श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ चारोळ्या… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

घन अंधारी, नदीकिनारी

एक काजवा लहरत जाई

प्रकाश टिंबे मांडितो परि तो

जळतही नाही, विझतही नाही.

*

तप्त रस सोनियाचा

खाली आला फुफाटत

सारा शांतला शांतला

फुलाफुलांच्या देहात

*

किती आवेग फुलांचे

वेल हरखून जाते.

काया कोमल तरीही

उभ्या उन्हात जाळते.

*

किती कशा भाजतात

उन्हाळ्याच्या उष्ण झळा

परि झुलतात संथ

बहाव्याच्या फूलमाळा

*

किती किती उलघाल

होते काहिली काहिली

एक लकेर गंधाची

सारे निववून गेली

© सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments