सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ गुढी पाडवा… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे 

चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस म्हणजे गुढीपाडवा. या दिवसापासून हिंदूंचे नवे वर्ष सुरू होते. शिशीर ऋतूत  झाडांची पाने गळून गेलेली असतात तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी फुटते, वृक्ष वेली टवटवीत दिसतात. ऋतूंचा राजा वसंत सुरू झालेला असतो. सर्व  पृथ्वी चित्रासारखी सुंदर दिसते म्हणून या महिन्याला चैत्र हे नाव दिले आहे.  गुढीपाडव्याच्या दिवशी आनंदाचे प्रतीक म्हणून घराघरांतून गुढी उभारली जाते.गुढीसाठी काठी, रेशमी वस्त्र,धातूचा गडू,साखरेची माळ वापरले जाते.या सर्व वस्तू मधून आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवतात म्हणून समृद्धी व आनंद या सर्वांचेप्रतीक म्हणूनच गुढी उभारली जाते. या दिवशी कडुलिंबाची गूळ व मीठ,हिंग घालून केलेली चटणी खाण्याची प्रथा आहे. कडुलिंब हा औषधी असल्याने आरोग्य चांगले राहते.

दुष्ट प्रवृत्तीच्या राक्षसांचा व रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र अयोध्येला परतले तोच हा दिवस.हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो.

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments