श्री विनय माधव गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ गरजेचे नियम ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

जग हे गरजेच्या नियमानुसार चालत असतं—–

थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो.

तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल!

हवेची पण गंमत असते, चाकातून गेली की चाक पळत नाही.

डोक्यात गेली की, चांगलं-वाईट कळत नाही.

आणि श्वासोच्छवास सोडून गेली की, घरात कोणी ठेवत नाही!

माणसाचे दोन गुरू असतात एक अनुभव आणि दुसरे कर्म– हे दोघेही सोबत राहतात.

कर्म हे लढायला शिकवत असते आणि अनुभव हा जिंकायला शिकवत असतो! 

या जगात जो तो आपल्याकरिता जगतो हेच खरे. वृक्षवेलींची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात, तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात. याला जग कधी प्रेम म्हणते, कधी प्रीती म्हणते, तर कधी मैत्री—पण खरोखरच हे आत्मप्रेम असते! 

जबाबदारी घेताना “मी”, आणि श्रेय घेताना “आपण” हा शब्द जर केंद्रस्थानी असेल, तर कुठलेही काम सहज निःसंशय पूर्ण होतॆ!

थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते, पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही. म्हणूनच शरीर थकले तरी चालेल, परंतू मनाला कधीही थकू देऊ  नका!

जगण्याचा तोल हा असा असतो. कुणाला क्षणभराचे रंग मिळतात, कुणाला सुंदर क्षण मिळतात, कुणाकडे जग सहज मान उंचावून पाहते, तर कुणाला मिळते फक्त जगण्याचं बीज. त्यातून आपापलं फुलायची जादू मात्र शिकून घ्यायची असते. एकदा ती जादू आली की रंग कुणाकडे मागावे लागत नाहीत. ते उमलत राहतात…… बहरत राहतात ‼️

संग्राहक : विनय गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments