मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक सहजीवन… – भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ एक सहजीवन…  भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(असं म्हटल्यावर रजनीने रविवारी सकाळचा नाश्ता झाल्यावर रघुवीरजींच्या समोर विषय काढला. ‘पप्पा, आम्ही तुम्हाला सोसायटीतल्या राजेश्वरी आंटीबरोबर पार्कमध्ये गप्पा मारताना पाहिलं आहे.’) – इथून पुढे — 

रघुवीरजी शांतपणे म्हणाले, ‘हो, अलीकडेच आमची ओळख झाली आहे. राजकीय घडामोडी, आवडती पुस्तके, जुनी अवीट गाणी ह्याविषयी होणाऱ्या गप्पांतून आमची मैत्री फुलत गेली आहे एवढंच. ’

‘पप्पा, मला ठाऊक आहे की तुमच्या हृदयातील सासूबाईंची जागा कुणीच घेऊ शकणार नाहीत, तरीही मी राजेश्वरी आंटीशी एकदा बोलून पाहते. ’ यावर काय बोलावं हे रघुवीरजींना सुचलंच नाही.

रजनीने माहिती काढल्यावर कळलं की राजेश्वरींच्या लग्नानंतरच्या दोन महिन्यांतच त्यांचे पती कायमचे परदेशी स्थायिक झाले. काही महिन्यानंतर त्यांच्या पतीने फोनवर सांगितलं, ‘आईवडिलांच्या इच्छेखातर मी हे लग्न केलं होतं. मी इथल्याच एका मुलीशी लग्न केलं आहे. तू तुझा निर्णय घ्यायला मोकळी आहेस. ’

हे ऐकल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. काय करावं हे सुचत नव्हतं. त्यांनी ठरवलं असतं तर त्या गुंत्यातून बाहेर पडल्या असत्या. घटस्फोट घेऊन त्या माहेरी जाऊ शकल्या असत्या पण त्यांच्या पोटात बाळ वाढत होतं.

स्थानिक हायस्कूलमध्ये त्या शिक्षिका होत्या. त्यावेळी त्यांनी माहेरी जाण्यापेक्षा सासू सासरे यांच्याबरोबर राहून आपल्या होऊ घातलेल्या अपत्याला वाढवत जीवन व्यतीत करण्याचा कठोर निर्णय घेतला. जो पर्यंत सासू सासरे होते तोवर त्यांची सेवा करीत राहिल्या. आपल्या लेकीला शिकवून विद्याविभूषित केलं.

एकुलत्या एका मुलीच्या लग्नानंतर राजेश्वरी मॅडम एकट्या पडल्या आणि त्या नुकत्याच सेवानिवृत्तही झाल्या. त्यांच्या आयुष्यात प्रचंड पोकळी निर्माण झाली. एकटेपणाच्या धास्तीने त्यांची तब्येत खालावत चालली. जावई आणि मुलीने राजेश्वरींना त्यांच्याकडे येऊन राहण्याचा आग्रह केला पण त्या तयार झाल्या नाहीत. अलीकडेच त्यांना रघुवीरजींच्या रूपाने सुखदु:ख वाटून घेणारा एक मित्र भेटल्याने त्यांच्या चित्तवृत्ती फुलून आल्या होत्या.

एके दिवशी रजनी भाभी थेट राजेश्वरींच्या घरी पोहोचली. रघुवीरजींची सून असल्याचं सांगून ती बसली. त्यांनी दिलेला चहा घेतला. विषयाला हात कसा घालावा या विचारात रजनी अवघडली होती. अखेर धैर्य एकवटून तिने तोंड उघडलं. ‘ मी काय म्हणत होते, तुम्ही दोघांनी लग्न केलंत तर तुम्हाला एकमेकांची सोबत होऊन तुमच्या जीवनातील एकटेपणा संपून जाईल. ’

राजेश्वरी अस्वस्थ होऊन म्हणाल्या, ‘निघा आता. ’ त्यांना तो विवाहाचा प्रस्ताव अजिबात रूचला नाही.

एवढ्यावरच न थांबता रजनीने राजेश्वरींच्या मुलीचा, अर्चनाचा मोबाईल नंबर मिळवला आणि तिला फोनवरून सगळी हकीगत सांगितली.

अर्चनानेही आईला भेटून तोच विवाहाचा प्रस्ताव मांडला. राजेश्वरी म्हणाल्या, ’अर्चू बेटा, संपूर्ण आयुष्य मी एकटीनं घालवलं आहे. मला लग्नच करायचं असतं तर मी माझ्या तारुण्यातच केलं असतं. या वयात लग्नाचा विचार केला तर लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल? अन लक्षात ठेव, सातासमुद्रापलीकडे असेना का, माझा पती अजून जिवंत आहे. ’

‘आई, त्यावेळी मी तुझ्या पोटात होते. तुला पुन्हा लग्न न करण्यासाठी ते एक सबळ कारण होतं. पण आता हे एकटेपण तुला सुखाने जगू देणार नाही आणि तुझ्या काळजीत मीदेखील सुखी राहू शकणार नाही.

आई, समाजाचं काय घेऊन बसली आहेस. बाबांनी केलेल्या अन्यायावर तुझ्या पाठीमागे त्यांनी चविष्ट चर्चा केली असेल. तुझं दु:ख वाटून घ्यायला कुणी पुढे आले नाहीत. आपलं स्वत्व सांभाळून, तू या स्वार्थी जगाच्या खडकाळ वाटेवर हरवून न जाता वाट काढत चालत राहिलीस. आपल्या पोटच्या गोळ्याला आणि त्याच माणसाच्या आईबाबांना सांभाळत नेटाने तू पुढे चालत राहिलीस.

आई, ज्यानं स्वत:च्या अपत्याचं तर सोड, जन्मदाते आईबाबा, जिच्याशी सप्तपदी घातली ती पत्नी ह्यांच्याकडे परत कधी वळूनही पाहिलं नाही त्या माणसाबद्दल बोलते आहेस? तू आपल्या अपत्याच्या वात्सल्यापुढे हरलीस हे त्यानं ओळखलं. तुझ्या काळजाला निर्दयीपणे नख लावून गेलेल्या त्या माणसाला तुझी तडफड कधीच कळली नाही. त्या पतीचं कसलं कौतुक सांगते आहेस?

अगं नोकरीच्या निमित्ताने ‘दोन ध्रुवावर दोघे आपण’ असं म्हणत जगणारी जोडपीही असतात; तरीही ही जोडपी मनाने, संवादाने एकमेकांशी जोडलेली असतात. एकमेकांच्या साथीने पुढे जातात, एकत्र स्वप्नं पहातात आणि ती पूर्ण करण्यासाठी आयुष्य वेचतात. पण गेल्या अठ्ठावीस वर्षात तो माझा ‘बाप’ म्हणवला जाणारा माणूस मी कधी पाहिलाच नाही.

आई, पती म्हणजे कोण हे मी सांगावं तुला? अगं, जो पुढे होऊन तिच्या डोळ्यांतला भाव टिपतो, कधी काळी चूक झालीच तर क्षमा करून तिचं न्यूनत्व तिला जाणवू न देता जो समजून घेतो आणि कसलीही उणीदुणी न काढता जो तिला उराशी धरतो, तो खरा जीवनसाथी. लग्नानंतरच्या दोन वर्षात मी हे अनुभवते आहे. तुला एवढा चांगला जावई शोधता आला ह्याचा अर्थ रघुवीरजींच्यात तू नक्कीच काही तरी चांगलं पाहिलं असणार. आई, माझ्यासाठी तरी हो म्हण. ’

‘बाळा, तरुणपणी आपण लग्न करतो किंवा एक नातं निर्माण करतो तेव्हा त्या नात्यासोबत काही जबाबदारीदेखील उचलतो. परंतु म्हातारपणी तसं नसतं. म्हातारपण म्हणजे व्याधींचं घर. आता त्या जबाबदारीचे ओझे शरीराला झेपत नाही, म्हणून एकटे राहावेसे वाटते. म्हातारपणी सोबत न राहता निखळ मैत्रीचे नाते जास्त उपयुक्त ठरते. या नात्याने आधार मिळतो आणि जबाबदारीचे ओझे देखील वाटत नाही. म्हातारपणी साथ देणारे मित्र- मैत्रीणी मात्र जरुर हवेत. ते आपला भावनिक प्रवास सुखकर करतात. त्यात स्त्री पुरूष असा मात्र भेद नसावा. ’

‘आई, आम्ही सदैव तुमच्यासोबत असणार आहोत’ हे लेकीने पटवून दिल्यानंतर अखेर राजेश्वरीने त्या प्रस्तावास होकार दिला. एकमेकांच्या सहवासात भावनात्मक आधार मिळणार होते, हे जरी खरं असलं तरी या वयात विवाहाच्या बंधनात अडकणे आणि वारसा हक्काने मिळणाऱ्या कुणाच्याही संपत्तीला धक्का लावणे हे मात्र त्यांना प्रशस्त वाटत नव्हते.

कसल्याही नात्यांची चौकट न स्वीकारता, त्या दोघा कुटुंबियांच्या आणि आप्तेष्टांच्या संमतीने त्या दोघांनी लग्नाविना सहजीवनाचा निर्णय घेतला.

आजवर एकटीनेच झुंजत राहिलेल्या राजेश्वरींच्या जीवनातले रितेपण संपून सौख्य पदरी आलं. साहेब, आता रघुवीरजींची काळजी घ्यायला राजेश्वरी आंटी असल्याने. लवकरच शेखर सपत्निक परदेशातल्या कंपनीत जॉइन होण्याच्या तयारीत आहे. अर्चनाला हक्काचे ‘पप्पा’ मिळाले म्हणून ती खूश आहे. एकच वाटतं, सहजीवन आजही तितकं समाजमान्य नाही. आपण सुद्धा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. ” असं जगदीशने आपले मत मांडलं.

रघुवीरजींना भेटून जुन्या आठवणी ताज्या करून उगाच त्यांच्या मनांत काहूर माजवायला नको म्हणून मी त्यांना भेटायचा विचारच सोडून दिला.

– समाप्त – 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बीज अंकुरे अंकुरे – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बीज अंकुरे अंकुरे – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

माझं सर्व बालपण सातारा जिल्ह्यातल्या म्हसवड नावाच्या छोट्याशा खेडेगावात आजीच्या सहवासात गेलं.

इथे घडलेल्या गमती – जमती, कथा – व्यथा आणि माझ्यावर झालेले भले – बुरे परिणाम; हे सर्व मी माझ्या पुस्तकात काहीही न लपवता मांडलं आहे.

माझ्या आजीचं नाव लक्ष्मीबाई… !

नावाप्रमाणेच ती होती. कपाळावर जुन्या रुपयाच्या कॉइन एवढं भलं मोठं कुंकू, नाकात बांगडीला लाजवेल एवढी मोठी नथ, काठापदराचं लुगडं घालून ती अशी चालायची; जसा राज घराण्यातला हत्ती निघाला आहे… ! म्हणायला अशिक्षित, पण व्यवहार चातुर्य PHD झालेल्या माणसाला लाजवेल असं…

तोंडानं फटकळ, पण मायेचा जिवंत झरा हृदयात घेऊन फिरायची… गावात जबरदस्त दरारा… ! 

एके दिवशी तिकडे तिचे वडील वारले आणि इकडे माझा जन्म झाला…

त्यावेळच्या भाबड्या कल्पनेनुसार, एका माऊलीने तिला सांगितले, ‘आगं लक्साबया… रडु नगो बाये, पांडुरंगाचे पोटी तुजा बापच जलमाला आलाय… !’ … पांडुरंग माझ्या वडिलांचे नाव… ! 

झालं, तेव्हापासून माझी आजी मला तिचा बापच समजायला लागली, आणि तेव्हापासून माझे विशेष लाड आणि कोड कौतुक सुरू झालं.

अख्खा गाव तिला मामी म्हणायचा, तिला घाबरायचा…. पण तिच्या प्रेमाने लाडावलेला मी तिला लहानपणी “ए लक्षे” म्हणून हाक मारायचो…. आजीचे वडील तिला याच नावानं हाक मारायचे, नातू पण त्याच नावाने हाक मारतो, म्हणजे खरोखरच आपला बापच नातवाच्या रूपाने जन्माला आला आहे, यावर आता शिक्कामोर्तब झालं… ! 

तिचा “बाप” असण्याचा, मग पुढे मी पुरेपूर फायदा घेतला.

करारी आणि कठोर बाई हि, परंतु कोणत्याही गरिबाच्या अडल्या नडल्या मदतीला ही सर्वात प्रथम पुढे येई.

सर्वांनाच हिच्याबद्दल आदरयुक्त भीती होती. गावातल्या श्रीमंतापासून ते गरिबातल्या गरीब घरापर्यंत कोणाच्याही घरात ती डायरेक्ट घुसायची… घरात जिथे उंच जागा सापडेल तिथे ती पायावर पाय टाकून बसायची…. आणि इकडे तिकडे पहात, पदराची दोन टोकं हाताच्या चिमटीत पकडत, स्वतःला वारा घालत, घरातल्या लोकांची हजामत करायची.

हतरून पांगरून आजुन काडली न्हाईत ? 

शेळ्याच्या लेंड्याच हित पडल्यात…

घरच नीट सारवलं न्हायी…

गाई म्हशीचं श्यान उचलायला का तुजा बा येणार हाय का ए… ? 

सुना म्हशीवानी खाऊन फुगल्यात…

ए टवळे डोक्याला त्याल लाव कि…. का तमाशात नाचायला जायचं हाय ? 

डोक्यावर पदुर घ्यायला तुज्या आईनं शिकावलं न्हाय का तुला, व्हय गं ए उंडगे… !

इतभर गजरा आणि गावभर नखरा…

……. तिची टकळी चालू असायची… तिच्या तावडीतून कुणीच सुटायचं नाही. येणारा जाणारा प्रत्येक जण तिची नजर चुकवून जायचा… ! 

यावेळी मी तिचा पदर धरून, डाव्या हाताने चड्डी सावरत शर्टाच्या उजव्या बाहीला शेंबूड पुसत सर्व काही पहात असे. चड्डी माझ्या मापाची मला कधीच मिळाली नाही.

‘ थोडी मोटी दे… वाडतं वय हाय… अजून मोटी दे…. हांग आशी… ‘ म्हणत दुकानदाराला माझ्या चड्डीची ऑर्डर आजीच द्यायची…

डावा हात हा फक्त चड्डी सांभाळण्यासाठी असतो आणि उजवा हात शेंबूड पुसण्यासाठी… त्या वयात हाताचे इतकेच उपयोग मला माहित होते.

तर सर्व उणीदुनी काढून झाल्यानंतर, पदरानं घाम पुसत, म्हातारी बिनदिक्कतपणे त्या घरात ऑर्डर सोडायची… ए टवळे, च्या टाक जरा मला… तुमाला आक्कल शिकवून दमले बया मी, तुमच्यापेक्षा गाडव बरं… वर तीच कांगावा करायची… ! 

चहा येईपर्यंत, माझी नाकाची फुरफुर चालूच असायची…

समद्या गावाचा शेंबूड तुलाच आलाय का काय मुडद्या ? असं म्हणत वैतागून उठत; ती मला दरा दरा ओढत घराबाहेर नेत, माझं नाक पदरात धरून असं शिंकरायची, की मृत्यु परवडला…. ! 

अजून थोडा जोर लावला असता, तर तीने माझा मेंदूच बाहेर काढला असता…

तुजं आसं हाय, शेंबूड आपल्या नाकाला, आन् रुमाल देतंय लोकाला… असं स्वतःशी पुटपुटत, मला कडेवर घेऊन ती परत घरात यायची.

यानंतर कान नसलेल्या, फुटक्या कपात, किंवा चार ठिकाणी चेंबलेल्या फुलपात्रात चहा यायचा. बऱ्याच वेळा जर्मन च्या “भगुल्यात” च्या यायचा… बशी नसली तर… आम्ही मग हा “च्या” गोल ताटात भरून भुरके मारत प्यायचो… आज जाणवतं, हा खऱ्या अर्थाने सोहळा होता… !!! 

….. आता कुठे आहे हे फुलपात्र ? ते जर्मनचं भांडं आणि तो कान नसलेला फुटका कप ??? 

 मी शोधतोय… ! आईच पत्र हरवलं… हा खेळ आम्ही लहानपणी खेळायचो, हे फुलपात्र… ते जर्मनचं भांडं आणि कान नसलेला फुटका कप सुद्धा तसाच हरवलाय… ! 

माणसं शिकत गेली आणि या जुन्या गोष्टी पुस्तकाच्या पानात दबून गेल्या… आठवण म्हणून ठेवलेल्या पिंपळाच्या जाळीदार पानासारख्या… ! 

आता या गोष्टी दिसतात फक्त जुन्या बाजाराच्या दुकानात… नाहीतर, चेहऱ्यावर सुरकुत्यांची जाळी घेऊन, अंताकडे वाटचाल करणाऱ्या म्हाताऱ्या माणसांच्या मनात… !!!

तर; बऱ्याच वेळा फुलपात्रातून किंवा फुटलेल्या कपातून, बशीत चहा सांडेस्तोवर दिला जायचा…

फुलपात्र आणि कप सोडून बशी सुद्धा चहानं भरलेली असायची… ! डाव्या हाताने चड्डी, उजव्या हाताने नाक सांभाळताना…. मला चहा प्यायलाच जमायचं नाही, मग माझी म्हातारी एक घोट स्वतः प्यायची, एक घोट मला पाजायची… ! हा चहा पिताना, माझ्या घशातून घुटुक घुटुक आवाज येत असावा… मला माहित नाही. पण यातही माझ्या आजीला कौतुक…

‘ बगा गं बायांनो, “माजा बाप” कसा घुटुक घुटुक च्या पितो, तुमाला दावते… ‘ म्हणत ती अजून चार फुलपात्रे नाक दाबून मला चहा पाजायची…

पुढे डोक्यावरून पाणी गेलं…

रडत खडत शिकलो…. त्यानंतर मोठ्या मुश्किलीने डॉक्टर झालो… पुढच्या खाचखळग्यातून वाटा काढत चालत राहिलो… आयुष्यातली सगळी पानीपते हरलो… तरीही पुढे कष्ट करून मनातला “विश्वासराव” जिवंत ठेवला… ! 

आयुष्याच्या एका टप्प्यावर आंतरराष्ट्रीय संस्थेत कामाला लागलो… आर्थिक स्थैर्य आलं. मग अनेक उच्चभ्रू लोकांशी / ऑफिसशी संपर्क येऊ लागला. सुरुवातीला… “खेड्यातनं आलंय येडं, आन भज्याला म्हनतंय पेडं…. ” अशी माझी अवस्था होती. खेड्यातला येडा मी…. तिथले मॅनर्स आणि एटिकेट्स शिकण्याचा प्रयत्न करू लागलो. चकचकीत आणि महागड्या कपांमध्ये चहा मिळू लागला… भल्या मोठ्या कपामध्ये / मगमध्ये सांडणार नाही, अशा पद्धतीने निम्माच चहा किंवा कॉफी असायची… ! 

पुढे मी सरावलो…

एकदा हि माझी खडूस म्हातारी… बऱ्याच वर्षांनी माझ्या घरी आली….

आंतरराष्ट्रीय संस्थेतील महाराष्ट्राचा प्रमुख मी….

तिला एका मोठ्या पांढऱ्या स्वच्छ कपामध्ये मी तिला चहा दिला…

कपाला सोन्याचीच वाटावी, अशी सोनेरी रंगाची नक्षी होती…

शिकलेले मॅनर्स सांभाळत, भल्या मोठ्या कपामध्ये; सांडणार नाही अशा पद्धतीने तिला निम्मा चहा दिला होता. विहिरीत वाकून बघावं, तसं तीनं कपात वाकून बघितलं… कपातला अर्धा चहा बघून ती खवळली…. तिच्या स्वभावानुसार ती बोलली…. ‘येवडासा च्या ? ल्हान पोरगं हेच्यापेक्षा जास्त मुततंय… तू कंनच्या कंपनीत काम करतूय रं… ? सायबाला म्हणावं पाच धा रुपय पगार जास्त दे… घरात आलेल्या पावण्यांना कप भरून च्या पाजू दे… !’

पाच लाख रुपये दरमहा कमावणाऱ्या माझ्यासारख्या माणसाच्या तोंडात माझ्याच म्हातारीने सणसणीत चपराक हाणली. मलाही राग आला, गावाकडे चेंबलेल्या फुलपात्रात आणि फुटक्या कपात च्या पिणारी माजी म्हातारी, आज इतक्या मोठ्या, सुंदर सोनेरी नक्षीच्या कपात चहा पीत आहे, नातवाचं हिला काहीच कौतुक नाही… ??? मी तिला हे बोलून दाखवलं.

यावर जोरदार पलटवार करत म्हातारी म्हणाली, ‘ गप ए शेंबड्या… तूजा कप किती छोटा हाय, का मोटा हाय…. त्याला सोन्याची का चांदीची नक्षी हाय, त्याला किंमत नसती… या कपातून तू काय देतू, किती देतू, कोनच्या भावनेनं देतू त्याला जास्त किंमत आसती… !’ 

आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये दरवर्षी “मॅनेजमेंट” या विषयावर किमान चार सेमिनार असतात… असे मागील दहा वर्षात मिळून मी 40 सेमिनार अटेंड केले असतील… तू काय देतो, किती देतो, कोणत्या भावनेनं देतो त्याला जास्त किंमत असते… ! सेमिनार मध्ये किती कळलं मला माहित नाही… पण माझ्या म्हातारीने दोन मिनिटात मॅनेजमेंटचं सर्व सार सांगितलं… ! हातातला कप माझ्या हातातच राहिला… तिच्याकडे भारावून मी पाहत राहिलो… “कपावरची” सोनेरी नक्षी आता तिच्या “कपाळावर” उमटलेली मला भासली… !!! 

गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची… !!!

— क्रमशः भाग पहिला   

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महर्षि बालखिल्य… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ महर्षि बालखिल्य… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

महर्षी बालखिल्य हे महर्षी कृतु आणि सन्नीता यांचे पुत्र. प्रजोत्पादनासाठी आणि तपस्या करण्यासाठी महर्षी कृतु यांनी आपल्या केसांपासून त्यांना निर्माण केले. ते साठ हजार होते. त्यांचा आकार अंगठ्या इतका लहान होता. ते सूर्याचे उपासक होते. ते सूर्य लोकात रहात. पक्षांप्रमाणे एक एक दाणा वेचून ते आपला उदरनिर्वाह करत असत. ते सदैव सूर्याकडे तोंड करून फिरत असत. त्यांच्या तपस्येचे तेज सूर्याला मिळत असे. ते सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट रेडियमच्या तीव्रतेपासून जगाचे संरक्षण करीत असत.

बालखिल्य हा दैवी ऋषींचा समूह आहे. ते शरीराने लहान पण तपस्वी म्हणून महान आहेत.

एकदा महर्षी कश्यप यांनी यज्ञ करण्याचे ठरवले. त्यांनी कृतु ऋषींना सांगितले तुम्ही माझ्या यज्ञात ब्रह्माचे स्थान ग्रहण करा व आपल्या सर्व पुत्रांना घेऊन या. महर्षी कृतुंनी आमंत्रण स्वीकारले. देवराज इंद्रही त्या ठिकाणी होते. महर्षी कश्यप यांनी सर्वांना यज्ञासाठी समिधा आणण्यास सांगितले. इंद्राने खूप समिधा आणल्या. पण बालखिल्य थोड्याच समिधा आणू शकले. इंद्राने चेष्टा केली. विचारले, हे वीतभर लाकूड घेऊन कशाला आलात? हा यज्ञ तुमच्या आकाराप्रमाणे छोटा असेल असे तुम्हाला वाटले का? बालखिल्ल्यांना उपहास समजला. तरीही कश्यप ऋषींसाठी शांत राहून ते म्हणाले, “आम्ही यज्ञासाठी समिधा आणल्या आहेत. त्यांच्या आकाराकडे न पाहता आमचा समर्पण भाव पहा. ” इंद्र म्हणाला, “ तुम्ही देवराज इंद्राशी बोलत आहात लक्षात आहे का? “ 

बालखिल्यांना खूप राग आला. इंद्राला धडा शिकवण्यासाठी ते म्हणाले, “ तुला इंद्रपदाचा गर्व आहे‌ म्हणून आम्ही संकल्प करतो की आम्ही आमच्या योगबलाने तुमच्यापेक्षा कैक पटीने शक्तिशाली, बुद्धिमान आणि सद्गुणी इंद्र निर्माण करू. ” इंद्र घाबरून कश्यपांकडे गेला. कश्यपांनी बालखिल्यांची समजूत घातली व सांगितले, “ जगात इंद्र एकच असणार तेव्हा त्याला क्षमा करा. ” बालखिल्यांना आपला संकल्प परत घेणे कठीण होते. ते म्हणाले, “ आम्ही संकल्प परत घेऊ शकत नाही. पण बदल करू शकतो. तुम्ही पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत आहात. तुमचा पुत्र अतिशय पराक्रमी, शक्तिशाली असा प्राणी असेल जो पक्षांचा इंद्र होईल. आमचा संकल्पही पूर्ण होईल आणि इंद्र पदाचे महत्व ही कमी होणार नाही. ” 

कश्यपांची पत्नी विनता हिने गरुडाला जन्म दिला आणि गरुड भगवान विष्णूचे वाहन बनले. तसेच त्याला पक्षांचे इंद्र असे नाव पडले.

त्यांनी बालखिल्य संहिता रचली. ते केदारखंडमध्ये तपस्या करीत होते. तिथे एक नदी आहे तिचे नाव बालगंगा.

ऋग्वेदाच्या आठव्या मंडलाच्या शेवटी एक परिशिष्ट आहे. त्याला बालखिल्यसूक्त असे म्हणतात.

एकदा गरुडाला खूप भूक लागली. त्याने वडिलांना विचारले, ‘ मी काय खाऊ?’ तेव्हा ते म्हणाले, “समुद्रात एक मोठे कासव आहे आणि वनामध्ये एक महाभयंकर हत्ती आहे. दोघेही खूप क्रूर आहेत. तू त्यांना खा. ” गरुडाने दोघांना पकडले व तो सोमगिरी पर्वतावर गेला. तिथे एका उंच वृक्षावर काही ऋषी उलटे लटकून तपस्या करत होते. गरुड त्याच फांदीवर बसला. त्याच्या वजनाने ती फांदी तुटू लागली. गरुडाने आपल्या चोचीत ती फांदी पकडली आणि कश्यप ऋषींकडे आला. कश्यप ऋषी म्हणाले, “ हे बालखिल्य ऋषी आहेत. त्यांना त्रास दिलास तर ते शाप देऊन तुला भस्म करतील. ” गरुडाला वाचवण्यासाठी त्यांनी बालखिल्य ऋषींना प्रार्थना केली की ‘ तुम्ही फांदीवरून खाली या. ’ बालकिल्ल्यांनी कश्यपांची प्रार्थना ऐकली. ते खाली आले आणि हिमालयात तपस्या करण्यासाठी निघून गेले.

असे हे आकाराने लहान पण कर्तृत्वाने महान असे तपस्वी बालखिल्य ऋषी. त्यांना कोटी कोटी प्रणाम.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एक गंमत सांगू तुला ?…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “एक गंमत सांगू तुला ?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

“एक गंमत सांगू तुला. ?”

 

लहानपणी चणे फ़ुटाणे खूप आवडायचे खायला..

पण दहा पैसेही परवडायचे नाहीत खिशाला..

म्हातारपणी रुपयांनी खिसा भरला

पण मोडके दात बघून चणे लागले चिडवायला…

 

एक गंमत सांगू तुला…?

 

लहानपणी वाटायचं,

नविन पुस्तके हवीत वाचायला..

पण चोरुन, लपुन, उसनी मित्रांची पुस्तके घेवून अभ्यास पूर्ण केला..

म्हातारपणी नवीन पुस्तकांचा ढीग येवून पडला

पण तो पर्यंत चष्म्याचा नंबर सोडावाॅटर झाला…

 

एक गंमत सांगू तुला….?

 

लहानपणी रिक्षातून आवडायचे फिरायला

पण सव्वा रुपायासुध्दा नसायचा कनवटीला..

म्हातारपणी ड्रायव्हर म्हणतो गाडी तयार आहे, चला फिरायला 

पण जीना उतरेस्तोवर

पाय लागतात लटपटायला…

 

एक गंमत सांगू तुला….?

 

लहानपणी १०✘१० ची खोली होती रहायला,

दमून भागून आलो की क्षणात लागायचो घोरायला..

म्हातारपणी चार खोल्यांचा मोठा ब्लाॅक घेतला,

पण एकेक खोली आ वासून येते खायला…

 

एक गंमत सांगू तुला……?

 

खूप शिकून मुलगा अमेरिकेला गेला,

फार फार आनंद झाला पण भिती वाटते मनाला.. !

मृत्युसमयी येईल का तो पाणी द्यायला,

का ई-मेलवरच शोकसंदेश पाठवेल आपल्या आईला.

 

…. म्हणून सांगतो मित्रांनो…… आताच जगणं शिका.

आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगा…

… ज्या क्षणी तुम्ही मरण पावता, त्या क्षणी तुमची ओळख एक ‘बॉडी’ बनुन जाते,

‘बॉडीला’ आणा, बॉडीला झोपवा,

लोक तुमच्या नावाने सुद्धा हाक मारत नाही.

म्हणून आव्हाने स्वीकारा,

 

आवडत्या गोष्टीसाठी खर्च करा,

आवडत्या लोकांना वेळ द्या,

 

पोट दुखेपर्यंत हसा, कोणी बालिश 

म्हणाले तरी चालेल.

 

मनसोक्त नाचा, लग्नात, वरातीत. जिथे मिळेल तिथे नाचा.

अगदी लहान बाळासारख़ं जगा.

कारण,

 

‘मृत्यु’ हा जीवनातला सर्वात मोठा लॉस नाहिये, लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला ‘जिवंतपणा’ मेलेला असतो.

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ काव्यसुधा (काव्यसंग्रह) – कवी : चिंतामणी ज. भिडे ☆ परिचय – प्रो. भारती जोगी ☆

प्रो. भारती जोगी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ काव्यसुधा (काव्यसंग्रह) – कवी : चिंतामणी ज. भिडे ☆ परिचय – प्रो. भारती जोगी ☆

पुस्तक : काव्यसुधा (काव्यसंग्रह)

कवी : चिंतामणी ज. भिडे 

मुद्रक— आसावरी इंटरप्रायझेस, ठाणे.

मूल्य– ₹ १००/-

‘काव्य सुधा ‘ हा श्री. चिंतामणी ज. भिडे लिखित, काव्यसंग्रह माझ्या हाती आला तो आंतरजालाच्या माध्यमातून! एका समूहावर नेहमीच होणाऱ्या, एका खास बाजाच्या, वैशिष्ट्यपूर्ण लहेजातल्या, काव्य सुधा सिंचनाचा आनंद घेणारी मी! मला सतत तो सुधाघट काठोकाठ भरलेला बघण्याची इच्छा! आणि एक दिवस तो काव्यसुधा संग्रह, अचानक माझ्या हाती आला… तो ही हवेतून… स्पीड पोस्टाने (मारूत तूल्य वेगम् ) असाच! 

हा काव्यसंग्रह हाती आला. सवयीने आधी मुखपृष्ठावर नजर गेली. कारण मुखपृष्ठ आरसा असतं त्या-त्या साहित्य कृतीचा! माझ्या दृष्टीस पडलं ते एक सुंदर असं… पूर्ण विकसित, उन्मिलित झालेलं… कमल पुष्प! आणि शीर्षस्थानी ‘ काव्यसुधा ‘ हे शीर्षक, एकेरी अवतरण चिन्हांत, मोठ्या दिमाखात विराजमान झालेलं! 

वाटलं की… नक्कीच श्री. भिडे यांच्या मनातील विविध रंगी विचारांच्या पाकळ्या, त्यांच्या शब्दांतील, काव्य अमृताच्या सिंचनाने, अंग-प्रत्यंगाने उमलून आल्या असाव्यात. आणि मग त्याचाच हा अमृत कलश… काव्यसुधा!!

पुस्तकाच्या प्रस्तावनेला लाभलेला ; श्री. वामन देशपांडे यांचा शब्द स्पर्श अतिशय अभ्यास पूर्ण !! अर्वाचीन मराठी कवितेच्या आजवरच्या प्रवासाची वळणं थेट नव्या रूपापर्यंत आणून… चिंतामणी भिडे या कविच्या कविता लेखनाचं सुंदर रूप विशद करणारा!! तसेच… प्रा. डॉ. अनंत देशमुख यांचं… कवीच्या निवडक अशा, मनात ठसलेल्या, मनाला भिडलेल्या कवितांचं भाव भरलं असं अभिप्रायी मनोगत वाचायला मिळतं. तसेच प्रदीप गुजर यांचंही… भिडे यांच्या कवितेतले, मन तृप्त करणारे पैलू उलगडणारा अभिप्राय ही आस्वादायला मिळतो.

संग्रहाची… मलपृष्ठावरील पाठराखण केलीयं… श्री. प्रभाकर शंकर भिडे यांनी! ‘ अल्पाक्षर रमणीयता ‘ अगदी भिडेंच्या मैत्रीच्या रंगात रंगून, एकरंग झालीये जणू!! 

‘काव्यसुधा’ या काव्यसंग्रहात जवळपास ६५ कविता समाविष्ट आहेत. त्यात “फुल्ल कुसुमितं, द्रुमदल शोभिनिम्! ” हीच अनुभूती येते. कवीने रोजच्या जगण्यात, आसपासच्या जगतात, जे जे संवेदनशील मनाने आणि वृत्तीने बघितलं, अनुभवलं, जाणवलं, टिपलं… ते ते सगळं त्यांच्या कवितांमध्ये स्पष्ट, नितळ आणि पारदर्शीत्व घेऊन उमटलयं!

त्यांच्या कवितांमध्ये, राजकीय, सामाजिक, पौराणिक, राष्ट्रीय अशा विषयांवरील उपहासात्मक, उपरोधिक भाष्य, मातृभाषा प्रेम, यावरील तळमळीची व्यक्तता दिसून येते. त्या-त्या वेळी घडलेल्या, चर्चा रंगलेल्या, न्यूज चॅनेलचा टी. आर. पी. वाढविणा-या घटना, त्यावर कवीने केलेलं भाष्य अगदी… स्पष्ट, परखड! 

कवीच्या लेखन शैलीचं… अगदी खास, त्यांचंच म्हणावं लागेल, ज्यावर त्यांचीच नाममुद्रा ठसवावी… इतकं वैशिष्ट्यपूर्ण, वैशिष्ट्य… म्हणजे.. त्यांच्या कवितांची शीर्षके आणि श्लेषात्मक अनुभूती देणारे शब्द!! 

कवी ते-ते शब्द () कंसात विराजमान करून, त्यांचा योग्य तो अर्थ लावून, यथोचित सार्थकता प्रदान करण्याचं स्वातंत्र्य मात्र, सुजाण, समजदार वाचकांवर सोपवून टाकतात. ही सूचकता भिडेजींच्या कवितेत, ठायीं-ठायी आढळते.

ऑक्टोबर हीट ही पहिलीच कविता… मी टू च्या चर्चेनं तापलेल्या वातावरणाची धग थेट पोहोचवणारी. आणि… सहावं इंद्रिय जागृत असलेल्यांना विचारलेल्या प्रश्नातल्या उपरोधाने बोच ही अगदी जाणवणारी….

 “शोषण झालं हे कळायला,

 त्यांना इतकी वर्षे लागली?… ! “

मतदार ( राजा )? या रचनेतली एका संवेदनशील मनाची तळमळ बघा…

 ” सत्तेची आसुरी लालसा, पैशांचा सारा खेळ,.. शेतक-यांचे अश्रू पुसायला आहे कुणाला वेळ? “

बळी (राजा) ची हार या कवितेतही, शेतकरी बांधवांविषयीचा कळवळा जाणवलेल्या ओळी…

 “अनीती, अधर्म, कपटाने

 पुन्हा अभिमन्यु ला घेरला। 

 जिंकले गलिच्छ राजकारण

 गरीब शेतकरी मात्र हरला. “

कोविड काळातील सत्य घटनेवर आधारित रचना, ख-या समर्पणाची किंमत न ओळखणा-या पत्रकारितेवर उपरोध किती बेधडकपणे बघा…

 “रुग्णशय्या आपुली देती एका गरजू तरूणाला,

वयोवृद्ध ते नारायणराव, कवटाळिती मृत्यूला! 

समर्पणाच्या भावनेची मांडलिकांना काय महती? 

मिंधी झाली पत्रकारिता, अनीती हीच असे नीती! “

कवीने … उपेक्षित, सपूत… यांसारख्या रचनांतून, लालबहादूर शास्त्रीजींच्या कार्याचा गौरव करून, ते सपूत असूनही, एकाच तारखेला जन्मले असूनही, महात्मा गांधींच्या तुलनेत कसे दुर्लक्षित, उपेक्षित राहिले याची खंत ही व्यक्त केली आहे…

 जन्मले दोघे एकाच दिवशी,

 मृत्यू ही तितकाच अनपेक्षित। 

 आजही जयजयकार एकाचा

 दुसरे कायम उपेक्षित|

देवपण या कवितेत तर… एक काळा दगड आणि विठ्ठल यांत संवाद दाखवून…

 “एकदा एक दगड काळा, गेला विठ्ठलाच्या देवळात…

म्हणे,

” अरे विठ्ठला, दोघे आपण काळे कुठे आहे फरक? 

मला बी उभं रहायचयं इथे, जरा तू सरक! “

मग पुढे काय झाले, ते कवितेत वाचण्यातंच खरा आनंद! आणि मग मिळालेला बोध… “सोसल्याविना टाकीचे घाव, कधी मिळतं का देवपण! 

काही रचनांमध्ये कवीची गाव, गावपण, बारा बलुतेदार, यांविषयीची आस्था, कळकळ, हळूहळू ओस पडत गेलेली गावं, याचं ही अतिशय भावपूर्ण चित्रण बघायला मिळतं.

 ” गावाचं ‘गावपण’ गेलं,

 ‘हायवे’ वरून पुढे,

 पहिली, दुसरी पिढी

 आता मनातच कुढे. “

तसंच… बारा बलुतं या रचनेत.. कालौघात गडप होत चाललेल्या बारा बलुतेदारांतील, सुतार, लोहार, न्हावी, मोची, शिंपी… यांच्या भेटीची कल्पना करून, त्यांच्या मनातल्या भावना जाणून घेत… आपल्या खास… शाब्दिक कोटी करण्याच्या शैलीचा साज चढवून, जो एक वेगळाच बाज आणलायं ना, तो खरंच वाचनीय!

बघा की… सुतार म्हणतोय…

 थोडीच आहेत कामं,

 पण करवतच नाही.

रेडिमेड मुळे संपत चाललेला शिंपी म्हणतोय…

 आभाळंच फाटले

 किती लावू ठिगळं?

असे शब्दच्छल आणि त्यातला मतितार्थ,… कवी जणू सांगतो… शोधा म्हणजे सापडेल.

 भिडेंच्या काही कविता मिश्किलीच्या रुपांत ही वावरत आहेत संग्रहात! 

 कवी आणि कविता या कवितेत…

कवीने मित्राशी संभाषण दाखवून… विनयशील आणि जमिनीवर असण्याचा छान पुरावा दिलायं..

म्हणतोयं… “आम्ही म्हणजे उगीच आपलं वासरात लंगडी गाय शहाणी”! 

कवीची वैशिष्ट्ये सांगतांना म्हंटलयं…

 ” खरे कवी ते, व्यासंग फार ज्यांचा, अन् नाचे जीभेवर सरस्वती। 

ओघळती शब्द त्यांचे, जसे तुटल्या सरातून मोती! “

असे त्यांचेच शब्द मोती झरतांना बघायला मिळतात त्यांच्या मैतर नावाच्या पंचाक्षरी कवितेत. असेही काही टपोरे, पाणीदार मोती ओवले आहेत त्यांनी! 

कवी सांगतोयं… मैत्रीचं नातं, ना त्यापेक्षा ही पुढं, सहज आणि…

नात्याहून ही मैतर खोल!! फक्त खोली ओळखता आली पाहिजे.

कवितेबद्दल च्या भावना आणखी एका कवितेत व्यक्त करून कवी म्हणतोयं,

” साहित्य देई मुक्त प्रांगण,

 शब्दांची करा अशी गुंफण

 कविता व्हावी मनी गोंदण

कवी भिडे यांनी निसर्गाचे भानही राखलयं! त्याच्या निसर्ग प्रेमाला फुटलेली पालवी, आलेला बहर, आणि झालेला वर्षाव चिंब भिजवतो आणि…

 ” विविध रंगांनी

 नटली अवनी

 फुटते पालवी

 वठलेल्या मनी|”

‘मातृभाषा *दीन…’ ही कविता, कवीला मातृभाषा दीन झाल्याचं दु:ख, वैषम्य, याची भावपूर्ण जाणीव करून देणारी! 

“करंटे आम्ही असे, केले मातृभाषेस दीन

तरीही दरवर्षी सजतो आमचा मराठी भाषा दिन! 

हे आणि असे विडंबन विविध रचनांमध्ये आढळते आणि आपण ही मग विचार करायला प्रवृत्त होतो. कवीच्या सहज, सोप्या पण परिणामकारक शब्दांमध्ये हे सामर्थ्य सतत जाणवंत रहातं.

 आम्ही कोण?, मुक्ताफळे, अहिंसेचा खिडकी, स्वातंत्र्याचे मोल… यांसारख्या विडंबनात्मक रचना, त्यातल्या उपहासाची बोच ; त्यामागचा उद्देश, नंतरही लक्षात रहाणारा! 

 निवृत्ती नंतर… या कवितेत, कवीच्या मिश्किलीला, वात्रटिकेची झालर जोडलीयं! निवृत्ती नंतर…

” लवकर उठावे, चहा करावा,

 आपलाच नव्हे तर सर्वांचा ठेवावा

 चहा घेऊन बाहेर पडावे

 मोबाईल ही जवळ ठेवावा

 धडपडल्यास उपयोग व्हावा

 सौंदर्य दर्शन जरी कां घडेल,

 वळून न पहावे, मान अवघडेल!”

किती सहज, हलक्या फुलक्या शब्दांत दिलेला हा इशारा, आणि निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखाचं जावं म्हणून सांगितलेले सूत्र! हे असे, वरून अगदी साधे वाटणारे, हसत-खेळत घेतलेले चिमटे, दिलेल्या कानपिचक्या… भिडेंच्या कवितेत अगदी… भीडेचीही, भीड न बाळगता, निर्भिडपणे घेतलेल्या आढळतात… आणि आपण ही मग, अगदी उगीचच भिडस्तपणा दाखवत, गालातल्या गालांत हसत…

“आपण नाही बुवा! “… असं म्हणंत पुढे जातो. इथेच तर कवीच्या काव्यलेखनाची जीत होते, उद्देश पूर्ण होतो. लिखाणाचं चिज होतं! 

कवीने, ” अध्यात्मास थोडे स्थान द्यावे ” म्हणत… काही रचनांना अध्यात्माचा स्पर्श देत…

“मना पहावे, ‘आपणांसी आपण’

न लागे तयाला कोणताही दर्पण

घेता रामनाम मनी वा वैखरी

आत्माराम शोधू मनाच्या गाभारी”

असं म्हणत… नाम महात्म्यही विशद केले आहे.

पुढे त्यांनी मुक्तीचा मार्ग ही शोधून काढला…

” भजतो तव सगुण रूपा,

 निर्गुण निराकारा!

तुझ्या विना कोण सोडवी,

जन्म-मृत्यू चा फेरा? “

शेवटी… “अव्याहत चालला तुझाच शोध,

द्यावी मुक्ती मज, व्हावा आत्मबोध! “

असाही एक सुंदर विचार रचनांमध्ये आढळतो.

 विविधतेतलं सौंदर्य, त्यातलं लावण्य मांडतांना कवी, कव्वालीचाही वाली झालाय ;हे विशेषच ना!! 

 आईचं ऋण ही व्यक्त केलयं आणि भावपूर्ण जाणीव करून दिली आहे…

 “नको तिला कौतुक सोहळे,

 नको तिला मातृदिन! 

 ऋणात निरंतर रहावे तिच्या,

 प्रेमाविना ती होईल दीन… “

शेवटी मनाचे यान आत्मबोधाकडे वळवत… “मन हारता होई हार, मन जिंकता जीत! “… हे सुवचन रूजवत, स्थिरावलयं!! 

असं हे काव्यसुधा सिंचन, त्यातल्या प्रत्येक थेंबातलं, नितळ, स्वच्छ, पारदर्शी असं साधेपणातलं, एक वेगळंच सौंदर्य लेऊन झालयं! त्या-त्या वेळी मनांत आलेल्या विचार किरणांच्या परावर्तनाने, त्या थेंबांना, जे… कविता, वात्रटिका, विडंबन, पंचाक्षरी, षडाक्षरी, उपहास, उपरोध, देशभक्ती, मातृभाषा प्रेम, अध्यात्म, निसर्ग भान, मैत्री भावाची जाण, राजकीय हालचालीं चा उहापोह, त्याबद्दलचा उद्वेग,…. हे आणि असे… इंद्रधनूचे रंग, त्याच्या विविध छटांचा आनंद घेण्यासाठी आणि, साध्याही विषयांत आढळलेला मोठा आशय, गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी… यांतलं अर्थाचं मोठेपण आणि खोली, जाणून घेण्यासाठी तरी एकदा हा काव्यसंग्रह वाचायलाच हवा.

श्री. चिंतामणी भिडे यांना या निवडलेल्या, वेगळ्या वाटचालीसाठी, पुढील अशाच, तैल विनोद बुद्धीच्या, सूक्ष्म निरीक्षणातून, शब्दच्छलाचा निर्भेळ आनंद देणा-या रचनांचे सृजन करण्यासाठी शुभेच्छा! 

परिचय – प्रा. भारती जोगी

पुणे

मो ९४२३९४१०२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 70 – तो सुख सारे मिल जायें… ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे।  आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना –तो सुख सारे मिल जायें।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 70 – तो सुख सारे मिल जायें… ☆ आचार्य भगवत दुबे ✍

हृदय हमारे मिल जायें 

तो सुख सारे मिल जायें

*

दाह बुझे, जो अधरों के 

ये अंगारे मिल जायें

*

तुम चाहो, तो दोनों के

दिल बेचारे मिल जायें

*

जलूँ शौक से, यदि छूने 

रूप शरारे, मिल जायें

*

डूबूं तेरे संग, भले 

मुझे किनारे मिल जायें

*

तू न मिले तो, व्यर्थ मुझे 

चाँद-सितारे मिल जायें

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 143 – मौन  छा गया घर-आँगन में… ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता “मौन  छा गया घर-आँगन में…। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 143 – मौन  छा गया घर-आँगन में… ☆

मौन  छा गया घर-आँगन में।

जीवन फँसा कठिन उलझन में।।

*

आई संध्या-काल घड़ी जब।

किसकी नजर लगी उपवन में?

*

राह देखती रही हमारी,

प्रिय बहना रक्षाबंधन में।

*

कैसी भगवन हुई परीक्षा,

विश्वासों के उत्पीड़न में!

*

मात-पिता की याद आ गई,

चिंता-मुक्त खेल-बचपन में।

*

अधिकारी नेता की चाहत,

धनसंचय के आराधन में।

*

मानवता के शत्रु बन गए,

धर्म-पताका आरोहण में।

*

आजादी की बिछी बिछायत,

सत्ता पाने की अनबन में।

*

भरा पेट हो या खाली हो,

देखो बैठ रहे अनशन में।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – हरापन ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – हरापन ? ?

बहुत कठिनाई से

रुकता है बहता जल,

अथक संघर्ष के बाद

स्थिर होता है मन,

उसका फिर उछालना

छोटा-सा एक कंकड़,

प्रवाह को बांधे रखने की

असाध्य अभीप्सा,

अप्सरा के मदनोत्सव से

तिरोहित होती तपस्या,

तरंगों का अट्टहास

उसकी खिलखिलाहट,

थमे पानी का

धीरे-धीरे रिसना,

सूखे घाव का

हर बार कुछ हरा होना,

लाख जतन कर लो

वेदना का शमन नहीं होता,

कितने ही दिलासे दे लो

हरापन हमेशा सुखद नहीं होता!

© संजय भारद्वाज  

10:28 बजे, 30.11.2020

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 27 अगस्त से 9 दिवसीय श्रीकृष्ण साधना होगी। इस साधना में ध्यान एवं आत्म-परिष्कार भी साथ साथ चलेंगे।💥

🕉️ इस साधना का मंत्र है ॐ कृष्णाय नमः 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक की पुस्तक चर्चा # 169 ☆ “औघड़” – लेखक … श्री नीलोत्पल मृणाल ☆ चर्चा – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(हमप्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’  जी के आभारी हैं जो  साप्ताहिक स्तम्भ – “विवेक की पुस्तक चर्चा” शीर्षक के माध्यम से हमें अविराम पुस्तक चर्चा प्रकाशनार्थ साझा कर रहे हैं । श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी, जबलपुर ) पद से सेवानिवृत्त हुए हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। उनका दैनंदिन जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है। इस स्तम्भ के अंतर्गत हम उनके द्वारा की गई पुस्तक समीक्षाएं/पुस्तक चर्चा आप तक पहुंचाने का प्रयास  करते हैं।

आज प्रस्तुत है आपके द्वारा श्री नीलोत्पल मृणाल जी द्वारा लिखित पुस्तक औघड़पर चर्चा।

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक की पुस्तक चर्चा# 169 ☆

☆ “औघड़” – लेखक … श्री नीलोत्पल मृणाल ☆ चर्चा – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

पुस्तक चर्चा

पुस्तक …औघड़

उपन्यासकार …नीलोत्पल मृणाल

प्रकाशक …हिन्द युग्म, नोएडा

पृष्ठ …३८८, मूल्य …२०० रु

चर्चाकार …विवेक रंजन श्रीवास्तव

नाटकीयता से परे जमीनी हकीकत पर “औघड़”एक उम्दा उपन्यास

हिन्द युग्म “नई वाली हिंदी” का जश्न मनाने वाला, युवाओ द्वारा प्रारंभ की गई साहित्यिक यात्रा का मंच है। ब्लागिंग के प्रारंभिक दिनों में शैलेश भारतवासी ने हिन्दयुग्म प्रकाशन शुरु किया था। काव्य पल्लवन ब्लाग से मैं भी हिन्द युग्म के प्रारंभिक समय से जुडा रहा हूं। हिन्द युग्म ने कई हिट्स साहित्य जगत को दिये हैं। नीलोत्पल का “औघड़” भी उनमें से एक है। मलखानपुर गांव के इकतीस शब्द दृश्य बेबाकी से यथार्थ बयानी करते हैं। नीलोत्पल की लेखनी में प्रवाह है।

चाय की गुमटी वाले मुरारी, पंडित जी, जग्गू दा, जगदीश यादव, डागदर साहब, गणेशी, आदि आदि चरित्र पात्रों के संग कथानक के नायक सामंतवाद के प्रतिनिधि पुरोषत्तम सिंह और फूंकन सिंह वर्सेस पेशाब की धार को हथियार बनाकर जमीदार की हवेली पर प्रहार करने वाला औघड़ गंजेड़ी बिरंचिया … सब को बड़ी सहजता से “औघड़” में पिरो कर प्रस्तुत किया गया है। बिना नायिका के भी उपन्यास पाठक को अपने साथ बनाये रखने में पूरी तरह सफल है।

नीलोत्पल मृणाल नई पीढ़ी के लोकप्रिय लेखकों में से हैं, उन्हें साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिल चुका है। औघड़ लोकभाषा और उसी टोन में गांव की पृष्ठ भूमि पर लिखा गया उपन्यास है।

रोजमर्रा की ग्रामीण समस्याओ को रेखांकित किया गया है, उपन्यास अंश उधृत है ” रमनी देवी ने कई बार कहा था कि रात-बिरात हरदम बाहर जाना पड़ता है। सुबह खेत जाओ तो लाज लगता है। कल के दिन घर में बहू आएगी तऽ ऊहो का ऐसे ही खेत जाएगी? काम भर के खाने-पीने का फसल हो ही जाता है। क्या घर में एक ठो लैटरिंग रूम नहीं बन सकता ? गरीब और किसान घर की औरत का इज्जत पानी नहीं है का? एक दिन रात को बलेसर के पतोह को दू-चार लफुआ मोटरसायकिल के लाइट मार रहा था। बेचारी कैसहूँ इज्जत ढक भागी। काहे नहीं बनवा देते हैं घर में लैटरिंग रूम ?”

इसी तरह भूत प्रेत टोना टुटके पर ग्रामीण नजरिये का अंदाजा इस अंश में देखिये “अरे, धीरे बोलिए ना आप। काहे हमारा प्राण लेने पर तुल गए हैं बाबा। अरे बाबा हम तो कह रहे हैं कि 1000 परसेंट भूत ही पकड़ा है चंदन बाबा को। लेकिन ई भूत हिंदू भूत है ही नहीं, महराज यह मुसलमान है, मुसलमान भूत। तब ना इतना उत्पात मचा रहा है। मुसलमानी भूत को क्या कर लेगा आपका जंतर-मंतर। ” लटकु भंडारी ने यह बता जैसे ब्रह्मांड की उत्पत्ति का रहस्य खोलकर रख दिया हो। “

नीलोत्पल के वाक्य विन्यास व्याकरण की सीमाओ से परे बोलचाल की ग्रामीण भाषा में ही है।

नमूना देखिये ” गहरा साँवला रंग। हड्डी पर काम भर का माँस। यही बनावट थी वैजनाथ की। “

सहज दृश्य वर्णन में वे नये उपमान रचते हैं, ” समय खेत जाते बैल की तरह चला जा रहा था “, “मुरारी ने अपने इस सार्थक वचन के साथ ही चर्चा को एक नया फलक प्रदान कर दिया था। चाय पर चर्चा, देश को कितनी सार्थक दिशा दे सकती है, यह यहाँ आकर देखा और समझा जा सकता था। दूरदर्शन और उसके समाज पर प्रभाव के इस सेमीनार का सत्र चल ही रहा था कि मस्जिद से अजान की आवाज आई, “अल्लाह हू अकबर… “लीजिए अजान हो गया। बैरागी पंडी जी के आने का हो गया टाइम। ” मुरारी ने चाय का कप बढ़ाते हुए कहा। असल में बैरागी पंडी जी गाँव के ही मंदिर में पुजारी थे। अजान की आवाज अल्लाह तक जाने से पहले मंदिर के देवी-देवाताओं को मिल जाती थी। बैरागी पंडी जी को वर्षों से अजान की आवाज सुनकर उठने की आदत थी। यही उनका दैनिक अलार्म था। ” …. यह गाँव ही था जहां आम कुत्ते भी हीरा, मोती, शेरा नाम से जाने जाते थे ” .

उपन्यास में गांवो के सामाजिक-राजनीतिक ढाँचे की विसंगतियां, धार्मिक पाखंड, जात-पात, छुआछूत, महिलाओ की स्थिति का यथार्थ, अपराध और प्रसाशन के गठजोड़, झोलाछाप स्वास्थ्य व्यवस्था, सामंतवादी सोच के खिलाफ मध्य वर्ग की चेतना आदि विषयों को पूरी गंभीरता से सामने लाने का प्रयास किया गया है।

बिरंचिया गंजेड़ी है। वह फूंकन सिंह की हवेली के सामने के नल से ही पानी पीकर पीछे की दीवार पर पेशाब कर उसे कमजोर करने की मशक्कत में लगा रहता है। उसके माध्यम से व्यंजना में बिटवीन द लाइन्स लेखक ने सामंतवाद के विरोध में बहुत कुछ अभिव्यक्त किया है। बिरंचिया की असामयिक मौत के 13 दिन बाद अंतिम पृष्ठ से उधृत है …. ” रात के 11:30 बजे थे। पुरुषोत्तम सिंह की पत्नी आँगन में कुछ सामान लेने गई थी। तभी उसे लगा कि हाते के पास कुछ आकृति जैसी दिखी हो। उसने करीब जाकर दीवार के पार झाँका। झाँकते ही वह बदहवास उल्टे पाँव चिल्लाकर दौड़ी। घर के लोग तब तक लगभग सो चुके थे। आवाज सुनकर सबसे पहले पुरुषोत्तम सिंह हड़बड़ाकर जागे। “अरे क्या हुआ ? अरे हुआ क्या, काहे चिल्लाए हैं?” पुरुषोत्तम सिंह ने अपने कमरे से बाहर आकर पूछा। “अजी बिरंचिया। बिरंचिया को देखे हम। वहाँ है। वहाँ खड़ा है। ” क्षणभर में पसीने से नहा चुकी, डर से थर-थर काँप रही पत्नी माला देवी ने बताया। “का ? दिमाग खराब है क्या तुम्हारा माँ!” तब तक उठकर आ चुका फूँकन सिंह अंदर के बरामदे से बोला। बाप-बेटे ने लाठी-टॉर्च लेकर पीछे जाकर देखा।

फूंकन सिंह लपक के दीवार पर चढ़ा और पुरुषोत्तम सिंह एक ऊँचा स्टूल लेकर टॉर्च मारने लगे। एक जगह टार्च जाते ही सिहर उठे दोनों। दीवार का एक कोना भीगा हुआ था। फूँकन सिंह तो देखते ही दीवार से कूदकर आँगन में आ गया था। पुरुषोत्तम सिंह ने काँपते कलेजे को सँभालते हुए एक बार सीधी रेखा में टार्च मारी। उन्हें भी लगा कि कोई आदमी काला कंबल ओढ़े दूर खेतों की ओर से निकल रहा है। पुरुषोत्तम सिंह को भी जो दिखा उस पर खुद भी यकीन नहीं कर पा रहे थे। … आखिर कौन था वो आदमी ? कोई तो था। बाप-बेटे अंदर से हिल चुके थे। पसीने से तरबतर, एक-दूसरे का मुँह देख रहे थे। दीवार अब भी खतरे में थी।

कुल जमा सहज भाषा में नाटकीयता से परे जमीनी हकीकत पर “औघड़”एक उम्दा उपन्यास है। कूब पढ़ा जा रहा है, प्रिंट रिप्रिंट जारी है, अमेजन पर सुलभ है, आप भी पढ़िये।

चर्चाकार… विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

समीक्षक, लेखक, व्यंगयकार

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३, मो ७०००३७५७९८

readerswriteback@gmail.कॉम, apniabhivyakti@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मेरी डायरी के पन्ने से # 25 – गुजरात के दर्शनीय स्थल – भाग – 2 ☆ सुश्री ऋता सिंह ☆

सुश्री ऋता सिंह

(सुप्रतिष्ठित साहित्यकार सुश्री ऋता सिंह जी द्वारा ई- अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए अपने यात्रा संस्मरणों पर आधारित आलेख श्रृंखला को स्नेह प्रतिसाद के लिए आभार। आज प्रस्तुत है आपकी डायरी के पन्ने से …  – संस्मरण – गुजरात के दर्शनीय स्थल)

? मेरी डायरी के पन्ने से # 25 – गुजरात के दर्शनीय स्थल – भाग – 2 ?

(14 फरवरी 2020)

वेरावल शहर छोटा सा बंदरगाह है। समुद्र तट की सुंदरता के अलावा खास दर्शनीय कुछ  और नहीं है। हमारे हाथ में एक दिन बचा था तो सोमनाथ देखने के बाद दूसरे दिन हम दिव (Diu ) के लिए रवाना हुए।

सोमनाथ से दिव 113 किलोमीटर की दूरी पर स्थित है। यह समुद्री तट पर बसा शहर है। हम से टैक्सी चालक ने कहा कि हम एक दिन में ही दिव देखकर लौट सकते हैं। हमें दिव पहुँचने में 2.50 मिनिट लगे। रास्ता बहुत ही मखमली होने के कारण यह एक आरामदायक सफ़र रहा। हम हभी साधारणतया दमन और दिव कहते हैं पर ये दोनों अलग -अलग शहर हैं।

यहाँ यह बताना आवश्यक है कि गुजरात में सड़कों पर हमारे देश के अन्य शहरों की तरह ढाबे या रेस्तराँ की भरमार नहीं है। यहाँ के निवासी घर से ही थेपला, फाफड़ा, ढोकला, फरसाण आदि भोजन पदार्थ अपने साथ लेकर चलते हैं जिस कारण ढाबे या रेस्तराँ का खास प्रचलन नहीं है। हम लोग प्रातः सात बजे निकले थे तो अपने साथ कुछ भोजन सामग्री लेकर ही चले थे।

कुछ 30 कि.मी. जाने के बाद चाय पीने की इच्छा हुई और सड़क से हटकर ज़रा दूर एक ढाबा सा दिखा। हमने वहाँ अपनी गाड़ी मोड़ ली। ढाबे के बाहर रेतीली भूमि थी जिस पर कुछ  चारपाइयाँ रखी हुई थीं। साथ में एक प्लास्टिक की मेज़ थी जिसके पायों को  रेत में धँसा दिया गया था। अभी सुबह का ही समय था तो हमें गरमागरम चाय और पकौड़े मिले। हम अपने साथ ब्रेड और मक्खन लेकर गए थे तो सब कुछ मिलाकर बढ़िया नाश्ता हो गया।

कुछ दो घंटे बाद हम दिव पहुँचे।

दिव सुंदर स्वच्छ शहर है। पर आज भी वहाँ पुर्तगाली संस्कृति की छाप स्पष्ट दिखाई देती है। लोगों में लेट बैक एटिट्यूड दिखाई देता है। पुर्तगाली तो चले गए पर अपना असर छोड़ गए। देर सबेरे तक शहर भर में कहीं कोई नज़र नहीं आता। यहाँ लोगों के दिन की शुरुआत भी देर से ही होती है। तब तक सभी दुकानें बंद ही होती हैं।

यह शहर समुद्र तट पर बसा हुआ है। शहर में ख़ास हलचल नहीं है, न ही भीड़भाड़ है। इस तरह का वातावरण और समानता हमने गोवा और पोर्त्युगल में भी अनुभव किया है। यहाँ की आबादी खास नहीं है।

रास्ते से जब टैक्सी गुज़रने लगी तो अधिकतर घर बंद नज़र आए जिन पर ताले जड़े दिखे। पूछने पर चालक ने बताया कि पुर्तगाल से उन स्थानों के निवासियों को स्थायी नागरिकता के लिए वीज़ा दिया जा रहा है जहाँ पुर्तगाली राज्य किया करते थे। हमने सिर पीट लिया। 450 वर्ष की गुलामी के बाद 1961 के करीब देश को उनसे मुक्ति मिली थी और अब यह क्या हो रहा है?

जिन लोगों के दादा – परदादा ने पुर्तगालियों की गुलामी की थी, अत्याचार सहे थे, जबरन ईसाई बनने के लिए मजबूर किए गए थे या प्राण बचाने के डर से अन्यत्र भाग गए थे या मार दिए गए थे उसी  दामन और दिव की आज की यह पीढ़ी  पचास साल बाद पुर्तगाल जाकर बस रही है!

पुर्तगाली स्वभाव से आलसी हैं, उन्हें सब प्रकार के काम करने के लिए लोग चाहिए इसलिए तो वीज़ा दे रहे हैं। न जाने कितने ही लोग विदेश में रहने के लालच में यहाँ से वहाँ चले गए। हमारे देशवासियों को सफेद चमड़े के प्रति इतना आकर्षण है कि फिर एक बार गुलाम बनने को तैयार हो गए। सुना है अवैध रूप से कई कागज़ात बनाकर लोग जाने की ताक में बैठे हैं। पता नहीं हम अपनी भूमि से प्रेम करना कब सीखेंगे!

भारी मन से हम आगे बढ़े। यहाँ कुछ पुराने चर्च हैं, जहाँ रविवार के दिन प्रार्थना सभा होती है। कुछ चर्च तीन सौ वर्ष पुराने भी हैं। इन सभी जगहों पर पर्यटक घूमते दिखाई देते हैं। हम एक विशाल चर्च में घुसे। हम सनातनी धर्म के अनुयायी मंदिर हो या चर्च अपने जूते उतारकर ही भीतर प्रवेश करते हैं। हमारे लिए  देवालय चाहे किसी का भी हो पूजनीय स्थान होता है।

वहाँ बैठा प्रहरी बोला जूते पहनकर जाओ माताजी, यहाँ जूते नहीं निकालते। हम आश्चर्य चकित हुए पर फिर भी जूते उतारकर ही भीतर गए। हमारी संस्कृति किसी दूसरे धर्म के ईश्वर का अपमान करने का अधिकार नहीं देती। चर्च के भीतर कुछ पुरानी मूर्तियाँ देखने को मिलीं बाकी कुछ खास नहीं। सूली पर चढ़ी उदास ईशु की मूर्ति चुपचाप सी नज़र आई। कुछ धूलयुक्त प्लास्टिक की माला गले में पड़ी थी। वैसे फूल-माला चढ़ाने की कोई प्रथा ईसाई समुदाय में नहीं है। संभवतः यह भारत भूमि पर खड़ा गिरजाघर है तो कभी किसी न चढ़ाया होगा। किसी धर्म के पैगंबर को इस तरह देखकर मन भीतर तक उदास हो उठा पर हमारे लिए झुककर प्रणाम करने के अलावा करणीय कुछ भी न था।

आज शहर में निवासी ही नहीं तो चर्च की सटीक देखभाल भी नहीं। पर अपने समय में यह एक जीता जागता प्रार्थनागृह रहा होगा क्योंकि इसकी इमारत बहुत विशाल और भव्य है।

हम घूमते हुए समुद्र तट के पास आ पहुँचे।

इस शहर में समुद्र के किनारे एक बहुत पुराना मंदिर है। कहा जाता है यह मंदिर पांडवों के समय का बना हुआ है। उस समय यहाँ तक समुद्र का जल नहीं आता था। मंदिर गुफानुमा बना हुआ है। गुफा की दीवार पर बड़ा – सा पंचमुखी नाग बनाया हुआ है और नीचे पाँच शिवलिंग हैं। कहा जाता है कि कभी वनवास के दौरान पांडव वहाँ आए थे और पूजा किया करते थे। इसे गंगेश्वर मंदिर कहते हैं। आज समुद्र का जल न जाने कितनी ही बार उन पाँच शिवलिंगों को नहला जाता है। दोपहर को पानी जब भाटे के कारण दूर सरक जाता है तब आराम से दर्शन करना संभव होता है। हम दोपहर को पानी उतरने के बाद ही मंदिर में दर्शन करने पहुँचे। मंदिर स्वच्छ था। कई सीढ़ियाँ उतरकर हम मंदिर के पास पहुँचे जहाँ शिवलिंग बने हुए हैं। एक स्थान पर बड़े से छोटे पाँच शिवलिंगों का दर्शन आश्चर्य की ही बात थी। मूलतः हर शिव मंदिर में एक ही शिवलिंग का दर्शन होता है। यह महाभारत की कथा के अनुसार एक गवाह के रूप में दिखाई देने वाला स्थान है। हमसे पूर्व लोगों ने शिवलिंगों की पूजा की थी। वहाँ खूब सारे नारियल चढ़ावे में रखे हुए थे।

हम और आगे अब समुद्र तट की ओर निकले। पास ही एक पुराना किला बना था जो समुद्र  से होनेवाले आक्रमणों से बचने के लिए बनाया गया था। यह किला भी कुछ तीन सौ वर्ष पुराना ही था। भाटा पूरे ज़ोर पर था जिस  कारण पानी उतर चुका था और बड़े -बड़े पत्थर तथा  चट्टानें अब समुद्र के जल से ऊपर बाहर की ओर निकल आई  थीं। ऐसा लग रहा था मानो विशाल मत्स्य जल से निकलकर हवा को सूँघ रहा हो।

दोपहर का समय था पर समुद्री तट पर शीतल हवा थी। हमें ज़रा भी गर्मी का अहसास नहीं हुआ। तट से दूर समुद्र की लहरें कदमताल करती आतीं और दूर से ही लौट जातीं। उन लहरों पर जब सूरज की किरणें पड़तीं तो असंख्य लहरों के ऊपरी हिस्से यों चमकते मानो कई बड़े से नाग अपने फन पर मणि लेकर द्रुतगति से आगे बढ़ रहे हों। आँखों को एक अद्भुत सुकून का अहसास हो रहा था। हम सभी निःशब्द इस सौंदर्य को सम्मोहित – सा  होकर निहार रहे थे।

समुद्र पर सफ़ेद महीन, मुलायम कपास के समान सुकोमल  रेत फैली थी। पैर मानो उसमें धँसे जा रहे थे और उस मुलायम रेत के भीतर ठंडी रेत जब पैरों को छू रही थी तो पैरों को एक अद्भुत गुदगुदी के साथ आराम का भी अहसास हो रहा था। दोपहर का सूरज सिर पर था। रेत में बहुत ही छोटी -छोटी  सींपियाँ और शंख थे जिन्हें बड़ी संख्या में हम चुनने में व्यस्त हो गए।

एक लड़के ने पास आकर कहा, “ताल ले लो माई” हमारी तंद्रा टूटी। काले से ताल के भीतर मुलायम मीठे नारियल की गरी के समान ताल की मलाई उसने निकालकर हमें दी। मीठा, रसीला स्वादिष्ट! हमने पूछा, “कहाँ से लाया ?”

तो उसने उँगली ऊपर करके तट की ओर इशारा किया। समुद्र के तट पर दूर तक जहाँ नज़र दौड़ाते ताल के ही वृक्ष सजे हुए दिखाई दिए। इतनी देर तक हम सब लहरों को देखकर मुग्ध हो रहे थे उस बालक के कहने पर हमने सुदूर  तट की ओर रुख किया। हवा की वेग से उसके झालरदार पत्ते झूम रहे थे मानो कोई मतवाला हाथी सिर हिलाता हुआ झूम रहा हो।

देर दोपहर तक हम तट पर ही बैठे रहे। शांत वातावरण में लहरों की ध्वनि किसी गीत के धुन के समान कर्ण प्रिय लग रही थी। हम सबने वहीं बैठकर न जाने पृथ्वी के कितने ही विभिन्न समुद्र तट और अपने अनुभवों की चर्चा करते रहे। एक महिला अंगीठी पर भुट्टे भूनकर दे रही थी। हम लोगों ने दोपहर का भोजन तो किया ही न था। जो कुछ साथ लाए थे वही चबाते रहे। भुट्टे के भुनने की तीव्र गंध ने नथुनों को फुला दिया और हमारे पेट में भूख जाग उठी। बड़े -बड़े भुट्टे कोयले की आग पर  सेंके गए और उस पर नींबू और मसाला लगाकर दिया गया। हमने मानो बचपन को फिर एक बार जी लिया।

शाम होने लगी। पानी अब तट की ओर बढ़ने लगा। हमने भी प्रस्थान करना उचित समझा।

रास्ते में एक ढाबे पर गरम थेपले और इलायची अदरकवाली चाय का हमने आनंद लिया। प्रशंसनीय तो यह बात थी कि उस ढाबे को चलानेवाली और काम करनेवाली सभी महिलाएँ ही थीं। साथ में यह संदेश भी मिला कि वहाँ महिलाओं के लिए कोई डरवाली बात नहीं होती है। वे स्वाधीनता से अपना जीवन जीती हैं। वे सब बहुत सुरक्षित महसूस करती हैं। वाह! रे मेरे गुजरात !

क्रमशः… 

© सुश्री ऋता सिंह

फोन नं 9822188517

ईमेल आई डी – ritanani1556@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares