मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वेगळा… ☆ सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ वेगळा… ☆  सौ. प्रभा हर्षे 

जानेवारी महिना आला की नीताला छातीत धडधडायला लागतं. मन फार उदास होतं. २६ जानेवारी– तिच्या  समीरचा वाढदिवस. समीर वेगळा रहायला लागल्याला आज ५ वर्षे झाली. पण एकही वर्ष त्याने वाढदिवसाला घरी यायचं टाळलं नाही. समीर नीताचा पहिला मुलगा. अत्यंत नाजूक प्रकृती असलेल्या समीरला नीता व सुजय यांनी अक्षरश: हाताचा पाळणा करून वाढवला. पण त्याची कुडी तशी लहानखोरच राहिली. धाकटा सचिन मात्र अगदी उलट. आडदांड असलेला सचिन जरी फक्त २२ वर्षांचा असला तरी दिसे मात्र जणू समीरचा मोठा भाऊच. आणि तो वागेही तसाच ! आपल्या या अशक्त भावाची तो खूप काळजी घेई. ५ वर्षांपूर्वी  समीर जेव्हा वेगळा राहू लागला तेव्हा मात्र सचिन खूप रागावला होता. ‘‘ सबर्बनमध्ये नोकरी आहे म्हणून कुणी वेगळं राहतं का? तू रोज आपली गाडी  घेऊन जात जा. मी तुला पेट्रोल भरून देतो. आणि आई तू तरी कशी परवानगी देतेस गं त्याला ? काय गरज आहे वेगळे रहाण्याची? ” — 

 

त्याच्या प्रश्नांच्या या सरबत्तीपुढे नीता मात्र अगदी शांत राहिली होती. सुजयनेही यावर बोलायचे टाळले होते. समीरने  वेगळे घर घेऊन राहावे ही खरं तर डॉक्टरकाकांचीच आयडिया होती. बऱ्याच विचारांती सुजयला मान्य झालेली, पण नीताला अजिबात न पटलेली. आपल्या या अशा वेगळ्या मुलाला डोळ्यासमोरून दूर जाऊ द्यायला ती तयार होत नव्हती ते त्याच्या अतीव काळजीमुळेच.  डॉक्टरकाका मात्र आपल्या मतावर ठाम होते. “ मुलांची काळजी घ्या, पण त्यांना कुबड्यांची सवय लावू नका. लक्षात ठेवा, तुम्ही काही अमरपट्टा घेऊन आलेले नाही आहात. केव्हातरी त्याला एकटे राहावे लागणारच आहे. त्याची जबाबदारी त्याला घेऊ द्या. तो खूप हुशार आहे. उगाच का  कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये  पहिल्या फटक्यात एवढा चांगला जॉब मिळाला आहे त्याला ? लोकांच्या विचित्र नजरा पाहून त्याच्या मनाची किती उलघाल होत असेल याचा विचार करा. त्याला विश्वासात घ्या. त्यालाही एकटं वेगळं राहावंसं वाटत असेल तर मग त्याला राहू दे स्वतंत्रपणे.  त्याला अभ्यासालाही निवांत वेळ मिळेल. ऐका माझं.” —नीताचा नाईलाज झाला. समीरच्या कलाकलाने त्याचं मत जाणून घेतल्यावर दोघेही तयार झाले, आणि समीर एकटाच वेगळा राहू लागला. 

 

या सर्व घटनेला आज ५ वर्षे झाली. हळूहळू समीरने आपले येणे जाणे हेतुपुरस्पर कमी केले. तसा मोबाईलवर संवाद रोज असे. पण प्रत्यक्ष येणे जाणे मात्र कमी झाले. त्या वर्षीची २६ जानेवारी ही तारीख. सार्वत्रिक सुट्टी असल्याने समीर लवकरच घरी आला. आल्याआल्या देवाच्या आणि आई बाबांच्या पाया पडला. सर्वांनी त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या. भेट म्हणून त्याच्या आवडीचे आणलेले कपडे दिले. आज बाहेर जेवायला जायचा बेत होता. नीताने केलेला त्याच्या आवडीचा उपमा सर्वांनी खाल्ला. सचिन मात्र नेहेमीपेक्षा जरा गप्पगप्पच होता त्यादिवशी. संध्याकाळी समीर त्याच्या घरी परत गेल्यावर तो परत नव्याने बाबांशी हुज्जत घालू लागला— 

 

‘‘ बाबा, आपलं एवढं मोठं घर आहे. माणसं  ४ व खोल्या ९. असं असताना का तुम्ही समीरला तिकडे असं वेगळं राहायची परवानगी दिली आहेत ? तुम्हाला या गोष्टीचं काहीच कसं वाटत नाही.” 

‘‘ सचिन, बाळा तू आता मोठा झाला आहेस. काही गोष्टी न सांगता तुला कळल्या पाहिजेत रे.” सुजयचा गळाही दाटून आला होता. “ आज तुला खरं काय ते सांगतो. मला सांग तू समीरच्या बोलण्या-चालण्याकडे कधी  बारकाईने लक्ष दिलं आहेस का? ”

‘‘ बाबा, असं का विचारता? तो खूप अशक्त आहे. त्यामुळे तो अगदी हळूबाई असल्यासारखा  वागतो. अगदी शांत असतो, कमी बोलतो, हे का मला माहीत नाही? ” 

‘‘ अरे बाळा हे सगळं वरवरचं  आहे. खरी गोष्ट आम्ही मह्तप्रयासाने सर्वांपासून लपवून ठेवली आहे. पण आज तुला सांगतो. नीट ऐक. समीर १३/१४ वर्षांचा झाला तेव्हा त्याचं वागणं फार बदलायला लागलं होतं. विचित्र व्हायला लागलं होतं. त्याच्या बोलण्याचालण्यात थोडी बायकी झाक येऊ लागली होती. आम्हाला फार काळजी वाटायला लागली होती. मनाला वेगळीच शंका भेडसावत होती. म्हणून त्याला आम्ही डॉक्टरकाकांकडे घेऊन गेलो—-  तो दिवस आमच्यासाठी फार भयंकर ठरला होता बाळा. डॉक्टरांनी त्याची सर्व तपासणी केली व त्यांचं मत स्पष्टपणे सांगितलं —- “ समीर ‘गे’ आहे. त्यामुळे त्याचं वागणं बदलतं आहे. आणि ही गोष्ट तुम्हाला स्वीकारावीच लागेल.” 

काय करावं, काही कळेना. आम्ही अगदी सुन्न होऊन गेलो होतो. ‘आमच्या मुलाच्या नशिबातच हे असं का ?’ हा एकच विचार मनाला सारखा पोखरत होता. तुझ्या आईच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. ती बिचारी रडून तिचं दुःख मोकळं तरी करू शकत होती. पण मी— तिच्याइतकंच दुःख मलाही होत होतं. पण मोकळेपणाने रडूही शकत नव्हतो मी. आईला रडतांना पाहून समीर अगदी बावरून गेला होता– सारखा माझ्याच मागेमागे करत होता.   या सगळ्यांत आम्हाला आधार दिला तो आपल्या डॉक्टर काकांनी. समीर डोळ्यासमोर आला की आम्हाला रडायला येई. पण डॉक्टरकाकांनी खूप धीर दिला. “ तो समंजस आहे. हुशार आहे. तो समजून घेईल. पण तुम्ही जबाबदारीने वागा.” –त्यांनी एका मानसोपचार तज्ञाशी समीरची गाठ घालून दिली. त्या तज्ञांनी मात्र आपले काम चोखपणे बजावले. या ‘गे’ प्रकाराबद्दल असलेले सर्व अपसमज त्यांनी मुळातून काढून टाकले. काही हार्मोन्सची इंजेक्शन दिली तर तुम्ही नॉर्मल आयुष्य व्यवस्थित जगू शकता हे त्यांनी प्रत्यक्ष उदाहरण देऊन पटवून दिले. तेव्हापासूनच त्यांच्याच सल्ल्यानुसार आम्ही समीरला जास्तीत जास्त स्वातंत्र्य देतो. त्याला वेगळे वाटू नये याची काळजी घेतो. नातेवाईकांनी अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नयेत म्हणून पटतील अशी उत्तरे देतो. आता हेच पहा ना, त्यानेच विचारले,  “ बाबा माझे पैसे साठले आहेत. मी घर घेऊ का?” तेव्हा मी त्याला छोटे घर न घेता मोठे घर घ्यायला सांगितले व वरचे पैसे ट्रान्सफर करून दिले. हेतू हा की त्याला असे वाटू नये की आपल्याला कोणी विचारत नाही. कधी तरी आपण जातो तेव्हा त्यालाही कंम्फर्टेबल वाटेल. आणि खरं सांगू का सचिन, माझी तर अशी इच्छा आहे की त्याला कोणाची तरी सोबत मिळावी !”

‘‘अहो बाबा, म्हणूनच तर मी म्हणतोय ना की त्याला घरातच राहू दे म्हणून ! आपण आहोतच ना त्याच्या सोबतीला.”

‘‘अरे अशी सोबत नाही. आयुष्यभरासाठीचा कुणीतरी जिवाभावाचा साथीदार ! त्याच्यावर निसर्गाने हा जो अन्याय केला आहे, त्याची बोच कमी करण्यासाठी जन्मभराची साथ देणारा कोणी जोडीदार– मग तो कोणीही असो– कदाचित याच्यासारखाच असू शकतो की तो.  त्याने त्याचे संपूर्ण आयुष्य एकट्याने काढायचे ही कल्पनाही मला सहन होत नाही रे. लोकांच्या दृष्टीकोनात आजकाल फरक पडला आहे आणि समजा नसेल तर आपण त्यांना पटवून देवू की मन, भावना, आत्मीयता, प्रेम यासाठी  सर्वच जण भुकेलेले  असतात. समीरसारखे तर कदाचित जास्तच. पण त्यांचा Inferiority Complex त्यांना अबोल बनवतो, एकटं पडायला भाग पडतो. हे थांबवले पाहिजे रे. तो न्यूनगंड घालवला पाहिजे – अगदी जाणीवपूर्वक. त्याची कमतरता लक्षात घेऊन समाजाने जास्तीत जास्त त्याला सामावून घेतले पाहीजे. पटतंय ना तुला ? म्हणून मग मी आपल्यापासूनच सुरुवात केली. कालच तो मला सांगत होता. “ बाबा माझे लवकरच प्रमोशन होईल. मग मी गाडी घेऊ का !” मी सांगितले, ‘‘अरे बिनधास्त घे. चांगली लेटेस्ट मॉडेल घे. तुझ्या गाडीतून आपण चौघे ट्रीपला जाऊ. भरपूर मजा करू. “ सचिन अरे, आता कळले ना, की आईवडील आपल्या मुलांची आयुष्यभरच काळजी करत असतात. ती कितीही मोठी झाली तरी ! गे असला म्हणून काय झालं… माझाच मुलगा आहे ना ! त्याने चुकीच्या वाटेने जाऊ नये यासाठी हा सर्व प्रयत्न आहे. आणि बाळा आता हे सगळं समजल्यावर तू त्याच्यावरचं तुझं प्रेम तसूभरही कमी होऊ देऊ नको. त्याच्याशी असं काहीच वागू-बोलू नकोस ज्यामुळे तो दुखावला जाईल, आणखी कोशात अडकेल. समजतंय ना तुला ? कुणीच त्याच्याशी कुठल्याही वेगळेपणाने वागायचं नाहीये. ऐकशील ना माझं ?” 

सचिनने आपले भरून आलेले डोळे पुसत मान हलवली. ‘ समीर कसाही असला, कुठेही रहात असला, तरी मी कधीच त्याला अंतर देणार नाही बाबा ‘ मनोमन जणू शपथच घेतली त्याने. आणि इतका वेळ त्या दोघांचं बोलणं ऐकत असलेली नीता —तिच्या डोळ्यातले अश्रू जरी थांबत नव्हते तरी डोळ्यात एक निश्चय स्पष्ट डोकावत होता. ती स्वत:लाच बजावत होती, ‘माझा मुलगा असे ना का वेगळा, पण नाही होऊ देणार मी कधीच त्याला दुबळा. बनवेन त्याला समर्थ ! कणखर आणि कर्तृत्ववान —- इतरांपेक्षा जास्तच‘—

© सौ प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘मन्मन’चे निरागस कर्मयोगी मनोहर गोखले… भाग – 1 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆

??

☆ ‘मन्मन’चे निरागस कर्मयोगी मनोहर गोखले… भाग – 1 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆

आमचा सुहृद मित्र कै. दिलीप सत्तूर मला दरवर्षी आठवण करून द्यायचा “श्रीकांत, तळवलकर ट्रस्टच्या “अनुकरणीय उद्योजक” पारितोषिकासाठी तू ‘ मन्मन ‘च्या गोखल्यांचा विचार का करत नाहीस? एकदा त्यांना भेट. मन्मन उद्योग सदाशिव पेठेत मुलांच्या भावेस्कूल समोर आहे. तुला फार लांब नाही. फार वेगळे गृहस्थ आहेत. बघ एकदा त्यांच्याशी बोल आणि तुला योग्य वाटले तरच पारितोषिकासाठी विचार कर.” माझ्या डोक्यात अनेक नावे असत, त्यामुळे गोखल्यांचे नाव मागे पडत गेले. यंदा परत दिलीपने आठवण करून दिली आणि आग्रह देखील केला. तु गोखल्यांना एकदा भेटच तुमचा अनुकरणीय उद्योजकाचा शोध नक्की संपेल. फार अफलातून गृहस्थ आहेत. मी ठरवले, जाऊयात एकदा हा एव्हडा म्हणतोय तर. खरं म्हणजे सदाशिव पेठेत असा काही उद्योग असेल असे मनाला पटत नव्हते आणि असलाच तर असून असून किती मोठा असेल? असा प्रश्न मला उगीचच पडत होता. कदाचित म्हणूनच माझे पाय तिकडे वळत नव्हते. पण शेवटी मी ठरवले गोखल्यांना भेटायचे. दिलीपला विचारले तुझी ओळख देऊ का? तर दिलीप म्हणाला छे छे मी त्यांना १०-१२ वर्षांपूर्वी भेटलोय ते मला आता ओळखणार देखील नाहीत. शेवटी मी, अरुण नित्सुरे आणि अजय मोघे मन्मनच्या ऑफिसमध्ये धडकलो. स्वागतिकेला गोखल्यांना भेटायचे आहे म्हणून सांगितले. माझे कार्ड दिले. तिने कार्ड आत नेऊन दिले आणि १० मिनिटात बोलावतील असे सांगितले. आम्ही रिसेप्शनमध्ये वाट पहात बसलो. तेव्हड्यात एक कुरियरवाला आला. त्याने पार्सल स्वागतिकेकडे दिले. बिल दिले आणि निघाला. तोच तिने त्याला परत बोलावले आणि Octroi रिसीट विचारली. तो म्हणाला, “ Octroi भरला नाही, मटेरियल तसंच आणलंय. पण मॅडम octroi भरला नाही म्हणून पैसे पण घेतले नाहीत.” आणि तो वळून जाऊ लागला. रिसेप्शनिस्टने त्याला जरबेने बोलवून घेतले आणि सुनावले, “ हे बघा, octroi भरला नसेल तर ते पार्सल परत घेऊन जा. मी पाठवणाऱ्या कंपनीला कळवते की ह्या कुरियरने परत पार्सल पाठवू नका. हे घेऊन जा आणि octroi भरून आणा.” कुरियरवाल्याला हे नवीन होते. तो बाईंना पटवू लागला, “ बाई, तुमचं काहीतरी वेगळंच. आता मी कुठे भरू octroi? घ्या ना यावेळी.  पुढे बघू.”

“ हे बघा हे चालायचं नाही. मी आत्ताच फोन करते त्यांना ” आणि फोन लावला देखील.

शेवटी होय नाही म्हणता कुरियर ते पार्सल परत घेऊन गेला. बाईंनी पार्सल पाठवणाऱ्या सप्लायारला याची खबर दिली व असे परत होणार नाही याची तंबी दिली. पार्सल परत देताना ‘ मन्मन ‘मधल्या कोणी ते मागवले होते? वेळेत न मिळाल्याने व्यवसायावर काय परिणाम होईल? याचा विचार न करता ते परत पाठवले. 

मी हे सर्व बघत होतो. गोखल्यांच्या कंपनीचे एथिकल वेगळेपण इथेच बघायला मिळाले. मला गोखल्यांचे आत बोलावणे आले आणि स्वागतिकेने स्वत: मला त्यांच्या केबिनपर्यंत सोडले. आत मनोहर गोखल्यांचे दर्शन झाले. वय साधारण सत्तरच्या आसपास, कोकणस्थी गोरेपण आणि चेहऱ्यावर सात्विक शांत भाव असलेले गोखले प्रथम दर्शनीच आवडले. रिसेप्शनिस्टने octroi न भरल्याने पार्सल परत पाठवल्याचे गोखल्यांच्या कानावर घातले. ‘उत्तम केलेस’, असे बाईंचे कौतुक केले आणि माझ्याकडे बघून स्माईल केले व मला बसण्याची खूण केली. मी माझा येण्याचा उद्देश सांगितला की, “आम्ही तुमच्याविषयी खूप ऐकले आहे. एक उत्सुकता म्हणून आपण काय करता हे जाणून घेण्यास आलोय.” त्यांना माझी ओळख सांगितली. असे काही कुणी उत्सुकतेपोटी येईल अशी त्यांना कल्पना नसल्याने आश्चर्य मिश्रित कौतुकाने मला म्हणाले, “ बोला काय माहिती हवी.”

“ हेच की आपण काय करता? प्रॉडक्ट काय? ”

“आम्ही मेडिकल सर्जरीसाठी लागणारी सामग्री बनवतो.” असे म्हणून त्यांनी त्यांचा एक प्रॉडक्ट कॅटलॉग समोर ठेवला. मी इंजिनीअर असल्याने मला फारसे आकलन झाले नाही. पण त्यांनीच हा प्रश्न सोडवला आणि त्यांनी सुरुवात केली.

 “आम्ही orthopedic सर्जरीपासून मेंदूच्या सर्जरीपर्यंत लागणारी सर्व प्रकारची शल्य उपकरणे बनवतो, ज्यामुळे डॉक्टरला शल्यक्रिया करणे सुकर जाते. आम्ही १००-१२५ प्रकारची शल्य उपकरणे बनवतो. देशात तसेच परदेशात देखील वितरीत करतो.” एकंदर मला जे कळले त्यावरून जशी कारखान्यात आपण वेगवेगळ्या प्रकारची टूल्स वापरतो तशीच टूल्स एखाद्या सर्जनला ऑपरेशनकरता वापरावी लागतात. एखादे मशीन दुरुस्त करताना ठराविक वेळेत दुरुस्त व्हावे असे इंजिनीअरला बंधन नसते. आज काम अपुरे राहिले तर उद्या करू, आहे काय अन नाही काय. पण माणसाचे हृदय, किडनी अथवा मेंदूची दुरुस्ती करताना, वेळ अतिशय काटेकोरपणे वापरावा लागतो. आज दुरुस्ती झाली नाही –  रुग्णाला तसेच ठेऊन उद्या उरलेली करू, असे चालत नाही. हा महत्वाचा फरक माणूस आणि मशीन दुरुस्त करण्यातला आहे. तसाच इंजिनियर आणि सर्जन यामधला आहे. त्यामुळे शल्यक्रियेची अशी उपकरणे बनवताना अजून एक महत्वाची काळजी घ्यावी लागते ती म्हणजे, त्या आयुधामुळे रुग्णास कोणतीही इजा होता कामा नये. एकंदर लक्षात आले की, गोखलेसाहेब आपल्या आकलना आणि आवाक्याच्या पलीकडचे काम करतायत. 

“ तुम्ही इकडे कसे वळलात? ” असे मी विचारले  

“ अहो त्याची मोठी गम्मतच झाली.” श्रोते मिळाल्यामुळे गोखलेसाहेब रंगात आले होते.

“२० वर्षांपूर्वी माझा भाऊ ससूनमध्ये न्युरो सर्जन होता. तो एकदा म्हणाला ‘ अरे मला मेंदूचे ऑपरेशन करताना कवटीतून मेंदू मोकळा करून, कवटी डाव्या हाताने धरून शस्त्रक्रिया करावी लागते. त्यामुळे शस्त्रक्रियेस वेळ लागतो आणि आपले काहीतरी चुकले तर? ही मोठी भीती वाटत रहाते. तर तू अशी काही वस्तू कर की ती कवटी अलगद पकडून ठेवेल आणि माझे दोन्ही हात शल्यक्रियेस मोकळे राहतील, जेणेकरून मला नीट काम करता येईल आणि वेळ कमी लागेल. परदेशात अशी उपकरणे मिळतात पण ती फार महाग असतात आणि त्यामुळे शस्त्रक्रियेचा खर्चही वाढतो आणि तो रुग्णास परवडत नाही.’ मी म्हटले मला तू ऑपरेशन करताना एकदा बघावे लागेल.”

– क्रमशः भाग पहिला. 

© श्री श्रीकांत कुलकर्णी

९८५००३५०३७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दगडांना बोलतं करणारा माणूस ! – लेखक : श्री अभिजित घोरपडे  ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆  ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ दगडांना बोलतं करणारा माणूस ! – लेखक : श्री अभिजित घोरपडे  ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सासवडजवळ काहीतरी वेगळं पाहण्यासाठी चाललो होतो. आम्ही दोघेच होतो. मी आणि डॉ. शरद राजगुरू. पुण्यावरून मोटारसायकलवरून निघालो. दिवे घाट चढून माथ्यावर पोहोचलो. तसेच पुढे सासवड गाठले. या ऐतिहासिक गावाला वळसा घातला आणि पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याच्या दिशेने निघालो. तिथले प्रसिद्ध संगमेश्वर आणि त्यानंतर वटेश्वर ही मंदिरे ओलांडली. पुरंदरच्या रस्त्याने जात असताना डाव्या बाजूला कोरडं पात्र असलेला एक ओढा समांतर जात होता. काही अंतर गेल्यावर सरांनी थांबायला सांगितले आणि ते ओढ्यात उतरण्यासाठी वाट शोधू लागले.

त्या वाटेने काही अंतर गेल्यावर त्यांनी एक दगड उचलला. तो पाहून त्यांचा चेहरा उजळला आणि मलासुद्धा ते काहीतरी वेगळे असल्याचे जाणवले. ‘हा जांभा आहे…’ राजगुरू सरांचे शब्द. ते पाहून मी अतिशय रोमांचित झालो. कारण आतापर्यंत जांभा खडकाचा संबंध किनारपट्टीवरील कोकण आणि धो धो पाऊस पडणाऱ्या घाटमाथ्यांशीच लावला जात होता. त्यामुळे माझ्या मनात स्वाभाविक प्रश्न होता- जांभा इथं कसा?

तो दगड जाता-येता कदाचित कोणी टाकून दिलेला होता का?… तसेही नव्हते. कारण त्या ओढ्याच्या पात्रात आतमध्ये घट्ट रोवून बसलेले काही गोटे सापडले. ते सुद्धा गोल गरगरीत आणि गुळगुळीत. याचा अर्थ ते त्या ओढ्याच्या पात्राचा भाग होते. वरच्या बाजूला कुठेतरी त्यांचा मूळ स्रोत होता आणि ते तिथून निघून पाण्यासोबत वाहत वाहत इथवर पोहोचले होते. पण या ओढ्याचा उगम फार दूरवर नव्हतो, तर तो पुरंदर किल्ल्याच्या जवळपासच होता. म्हणजे त्या परिसरातच जांभा खडक तयार झाला होता. या खडकाची निर्मिती होण्यासाठी भरपूर काळ धो धो पाऊस पडावा लागतो. पण ज्या परिसरात आता हा जांभा सापडला, तो तर कोरड्या हवामानाचा भाग आहे. याचाच अर्थ पूर्वी त्या भागात भरपूर पावसाचे आर्द्र हवामान होते… राजगुरू सरांकडून हे समजून घेणं हे अतिशय आनंददायी असे. कारण त्यांच्या बोलण्यात, समजावण्यात, वावरण्यात कमालीचा साधेपणा असे. म्हणूनच मोठ्या अभ्यासकापासून ते विद्यार्थी आणि सर्वसामान्य माणूससुद्धा त्यांच्याशी सहजपणे जोडला जाईल.

त्यांच्यासोबत जांभा पाहिला, तशी वीस-पंचवीसच वर्षांपूर्वी कऱ्हेच्या पात्रातील ज्वालामुखीची राख पाहिली. दिवे घाटाच्या माथ्यावर सापडणारी आदिमानवाने तयार केलेली छोटी-छोटी दगडी हत्यारं (सूक्ष्मास्त्र / Microliths) पाहिली. त्यांचा अर्थ समजून घेतला… असा हा खडकांना बोलायला लावणारा, त्यांचा अर्थ शोधणारा आणि तो इतरांपर्यंत पोहोचवणारा माणूस!

त्यांचे वेगळेपण म्हणजे, त्यांनी भूविज्ञान (Geology) आणि पुरातत्त्वविज्ञान (Archaeology) या दोन विषयांची उत्तम सांगड घातली. त्यामुळेच भूविज्ञानातील काही गोष्टी वापरून पुरातत्त्वविज्ञानातील काही घटनांचा अर्थ लावला किंवा उलटे सुद्धा! याचे उदाहरण म्हणजे आपल्याकडे मोरगाव आणि बोरी या ठिकाणी नद्यांच्या पात्रात सापडणारी इंडोनेशियामधील ज्वालामुखीची राख (Tephra). ही राख इथे कधी येऊन पडली याची कालनिश्चिती करण्यासाठी या थराच्या खाली सापडलेल्या दगडी हत्यारांचा उपयोग झाला. हे करणाऱ्या टीमध्ये राजगुरू सरांचा प्रमुख वाटा होता. अशी अनेक उदाहरणे आहेत.

सरांनी वयाची ऐंशी ओलांडली तरी त्यांचा उत्साह प्रचंड होता. कोणतीही नवी गोष्ट पाहिली, त्याबाबत ऐकले किंवा काही वाचले तरी ते समजून घेण्याचे कुतूहल एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे असे. कोविडच्या काळात बाहेर पडणे कमी झाले, अन्यथा ते फिल्डवर जाण्यासाठी सदैव तत्पर असत. गेल्याच महिन्यात त्यांनी वयाची नव्वदी पार केली होती. त्या वेळी शंभरी गाठणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, ती पूर्ण झाली नाही. काल सायंकाळी त्यांचे निधन झाले.

योगायोग असा की दगडांची भाषा ऐकवणारी आणि त्यांचा अर्थ लावणारी  #Wonders_of_Geology# ही तीन दिवसांची इको-टूर ‘भवताल’च्या वतीने उद्यापासून सुरू होत आहे. ज्यांच्यामुळे खूप पूर्वी कधीतरी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे बीज मनात पेरले गेले, त्यापैकी एक म्हणजे डॉ. शरद राजगुरू. त्यामुळे त्यांचे आता जाणे ही अतिशय दु:खद बाब.

त्यांना व्यक्तिश: तसेच, “#भवताल” तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

लेखक : श्री अभिजित घोरपडे 

संग्रहिका : सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अद्भूत  ☆ सुश्री शुभा गोखले ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ अद्भूत  ☆ सुश्री शुभा गोखले

९२ वर्षांचे गुरुवर्य पंडित वसंतराव घोटकर हे वृद्धापकाळातील आजारामुळे कोमामध्ये होते. दहा एक दिवस वाट पाहिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचे पुत्र विवेक घोटकर यास सांगितले की गुरुजी आता काही तासांचेच पाहुणे आहेत, तेव्हा सर्व कुटुंबाला एकदा बघून जायला सांगा. हे कळताच दुसऱ्याच दिवशी गुरुजींचा पट्टशिष्य प्रकाश वाडेकर त्यांना भेटायला आला आणि त्यांच्या पायाजवळ बसून त्यांना “गुरुजी गुरुजी” अशी हाक मारु लागला. पण गुरुजी काही केल्या ओ देईनात. सुमारे अर्धा तास असाच गेला शेवटी प्रकाश म्हणाला की “ दादा मला तबला दे. मी गुरुजींच्या पायाजवळ बसून शेवटचा तबला वाजवतो, तेव्हडाच मला आशीर्वाद मिळेल. “ प्रकाशने असे म्हणताच विवेकदादाचा मुलगा शुभम हा तबला घेऊन आला, आणि प्रकाश गुरूजींच्या पायाजवळ बसून तबला वाजवू लागला. त्यांनी दिलेल्या वेगवेगळया चीज़ा एकानंतर एक वाजवू लागला आणि पाहतो काय?— गेल्या दहा दिवसांपासून बेशुद्धावस्थेत मौन असलेले गुरुजी हळुवारपणे पुटपुटले— ” कोण? प्रकाश? ” हे ऐकताच घरातील सगळ्यांच्या  अंगावर काटा उभा राहिला. सगळे जण आश्चर्यचकित होऊन तो चमत्कार पाहू लागले आणि आता गुरुजी  फक्त उठलेच नव्हते, तर मृत्युशय्येवर असून सुद्धा  चक्क तबला शिकवू लागले होते. सांगत होते, चुका दुरुस्त करत होते, आणि वाजवून सुद्धा दाखवत होते. आणि असेच जवळपास दहा – पंधरा मिनिटे  शिकवून ते पुन्हा झोपी गेले ते सरळ पंचतत्वात विलीन होण्यासाठी – ईश्वराच्या चरणी जाण्यासाठी.

ही माहिती, सरस्वतीची उपासना काय असते? गुरु कसे असावे? भारताची गुरु-शिष्य परंपरा काय आहे? गुरु शिष्यांची श्रद्धा आणि प्रेम काय असते? याबद्दल बरंच काही सांगून जाते .

संग्रहिका :  शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 123 – गीत – कहूँ योजना… ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  एक भावप्रवण गीत – कहूँ योजना।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 123 – गीत – कहूँ योजना…  ✍

नाम तुम्हारा क्या जानूँ मैं

मन कहता मैं कहूँ योजना।

 

गौरवर्ण छविछाया सुन्दर

अधरों पर मुस्कान मनोहर

हँसी कि जैसे निर्झरणी हो

मत प्रवाह की कमी थामना।

 

अंत: है इच्छा की गागर

आँखों में सपनों का सागर

मचल रहीं हैं लोल लहरियाँ

प्रकटित होती मनो कामना।

 

राधा रसका है आकर्षण

मनमोहन का पूर्ण समर्पण

सम्मोहन के गंधपाश में

कोई कैसे करे याचना।

 

अपलक देखा करें नयन, मन

मन रहता है उन्मन उन्मन

शब्दों के संवाद अधूरे

मन ही मन मैं करूँ चिन्तना।

 

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ दोहे # 124 – “॥ कुछ दोहे ॥” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज प्रस्तुत है आपके  – “॥ कुछ दोहे ॥।)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 123 ☆।। दोहे।। ☆

☆ ॥ कुछ दोहे ॥ ☆

ठिठक गया है चन्द्रमा, इस सुदर्शना झील ।

जिसे देखने के लिये,आया चल सौ मील ॥

 

इसके तट पर तो कहीं, मिला करेगा पुण्य ।

जिसको पाने के लिये, रोया है पर्जण्य ॥

 

पानी जो चुपचुप लगे, देख रहा फिलहाल ।

क्या बादल से पूछते हो मौसम का हाल ॥

 

जिनने देखा है नहीं, अद्भुत द्वन्द्व समास ।

आमंत्रित करके कहें, करलें और प्रयास ॥

 

लहँगा, चोली से सटा, सहलाता है पेट ।

मैं थोड़ा होता बड़ा, लेता नहीं समेट ॥

©  श्री राघवेन्द्र तिवारी

27-11-2022

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – भोर ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 माँ सरस्वती साधना संपन्न हुई। अगली साधना की जानकारी से हम आपको शीघ्र ही अवगत कराएँगे। 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि – भोर  ??

सारी रात

बदलता हूँ करवट,

अजीब बेचैनी,

अजीब पीड़ा से,

जैसे काटती है रात,

प्रसव वेदना से

कराहती कोई स्त्री,

लगता है-

प्रसव की भोर आएगी

कुछ नया लिखा जायेगी!

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 172 ☆ “लोढ़ा वाली पदमश्री जुधैया बाई” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

श्री जय प्रकाश पाण्डेय

(श्री जयप्रकाश पाण्डेय जी की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके  व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में  सँजो रखा है।आज प्रस्तुत है आपकी एक समसामयिक विषय पर आधारित आलेख  – “लोढ़ा वाली पदमश्री जुधैया बाई”)

☆ आलेख # 172 ☆ “लोढ़ा वाली पदमश्री जुधैया बाई” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

लुप्तप्राय बैगा जाति के उन्नयन और लोक संस्कृति से जुड़ी उमरिया जिले के पिछड़े गांव लोढ़ा निवासी श्रीमती जुधैया बाई बैगा को पदमश्री की बधाई ।

जुधैया बाई बैगा के गुरु प्रख्यात चित्रकार आशीष स्वामी समय समय पर चित्रों, कोलाज, पेन्टिंग, लोकनृत्य एवं रंगकर्म के माध्यम से बैगा संस्कृति को उकेरते रहे हैं।

प्रकृति – प्रेम भरा जीवन एवं वन्य – जीवों से प्रेम करने वाली बैगा जाति से उपजी कला को समझने के लिए बैगा जाति के मानस को समझकर रंग – कूची के संसार एवं रंगकर्म से जोड़ने की कला आशीष स्वामी ने उमरिया जिले के जनगण तस्वीरखाना से पाई थी। उनके मार्गदर्शन में लम्बे समय से बैगा संस्कृति पर काम कर रही 82 वर्षीय जुधैया बाई बैगा (लोढ़ा, उमरिया) को देश विदेश में आज ख्याति मिली है और आज उन्हें पद्मश्री मिल गई।

(पहली फोटो में नारी शक्ति सम्मान लेते हुए जुधैया बाई। दूसरी फोटो में उनके गुरु आशीष स्वामी। तीसरी फोटो में रंग और कूची के साथ जुधैया बाई।)

उल्लेखनीय है, उमरिया आरसेटी में डायरेक्टर के पद पर रहते हुए 2013 में श्रीमती जुधैया बाई बैगा और ख्यातिलब्ध चित्रकार आशीष स्वामी का  सम्मान करने का गौरव हम लोगों को मिला था। आशीष स्वामी को कोरोना लील गया पर चित्रकार आशीष स्वामी ने अपने जीते जी 2019  से लगातार जुधैया भाई को पद्मश्री मिले इसके लिए प्रयास किए थे। एवं कलेक्टर उमरिया के माध्यम से सरकार को रिकंमनडेशन भिजवाया था।

© जय प्रकाश पाण्डेय

416 – एच, जय नगर, आई बी एम आफिस के पास जबलपुर – 482002  मोबाइल 9977318765

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 114 ☆ # गणतंत्र… # ☆ श्री श्याम खापर्डे ☆

श्री श्याम खापर्डे

(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है दीप पर्व पर आपकी एक भावप्रवण कविता “# गणतंत्र…#”

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 114 ☆

☆ # गणतंत्र… # ☆ 

यह भारत का गणतंत्र है

समता, सद्भाव का मंत्र है

बंधुत्व, एकता का तंत्र है

धर्मनिरपेक्षता का यंत्र है

 

हर व्यक्ति को अधिकार है

हर क्षेत्र में अपार है

देश में कहीं भी, कभी भी

रहने, बसने का आधार है

 

चाहे जो हो अभिलाषा

चाहे जो हो भाषा

चाहे जो हो प्रांत

पूर्ण हो सबकी आशा

 

सब धर्मों का हो सम्मान

हर व्यक्ति हो धर्म प्राण

अपनी अपनी जीवन पद्धति

अपने रीति रिवाजों से हो निर्वाण

 

अमीर गरीब का ना भेदभाव हो

जात पात की ना कोई छांव हो

सब मनुष्य एक समान है

प्रेम, बंधुत्व का एक भाव हो

 

मतदान का अधिकार अस्त्र है

सरकार चुनने का शस्त्र है

योग्य व्यक्ति का करें चुनाव

यही तो गणतंत्र है

 

हम सब भाग्यवान है

गणतंत्र हमारी शान है

सब को एक सूत्र में बांध के रक्खा

कितना महान हमारा संविधान है

© श्याम खापर्डे

फ्लेट न – 402, मैत्री अपार्टमेंट, फेज – बी, रिसाली, दुर्ग ( छत्तीसगढ़) मो  9425592588

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

सूचनाएँ/Information ☆ –’आचार्य जगदीश चंद्र मिश्र’ – लघुकथा प्रतियोगिता – वर्ष 2023 – ☆ प्रस्तुति – डॉ ऋचा शर्मा ☆

 ☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

🌹‘आचार्य जगदीश चंद्र मिश्र’ – लघुकथा प्रतियोगिता – वर्ष 2023 – 🌹

आयोजिका – डॉ. ऋचा शर्मा

आचार्य जगदीश चंद्र मिश्र लघुकथा सम्मान समिति, अहमदनगर, महाराष्ट्र के द्वितीय वार्षिक कार्यक्रम के अवसर पर राष्ट्रीय स्तर पर ‘आचार्य जगदीश चंद्र मिश्र लघुकथा प्रतियोगिता’ का आयोजन किया जा रहा है।

इसमें प्रविष्टि भेजने के लिए नियम व शर्तें इस प्रकार हैं –

।. प्रेषित लघुकथा मौलिक तथा अप्रकाशित, अप्रसारित हो। इसका प्रमाण पत्र लघुकथाकार द्वारा देना अनिवार्य है।

2. वर्तनी की अशुद्धियां नहीं होनी चाहिए तथा व्याकरण चिह्नों का समुचित प्रयोग किया होना चाहिए।

3. एक लघुकथाकार एक लघुकथा ही भेजें।

4. लघुकथा का शीर्षक, अपना पूरा नाम, डाक पता, फोन नंबर, ई-मेल आदि का स्पष्ट उल्लेख करें।

5.कृपया लघुकथाएँ ई-मेल, व्हाट्सएप पर अथवा डाक/कूरियर से न भेजें

  लघुकथाएं इस लिंक पर क्लिक कर प्रेषित करें। 👉  लघुकथा  

6. किसी प्रकार की सहायता हेतु इस  ई-मेल पर 👉 [email protected] अथवा 9370288414 पर वाट्सएप के माध्यम से संपर्क करे।

7. रचना भेजने की अन्तिम तिथि–28 .2.2023 है। इसके बाद प्राप्त रचनाएँ प्रतियोगिता में शामिल नहीं की जाएँगी।

8. निर्णायक समिति का निर्णय ही मान्य तथा अंतिम होगा |

9. प्रतियोगिता का परिणाम 29.5.2023 को घोषित किया जाएगा। इससे पूर्व इस संदर्भ में कृपया कोई संपर्क न करें।

प्रथम पुरस्कार – ₹2100

द्वितीय पुरस्कार – ₹1100

तृतीय पुरस्कार – ₹ 750

प्रोत्साहन पुरस्कार (2)- ₹500

आयोजिका –  डॉ. ऋचा शर्मा

प्रोफेसर एवं अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001, e-mail – [email protected]  मोबाईल – 09370288414.

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares