? विविधा ?

☆ अण्णाभाऊ साठे….साहित्यरत्न.! ☆ सौ.रोहिणी अमोल पराडकर ☆

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाटेगावी जन्मले.त्यांचा जन्म १ /८/ १९२० साली झाला.

त्यांचे खरे नाव तुकाराम होते. पण टोपण नावाने त्यांना गावातील लोक अण्णा म्हणून हाक मारत.  शाळेत फक्त दिड दिवस गेले तरी ते साहित्यिक सम्राट ठरले. त्यांनी अनेक पोवाडे रचले.ते मजूरवर्गावरील अन्याय सहन करू शकले नाहीत.

   कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केले. वडिलांसोबत मुंबई ला येऊन छोटी मोठी काम केली. त्यांना गिरणीत झाडूवाल्याची नोकरी मिळाली. तेव्हा मजुरांचे कष्टप्रद जीवन जवळून अनुभवले. भारतीय कम्युनिस्ट पार्टी चे नेते काॅम्रेड डांगे यांच्या नेतृत्वाखाली त्या पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. तमाशा फडात सुध्दा चुलत भावा बरोबर काम केले.

  लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांची निरिक्षण शक्ति जबरदस्त होती.

नेत्यांची भाषणे ऐकून त्यांनी अनेक कथा कांदबऱ्यां लिहिल्या आहेत. आत्मियतेने ते त्यांचे विचार लेखणीतून उतरवत होते.  ‘पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे’, असे त्यांना वाटे.

त्यांच्या कथा-कादंबऱ्याचे भारतातच नव्हे, तर २२ परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत. जेव्हा ते रशियाला गेली तेव्हा

त्यांनी लिहिलेला १९६१ साली प्रवासवर्णन रशियाचा प्रवास अनुभवावर आधारित होता. नंतर मात्र दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले.

विपन्नावस्थेत गोरेगाव (मुंबई) येथे त्यांचे निधन झाले.*

असे साहित्य रत्न अण्णाभाऊ यांनी १८ /७/१९६९ मुंबईत अखेरचा श्वास घेतला.

साहित्यरत्न, साहित्य शिरोमणी अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा…… !!

© सौ. रोहिणी अमोल पराडकर

कोल्हापूर  

भ्रमणध्वनी – 8208890678

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments