सुश्री प्रभा हर्षे

??

☆ आहोत आम्ही पुण्यवान … लेखिका- सुश्री मृदुला बर्वे आणि डाॅ.अपर्णा कल्याणी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

एका बातमीवर नजर पडली – आपल्या सर्वांच्याच आवडत्या – the most famous – Switzerland – स्वित्झर्लंड मध्ये आत्महत्येला सहाय्य करणारे – suicide pods बनवले गेले आहेत आणि त्या पॉडमध्ये जाऊन आत्महत्या करण्यासाठी म्हणे “waiting list” आहे. ज्या वेस्टर्न जगाची, तिथल्या राहणीमानाची भूल पाडून आपल्याला आपल्या धर्मापासून दूर केले गेले, तिथे ही अवस्था?आत्महत्या करायला रांग? आणि कुपन्स? आपसूक उद्गार निघाले – मी भारतात जन्मले, हो आहेच मी भाग्यवान ! In this land, every birth and every death counts! 

त्याच आठवड्यात एका लग्नाच्या मीटिंगसाठी ओपंडित (म्हणजे ओव्हर्सिज भटजी/पंडित) कडून गेले होते. मुलगी मराठी आणि मुलगा अमेरिकन. लग्न विधी समजावून सांगताना त्याला मी विचारले – तुझे पालक? म्हणतो – “ I have no idea, I haven’t spoken with my parents for 12 odd years :O” 

मी त्याला विचारले – “ don’t you feel lonely? “  त्याने प्रामाणिकपणे उत्तर दिले – “  I do… I miss them. Then I drink and then I am okay. I want to change this and hence I decided to get married to an Indian woman. I envy you guys…”  मी कसंनुसं जराशी हसले – मनात तेच शब्द, तेच वाक्य – ‘ होय, होय आहोतच आम्ही भाग्यवान, पुण्यवान…’

न मागता मिळालेले सुख म्हणजे भारतात जन्म ! त्यातही हिंदू कुटुंबात जन्म ! त्यातही धार्मिक, भगवंतावर विश्वास असणाऱ्या कुटुंबात जन्म !

“सर्वेपि सुखिन: सन्तु |” अशी मागणी करणारा आपला धर्म ! —

“Hindus seek out life, not destroy it. Hindus are the only people who have never invaded any land. We live in perfect harmony with nature.”

आपले अकरावे इंद्रिय – मन. हे मन जे आपल्या सर्व आयुष्याला आकार देते, त्यावर सर्वात जास्त संस्कार करणारी संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती आणि हिंदु धर्म.

” मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव|” – ह्या मूल्यांवर आधारित आपली संस्कृती व धर्म !

प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जर कुठली संस्कृती देऊ शकते तर ती आहे ‘ वैदिक सनातन आर्य हिंदु संस्कृती!’

‘ जीवन तर धन्य कराच पण मृत्यूही धन्य करा,’ अशी शिकवण देणारी आपली संस्कृती!

प्रत्येक प्रदेशात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक पंथात – मनाला बळकटी देणारे अध्यात्मिक ज्ञान, संत वाङ्मय, उपासना – म्हणजे भारत देश !

” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ” – असे सांगणारे स्वामी समर्थ…

” समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे?”, किंवा “आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो “- असे मनोबल वाढवणारे समर्थ रामदास स्वामी…

” शिवछत्रपती राजा महाराष्ट्राचा, अवतार महादेवाचा ” – हिंदु साम्राज्य प्रस्थापित करणारे राजे… 

—अगणित उदाहरणे, अगणित संदेश, पण उद्देश्य एकच –- “ बाबारे, ८४  लाख योनिंमधून प्रवास करून मिळालेला मनुष्य जन्म धन्य कर—- तू कुठल्याही वर्णात असशील, तू कुठल्याही आश्रमात असशील, तू श्रीमंत असशील, गरीब असशील, तू आंधळा असशील, पांगळा असशील, तरी हा मनुष्य जन्म धन्य कर. अध्यात्मिक व पारमार्थिक प्रगती कर !”— अशी शिकवण देणारी आपली संस्कृती, अशा भारत देशात आम्ही जन्मलो… एक अख्खा जन्म कमी पडेल एवढे ज्ञान ह्या भूमीने आम्हाला दिले…

होय ! आहोतच आम्ही पुण्यवान, आहोतच आम्ही भाग्यवान ! 

 – सुश्री मृदुला बर्वे. 

(डॉ.अपर्णाताई कल्याणी यांच्या FB Wall वरुन साभार) 

https://www.facebook.com/aparna.kalyani.58

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments