? विविधा ?

☆ 1. वसंत पंचमी… डाॅ.व्यंकटेश जंबगी  ☆ 2. शाळेची योग्य वेळ… श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

डाॅ. व्यंकटेश जंबगी

☆ 1. वसंत पंचमी… डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

“जय शारदे वागीश्वरी

विधिकन्यके विद्याधरी, वागीश्वरी”

ज्येष्ठ कवयित्री के.शांता शेळके यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली ही रचना….

साक्षात सरस्वती मातेला आपल्या समोर उभी करते.

रसिकहो, वसंत पंचमी म्हणजे या विद्येच्या देवतेचा जन्म उत्सव!

ही सकल कला, संगीत आणि वाणीची देवता..केवळ श्वास घेतला म्हणजे जगणं नाही… मनुष्याच्या जीवनात विद्या,कला हवी.. त्याचबरोबर मधुर वाणी..

सरस्वतीच्या हातातील वीणा संगीत साधनेचे द्योतक आहे…

तिची शुभ्र वस्त्रे सात्विक भाव सांगतात…कमळ संसार सागरातून अलिप्तता शिकविते.

पूर्वी शाळेत पाटी पूजन असे.

आता पाटीच नाही..

हसरी, सुमुखी, उपनिषदात वर्णन केल्याप्रमाणे मधुमती अशी ही सरस्वतीची मूर्ती.. हे स्वरूप.

“विद्या विनयेन शोभते!” हेच सांगते…

सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

© डाॅ.व्यंकटेश  जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४ मो ९९७५६००८८७

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

☆ 2. शाळेची योग्य वेळ… श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

शाळेची योग्य वेळ – 

1) आमचं बालपण 2) मुलांचं बालपण 3) शिक्षक म्हणून.  

कोकणातलं ठार खेडं. चालतच शाळेत जायचं. आमची पूर्ण प्राथमिक मराठी शाळा. पंचक्रोशीत एकच. ती दुबार भरायची. सकाळी 7.30 ते 10.30 दुपारी 2.30 ते 5.30.

पाच मैलांवरून येणाऱ्या मुलांनी कसं यायचं?केव्हा उठायचं? त्यांच्या दुपारच्या वेळेचं काय? जेवणाचं काय?हा विचार कोणीही का केला नव्हता ?  कारण  शिक्षण सार्वत्रिक नव्हतं. ब्राह्मणांची मुलं सातवी पर्यंत कशीबशी  शिकायची नि मास्तर व्हायची. बाकीची जरा जाणती झाली की “मुंबईक  जावन रामाबालू नायतर गिरणीत चिकटुची.” शहरातल्या  काही शाळा 11 ते 5 .तरी पहिली ते चौथी सकाळीच. का? माहित नाही.

2) आमची मुलं लहान असतानाही थोडीफार अशीच परिस्थिती होती.  मोठ्यांच्या शाळा, कॉलेजीस, ऑफिसेस दुपारी, पण लहान मुलांना मात्र सकाळचीच शिस्त (?) किंवा शिक्षा. कारण?

3) मी शिक्षक असताना  फारच दारूण अवस्था होती. आमची शाळा खेड्यातली. तरी टेक्निकल हायस्कूल. टेक्निकलचे वर्ग सकाळी. बाकीचे पाचवीते दहावी सर्व वर्ग 11त 5..गावातल्या पहिली ते चौथी प्राथमिक शाळा — जिल्हा परिषदेच्या. त्याही 11ते 5 होत्या. छान चाललेलं.

— मुलांची संख्या वाढली , तुकड्या वाढल्या. इमारत पुरेनाशी झाली. शाळा दुबार भरवणे हा पर्याय उरला. आणि  लहान मुलांवर संकट आलं. पाचवी ते सातवी 7.30 ते 12. आठवी ते आता दहावी कं12.30 ते6. दोन्ही शिफ्टच्या मधल्या सुट्टया लहान झाल्या. आमची शेतकऱ्यांची, मजुरांची मुलं त्यांच्या आयाही  कामाला जायच्या.  त्यांनी मुलांचे डबे कधी करायचे?बरींच मुलं बिन आंघोळीची यायची. कारण पाणी सुटलं तरी ते भरून ठेवायला हवं आयांना.  मुली तर आपापल्या वेण्या कशातरी गुंडाळून यायच्या. केस विंचरायला सवड नको? पहिल्या तासाला वर्गात घाण वास सुटलेला असायचा. पोट साफ करून तरी मुलं येतील ही शंकाच. मुलांना स्वच्छl रहाण्याचं शिक्षण कसं मिळायचं? शाळेची इमारत बांधणं ही काही साधी गोष्ट नव्हती. अशी सगळी आबदा.  इमारत होईपर्यंत असंच सगळं.

आता काही उपाय.–

1) शाळेच्या इमारती डामडौल नसलेल्या पण, मोठ्या, सर्व वर्गाना पुरतील अशा बांधाव्यात म्हणजे कमी खर्चात ऐसपैस असाव्यात. दोन शिफ्ट करण्याची वेळच येऊ नये.

2) मुंबई, पुण्याच्या सर्व स्त्रिया नोकरी करतातच. त्यांच्या मुलांची सकाळची शाळा त्यांना सोयीची. मुलांना सगळ्या तयारीनिशी एकदा शाळेत पाठवलं की स्वतःची तयारी. पण त्यात मुलांच्या झोपेचं, शीशूच काय? त्यांच्या बालपणावर उगीचच ताण, त्यांच्या आजी,आबांना ठेऊन घ्याव. ते निवांतपणे, प्रेमाने नातवंडांचं करतील, एकदा मुलांच्या बाजूने विचार केला की उपाय खूप आहेत. शब्द मर्यादेमुळे बास.   

© श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

रिटायर्ड मुख्याध्यापिका

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416. मो. – 9561582372, 8806955070.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments