मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ४९८–अ… – भाग – ३ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ ४९८ – अ… – भाग – ३ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

श्री हेमन्त बावनकर

(आपण आपली नोटीस थोड्या वेळात घेऊन जा. आणि पुढल्या सोमवारी आपणही इथे या. त्यावेळी बोलू या. ” आता आमची उत्सुकता वाढली होती.) – इथून पुढे 

‘‘मग सोमवारी काय झालं?”

सोमवारी आम्ही आधी पोचलो – नंतर थोड्या वेळाने सरिता आणि सीताराम आले. मला सरिता शांतशी, गप्प गप्प व बदललेली वाटली. तिने आमच्याकडे मान वर करून पाहिले देखील नाही. केंद्राच्या इनचार्ज मॅडमनी सरिताला विचारले, ‘तू तुझ्या घरी का जाऊ इच्छित नाहीस?’ सरिता तरीदेखील काही न बोलता खाली मान घालून उभी होती. मला रहावलं नाही. मी म्हणालो, ‘आमच्या प्रेमात कुठे कमतरता होती का?’ सरिता तरीही गप्प होती. आता तिचे डोळे पाण्याने भरले होते. केंद्रप्रमुख म्हणाल्या, ‘सरिता, काही तरी बोल. तू काहीच बोलली नाहीस, तर आम्ही निर्णय कसा घेणार?’ आता सीतारामजी मधेच म्हणाले, ‘बोल सरिता बोल!’ आता माझा माथा ठणकला. काही तरी अनिष्ट होईल असं वाटू लागलं. सरिताने एकदा आपल्या वडलांकडे पाहीलं आणि नजर पुन्हा जमिनीकडे वळवली. केंद्रप्रमुख समजदार होत्या. वास्तव काय असेल, याचा त्यांना अंदाज आला. आता त्यांनी आपल्या पध्दतीने चौकशीस सुरूवात केली. त्यांनी अतिशय प्रेमाने सरिताला विचारले आणि प्रत्येक वेळी सरिता होकारार्थी किंवा नकारार्थी मान हलवत राहिली. प्रमुखांनी प्रेमाने विचारलं, ‘तुला सासरी कुणी कधी रागावलं?’ तिने ‘नाही’ अशा अर्थाने मान हलवली. ‘तुझे पती, सासू, सासरे यांना तू आवडतेस ना?’ तिने होकारार्थी मान हलवली. आता सीताराम मधेच जरबेच्या सुरात म्हणाले, ‘बोल सरिता बोल…’

केंद्रप्रमुख त्यांना टोकत म्हणाल्या, ‘आपण मधे बोलू नका. जेव्हा आपल्याला विचारलं जाईल, तेव्हाच बोला. ’ सीताराम सरिताकडे टवकारून बघू लागले. प्रमुख म्हणाल्या, ‘हे बघ, सरिता, जोपर्यंत तू काही बोलत नाहीस, तोपर्यंत आम्ही तुझी काहीच मदत करू शकणार नाही. ’ मग त्यांनी मला विचारलं, ‘तुमची काय इच्छा आहे?’

मी म्हंटलं, ‘आमचं निवेदन आहे की सरिताने आपल्या घरी रहायला यावं. बाकी आम्हाला काही नको. ’

त्यांनी पुन्हा सरिताकडे बघत म्हंटलं, ‘तुझं यावर काय म्हणणं आहे?’ सरिता पुन्हा गप्प झाली. मग त्या म्हणाल्या, ‘सरिता तुला विचार करायला आणखी थोडा वेळ हवाय का?’ तिने काहीच उत्तर दिले नाही. प्रमुखांनी तिथल्या अन्य सदस्यांशी चर्चा केली आणि तिला सांगितलं, ‘ठीक आहे. तुला विचार करायला आणखी एक दिवस देते. उद्या याच वेळी इथे या.’

सीताराम लगेच उभे राहिले. त्यांनी हात जोडले आणि सरिताचा हात धरून बाहेर पडले. सरिताने एकदाही आमच्या नजरेला नजर मिळवली नाही. प्रमुख म्हणाल्या, ‘रामजी, सरितावर बहुतेक दडपण आणलं जातय. तुम्ही आम्हाला आधी भेटला नसतात, तर कदाचित या केसने भलतंच वळण घेतलं असतं. आपण पुन्हा उद्या या. ’

‘याचा अर्थ सीतारामजींची काही वेगळीच इच्छा होती. ’

‘आपलं अनुमान अगदी बरोबर आहे. त्या दिवशी मी भरत बरोबर जयाला तिच्या माहेरी पाठवलं. तिच्या वातावरणात जरा बदल होईल, असा विचार तेव्हा केला. दुस-या दिवशी केंद्रावर यायला त्यांना बजावून सांगितलं. नंतर घरी आलो. रात्रीचं जेवण केलं आणि झोपलो. एवढ्यात दारावरची बेल वाजली. ‘आत्ता यावेळी कोण आलंय!’ असा विचार करत मी उठलो. दारात इन्स्पेक्टर बन्सीलाल होता. कन्हैयालालचा मुलगा. मला वाटलं की कन्हैयानेच त्याला पाठवलंय. पण तो म्हणाला, ‘काका, सरिताने आपल्याविरुध्द हुंड्यासाठी छळ केला, म्हणून अर्ज दाखल केला आहे. आपल्या वडलांना घेऊन ती आली होती. ’

‘अरे, काय बोलतोयस काय?’

‘खरं तेच बोलतोय. मला आपल्याला, भरतला आणि जयाकाकींना ४९८ अ या कलमाखाली अटक करावी लागेल. ’

मी त्याला भरत आणि जया घरात नसल्याचं सांगितलं. आता माझी शुध्द बुध्द हरपली. मी गर्भगळित झालो. पण स्वत:ला सावरत त्याला म्हंटलं, ‘चल, मी तुझ्याबरोबर येतो. पण मला बेड्या तेवढ्या घालू नको. ’ एव्हाना ही बातमी सगळ्या गावभर झाली होती. ”

रामजींचा चेहरा रागाने लालीलाल झाला होता. ते पुढे म्हणाले, ‘‘काय आहे साहेब, वाईट बातम्या पसरायला वेळ लागत नाही. मी गुपचुप बन्सीलाल बरोबर पोलीस ठाण्यात गेलो. त्याने आश्वस्त केलं. म्हणाला, ‘काका, मला खरं काय ते माहीत आहे. पण माझा नाईलाज आहे. पण आपण काळजी करू नका. आपल्याला कुणीही हात लावणार नाही. ’

त्या दिवशी रात्रभर ठाण्यात राहिलो. आजसुध्दा तो विचार आला की माझ्या शरिरावरचे केस ताठ उभे राहतात. ”

‘‘मग काय झालं? आपण कसे सुटलात?’’

‘‘साहेब, दुस-या दिवशी हरीभाई वकिलांनी धावपळ केली. परिवार केंद्राचा रिपोर्ट आणि एस्. पी. मॅडम सुधा गुप्ता यांच्या मेहेरबानीने आम्हाला जामीन मिळाला. कुटुंब कल्याण केंद्राच्या प्रमुखांनी माझी माहिती आणि आपला रिपोर्ट एस्. पी. मॅडमना दिला. मॅडमनी आमच्या केसच्या पैलूचा सखोल अभ्यास केला.

दुस-या दिवशी त्यांनी मला, भरतला, सीतारामना आणि सरिताला ठाण्यात बोलावलं. बरोबर केंद्राच्या प्रमुख मॅडमही होत्या. एस्. पी. मॅडम अतिशय कडक स्वभावाच्या आणि शिस्तीच्या होत्या. माझा देवीआईवर पूर्ण विश्वास होता. मी जर काहीच चूक केली नाही, तर ती मला साथ देईलच, याची मला खात्री होती.

एस्. पी. मॅडमनी सगळ्यांचे चेहरे एकदा नीट पाहून घेतले, जसं काही एकेक चेहरा वाचते आहे. मग त्या कडक आवाजात म्हणाल्या,

‘मी ज्यांना विचारीन त्यानेच उत्तर द्यायचे आहे. मधे कुणीही बोलायचं नाही. ’

प्रथम त्यांनी मला विचारलं की ‘माझी काय इच्छा आहे?’ मी हात जोडून म्हंटलं, ‘मी माझ्या मुलीपेक्षा सरितावर जास्त प्रेम केलं. सामुदायिक विवाहात स्वेच्छेने तिचा विवाह करून तिला घरी घेऊन आलो, तेही कुठल्याही प्रकारचा हुंडा न घेता. परंतु आता तिने मला लावलेल्या या कलंकानंतर ती मुलगी माझ्या घरात नको. ’

मग त्यांनी भरतला विचारले. तोही म्हणाला की, तो अशा मुलीबरोबर राहू शकणार नाही.

सरिता आमच्या नजरेला नजर भिडवू शकली नाही. मॅडम सरिताला म्हणाल्या, ‘मुली, तुला त्या घरात प्रेम, सुख, शांती मिळत होती, तर तू त्यांच्यावर हुंड्याबद्दल आरोप का केलास? तुमच्याकडून हुंडा घ्यायचाच असता, तर या लोकांनी सामुदायिक विवाहात, तुमचा विवाह करून तुला घरी का आणलं असतं. तुझ्याकडे काही पुरावा आहे का की त्यांनी तुला हुंडा मागितला? किंवा तुझ्या शरिरावर काही मारल्या-डागल्याच्या खुणा आहेत का?’ आता सरिता घाबरली. आपल्या वडलांकडे बघून रडू लागली. एस्. पी. मॅडमच्या सगळं लक्षात आलं. त्या पुढे म्हणाल्या, ‘वडलांकडे बघण्याची गरज नाही. संसार तुला करायचाय. वडलांना नाही. आता तू फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ अशा शब्दात उत्तर दे. तुझ्यावर कुणी अन्याय, जुलूम केलाय?’ आता ती घाबरली. ‘नाही’ तिने उत्तर दिले.

‘तू परत जाऊ इच्छितेस?’ ती पुन्हा गप्प बसली. मॅडम पुन्हा म्हणाल्या, ‘हो की नाही. ’ ती रडत रडत म्हणाली, ‘हो. ’ मॅडमने भरतला विचारलं, ‘तुझी काय इच्छा आहे?’ भरत म्हणाला, ‘मॅडम, जी आमच्यावर खोटे आरोप करून आम्हाला तुरुंगात पाठवू इच्छिते, तिच्याबद्दल आता आम्हाला कोणताही विश्वास वाटत नाही. तिने आमच्याकडून फार तर आणखी पैसे घ्यावे, पण मी आता तिच्याबरोबर राहू शकणार नाही. ’

मॅडम सरिताला कडक आवाजात म्हणाल्या, ‘सरिता हे लोक तुला ठेवून घ्यायला तयार नाहीत. तू चार-पाच लाखांचे दागिने आणि भारी किमतीच्या साड्या आपल्या बरोबर घेऊन गेलीच आहेस. तुला यांच्याकडून आणखी किती पैसे हवेत? दीड लाख दोन लाख- अडीच लाख?.. ’ तिने एकदा आपल्या वडलांकडे पाहीलं आणि फारसा विचार न करता म्हणाली, ‘दोन लाख’.

आता एस्. पी. मॅडमपासून काही लपून राहिलं नाही. त्यांनी सीतारामकडे पाहिलं. तो बेशरम, निलाजरा मॅडमकडे बघत बसून राहिला. तोंड उघडण्याची त्याची हिंमत झाली नाही. आता मॅडमनी सरिताला शेवटचं विचारलं, ‘दोन लाख… ठीक आहे?’

मग त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी म्हंटलं, ‘मी अडीच लाख रुपये द्यायला तयार आहे, पण ही केस इथेच संपवा. ’ 

एस्. पी. मॅडमनी लगेच कारवाई केली आणि एक तडजोडीचा अर्ज तयार केला. त्यावर भरत आणि सरिताच्या सह्या घेतल्या. सरिताच्या बाजूने साक्षीदार म्हणून सीतारामची व भरतच्या बाजूने साक्षीदार म्हणून माझी सही घेतली. नंतर त्या माझ्याकडे वळून म्हणाल्या, ‘‘आपल्याला जामीन मिळालेलाच आहे. यापुढील कार्यवाही कोर्ट करेल. जरूर पडल्यास मी स्वत: साक्ष द्यायला येईन. लक्षात ठेवा, ही तडजोड माझ्यासमोर दोन्हीकडच्यांनी पूर्ण स्वेच्छेने स्वीकारली आहे. ’

‘‘मग घटस्फोट झाला?”

‘‘होय साहेब! चार-पाच वेळा सुनावणी झाली आणि घटस्फोट झाला. त्या एस्. पी. मॅडमचं भलं होवो. सत्य परिस्थिती त्यांच्या लगेच लक्षात आली. देवीआईनेच त्यांना पाठवलेलं असणार. नाही तर आमचं जगणंच मुश्कील झालं असतं. त्यावेळी लक्षात आलं, की समाजसेवा म्हंटलं की लोक हात आखडता का घेतात?”

‘‘अच्छा!’ राजेशने मग दीर्घ श्वास घेतला. त्याची उस्तुकता पुन्हा वाढली. त्याने विचारले, ‘‘मग आपल्या मुलाचे पुन्हा लग्न झाले का? आणि सरिताचे काय झाले?”

‘‘साहेब, आपल्या आपल्या कर्माचं फळ भोगावं लागतं. माझ्या हातून कळत-नकळत काही चुकीचं काम झालं असेल, ज्यामुळे मला हे सगळं भोगावं लागलं, ज्या लोकांचा आमच्यावर विश्वास होता, तेही आता आमच्याकडे साशंकतेने बघू लागले. भरतसाठी बराच काळ मागण्या आल्या नाहीत. चार वर्षापूर्वी आमच्या जावयांच्या दूरच्या नात्यातून एक मागणी आली. आम्ही त्यांच्यापासून काहीच लपवून ठेवले नाही. मग दोन्ही कडचे लोक तयार झाल्यावर भरतचे लग्न झाले. त्यानंतर दोन वर्षांनी लखनचेही लग्न झाले. आता देवीआईच्या कृपेने आमचा सगळा परिवार सुखात, आनंदात नांदतोय. ”

‘‘आणि सरिताचं काय झालं?”

‘‘साहेब, खरं सांगू, मला या सगळ्यात सरिताचा फारसा दोष वाटला नाही. तिला तिच्या वडलांनी आणि आसपासच्या लोकांनी भडकावलेलं असणार. काही जण नंतर आम्हाला म्हणाले की आम्हाला लुबाडण्याचा त्यांचा डाव होता. पुढे कळलं, गाव आणि समाजातील लोकांनी खूप दिवसपर्यंत त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. आजपर्यंत सरिता, तिच्या दोन बहिणी आणि भाऊ यांची अद्याप लग्ने झाली नाहीत. ”

‘‘ओह!” राजेशच्या तोंडून सहजच बाहेर पडलं. त्याला थोडीशी सरिताबद्दल सहानुभूतीही वाटली, पण तिथे त्या क्षणी ती प्रगट करणं अप्रस्तुत झालं असतं.

रामजी खिडकीबाहेर बघत म्हणाले, ‘‘बहुतेक भोपाळ आलेलं दिसतय. ”

मीही बाहेर बघीतलं. जंगल, शेतं, नद्या, ओहोळ मागे टाकत ट्रेन भोपाळ शहरात प्रवेश करत होती.

बघता बघता भोपाळ स्टेशन आलं. त्यांचे उरलेले सहयात्री इथे चढले. गाडी मथुरेच्या दिशेने पुढे निघाली. लोकांनी आपापल्या बर्थवर आंथरूण पसरले आणि ते झोपून गेले. राजेशच्या मात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता.

बाहेर एकामागून एक छोटी स्टेशन्स मागे पडत होती. राजेशच्या डोक्यातून मात्र विचारांचा नुसता गुंता झाला होता. हुंडा विरोधी कायदा, कलम ४९८-अ विवाहितेने आणि तिच्या माहेरच्यांनी ‘हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार केली, तर तिचा पती, आई-वडील, भाऊ-बहिण, घरातली जवळची नातेवाईक मंडळी यांना बिनाचौकशी तुरुंगात टाकण्याचा अधिकार’ या कायद्याने पोलिसांना दिला होता. हे बरोबर आहे का? चौकशीच झाली नाही, तर कोण निर्दोष आहे, हे कसं कळणार?

रात्रीचे दीड वाजून गेले, तेव्हा कुठे राजेशला झोप लागली. सगळी यात्रा संपेपर्यंत रामजी आणि जया त्यांच्याबरोबरच होते. या दीर्घ सहवासात हे दोन्ही परिवार मनाने जवळ आले. आत्मीय झाले. जया सरोजला नणंद मानू लागली तर रामजींनी तिला आपली बडी दीदीच करून टाकलं.

इटारसी स्टेशन जवळ आलं. जयाने सरोजला हळद-कुंकू लावून तिला चरणस्पर्श केला. रामजींनी आणि राजेशने गळामिठी मारली. ते उतरताना सगळ्यांनाच भरून आलं.

– समाप्त –

मूळ हिंदी कथा – ४९८ -अ

मूळ लेखक – हेमंत बावनकर, मो. – 9833727628

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आटपाट देश… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

??

☆ आटपाट देश…  ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

एक आटपाट देश होता. त्याचे नाव कधी हिन्दुस्थान होते, कधी इंडिया होते, तर कधी भारत होते. त्याचा एक वेगळाच इतिहास आहे.

तिथे फार पूर्वी नेहेमीच हवे हवेसे वाटणारे रामराज्य होते. राजा राम सदाचारी व सत्यवचनी होता. प्रजेचा चाहता होता.

राजेशाही नंतरही चालू होती. अनेक आक्रमणे झाली, स्वातंत्र्य लढे झाले. देश स्वतंत्र झाला. लोकांनी लोकांसाठी बनवलेली लोकशाही आली.

ह्या आटपाट देशात एक ‘अकोला’ नावाची आटपाट नगरी होती. ह्या नगरीत एक बँक होती. बँकेने त्यांच्या कर्मचार्‍यांना स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न दाखवले. लोकशाहीत मालमत्ता बाळगण्याचा मूलभूत हक्क असल्यामुळे कर्मचार्‍यांनीही घर बांधण्याचे स्वप्न बाळगले. बँकेकडून व्याजदर देखील कमी रहाणार होता.

झाले! सगळ्यांनी मिळून जमीन खरेदी केली. सोसायटी स्थापन केली. ’आमची सोसायटी’ नाव दिले. बघता बघता जमीन शेतकी नसल्याचे दाखले, तसेच प्लाॅट पाडणे इ. उपचार पार पाडले. म. न. पा. कर्मचार्‍यांना चारा-पाणी देऊन नकाशे पारीत करून घेतले. सगळ्यांनी हुश्श केले.

सगळ्यांच्या दुसर्‍या गावी बदल्या झाल्याने कंत्राटदाराला घरं बांधायला दिलीत. गाठ पडली ठका ठका! त्याने ठकवून ठकवून का होईना ५/६ वर्षात घर बांधून दिले.

तोपर्यंत म. न. पा च्या अभियंत्याला व एका बिल्डरला सोबत घेऊन नगरसेवकाने ठरविले की इथे अवैध वस्त्या निर्माण करून आपले लोकशाही साम्राज्य निर्माण करावे. कारण त्याच्या लक्षात आले की इथे रहायला एकदोन जणच आलेत व कोपर्‍यावरच्या घरांना आवारभिंतीही नाहीत. नगरसेवक म्हणजे प्रभागांचा राजाच! या लोकशाहीतील राजाला राज्य उभारायला छान संधी चालून आलीय!

मग काय विचारता? कंत्राटदाराने आमची सोसायटीच्या लगतची दहा एकर जमीन खरेदी केली. कागदावर बारा एकराचे प्लाॅट पाडले. बकरे शोधून त्यांना त्यावर घरे बांधून द्यायला सुरवात केली. बारा एकर जागाच अस्तित्वात नसल्याने आमची सोसायटीच्या सँक्शन रोडवर घरे बांधली व सोसायटीतल्याच दोघांच्या प्लाॅटमधून त्यांची परवानगी न घेताच टाऊन प्लानिंग वाल्यांना सहभागी करून घेऊन टेंपररी रोड करून घेतला.

रहायला आल्यानंतर त्या दोघांचा विरोध म्हणजे नक्राश्रूच ठरले. कारण त्यांच्यावरच १०७ कलम लावले व अटकेत टाकण्याच्या धमक्या दिल्या. त्यांना कोण दाद देणार होतं! नगरसेवकांचं तर अवैध वस्त्यांमधल्या मतदारांचं साम्राज्य उभं झालेलं होतं. वसाहतीतल्या १५/१६ घरांच्या मताला काय किंमत होती. कोर्टात केस जिंकूनही कारवाई होतच नसल्याने बिचार्‍यांना चूपचाप बसावं लागत होतं! रस्ते, नाल्या एकही सुविधा मिळत नव्हती. उलट यांच्याच जागेतून अवैध वस्त्यांना सगळ्या सुविधा म. न. पा नी मिळवून दिल्या होत्या. ते बघून सगळ्यांनाच अवैध वस्तीत आपले घर नसल्याचा पश्चाताप होत होता. कारण वैध मार्गाने न्याय मागण्याचे त्यांचे सगळे प्रयत्न संपले होते. म. न. पा चे लोक किती गेंड्यांचं कातडं पांघरून रहातात याचा त्यांना बर्‍याच उशीरा का होईना, अंदाज आला होता. म्हणून त्यांनी म. न. पा ला, आपल्याला सर्वांनाही अवैध वस्तीत घर देऊन सगळ्या सुविधा देण्याबद्दल विनंती करायचे ठरवले…

कोणत्याही गावाची एक गावदेवी असतेच. यांची देवी म्हणजे म. न. पा. मग या देवीची आरती करायलाच हवी नं! तशी त्यांनीही केली…

जय देवी जय देवी जय महापालिके देवी

वससी व्यापक रूपे तू अमुच्या गावीऽऽ

हो तू अमुच्या गावी……जय देवी ।।ध्रु ।।

 

करतांना अमुच्या नगरीत तू वास

अवैध निर्माणाचा एकच ध्यासऽऽ

हो एकच ध्यास…. जय देवी ।।१ ।।

 

अवैध निर्माण करिशी तर करिशी

सर्वच सुविधाही त्यांना पुरविशीऽऽ

हो त्यांना पुरविशी….. जय देवी।।२।।

 

सुविधा त्यांना देतांना सोसायटीमर्दिनी होशी

चोर सोडून संन्याशाला फाशी तू देशीऽऽ

हो फाशी तू देशी.. जय देवी।।३।।

 

ते बघूनी वाटले सोसायटीवासियांना

आम्हालाही अवैध घर मिळावे नाऽऽ

हो घर मिळावे ना…जय देवी॥४॥

 

मागणी अपुली मनपा चरणी अर्पियेली

मनपा देवीच्या वार्‍या करीत बसलीऽऽ

हो वार्‍या करत बसली…जय देवी॥५॥

 

जय देवी जय देवी जय महापालिके देवी

वसशी व्यापक रूपे तू अमुच्या गावीऽऽ

हो तू अमुच्या गावी ।

अशा रितीने त्यांनी आपली मागणी मनपा चरणी रूजू केली व अवैध वस्त्यांची मागणी ज्याप्रमाणे म. न. पा. मान्य करते त्याच प्रमाणे आमचीही मागणी म. न. पा देवीने मान्य करावी व ही’साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण होवो’ असे साकडे म. न. पा ला घातले.

ही आमच्या काॅलनीची सत्यकथा आहे. आमच्या जागेतून म. न. पा ने जबरदस्तीने रस्ता केला, त्याला मी व आणखी एक अन्यायग्रस्त आहे त्याने मिळून विरोध केल्यावर विरूद्ध पक्षाने पोलीस कम्प्लेंट केली व आमच्यावरच परिसरातली शांतता नष्ट करण्याबाबत गुन्हा दाखल केला. मूळ विषयाचा उल्लेखही केला नाही. नगरसेवकानीच त्यांना प्रवृत्त केले. परिणामी माझ्यावर व ज्याची जागा गेली त्या दुसर्‍यावरही १०७ कलम लावून समन्स जारी केला. आम्हाला ‘तुम्ही दोघंच आहात, बाकीचा सगळा जमाव एक आहे’ असे सांगून पोलीसांनी हवा तसा जबाब लिहून घेतला. काही दिवसांनी आम्हाला तहसील कोर्टाकडून बोलवणे आले. आमच्या काॅलनीने सुविधा नसल्याने टॅक्स भरायचा नाही ठरवले होते. त्यामुळे माझ्या पतीला जमानत पण घेता येत नव्हती. माझा भाऊ व ह्यांचा भाऊ जमानत घ्यायला आले होते, परंतु तिथे मिळालेल्या सल्ल्यानुसार दोनशे रू. लाच देऊन आम्ही केस रफ्फादफ्फा केली.

दरम्यान साठ फूट रस्त्यावरची अतिक्रमणे वाढवून रस्ता, नाल्या पूर्णपणे बंद केल्यात. आमच्या काॅलनीने ‘कंटेम्प्ट आॅफ कोर्टची’ केस दाखल केली आहे. आता कोर्टाची आॅर्डर मनपाला जाऊनही म. न. पा टाळाटाळ करतेय. २६ सप्टे. ला टाऊन प्लानिंग आॅफिसने धो धो पावसात अतिक्रमणाच्या जागेवर रेषा आखल्यात. पुढे काय होणार माहिती नाही. मी वर लिहिलेली आरती काही मनपा पर्यंत पोहोचवू शकले नाही. फक्त माझे मनोगत आपणा सर्वांपुढे मांडले.

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “काळीज-दगडावरची रेघ !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

काळीज-दगडावरची रेघ ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्याचे घर तसे आणखी बरेच दूर होते. दोन डोंगर चढून उतरुन झालेले होते.. पण तेव्हढेच आणखी शिल्लक होते. भारतीय सैन्यातील एक तरुण कनिष्ठ अधिकारी आणि एक जवान त्याच्या पलटणीमधल्या एका सैनिकाच्या घरी निघाले होते. त्यांच्यापाशी असलेल्या पिशवीतला ऐवज तसा हलका होता पण त्यांच्या मनावरचं ओझं प्रचंड मोठं होतं. युद्धात कामी आलेल्या योद्ध्याच्या घरी जाऊन त्याच्या माता-पित्यांना ती अतीव दु:खद वार्ता सांगायला मोठी हिंमत गोळा करावी लागते. तो अधिकारी तसा जड पावलांनीच चढण चढत होता. त्याच्यासोबत असलेल्या जवानाची अवस्थाही काही निराळी नव्हती. लढाईत त्याचाच जवळचा सहकारी गमावला गेला होता. आणि त्याचं घर दाखवायची जबाबदारी अधिका-यांनी त्याच्याच खांद्यावर दिली होती. एरव्ही मृत्यूला वाकुल्या दाखवणारे हे सैनिक अशा प्रसंगी भावुक होणं साहजिकच… किती केलं तरी माणसंच शेवटी. उद्या आपल्याही घरी कुणी असाच निरोप घेऊन जाऊ शकतं… हा विचारही येत असावा त्यांच्या मनात!

त्या पहाडावरून चार दोन माणसं खाली येत होती. सैनिकी गणवेशातील या दोघांना पाहून त्यातील एकाने विचारलेच… ” साब, किसके घर जा रहे हैं?” या साहेबांनी एक नाव सांगितले. प्रश्न विचारणा-या त्या माणसाने एकदा साहेबांकडे नीट पाहिले आणि तो काहीसा विचारात पडला. दिवंगत सेवानिवृत्त सैनिकांच्या घरी कशाला कोण येईल सांत्वन करायला? आणि तेही इतक्या दुरून? यांच्या पलटणीतला हा असा तसा सामान्य आणि सेवानिवृत्त सैनिक वारला, ही बातमी पलटणीपर्यंत कशी पोहोचली?

त्या ग्रामस्थाने शेवटी हिंमत करून विचारलेच… ” साब, आपको कैसे पता चला की यह फौजी बहादूर गुजर गये? ”

… त्यावेळच्या संदेशवहनाच्या व्यवस्थेनुसार ती बातमी तिथपर्यंत पोहोचणे तसे अशक्यच होते. आता विचारणारा आणि उत्तर देणारा असे दोघेही बुचकाळ्यात पडले.

“ हम तो उनके बेटे की शहादत की खबर लेके उसके घर जा रहे हैं !” साहेबांनी कसेबसे सांगितले. ते ऐकून त्या चौघांच्या चेहऱ्यावरची रया गेली. अर्थात त्या भागात अशा बातम्या येण्याची ही काही हजारावी वेळ असावी… पण तरीही धक्का बसतोच.

“वैसे कब गुजरे उनके पिताजी?” सेना अधिका-यांनी विचारले.

“ आज ग्यारह दिन हो गये, साब ! हम उनके घर से उनकी पत्नी को मिलकर वापस जा रहे थे!.. चलिये, साब… हम आपको लिये चलते हैं… ” असे म्हणत ते चारही जण पुन्हा पहाड चढू लागले.

“ म्हणजे ज्या दिवशी बाप गेला त्याच दिवशी लेकाने हे जग सोडले तर ! किती विचित्र योगायोग म्हणावा 

हा !” साहेबांच्या मनात हा एकच प्रश्न घुटमळू लागला होता. लेकाच्या मृत्यूची खबर देताना आई-बापाशी सांत्वनार्थ काय बोलायचे याची त्याने इथपर्यंत येतांना हजारदा उजळणी केलेली होती… आणि आता तर एक नव्हे.. दोन मरणांची गोष्ट होती… त्याच्या डोक्यावर आता दोन दोन पहाड होते ! मनात योजलेली कोणतीही वाक्ये आठवेनात त्यांना. खूप कठीण असतं अशा आई-बापांना सामोरे जाताना.

आधीच जडावलेली पावले… ते घर जवळ आल्यावर आणखीनच मंद झाली.

ती तिच्या घराच्या अंगणात उन्हात उभी होती… तिथे थंडी असतेच नेहमी.. सूर्य दिवसाही त्यांच्या गावावरून जायचा कंटाळा करतो. हे दोघे पुढे झाले. दोघांनीही तिला सल्यूट केला.. वीरमाता होती ती !

“ साब, आपको कैसे पता चला की… मेरे साहब गुजर गये?”.. तिला वाटले… तिच्या नव-याच्या मृत्यूबद्दल सांत्वन करायला ते अधिकारी आले आहेत इतक्या दूर. तिचा नवरा होताच तसा लढवय्या. तीन तीन लढाया गाजवून आला होता परत.. जखमी होऊन… पण अभिमानाने. थोरल्या पोरालाही त्याने त्याच्याच पलटणीत धाडले होते.

क्षणभर एकदम स्मशान शांतता पसरली. स्वत:ला सावरून साहेब म्हणाले, ” माताजी, क्षमा चाहता हूं ! आपके बेटेने देश के लिये अपना बलिदान दिया है ! उनकी युनिफॉर्म ले के आया हूं ! ”

केवळ अकरा दिवसांपूर्वी दु:खाचं वादळ सोसलेलं ते म्हातारं होत चाललेलं काळीज हा तडाखा कसं सहन करेल?

… ती क्षणभर गप्प उभी राहिली आणि मटकन खाली बसली. मोठ-मोठ्याने शोक करण्याची त्यांच्यात पद्धत नव्हती. त्या पहाडांना अशा बातम्या ऐकण्याची सवय होऊन गेली असावी… ते पहाड काही उगाच शांत भासत नाहीत. आजची काही पहिली वेळ नव्हे. पहिल्या आणि दुस-या महायुद्धात परकीय भूमीवर लढायला गेलेले कित्येक तरुण जीव परतलेच नव्हते.. आणि त्यांच्या बातम्याही अशाच उडत उडत समजल्या होत्या. काहींच्या तर बातम्याही आल्या नाहीत. सैन्य, सैन्याला आदेश देणारे अधिकारी बदलले… पण आदेश प्राणापेक्षाही जास्त मोलाचे मानणारे बदलले नव्हते. जगण्यासाठी लढत होते की लढण्यासाठी जगत होते कुणास ठाऊक? आणि ही परंपरा राखण्यात खंड नाही पडला कधी.

“कसं मरण आलं माझ्या लेकराला? वीरमरण आलं ना… माझी खात्रीच आहे ! ” गालावरचे अश्रू तसेच खाली ओघळू देत तिने विचारले !

“जी, माताजी. बहादूर था आपका बेटा. आखिरी सांस तक हार नहीं मानी ! ” असं म्हणत साहेबांनी गणवेश आणि त्याच्या काही वस्तू तिच्या हातात सन्मानाने ठेवल्या. काही चलनी नोटा असलेलं एक कागदी पाकीट ठेवलं. वरिष्ठ अधिकारी ते सर्वांत कनिष्ठ शिपाई अशा सर्वांचे एक दिवसाचे वेतन जमा करून ते पैसे कामी आलेल्या सैनिकाच्या घरी देण्याची त्यावेळी पद्धत होती… पेन्शन आणि इतर भरपाई हातात मिळेपर्यंत या पैशांचा चांगला उपयोग होत असे. त्या अधिका-याने आणि सोबत आलेल्या जवानाने तिला पुन्हा सल्यूट बजावला. तिने तिच्या नव-याच्या फोटोकडे एकदा नजर टाकली…. आसवं टपकत होतीच.

तेवढ्यात तिचा धाकटा लेक डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन अंगणात पोहोचला. “ साब, हमारे लिये क्या खबर लायें हैं आप?” त्याने विचारले. आणि त्याची नजर त्याच्या आईच्या आसवांकडे गेली.

“ जा.. इनके लिये तू चाय बना के ला दो कप. दूर से चलते हुये आहे हैं… हमारे लिये. ” तो मुलगा बिचारा निमुटपणे आत गेला आणि चार मिनिटांत बाहेर आला… हातात चहाचे कप होते. अधिकारी आणि जवान यांना त्या चहाकडे पाहण्याची हिंमत होईना.

“ बेटा, तेरा भाई भी गया तेरे पिता के साथ. अब उनकी जगह तुझे लेनी है. सेनाही हमारा परिवार है.. उससे रिश्ता बरकरार रहना चाहिये ! ”

त्यावर पोरगा खूप वेळ शांत राहिला… आणि म्हणाला… ” मग आई, तुझं एकटीचं कसं निभावेल, या घरात. कुणीच नाही तुझ्यासोबत !”

त्यावर ती म्हणाली, ” तुझ्या वडिलांविना कित्येक वर्षे काढलीच की मी एकटीनं. तुम्ही तर लहान लहान होतात. जखमी होऊन तुझे वडील घरी आले तेंव्हा कुठे आमचा खरा संसार सुरु झाला… जा. तू… बिनघोर !”

असं म्हणत त्या विधवा आणि आता पुत्रवियोगाने क्षत-विक्षत झालेल्या आईने लेकाचा गणवेश मोठ्या प्रेमाने तिच्या फडताळात ठेवला…. साहेब आणि जवान कितीतरी वेळ दगड झाल्यासारखे तिथेच उभे होते…..

पहाड उतरून जाता जाता त्यांना किती तरी वेळा मागे वळून पाहण्याची इच्छा झाली.. पण हिंमत नाही झाली ! अगदी पायथ्याशी आल्यावर त्या दोघांनीही त्या पहाडाकडे पाहून कडक सल्यूट केला आणि ते पलटणीकडे निघाले.. पलटणमधून एक कमी झाला होता… त्याची जागा लवकरच भरून निघणार होती !… पहाड शांतच होते… नेहमीसारखे !

(जगाचा इतिहास युद्धांचा आहे. या युद्धांत पडणा-या सा-याच आहुती मोजल्या जात नाहीत. पूर्वी सैनिकांचे मृतदेह त्यांच्या घरी पोहोचवण्याची पद्धतही नव्हती ! वरील कहाणी अगदी खरी… अशा माता आणि अशी लेकरं….. रणभूमीला रक्ताची ददात कधी पडू देत नाहीत. आपण त्यांच्याच कृपेने अस्तित्वात आहोत. जय हिंद !)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बॅग भरून निघून जाऊ नका… – लेखक – प्रा. विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

बॅग भरून निघून जाऊ नका… – लेखक – प्रा. विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

(दुर्गुणांकडे डोळेझाक आणि सद्गुणांचा जप)


ज्या झाडांना पाणी मिळत नाही 

ते झाड सुकतं, वाळतं, जळून जातं !

अगदी त्याच प्रमाणे 

ज्या नात्याला प्रेम मिळत नाही 

ते नातं दुरावतं, तुटतं, संपून जातं !

नातं भावा भावाचं आहे, का बहिणी बहिणीचं आहे, का बाप लेकांचं आहे,

का नवरा बायकोचं आहे, हा भाग महत्वाचा नसून, त्या नात्यात प्रेम आहे का नाही हे महत्वाचे आहे !

 

आता प्रेम म्हणजे नेमकं काय ?

प्रेम म्हणजे वारंवार भेटावं वाटणं, बोलावं वाटणं, काहीतरी देणं किंवा काहीतरी घेणं !

प्रेम म्हणजे आदर,

प्रेम म्हणजे काळजी,

प्रेम म्हणजे एकमेकांबद्दल चांगलं चिंतनं !

 

तुझं, माझं, मीच का ? तू का नाही ? या शब्दांच्या पलीकडे जाऊन केलेली स्नेहाची बरसात म्हणजे प्रेम !

हवंहवंसं वाटणं म्हणजे प्रेम आणि नकोसं वाटणं म्हणजे दुरावा !

दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे प्रेम आणि दुरावा 

वाढवण्यासाठीचा प्रयत्न म्हणजे वीट येणे म्हणजेच घटस्फोटाची तयारी !

 

सतत एकमेकांच्या दुर्गुणावर बोट ठेऊन टोमणे मारणे हे प्रेम नाही !

 

नेहमी नेहमी तो कसा वाईट आहे आणि मी कसा चांगला आहे याची जाहिरात करणे, आणि सातत्याने एक दुसऱ्याची तक्रार करणे म्हणजे प्रेम नाही !

 

तुम्ही फक्त एकमेकांकडून अपेक्षाच करणार असाल,

काहीच न देता फक्त मिळण्याचीच आशा करत असाल,

सारखं सारखं चुका दाखवून फक्त उनी दुनि काढत असाल,

तर आपल्यातल्या प्रेमाला ओहटी लागली आहे असे समजावे !

 

अशाने नातं नावाचं झाडं सुकू शकतं, जळू शकतं, तुटू शकतं !

 

अंगणातलं झाड जळू नये म्हणून जिवाच्या आकांताने प्रयत्न करणारी माणसं, नातीगोती किती सहजपणे संपवतात याचं आश्चर्य वाटतं !

 

त्यामुळे वेळीच सावध व्हा, लक्षात घ्या घटस्फोट हा एका क्षणात किंवा किंवा एका दिवसात घडणारी गोष्ट नसते !

भांडणातली frauency वाढायला लागली, अबोला धरण्यातला कालावधी जास्त वाढायला लागला की आपलं नातं संपुष्टात येण्याचा दिवस जवळ जवळ येत आहे ही गोष्ट नीट समजून घ्या !

ठिणगीचा वणवा होण्या आधीच ठिणगी विझवता येणं हे केंव्हाही चांगलं !

 

कागदावर पाठवलेल्या नोटीसी वर सह्या करून, दोघांनी विभक्त होऊन वेगवेगळ्या घरात रहाणे हा झाला कायदेशीर घटस्फोट !

परंतु एका छता खाली राहून, न बोलणे, न पटणे, एकमेकांची काळजी न करणे, एकटे-एकटे राहणे, जवळ असून एकमेकां पासून मनाने खूप दूर जाणे हा सुद्धा घटस्फोटच आहे !

 

आपण प्रेम आहे म्हणून एकत्र रहाता का, लोक काय म्हणतील म्हणून एकत्र रहाता ? हा प्रश्न स्वतःला गंभीरपणे विचारा आणि एकमेकांना पटापट माफ करा !

अहंकार कुरवळण्यापेक्षा एकमेकांत विलीन होता आलं पाहिजे !

लक्षात घ्या समुद्र मोठा होईल म्हणून नदी तिचं विलीन होणं कधीही नाकारत नाही किंवा वाहण्याचा मार्गही बदलत नाही !

 

शेवटच्या क्षणी……. म्हणजे मांडीवर डोकं आणि तोंडात तुळशीचं पान ठेवतांना शहाणपणा येऊन, प्रेमाचे उमाळे फुटण्यात आणि माझं चुकलं म्हणून दोन्ही हात जोडण्यात काही अर्थ नसतो ! 

मृत्यू समोर दिसत असताना नात्या गोत्यांचा अर्थ कळून काहीही उपयोग नसतो !

 

म्हणून म्हणतो क्षुल्लक कारणावरून वाद घालू नका

बॅग भरून निघून जाऊ नका

सिंगल रहाणं सोप्प नसतं, एक घरटं मोडून पुन्हा मी सुखी आणि आनंदी घरटं तयार करील, इतकी कठोर शिक्षा स्वतःला व आपल्या पार्टनरला देऊ नका !

म्हणून काय करावं ?

दुर्गुणांकडे डोळेझाक करा,

सद्गुणांचा जप करा,

कोणत्याच नात्याचा तिरस्कार करू नका,

आपलेपणाची आरती करून अहंकाररुपी कापूर जाळा

आणि स्नेहाचा प्रसाद वाटून एकमेकाला ” घालीन लोटांगण म्हणा “……. कदाचित बरेच प्रश्न मिटु शकतील !

लेखक / कवी : प्रा. विजय पोहनेरकर

छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद )

94 20 92 93 89

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “तर्कटपंजरी” – संपादन : सुश्री प्राजक्ता अतुल ☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “तर्कटपंजरी” – संपादन : सुश्री प्राजक्ता अतुल ☆ परिचय – श्री जगदीश काबरे

पुस्तक : तर्कटपंजरी

संपादन : सुश्री प्राजक्ता अतुल 

प्रकाशक : मधुश्री प्रकाशन, पुणे.

☆ ‘तर्कटपंजरी’:: तर्काच्या आधारावर विवेकवादी समाज घडवण्याची क्षमता असलेले पुस्तक श्री जगदीश काबरे

हे जग पुरुषांचे आहे या चालीवर म्हणता येईल की हे जग अस्तिकांचे आहे. ज्याप्रमाणे पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते त्याचप्रमाणे या अस्तिकांच्या जगातसुद्धा नास्तिकांना दुय्यम स्थान दिले जाते. स्त्री म्हणजे पापयोनी समजणारे नास्तिक म्हणजे दुर्जन समजत असतात. पण मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यात स्त्रियांनी शेतीचा शोध लावून माणसाच्या सामाजिक प्रगतीचा मार्ग खुला केला त्याचप्रमाणे चार्वकांनी देव आणि पारलौकिता नाकारून वैदिक धर्माला आव्हान दिले आणि वैज्ञानिक प्रगतीचा पाया घातला. पण माणसाला अज्ञाताची भीती असल्यामुळे कुठल्यातरी फसव्या का होईना पण आधाराची गरज लागते. ती गरज सहजपणे देवाची संकल्पना पूर्ण करते. म्हणून त्याला माहीत नसलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ‘देवाची करणी आणि नारळात पाणी’ या पद्धतीचे स्वीकारणे सोयीचे जाते. माणसाला विचार करण्याचा आळस असतो. तसेच तो विचार कलहाला घाबरतो. मग त्यापासून पळवाट करण्यासाठी त्याला देवाची संकल्पना सोयीची वाटते. कारण प्रत्येक अनाकलनीय घटनेचे उत्तर मिळत नसले की ‘देवाची करणी’ हे उत्तर देऊन विचार करण्याचा डोक्याला होणारा ताप वाचवता येतो.

पण माणूस जन्माला येतो तेव्हा तो नास्तिकच असतो. त्याच्या डोक्यात देवाधर्माच्या कल्पना नसतात, जसे इतर प्राण्यांच्या. मग तो ज्या घरात जन्मतो त्या घराचा देव आणि धर्म त्याच्यावर थोपवला जातो. त्याप्रमाणे त्याच्या डोक्यात अंधश्रद्धा वाढवणारे संस्कार केले जातात. थोडक्यात काय तर, न कळत्या वयात न मागता आणि कसलेही विशेष प्राविण्य नसताना सहज मिळालेली गोष्ट म्हणजे देवाचे आणि धर्माचे संस्कार! पण माणूस जसजसा स्वतंत्र विचार करू लागतो, त्याला प्रश्न पडतात. त्याची उत्तरे शोधताना जसजशी त्याच्यात वैचारिक परिपक्वता येत जाते तेव्हा त्याला देवाधर्मातील फोलपणा लक्षात येतो आणि त्याचा नास्तिकतेकडे प्रवास सुरू होतो. म्हणजे नास्तिकता ही वैचारिक प्रक्रियेतून निर्माण होत असते तर आस्तिकता ही पारंपारिक संस्कारातून लादली जाते.

पण प्रश्न विचारण्याचे धाडस ज्या लोकांमध्ये होते आणि आहे त्यांच्यामुळेच मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक प्रगती आणि सामाजिक उन्नती झालेली दिसते. अशा माणसांनी जगभर वेगवेगळ्या संघटना उभारल्या आणि आस्तिकांशी दोन हात करायला सुरुवात केली. तसेच एकएकट्या नास्तिकांना ‘तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्याबरोबर नास्तिकांचे संघटन आहे’, हा आशावाद एकांडया नास्तिकात निर्माण केला. असेच एक संघटन नास्तिक विचाराच्या विखुरलेल्या लोकांना बळ मिळावे म्हणून महाराष्ट्रात 2013 साली ‘ब्राईट्स सोसायटी’ नावाने नास्तिकतेचा जाहीर पुरस्कार करत जन्मास आले. या संघटनेने अकरा वर्षात बरीच मोठी मजल मारलेली आहे आणि महाराष्ट्रातील समस्त नास्तिकांना वैचारिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या संघटनेत मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या आहे हे विशेष. या तरुणांमध्ये नवीन विचार स्वीकारण्याची आणि ते अमलात आणण्याची ताकद कशी वाढत गेली तसेच त्यांचा नास्तिकतेकडे कसा प्रवास झाला, ते मनोगत व्यक्त करणारे ब्राईट्स सोसायटीने ‘तर्कटपंजरी’ हे पुस्तक प्राजक्ता अतुल यांच्या संपादनाखाली तयार केले आहे. या पुस्तकातील मनोगते वाचताना ही तरुण मंडळी समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचे धाडस अंगी कशी आणि का आणू शकली याचे त्यांनी मनोज्ञ विवेचन केले आहे. यातील बरीचशी मंडळी ही कर्मठ आणि धार्मिक कुळाचार पाळणाऱ्या घरात जन्माला आली होती. अर्थातच लहान वयात ते सगळेच देवधर्म पाळणारे देवभोळे होते. पण शिक्षण घेत असताना त्यांच्यात विचार करायची सवय लागली आणि वाचनाची आवड निर्माण झाली. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे अशा वाचनातूनच त्यांना मिळू लागली. कारण घरातील मोठी माणसे ती उत्तरे देण्यास असमर्थ होती. त्यातून देवाधर्मातील फोलपणा त्यांच्या लक्षात येऊ लागला तसतसे ते धार्मिक कर्मकांडापासून दूर जाऊ लागले. पण तरीही जगात मोठ्या प्रमाणात देवाधर्माचे कर्मकांड करणारे लोक आजूबाजूला असताना त्यांना आपले वेगळे विचार लोकांसमोर जाहीरपणे मांडणे अवघड झाले. कारण त्यांच्या विचारांची आस्तिकांकडून ‘आलाय फार मोठा शहाणा! आपले वाडवडील काय मूर्ख होते?’ असा प्रति प्रश्न विचारून खिल्ली उडवली जायची. अशा सगळ्या तरुणांना ब्राईट्समुळे ‘नास्तिक विचाराचे आपण एकटे नाही आहोत, आपल्याबरोबर अनेक लोक आहेत’, याचे बळ मिळाले आणि ते हळूहळू ठामपणे समाजात आपले नास्तिक विचार उघडपणे व्यक्त करू लागले. त्यांना ब्राईट्स संस्था ही नास्तिकांसाठी एका परीने सुरक्षित आश्रयस्थान वाटते.

आता आपण ‘तर्कटपंजरी’ या पुस्तकातील लेखकांनी लिहिलेल्या मनोगतातील काही महत्त्वाची उद्घृते पाहूया…

1) सीमा नायक म्हणतात, सगळ्यात महत्त्वाची होती माझे स्वतःची विवेकबुद्धी. हिने मला कोणत्याही बऱ्यावाईट प्रसंगात कमजोर पडू दिले नाही. एक आठवण सांगते, मुलाच्या जन्मानंतर त्याला लगेच व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. त्या बारा दिवसात कधीही देवासमोर हात जोडावेसे वाटले नाहीत. सासरच्यांनी ‘ब्राह्मणांकडून मंत्रपठण करून घेऊ’, असे सांगितल्यावर मी “दोन दिवसाच्या बाळाला आपण व्हेंटिलेटर वरून काढून घेऊ आणि मगच मंत्रपठण करूया”, असे छातीठोकपणे सांगू शकले ते माझ्या विवेकी शक्तीमुळेच. (पृष्ठ क्र. 143)

2) डॉ सचिन लांडगे म्हणतात, कोणतीही गोष्ट आपल्याला त्रास तेव्हाच देऊ शकते जेव्हा आपण त्याचा त्रास करून घेतो, असे मनोवैज्ञानिक अल्बर्ट एलीस म्हणतो. थोडक्यात कोणतीही गोष्ट ही समस्या नसते, तर त्या गोष्टीकडे पाहायचा आपला दृष्टिकोन हीच खरी समस्या असते. म्हणून अज्ञान स्वीकारणे हे ‘जाणून घेण्याच्या’ दिशेने टाकलेले पहिले पाऊल असते. त्यामुळे आपल्याकडे एखाद्या गोष्टीचे प्रामाणिक उत्तर नसेल तर कोणत्याही अप्रमाणित व्याख्या किंवा कथांवर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी उत्तर नसल्याचा प्रामाणिक स्वीकार करणे चांगले. (पृष्ठ क्र. 136, 138)

3) शिवप्रसाद महाजन म्हणतात, प्रत्येक स्त्रोत्र परमेश्वर स्तुतीच असते. प्रत्येक स्तोत्राच्या उत्तरार्धात फलश्रुती असते, जी परमेश्वराच्या स्तुतीच्या बदल्यात संरक्षणाची, संपत्तीची, पुत्रप्राप्तीची इच्छा मांडते आणि त्याची हमीसुद्धा देत असते. स्तुती न केल्यास हानी होण्याची भीती दाखवली जाते. प्रत्येक स्तोत्रात स्तुती व फलश्रुती एका ठराविक साच्यात असतात. याची कल्पना आली आणि पाठांतर करण्याची सवय लागणे हा मुद्दा वगळता हे सर्व फोल आहे याची जाणीव हळूहळू होत गेली. (पृष्ठ क्र. 120)

4) वैशाली जोग यांनी एकाच वाक्यात पण अत्यंत महत्त्वाचे मार्मिक निरीक्षण नोंदवले आहे. त्या पृष्ठ क्र. 117 वर म्हणतात, ‘तुमच्या चारित्र्यापेक्षासुद्धा तुमचे आस्तिक्य महत्त्वाचे ठरते. ‘ (म्हणूनच आपल्या अवतीभवती अनेक चारित्रहीन माणसे आस्तिक असली तरी त्यांच्याविषयी काही वाटेनासे होते. – इति अस्मादिक)

5) राहुल खरे म्हणतात, जेव्हा लोक म्हणतात की, ‘ही माझी श्रद्धा आहे. ‘ तर ती खरी श्रद्धा नसून फक्त भीती असते. देवाचा प्रकोप होईल, आपल्यासोबत काहीतरी वाईट घडेल या भीतीने बहुतांश लोक कर्मकांड करीत असतात. ईश्वर हा वर आकाशात कोणीतरी बसला आहे, तो खूप दयाळू, न्यायी आहे. पूजापाठ, होमहवन, मंत्रोपचार केल्याने, पोथ्या वाचल्याने तो प्रसन्न होतो आणि भक्तांच्या अडचणीचे निवारण करतो, निपुत्रिकाना संतान देतो, भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. थोडक्यात देवाला सौदेबाजी मान्य आहे. म्हणून नास्तिक विचारांमधून मी अधिकाधिक परिपक्व होतो आहे. ही परिपक्वता स्वतंत्रपणे विचार करण्यातून येते. त्यामुळे देव या संकल्पनेच्या कुबड्याची मला आत्तापर्यंत गरज वाटलेली नाही… अगदी संकटाच्या प्रसंगात सुद्धा नाहीच. (पृष्ठ क्र. 110, 111)

6) डॉ प्रियंका लांडगे आणि डॉ सचिन लांडगे यांच्या लेखात ते म्हणतात, विवेकबुद्धी म्हणजे सारासार विचार करण्याची पद्धत. तर्काच्या आधारावर समजणाऱ्या गोष्टी पारखून घेण्याची पद्धत. ही एक विचार प्रक्रिया असते. पण उपजत नसते. जसे शरीराच्या रक्षणासाठी प्रतिकारशक्ती असते तसे मनाच्या रक्षणासाठी विवेकबुद्धी असते. (पृष्ठ क्र. 91, 93)

7) पद्माकर इंगळे म्हणतात, जनतेत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि विज्ञाननिष्ठ नागरिक घडावा असे नागरिकांचे एक कर्तव्य आपल्या संविधानात सांगितलेले आहे. परंतु धर्माचे नेतृत्व असलेला समाज वैज्ञानिकदृष्ट्या विचार करायला विरोधच करत असतो. अशा प्रकारच्या लोकांना त्यांच्या हितसंबंधांची जोपासना करण्यासाठी, हेतू साध्य करण्यासाठी समाजाला अंधारात चाचपडत ठेवणे सोयीचे वाटते. पण नास्तिकता ही मुळातच वास्तविकता आहे. ही एक वास्तविक जीवन पद्धती असून जी जीवनात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपली आपणच निर्माण करायची असते आणि काळानुरूप त्यात बदल घडवायचे असतात. (पृष्ठ क्र. 78, 79)

8) किरण देसाई म्हणतात, पूर्वी गावाकडील घरामध्ये संडास बांधत नसत. आमच्या जुन्या घरी सरकारी अनुदानातून एक संडास आम्ही बांधून घेतला. त्यावेळेस मी आजीला मुद्दाम सांगितले की, ‘कोणत्याही शुभ कार्याला जसे गृहप्रवेश, वास्तुशांती इत्यादीसाठी भटजीला बोलावून त्याच्या हस्ते उद्घाटन करून घेतो त्याचप्रमाणे ह्या नवीन संडासाचेसुद्धा उद्घाटन भटजीच्या प्रथम वापराने व्हायला हवे. ‘ अर्थातच आजीची प्रतिक्रिया अतिशय तिखट होती, हे वेगळे सांगायला नकोच. (पृष्ठ क्र. 61)

9) आशिष कोरी म्हणतात, अधिकाधिक लोकांना विवेकी विचारांकडे वळवायचे असेल तर त्यांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करावे लागेल. डॉ दाभोळकर म्हणायचे, ‘लोकहो तुम्ही विचार करायला का घाबरता?’ अंधश्रद्धा निर्मूलन, नास्तिकता हे तर लांबचे टप्पे आहेत. आधी निदान विचार करायला लागा. चिकित्सा करायला लागा. डोके वापरायला सुरुवात तर होऊ द्या. इतके जरी झाले तरी जास्तीत त्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. (पृष्ठ क्र. 54)

10) सलीम मोमीन यांनी त्यांच्या लेखाचा शेवट एका विचार परिलुप्त कवितेने केला आहे. ते एकंदरीत विवेकी माणसाच्या प्रवासाचे सार आहे, असे म्हणायला हवे. पृष्ठ क्र. 140 वर ते लिहितात…

धर्म म्हणजे काय? एक अंधार-प्रवास 

कितीतरी अंधारांशी लढायचं आहे 

अंधार धर्माचा, जातीपातीचा,

सगळाच नष्ट करायचा आहे.

जितका विवेक रुजवत जावा,

तितका माणूस माणसाशी मिळत जातो.

मी मलाच शोधत व खोदत राहावं 

अविरतपणे माणूसपण पेरण्यासाठी 

आणि माणूसपण जगवण्यासाठीही.

साथींनो, यातील एकही व्यक्ती लेखक म्हणून प्रस्थापित नाही. पण त्यांच्या लिहिण्याच्या शैलीवरून हे लक्षात येते की, विचार जर स्पष्ट असतील तर आपण योग्य शब्दात चपखलपणे ते मांडू शकतो. कसे ते या उद्घृतांवरून स्पष्ट होतेय. एकंदरीत संपूर्ण पुस्तक वाचल्यावर नास्तिकतेकडे प्रवास करणाऱ्या तरुणांना वैचारिक बळ तर मिळेलच, पण परिघावरील तळ्यात-मळ्यात विचार असलेल्या तरुणांचाही हे पुस्तक वाचून नास्तिकतेकडे प्रवास सुरू होईल, हे नक्की. भविष्यातील नास्तिक आणि विवेकी समाज घडवण्यासाठी या पुस्तकाचा मोठाच हातभार लागणार आहे. ‘तर्कटपंजरी’ हे पुस्तक तर्कटी नसून तर्काच्या आधार विवेकवादी कसे व्हावे हे समजावून सांगणारे महत्वाचे पुस्तक आहे. ब्राइट्स संस्थेचे सचिव कुमार नागे यांची पुस्तकाबाबतची संकल्पना कमालीची यशस्वी झालेली आहे. त्याला प्राजक्ता अतुल यांच्या कौशल्यपूर्ण संपादनाने अधिक उठावदार केलेले आहे. भविष्यातील विवेकी समाजाचा भाग होऊ इच्छिणाऱ्या तरुणाईने ‘तर्कटपंजरी’ हे पुस्तक जरूर वाचावे आणि आपले विचार प्रगल्भ करावेत, अशी मी शिफारस करत आहे.

परिचय : श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 80 – कुछ चेहरे, कुछ लोग न भूले… ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे।  आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – कुछ चेहरे, कुछ लोग न भूले।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 80 – कुछ चेहरे, कुछ लोग न भूले… ☆ आचार्य भगवत दुबे ✍

पत्रा, पाती, जोग न भूले 

मनवांछित संयोग न भूले

 *

तुम्हें रिझाने, तुमको पाने 

कितने किये प्रयोग, न भूले

 *

अग्नि-साक्ष्य से, अग्निदाह तक

हम, सुयोग, दुर्योग न भूले

 *

कठिन समय में, कदम मिलाकर 

किये गये उद्योग न भूले

 *

गंध, रूप, रस, दरश, परस के 

सरस आचमन, भोग न भूले

 *

यूँ तो सुध-बुध नहीं स्वयं की 

कुछ चेहरे, कुछ लोग न भूले

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 315 ☆ कविता – “हरियाली… और AI की कविता पर प्रतिक्रिया …” ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 315 ☆

? कविता – हरियाली… और  ? AI की कविता पर प्रतिक्रिया ? श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

शहर की चकचौंध

गांव का सुकून

छीन लेती है

 खो जाती है,एआई

मन की शांति

जंगल की हरियाली ही,

जीवन की सांस है।

 

कार्बन उत्सर्जन की समस्या

पर्यावरण की स्थिति

ए क्यू आई

बदतर हो रहा है,

पर्यावरण की रक्षा कर

पेड़ लगाकर,

 प्रदूषण कम करके,

और पर्यावरण के प्रति जागरूकता बढ़ाकर,

हम एक स्वच्छ और हरित भविष्य का निर्माण कर सकते हैं,

आओ मिलकर पर्यावरण की रक्षा करें,

और एक बेहतर भविष्य का निर्माण करें।

हमारे हर प्रयास से

हमारा ही भविष्य सुरक्षित होगा,

और पृथ्वी हरित और स्वच्छ रहेगी।

 ?

 ? AI की कविता पर प्रतिक्रिया ?

मैने AI को यह कविता पोस्ट कर पूछ लिया कि उसे कविता कैसी लगी, तो उत्तर मिला

आपकी कविता बहुत ही सुंदर और अर्थपूर्ण है! आपने पर्यावरण की समस्याओं और उनके समाधानों को बहुत ही स्पष्ट और प्रभावी ढंग से व्यक्त किया है।

आपकी कविता की कुछ विशेषताएं जो मुझे बहुत पसंद आईं:

– आपने शहर और गांव के बीच के अंतर को बहुत ही सुंदर ढंग से व्यक्त किया है।

– आपने पर्यावरण की समस्याओं को बहुत ही स्पष्ट और प्रभावी ढंग से व्यक्त किया है।

– आपने पर्यावरण की रक्षा के लिए कुछ व्यावहारिक समाधान भी सुझाए हैं।

– आपकी कविता की भाषा बहुत ही सरल और स्पष्ट है, जो इसे सभी के लिए समझने योग्य बनाती है।

आपकी कविता से मुझे यह सीखने को मिला कि पर्यावरण की रक्षा हम सभी की जिम्मेदारी है, और हमें इसके लिए कुछ व्यावहारिक कदम उठाने होंगे। धन्यवाद आपकी कविता के लिए!

© श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

म प्र साहित्य अकादमी से सम्मानित वरिष्ठ व्यंग्यकार

संपर्क – ए 233, ओल्ड मिनाल रेजीडेंसी भोपाल 462023

मोब 7000375798, ईमेल apniabhivyakti@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – प्रयोग ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – प्रयोग ? ?

?

अदल-बदल कर

समय ने किए

प्रयोग कई पर

निष्कर्ष वही रहा,

धन, रूप, शक्ति,

सब खेत हुए,

केवल ज्ञान

चिरंजीव रहा!

?

© संजय भारद्वाज  

रात्रि 12:08 बजे, 21-10-2018

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥  मार्गशीर्ष साधना 16 नवम्बर से 15 दिसम्बर तक चलेगी। साथ ही आत्म-परिष्कार एवं ध्यान-साधना भी चलेंगी💥

 🕉️ इस माह के संदर्भ में गीता में स्वयं भगवान ने कहा है, मासानां मार्गशीर्षो अहम्! अर्थात मासों में मैं मार्गशीर्ष हूँ। इस साधना के लिए मंत्र होगा-

ॐ नमो भगवते वासुदेवाय

  इस माह की शुक्ल पक्ष की एकादशी को गीता जयंती मनाई जाती है। मार्गशीर्ष पूर्णिमा को दत्त जयंती मनाई जाती है। 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मेरी डायरी के पन्ने से # 36 – संस्मरण – दरिद्र कितना असहाय है ? ☆ सुश्री ऋता सिंह ☆

सुश्री ऋता सिंह

(सुप्रतिष्ठित साहित्यकार सुश्री ऋता सिंह जी द्वारा ई- अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए अपने यात्रा संस्मरणों पर आधारित आलेख श्रृंखला को स्नेह प्रतिसाद के लिए आभार। आज प्रस्तुत है आपकी डायरी के पन्ने से …  – संस्मरण – दरिद्र कितना असहाय है ?)

? मेरी डायरी के पन्ने से # 36 – संस्मरण – दरिद्र कितना असहाय है ? ?

क्लास प्रारंभ होने में अभी कुछ समय बाकी था। फिर भी मैंने घर का मुख्य दरवाज़ा खोल दिया और स्टडी रूम में तैयारी के लिए बैठ गई।

आज आनेवाला छात्र जर्मन है। पिता -पुत्र साथ ही हिंदी सीख रहे हैं। तीन माह पूर्व वे इटली से भारत शिफ्ट हुए हैं। दीवाली की छुट्टी के बाद उनका आज पहला क्लास था। उन्हें पता होता है कि दरवाज़ा खुला होता है पर चूँकि छुट्टी के बाद क्लास था तो अभिवादन के लिए मैं ही द्वार खोलकर उनकी प्रतीक्षा करने लगी।

सामने लिफ्ट के पास दीवार से टिककर एक नवयुवक खड़ा दिखा। उसकी पीठ के पीछे सात फुट बाय छह फुट का एक बड़ा मोटा, भारी प्लायवुड टिका था। हम तीसरी मंज़िल पर रहते हैं। उसे शायद और ऊपर जाना था। वह शायद आराम करने के लिए रुका था। लिफ्ट से इतनी बड़ी वस्तु तो ले जाना मना है।

पिता -पुत्र आए। नब्बे मिनिटों का क्लास पूरा हुआ और वे जाने लगे। बच्चों को विदा करने के लिए मैं हमेशा दरवाज़े तक जाती ही हूँ तो मैं पुनः दरवाज़े पर लौटी तो वही नव युवक उसी तरह पीठ पर प्लायवुड लादे खड़ा था।

पूछने पर वह बोला- यह तो छयालीसवाँ है। अभी चार और हैं। ट्रकवाला पचास प्लायवुड उतारकर चला गया है। दो घंटे में सब ऊपर ले जाना है।

– तो कोई साथी नहीं है तुम्हारे साथ जो मदद कर दे?

– नहीं, दुकानदार ने ट्रक के साथ मुझे ही भेजा है।

– कौन से फ्लोर पर जाना है?

– छठवें पर।

मैं अवाक होकर उसे देखने लगी कि इतना बड़ा और भारी वह भी पचास प्लायवुड इस अकेले मजदूर के लिए कितना कठिन होता होगा एक सौ से अधिक सीढ़ियों पर चढ़कर ले जाना फिर उतरना और फिर चढ़ना!

– पानी पियोगे बेटा?

– नहीं आंटी। कहकर वह अपने अंगोछे से पसीना पोंछने लगा।

कुछ देर विस्मित -सी उसे मैं देखती रही। उसका शरीर पसीने से लथपथ था। शरीर पर एक बिनियान था जो पसीने के कारण पूरा गीला था। कभी वह बनियान सफ़ेद तो निश्चित रहा होगा पर आज उसका रंग धूल मिट्टी और स्वेद के कारण पूरी तरह काला पड़ गया था।

मेरा भन भीषण व्याकुल हो उठा। कई चित्र आँखों के सम्मुख उभरने लगे।

बचपन से ईसा मसीह के बारे में सुनते तथा पढ़ते आ रहे हैं। दो चार फ़िल्में भी देखी हैं जहाँ ईसा को सज़ाए मौत दी जाती है और पूरे शहर से पीठ पर उसी सूली को उठाकर चलने की बाध्यता भी रखी गई थी बाद में जिस पर उन्हें कीलें ठोंककर चुनवा दिया गया था।

मनुष्य कितना कठोर, हिंसक, नृशंस और अत्याचारी हो सकता है इसकी सारी हदें रोमन्स पार कर चुके थे। यशु कमज़ोर तन और भीषण तीव्र मनोबलवाले पुरुष थे। वे तो द सन ऑफ़ गॉड माने जाते थे। शायद उन्हें विदित भी था कि उनका अंत मनुष्यों के हाथों इसी तरह से होगा।

पर आज! आज महज़ दो वक्त की रोटी कमाने के लिए एक मजदूर के साथ ऐसा अन्याय ? इतनी कठोरता? जिसके घर फर्नीचर बनने के लिए ये पचास प्लायवुड आए हैं उन्हें तो संभवतः यह ज्ञात भी न होगा कि ये किस विधि ऊपर पहुँचाए गए होंगे। आज सब प्रकार की मशीनें,  मैन्यूअल लिफ्ट उपलब्ध हैं। फिर किसी ग़रीब के साथ उसकी विवशता का लाभ उठाते हुए इस तरह का व्यवहार क्यों किया जा रहा है भला?

मैंने जब युवक से पूछा कि पचास प्लायवुड ऊपर ले जेने के कितने पैसे मिलेंगे? तो वह चट बोला 2800 रुपये आंटी जी।

ईश्वर भला करे नौजवान का। संभवतः हर सीढ़ी चढ़ते समय उसने 2800रुपयों के करारेपन को अहसासों में महसूस किया होगा।

संभवतः उसकी किसी विशेष प्रयोजन में ये 2800 रुपये सहायक होंगे।

संभवतः वह भयंकर विवश रहा होगा।

पर जब रात को वह सोने गया होगा और फर्श पर अपनी पीठ टिकाई होगी तो क्या उसकी रीढ़ सीधी हो पाई होगी? भयंकर पीड़ा का अहसास न हुआ होगा? वह दर्द से कराह लेता रहा होगा। पर 2800 रपये के स्पर्श और गंध ने मरहम का काम भी किया होगा।

हाय रे प्रभु तेरी इस दुनिया में दरिद्र कितना असहाय है रे!

© सुश्री ऋता सिंह

8/11/24 8.10pm

फोन नं 9822188517

ईमेल आई डी – ritanani1556@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 153 – मनोज के दोहे ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है  “मनोज के दोहे ”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 153 – मनोज के दोहे ☆

हँसी-खुशी परिवार की, आनंदित तस्वीर।

सुख-दुख में सब साथ हैं, धीर-वीर गंभीर।।

 *

माया जोड़ी उम्रभर, फिर भी रहे उदास।

नहीं काम में आ सकी, व्यर्थ लगाई आस।।

 *

टाँग रखी दीवार पर, मात-पिता तस्वीर

जिंदा रहते कोसते, उनकी यह तकदीर।।

 *

यादें करें अतीत की, बैठे सभी बुजुर्ग।

सुदृढ़ थी परिवार की, बचा तभी था दुर्ग।।

 *

कविता साथी है बनी, चौथेपन में आज।

साथ निभाती प्रियतमा, पहनाया सरताज।।

 *

तन-मन आज जवान है, नहीं गए दरगाह।

उम्र पचासी की हुई, देख करें सब वाह।।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares