डाॅ.भारती माटे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ ताटी लावता आली पाहिजे..! ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

प्रत्येकाला हे करता आले पाहिजे.स्वतःला आतून काही काळ तरी बंद करून घेता आले पाहिजे.

मनाला आतून थांबवायचं.!

विचारांना आतून थांबवायचं..!

चक्क कडी घालायची..!

विरक्तपणाची कडी..!

माउलींना हे सहज शक्य झालं..!

कारण त्यांनी विचारांची झेप  त्यांच्या नियंत्रणात ठेवली होती.

 

आपलं तसं नाही.

आपल्याला स्वतःला आवरायला अवघड आहे.

पण जमलं पाहिजे.

समाजाला काही काळ नाकारता आलं पाहिजे.

नात्यांना काही काळ लांब ठेवता आलं पाहिजे.

अगदी तो विश्वंभर ही शक्य तेवढा बाजूला ठेवावा.

श्वास सुद्धा सखा नाही याची जाणीव व्हावी.

 

ताटी लावून घ्यावी..!

 

कुणाशी वैर नाही..

दुस्वास नाही..

स्पर्धा नाही..

पण अंतर ठेवावं.!

 

ताटी घट्ट करावी..!

 

ताटीबाहेरच्या जगाला त्यांच्याप्रमाणे वागू द्यावं.!

तो कोलाहल, त्या हाका ऐकूनही न ऐकल्यासारख्या कराव्या.

 

आणि आतल्या आत्मारामाचा आक्रोश ऐकावा.!

आतली हाक समजून घ्यावी.

स्वतःला समजावून द्यावी.!

 

न जाणो ती हाक जेव्हा आपल्याला कळेल तेंव्हा आपल्या आयुष्यात ही मुक्ताई आपल्या झोपडीबाहेर अवतरेल..!

ताटीची गरजच पडणार नाही.

तीच हाका देईल..!

जोहार मांडेल..!

अशा वेळी ताटी उघडून तिच्या कुशीत जाणं म्हणजे आयुष्याचं सार्थक. 

:: राम कॄष्ण हरि ::

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments