? मनमंजुषेतून ?

☆ ताटी लावता आली पाहिजे..! ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

प्रत्येकाला हे करता आलं पाहिजे. स्वतःला आतून काहीकाळ तरी बंद करून घेता आलं पाहिजे.

मनाला आतून थांबवायचं.! विचारांना आतून थांबवायचं..! चक्क कडी घालायची..!

— विरक्तपणाची कडी..! माउलींना हे सहज शक्य झालं..! कारण त्यांनी विचारांची झेप  त्यांच्या नियंत्रणात ठेवली होती.

 

आपलं तसं नाही.– आपल्याला स्वतःला आवरणं अवघड आहे.– पण जमलं पाहिजे.

समाजाला काही काळ नाकारता आल पाहिजे.— नात्यांना काही काळ लांब ठेवता आल पाहिजे.

अगदी तो विश्वंभरही शक्य तेवढा बाजूला ठेवावा.– श्वास सुद्धा सखा नाही याची जाणीव व्हावी.

— ताटी लावून घ्यावी..!

 

कुणाशी वैर नाही..– दुस्वास नाही..

स्पर्धा नाही..— पण अंतर ठेवावं.!

ताटी घट्ट करावी..!

 

ताटीबाहेरच्या जगाला त्यांच्याप्रमाणे वागू द्यावं.!

तो कोलाहल, त्या हाका ऐकूनही न ऐकल्यासारख्या कराव्या.

आणि आतल्या आत्मारामाचा आक्रोश ऐकावा.! आतली हाक समजून घ्यावी.

— आणि स्वतःला समजावून द्यावी.!

 

— न जाणो ती हाक जेव्हा आपल्याला कळेल, तेव्हा आपल्या आयुष्यात ही मुक्ताई आपल्या झोपडी बाहेर अवतरेल..!

ताटीची गरजच पडणार नाही.— तीच हाका देईल..! जोहार मांडेल..!

अशा वेळी ताटी उघडून तिच्या कुशीत जाणं म्हणजे आयुष्याचं सार्थक..! हे झालं पाहिजे.

या जन्मात नाहीतर पुढच्या जन्मी..! पण केव्हातरी..—– 

— ताटी लावता आली पाहिजे..!!!!

लेखक : श्री प्रवीण 

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments