श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ साठमारी☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

आजच्या राजकारणापेक्षा

पूर्वीची साठमारी बरी होती

मैदानावर जीव खाऊन पळता येत होतं

अंगावर घेत पिसाळलेला हत्ती….

*

हरलो तर त्याच्या पायाखाली चिरडून एकदाच मरून मुक्त होता येत होतं

मिटत होत्या कायमच्या यातना

पण आत्ताच्या या मग्रूर सांडांच्या लढाईत

धडपणे मरताही आणि जगताही येत नाही माणसाला

नरकवासातील यातना भोगत जिवंत राहून करायचं तरी काय ?

*

जिथे परंपरागतांच्या तोंडचा मालकीहक्काचा घासच हिरावून घेतला जात आहे

त्यांनीच निवडून दिलेल्या दानवाकडून

त्याना शासनतरी करणार कोण ?

*

मायभूमीवर किड्यामुंग्यांचा नाही

माणसांचा रहीवास आहे

हेच विसरलेत शासनकर्ते

*

एकामेकांची उणीदुणी काढत ही गिधाडं सामान्यांचे लचके तोडत

आपलं अस्तित्व शाबूत ठेवून आरामात जगण्यात मश्गूल

राहून

आमचीच दिशाभूल करत आहेत

*

सामान्यानो जागे व्हा हीच ती नेमकी वेळ आहे.

देशाला सावरण्याची आणि मातलेल्या पुंडपाळेगाराना आवरण्याची

*

वणव्यात जळून मरण्यापेक्षा

तो विझवण्यासाठी प्रयत्न करुया

एकजूटीने आपल्या

जागते रहा रात्र वै-याची आहे.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments