श्री तुकाराम दादा पाटील

?  विविधा  ?

☆ त्याग… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

मावळताना दिवस मन उगाच कातर होतं. का ? कसं ? कशासाठी ? आजवर कधीच कळलं नाही . जगण्याच्या चाकोरींची गतिमानता थांबवणे अवघड काम .

ते  -हाटगाडग्यासारखं,सतत फिरत रहातं पोटासाठी , प्रतिष्ठेसाठी ,नात्यागोत्याच्या गुंत्यासाठी आणि भूतकाळात उपभोगलेल्या लाघवी स्वप्नांच्या स्मरणासाठी. सारंच कसं खूप धुसर झालेलं असतं काळाच्या पडद्याआड. वर्तमानात त्याची दखलही घेता येत नाही. टाळताही येत नाही त्याला . आठवण पाठपुरावा करणंही काही केल्या सोडत नाही. करायचं तरी काय ? हा यक्षप्रश्न भेडसावतो सारखा . मग लागीर झालेलं झाड घुमत रहाव तसंआपणही धुमसत रहातो आतल्याआत, हिम्मत हरवलेल्या मांत्रिका  सारखं .  इथंच डोकावतो मनोनिग्रह . स्थितप्रज्ञ होण्यासाठी  सावरायला . ओळख त्याला. जवळ कर .  सगळं काही काळजात बंदिस्त करून तूच चौकीदार हो मनाचा. ठणकावून सांग त्याला, बलदंड पुंडासारखा वागलास तर याद राख. आता देहाचा वारु थकलाय , त्याला गरज आहे विश्रांतीची . ती दिली नाहीस तर मीच परागंदा होईन इथून . मग मला नको विचारूस. ज्याला आत्मा म्हणतात तो तूच काय ? म्हणून म्हणतोय तुला शांत हो. निरभ्रांत हो. लगाम घाल मनाला.  वाच चार ओळी अध्यात्माच्या, संत महंतांच्या , भारतीयांच्या थोर परंपरेच्या आणि वानप्रस्थ हो योग्या सारखा .

त्याग करून तुझाच  तू. अरे, मी हे सगळं सगळ्यांसाठी सांगतोय.  तू कोण टिकोजीराव लागून गेलास माझ्यापुढे ? 

त्याग हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे आत्मशांतीचा. म्हण ॐ शांती शांती.

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments