सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे
🪻 अभिनंदन 🪻
आम्ही सिद्ध लेखिका, कोकण विभाग, यांच्यातर्फे, ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके स्मृतीदिनानिमित्त राज्य स्तरीय अष्टाक्षरी काव्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे यांच्या कवितेस लक्षवेधी रचनेचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
त्याबद्दल ई-अभिव्यक्ती (मराठी) परिवारातर्फे त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
🌸🌸🌸🌼🌼🌸🌸🌸
आजच्या अंकात वाचूया ही पुरस्कार प्राप्त कविता मन पाखरू पाखरू…
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
कवितेचा उत्सव
☆ मन पाखरू पाखरू… ☆ श्रीमती उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
(आम्ही सिद्ध लेखिका कोकण विभाग आयोजित राज्यस्तरीय अष्टाक्षरी काव्य स्पर्धा… लक्षवेधी रचना पुरस्कार प्राप्त कविता)
☆
मन पाखरू पाखरू,
पळभर भुईवर!
जाते आभाळा भेटाया,
पंख पसरून वर! … १
*
मन पाखरूच असे,
पंख फुटता उडते!
त्याची झेप ही अफाट,
नभ अपुरे पडते! … २
*
मन पाखराप्रमाणे,
करी सर्वत्र संचार!
नाही लागे थांग त्याचा,
त्याचे उडणे अपार! .. ३
*
मन अधीर अधीर,
क्षणभर एका ठायी!
विचारांच्या झोपाळ्यात,
मंद मंद झोका घेई! .. ४
*
असे मनाचे पाखरू,
इवलासा जीव त्याचा!
दिसे त्याचा हा स्वभाव,
स्वच्छंदाने जगण्याचा! … ५
☆
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈