सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ आयुष्य म्हणजे काय आहे ? ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

आयुष्य म्हणजे काय..

एक धुंद संध्याकाळ, ४ मैत्रिणी , ४ कप चहा, १ टेबल … 

आयुष्य म्हणजे काय..

१ इनोव्हा कार, ७ मैत्रिणी , आणि एक मोकळा पहाडी रस्ता ….

आयुष्य म्हणजे काय….

१ मैत्रिणीचे घर, हलकासा पाऊस, आणि खूप खूप गप्पा …

आयुष्य म्हणजे काय…

शाळेच्या मैत्रिणीसह, बुडवलेला तास, १ कचोरी, २ सामोसे,  आणि बिलावरून झालेला वाद …

आयुष्य म्हणजे काय…

फोन उचलताच पडणारी मैत्रिणीची  गोड शिवी, आणि सॉरी म्हटल्यावर अजून एक शिवी … 

आयुष्य म्हणजे काय … 

काही वर्षानंतर, अचानक जुन्या मैत्रिणीचा एक मेसेज, अंधुक झालेल्‍या काही ओल्या आठवणी, आणि डोळ्यातले पाणी …

 

आपण खूप मैत्रिणी  जमवतो…

काही खूप जवळच्या मैत्रिणी बनतात …

काही खास मैत्रीणी  होतात …

काहींच्या आपण प्रेमात पडतो…

काही परदेशात जातात…

काही शहर बदलतात …

काही आपल्याला सोडून जातात…

 

आपण काहींना सोडतो …

काही संपर्कात राहतात …

 

काहींचा संपर्क तुटतो …

 

काही संपर्क करत नाहीत … त्यांच्या अहंकारामुळे …

कधी आपण संपर्क करत नाही … आपल्या अहंकारामुळे  …

त्या कुठेही असोत… कशाही असोत… आपल्याला त्यांची आठवण असतेच … 

आपलं प्रेमही असतं…आपल्याला त्यांची उणीव भासते…आपल्याला त्यांची काळजीही असते ..

— कारण आपल्या आयुष्यात त्यांचं असं एक स्थान असतंच…

तुम्ही किती वेळा भेटता,  बोलता,  किंवा किती जवळचे आहात  ते महत्वाचे नाही …

 

जुन्या मैत्रिणींना कळू दे, की तुम्ही त्यांना विसरला नाहीत …

 

आणि नवीन मैत्रिणींना  सांगा, की तुम्ही त्यांना विसरणार नाही…

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments