सुश्री अपर्णा परांजपे
☆ ✍️ चराचरात आहे राम… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆
☆
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🚩
या जगातील सगळ्या गोष्टींची जबाबदारी भगवंताची आहे
☆
कुणी मानतं कुणी मानत नाही,
एवढाच काय तो फरक आहे..
*
पृथ्वी, जल, आप, वायू, अग्नी तर त्याचेच, जीवाचा श्वास ही “त्याचा” आहे
कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे….
*
दृश्य, अदृश्य, ऊन, सावली, सुख दुःखाचा तोच द्रष्टा आहे
कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे…
*
निर्माता तर आहेच पण निर्मितीचे कारणही तोच आहे
कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे…
*
साधु संतांनी हे ओळखले व त्याला जाणले आहे
कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे…
*
मानणे न मानणे हया पलिकडचे अस्तित्व “तो” आहे
कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे….
*
गुह्यतम हे ज्ञान हेच केवळ सत्य आहे
कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे….
*
ज्याने जाणले त्याला त्याचाच तो आहे
कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे….
*
त्याला जाणल्यावर जाणण्याचे काही शिल्लक रहात नाही
स्वतः तच त्याला अनुभवल्यावर वेगळे काही असत नाही…
*
स्वानंदाचा हा आनंदकंद निर्मितेचे कारण आहे
कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे….
*
“शीतोष्ण सुख दुःखेषु” असा तो स्थितप्रज्ञ ज्ञानी आहे
कुणी मानतं कुणी मानत नाही एवढाच काय तो फरक आहे…
*
मानणे, न मानणे अंध:कार संपला
फरक ओळखून जगी “सुवर्ण मध्य” साधला…
*
सत्यमेव जयते 🙏
आत्माराम (च)राजाराम *
☆
भगवंत हृदयस्थ आहे 🙏
© सुश्री अपर्णा परांजपे
कात्रज, पुणे
मो. 9503045495
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈