सौ कल्याणी केळकर बापट

? मनमंजुषेतून ?

☆ भाषा… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

दसरा झाला. ह्या वर्षीचा दसरा जरा पाऊस,विजा,कडकडाट आणि गडगडाट ह्यामध्ये पार पडला त्यामुळे नेहमीचा सणाचा उत्साह, लगबग लुप्त होऊन जरा ह्या चैतन्यावर निरुत्साहाचं मळभ आलं होतं.असो.  

“ कालाय तस्मै नमः “

नवरात्राची धावपळ, लगबग संपली. आता जरा निवांतपणा आला आला, असं वाटतं नं वाटतं तोच दिवाळी येतेय. नवरात्र उरकलं आणि आता वेध दिवाळीचे.

नवरात्र उरकलं हा विचार मनात आला खरा आणि लगेच मराठी भाषेची मोठी गंमतच वाटली. उरकलं हा शब्द तसा अर्थाने सरळसरळ घेतला तर बरोबरच, पण गर्भितार्थ बघितला तर चूकच. 

आपण हे सणवार, कुळाचार हे मनापासून करीत असतो. ह्या पासून आपल्याला आनंद,समाधान लाभतं. आणि ‘उरकलं ‘ हा शब्द जरा निरुत्साही वातावरणात काम झालं की मनात येतो.

खरंच भाषा हा प्रकारच मुळात लवचिक. मोडू तसा मोडणारा, वळवू तसा वळणारा, वाकवू तसा वाकणारा. ही भाषाच आपल्याला एकाच शब्दाचे अनेक अर्थ पुरविते. तर एकीकडे हीच भाषा समानार्थी शब्दासाठी अनेक पर्याय पण सुचविते नाही का ? —–

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments