सौ. उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २८ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर (५ऑगस्ट१९२७ – २७ ऑगस्ट२००१) 

व्यंकटेश  माडगूळकर हे मान्यवर लेखक, उत्तम चित्रकार व लोकप्रिय पटकथाकार होते. त्यांचे औपचारिक शिक्षण फारसे झाले नव्हते. पण मराठी आणि ईंग्रजी वाङ्मयाचा  त्यांचा व्यासंग दांडगा होता. त्यांनी कथा, कादंबर्याई, प्रवास वर्णन, चित्रपट कथा लिहिल्या. त्यांना शिकारीचा छंद होता. जंगल भ्रमंतीच्या अनुभवावरही त्यांची पुस्तके आहेत. त्यांनी आकाशवाणीवर दीर्घकाळ नोकरी केली. १९५०मध्ये ते मुंबईत आले आणि तिथे पटकथा लेखन करू लागले. जशास तसे, पुढचे पाऊल, रंगपंचमी, वशाचा दिवा, सांगत्ये ऐका, हे त्यांच्या पटकथा असलेले चित्रपट खूप गाजले.

व्यंकटेश  माडगूळकरांनी नाटकेही लिहिली. तू वेडा कुंभार, पती गेले ग काठेवाडी, सती ही त्यांची नाटकेही गाजली. याशिवाय ‘कुणाचा कुणाला मेळ न्हाई’, ‘बिनबियांचे झाड ही वागनाटयेही ही लोकप्रिय झाली.

१९४९साली त्यांचा ‘माणदेशी माणसे’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. यातील कथातून ग्रामीण माणसांचे अस्सल आणि जीवंत चित्रण त्यांनी केले आहे. तोपर्यंत कथा वाङ्मयात  स्वप्नरंजन आणि कल्पनारम्यतेचा भाग आधीक असे. माडगूळकरांचे लेखन वास्तववादी होते. लेखनाची वेगळी वाट या पुस्तकाद्वारे मराठी वाङ्मयात रुळली. त्यानंतर त्यांचे अनेक कथासंग्रह प्रकाशित झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मनी, जपानी, आणि रशियन भाषेत झाले आहेत.

ग्रामीण कथेप्रमाणे ग्रामीण कादंबरीच्या सदर्भातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. बनगरवाडी, वावटळ, पुढचं पाऊल, कोवळे दिवस या त्यांच्या कादंबर्यानही लोकप्रिय झाल्या आहेत.

प्रवास एका लेखकाचा हे त्यांचे आत्मवृत्तही प्रसिद्ध आहे॰

व्यंकटेश  माडगूळकरांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. त्यापैकी निवडक पुस्तके-

कथासंग्रह – गावाकडच्या गोष्टी, हस्ताचा पाऊस, काळी आई , जांभळीचे दिवस

कादंबरी – बनगरवाडी, वावटळ, करुणाष्टक, सत्तांतर

ललित – अशी माणसे, अशी साहसे, चित्रे आणि चरित्रे

इतर – जंगलातील दिवस,

व्यंकटेश  माडगूळकर यांच्यावरील पुस्तके

१.    व्यंकटेश  माडगूळकर वाङ्मयीन वेध – लेखक – डॉ. जितेंद्र गिरासे

२.    व्यंकटेश  माडगूळकर लेखक आणि माणूस – संपादिका – ज्ञानदा नाईक

गौरव – आंबेजोगाई येथे १९८३ साली झालेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

पुरस्कार

१. व्यंकटेश  माडगूळकर यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत. ‘गावाकडच्या गोष्टी’, ‘काळी आई’ हे कथा संग्रह, ‘बनगरवाडी’ ही कादंबरी , ‘सती’ हे नाटक यांना हे पुरस्कार मिळाले आहेत. अनेक

२.१९८३ मध्ये ‘सत्तांतर’साठी त्यांना साहित्य अकॅडमीचा पुरस्कार मिळाला 

३ जनस्थान पुरस्कारही त्यांना लाभला आहे.

☆ ☆ ☆ ☆ ☆

महादेव विनायक गोखले ( २१ नोहेंबर १९२९ – २८ ऑगस्ट २०१३ ) 

म. वि. गोखले हे मान्यवर मराठी लेखक होते. मराठी घेऊन एम.ए. केल्यावर त्यांनी ‘आरती वाङ्म्याचा अभ्यास’ या विषयावर पीएच. डी. मिळवली. पुण्याच्या वाडिया कॉलेजमधे त्यांनी २९ वर्षे अध्यापनाचे काम केले. पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागातही त्यांनी अध्यापनाचे काम केले. अमेरिकेतील पेन्सिल्व्हानिया येथे अभ्यागत प्राध्यापक म्हणून जाण्याची संधी त्यांना १९८८ मधे मिळाली.

सुरूवातीला ते गणेशोत्सवात नकलांचे कार्यक्रम करीत. हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या, चित्रपट क्षेत्रातही काही काळ त्यांनी दिग्दर्शन केले.

१९९२ ते १९९५ या काळात ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. साहित्य महामंडळाचेही काही काळ ते कार्यवाह होते. साहित्य संस्कृती मंडळाच्या कोश प्रकल्पात विभागीय संपादकाची जबाबदारी त्यांनी पार पाडली.

म. वि. गोखले यांनी लिहीलेल्या पुस्तकांची संख्या ९२ पेक्षा जास्त आहे. त्यांच्या पुस्तकांना अनेक खाजगी व शासकीय पुरस्कार मिळाले आहेत.

यशोदेला न्याय हवा, महाभागवत, सत्यप्रतिज्ञा, भीष्म यासारख्या कादंबर्याव, छत्रपती शिवराय, लंकाधीश रावण, यासारखी चरित्रे त्यांनी लिहिली. निवडक चरित्रे भाग १ व २ यासारख्या पुस्तकात अॅवनी बेझंट, ईश्वचंद्र विद्यासागर, म.फुले, जगदीशचंद्र बॉस, अरविंद घोष, , जायप्रकाश नारायण, फिरोजशाहा मेहता इ. अनेक ख्यातनाम व्यक्तींची चरित्रे आहेत.

☆ ☆ ☆ ☆ ☆

सुहासिनी इर्लेकर ( 1932 – 28 ऑगस्ट 2010 )

सुहासिनी इर्लेकर यांचा जन्म सोलापूरचा. त्या कवयित्री व लेखिका होत्या. संत साहित्याच्या त्या अभ्यासक होत्या. मराठवाडा विद्यापीठाच्या त्या पहिल्या महिला पीएच. डी. बीडयेथील बालभीम कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात त्या मराठीच्या विभाग प्रमुख होत्या. कॉलेजचे वाङ्मय मंडळ विकसित करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं

सुहासिनी इर्लेकर यांचे १०पेक्षा जास्त कवितासंग्रह प्रकाशित आहेत. याशिवाय, त्यांचे गद्य लेखनही आहे.

सुहासिनी इर्लेकर यांचे निवडक प्रकाशित साहित्य

१.    अभंगसागरातील दीपस्तंभ – संत साहित्याचा तौलनिक अभ्यास

२.    आकाशाच्या अभिप्रायार्थ – साहित्य आणि समीक्षा

३.    आल्या जुळून तारा –  साहित्य आणि समीक्षा

४.    यादव कालीन मराठी समीक्षा

५.    या मौन जांभळ्या क्षणी – कविता संग्रह

६.    छांदस-  कविता संग्रह

७.    आई! ती माझी आई – कथा संग्रह

८.    महानंदेचे धवले- कादंबरी

९.    चित्रांगण – कथा, लेख, भाषणे

१०.   आजी आणि शेनवॉर्न – बालसाहित्य

 इ. अनेक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.

पुरस्कार, सन्मान

१.    बीड नात्यापरिषदेतर्फे सुहासिनी इर्लेकर हा पुरस्कार दिला जातो.

२.    बीडमध्ये २०१३ साली झालेल्या लेखिका साहित्य संमेलनात, संमेलन स्थळाला सुहासिनी इर्लेकरहे नाव देण्यात आले होते.

३.    बीडमध्ये २०१३ साली झालेल्या लेखिका साहित्य संमेलनात त्यांच्या ‘आकाशाच्या अभिप्रायार्थ’ हा वाचन, नृत्य, गायन असा कार्यक्रम झाला.

४.    महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे सुहासिनी इर्लेकर हा पुरस्कार दिला जातो.

५.    वारकरी साहित्य परिषदेतर्फे सुहासिनी इर्लेकर यांना ६ ऑक्टोबर २०१३ रोजी मरणोत्तर पुरस्कार दिला गेला.

आज व्यंकटेश  माडगूळकर,  म. वि. गोखले, सुहासिनी इर्लेकर या तिघा मान्यवर साहित्यिकांचा स्मृतिदीन. त्यानिमित्त त्यांच्या प्रतिभेला प्रणाम. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

सौ. उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments