सुश्री विभावरी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘अष्टदीप’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

पुस्तक – ‘अष्टदीप’

लेखक- श्री विश्वास देशपांडे, चाळीसगाव

प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन्स

पृष्ठसंख्या – ३०० पाने

पुस्तकाचे मूल्य – ४२५ रुपये

पुस्तक परीक्षण- सुश्री विभावरी कुलकर्णी

अष्टदीप पुस्तकाविषयी

या पुस्तकात भारतरत्न मिळालेल्या आठ व्यक्तींची चरित्रे लेखकाने रेखाटली आहेत.   महर्षी कर्वे, जे आर डी टाटा, सर विश्वेश्वरय्या, लता मंगेशकर, लाल बहादूर शास्त्री, अटल बिहारी वाजपेयी, सरदार पटेल आणि ए पी जे अब्दुल कलाम. या सर्वांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग आणि त्यांचे कर्तृत्व रसाळ आणि सोप्या भाषेत वर्णन केले आहे. दीपस्तंभाप्रमाणेच ‘ अष्टदीप ‘ हे पुस्तक तरुणाईसाठी प्रेरणास्रोत ठरेल यात शंका नाही.यातील व्यक्ती भिन्न परिस्थितीतून असलेल्या आहेत.पण सर्वांनी काम मात्र देशासाठीच केले.आणि त्या साठी   या सर्वांच्या नावा आधी असलेली विशेषणे त्यांचे कार्य सांगून जातात.या सर्वांनीच अतिशय खडतर प्रवास केला आहे.आणि तोच या पुस्तकात वाचायला मिळतो.

निश्चयाचा महामेरू महर्षी धोंडो केशव कर्वे

नाव वाचताच लक्षात येते खूप प्रतिकूल परिस्थितीत अचल महामेरू प्रमाणे ठाम ध्येय डोळ्या समोर ठेवून निश्चयाने काम केले आहे.त्यांचे विधवांचे पुनरुत्थान आणि स्त्री शिक्षण याने जगातील स्त्रियांना वेगळेच स्थान मिळवून दिले आहे.प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेली छोटी संस्था आज एका मोठ्या वटवृक्षात रूपांतरीत झाली आहे.आणि कित्येक महिलांचे कल्याण झाले आहे.

द्रष्टा अभियंता सर विश्वेश्वरैया

पाणी, कालवे, बंधारे यावर त्यांनी केलेले संशोधन व प्रयोग आजही उपयुक्त ठरत आहेत. किंवा त्याला पर्यायच नाहीत. त्यांना आधुनिक विश्वकर्मा म्हणतात.

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल

सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

द्रष्टा उद्योगपती जे.आर.डी.टाटा

कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये ‘दिवसातून आठ तास काम’, ‘मोफत आरोग्यसेवा’, ‘भविष्य निर्वाह निधी’ आणि ‘अपघात विमा योजना’ अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या.

टाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय साली मुंबईत सुरू केले

लाल बहादूर शास्त्री

अतिशय साधी रहाणी व देशा साठी केलेले कार्य यांच्या वरील जी भाषणे ऐकतो त्या पेक्षा वेगळी व सखोल माहिती या पुस्तकात मिळते.

अशीच माहिती आठही रत्नांची मिळते.

यातील लता मंगेशकर यांचे छोटी लता ते महान गायिका लता मंगेशकर असा जीवन पट वाचायला मिळतो.आणि सध्या त्यावरील एका सांगीतिक कार्यक्रमाचा आस्वाद पण आपण घेत आहोत.

ठळक वैशिष्ट्ये

आठ भारतरत्न प्राप्त व्यक्तींचा आदर्श हे पुस्तक आपल्या समोर ठेवते.

मूल्यविहीन तडजोड, भ्रष्टाचार इ च्या पार्श्वभूमीवर या भारतरत्न प्राप्त व्यक्तींचे जीवन म्हणजे जणू आपल्यासमोर धरलेला आरसा आहे.

देशासाठी बांधिलकी, त्याग करणे, कठीण परिस्थितीत खचून न जाता तिला धैर्याने तोंड देणे या गोष्टी हे पुस्तक नकळतपणे शिकवून जाते.

मूल्य – 425/- प्रकाशन – जुलै 2022

श्री विश्वास विष्णु देशपांडे

लेखकाविषयी

विश्वास देशपांडे हे लोकप्रिय लेखक असून त्यांची यापूर्वीची पुस्तके वाचकांकडून गौरवण्यात आली आहेत. ललित लेखन हा त्यांचा आवडता प्रांत आहे. सकारात्मक आणि आनंद देणारे लेखन हे त्यांच्या पुस्तकांचे वैशिष्ट्य आहे.

कवडसे सोनेरी अंतरीचे व आकाशझुला ही दोन्ही पुस्तके शासनमान्य पुस्तकांच्या यादीत समाविष्ट झाली आहेत.आणि बेसटसेलर पुस्तकात या पुस्तकांच्या बरोबर अष्टदीप याचाही समावेश आहे.

आत्ता पर्यंत त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत.आणि नवीन पुस्तके लवकरच प्रकाशित होणार आहेत.

अत्यंत अभ्यासपूर्ण लेखन पण सोप्या सुटसुटीत शब्दात वाचकांच्या समोर आणणे हे लेखन वैशिष्ट्य आहे. त्या मुळे आपल्याच मनातील भावना व्यक्त होत आहेत असे वाटते.लेखकांची निरीक्षण शक्ती पण खूप दांडगी आहे.आणि शांत, गंभीर, सुस्पष्ट आवाजातील निवेदन या मुळे रेडिओ विश्वास वरील कार्यक्रम (आठवड्यातून तीन दिवस प्रसारित होणारे) अतिशय लोकप्रिय झाले आहेत.

एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते,लेखकांची सर्वच पुस्तके संग्रही ठेवावी व भेट म्हणून द्यावीत.

या पुस्तकाला तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे यांचा राष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार, प्रेरणादायी व्यक्तिकथा हा पुरस्कार  ६ ऑगस्ट २०२३ रोजी प्राप्त झाला आहे.पुरस्कारासाठी मन:पूर्वक अभिनंदन!

पुढील साहित्य निर्मिती साठी खूप खूप शुभेच्छा!

पुस्तक परीक्षण – सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

image_print
5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments