? वाचताना वेचलेले ?

☆ प्रश्न ?? # 3 ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

  1. नाती का जपायची ?

रेशमाच्या धाग्याचा गुंता सोडवून पहा एकदा…

 

  1. आठवणींची एक गंमत आहे.

त्याच्यात गुंतून राहिलात तर नवीन निर्माण नाही होत !!

 

  1. माणूस देवाला म्हणाला “माझा तुझ्यावर विश्वासच नाही.”

देव म्हणाला “वा !!  श्रद्धेच्या खूप जवळ पोहोचला आहेस तू. प्रयत्न सुरु ठेव.”

 

  1. गवई एकदा तानपुऱ्याला म्हणाला,”तू नसलास तर कसं होईल माझं?”

तानपुरा म्हणाला ,”अरे वेड्या ! माझी गरज लागू नये हेच तर ध्येय आहे.”

 

  1. विठुमाऊली एकदा एकादशीला दमून खाली बसली. मी विचारलं,”काय झालं ?”

विठुराय म्हणाले, “पुंडलिकाचा गजर करतात लेकाचे पण मायपित्यांना एकटं सोडून अजून माझ्याच पायाशी येऊन झोंबतात वेडे कुठले. !”

 

  1. एकटं वाटलं म्हणून समुद्रावर गेलो एकदा. त्याला विचारलं “कसा एकटा राहतोस वर्षानुवर्ष ?”

तो म्हणाला “एकटा कुठला, मीच माझ्यात रमावं म्हणून ईश्वराने लाटा दिल्या आहेत ना मला.”

मी विचारलं “माझं काय?”

तो हसून म्हणाला

 “नामस्मरण आणि माझ्या लाटांमध्ये काहीच साम्य दिसत नाही का तुला?”

 

संग्राहिका : सुश्री मंजिरी गोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments