श्रीमती उज्ज्वला केळकर
कवितेचा उत्सव
☆ चारोळ्या… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
☆
घन अंधारी, नदीकिनारी
एक काजवा लहरत जाई
प्रकाश टिंबे मांडितो परि तो
जळतही नाही, विझतही नाही.
*
तप्त रस सोनियाचा
खाली आला फुफाटत
सारा शांतला शांतला
फुलाफुलांच्या देहात
*
किती आवेग फुलांचे
वेल हरखून जाते.
काया कोमल तरीही
उभ्या उन्हात जाळते.
*
किती कशा भाजतात
उन्हाळ्याच्या उष्ण झळा
परि झुलतात संथ
बहाव्याच्या फूलमाळा
*
किती किती उलघाल
होते काहिली काहिली
एक लकेर गंधाची
सारे निववून गेली
☆
© सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈