श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ आत्मपरीक्षण… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

बालपण सारखं पायात कडमडतं . वय वाढत. तिथच बिघडत.  मनाला मी पणाची चाहूल लागते.  मग सुरू होतो डाव रडीचा.  हे माझं . ते माझं . तेव्हा सुटते सुसाट धावत मनाची कोती हाव.  मग चक्रावत डोकं. ते सिद्ध करण्यासाठी.  सगळं मलाच हवं.  माझं ही आणि दुस-याच ही. का कुणास ठाऊक हा अचानक झालेला बदल मनात घर करून बसतो आणि मरे पर्यंत तिथेच वस्तिला रहातो.  त्याचा छळ सोसत जगताना वर्तनावर अनेकानेक बंधन लादावी लागतात. अंगावर पडणा-या जबाबदा-या ही त्याच अनुषंगाने पारपाडल्या जातात. मनातलीआपुलकीची भावना नकळत कुठे परागंदा होते ते कळतच नाही. आत्मकेंद्री बनताना आवडलेल्या सगळ्यांनाच दूर लोटाव लागत.

आपलं अस्तित्त्व अबाधित राखण्यासाठी. असा कुठला चमत्कार हे सारं घडवत असतो आणि आपणही त्याला खुशाल दुजोरा देत जातो . दुस-याला कमी लेखत आपलं मोठेपण सिद्ध करण्यातच आपण आपल्याला धन्यमानतो. अनुभवलेल्या अप्रतिम अनुभवांवर विरजण टाकून मोकळे होतो.  का? कशासाठी? पुनः प्रत्यय सोडा त्याची अनुभूती ही क्षीण होत जाते.  हळूहळू लोपत जातं भोगलेल , आवडलेल, जगण्याच्या रबाडग्यात कायमचं.

असं करताना आपण ,आपणच निर्माण केलेल्या एका भ्रामक भावविश्वत भ्रमिष्ट होऊन वारत असतो. तेलंघाण्याच्या बैला सारख. तिथं वाटत सगळं आपलंच आहे. आपणच राजे आपल्या विश्वाचे. पण हे लक्षात येतनाही आपल्या. आपण कमावलेली एखादी गोष्ट हरवली तर ती आपण परत मिळवू शकतो पण जे देवाने आणि दैवाने  दिलेलं असतं ते हरवलं तर उभ्या जन्मात परत मिळवू शकत नाही. जीवनात स्थिरावण्यासाठी कल्पकता, कष्ट, संघर्ष , सत्ता मग उपभोग हे सार लचांड सांभाळता सांभाळता अमाप झिजून झाल्यावर मावळणारा उत्साह आणि थकलेले शरीर भेडसावत असते. जप स्वतःला नाही तर अचानक बला यायची वाट्याला. मग घाबरगुंडी जीवाची आणि धावपळ देहाची.  कपात काळाची.  अनवरत इच्छा ध्येय गाठायची.  या सा-यांचा ताळमेळ बसवताना  संधीच मिळत नाही उपभोग घेण्याची.

हस्य हुश्य करत मग आठवण जुन्या लाघवी मनसोक्त जगलेल्या जीवनाची. हातात असतंच काय त्यांच्या शिवाय. म्हणून आठवणीची साठवण होते पुनरपी दर्शन नाही. 

हे कळत फार उशीरा. संधी निघून गेल्यावर हातातून . वाटत हा शाप भोवतोका प्रत्येक जीवाला. का अहं पणाच्या प्रभावाखाली स्वतःला सिद्ध करण्यासाठी उडताना आपल्या पेक्षा आकाशात उंच उडत गेलेल्या असंख्य गरुडांच विस्मरण कसं होतं आपल्याला. याची जाणीव झाल्यावरच आपण म्हणतो आत्मपरीक्षण करतोय.

कशासाठी ? उपयोग काय त्याचा ?

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments