सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? जीवनरंग ❤️

☆ महापूर… लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ 

धुवाधार पाऊस तीन दिवस थांबायचं नांव घेईना. त्यातून अतिवृष्टीचा इशारा मिळालेला.

पिंपळवाडीचं धाबं दणाणलं.

गाव दोन्हीही बाजूंनी दोन नद्यांनी घेरलेलं. ना पूलाचा पत्ता.

इन-मीन दीडशे उंबऱ्याचं गांव अन् वस्ती म्हणाल तर पोराठोरांसकट पाचशेच्या घरात.

संपर्कच तुटला.

सरपंच अन् पोलिस-पाटलानं थेट जिल्ह्याला कळवलं. कलेक्टरनं ताबडतोब आर्मीचं हेलिकॉप्टर मागवलं अन् लोकांची सुटका करायला सुरुवात पण केली.

लोकांना पाच मिनिटांत पुराच्या पलिकडं आणून सोडलं जायचं.

होता होता सुटका केलेल्या गावकऱ्यांचा आकडा वाढतच गेला.

नऊशे लोकांची सुटका झाल्यावर पायलटनं सरपंचाला विचारलं,

“अहो सरपंच, तूम्ही तर म्हणाला होता की लोकसंख्या ५०० आहे. हे नऊशे आले कुठून? आणि अजून सुध्दा शंभरेकजण शिल्लकच आहेत पुरात अडकलेले?”

सरपंच पिचकारी मारत म्हणाले,” त्याचं काय हाय साएब…

माणसं ५०० पण नाहीत पण होतंय काय, हिकडं आणलेले लोक, पुनंदा तिकडं जात्यात पाण्यातून पोहून. अन् हेलिकॉप्टर मधून हिकडं येत्यात. आमाला कधीच मिळत न्हाई ना त्यात बसायला…खोटं कशाला सांगू साएब, मी सोत्ता तीनदा जाऊन आलोय…..!”

पायलटनं डोक्यावर हात मारून घेतला….!!!

मेरा भारत महान….

🤕

लेखक-अज्ञात

प्रस्तुती- सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments