून, वगळून म्हणण्यापेक्षा त्यागून जर ती रक्कम मदत म्हणून यांना पाठवली तर थेंबे थेंबे तळे साचे ही उक्ती सार्थ ठरेल व पाटील कुटुंबीयांवर ओढवलेले हे संकट दूर होईल… आम्ही मित्रमंडळी तर असे करतो आहोत, जर ही कल्पना आपल्याला आवडली असेल तर आपणही असं करू शकता…. किंवा आपल्या परीने वेगळी पद्धत अवलंबून खारीचा वाटा उचलू शकता…. हा लेखन प्रपंच करण्यामागचा एकमेव हेतू हाच आहे…. 

सातप्पा पाटील यांना आपल्या मदतीने रुग्णालयातून बाहेर काढूयात आणि त्यांच्या स्वप्नातल्या हक्काच्या घरात आनंदाने राहायला सहकार्य करूयात… 

बदल फक्त चेहऱ्यावरील एका छटेचा आहे… आज ही संकटग्रस्त परिस्थिती आ वासून उभी असताना उमटलेली दुःखद छटा व उद्या आपल्या सर्वांच्या मदतीने पाटील कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर उमटणारी प्रसन्नतेची छटा. 

मी शेवटी सर्वांना अगदी कळकळीची नम्र विनंती करतो की, आपण प्रत्येक जण शक्य तितका हातभार लावून आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवूयात. वाचक हो हा संदेश शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवूयात आणि यांना योग्य तितकी मदत मिळवून देऊयात….

लेखक – श्री रियाज तांबोळी

सोलापूर  मो 7775084363

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “राहून गेलेलं स्मारक” ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ “राहून गेलेलं स्मारक” ☆ श्री सुनील शिरवाडकर

एखादी प्रसिद्ध व्यक्ती गेल्यानंतर तिचे स्मारक होते. अगदी स्मारक झाले नाही तरी त्याविषयी चर्चा तर होतातच.ते व्हावे की नाही.. व्हावे तर कुठे व्हावे.. कसे व्हावे यावर बरेच वादविवाद होतात.अलिकडे तर ‘स्मारक’ हा विषयच टिकेचा,कुचेष्टेचा झालेला आहे.

नाशिकला मात्र तात्यासाहेब शिरवाडकरांचे घर हेच स्मारक म्हणुन जपुन ठेवलेले आहे. तात्यांची ती खोली.. बसण्याची खुर्ची.. लेखनाचे टेबल..त्यावर असलेल्या तसबिरी.. चार्ली चैप्लीन आणि गडकर्यांच्या. तेथे गेल्यानंतर क्षणभर भास होतो..आत्ता तात्या आतल्या खोलीतुन बाहेर येतील..श्रीराम श्रीराम म्हणत.

असंच अजुन एक स्मारक माझ्या बघण्यात आलं होतं.गणपती पुळ्याजवळच्या मालगुंड गावी. कवी केशवसुतांचं.त्यांचंही रहातं घर असंच जपुन ठेवलंय. दाट माडांच्या बनातलं ते कौलारू घर.लाल चिर्यांपासुन बनवलेलं.बाहेर पडवीत असलेला झोपाळा.. आतील माजघर..स्वयंपाकघर.. त्यातीलच ती शंभर वर्षापुर्वीची भांडी. कुसुमाग्रज तर म्हणालेही होते एकदा.. हे केवळ घर नाही तर ही मराठी काव्याची राजधानी आहे.

ग.दि.माडगूळकरांचं पण एक असंच स्मारक होणार होतं.माडगुळ या त्यांच्या गावी.तेथे त्यांचं घर होतं.आणि एक मळा. मळ्यात होती एक छोटीशी झोपडी. तीन बाजुंनी भिंती. दार वगैरे काही नाही. गावातील इतर घरे धाब्याची.फक्त या झोपडीवर लोखंडी पत्रे. म्हणून याचे नाव.. बामणाचा पत्रा.

गदिमा.. म्हणजे अण्णा तसे रहात पुण्यात. पण कधी शहरातील धकाधकीच्या आयुष्याचा त्यांना कंटाळा येई.कागदावर नवीन काही उतरणं मुष्किल होई.अश्यावेळी त्यांना साद घाली तो हाच ..बामणाचा पत्रा.

इतर वेळी याचा वापर गोठ्यासारखाच.पण अण्णा आले की त्याचे रुपडे बदलुन जाई.सारवलेल्या जमीनीवर पांढरीशुभ्र गादी..लोड..तक्के.त्या कच्च्या भिंतीवर असलेल्या खुंटीवर अण्णांचे कडक इस्त्रीचे जाकीट.. सदरे..खाली बैठकीवर निरनिराळे संदर्भ ग्रंथांचे ढीग.हे अण्णांचे स्फुर्तीस्थान होते.

पुर्वाभिमुख असलेल्या या झोपडीत अण्णा मग मुक्काम ठोकत.इथली सकाळ त्यांना मोहवुन टाके.ते म्हणतात..

“गावात चाललेल्या जात्यावरीर ओव्या झोपलेल्या कवित्व शक्तीला जागे करतात. पहाटे वार्यावर येणारा पिकांचा वास हिरव्या चाफ्याच्या वासासारखा उत्तेजक वाटतो.सारे वातावरणाच असे की पुन्हा झोप नको वाटते. अशा वेळी मी एकटाच उठुन उभ्या पिकांमधुन हिंडुन येतो. दवात भिजलेली जोंधळ्यांची पाने पायाला लाडीक स्पर्श करतात. ओला हरभरा गमतीदार चावे काढतो,तर करडईची काटेरी झाडे पायावर पांढर्या आणि बोचर्या रेघोट्या मारतात.”

हिंडुन आलं की सुस्नात होऊन लेखनाच्या बैठकीवर ते येत.या मातीचाच गुण..झरझर शब्द कागदावर उतरत जात.मधुन घरचा डबा येई.बाजरीची भाकरी, लसणीची खमंग चटणी, आणि सायीचे दही. कधी जेवणासाठी घरी चक्कर असे. अण्णा म्हणतात..

“आपल्या स्वतःच्या रानात पिकलेल्या शाळुची पांढरीशुभ्र भाकरी.. उसातल्या पालेभाज्या.. घरच्या गाई म्हशींचं दुधदुभतं..माणदेशात पिकणाऱ्या गुलाबी तांदळाचा चवदार भात..आणि वाढणारी प्रत्यक्ष आई.

जगातल्या कुठल्याही पक्वानाने होणार नाही एवढी त्रुप्ती त्या जेवणाने होते. मग पाटाच्या कडेला उभ्या असलेल्या गुलमोहराच्या गार सावलीचे मला बोलावणे येते. उजव्या हाताची उशी करुन मी मातीतच आडवा होतो. त्या भूमीतील ढेकळे मला रुतत नाही, खडे टोचत नाही. झोप अगदी गाढ लागते.”

तर असा हा ‘बामणाचा पत्रा’.अनेक अजरामर कवितांचा, कथा, पटकथांचा जन्म इथेच झाला.तो गाव..बामणाचा पत्रा,आणि गदिमा..हे अगदी एकरुप झाले होते. गदिमा गेले त्या वर्षी गावातली खंडोबाची यात्रा भरली नाही की कुस्त्यांचा फड भरला नाही.

गदिमा गेल्यानंतर व्यंकटेश माडगूळकर प्रथमच गावी आले होते.गदिमांचे वर्गमित्र आणि तालुक्यातील एक ज्येष्ठ नेते श्री बाबासाहेब देशमुख यांनी गावकर्यांची इच्छा बोलुन दाखवली. ते म्हणाले…

तुम्ही तिकडे मुंबई, पुण्यात आण्णांचे काय स्मारक करायचे ते करा.पण आमची एक इच्छा आहे.या गावी.. या वावरात अण्णांचं एक स्मारक हवं.

व्यंकटेश माडगूळकरांना पण  पटलं ते.त्या रात्री ते ‘बामणाच्या पत्र्या’तच झोपले.सकाळी उठले. समोर पूर्व दिशा उजळत होती. आणि त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या अण्णांचे स्मारक आकार घेत होतं.

ही सभोवार हिरवी शेते..हवेत भरुन राहिलेला ओल्या जमीनीचा, उभ्या पिकांचा गंध..मधे हा ‘बामणाचा पत्रा’..हाच तो दगड,ज्यावर बसुन अण्णा आंघोळ करत..बापु रामोशी भल्या पहाटेच तात्पुरत्या चुलवणावर मोठा हंडाभर पाणी तापवुन ठेवी.आंघोळ करतानाचे त्यांचे ते शब्द कानात घुमताहेत..

‘हर गंगे भागीरथी’.

विहीरीचं पाणी त्यांच्या डोक्यावर पडलं की खरंच त्याची गंगा भागीरथी होऊन जाई.

त्यांना वाटलं..

शिल्पकार भाऊ साठ्यांना बोलावुन घ्यावं.या आंघोळीच्या दगडाच्या जागी एखादं शिल्प त्यांच्या कल्पनेतुन घडवावं.वास्तुशिल्पी माधव आचवल यांनाही बोलवावं.त्यांच्या कल्पनेतुन इथे बरंच काही करावं.आजुबाजुला कायम फुललेली बकुळ, पलाशची झाडे लावावी. त्याखाली बाके.इथेच ती अण्णांची आरामखुर्ची ठेवावी. जानेवारीच्या थंडीत अण्णा इथे येत.त्यावेळी त्यांच्या अंगावर असणारा तो कोट..इथेच खुंटीवर टांगलेला असावा. त्यांची ती लोखंडी कॉट..ती पण इथेच कोपर्यात राहील. अण्णांची पुस्तके, हस्तलिखितं..सगळं इथं आणु.

हे गाव..इथली झाडंझुडं..पाखरं..पिकं..माणसं..हे सगळं मिळुनच इथे एका लेखकाचं स्मारक बनवु या.

व्यंकटेश माडगूळकरांच्या कल्पनेतलं हे स्मारक व्हायला हवं होतं..पण  नाही झालं..त्याचं दुःख आहेच.पण अखेर स्मारक म्हणजे काय?कशासाठी असतं ते?

तर ती व्यक्ती कायम स्मरणात रहावी यासाठीच ना!

आणि गदिमांचा उर्फ अण्णांचा विसर कधी पडेल हे संभवतच नाही. चैत्राची चाहुल लागली की ‘राम जन्मला गं सखे..’ हे आठवणारच आहे. आणि आभाळात ढग दाटून आले की ‘नाच रे मोरा..’ ओठांवर येणारच आहे. त्यासाठी आणखी वेगळ्या स्मारकाची जरुरच काय?

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पिंपळ आणि आंबा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “पिंपळ आणि आंबा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

आपले दु:ख, तेवढ्या मोठ्या मात्रेचे नसतांना अचानक कुणीतरी मोठ्या मात्रेने सांत्वन करायला पुढे आले की, थोडे गोंधळायला होते. हे सांत्वन झिडकारावे की त्यामागचा आपलेपणा पाहून नम्रपणे  स्वीकारावे ? अशा संभ्रमात पडायला होते खरे..

बागेतल्या पिंपळाला असेच काहीसे त्यादिवशी झाले बागेतले आंब्याचे झाड त्याला सांगत होते, “बघवत नाही रे तुला पिंपळा.. शिशिर ऋतूने तुला अगदीच पर्णहीन, निस्तेज करून टाकलंय. पण धीर धर. काही दिवसातच वसंत सुरू होईल आणि येईल पुन्हा पालवी…. होईल पुन्हा पूर्वीसारखे रूप … होशील माझ्यासारखा…” 

शिशिरात पर्णहीन अवस्थेत निरव शांततेतली आनंददायी ध्यानावस्था अनुभवणाऱ्या पिंपळाला यावर काय बोलावे, हे क्षणभर समजेना..

अनेकदा दुसऱ्याचे सांत्वन करतांना त्याचा दुःखभार हलका करण्याच्या हेतूपेक्षा, आपण खूप सुखात आहोत याचा काकणभर का होईना अभिमान दाखविण्याचा हेतू सांत्वन करणाऱ्याच्या मुखावर झळकत असतो. पण हा हेतू दिसला तरी त्यावेळी तसे बोलता येत नाही, याची समज आणि उमज पिंपळाला होती..

मंद स्मित करून पिंपळ आब्यांला म्हणाला, “तुझ्या प्रेमळ शब्दांसाठी खूप आभार. पण एक सांगू.. मी अजिबात दु:खात नाही. सृष्टीने सहाही ऋतूत आपले प्रारब्ध आधीच लिहून ठेवले आहे. कोणत्या झाडाने केव्हा फुलावे, बहरावे, कोमेजावे सगळे सगळे. आपल्या हातात फक्त मुळं आहेत आणि त्यांच्याव्दारे जमिनीतून जीवनरस घेणे आहे,.हे एकदा,उमगले की दुःखाचा लवलेश नाही “ 

“आपली मुळं आत सारखीच आहेत. फरक दिसतो, तो  फक्त बाहेर.. जमिनीवर… पाने, फळे, फुले, खोड, उंची यात फक्त फरक. विविधता आणि सौंदर्यासाठी केलेला… हे एकदा कळलं की, आहे त्यात आनंद.

सुख-दुःखापलीकडील समाधानाचा, आनंदाचा अनुभव. आपल्या बाह्य रूपातल्या बदलांकडे पहाण्याची एक वेगळीच दृष्टी येते. एक समाधानी अवस्था येते. जिथे कुणाशीही तुलना नाही, तक्रार नाही. ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान।” 

पिंपळाच्या या बोलण्याने आंब्याचे समाधान झाले नाही. त्याने पिंपळाला विचारले, “खरे खरे सांग ! पर्णहीन झाल्याने तुझं रूप कुरूप झालय, पक्षी येईनासे झालेत, पानांची सळसळ नाही… याचे खरेच तुला दुःख नाही?”

धीरगंभीर आवाजात पिंपळ उत्तरला, ” नाही. अजिबात नाही. बाहेरच्या बदलणाऱ्या गोष्टींशी आपल्या सुखाला जोडून घ्यायचं आणि त्या गोष्टी बदलल्या की दुःखी व्हायचं, ही माणसं करीत असलेली चूक आपण का करायची? माझं सद्‌भाग्य की, तथागताचा सहवास मला लाभला आणि पानं, फुलं, फळं यापलीकडे जाऊन कायम मुळाकडेच पाहण्याची खोड मला लागली. ‘घट्ट  मूळ’ आणि ही ‘खोड’ असली की आनंदाला बाधा नाही. बाह्य बदलांकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाते ”

 “ तू म्हणतोस पाने नाहीत त्याचं दुःख. पण खरं सांगू ..  शिशिर ऋतू माझा ५-६ हजार पानांचा भार हलका करतो. ते २-३ महिने खूप हलकं हलकं वाटतं ! तू हे सुख नाही अनुभवू शकत.. पानांचा भार नाही.

सळसळ नाही, पक्षांचे आवाज नाही. त्यामुळे ध्यान समाधीही दीर्घकाळ लावता येते. अधिक मुळाकडे जाऊन चैतन्याचा स्रोत देहभर भरून घेता येतो. वसंताला सामोरे जाण्याची ही पूर्वतयारी असते. म्हणूनच वसंत आला रे आला की अवघ्या सात दिवसात माझ्या देहभर पालवी फुललेली दिसते “

आंब्याला हळूहळू पिंपळाचे विचार पटत होते. पिंपळ पुढे बोलू लागला.” कुणाला आपण किती प्रिय आहोत, यावर आपण आपली प्रियता ठरवू नये. तुझाही मोहोर कधी जळतो.. कधी गळतो.. फळं नाही येत तेवढी… लोकं नाराज होतात..  फळांच्या अपेक्षेने प्रियता, जवळीकता असली की ती कधीतरी लोप पावते. पण फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष प्रेम केलं की प्रियता कायम रहाते. अशा निरपेक्ष प्रेम करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या प्रेमाची आठवण म्हणून त्यांच्या वहीत, पुस्तकात पिंपळपान कायमचं ठेवतात. शिशिरात देहावरची पाने गळाली तरी ती वह्या-पुस्तकातील पाने तशीच असतात. त्यांना बघून मी धन्य होत असतो.”

आपल्या फळाला बाजारात मोठा भाव / प्रसिध्दी आहे, अशा समजुतीत असणाऱ्या आंब्याला पिंपळ आपल्याहून जाणीवेने, विचाराने खूप मोठा आहे, हे एव्हाना जाणवले होते. पिंपळाप्रती आदरभाव, कौतुक व्यक्त करावं म्हणून आंबा पिंपळाकडे वळला तर काय? पिंपळ डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. पर्णहीन पिंपळाचं झाड आंब्याला स्वतःहून सुंदर दिसलं..समाधानी जाणवलं…आणि  मुळाकडे जायची खोड लावून घेण्याचा निश्चय त्याने मनोमन केला.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “जोहड…” – लेखिका : सुश्री सुरेखा शहा ☆ परिचय – डॉ. मुग्धा सिधये तगारे ☆

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “जोहड…” – लेखिका : सुश्री सुरेखा शहा ☆ परिचय – डॉ. मुग्धा सिधये तगारे ☆ 

पुस्तक – जोहड

लेखिका – सुरेखा शहा

‘Waterman of India’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या राजेंद्र सिंह यांच्यावरचं हे चरित्रात्मक पुस्तक.फार वर्षापूर्वी लिहिलेलं. पुस्तकाची सुरुवात होते ती राजस्थानातील अलवर या जिल्ह्यातील एका दूरवरच्या खेड्यातून.हजार बाराशे वस्तीचं हे गाव पाण्याच्या दुर्भिक्षामुळे देशोधडीला लागलेलं असतं.शेतात फारसं पीक नाही,खायला अन्न नाही, सार्‍यांची पोटं खपाटीला गेलेली.म्हातारी व स्त्रिया मागे राहिलेल्या…पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन.. स्रियांना दूरवर पायपीट करायला लागते आहे.अशक्त, उपाशी मुलं, गरीबी,निरक्षरता, उपासमार अशा दुर्दैवाच्या भोवर्‍यात सापडलेली कुटुंब…

१९७५ सालातलं हे वर्णन आहे. सातपुडा पर्वत रांगांमधील सरिस्का जंगलाजवळचा हा जिल्हा. तिथे बेसुमार जंगलतोड सुरू आहे.सगळीकडे प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. या पार्श्वभूमीवर ‘त्याचं’ आगमन होतं. तो एक ध्येयवादी तरुण राजेंद्र.समाजाचं आपण काही देणं लागतो या भावनेनं आलेला. नुसतंच लग्न, मुलं, संसार करत जगायचं आणि मरुन जायचं या आयुष्याला काही अर्थ नाही. म्हणूनच तरूण वयात सरकारी नोकरी सोडून, समान ध्येय असलेल्या चार मित्राना घेऊन राजास्थानातील या ‘किशोरी’ गावात तो येतो. काय काम करायचं हे या मित्रांचं ठरलेलं नसतं. हे सर्वजण शहरी, सुशिक्षित तरूण. राजेंद्र तर बी ए एम एस डाॅक्टर. पण तिथली एकूण परिस्थिती पाहून ‘पाणी’ प्रश्नावर काम करायचं निश्चित होतं.आजुबाजूला पाहणी केल्यावर लक्षात येतं की, पूर्वी इथे ‘जोहड’ होते. जोहड म्हणजे पावसाचं पाणी अडवणारे छोटे बांध. ज्यामुळे तळं निर्माण होतं व पुढचा पाऊस येईपर्यंत त्याचं पाणी पुरत असे. मात्र हे जोहड अनेक वर्षांमधे दुर्लक्षित होते. त्यात माती, गाळ साचून निरुपयोगी झाले होते. ही गोष्ट लक्षात आल्यावर राजेंद्रनी हे काम हाती घ्यायचं ठरवलं. सुरूवातीला गावातले लोक यासाठी पुढे येईनात. तेव्हा राजेंद्रने स्वत: हातात कुदळ घेऊन काम सुरू केलं.त्यांच्याबरोबर आलेले सुशिक्षित तरुणही हे श्रमाचं काम करायला कचरले. गावकर्‍याना किमत नाही तर आपण का घाम गाळा असे म्हणून ते निघून गेले. राजेंद्र मात्र हरला नाही. आठ दिवस एकटा घाम गाळत राहीला. नियती जणु त्याची कठोर परीक्षा घेत होती.अखेर गावातील एक स्त्री घुंघट घेऊन हातात घमेलं, फावडं घेऊन मदतीला आली. ते पाहून लाज वाटून आणखी काही लोक आले.हळूहळू चित्र पालटलं. पावसाळ्याआधी काम पूर्ण झालं. पावसाळ्यात त्यात पाणी साचून राहिलं.शेती चांगली झाली. अन् गावाचं चित्रच पालटलंच.हळूहळू राजेंद्रना ‘तरुण भारत संघ’ या संस्थेचे इतर कार्यकर्ते येऊन मिळाले. त्यानंतर गावागावात या ‘जोहड’ च्या कामाला गती आली. वीस वर्षांमधे ८६०० जोहड बांधून या मरूभूमीचा कायापालट झाला. हळूहळू शेती, शिक्षण, आरोग्य, वृक्षारोपण, बेकायदा जंगलतोड थांबवणे अशा सर्वच क्षेत्रात काम सुरू झालं.

वर्षामागून वर्षे गेली आणि झालेला विकास पाहून या कामाचं अनन्यसाधारण महत्त्व सगळ्यांच्या लक्षात आलं. घर सोडून माहेरी निघून गेलेली राजेंद्रची पत्नी परत आली. समाजानेही या कार्याची दखल घेतली. २००१ साली राजेंद्रना मॅगसेसे पुरस्कार मिळाला.२००५ साली जमनालाल बजाज पुरस्कार, २०१५ साली Stockholm पुरस्कार – Noble Prize for Water मिळाला. यानंतर त्याना अनेक पुरस्कार मिळाले.पाणी प्रश्नावर काम करणार्‍या विविध सरकारी व बिगर सरकारी समितीवर राजेंद्र निवडले गेले.जंगलातील बेकायदा खाणकाम थांबवलं.खाणमजूराना एकत्र केलं म्हणून चिडून खाणमालकानी, भ्रष्ट अधिकार्‍यानी तीन वेळा त्याना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तिन्ही वेळा त्यातून ते वाचले.

उत्तर प्रदेशच्या खेड्यातील एका जमिनदाराचा हा मुलगा.शाळेतील शिक्षकानी त्याच्यावर समाजकार्याचे संस्कार केले. गांधीवादी विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावर पडला.गांधीजी म्हणाले,’खेड्याकडे चला’ म्हणून ते राजस्थानात खेड्यात गेले. जयप्रकाश नारायण यांचाही त्यांच्यावर खूप प्रभाव पडला.२५ – ३० च्या कोवळ्या तरुण वयात घरदार आणि पत्नीला सोडून घरातलं फर्निचर विकून दूर खेड्यात जावून काम करणारा, दृढ निश्चय, प्रखर ध्येयनिष्ठा असणारा हा अवलिया…

त्यांच्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं.

परीक्षण : डाॅ. मुग्धा सिधये – तगारे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 53 – खुद ही उंगली जला ली आपने… ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे।  आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – खुद ही उंगली जला ली आपने।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 53 – खुद ही उंगली जला ली आपने… ☆ आचार्य भगवत दुबे ✍

बात मेरी न टाली आपने 

लाज सबकी बचा ली आपने

*

बंद, मुंह, कर दिया जमाने का 

माँग भर दी जो खाली आपने

*

तोड, जंजीर रूढ़ियों की सब 

हथकड़ी धागे की, डाली आपने

*

काटकर कुप्रथाओं के पर्वत 

राह उससे निकाली आपने

*

शत्रु लाचार को, शरण देकर 

कितनी जोखिम उठा ली आपने

*

शांति के यज्ञ में, हवन करके 

खुद ही, उंगली जला ली आपने

*

आग मजहब की तो, बुझा आये 

दुश्मनी, कितनों से पाली आपने

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 129 – ईश्वर ने उपकार किया है… ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता “ईश्वर ने उपकार किया है…। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 129 – ईश्वर ने उपकार किया है… ☆

ईश्वर ने उपकार किया है ।

धरती का शृंगार किया है।।

 *

संघर्षों से जीना सीखा,

मानव का उद्धार किया है।।

 *

निज स्वारथ में डूबे रहते,

उनने बंटाढार किया है।

 *

संस्कार को जिसने रोपा,

सुख का ही भंडार किया है।

 *

लालच बुरी बला है यारो,

कुरसी पा अपकार किया है।

 *

जब-जब नेता भरें तिजोरी,

जन-मन अत्याचार किया है।

 *

सुख-दुख जीवन में हैं आते,

यही सत्य स्वीकार किया है।

 *

सुख की बदली जब भी बरसी,

जनता ने आभार किया है।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

8/5/2024

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – नि:शब्द.. ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – नि:शब्द.. ? ?

तुम अंतर्भूत रही

मेरे सुख में, मेरे दुख में,

साथ बहती रही,

साथ सहती रही,

उपेक्षित होती रही,

सुविज्ञ हूँ मैं कि

लगा दूँ अपने शब्दों की

सारी जमा-पूँजी

तब भी

बौने पड़ेंगे सारे भाव

तुम्हारी प्रशंसा कर सकने में,

बस रहना

यों ही अंतर्भूत

मेरे होने का प्रमाण,

मेरे होने की गारंटी,

और वारंटी बनकर,

सोचता हूँ

क्या झाड़े जा रहा हूँ मैं

जबकि

जानता हूँँ कि

समझाने के लिए

भले ही मुझे चाहिए हों शब्द

तुम विषय को जान लेती हो निःशब्द!

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 श्री हनुमान साधना – अवधि- मंगलवार दि. 23 अप्रैल से गुरुवार 23 मई तक 💥

🕉️ श्री हनुमान साधना में हनुमान चालीसा के पाठ होंगे। संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही। मंगल भव 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 360 ⇒ गलत सही… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “गलत सही।)

?अभी अभी # 360 गलत सही? श्री प्रदीप शर्मा  ?

वे लोग सही नहीं होतेे

जो दंभ भरते हैं कि

वे कभी ग़लत

नहीं हो

सकते।

सही वे ही होते हैं

जो यह स्वीकारते हैं

कि वे भी कभी

ग़लत भी हो

सकते हैं !!!!!

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मेरी डायरी के पन्ने से # 10 – संस्मरण # 4 – एक और गौरा ☆ सुश्री ऋता सिंह ☆

सुश्री ऋता सिंह

(सुप्रतिष्ठित साहित्यकार सुश्री ऋता सिंह जी द्वारा ई- अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए अपने यात्रा संस्मरणों पर आधारित आलेख श्रृंखला को स्नेह प्रतिसाद के लिए आभार।आज प्रस्तुत है आपकी डायरी के पन्ने से …  – संस्मरण – एक और गौरा)

? मेरी डायरी के पन्ने से # 10 – संस्मरण # 4 – एक और गौरा ?

श्रावणी मासी मोहल्ले भर में प्रसिद्ध थीं। सबके साथ उठना – बैठना, सुख-दुख  में पास आकर सहारा देना उनका स्वभाव था। स्नान के बाद सिर पर एक गमछा बाँधकर वह दिन में एक दो परिवारों का हालचाल ज़रूर  पूछ आतीं  पर एक बात उनकी ख़ास थीं कि वे स्वयं कभी किसी से किसी प्रकार की चर्चा न करतीं,यहाँ का वहाँ न करतीं जिस कारण सभी अपनी पारिवारिक समस्याएँ उनके सामने रखते।

वे किसी से सहायता की अपेक्षा कभी नहीं रखतीं थीं। वे स्वयं सक्षम, समर्थ और साहसी महिला थीं। निरक्षर थीं वे पर अनुभवों का भंडार  थीं। समझदार बुद्धिमती तथा सकारात्मक दृष्टिकोण रखनेवाली स्त्री।

किसी ज़माने में जब हमारा शहर इतना फैला न था तो नारायण मौसाजी ने सस्ते में ज़मीन खरीद ली थी और एक पक्का मकान खड़ा कर लिया था। घर के आगे – पीछे खूब ख़ाली ज़मीन थी। श्रावणी मासी आज भी खूब रोज़मर्रा लगनेवाली सब्ज़ियांँ अपने बंगले के पिछवाड़े वाली उपजाऊ भूमि पर उगाती हैं। उन सब्ज़ियों का स्वाद हम मोहल्लेवाले भी लेते हैं। अपने तीनों बेटों के हर जन्मदिन पर वे पेड़ लगवाती, पर्यावरण से बच्चों को अवगत करातीं। आज उनके जवान बच्चों के साथ वृक्ष भी फलदार हो गए। आम,जामुन,अनार,अमरूद,सीताफल, पपीता , कटहल, कदली , चीकू , सहजन के पेड़ लगे हैं उनके बगीचे में। खूब फल लगते और मोहल्ले में बँटते हैं। आर्गेनिक फल और सब्जियाँ! पीपल, अमलतास , गुलमोहर वट, नीम के भी वृक्ष लगे हैं। हम सबके बच्चों ने पेड़ पर चढ़ना भी यहीं पर तो सीखा है।

अब शहर बड़ा हो गया, चारों ओर ऊँची इमारतें तन गईं, और उनके बीच श्रावणी मासीजी का बंगला पेड़ – पौधों से भरा हुआ खूब अच्छा दिखता है। कई बिल्डरों ने कई प्रलोभन दिए पर मासीजी का मन न ललचाया।

अब तीनों बेटे ब्याहे गए । घर में खूब हलचल है। बेटे भी सब पर्यावरण के क्षेत्र में काम करते हैं। पूरा परिवार प्रसन्न है।

अचानक सुनने में आया कि मासी जी के घर बछड़ा समेत एक सफ़ेद गाय लाई गई। गोठ बनाई गई , उसकी सेवा के लिए एक ग्वाला नियुक्त किया गया। अब हम सबको दही, घी, मट्ठ़े का भी प्रसाद मिलने लगा।

बार – बार सबके पूछने पर कि मासीजी को गाय खरीदने की जरूरत क्यों पड़ी भला! आज के आधुनिक युग में भी भला कोई गाय पालता है! कितनी गंदगी होगी, बुढ़ापे में काम बढ़ेगा कैसे संभालेंगी वे ये सब!

एक दिन श्रावणी मासी जी ने यह कहकर सबका मुँह बंद करवा दिया कि, अब तक आप सब आर्गेनिक सब्ज़ियों और फलों का आनंद लेते रहे । अब अपनी आनेवाली अगली पीढ़ी को भी शुद्ध दूध-दही,छाछ- मट्ठ़ा और घी- मक्खन खाकर पालेंगी।

आल आर्गेनिक थिंग्स। दूध भी आर्गेनिक,। हम सब मासीजी की बात पर हँस पड़े।

वे बोलीं, मेरी दो बहुएँ गर्भ से हैं। ये व्यवस्था उनके लिए है।आनेवाली पीढ़ी शुद्ध वस्तुओं के सेवन से स्वस्थ, ताकतवर बनेगी। इसकी शुरुआत मैं अब आनेवाले मेरे पोते-पोतियों से करती हूँ। श्रावणी मासी जी की दूरदृष्टि को सलाम।

मुझे महादेवी वर्मा जी की ‘ गौरा ‘ याद आ गई। जो किसी की ईर्ष्या का शिकार हो गई थी और तड़पकर मृत्यु मुखी हुई। और यहाँ आज एक गाय अपने बछड़े समेत खूब देख- भाल और सेवा पा  रही है। बछड़े का भी भविष्य उज्जवल है और आनेवाली पीढ़ी का भी। दोनों तंदरुस्त होंगे।

© सुश्री ऋता सिंह

फोन नं 9822188517

ईमेल आई डी – ritanani[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares