मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मुक्ती… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ मुक्ती… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी 

कल्पना… शक्यता… शोध! 

मुक्ती म्हणजे नक्की काय? मला वाटतं एखाद्या विचाराच्या स्त्रोतापर्यंत पोहोचणं म्हणजे मुक्ती. जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटणं ही एक आध्यात्मिक बाजू आहेच, पण तेव्हा नक्की काय घडत असावं? विचार करताना मला जाणवलं की एकुणात मुक्ती हे प्रकरण इंटरेस्टिंग आहे… अनेक जणांना त्याचं अप्रूप आहे काहींचं जीवन ध्येय आहे… तर हे काय आहे…

एकदा प्राणायमाच्या विषयी जाणून घेताना हळूहळू विषय श्वास जन्म-मृत्यू यावर आला. आणि मग जगण्याचा दृष्टिकोन नेमका कुठला योग्य ? अशा अर्थाची आम्ही चर्चा करत होतो. त्यावेळी मला आमच्या ओळखीतल्या एकांनी सांगितलं होतं की आपल्या या जन्मातली प्रत्येक गोष्ट ही केवळ आणि केवळ आपल्या विचारांतून निर्माण झाली आहे. आपण करणाऱ्या (काही जणांच्या दृष्टिकोनातून घडणाऱ्या) प्रत्येक कृती मागे हा विचार असतो. कधी प्रगट तर कधी सुप्त अवस्थेत. आपला जन्म कधी, कुठे, कसा झाला/होतो. आपलं शरीर, आपल्या इच्छा, वासना, जगण्याचा दृष्टिकोन हे सारंकाही आपल्या विचारांनी नियंत्रित केलं जातं/आहे. हे विचारच आपल्याला निवड करायला प्रेरणा देतात. ज्यांना याची जाणीव नाही अशा कमजोर व्यक्तींच्या दृष्टीने भाग पाडतात.

हे ऐकल्यानंतर मला असं वाटू लागलं की ज्यावेळी एखाद्याला ही गोष्ट पटून आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर त्याला वाटतं की याचा शोध घ्यावा… याच्या मुळापर्यंत पोहोचावं… तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा मुक्तीच्या दिशेने प्रवास सुरू होत असावा.

मग त्याला हे जग नक्की कोण नियंत्रित करतं? अशी कुठली शक्ती आहे? तिचं स्वरूप स्थिर आहे का अस्थिर? या उत्तराचा ध्यास लागत असावा. आणि आयुष्यातल्या प्रत्येक घटनेकडे या दृष्टिकोनातून बघताना कधीतरी त्याला या प्रश्नाचा उगम सापडत असावा. मग या उगमापाशी पोहोचल्यानंतर त्याला एका परिपूर्ण अवस्थेचा अनुभव येऊन तो मुक्त होत असावा. कारण जिथे विचार आणि प्रश्न दोन्हींची निर्मिती थांबते आणि उत्तराचीही आस राहत नाही त्या क्षणापासून त्याचा मुक्तीकडे प्रवास वेगाने होत असावा किंवा तोच एखादा क्षण त्याला मुक्तता देत असावा? असं मला वाटतं.

मुक्तीच्या कल्पना आणि शक्यता अशाही असतील.. की आणखीन काही वेगळ्या? शोध चालू आहे… कधीतरी याचं उत्तर मिळेल.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आकाश मोजतांना…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ “आकाश मोजतांना” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

वळवाचा पाऊस नुसताच पडून गेला व्हता. गावातल्या लाईटी गेल्या व्हत्या. मेणबत्ती लावून मी चटई टाकून पडलो होतो. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. आई झोपली होती. बायको आणि पोरं बडबड करत कसला तरी खेळ खेळत होती. तेवढ्यात माझा फोन वाजला. फोन उशालाच व्हता. मी पटकन उचलला. सवयी प्रमाणे मी फोन स्पीकर वर टाकला. आणि पलीकडून आवाज आला. हॅलो साहेब, दंगलकार बोलता का.. ? मी बी व्हय म्हणलं. पलीकडची व्यक्ती म्हणाली, “आम्हाला तारीख हवी होती. गोंदियामध्ये तुम्हाला बोलवायचे आहे. आमच्या सगळ्यांची इच्छा आहे तुम्हाला ऐकायची. 14 एप्रिल तारीख हवी आहे आम्हाला. बाबासाहेबांच्या जयंती निमित्त.. ”

तसा एप्रिल महिना सुरू व्हायला अजून पंधरा दिवस होते. बऱ्याच तारखा बुक झालेल्या होत्या. पण 14 एप्रिल कुणाला दिलेली नव्हती. पण गोंदिया खूप लांब होतं. मी त्यांना म्हणलं, “साहेब तुम्हाला तारीख द्यायला अडचण नाही पण, येण्याजाण्यात माझे चार दिवस जातील. अंतर खूप आहे आणि मला खूप अवघड होईल. ” त्यावर ती व्यक्ती जरा शांत झाली. आणि लगेच पुन्हा ते म्हणाले, ”आम्ही विमानाचं तिकीट करतो साहेब पण तुम्हाला यावं लागेल.. ” 

माझ्या पोटात एकदम गोळा आला. आणि माझे वडील माझ्या बाजूला येऊन फोनकडे एकटक कधी बघत बसले कळलं नाही. बायको पोरं एकदम शांत. आई पण जागी झाली. पलीकडची व्यक्ती म्हणाली, “ साहेब पुणे ते नागपूर विमान सेवा आहे. आम्ही येणे जाणे करून घेतो. आजच तिकीट बुक करतो तुमचं. आता नाही म्हणू नका. ”.. मला लै आनंद झाला. पण माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या वडिलांना झालेला होता. बाजूला बसलेल्या आईचा हात त्यांनी हातात गच्च दाबून धरलेला मला दिसला. अण्णा इमान इमान अस बडबड करत वरच्या पत्र्यावर नजर फिरवताना मला दिसले. मला फार गंमत वाटली. तेवढ्यात पलीकडची व्यक्ती काही बोलणार त्यांना मीच म्हणालो, ”साहेब तुम्ही पहिलेच आहात माझ्या आयुष्यात जे मला विमानाने बोलवत आहात. तुमच्यामुळे माझ्या आयुष्यातला पहिला विमान प्रवास घडणार आहे. तुमचे खूप आभार. पण, साहेब माझी एक विनंती होती बोलू का.. ?”त्यावर ते म्हणाले “बिनधास्त बोला दादा.. ”

त्यांना मी म्हणलं, ”साहेब हा पहिला विमान प्रवास माझ्या वडिलांच्या सोबत व्हावा अशी माझी खूप इच्छा आहे. तुम्ही मानधन नाही दिले तरी चालेल. पण आमच्या बाप लेकाची तिकीट तेवढी काढून द्या. आम्ही सोबत येतो. ” त्यावर ते म्हणाले, “ नितीन दादा अजिबात काळजी करू नका. तुमचं जे मानधन असेल ते ही करतो. आणि बाबुजीचे आणि तुमचे तिकीट ही बुक करतो. काळजी करू नका. फक्त दोघांचे आधार कार्ड चे फोटो पाठवा. ” मी आनंदाने होकार दिला. फोन कट केला. बाजूला वडिलांच्याकडे बघितले तर अण्णा गायब. आण्णा कपाट उघडून आधार कार्ड शोधत होते.

तासाभराने लाईट आली. लाईट आल्याबरोबर अण्णा आधार कार्ड घेऊन माझ्याजवळ आले आणि म्हणाले, ”काढ लवकर फोटू याचा आणि पाठव त्याला.. ” मी आमच्या दोघांचेही आधार कार्डचे फोटो पाठवून दिले. आमची तिकीट बुकिंग झाली. आम्ही 14 एप्रिलला पहाटे पाच वाजता विमानात बसणार होतो. ते ही पुण्यातून. या भावनेने मला रातभर झोप लागत नव्हती. आण्णा तर रातभर बडबड करत होते. आजवर आकाशात उडणारे विमान पाहणारी आम्ही साधी माणसं. आमच्यासाठी हे खूप काही होतं.

त्या दिवसापासून आमचे अण्णा सगळ्या गावाला सांगत सुटले मी विमानात बसणार आहे म्हणून. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर आमच्या सगळ्या पाहुण्यांना फोन करून ते सांगू लागले. रोज दिवस मोजू लागले. अखेर तो दिवस आला. याचदिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. त्याच निमित्ताने मी प्रमुख पाहुणा म्हणून निघालो होतो. आणि याच महामानवामुळे आम्ही आज आकाश मोजणार होतो.

माझे मित्र मिलिंद केदारे यांनी त्यांच्या चारचाकी गाडीतून आम्हाला विमान तळावर सोडले. आजवर एस. टी. स्टँड आणि रेल्वे स्टेशनवर उभं राहून गाडीची वाट पाहणारी आम्ही साधी माणसं आज विमान तळावर आलो होतो. मी विमानतळापेक्षा जास्त बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद मनात साठवत होतो. आजूबाजूला बघून प्रत्येकाला विचारत आत जाण्याची प्रोसेस आम्ही पूर्ण केली. तिथून आम्ही बाहेर पडलो. एक बस न्यायला आली. त्यात बसलो. त्यावेळी अण्णा म्हणाले, “ आरे इमान कुठाय.. ? “ मी हसत म्हणलं, “ ही गाडी आपल्याला विमानाजवळ घेऊन जाईल. ” गाडी हलली तशी तिथल्या मैदानात उभी असलेली विमाने आम्हाला खिडकीतून दिसू लागली. अण्णा भान हरवून तिकडे बघत होते.

बस थांबली. आम्ही उतरलो. आमचं नागपूरसाठी जाणारं विमान समोर उभं होतं. त्या पायऱ्या चढून आम्ही आत आलो. आमची शिट पाहून बसलो. अण्णा संपूर्ण विमान नजरेत साठवत होते. विमान त्या रन वै वर उभं राहिलं. त्यातल्या हवाई सुंदरी असणाऱ्या पोरीनी हातवारे करून माहिती दिली. अण्णा त्यांच्याकडे एकटक बघत होते. आणि मी अण्णांना पाहत होतो. तेवढ्यात पाठीमागून माझ्या खांद्यावर एक हात पडला. मी मागे वळून बघितलं. तर तो माणूस हातात हात देत म्हणाला, ” साहेब जय भीम. मी वानखेडे. तुमचा लै मोठा फॅन आहे. ” त्याने माझ्यासोबत एक सेल्फी घेतला. मनात म्हणलं, ”एस. टी मध्ये आपले फॅन भेटतात पण विमानात बी आपल्यावर प्रेम करणारी माणसं हायती.. ” लै भारी वाटलं.

विमान धावू लागलं. आणि त्याने एका क्षणाला जमीन सोडली. त्यावेळी फक्त विमान आकाशात उडालेले नव्हते. एक मुलगा त्याच्या बापाला ओंजळीत धरून हवेत तरंगू लागलेला होता. जसं विमान उडाले तसे मी अण्णांकडे बघितले. अण्णा लहान मुलासारखे खिडकीतून वाकून पाहण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांच्या कडे पाहतोय हे लक्षात आल्यावर त्यांनी माझ्या डोळ्यात बघितलं. माझा हात गच्च हातात धरून भरलेल्या डोळ्यांनी माझा बाप एकच वाक्य बोलला. ” पोरा आपल्या अख्ख्या खानदानीत इमाणात बसलेला मी पहिलाच माणूस बरं का.. “ असं म्हणून अण्णांनी मान डोलावली.

थोड्या वेळाने हवाई सुंदरी आली. चहा हवाय का म्हणून विचारू लागली. मी किंमत विचारली. तिने दोन चहाचे दोनशे रुपये सांगितले. अण्णानी मला हळूच चिमटा घेत म्हणले. ”नको जाऊ दे. दोनशे रुपयात आठवड्याची भाजी येईल बाबा. तुझी आय काय म्हणल.. ?” आम्ही तो चहा घेतला नाही. पण जी माणसं चहा पीत होती त्यांच्याकडे मात्र आम्ही एकटक पाहत राहिलो. तेवढ्यात अण्णा म्हणले. ” व्हय रे” यात सगळी सोय असती ना.. ?” मी व्हय म्हणलं, त्यांना बाथरूमबद्दल विचारायचं होतं हे कळलं. मी म्हणलं. मागे आहे टॉयलेट या मोकळं होऊन.. ’” आण्णा हसत म्हणले, तशी काय गरज नाही, मला काय आलेली नाहीय. पण जाऊन येतू बघून येतु” अस म्हणून आण्णा ते ही सगळं करून आले.

आम्ही आकाशात उडत होतो. आम्ही आकाश मोजत होतो. टिव्ही, पिचर, पेपर, मोबाईल, आणि हवेत उंच उडणाऱ्या जागी विमान पाहणारी साधी माणसं आम्ही. आज विमानात बसलो होतो. हा आकाश मुठीत घेणारा पहिला विमान प्रवास मी बापासोबत केला याचं समाधान होतं. ज्या बापाच्या मांडीवर मी लहान असताना झोपलो. त्याचं बोट धरून पहिलं पाऊल टाकलं. त्याच बापाने आज त्याचं डोकं हळूच खांद्यावर टेकवत आण्णा भरलेल्या डोळ्यानी मला म्हणाले, “ नितीन आयुष्यात सगळं मिळालं. जे स्वप्नात ही वाटले नव्हते ते जगायला मिळालं. ”.. असं म्हणून दोन पोरांचा बाप असलेला मी. या वयात माझ्या बापाने माझ्या गालाचा हळूच मुका घेतला. मी डोळे झाकले. हुंदक्यांची दाटून आलेली जत्रा मी आतल्या आत अडवून धरली. आणि बंद पापणीच्या आड बापाच्या खांद्यावर हात टाकून धरण फुटल्यासारखा झिरपून गेलो..

…आता सतत विमान प्रवास असतो पण तो पहिला प्रवास मात्र मनात घर करून आहे.

थॅन्क्स बाबासाहेब….

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय झालं? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

? इंद्रधनुष्य ?

मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय झालं? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

निकष काय होते? कोणते फायदे मिळणार?

भाषेला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे काय?

संपूर्ण महाराष्ट्राला व जगभरात पसरलेल्या मराठीजनांना अभिमान वाटावा अशी बातमी नुकतीच समोर आली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने गेल्या अनेक दशकांपासूनची मराठी जनतेची ही मागणी पूर्ण केली आहे. अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे सर्व निकष मराठी भाषेने पूर्ण केले आहेत. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीसह पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

दरम्यान, काही लोकांना प्रश्न पडला आहे की, एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं? यामुळे काही फायदे मिळणार? आणि अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे निकष काय असतात? या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देत आहोत.

अभिजात दर्जा मिळणे म्हणजे काय?

देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तमिळ भाषेला सर्वात आधी २००४ साली अभिजात दर्जा प्रदान करण्यात आला. त्यापाठोपाठ संस्कृत (२००५), कन्नड (२००८), तेलुगु (२००८), मल्याळम (२०१३) आणि ओडिया (२०१४) या भाषांना अभिजात दर्जा बहाल केला गेला. हा दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटते.

अभिजात दर्जा असलेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे २५०-३०० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. भाषा भवन उभारणे, त्या भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे, ग्रंथालये उभारणे, देशभरातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रसार यासह इतर प्रकल्पांसाठी आर्थिक पाठबळ दिलं जातं. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास त्या भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिजची स्थापना केली जाते. प्रत्येक विद्यापीठात त्या त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारलं जातं. भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची व्यवस्था केली जाणार. प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाणार.

भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळण्याचे निकष काय?

अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्षे प्राचीन असायला हवी. त्या भाषेतील समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी. ते मूळ त्याच भाषेतील लिहिलेले असावे, अनुवादित नसावे. भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट असावे, अशा सर्वसाधारण अटी आहेत. एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यावर साहित्य अकादमीकडून पुराव्यांची छाननी होते. त्रुटींची पूर्तता झाल्यावर पुरावे योग्य असल्यास केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडे शिफारस केली जाते व मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर केला जातो. मराठी भाषेने हे सर्व निकष पूर्ण केले आहेत.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री आशिष बिवलकर 

बदलापूर – मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “देवीची ओटी…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “देवीची ओटी…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

आज एक मुलगी रेल्वे स्टेशनला ५ रु. मीटरने ताजेतवाने तोरण विकत होती.

बाजूचे सगळे २०/३०रु. ला विकत होते.

मी तिला विचारलं, “सगळे २०/३० रुपयांनी विकत आहेत. तुझा शेवटचा माल शिल्लक राहिला आहे, म्हणून पाच रुपयांनी विकतेस का?”

 

 ती थोडं थांबली व मला म्हणाली,

“दादा, आयुष्यात पहिल्यांदाच रस्त्यावर बसून विकतेय फुलं. बाप नाही. आई निघून गेली. आजी सांभाळते मला.

 सकाळी १००/- रुपये दिले आजीने. डाळ तांदूळ आणायला. विचार केला, म्हातारीला गिफ्ट द्यावं.

म्हणून ट्रेन पकडून इकडे आले दुपारी ३ वाजता. फुलं, दोरा, सुई विकत घेतली. ८०/- रुपये खर्च झाले.

पहिले मी पण वीस रुपयांना विकले.

आजीने दिलेल्या १००/- रुपयांचे ३००/- रुपये केले. आता उरलेली पाच तोरणं विकली गेली, तर ठीक! नाहीतर, घराला बांधीन! पहिली कमाई म्हणून. “

 

मी शांतपणे खिशात हात घातला. १०० रुपये काढून तिला दिले आणि म्हटलं, ” पोरी हे पैसे ठेव, मला तोरण नको. माझ्याकडून तुला तुझ्या मेहनतीचं गिफ्ट. घरी जा. ह्यातील एक तोरण तू दरवाजाला लाव. आणि हो. हे घे अजून ५० रुपये. जाताना तुला अणि आजीला काहीतरी गोड घेऊन जा. “

 

कालच बायको म्हणत होती,

“देवीची ओटी जरा वेगळ्या पद्धतीने भरू. “

आज तिची इच्छा पूर्ण झाली.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मेरी डायरी के पन्ने से # 30 – कच्छ उत्सव – भाग – 1☆ सुश्री ऋता सिंह ☆

सुश्री ऋता सिंह

(सुप्रतिष्ठित साहित्यकार सुश्री ऋता सिंह जी द्वारा ई- अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए अपने यात्रा संस्मरणों पर आधारित आलेख श्रृंखला को स्नेह प्रतिसाद के लिए आभार। आज प्रस्तुत है आपकी डायरी के पन्ने से …  – संस्मरण – कच्छ उत्सव)

? मेरी डायरी के पन्ने से # 30 – कच्छ उत्सव – भाग – 1 ?

(दिसंबर 2017)

रिटायर्ड शिक्षिकाओं का यायावर दल पिछले कई वर्षों से निरंतर अपने बकेट लिस्ट की पसंदीदा स्थानों का भ्रमण करता आ रहा है। हम दस शिक्षिकाएँ हैं और साथ -साथ घूमते हैं। सभी चाहते हैं कि दूर दराज के दर्शनीय स्थानों का भ्रमण शरीर के अधिक थकने और बूढ़े होने से पूर्व ही कर लिए जाए।

कच्छ नहीं देखा तो कुछ नहीं देखा, कुछ समय तो बिताएँ गुजरात में। यह स्लोगन गुजरात के बारे में बहुप्रचलित है। कच्छ के इस उत्सव को रान ऑफ़ कच्छ भी कहा जाता है। इस उत्सव की व्यवस्था गुजरात पर्यटन विभाग द्वारा आयोजित की जाती है। इसे व्हाइट डेजर्ट फ़ेस्टिवल भी कहा जाता है।

यह उत्सव प्रति वर्ष 28 नवंबर से 23 फरवरी तक मनाया जाता है। समस्त संसार से लोग इस उत्सव का आनंद लेने आते हैं और अद्भुत अविस्मरणीय अनुभव लेकर लौटते हैं।

यह उत्सव नगरी अस्थायी नगरी है जो प्रति वर्ष महान थार रेगिस्तान के बीच आयोजित की जाती है। ज़मीन के नाम पर यहाँ की भूमि पर नमक की सफ़ेद परत दिखाई देती है। यह उत्सव शीतकालीन उत्सव है। कच्छ के इस प्रांत का नाम धोरडो है

2017 में कच्छ फेस्टीवल देखने जाने के लिए हमारे यायावर दल ने निश्चय किया और दिसंबर महीने में हम उसके लिए रवाना हुए। हम पुणे के निवासी हैं इसलिए हम पुणे से मुंबई गए।

कच्छ जाने के लिए हमें पहले रेलगाड़ी द्वारा भुज तक यात्रा करनी पड़ी। भुज स्टेशन पर उतरते ही साथ कच्छ उत्सव की गंध हमें स्टेशन के बाहर आते ही मिलने लगी।

स्टेशन के बाहर कच्छ उत्सव गुजरात पर्यटन विभाग का विशाल पोस्टर लगा था और विशाल टेंट में उत्सव के लिए आए हुए लोगों के लिए सुचारु व्यवस्था की गई थी।

पगड़ीधारी, कच्छी वस्त्र पहने हुए लोकल लोगों ने खंभाघणी आओ पधारो कहकर हमारा स्वागत किया। ठंडी के दिन थे, सुबह का समय था, हम थके हुए थे और हमारे सामने गरमागरम मसालेवाली चाय रखी गई। उसकी हमें आवश्यकता भी उस वक्त हो रही थी तो आनंद आया!

भुज से धोरडो कच्छ तक का अंतर 72 किलोमीटर है। स्टेशन से वहाँ तक जाने के लिए बस की व्यवस्था होती है। हम पाँच सखियाँ थीं तो हमने आठ दिनों के लिए एक इनोवा की व्यवस्था रख ली थी। यह गाड़ी हमेशा हमारे साथ रही और हमें घूमने में सुविधा भी रही।

धोरडो में एक विशाल मैदान पर स्वागत के लिए अत्यंत आकर्षक प्रवेश द्वार बना हुआ था। कहते हैं कि प्रतिवर्ष प्रवेश द्वार की डिज़ाइन बदली जाती है। भीतर प्रवेश करते ही आपको दाहिनी ओर कच्छ पद्धति से पगड़ी पहनकर तस्वीर खींचने का आमंत्रण मिलेगा। आप जो भी रकम देना चाहते हैं दे सकते हैं वे आपसे कोई धनराशि की माँग नहीं करते।

स्त्री- पुरुष सभी को पगड़ी पहनाकर पगड़ीवाले गर्व महसूस करते हैं। हम भला क्यों पीछे रहते? हमने भी बाँदनी पगड़ियाँ अलग -अलग स्टाइल में सिर पर बँधवा ली साथ ही कलाकृति वाले महलों के द्वार जैसे फाटक जो फोटो खिंचवाने के लिए ही लगे हुए थे तो हाथ में कभी काठ की तलवार तो कभी बड़ी काठी लेकर फोटो खिंचवाकर आनंद लिए। हम एक बार फिर बचपन के उस दौर में पहुँच गए जहाँ आनंद सर्वोपरि हुआ करता था।

उत्सव के भीतर की सजावट प्रतिवर्ष अलग – अलग होती है। हम जब गए तब एक तरफ टेंट में कच्छी वेश-भूषा में स्त्री -पुरुष की बड़ी मूर्तियाँ दिखाई दीं। सामने सजाया हुआ काठ का बड़ा घोड़ा था और साथ में ताँगा। थोड़ा और आगे बढ़े तो बड़ी- बड़ी कठपुतलियाँ झूलती हुई दिखीं। वे गोटेदार वस्त्रों से सजी थीं।

हमारा सामान लेकर वहाँ की बैटरीगाड़ी हमें निर्धारित टेंट की ओर ले गई।

इस उत्सव के स्थान पर निवास की व्यवस्था टेंटों में ही होती है। विशाल टेंट में कालीन बिछा था जो लोकल बुनकरों द्वारा बनाया होता है। बैठने के लिए रस्सी से बनी दो मचिया थी। निवार से बुने दो खाट जिस पर आरामदायक गद्दे, स्वच्छ चादरें बिछी हुई थीं। साथ में स्नानघर तथा शौचालय की व्यवस्था थी। स्नान करने तथा हाथ मुँह धोने के लिए गरम पानी की भरपूर व्यवस्था थी। एक ड्रेसिंग टेबल भी हर टेंट में रखा गया था ताकि पर्यटक अपने प्रसाधन की सभी वस्तुएँ वहाँ रख सकें। टेंट के भीतर गीले तौलिए रखने के लिए लकड़ी का स्टैंड और दो बड़े और दो छोटे टेबल भी रखे गए थे। हर टेंट में बिजली के बल्ब की व्यवस्था थी। मोबाइल, कैमरा आदि चार्ज करने के लिए काफी सारे चार्जिंग पॉइंट भी थे। यहाँ टेंट की सुख -सुविधाओं को देखकर यह विश्वास करना कठिन था कि वह सब कुछ तीन माह के लिए की गई अस्थायी व्यवस्था थी।

सभी टेंट एक विशाल मैदान के चारों तरफ गोलाकार में लगे हुए थे। कम से कम साठ से सत्तर टेंट तो अवश्य ही थे। आज संभवतः और अधिक हो गए होंगे। मैदान के मध्य भाग में मोटे रंगीन टाटों को जोड़कर विशाल कार्पेट जैसी आकृति देकर बिछा दी गई थी। सब तरफ नमक की मोटी परत होने के कारण यह व्यवस्था थी। मैदान के बीच में एक ऊँचा लैंप संध्या होते ही जल जाता था। ये सारी व्यवस्था आज सोलर सिस्टम पर हो रहा है।

प्रत्येक टेंट के अहाते के मुख्य द्वार पर चार द्वारपाल दिनभर तैनात रहते हैं। पर्यटकों की हर आवश्यकता को वे तुरंत पूरी करते हैं।

टेंट के बाहर निकल आएँ तो पक्की सड़कें बनी हुई हैं। वहाँ पर बैटरी कार भी दिन भर उपलब्ध होती हैं। पूर्णिमा की रात यह परिसर अत्यंत उज्ज्वल और चाँदनी की छटा के कारण और अधिक सुंदर और आकर्षक दिखाई देता है। हम उस सौंदर्य को देखने से वंचित रहे।

टेंट से थोड़ी दूरी पर विशाल डायनिंग हॉल की व्यवस्था थी। यहाँ कच्छ की कलाकृतियों का सुंदर प्रदर्शन था। पर्यटकों के लिए इस स्थान पर तस्वीरें खिंचवाने के लिए भी विशेष आयोजन रखा गया था।

यह डायनिंग हॉल इतना विशाल और फैला हुआ था कि कम से कम एक साथ पाँचसौ लोग भोजन कर सकते थे। आज शायद इस संख्या से अधिक लोगोउअं की व्यवस्था हो गई होगी। एक टेबल और छह कुर्सियों की हर जगह व्यवस्था थी।

भोजन की बात क्या लिखूँ और क्या न लिखूँ! इसके लिए तो आप पाठकों को एक बार इस अतुलनीय स्थान का भ्रमण करना ही चाहिए।

चाहे नाश्ता हो या दोपहर-रात का भोजन, व्यंजन इतने प्रकार के हुआ करते हैं कि एक बार में हर वस्तु का स्वाद लेना कठिन ही हो जाता है। नमकीन के साथ -साथ कई प्रकार के मीठे व्यंजनों की भी व्यवस्था भरपूर मात्रा में होती है। हमारे देश का हर राज्य तो भोजन के लिए सदा ही प्रसिद्ध है फिर भला कच्छ या यों कहें गुजरात कैसे पीछे रहता!

उस डायनिंग हॉल से निकलने पर आपको छोटी – छोटी आर्ट ऍन्ड क्राफ्ट के टेंट दिखेंगे।

आप उनके साथ बैठकर वहाँ की कलाकृतियों को बनते देखने और सीखने का आनंद भी ले सकते हैं।

एक बड़े मैदान पर संध्या के समय मनोरंजन के कार्यक्रम होते हैं। हम सभी रात्रि भोजन के पश्चात उस मंच के पास जाकर बैठे। वहाँ सुंदर बड़े -बड़े झूले भी लगे हुए थे। हम उसी पर बैठे। स्थानीय संगीत, नृत्य, कठपुतली का खेल आदि का आनंद हम सभी पर्यटकों ने लिया। मनोरंजन के ये कार्यक्रम काफी रात तक चलते हैं। सर्दी काफी होती है अतः पर्यटक स्वेटर, शाल, गुलुबंद, ऊनी टोपी अवश्य साथ रखें। कई बार तेज़ हवा की शीत लहरें भी चलती हैं। सभी कार्यक्रम का आनंद लेकर रात के करीब ग्यारह बजे हम अपने टेंट पर लौट आए।

दूसरे दिन सुबह दिन भर हम परिसर का आनंद लेते रहे। परिसर में गुजरात हैंडीक्राफ्ट की प्रदर्शनी थी। बड़ी मात्रा में कच्छ में बननेवाली, बुनकर बनाई जानेवाली वस्तुएँ थीं। गुजरात तो सूती कपड़ों के लिए विख्यात है तो यहाँ बड़ी मात्रा में सभी कुछ देखने, खरीदने का आनंद लिया। काँच लगाई और कढ़ाई की गई चादरें, घाघरा, मेज़ कवर, पर्दे तथा अनेक प्रकार की वस्तुएँ जिससे घर सजाया जा सकता है उन सबका प्रदर्शन था। हम सबने इन वस्तुओं की खूब खरीदारी की क्योंकि हमें ट्रेन से लौटना था और वज़न की सीमा का प्रश्न न था।

शाम के समय हमें ऊँट की गाड़ी पर बिठाकर टेंट से काफी दूर एक ऐसी जगह पर ले गए जहाँ नमक का दलदल था। यह वास्तव में एक विशाल मैदान है। हमसे कहा गया था कि हम थोड़ी दूर तक उस पर चलकर आनंद ले सकते हैं। हम सखियों ने खूब आनंद लिया। हड़बड़ी में मेरा पैर दलदल में फँस गया। बड़ी मुश्किल से पैर निकाला तो नमक और कीचड़ से पैर भर गया। हँसी मज़ाक के क्षण के बीच ऊँट कोचवान मेरे पैर धोने के लिए पानी ले आया। पैर साफ किए बिना गाड़ी पर बैठना कठिन होता।

संध्या होने लगी। हम जब पहुँचे थे तब धूप थी, नमक चमक रहा था। अब हवा में ठंडक आ गई थी। नमक पर से धूप हट गई और वह श्वेत चाँदी की फ़र्श जैसी दिखने लगी। दूर से देखने पर ऐसा लगता मानो बर्फ की परतें पड़ी हों।

यहाँ यह बता दें कि यह नमकवाला हिस्सा बेकार पड़ा था। हमारे देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी जब गुजरात के मुख्य मंत्री थे तब उन्होंने कच्छियों को इस जगह का उपयोग कर उत्सव मनाने का कार्यक्रम बनाया था। अब तो यहाँ विदेश से भी लाखों लोग आते हैं।

टेंट में लौटते समय ऊँटवालों ने दौड़ की स्पर्धा लगा दी। यह स्थान रेत और नमकवाली है, ऊँट अपने गद्देदार पैरों के कारण आसानी से दौड़ सकते हैं। कुछ समय के लिए खूब शोर होता रहा। इस स्पर्धा के दौरान हम पर्यटकों से अधिक गाड़ीवान आनंद ले रहे थे क्योंकि यह स्पर्धा तो उनके लिए मनोरंजन का ज़रिया था। हम सब ऊँट गाड़ी पर हिचकोले खाते रहे। फिर शाम ढलते हम सब अपने टेंट पर लौट आए।

क्रमशः… 

© सुश्री ऋता सिंह

फोन नं 9822188517

ईमेल आई डी – ritanani[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “विस्मरणात चाललेला ठेवा – हादगा” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलु साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

🌸 विविधा 🌸 

☆ “विस्मरणात चाललेला ठेवा – हादगा” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलु साबणे जोशी ☆

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला पितृपक्षांमध्ये कुठलेही सणवार असत नाहीत, अशा वेळेला ठिकठिकाणीच्या मुलींना उत्साह भरतो तो हादग्याचा.

कॅलेंडरमध्ये सूर्याचा हस्तनक्षत्र प्रवेश दिला असेल, त्याच दिवशी हादगा सुरू. अनेक नारीकर्तृक व्रताप्रमाणे याचेसुद्धा इतके पाठभेद आहेत की, मुळात व्रतराज ग्रंथात ‘हस्ती गौरी व्रत’ या नावाने दिलेल्या व्रताचे मूळ विधान बाजूला पडून वेगवेगळ्या रीती प्रचलित झाल्या आहेत. त्यातूनच विदर्भात ‘भुलाबाई’, मध्य महाराष्ट्रात ‘भोंडला’, कर्नाटकात ‘गजगौरी’ आणि पश्चिम महाराष्ट्रात ‘हादगा’ या नावाने हा खेळ होतो.

याच्यामध्ये मूळ ग्रंथात दिलेले विधान बघितलं तर ते असं आहे – कोणे एके काळी गौरी स्वप्नामध्ये शिवमूर्ति दग्ध झालेली पाहते आणि साहजिकच शंकरांना त्याचा परिहार किंवा कारण विचारताच शंकर सांगतात, ‘मध्यान्ह काळी घेतलेल्या निद्रेमुळे तुला असे विचित्र स्वप्न पडले. तेव्हा आता सूर्य हस्तनक्षत्रात असताना तेरा दिवस तू ऐरावतावर आपल्या दोघांसह गणेशाची प्रतिमा स्थापन कर आणि त्याची तेरा दिवस पूजा करून तेरा वर्षांनी त्या व्रताचे उद्यापन कर. ‘ पुढे भगवान श्रीकृष्णांनी कुंतीच्या इच्छेवरून तिला हे व्रत आणि कथा सांगितली. नेमकं त्याच वेळेला गांधारीने देखील हे व्रत ऐकले होते. मूळ कथेत पार्वती शंकरांना विचारते, ‘आपण मला सोन्याचा गणपती ईश्वर पार्वती – सोन्याच्या हत्तीवर बसवायला सांगितले आहे, पण जर समजा सुवर्णाची मूर्ति करणे शक्य नसेल, तर काय करावे अशा वेळेला?’ शंकर तिला म्हणतात, ‘सोन्याची शक्य नसेल, तर मातीची कर. ‘ या पर्यायाप्रमाणे गांधारी कौरवांना सांगून गंगाकिनाऱ्याची माती आणायला सांगते. हे बघून कुंतीला दुःख होते. गांधारीचे इतके पुत्र तिच्या व्रताचा मनोरथ सहज पूर्ण करतील हा विचार तिच्या मनात येताच अर्जुनाने आईच्या मनातले शल्य ओळखले. तो स्वतः गंगाकिनारी गेला आणि उमा महेश्वराचे तप करून शंकरांनाच विनंती केली की, ‘आपण ऐरावतावर बसून येऊन माझ्या आईची व्रतपूजा स्वीकार करावी. ‘ व्रताच्या प्रभावाने कुंतीच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या पुत्रांना जय, यश, लाभ, सगळ्याची प्राप्ती झाली. असं हे व्रत तेरा वर्षं, तेरा तेरा दिवसांसाठी करून चौदाव्या वर्षी याचे उद्यापन करावे, असे विधान व्रतराज ग्रंथात आहेत.

विदर्भातली भुलाबाई, मध्य महाराष्ट्रातला भोंडला याविषयी मला अधिक सविस्तर माहिती नाही. पण हादगा म्हटलं की शाळेतल्या आठवणी जाग्या होतात. काल या लेखासाठी हादग्याचे चित्र शोधायला एका ठिकाणी गेलो. एरवी सगळं काही मिळणारे त्या दुकानात हादग्याचे चित्र मागितल्यावर त्या दुकानाच्या वृद्ध मालकीणीनं सांगितलं, ‘हल्ली आम्ही हादग्याचे चित्र ठेवत नाही. कारण किमान २५ कागद घ्यावे लागतात आणि तेवढे खपत नाहीत. म्हणून आम्ही हादग्याचे चित्र ठेवत नाही. ‘ हे ऐकल्यावर आणखीनच वाईट वाटलं, कारण साधारणपणे शाळेत असताना हादगा सुरू झाला की, प्रत्येक वर्गात एकेक चित्र तगडाला चिकटवून अडकवले जायचे, घरीसुद्धा बहीण, तिच्या मैत्रिणी आपापल्या घरी हादगा बसवायच्या. १६ दिवस कोणी खिरापत आणायची, कुणी माळ आणायची याचे क्रम ठरायचे. १६ माळा, सोळा प्रकारच्या असाव्यात, याकडे मुलींचं जातीने लक्ष असायचं. भिजवलेल्या गव्हाची माळ, फुलाची माळ, चिरमुऱ्याची माळ, रामाच्या पावलांची म्हणजे पारिजाताच्या बियांची, सोळा फळांची, १६ प्रकारच्या फुलांची अशा अनेक माळा हादग्याला चढवल्या जायच्या. रोज साधारणपणे तिसऱ्या प्रहरी म्हणजे जेवणाच्या सुट्टीनंतर दोन तास उलटून गेले की साधारणपणे चार वाजण्याच्या सुमाराला वर्गात फक्त मुलं शिल्लक राहायची. बाकी सगळ्या मुली एका पाटीवर हत्तीचे चित्र काढून तो हत्ती मध्ये ठेवायच्या. प्रत्येकीने आणलेली खिरापत तिथे ठेवलेली असायची. आमच्या शाळेत मुलांना देखील खिरापत आणायला परवानगी होती. खिरापतीचे डबे, फुलांनी सजवलेल्या हत्तीचे चित्र मध्ये ठेवलं की, हादग्याची गाणी सुरु व्हायची. पहिल्या दिवशी एक या क्रमाने गाणी वाढत जाऊन सोळाव्या दिवशी सोळा अशी गाणी असायची.

ही गाणी सुद्धा मराठीचा एक ठेवाच म्हणावी लागतील. ऐलमा पैलमा हे पारंपारिक पहिलं गाणं. गणपतीला ‘माझा खेळ मांडू दे’ म्हणून विनंती झाली की, तिथून पुढे गाण्यांच्या प्रकाराला मर्यादा नसायची. मग पारंपारिक सासुरवासाची निंदा, माहेरचं कौतुक, देवांचे वैभव असं वर्णन करणारी अनेक गाणी गायली जायची. ‘त्यातलं उरलं एवढंसंसं पीठ’ असं म्हणत पाककृतीची गाणी असायची. कधी ‘अक्कण माती चिक्कण माती’ म्हणत दळलेल्या रव्याच्या करंज्या – पालखीतनं माहेरी धाडल्या जायच्या, तर कधी ‘कोणा वेड्याच्या बायकोला वेड्याने कसं जिवंत जाळलं’ याची हसता हसता डोळ्यात पाणी आणणारी कथा गायली जायची. आडलिंबू ताडलिंबू म्हणताना फेर धरणाऱ्या प्रत्येकीच्या भावाचं नाव घेतलं जायचं. तर ‘आज कोण वार बाई’ म्हणून वाराच्या सगळ्या देवांना नमस्कार केला जायचा. वेळ कमी असेल तर ‘आड बाई आडोणी, आडाचं पाणी काढोणी’, याच्यापुढे ‘आडात होती देवळी, देवळीत होता… ‘ नंतर एक एक शब्द जुळवून ‘आमचा हादगा… ‘ असं गाणं संपवलं जायचं. त्याला एक गाणं मोजलं जायचं. उदाहरणार्थ, ‘आडात होती देवळी, देवळीत होता शिंपला, आमचा हादगा संपला’, हे शेवटचं गाणं. मग त्यात अगदी साबण-बामण, खराटा-मराठा अशी यमकं जुळवून सुद्धा कडवी जोडली जायची. हे म्हणताना कोणाला वाईट वाटणं, कोणी दुखावलं जाणं, वगैरे प्रकार काही नाहीत. पण ‘शिंपला’ म्हटलं मात्र की, आनंद व्हायचा, कारण आता पुढचा प्रकार असायचा तो खिरापत ओळखण्याचा. मग एकेका पदार्थांची नावे घेणे आणि डब्यातून वास येतो का, हाताला गरम लागतं का, वगैरे खिरापत ओळखण्याचा प्रकार व्हायचा. हे सगळं करताना आपली खिरापत ओळखली जाऊ नये यासाठी खिरापत आणणाऱ्याचा फार अट्टाहास असायचा. विशेष म्हणजे त्या काळातल्या आयांना अशी न ओळखणारी खिरापत करून देणे हे सुद्धा एक प्रेस्टीजच वाटायचं. कारण तो त्या आईच्या पाककलेच्या सन्मानाचा विषय असायचा. सोळा दिवस झाले की, सोळाव्या दिवशी हादग्याची बोळवण असायची. भिंतीवर लावलेलं हादग्याचे चित्र (हे सुद्धा एक गमतीचाच भाग आहे – कोल्हापुरात दगडू बाळा भोसलेंच्या दुकानात ही चित्रं मिळतात. त्या चित्रांमध्ये दोन बाजूला दोन हत्ती, त्याच्यावर बसलेले माहुत, माहुताच्या मागे अंबारी, अंबारीत राजा राणी म्हणजे गौरीशंकर, तेही मराठी शाही थाटात, त्यांच्या मागे चवऱ्या मोर्चेल घेतलेले दोन सेवक, अंबारीला धरून उडणाऱ्या देवकन्या म्हणजे पऱ्या, दोन्ही हत्तींच्या मध्ये फुगडी घालणाऱ्या दोन स्त्रिया, त्यांच्या हातावर कुंडीत उगवलेलं उंच फुलाचे झाड आणि त्या झाडावर बसलेली दोन माकडं, विशेष म्हणजे दोन्ही हत्तींच्या पायामधे बसलेले सिंह. मला वाटते गांधारीच्या मातीच्या हत्तीचे आणि कुंतीच्या प्रत्यक्ष शिवपार्वतीचे ते दोघेही प्रतीक असावेत, कारण त्या दोन्ही हत्तीत काहीही फरक असत नाही, असं ते चित्र!) उचलून माळा, फुलांसह जवळच्या ओढ्याला पाण्याला विसर्जित करण्यासाठी नेले जायचे. तिथे गेलं की पुन्हा फेर धरला जायचा. आज सगळ्यांनीच खिरापत आणायची असे. ती ओळखायची नाही, तर गोपाळकाल्यासारखी प्रत्येकाच्यातली थोडी थोडी वाटून घ्यायची असं झालं की, हादगा विसर्जीत करायचा. आमच्या इथल्या एक काकू पोरींना आठवण करायच्या, “हादगा लवकर बोळवा गं. त्याला दिवाळी दाखवू नये. नाही तर पाऊस दिवाळीपर्यंत थांबतो. “

हस्त नक्षत्रावर पडणारा पाऊस हा हत्तीच्या सोंडेतून पडणाऱ्या पाण्यासारखा कमी वेळात धुंवाधार. हा पाऊस पाणी पाणी करून टाकतो. म्हणूनच हा हत्ती बसला की बसतो अशी समजूत आहे. तो जर नवरात्राच्या पहिल्या माळेला पडला तर वातीत सापडला, किंवा माळेत सापडला, असं म्हटलं जातं. म्हणजे तो नऊही दिवस पडणार अशी अटकळ बांधली जाते.

असा साध्याभोळ्या पोरींचा आणि न ओळखणारी खिरापत हे एक चॅलेंज मानणाऱ्या आयांचा सण म्हणजे ‘हादगा’. कालौघात पोरीबाळी शाळा, क्लास, एक्स्ट्रॉ करिक्युलम यामध्ये बिझी झाल्या आणि हादग्याचं प्रस्थ शाळेतूनही हद्दपार झाले. आता कुठे तरी एखादी संस्था, एक कल्चरल ॲक्टिव्हिटी म्हणून एखाद् दिवसाचा हादगा घेते आणि तिथे पोळीबाळी नटून थटून जाऊन रेकॉर्डेड गाणी म्हणतात. ‘कालाय तस्मै नमः’, दुसरे काय?

॥श्री मातृचरणारविंदस्य दास प्रसन्नसशक्तिकः॥

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ससा आणि कासव — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ससा आणि कासव — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

खेड्यातली ती शाळा.. कोणत्यातरी जुन्या वाड्यात भरणारी.. पहिली ते चौथी सगळे वर्ग एकाच मोठ्या हॉल मध्ये एका गुरुजींच्या अधिकारात चालणारे..

नशिबाने त्या वर्षी शाळेला स्त्री शिक्षिका मिळाल्या आणि मुलींना वेगळा वर्ग मिळाला.. मोठ्या छान होत्या जोशी बाई.. शहरातून इतक्या दूर खेड्यात बदली होऊन येणं त्यांना सोपं गेलं नसणार पण त्या हसतमुख राहून आपली नोकरी करत. बाई आल्यावर शाळा सातवी पर्यंत वाढली.. वर्गात बहुतेक मुली मध्यमवर्गीय असत त्या काळी..

संजीवनी अशीच गरीब कुटुंबातून आलेली.. घरी अठरा विश्वे दारिद्रय आणि घरी बरीच माणसं.. वर्गात संजीवनी मागेच बसायची. , नाहीत धड कपडे, नाहीत पुस्तकं नीट की वह्या नाहीत.. बरं अभ्यासात तरी कुठे हुशार होती ती? बाई सांगून थकत पण हिच्या डोक्यात शिरेल तर शप्पथ…. गबाळी, चेहऱ्यावर लाचार हसू आणि वर्गात सगळे हिडीस फिडीस करत ते ऐकूनही ही कधी चिडली नाही.. कधी डबा असायचा तर कधी मधल्या सुट्टीत काहीच आणायची नाही.. मुलींनी दिलं की म्हणायची “नको ग.. उपास आहे आज माझा.. ” संजीवनी दिसायला मात्र सुरेख.. गोरी घारी उंच पण घरच्या दारिद्र्याने हडकलेली.. वर्गातल्या मुली तिच्याशी मैत्री करायला अजिबात उत्सुक नसत पण बिचारी संजीवनी लोचट सारखी जाई त्यांच्या मागे मागे.. “ ए मला घ्या ना ग तुमच्यात खेळायला… मी येऊ का? ” पण हजार वेळा विचारूनही त्या हिला कधीही बोलावत नसत..

वर्गातली कुमुद मात्र अतिशय हुशार.. सतत वर्गात पहिली.. कुमुदला देवाने सढळ हाताने सगळं काही दिलं होतं. सुंदर रूप, घरची श्रीमंती. आणि बुद्धीही तितकीच चांगली.. शाळेत बाई सुद्धा कुमुदच्या कौतुकात कमी पडत नसत..

संजीवनी जुन्यापान्या पुस्तकांवरून अभ्यास करून पुढच्या वर्गात जायची.. आणि एखाद्या सम्राज्ञीसारखी कुमुद डौलात येऊन सर्वच्या सर्व बक्षिसे घेऊन जात असे.

संजीवनीची आई गरिबीने गांजून गेलेली होती.. एकदा संजीवनीची मावशी गावाला आली बहिणीला भेटायला. आपल्या बहिणीचं ते अठरा विश्वे दारिद्र्य तो पोरवडा, ते निष्क्रिय मेव्हणे बघून हादरूनच गेली ललिता, संजीवनीची मावशी..

”अग काय हा संसार तुझा उषा? काय हे?कोणत्या काळात रहाताय तुम्ही? पाच मुली?”

उषा ओशाळवाणे हसत म्हणाली…. ”अग ललिता, मुलगा नको का वंशाला? ”

ललिताने कपाळावर हात मारून घेतला..

”लले, तुझं बरंय एकच मुलगा आणि थांबलीस.. ”

“उषा, काही अक्कल नाही तुला. कसला दिवा अन काय.. ते जाऊ दे. ही संजू मला आल्या दिवसापासून चिकटली आहे.. किती ग गोड आहे पोरगी.. नेऊ का मी हिला मुंबईला ? मी तिला छान शाळेत घालेन शिकवेन.. येतेस संजू माझ्या बरोबर?” ललिताने संजूला विचारले..

उषा म्हणाली, ” ने खुशाल. नाहीतरी तिला इथलं काहीही आवडत नाहीच. सदा तोंड फुगवून बसते आणि घर घाण, अस्वच्छ अशी नावे ठेवते. ”

”मावशी, मी खरंच येऊ तुझ्याबरोबर? मी चांगली वागेन तिकडे. तुला त्रास नाही देणार आणि खूप शिकून मोठी होईन मावशी.. या घरात मला अभ्यास करायलाही वेळ होत नाही ग.. सगळं समजतं मला शाळेत ग, पण कधी नीट वही नाही की पुस्तकं नाहीत. कसा करू मी अभ्यास? बाईना वाटतं मी मठ्ठ आहे. ” संजूच्या डोळ्यात पाणी आलं.. मावशीने तिला जवळ घेतलं.

”संजू चल तू माझ्याबरोबर मुंबईला. नक्की नीट रहाशील ना? मी सारखी सारखी नाही हं तुला गावाला पाठवणार.. मलाही नोकरी आहे तिकडे ग.. ”

संजू म्हणाली, ” नाही ग मावशी.. मी येते तुझ्या बरोबर.. ” आत्ता नाही, पण जून मध्ये येईन मी तुला न्यायला. उषे निदान तिच्या शाळेचा दाखला तरी काढून ठेव.. तेवढं तरी कर आई म्हणून. ” ललिता रागाने म्हणाली.. “मावशी, नक्की येशील ना? मी तुला अपयश देणार नाही. पण मला नेच ग इथून.. ” संजूच्या डोळ्यात पाणी आलं. ”ललिता म्हणाली नक्की नेईन मी तुला बाळा.. ” 

त्या जून मध्ये ललिता संजूला घेऊन मुंबईला गेली.. आयुष्यात पहिल्यांदाच गाडीत बसली संजू.. त्यातल्या त्यात चांगला फ्रॉक नीटनेटक्या लांब केसांच्या वेण्या.. मावशीला गहिवरून आलं.. प्रेमाने तिने संजूच्या डोक्यावरून हात फिरवला..

मावशीची कार मुंबईत शिरली. संजूचे डोळेच फिरले ती गर्दी, त्या मोठमोठ्या इमारती, तो झगझगाट बघून.. मावशीचा छान फ्लॅट होता शिवाजी पार्कला..

संजू घरात आली.. ” अय्या, मावशी, किती छान ग फ्लॅट तुझा. पण आमच्या गावाच्या घरापेक्षा लहान आहे ना?” मावशी तिचे मिस्टर आणि ललिताचा मुलगा कुमार हसायला लागले.

कुमार म्हणाला, “आता विसरायचं बरं का ते तुझं खेडं.. ही मुंबई आहे संजू.. ” संजू लाजली. ”. मावशी मला दाखव ना स्वयंपाकघर.. मी चहा करू का?” 

संजूने सुंदर चहा केला.. पटापट कपबश्या धुतल्या.. ”मावशी इथे मला सगळं भातुकली सारखं वाटतंय गं.. कित्ती आटोपशीर सगळं.. ” संजू बाल्कनीत उभी राहिली. आठव्या मजल्यावरून छोटी दिसणारी मुंबई ती भान हरपून बघत होती.. मावशीने तिला जवळच्या चांगल्या शाळेत घातले.

संजू नवी पुस्तके वह्या सॅक बघून हरखून गेली. नवीन कोरा युनिफॉर्म बघून तिला रडू आलं.. ललिताने तिला जवळ घेतलं..

”मन लावून शीक संजू. “म्हणाली मावशी..

संजू मुंबईत लवकरच रुळून गेली. तिला शाळेत चांगले मार्क्स मिळायला लागले.. बघता बघता संजू पक्की मुंबईकर झाली.. पूर्वीची खेडवळ संजू नाहीशी झाली.. मुळात सुंदर असलेल्या संजूवर आरोग्याची नवी झळाळी चढली.. संजू चांगले मार्क्स मिळवून बारावी झाली आणि त्या उत्तम मार्क्सवर तिला मायक्रोबायॉलॉजी ला प्रवेश मिळाला..

मावशीला किती मदत होत असे संजूची.. सकाळी लवकर उठून संजू सगळी कामे पटापट करून टाकी.. मग येत पोळ्याच्या मावशी.. , संजू सकाळी भाजी करून टाकी आणि सगळे आपापले डबे घेऊन निघून जात.. संजू कॉलेजमधून आली की संध्याकाळी छानसं खायला करी.. किती गुणी होती संजू..

मावशीच्या मनात येई, हे रत्न तिकडे त्या खेड्यात असंच झाकोळून गेलं असतं..

त्या दिवशी ललिताचा पुतण्या अचानक भेटायला आला. सुबोध मर्चंट नेव्हीमध्ये होता.. यावेळी सहा महिन्यांनी तो मुंबईला बोटीवरून उतरला होता.. काका काकूंच्या घरी चार दिवस रहावे आणि मग जावे आपल्या आईबाबांकडे पुण्याला असा बेत होता त्याचा..

अचानक कॉलेज मधून आलेली संजू त्याला दिसली.. ललिताने ओळख करून दिली. ही माझी भाची संजीवनी. आणि हा सुबोध माझा पुतण्या.. ” सुबोथ या सुंदर मुलीकडे बघतच राहिला..

सुबोध आता जवळजवळ तीस एकतीस वर्षाचा झाला पण त्याने अजून लग्नच नव्हते केले.. चार दिवस राहून सुबोथ पुण्याला निघून गेला..

संजूने निरागसपणे विचारलं, ” हे दादा कुठे नोकरी करतात? बोटीवर काय काम करतात ते?” कुमार हसला आणि तिला सगळं समजावून सांगितलं..

दर वेळी परस्पर बोटीवर जाणारा सुबोध यावेळी पुन्हा काकांकडे आला…. दरम्यान संजू एमेस्सी झाली.. तिला एका हॉस्पिटलमध्ये मायक्रोबायॉलॉजिस्ट म्हणून चांगली नोकरी मिळाली..

कोकणच्या खेडेगावच्या सुरवंटाचं सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरू झालं.. संजूची नोकरी सुरू झाली. पहिला पगार होताच तिने काका मावशी आणि कुमारला हॉल मध्ये बोलावलं..

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – १४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – १४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

गणपती १”

आमच्या घरी तांदुळाचा गणपती असे. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रभात समयी सुस्नात होऊन पप्पा सुंदर, जांभळ्या रंगाचा कद नेसून गणपती पूजनासाठी बसत. एका गोष्टीचं मला नेहमी आश्चर्य वाटायचं ते म्हणजे पप्पांच्या व्यक्तिमत्त्वात आढळणाऱ्या विसंगतीचं. कर्मकांडं, पूजाअर्चा यावर पप्पांचा विश्वास नव्हता की ते त्यावर विसंबूनच नव्हते हे मला कळलं नाही पण गणपती म्हणजे बुद्धी देवता, विद्येची आराध्यदेवता. बाकी गणपतीची विघ्नहर्ता, सुखकर्ता वगैरे विशेषणे कदाचित पप्पांसाठी म्हणजे त्यांच्या वैचारिक बैठकीसाठी तितकीशी महत्त्वाची नसतील पण विद्येची देवता म्हणून गणपती या दैवता विषयी त्यांना अपरंपार प्रेम होतं आणि त्याच भावनेतून आमच्या घरी गणपती पूजन फार सुंदर पद्धतीने होत असे.

आई चौरंगाखाली सुरेख रांगोळी रेखायची आणि सागवानी पाटावर बसून चौरंगावर तांदूळ पसरून पप्पा त्यातून सोंडवाला, मुकुटधारी, लंबोदर, चतुर्भुज गणेश साकारत. पायाशी तांदळाचा मूषक, भोवती झेंडूच्या गेंदेदार फुलांची चौकट, कापूर उदबत्तीचा सुवास आणि आम्ही सगळेजण पप्पांच्या डाव्या उजव्या हाताशी मनोभावे हात जोडून, त्यांच्या सुरेल स्वरात गायलेली गणपतीची कहाणी ऐकत असू.

।। सिद्धगणेश सिद्धंकार
मनीच्छले मोत्येहार
सोन्याची काडी रुप्याची माडी
तेथे सिद्धगणेश राज्य करी
राजामागे राज
राणीमागे सौभाग
निपुत्राला पुत्र
आंधळ्याला नेत्र
त्यांनी वाहिली सोन्याची काडी
आम्ही वाहू दुर्वांची पत्री
त्यांना प्रसन्न झालात
तसे आम्हाला व्हा ।।

तीन पदरी सूत्रात एकेक दुर्वांची जुडी गुंफत २१ वेळा पप्पा ही कहाणी सांगत आणि मग २१ दुर्वांच्या जुडीची ही माळ गणपतीला वाहत.

त्यानंतर आरती, “घालीन लोटांगण” “मंत्रपुष्पांजली” आणि डोळे मिटून, नाकावर हात ठेवून, प्रणव मुद्रेत अर्पण केलेला पांढराशुभ्र, कळीदार २१ मोदकांचा, चांदीच्या ताटातला सुरेख सुगंधी नैवेद्य !

ॐ प्राणाय स्वाहा
ॐ अपानाय स्वाहा
ॐ उदानाय स्वाहा
ॐ व्यानाय स्वाहा
ॐ ओम समानाय स्वाहा
ॐ ब्रह्मणे नमः

अशा रितीने गणपती पूजन झाल्यानंतर मनाला अतिशय प्रसन्नता जाणवायची. कापूर, उदबत्तीच्या सुगंधात, सुग्रास स्वयंपाकाच्या मधुर वासात घर दरवळलेलं असायचं.

खरं म्हणजे आमची संपूर्ण गल्लीच गणेशमय झालेली असायची. घरोघरी यथाशक्ती, यथामती गणपतीची प्रतिष्ठापना व्हायची. सण सोहळ्यातला सामुदायिक आनंद, सार्वजनिकतेचं महत्त्व आम्ही लहानपणी खऱ्या अर्थाने अनुभवलं असं म्हणायला हरकत नाही. गल्लीत गजाचा गणपती, सलाग्र्यांचा गणपती, दिघ्यांचा गणपती जसा मूर्ती सजावटीसाठी प्रसिद्ध होता तसाच मुल्हेरकरांचा गणपती म्हणजे आम्हाला आमच्याच घरचा गणपती वाटायचा. अगदी तेव्हापासून आजपर्यंत. मुल्हेरकरांच्या गणपती सजावटीत आम्हा सर्व सवंगड्यांचा हातभार लागायचा पण या कार्यक्रमातला प्रमुख अध्यक्ष म्हणजे दिलीप मुल्हेरकर. दिलीप हा सर्वच बाबतीत गल्लीतला एक अनभिषिक्त लीडर होताच. तो एक उत्तम कलाकार होता, उत्तम क्रीडापटू होता. क्रिकेट कसे खेळावे ते आम्ही त्याच्याकडूनच शिकायचो. तो जितका संवेदनशील होता तितकाच तापट होता. खरं म्हणजे माझ्यापेक्षा तो लहान होता पण कलेच्या क्षेत्रात सगळ्यांनीच त्याचे मोठेपण मान्य केले होते त्यामुळे गणपती सजावटीसाठी लागणाऱ्या सामानापासून ते मखर बनवण्यापर्यंत तो जे जे सांगेल ते ते आम्ही त्याला मदत म्हणून, गंमत म्हणून करायचो.

टेबलावर छानसा रेशमाने भरलेला टेबलक्लॉथ टाकायचा, त्याच्या चारी बाजू कलात्मक रित्या दुमडून त्यावर बनवलेलं पुट्ठ्यांचं, रंगीत चकाकणार्‍या पेपर वेष्टनातलं, टिकल्यांनी सजवलेलं मस्त मखर ठेवायचं. मागे, बाजूला दिव्यांच्या माळा, फुलांच्या माळा सोडायच्या. खरं म्हणजे गणपतीच्या मखराच्या या तयारी पासूनच आमच्या अंगात गणेशोत्सवाचा उत्साह भरायचा. मग सकाळी टाळ, झांजा घेऊन आग्यारी लेनमध्ये एका तात्पुरत्या मंडपात विक्रीसाठी मांडलेल्या, कोकणातल्याच एका खास मूर्तिकाराकडची (मला त्यांचं नाव आता आठवत नाही) सुंदर, मध्यम आकाराची देखणी, प्रसन्न गणेशाची मंगलमूर्ती— आम्ही त्यावर विणलेला एखादा रुमाल टाकून घरी घेवून येत असू. दिलीप, चित्रा, संध्या, बेबी, सुरेश, अशोक, बंडू आणि आमचा गल्लीतला बालचमू मिळून गणपतीची थाटात मिरवणूक असायची. गणेश आगमनाच्या स्वागताची मिरवणूक. पुन्हा चालताना….

पायी हळूहळू चाला
मुखाने मोरया बोला…

गणपती बाप्पा मोरया… अशी झांजा वाजवत ही आनंद गीते मुक्तपणे गात आम्ही आमच्या या आवडत्या गणेश पाहुण्याला घरी आणत असू. उंबरठ्यात ओवाळायचे, चारी दिशांना पाणी सोडायचे, गुळखोबरं ओवाळून नजर उतरवायची आणि मखरात बसवायचे. एखाद्या विमानतळावरून नाही का आपण आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला रिसिव्ह करत ? अगदी तीच भावना आमच्या मनी या गजाननासाठी असायची.

आमचा स्वतःचा घरचा गणपती दीड दिवसाचा असायचा. त्यानंतर गौरीपूजन मात्र असायचे पण मुल्हेरकरांच्या गणपतीचे विसर्जन गौरीबरोबर व्हायचे म्हणजे कधी पाच दिवस तर कधी सात दिवस. आरत्यांचा गजर चालायचा, जवळजवळ गल्लीत सगळ्यांच्याच घरी आम्ही आरतीला जात असू आणि सहजपणेच प्रत्येक घरी आरतीच्या वेळाही ठरत.

मुल्हेरकरांकडे गायलेल्या आरत्या आजही माझ्या कानात आहेत. दिलीप तबला, ढोल, पेटीची व्यवस्था करायचा.

येई हो विठ्ठले माझे माऊली ये म्हणताना लागलेला सूर आत मध्ये काहीतरी उचंबळून टाकायचा.

रखमाई वल्लभ्भा राईच्या वल्लभ्भा म्हणताना पडलेली ती तबल्यावरची थाप कशी वर्णन करू ? आणि दशावताराची आरती म्हणताना तर कंठ भरून जायचा.

रसातळाशी जाता पृथ्वी पाठीवर घेसी
परोपकारासाठी देवा कासव झालासी
देवा कासव झालासी

शब्दाशब्दांचा सूर लांबून केलेला उच्चार आणि पेटीच्या संगतीत म्हटलेल्या त्या सुरेख आरत्या म्हणजे आमच्या जडणघडणीच्या काळातली संस्कार शक्तीपीठे होती.
हरे राम हरे राम राम हरे हरे हे गतिशील नामस्मरण, तितक्याच गतीत वाजत असलेले टाळ आणि झांजा, हे म्हणत असताना स्वतःभोवती मारलेल्या प्रदक्षिणा आणि समोरच्या मखरातील, तबकातल्या निरांजनाच्या प्रकाशात उजळलेली ती हास्यवदना, प्रसन्नदायी, मंगलमूर्ती आजही अंतरीच्या कप्प्यात पावित्र्य आणि मांगल्य घेऊन स्थिरावलेली आहे.

मंत्रपुष्पांजलीने आरतीची सांगता व्हायची, हातात पुष्प पाकळ्या घेऊन, डोळे मिटवून पप्पा सूर लावायचे..

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि.. … त्या एकेका मंत्रोच्चारातला दिव्यपणा कळत नसला तरी जाणवायचा नक्कीच.

आवर्जून सांगते की आमच्या गल्लीत काही मुस्लीम परिवार होते. शरीपा, ईसाक, अब्दुल, बटुबाई, आरतीला भक्तीभावाने हजर रहात. प्रसादभक्षण करत. आमचा गणपती असा सर्वधर्मपरायणी होता.

खरोखरच दरवर्षी येणाऱ्या या दहा दिवसाच्या लाडक्या पाहुण्यांनी नकळत जीवनातली सत्त्वबीजे आमच्यात नक्कीच पेरली. गल्लीतला गजाचा गणपती रात्री बाल्याच्या नृत्याने रंगायचा मध्ये ढोलकी वादक बसलेला असायचा. गायकही असायचा आणि सभोवताली गोलाकार नृत्य करणारे कलाकार असत. त्यांच्या उजव्या पायात चाळ बांधलेले असत आणि *गणा धाव रे गणा पावरे* अशी गणरायाची आळवणी करून नाचायला सुरुवात व्हायची. या नृत्यात काही वैविध्य, सौंदर्य नसायचं. गाणाराही बऱ्याच वेळा भसाड्या आवाजात गायचा.

चांगला ठकडा ठरलाय गो
सोळा सहस्त्र भोगून नारी
ब्रह्मचारी ठरला ग …

असे काही शब्द त्या गाण्यात असायचे. पण या नृत्यातला ठेका आणि लय एक प्रकारे मनात बसायची. नाचणार्‍यांत एकसंधपणा असायचा. पावलांच्या गतीत एक मेळ असायचा आणि एक प्रकारची लोक संस्कृती, लोकसाहित्य या रुपातून रस्त्यावर अवतरायचं आणि त्यातलं भारीपण कुठेतरी जाणवायचं.

तर असा हा आमचा आठवणीतला गणपती. दरवर्षी भाद्रपद महिन्यात चतुर्थीला येतच असतो पण माझ्या मनातला आजचा आणि तेव्हाचा गणपती वेगळ्या रुपात असतो आणि हो एक गंमत सांगायची राहिली. गणेश चतुर्थीच्या दिवशी “चंद्र पहायचा नाही. पाहिला तर चोरीचा आळ येतो” हे भय बालमनावर इतकं ठासून ठेवलेलं होतं की एक तर त्या दिवशी रात्री बाहेर पडायचंच नाही, नाहीतर रस्त्यात खाली मान घालून चालायचं. कुणीतरी वात्रटपणे म्हणायचे (बहुतेक वेळा ती व्यक्ती मीच असायचे. ) ”ते बघ काय वरती ?” आणि पटकन सगळ्यांनाच वर आकाशात बघायला व्हायचं आणि नेमकी सुंदर चतुर्थीची चंद्रकोर वाकुल्या दाखवत नजरेसमोर यायची पण खरोखरच या दर्शनाने चोरीचे आळ आले का ? कोण जाणे ! पण पुढे आयुष्य जगत असताना ज्या नाना प्रकारच्या ठेचा लागल्या, विनाकारण दोषही लागले, स्वतःचा चांगुलपणा गैरसमजुतीमुळे काळवंडला गेला त्याला हेच कारण असेल का ? गणेश चतुर्थीच्या दिवशी घेतलेले चंद्रदर्शन…?

माहीत नाही. पण या गणरायाने एक समर्थ मन मात्र घडवलं.

— क्रमश: भाग १४  

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फजान…. लेखक – डॉ. शिरीष भावे ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ फजान…. लेखक – डॉ. शिरीष भावे ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

नॅशनल जिओग्राफिक वाहिनीवरचे माहितीपूर्ण लघुपट पाहणे हा माझा फावल्या वेळातला आवडता छंद. असाच एक लघुपट, थायलंडमधल्या हत्तींच्या प्रशिक्षण केंद्रावर आधारित, मी पाहत होतो. जंगली हत्तींना माणसाळावून त्यांचा वापर करणे ही एक अमानुष प्रक्रिया आहे. पर्यटकांना जंगलातून पाठीवर बसवून फिरवणे अथवा लाकडी ओंडक्यांसारख्या जड वस्तू वाहून नेणे अशा गोष्टींसाठी हत्तींचा वापर केला जातो. महाकाय आणि शक्तिशाली असलेलं हे जनावर सहजासहजी माणसाळत नाही. फासे टाकणे, खड्डा खोदून त्यात सापळा लावून त्यांना पकडणे अशा मार्गांनी त्यांना आधी बंदिस्त करावं लागतं आणि त्यानंतर सुरु होते त्यांच्यावर हुकमत गाजवण्यासाठी, त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी केली जाणारी अघोरी प्रक्रिया. पकडलेल्या हत्तीला साखळदंडाने बांधून एका छोट्या लाकडी पिंजऱ्यामध्ये कोंडलं जातं. त्यानंतर उपाशी ठेवणे, भाल्यांनी टोचणे, झोपू न देणे अशा मार्गांनी त्याचा अनन्वित छळ केला जातो. इंग्रजीमध्ये याला “ब्रेकिंग द स्पिरिट ऑफ द एलिफंट” म्हणजे हत्तीची आंतरिक उर्मी आणि जिजिविषा नष्ट करणे असं म्हणतात. या सर्व क्रूर प्रक्रियेला ‘ फजान ‘ असं म्हणतात.

मी पहात असलेल्या लघुपटामध्ये त्या प्रशिक्षण केंद्राचा प्रमुख कार्यक्रमाच्या निवेदकाला माहिती देत होता. एके ठिकाणी एक प्रचंड मोठा, लांबलचक सुळे असलेला हत्ती उभा होता. निवेदकाच्या लक्षात आलं की त्याच्या पायात एक जाडजूड साखळदंड बांधलेला आहे पण तो दुसऱ्या बाजूला कुठेच बांधलेला नसूनही तो हत्ती इंचभरही जागचा हालत नाहीये.  त्यानी ,”हे कसं” असं आश्चर्याने विचारलं तेव्हा केंद्रप्रमुख म्हणाला,” ती साखळी फक्त त्याच्या पायात अडकवलेली पुरेशी असते. ती दुसरीकडे बांधायची गरज नसते. ती साखळी त्याच्या पायात आहे याची नुसती जाणीव त्याला असली की तो जागच्या जागी उभा राहतो!”

लघुपट संपला आणि मी अंतर्मुख झालो. ही अशीच साखळी आपल्या विस्तृत, खंडप्राय देशाच्या पायात अडकवून इंग्रज निघून गेले. 1947 साली त्यांनी ती दुसऱ्या बाजूने सोडली तरी अजूनही आपल्या मनात ती काल्पनिक शृंखला बांधलेलीच आहे. 1835 साली लॉर्ड मेकॉलेने अतिशय धूर्तपणे या देशाच्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केला. इंग्रजी भाषेला सर्वोच्च दर्जा दिला गेला. स्थानिक भाषांचं महत्त्व पद्धतशीरपणे छाटलं गेलं. इंग्रजी भाषेचा साखळदंड आपण अजूनही पायात दिमाखात मिरवतो. आपल्या समृद्ध स्थानिक भाषांमध्ये व्यवहार करणं आपण कमीपणाचं समजतो. भाषेबरोबर तिच्याशी निगडित संस्कृती आली आणि झालं आपल्या राष्ट्रीय अस्मितेचं आणि क्षमतेचं खच्चीकरण. इंग्रजांनी आपला सामूहिक आत्मविश्वास इतका नष्ट केला की स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षं होऊनही बरेचसे नियम आणि अधिनियम इंग्रज राजवटीमध्ये अंमलात असलेले अजूनही आपण वापरतो. मोटार वाहन अधिनियम इंग्रजांनी 1919 साली बनवला आणि तो स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष तसाच राबवला जात होता.

वैयक्तिक जीवनात अशी काल्पनिक साखळी मनात बांधून जगणारे अनेक जण आहेत. राहुलचंच उदाहरण बघा ना.

काही दिवसांपूर्वी अतिशय विष्षण मनोवस्थेमध्ये मला भेटायला आला होता. एका बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची उत्तम नोकरी होती. परंतु कुठल्यातरी गूढ तणावाखाली असल्याच्या खुणा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. मी विचारलं,” काय रे राहुल, इतका चिंताग्रस्त का तू?”  “माझ्या बॉसला मी प्रचंड घाबरतो.आज नोकरी लागून दहा वर्ष झाली तरीसुद्धा तो मला रागवेल, वाईट साईट बोलेल अशी उगीचच भीती सतत मनात असते. खरंतर माझ्यावाचून त्याचं पान हलत नाही; पण मी मात्र निष्कारण तणावाखाली जगतो.”

मी म्हटलं,” पण तू तर त्या ऑफिसमधला एक महत्त्वाचा दुवा आहेस. तुला असं राहण्याचं कारणच काय?”

“मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा पहिल्या सहा महिन्यांमध्ये माझा बॉस माझ्यावर येता जाता उगाचच डाफरत असे. ती दहशत अजूनही माझ्या  मनात खोलवर रुजलेली आहे. मी त्यातून बाहेर पडू शकत नाहीये. तो नवीन येणाऱ्या  सगळ्यांनाच अशी वागणूक देतो, हे मी पाहिलंय.” “म्हणजे तुझ्या बॉसने तुझं फजान केलं तर.” असं म्हणून मी राहुलला हत्तीची गोष्ट सांगितली. “ती साखळी नाहीच आहे, खरं तुझ्या पायात. तू ज्या क्षणी ती मनाने काढून टाकशील त्या क्षणी एका मुक्त मनाचा जन्म होईल. आत्ताच्या आत्ता, या क्षणी ते तू कर राहुल”. 

माझ्या नजरेला नजर देत त्यानी रोखून पाहिलं आणि फक्त ” येस्स्ssss” असं म्हणत तो निघून गेला.

योगायोग असा की त्यानंतर दोन दिवसांनी रूपालीची भेट झाली. तीसुद्धा अशाच कुठल्यातरी दबावाखाली असल्याची चिन्हं मी ओळखली.

“माझं लग्न होऊन मी सासरी आले आणि माझ्या सासूबाईंनी पहिल्या  वर्षात माझा पूर्ण ताबा घेतला. मला कुठलंच स्वातंत्र्य नव्हतं. साध्या साध्या गोष्टीत त्यांची सतत दादागिरी असे. खरंतर आज लग्नानंतर दहा वर्षांनी मी त्यांच्यावर कुठल्याच दृष्टीने अवलंबून नाही. माझं स्वतःचं करियर आहे, अस्तित्व आहे आणि आर्थिक स्वातंत्र्यही आहे. पण तरीसुद्धा माझ्या मनात भीती असते, त्या मला कशावरून तरी बोलतील. आता खरं तर त्या तशा वागतही नाहीत. पण मी ही मनातली बेडी कशी झुगारून देऊ?”

मी मनात म्हटलं ,”हे अजून एकाचं फजान. “

राहुलला जे सांगितलं तीच गोष्ट  मी रुपालीला ऐकवली. “रूपाली सासूबाईंनी फजान केलं तुझं. फेकून दे ती मनातली साखळी.”  अचानक साक्षात्कार व्हावा, याप्रमाणे ती दुर्दम्य आत्मविश्वास आणि दृढनिश्चय मनात घेऊन माझ्या समोरून गेली.

काही महिन्यांनी दोघेही भेटले. दोघांचेही पहिलं वाक्य तेच होतं. “काका, फजान संपलं. साखळी आता पायातही नाही आणि मनातही.”

आपल्या देशाच्या पायातीलही ती मायावी शृंखला गळून पडण्याची मी आशेने वाट पाहतोय.

लेखक :  डॉ. शिरीष भावे

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मिरजेतला उदास आपलेपणा… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ मिरजेतला उदास आपलेपणा… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर 

वडिलांच्या बदलीचा हुकूमनामा आमची इवलीशी आयुष्ये ढवळून टाकीत असे. पुण्यातल्या नूतन मराठी विद्यालयाच्या लहान शाळेत चौथीच्या वर्गातून मिरजसारख्या ठिकाणी जायचा आदेश जरा जास्तच जाचक वाटला. छानसा गणवेश, शाळेत पोहोचवायला-आणायला घरची माणसे, डबा, दप्तर, मातकामाचा वर्ग, सवंगडी या सौख्यातून उठून जाऊन मिरजेच्या शाळेत गेले, तेव्हा जीव घुसमटला.

मिरजमधला दिवाण जोशींचा भला मोठा वाडा अंधारात बुडून जाई. माडीवरच्या बाल्कनीत उभे राहिले, की शहरही अंधारात बुडल्यासारखे वाटत असे. पुण्याची आठवण येऊन जीव कासावीस होई. तिथून मिरजेचा मिरासाहेबांचा दर्गा दिसे. रात्री घुमटावरचा हिरवा दिवा पाहून अंधार अधिकच गडद होई. अशावेळी माझा सांगाती रेडिओ असे आणि रेडिओ सिलोन माझ्या सांत्वनासाठी चित्रपटसंगीताची भरगच्च शिदोरी घेऊन येत असे. रेडिओचे निवेदक मला एकेक गाण्याची अचूक माहिती पुरवीत असत. त्या वेळी जुन्या गाण्यांची अन आगामी चित्रपटांतल्या गाण्यांची बरसात होत असे.

त्या वेळी ‘फागुन’ चित्रपटातली गाणी रेडिओवर प्रचंड वाजत असत. माझ्या बालपणाने एक बोट शंकर-जयकिशनच्या हाती दिले होते – दुसरे ओ. पी. नय्यरने पकडले. ‘पिया पिया ना लागे मोरा जिया’, ‘इक परदेसी मेरा दिल ले गया’, ‘छुन-छुन घुॅंगरू बोले’, अशी गाणी कितीदा तरी ऐकू येत. अशाच एका उदास संध्याकाळी ‘फागुन’ मधले गाणे लागले- ‘मैं सोया अखियाँ मींचे’- ‘तेरी जुल्फों के नीचे’ आशा-रफीच्या युगलगीतातल्या संथ लयीने माझे इवलेसे हृदय हलले. ‘ये कौन हँसी शरमाया, तारों को पसीना आया… ‘ त्यातल्या नर्म शृंगार, प्रणय, शब्दांतून झिरपणारी प्रेमभावना, याबद्दल माझे बालमन पूर्णपणे अनभिज्ञ होते. जुल्फें, बाहें… याबद्दल अगदी बेखबर ; पण पुणे सोडून आलेले नव्या दुनियेत एकाकी विहरणारे माझे मन त्या गाण्यातल्या शब्दसुरांकडे झेपावले. मग मी रोज विशिष्ट वेळी त्या गाण्याची वाट पाहू लागले.

अशा वेळी आणखी एका गाण्याने मला खुणावले. ‘चंपाकली’ चित्रपटातले लताचे ‘छुप गया कोई रे, दूरसे पुकारके, दर्द अनोखे हाय, दे गया प्यार के… ‘ माझ्या मनात त्या ‘दर्द’ ने हलकेच प्रवेश केला असावा आणि शब्दार्थ- भावार्थ ओलांडून ते गीत मला आणखी उदास करीत राहिले अन कधी-कधी थोपटत राहिले.

हळूहळू मिरजदेखील आपलेसे वाटू लागले. मित्र-मैत्रिणी, बाई, मास्तर, यांचे वर्तुळ जमू लागले. रेडिओ सिलोननी सुवर्णकालाच्या संगीताची टांकसाळ माझ्यासाठी खुली केली होती. अमर, देवल चित्रपटगृहांत पोस्टर्स झळकू लागताच त्यातल्या एकेका गाण्याचे तपशील माझ्या जिभेवर हजर असत आणि गाण्यांनी माझे अवघे जग भारून जाई.

एके दिवशी सामानाची बांधाबांध पुन्हा सुरु झाली. अंबाबाईचे देऊळ, मिरासाहेबांच्या दर्ग्याचा उरूस, किल्ल्यातले आत्याचे भले मोठे घर, तिच्या कानडी भाषक घरातले खमंग पुरणाचे कडबू, बसप्पा, मलप्पा चौगुलेंचे पेढे… अशा मिरजेकडे पाठ फिरवून पुण्यात आलो. पुढच्या घटनांनी आयुष्य भरून गेले. चित्रपटगीतांनी भरभरून माप पदरात टाकले. त्या गाण्यातून जीवनाचा वेध घेण्याचा छंद जडला. सळसळत्या वृक्षांतून जीवनरस मिळवावा, तसा गाण्यांचा अक्षय्य ठेवा लाभला. मिरजेत ऐकलेल्या गाण्यांचे अर्थ उमगत राहिले.

‘आज है सुनी सुनी दिलकी ये गलियां 

बन गयी कांटे मेरी खुशियो की कलियां 

हाय! याही तो मेरे दिन थे सिंगार के… ‘

… हे पुन्हापुन्हा ऐकताना मनात असोशी भरून राहायची.

‘मुस्कुराओ के जी नहीं लगता’ सारख्या गाण्यासाठी मी माझी सारी व्यवधाने दूर ठेवायची. चित्रपटाचे प्रवाह बदलले अन आपल्या जीवनाचेदेखील. कृष्णधवल चित्रपट गेले; रंगीत आले. अँग्री यंग मॅनच्या युगाचे उदयास्त झाले. तरीदेखील सुवर्णयुगाच्या चित्रपटगीतांनी खिशातली नाणी खुळखुळत राहिली. आपल्या श्रीमंतीला ओहोटी लागलीच नाही, असे वाटत राहिले. त्या श्रीमंतीला आणखी एक मोरपीस लागले.

ज्यांची नावे गाण्यापाठोपाठ निवेदक ऐकवीत राहायचा, त्यांना प्रत्यक्ष भेटायचे योग् आले. पुढे तो माझ्या कामाचा एक भाग झाला. भेटी, मुलाखती, लेखन आणि पुन्हा गाण्याच्या आनंदाची मैफल होत राहिली. बाहेरच्या अपमानाचे, उपेक्षांचे बाण परतवून लावणारा अक्षय्य भाता माझ्या जवळ होता ना ! 

एके दिवशी मुंबईतल्या संगीतप्रेमी स्नेह्याने निरोप पाठवला.. त्या संध्याकाळी आठवणी जागवायला जमलेल्यांमध्ये वयोवृद्ध कवी प्रदीप होते. संगीतकार अनिल विश्वास मीनाजींबरोबर हजर होते. मोती सागर, सितारादेवी, शायर कमर जलालाबादी होते. गप्पांची मैफल रंगात आलेली होती. शेरोशायरी, विनोद यांना बहर आला होता. ‘रोटी’ मधला सितारादेवींचा हृदयस्पर्शी रोल, ‘दूर हटो ऐ दुनियावलों’ ची छपन्न कडवी लिहून आणणारे कवी प्रदीप, अनिलदांनी ऐकवलेली फैज अहमद फैज यांची गझल.. मैफल रंगात आली होती. चहापानाच्या वेळी मी कमरसाहेबांना ‘जलती निशानी’ मधल्या लताच्या ‘रूठ के तुम तो चल दिये’ बद्दल छेडले… हे गाणे आठवते का विचारले. त्यांनी अनिलदांकडे पाहिले. म्हणाले, “कसे विसरणार? चित्रपट पहिल्याच शोनंतर कोसळला होता !” … त्या दोघांना हसू आवरेना. अनिलदांनी त्याला संगीत दिलेले होते.

हरवून गेलेल्या चित्रपटांतली अविस्मरणीय गाणी… सोन्यासारखी गाणी… तीच तर माझ्याजवळ आहेत.

‘हे माझे कुँवार डोळे-तुझ्याशी नजर मिळवताना खाली झुकले आहेत. हरले आहेत. तू माझा जन्मोजन्मीचा साथीदार आहेस ना… मग, चल, माझ्या भांगात चांदण्या भर… ‘ … अशा अर्थाची गाण्यातली ओळ चित्रपटसंगीताच्या फार मोठ्या ‘बिझिनेस’ मधून मी हलकेच गाठीशी बांधते. फार लहानपणीचा दर्ग्याच्या घुमटावरचा दिवा आठवतो. त्याला लपेटलेला अंधार आठवतो; पण त्याहीवेळी आपण उगाच उदास का झालो होतो, ते कळत नाही…

आजदेखील गाणे ऐकताना डोळे का भरतात… ? छे ! या वयात मन आवरायला शिकले पाहिजे…

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares